tag:blogger.com,1999:blog-30800111279791508762024-03-06T13:41:32.240+05:30नोंदी सिद्धारामच्या...राम राम, वाचनात आलेले काही लेख, बातम्या येथे मांडतो, कधी कधी स्वत: लिहितो. विचारांशी सहमत असाल तर टिपण्णी द्या; असहमत असाल तर मत मांडा. कारण, आधी विचार जन्म घेतात, मग कृती !psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.comBlogger656125tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-40847314190434353772022-06-29T00:52:00.001+05:302022-06-29T00:52:18.703+05:30ऋषी बंकिमचंद्र चरित्र ग्रंथाचे सुनील देवधर यांच्या हस्ते प्रकाशन <p><span style="color: #660000; font-size: large;"><b>बंकिमचंद्रांनी वंदे मातरम् मंत्र दिला, त्यातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली</b></span></p><p><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbFVbDRAGlkxtRH5gUXsuVLlDk4-p-Cj9y1CbWpZ29dhIRmDeTCHqrkI6160SxKfL_dpq8mByEsd1OIDSltImMtWHyxkHJ-lssIl06nou0WqWZVGJcCBJ5bODtEyWSUc4ShLggWMQcnqCMXsdaPGvtB_g_-ExQK1_HbdE-6tGin5MBWCWNKbaGdaM-NA/s3637/bankim.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1920" data-original-width="3637" height="169" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjbFVbDRAGlkxtRH5gUXsuVLlDk4-p-Cj9y1CbWpZ29dhIRmDeTCHqrkI6160SxKfL_dpq8mByEsd1OIDSltImMtWHyxkHJ-lssIl06nou0WqWZVGJcCBJ5bODtEyWSUc4ShLggWMQcnqCMXsdaPGvtB_g_-ExQK1_HbdE-6tGin5MBWCWNKbaGdaM-NA/s320/bankim.jpg" width="320" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="text-align: left;">‘ऋषी बंकिमचंद्र' ग्रंथाचे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे प्रकाशन करताना जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेचे संतोष जाधव, डेक्कन एज्युकेश सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, वक्ते सुनील देवधर, लेखक मिलिंद सबनीस आणि प्रकृती केअरचे डॉ. ज्ञानोबा मुंडे.</span></td></tr></tbody></table><br /><span style="color: #0c343d; font-size: medium;"><br /></span></p><p><span style="color: #0c343d; font-size: medium;">पुणे | कृतज्ञता हा भारताचा स्थायीभाव आहे. कुटुंबातील आई ही कृतज्ञतेचे मूर्तीमंत रूप आहे. ऋषी बंकिमचंद्र यांनी भारत देशाला मातेच्या, आदिशक्तीच्या रूपात पाहिले. ‘वंदे मातरम्' हा मंत्र दिला. या महामंत्रातूनच स्वातंत्र्याची उर्मी जागली. वंदे मातरम् हा वंगभंग आंदोलनाचा आत्मा होता. यातूनच लाल, बाल आणि पाल यांचे नेतृत्व पुढे आले. बंकिमचंद्रांचे चरित्र प्रेरक आणि स्फूर्तीदायी असल्याने ते घराघरात पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन ईशान्य भारतातील नेते व अभ्यासक सुनील देवधर यांनी केले.</span></p><p>पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ऐतिहासिक अॅम्फी थिएटरमध्ये जटायु अक्षरसेवा प्रकाशन संस्थेने आयोजित केलेल्या ऋषी बंकिमचंद्र या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे धनंजय कुलकर्णी, प्रकृती केअर फाउंडेशनचे डाॅ. ज्ञानोबा मुंडे जटायुचे संतोष जाधव आणि वंदे मातरम््चे अभ्यासक व ग्रंथाचे लेखक मिलिंद सबनीय यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि बंकिमचंद्र जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.</p><p>यावेळी देवधर म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शाश्वत विचारांची मांडणी केली आहे. या विचारांना आचरणात आणणाऱ्या समाजाची आज आवश्यकता आहे. राष्ट्रीय विचारांची प्रभावी मांडणी होण्यासाठी तरुणांनी सोशल मीडिया योद्धा बनण्याची गरज आहे. हिंदूंचे सैनिकीकरण झाले पाहिजे, यासाठी शस्त्र म्हणून कायद्याचे प्राथमिक ज्ञान करून घ्या, माहिती अधिकार कायदा जाणून घ्या. </p><p>लेखक मिलिंद सबनीस यांनी ग्रंथलेखनामागील भूमिका सांगितली. संतोष जाधव यांनी प्रास्ताविक तर डॉ. रवींद्र मिणियार यांनी परिचय करून दिला. सूत्रसंचालन सिद्धाराम पाटील तर आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता हिमानी नांदे यांनी गायलेल्या वंदेमातरम्ने झाली.</p><p><b><span style="color: #0c343d; font-size: medium;">पवारांना पगडीचा राग येतो म्हणून पगडी घालूनच बोलणार</span></b></p><p>प्रारंभी देवधर यांचा बह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी हा ग्रंथ आणि पुणेरी पगडी देऊन सत्कार झाला. हा धागा पकडून देवधर म्हणाले, शरद पवार यांना पुणेरी पगडी पाहिली की राग येतो, असे ऐकिवात आहे. ते समाज तोडणारे नेते आहेत. त्यांना खूप राग यावा म्हणून मी पूर्णवेळ पगडी घालूनच बोलणार आहे, असे सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. </p><p>पुस्तकाचे नाव - ऋषी बंकिमचंद्र<br />लेखक - मिलिंद सबनीस<br />प्रकाशक - जटायु अक्षरसेवा<br />मूल्य - ५९९<br /><span style="background-color: #fcff01;">सवलतीत - ४९९ (टपाल खर्चासह)</span></p><p>पुस्तक मागवण्यासाठी <a href="http://jataau.com/shop/rishi-bankim"><span style="font-size: medium;">jataau.com/shop/rishi-bankim</span></a></p><p>9767284038 व्हाटस् अॅप क्रमांकावर संपर्क करूनही पुस्तक मागवू शकता.</p>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-77720994918996822782022-05-10T08:47:00.003+05:302022-05-10T08:50:34.745+05:30ओळख वंदे मातरम् रचेत्या ऋषी लेखकाच्या चरित्राची / ऋषी बंकिमचंद्र<p> </p><div><span style="color: #cc0000; font-size: medium;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDNNIlQqt1pX6TJ8_LW0JZXlMV-oz2duU7UMeHovElrvy_5_7OE8KqKSCTLHVqGqsxaIAubpTDsXNqOaPLXBLLvHq2rq5zgZ4L_0O8Orz3GJdN0-9Nkf7Y1Whq8wpmbQcooVAuVunxKinKXYeDLVkb8RWCeO_VHCpanuJhpHALqjjhqsagnkpqr2KayQ/s2598/Bankim%20Chandra%20cover.jpg" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="2598" data-original-width="1701" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhDNNIlQqt1pX6TJ8_LW0JZXlMV-oz2duU7UMeHovElrvy_5_7OE8KqKSCTLHVqGqsxaIAubpTDsXNqOaPLXBLLvHq2rq5zgZ4L_0O8Orz3GJdN0-9Nkf7Y1Whq8wpmbQcooVAuVunxKinKXYeDLVkb8RWCeO_VHCpanuJhpHALqjjhqsagnkpqr2KayQ/s320/Bankim%20Chandra%20cover.jpg" width="210" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">ऋषी बंकिमचंद्र</td></tr></tbody></table></span></span></div><div><span style="color: #cc0000; font-size: medium;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><b>पाच पिढ्या लोटल्या. बंकिमचंद्रांबद्दल दोन ओळींचीच माहिती पुढे आली. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले. आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीतील हे गीत आहे.. या त्या दोन ओळी. गेल्या 128 वर्षांत मराठी भाषेत एकही चरित्र ग्रंथ प्रकाशित झाला नाही.</b></span></span></div><div><span style="color: #20124d; font-size: medium;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><br /></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><b>भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा - वंदे मातरम्च्या रचेत्याचे प्रेरक चरित्र स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रकाशित करायचे जटायु अक्षरसेवाने ठरवले. ऋषी बंकिमचंद्र या नावाने ते प्रकाशित होत आहे. वंदे मातरम् आणि बंकिमचंद्र यांच्यावर दोन तपाहून अधिक काळ अभ्यास करणारे तपस्वी लेखक मिलिंद सबनीस यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे चरित्रग्रंथ साकार झाले आहे. या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा लेख येथे सादर आहे.</b></span></span></div><div><br /></div><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;" /><h4><span style="font-size: medium;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><span style="color: #990000;">ग्रंथाचे नाव :</span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> ऋषी बंकिमचंद्र<br /></span><span style="color: #990000;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">लेखक </span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">:</span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> मिलिंद सबनीस<br /></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><span style="color: #660000;">प्रकाशक </span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">:</span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> जटायु अक्षरसेवा<br /></span><span style="color: #222222;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">पृष्ठे </span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">:</span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> सुमारे 240<br /></span><span style="color: #0c343d;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">मूल्य </span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;">:</span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> 599/-<br /></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><span style="color: #cc0000;">सवलत मूल्यात घरपोच मागवा :</span></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"> 499/-<br /></span><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">संपर्क<span> </span>: 9767284038<br /></span>UPI : jataa108@uboi</span></h4><div><span style="font-size: medium;"><br /></span></div><div><h3><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><b><span style="color: #2b00fe; font-size: large;">एका अलौकिक स्फुरणाचे स्मरण</span></b></span></h3><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif; font-size: small;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">सुमारे बाराशे वर्षांच्या चिवट संघर्षानंतर भारतीय स्वातंत्र्यवीरांनी प्राप्त केलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 15 ऑगस्ट 2022 रोजी आपण साजरा करत आहोत. यानिमित्ताने त्या हजार-बाराशे वर्षांमध्ये भारताच्या राष्ट्रीय स्वाभिमानाची ज्योत प्रखरतेने तेवत ठेवण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे समर्पण करणार्या हजारो वीरांचे, योद्ध्यांचे कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचेच कर्तव्य आहे. या कर्तव्याच्या अनुषंगाने ‘जटायु अक्षरसेवा’ या प्रकाशन संस्थेतर्फे ज्येष्ठ लेखक, अभ्यासक मिलिंद सबनीस यांनी लिहिलेले वंदे मातरमचे उद्गाते, आनंदमठकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे चरित्र प्रकाशित केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला केलेले हे अनोखे अभिवादन आहे, असे म्हटले पाहिजे. याबद्दल या चरित्रग्रंथाच्या निर्मितीत पुढाकार घेतलेले सिद्धाराम पाटील आणि मिलिंद सबनीस यांचे हार्दिक अभिनंदन.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">या उपक्रमाला अनोखे अभिवादन म्हणण्याची अनेक कारणे आहेत. </span></div><div><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">सर्वात पहिले म्हणजे बंकिमचंद्र यांचे मराठीत प्रसिद्ध होत असलेले हे पहिलेच चरित्र आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे या पुस्तकाच्या शीर्षकाद्वारे बंकिमचंद्रांना लेखकाने सहर्ष आणि साभिमान प्रदान केलेली ‘ऋषी’ ही श्रेष्ठ उपाधी! बंकिमचंद्रांना राष्ट्र निर्माता आणि ऋषी या दोन विशेषणांनी गौरव केला तो महर्षी अरविंद यांनी! त्यासंदर्भात योगी अरविंदांनी ऋषी या संज्ञेची केलेली मीमांसा सबनीस यांनी आवर्जून या पुस्तकात नमूद केली आहे. अनोखेपणाचे तिसरे आणि सर्वात महत्वाचे कारण म्हणजे अर्थातच या पुस्तकातील मांडणीचा आशय आणि त्याद्वारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या देखण्या चरित्राचे उलगडलेले विविध विलोभनीय पैलू!</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी अत्यंत प्रत्ययकारी कविता लिहिणार्या शालेय वयातील बंकिमचे साहित्यगुण त्यांचे गुरू, ज्येष्ठ साहित्यिक आणि संपादक ईश्वरचंद्र गुप्त यांनी ओळखले आणि त्यांनीच त्याला पद्याबरोबरच गद्य लेखनही सुरू कर, असा सल्ला दिला. गुरूच्या संदेशाशी बंकिमचंद्रांच्या लेखणीने पूर्ण इमान राखले. इतके की, ‘आधुनिक कादंबरीचे जनक’ असे अजरामर स्थानच तिने बंकिमचंद्रांना प्राप्त करून दिले. कादंबरी शिवाय कथा, विनोदी लेख, विज्ञान, टीकात्मक लेख, निबंध, ललित लेख असे गद्य वाङ्मयाचे जवळजवळ सर्व प्रकार बंकिमचंद्र यांनी अत्यंत प्रभावीपणे हाताळले. दोन पृष्ठांच्या निबंधापासून ते 434 पृष्ठांच्या महाकादंबरीपर्यंत विविध आकाराच्या विस्ताराचे त्यांचे लेखन तितकेच प्रभावी आणि प्रत्ययकारी असे. ‘बंगदर्शन’सारखे साहित्यिक नियतकालिक अत्यंत समृद्ध स्वरूपात सादर करून त्यांनी आपले संपादकीय नैपुण्यही अधोरेखित केले.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">सामान्यतः कथा, कादंबरी, ललितलेख यासारखे साहित्य रंजनप्रधान आणि लोकप्रियतेचा अनुनय करणारे आढळते. मात्र बंकिमचंद्र यांच्या कादंबर्या विविध साहित्य रसांचा उत्तम परिपोष करतात आणि त्याचबरोबर प्रबोधन, सामाजिकता आणि राष्ट्रीयता यांचे जागरण, पराक्रम-वीरता यांचे संवर्धन, धर्माचा आधुनिक विचार-प्रसार तसेच जेत्यांनी लिहिलेल्या भ्रामक इतिहासाचा पर्दाफाश... यासारख्या राष्ट्रप्रेमी सामाजिकतेचेही संवर्धन करतात.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">दुर्गेश नंदिनी या पहिल्या कादंबरीपासून कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आदी सर्व कादंबर्यांचे अत्यंत धावते परंतु समर्पक रसग्रहण करीत मिलिंद सबनीस यांनी बंकिमचंद्र यांच्या लेखणीचे हे विशेष सोदाहरण उलगडून दाखवले आहेत. आर्य चाणक्याने जागवलेल्या एकराष्ट्रीयतेच्या प्रेरणेशी साधर्म्य दर्शवणारे, जवळीक साधणारे लेखन बंकिमदांनी केले असल्याचे अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण मिलिंद सबनीस यांनी नोंदवले आहे.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">बंकिमचंद्रांनी इंग्रजी प्रशासनाची चाकरी पत्करली हे खरे; परंतु आपल्या देशभक्ती आणि राष्ट्रभावना तसेच तिचा आपल्या साहित्यातून प्रसार यांच्याआड ती नोकरी येऊ दिली नाही. तसेच नोकरीच्या माध्यमातून आलेली न्यायदानाची जबाबदारी निष्ठेने पार पाडताना ब्रिटीश अधिकार्यांना दंड, शिक्षा फर्मावतानाही कोणत्याही दडपणाचा दबाव बाळगला नाही. यामुळे अधिकार्यांची नाराजी त्यांना पत्करावी लागली. परंतु त्यांच्या कठोर कर्तव्यदक्ष कारभारामुळे आणि प्रतिमेमुळे त्यांच्या नोकरीवर शासनाकडून कधीच गदा आली नाही. सतत बदल्यांच्या रूपाने काही प्रमाणात त्याची शिक्षा त्यांना अनुभवावी लागली. पण तीही त्यांनी विनातक्रार सहन केली. मात्र आपला न्यायनिष्ठेचा बाणा त्यांनी सोडला नाही. त्यांच्या या समतोलाचेही उत्कृष्ट वर्णन मिलिंद सबनीस यांनी केले आहे.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">उपासकाच्या रूपात बंकिमचंद्र हे विष्णूभक्त-वैष्णव होते. परंतु विष्णूची आराधना करतानाही त्यांनी दुष्टांचे निर्दालन आणि पृथ्वीच्या उद्धारासाठी कर्मयोगाचा संदेश देणार्या विष्णू रूपाचाच पुरस्कार आपल्या साहित्यातून केला. ‘आनंदमठ’मधील संन्यासी संतान (संथाळ) वैष्णवधर्मीच आहेत. या संतांनांच्या उठावाचे नेतृत्व करणारे वृद्ध संन्यासी सत्यानंद यांच्या तोंडी बंकिमदांनी अर्थपूर्ण वक्तव्याद्वारे वैष्णव धर्माचे उत्तम विश्लेषण मांडले आहे. स्वामी सत्यानंद म्हणतात, “खर्या वैष्णव धर्माचे लक्षण म्हणजे दुष्टांचे निर्दालन आणि या धरणीमातेचा उद्धार! कारण जगाचा पालनकर्ता विष्णू आहे. त्याने दहा अवतार घेऊन या जगाचा उद्धार केला. केसरी, हिरण्यकश्यपू, मधुकैटभ इत्यादी दैत्यांचा नाश त्यानेच केला. रावण, कंस आदी राक्षसांना त्यांनीच मारले. तोच जेता आणि पृथ्वीचा उद्धारकर्ता आणि तोच आहे संतानांचे इष्टदेवता... संतानांचा विष्णू केवळ शक्तीरूपी आहे...”</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">‘आनंदमठ’च्या माध्यमातून बंकिमदांनी एका बाजूने शक्तीच्या उपासनेचा आणि त्या शक्तीच्या अधिष्ठानावर इंग्रजांचे वर्चस्व झुगारून देणार्या चळवळीची प्रेरणा जागविली, तर दुसर्या बाजूने त्या चळवळीला सात्विक सामर्थ्य प्रदान करणारा ‘वंदे मातरम्’ हा पंचाक्षरी मंत्र उजागर केला. स्वाभाविकपणे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या चरित्रकथेचा सर्वात मोठा भाग ‘वंदे मातरम्’ने व्यापला आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीची सारी इमारतच मुळी वंदे मातरमच्या भक्कम पायावर उभी राहिली आणि यशस्वी फलनिष्पत्तीकडे गेली.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">वंदे मातरम् या गीताने काय काय आणि कोणा कोणाला प्रेरित केले याची सूची फार मोठी आहे. राष्ट्रयोगी महर्षी अरविंद, गुरूदेव रवींद्रनाथ टागोर, भगिनी निवेदिता, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि अनेकानेक क्रांतीकारक यांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत वंदे मातरमने प्रज्वलित केली. 1902 साली रवींद्रनाथ टागोर यांच्या घरी झालेल्या एका देशभक्त समूहाच्या बैठकीत ‘अनुशीलन समिती’ या क्रांतिकारक संघटनेची स्थापना झाली. योगी अरविंद घोष या बैठकीला उपस्थित होते. या संघटनेच्या नावातील ‘अनुशीलन’ या शब्दाचा स्वीकार बंकिमचंद्र यांच्या लेखातल्या शीर्षकातूनच केला गेला होता.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">दक्षिणेचे वासुदेव बळवंत फडके म्हणून ओळखले जाणारे अल्लुरी सीताराम राजू या आदिवासी लढवय्या क्रांतीकारकांनी आनंदमठ वाचूनच संन्यास ग्रहण केला आणि ब्रिटीशांचे राज्य उलथवण्यासाठी सशस्त्र चळवळ हाती घेतली. कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि कलकत्ता युनिवर्सिटीचे कुलगुरू गुरूदास बॅनर्जी यांनी बंकिमचंद्र यांचा उल्लेख ‘ऋषी बंकिम’ असा केला होता. अनुशीलन समितीतर्फे ‘युगांतर’ हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले होते. त्या वृत्तपत्राचे संपादक पद काही काळ स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्रनाथ दत्त यांनी भूषवले होते. 1905च्या डिसेंबरमध्ये बनारस येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भगिनी निवेदिता यांनी भारताचा जो ध्वज फडकवला (या ध्वजाची रचना स्वतः निवेदितांनी केले होते), त्यावर मध्यभागी ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे रेखांकित केली होती. त्याआधी ऑगस्ट 1905 मध्ये वंगभंग विरोधी उभ्या राहिलेल्या चळवळीची प्रचारसभा कलकत्त्यात झाली. त्यासोबत वंदे मातरमचा उद्घोष उच्च स्वराने केला गेला. वंगभंगविरोधी चळवळ भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला एक सुवर्णाध्याय आहे. त्या चळवळीचा मंत्रच मुळी वंदे मातरम हा होता. 1906 मध्ये बारिसाल येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरमचा गजर करणार्या कार्यकर्त्यांवर इंग्रज पोलिसांनी लाठीहल्ला केला. ब्रिटीश शासनाच्या उरात वंदे मातरम या घोषणेने जणू धडकीच भरली होती.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">1906 मध्येच वंगभंगाच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या सभेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी वंदे मातरम् मधोमध अंकित केलेलाच ध्वज फडकवला. एक वर्षानंतर 1907 मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत भारताच्या प्रतिनिधी या नात्याने मादाम भिकाजी रुस्तम कामा यांनी जो ध्वज फडकवला त्यावरही ‘वंदे मातरम’ हेच शब्द होते.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">एकोणीस वर्षांचा तरणाबांड खुदीराम बोस, लंडनमध्ये कर्झन वायलीवर गोळ्या झाडणारा तेजस्वी युवक मदनलाल धिंग्रा, रामप्रसाद बिस्मिल, अश्फाक उल्ला खान, राजेंद्र लाहीडी आदी क्रांतिकारकांनी वंदे मातरम्चा उद्घोष करीतच हौतात्म्य पत्करले. तर चितगाव येथील शस्त्रागारावर हल्ला करणारा सूत्रधार मास्टर सूर्यसेन यांची कथा तर अधिकच रोमांचक आहे. सूर्यसेनदांना फाशी देण्याच्या आदल्या रात्री 12 जानेवारी 1934 रोजी त्यांच्या कोठडीत नेत असताना ते वंदे मातरम्च्या घोषणा देत राहिले. त्यासाठी त्यांना अमानुष मारहाण जेलच्या अधिकार्यांनी केली. तरीही त्यांनी गर्जना थांबवली नाही. लाठ्यांच्या प्रहाराचा इतका वर्षाव त्यांच्यावर करण्यात आला की, शेवटी ते बेशुद्ध पडले. त्याच बेशुद्धावस्थेत त्यांना फासावर चढवण्यात आले. मिलिंद सबनीस यांनी वंदे मातरम्च्या प्रेरणेबाबतचा हा सारा तपशील अतिशय उद्बोधक रीतीने पुस्तकात नमूद केला आहे. नंदुरबारचा कोवळा किशोर शिरीषकुमार, कनकलता बरुआ ही आसामची बाल वीरांगणा यांनीही वंदे मातरम्च्या गजरातच ब्रिटीशांच्या गोळ्या झेलल्या.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">वंदे मातरम् या नावाने वृत्तपत्रसृष्टीला ही भुरळ घातली. या नावाचे पहिले साप्ताहिक बंगालमध्ये सुरू झाले. त्याचे पहिले संपादक बिपिनचंद्र पाल तर नंतरचे अरविंद घोष! 1908 मध्ये पुण्यातून, 1909 मध्ये जिनिव्हा येथून (मादाम कामा व श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंग्रजीत सुरू केले), 1914 मध्ये स्वित्झर्लंड येथून, 1920 मध्ये दिल्लीहून (लाला लजपतराय - हिंदीतून) वंदे मातरम् नावाची वृत्तपत्रे निघाली. वंदे मातरम् या शब्दसमुच्चयाचे आणि त्यातून व्यक्त होणार्या भावनेचे सामर्थ्य असे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रकट होऊ लागले ते साधारण विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापासून-1902 पासून. मात्र त्या सुप्त आणि सशक्त सामर्थ्याची जाणीव स्वतः बंकिमदांना मात्र त्या आधी किमान पंधरा वर्षांपासूनच स्पष्ट होती. 1890 मध्ये बंकिमचंद्र यांनी आपली कन्या शारदा कुमारीशी बोलताना, ‘एक दिवस तू पाहशील, दहा -वीस वर्षांच्या आतच या गीतामुळे सारा बंगाल पेटून उठेल. एकटा बंगालच काय, सारा हिंदुस्थान या गीतापासून स्फूर्ती घेईल. सारा देश एका सुरात हे गीत गाऊ लागेल...!’ या भाकितानंतर पंधरा वर्षांनी बंकिमदांचे हे शब्द अक्षरशः खरे ठरले.<div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXLxHjkdKXPEyITKJ5AZQbUKMMF94ESxap32i29EMM9sIdZP3rG_OZAF1DIg7f9BjXXKfyYkBfeDMtNO-lggS4bIeg1BZgBDyuAcHaAMV9EQvZgXXmc1HGNNizxgD1wx3eM3yLG1KUoJlUMiorV0XLsm3b6YVxV85QKzA0uLKiTg-C_DtugeMsi1VU6g/s1441/sm1.jpg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1441" data-original-width="749" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgXLxHjkdKXPEyITKJ5AZQbUKMMF94ESxap32i29EMM9sIdZP3rG_OZAF1DIg7f9BjXXKfyYkBfeDMtNO-lggS4bIeg1BZgBDyuAcHaAMV9EQvZgXXmc1HGNNizxgD1wx3eM3yLG1KUoJlUMiorV0XLsm3b6YVxV85QKzA0uLKiTg-C_DtugeMsi1VU6g/s320/sm1.jpg" width="166" /></a></div></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">बंकिमचंद्रांचेे भाचे शचिंद्रनाथ यांना तर त्यांनी म्हटले होते की, ‘माझे बाकी सारे लिखाण गंगेत बुडवले तरी चालेल; परंतु हे गीत मात्र शाश्वत ठरेल आणि देशाचे हृदय जिंकेल.’ केवढा प्रचंड आत्मविश्वास हा द्रष्टा लेखक आपल्या साहित्यकृतीबद्दल व्यक्त करीत होता!</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">आपल्या जन्मभूमीच्या मातीला माता स्वरूप बहाल करून देशभक्तीला मातृभक्तीचे रूप प्रदान करणारी उदात्तम भावना केवळ आणि केवळ भारतातच सर्वात प्रथम जन्माला आली, हे ऐतिहासिक सत्य आहे. वंदे मातरम् हे त्याच उदात्त भावनेचे स्फुरण आहे. याच स्फुरणाची प्रक्रिया आणि इतिहास अत्यंत मनोवेधक आहे. 1762 ते 1774 या काळात झालेल्या इंग्रज विरोधी संन्यासी-उठावाची पार्श्वभूमी कलकत्त्याच्या जवळच असलेल्या नैहाटी कांटलपाडा या आपल्या जन्मगावीच कार्तिक शुद्ध नवमी 7 नोव्हेंबर 1875 रोजी बंकिमचंद्रांना झालेले या बंगाली-संस्कृत मिश्र भाषेतील गीताचे स्फुरण, 1882 मध्ये त्या संन्यासी उठावावरच आधारलेल्या आनंदमठ या दिव्य कादंबरीत त्या गीताचा केलेला समावेश आणि मुख्यतः 1905 पासून वंगभंगाच्या चळवळीपासून थेट आजतागायत या पंचाक्षरी मंत्राने देशभक्त भारतीयांच्या हृदयाचा घेतलेला ठाव... हा सारा रोमहर्षक प्रवास अतिशय सुलभ भाषेत मराठी वाचकांसमोर साकार करणारे मिलिंद सबनीस आणि तो इतिहास पुस्तकरूपाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या उंबरठ्यापाशी सादर करणारे जटायु अक्षरसेवा हे दोन्ही शतशः अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या राष्ट्रकार्यास खूप खूप शुभेच्छा!</span></div><div><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;"><br /></span></div><div><span style="color: #222222;">( ग्रंथ मागवण्यासाठी संपर्क </span><span style="font-size: medium;"><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white; color: #222222;">: 9767284038</span></span>)</div><div><div><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span face="Arial, Helvetica, sans-serif" style="background-color: white;"><b><span style="color: #660000;">- अरुण करमरकर!!!!</span></b></span></div></div><br /><div><b style="color: #660000;">jataau.com/shop</b></div>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-35807099793496257462021-06-14T17:38:00.001+05:302021-06-14T17:39:57.054+05:30श्री रामजन्मभूमी ट्रस्ट, आरोप आणि वास्तव<p><span style="color: red; font-size: large;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><span style="color: red; font-size: large;"><a href="https://1.bp.blogspot.com/-N5c1jImCVHY/YMdF7T1utgI/AAAAAAAAJzY/dF8uY8vDE64VCUwP2iqZ9M4gUZQEX94pwCLcBGAsYHQ/s1300/Ram-janman-12.jpg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="731" data-original-width="1300" src="https://1.bp.blogspot.com/-N5c1jImCVHY/YMdF7T1utgI/AAAAAAAAJzY/dF8uY8vDE64VCUwP2iqZ9M4gUZQEX94pwCLcBGAsYHQ/s320/Ram-janman-12.jpg" width="320" /></a></span></div><b style="color: red;"><span style="font-size: large;"> <span style="font-family: "Divya Marathi Uni";">नेमके काय आहे प्रकरण</span></span></b><p></p><p><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="color: #0b5394; font-size: large;"><b>अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिर हे
शक्य तितके भव्य दिव्य व्हावे, ही समस्त रामभक्तांची भावना आहे. यासाठी
जन्मभूमीलगतचे काही भूखंड ट्रस्टने खरेदी केल्या आहेत. त्यातील १.२ एकर भूमीच्या
खरेदीसंदर्भात आरोप झाला आहे. आरोपाची कथानक अशा रीतीने रचण्यात आली आहे की
प्रथमदर्शनी घोटाळा झालेला असावा, असे वाटू शकते.</b></span></span></p><p><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">आम आदमी पक्षाच्या संजय सिंह आणि
समाजवादी पार्टीच्या पवन पांडेय यांनी आरोप केला की, “राम मंदिरासाठी जमीन खरेदीत
घोटाळा झाला आहे. १८ मार्च २०२१ रोजी पाच मिनिटांपूर्वी जी जमीन दोन कोटीत विकली
गेली तीच जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. पाचच मिनिटांत जमीन १६.५
कोटी रुपयांनी महाग झाली. या दोन्ही व्यवहारात डाॅ. अनिल मिश्रा हे साक्षीदार
आहेत. इत्यादि.’’ परंतु, ही माहिती अर्धसत्य आहे. नितीन त्रिपाठी या अभ्यासकाने आरोप
करणाऱ्यांची लबाडी नेमकेपणाने पकडली आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="background-color: #fcff01; font-family: "Divya Marathi Uni";">आरोप करणाऱ्यांनी १८ मार्च रोजी दोन
व्यवहार झाल्याचे म्हटले आहे. तिसरा व्यवहार आरोप करणाऱ्यांनी लपवला आहे. वास्तविक
पाहता तिसरा व्यवहार १८ मार्च रोजी सर्वात आधी झाला. या व्यवहारानुसार, कुसुम पाठक
व हरीश पाठक यांचे सुल्तान अंसारी बिल्डर आणि पार्टनरसोबत दोन कोटी रुपयाला
विक्रीचा जो करार होता तो निरस्त करण्यात आला.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="color: red; font-size: large;"><b><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">समाजायला सोपे व्हावे म्हणून क्रमाने
विषय समजून घेऊया.</span></b></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p><b> </b></o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><b>1 -</b> सन २०१९ मध्ये पाठक यांनी ही
जमीन दोन कोटी रुपयांत सुल्तान अन्सारी बिल्डर व अन्य ८ भागीदारांना विकण्यासंबंधी
करार रजिस्टर्ड केला. या प्रकरणी ५० लाख रुपये देण्यात आले. सर्वात महत्वाची गोष्ट
म्हणजे या वेळी अद्याप श्री रामजन्मभूमी संबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
लागलेला नव्हता. अर्थातच त्या वेळी अयोध्येतील जमीनाचे दर खूप कमी होते.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="font-size: large;"><b>2 –</b> दि. १८ मार्च २०२१ रोजी पाठक
यांनी हा करारनामा रद्द केला. हा करार रद्द झाल्याशिवाय पाठक यांना ही जमीन विकता
येणार नव्हती.<o:p></o:p></span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="font-size: large;"><b>3 –</b> मग त्याच दिवशी म्हणजे १८ मार्च
रोजी त्यांनी ही जमीन सुल्तान अन्सारी बिल्डरला याच दराने म्हणजे २ कोटी रुपयांना
विकली. <o:p></o:p></span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="font-size: large;"><b>4 – </b>मग सुल्तान अन्सारी यांच्याकडून
ही जमीन ट्रस्टने १८.५ कोटी रुपयांत खरेदी केली. <o:p></o:p></span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">दोन वर्षांपूर्वीची गोष्ट निराळी
होती. तेव्हा म्हणजे राममंदिर होईल की नाही याची काहीही खात्री नसताना त्या
जमिनीचा दोन कोटी रुपयांत व्यवहार झाला. आता सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्धपणे
श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिला आहे. त्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे धार्मिक
श्रद्धा केंद्र साकारले जाणार आहे. त्या भूमीशी जोडून असलेल्या १.२ एकर भूमीच्या
दरात प्रचंड वाढ होणे नैसर्गिक आहे. ती भूमी १८.५ कोटी रुपयांत खरेदी करणे काहीही
चुकीचे नाही. रियल इस्टेटमध्ये जमिनीच्या किंमती कशा रीतीने वाढतात किंवा कमी
होतात याचे सामान्य ज्ञान असलेला कोणीही हा व्यवहार योग्य आहे असेच म्हणेल.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">जमिनीचे व्यवहार हे असेच होतात. ही
काॅमन प्रॅक्टिस आहे. बिल्डर लोक २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून दीर्घ
काळासाठी लॅन्ड अॅग्रीमेंट करतात. मग ते ही जमीन खरेदी करू शकेल अशी पार्टी शोधत
राहातात. शेतकऱ्याने करार करून ठेवला असल्याने बिल्डरला आधी ठरलेल्या दरातच
विकण्यासाठी तो बांधील असतो. दरम्यान, जमिनीचे दर वाढतात. बिल्डरला योग्य पार्टी
मिळताच तो सौदा करतो. खरेदीदार पार्टीची विवशता किंवा मजबुरी असते की त्याला
बिल्डरकडूच खरेदी करावी लागते. कारण बिल्डरने शेतकऱ्याशी करार केलेला असतो. मग
रजिस्ट्री करण्याच्या दिवशी बिल्डर हा आधीचा करार रद्द करतो आणि प्राॅपर्टी जुन्या
दरानेच खरेदी करतो. आणि नव्या दराने पार्टीला विकून टाकतो.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">जमिनींच्या व्यवहारात प्राॅपर्टी
डीलिंगची एक सामान्य प्रॅिक्टस आहे. शहरात बिल्डर लोक असेच अॅग्रीमेंट करतात आणि
मग जमीन डेव्हलप करून दर वाढवून विकतात. ओरिजनल पार्टीला आधी ठरलेलाच दर मिळतो,
बिल्डरला यात प्रचंड नफा असतो. ही त्यांच्या रिस्कची वसुली असते.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">हिंदु समाजाचा तेजोभंग करणे, हेच काम
जे करत आले त्यांनी श्री रामजन्मभूमी मंदिर ट्रस्टवर आरोप केले आहेत. सर्वच आरोप
सत्य नसतात. सेंट्रल विस्टा असो, लहान मुलांचे लस दुसऱ्या देशांना का पाठवले असे
विचारणे असो वा राफेल आदी.. या सर्व विषयांवर आरोप असे केले गेले की क्षणभर शंका
यावी. सत्य सर्वांसमोर आहे. आता रामजन्मभूमी ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप करण्यात आला
आहे. पत्रकार परिषद घेऊन आरोप करणे </span><span style="font-family: "Divya Marathi Uni";"> </span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">टूलकिटचाच भाग आहे का, माहीत नाही. याची चौकशी
झाली पाहिजे.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">क्षुद्र राजकीय स्वार्थ साधण्यासाठी
कोणी देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधीत ट्रस्टवर संशयाचे धुके आणत असेल तर हे
गंभीर आहे. हिंदुत्वाला बदनाम करणाऱ्या शक्तींची आजवरची प्रचारशैली पाहा.
नॅरेटिव्ह किंवा कथानक अशा रीतीने पुढे आणले जाते की सामान्य माणसाला प्रथमदर्शनी
कथानक सत्य वाटू लागते. रामजन्मभूमी ट्रस्टवर झालेले आरोप केवळ बदनामी करण्यासाठी
केले आहेत, यात काही संशय नाही. कोणीही कोठेही भ्रष्टाचार किंवा फसवणूक केली असेल
तर संबंधितांवर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.
परंतु, हिंदुंचा तेजोभंग करणे एवढ्याच उद्देशाने पुन्हा पुन्हा खोटे आरोप होत
असतील तर कायदेशीर मार्गाने स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त झाला पाहिजे.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">केदारनाथ ढगफुटीच्या वेळी नरेंद्र
मोदी यांच्यासंबंधी अशीच खोटी बातमी चालवली गेली. नंतर संबंधीत मीडिया हाऊसने
क्षमा मागितली. कठुआ प्रकरणीही असेच कथानक रचले गेले. अनेक महिने खोट्या
बातम्यांचा रतीब घातला गेला. मुख्य आरोपी त्या दिवशी कठुआपासून शेकडो किलोमीटर दूर
असल्याचे एटीएमच्या सीसीटीव्हीमुळे सिद्ध झाले. अशी शेकडो उदाहरणे आहेत.
रामजन्मभूमीवर मंदिर होऊ नये यासाठी आकाशपाताळ एक करणाऱ्यांनी आता आणखी एक आघात
केला आहे.</span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-size: large;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><o:p> </o:p></span><span style="font-family: "Divya Marathi Uni";"> </span><span style="font-family: "Divya Marathi Uni";">‘आरोप आम्हाला नवीन नाहीत, आम्ही त्याची चिंता
करत नाही, तुम्हीही करू नका. आता काहीच सांगायचे नाही. या प्रकरणाचा अभ्यास
करण्यात येईल.’, असे ठामपणे ट्रस्टचे महासचिव आणि ज्येष्ठ प्रचारक चंपत राय
म्हणाले ते बरेच झाले. ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य या संस्कृतीसाठी, या
राष्ट्रासाठी समर्पित केले आहे, असे त्यागी लोक लोक श्री रामजन्मभूमी ट्रस्टवर
आहेत. तीन दशकांहून अधिक काळ समर्पित भावनेने रा. स्व. संघाच्या माध्यमातून कार्य
करणारे डाॅ. अनिल मिश्रा यांनी ट्रस्टचे प्रतिनिधी म्हणून भूमी खरेदीचा व्यवहार
केला आहे. ट्रस्टचे काम कोणा एका व्यक्तीच्या इच्छेने चालत नाही. निर्णय
प्रक्रियेत सर्वांचा सहभाग असतो. संघाचे हे संस्कार आहेत. जन्मभूमीलगत मोकळी
असलेली जेवढी भूमी बाजारभावाने घेता येईल, ती घ्यायची आणि होता होईल तेवढे भव्य
दिव्य जन्मभूमी मंदिर उभारायचे, ही हिंदू समाजाची भावना आहे. ट्रस्टने तेच काम
केले आहे. या गैरव्यवहार नाही किंवा घोटाळाही नाही.</span></span></p>
<p class="MsoListParagraph" style="line-height: normal; margin-bottom: 0in; mso-add-space: auto; mso-list: l0 level1 lfo1; text-indent: -0.25in;"><span style="font-size: large;"><!--[if !supportLists]--><span><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="mso-list: Ignore;">-<span style="font-family: "Times New Roman"; font-stretch: normal; font-style: normal; font-variant: normal; font-weight: normal; line-height: normal;"> - </span><span style="font-family: "Times New Roman"; font-stretch: normal; font-style: normal; font-variant: normal; line-height: normal;"><b>
</b></span></span></span><!--[endif]--><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><b>सिद्धाराम भै. पाटील</b><o:p></o:p></span></span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="font-size: large;">----------<o:p></o:p></span></span></p>
<p class="MsoNormal" style="line-height: normal; margin-bottom: 0in;"><span style="font-family: "Divya Marathi Uni";"><span style="font-size: large;">ही माहिती शेअर करण्यासाठी वा कापी
पेस्ट करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही.</span></span></p>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-40353207002446009302021-01-08T10:56:00.003+05:302021-01-08T10:56:53.481+05:30 विनाकारण माहोल का खराब कोण करत आहे ?<p><span style="background-color: white; color: #050505; font-family: inherit; font-size: 15px; white-space: pre-wrap;"></span></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-sza5ImxNJVg/X_fsCi3aEqI/AAAAAAAAJfs/SlV0CLoGta8-_EnU177ZQZw1WVBOCeSmgCLcBGAsYHQ/s582/news.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="582" data-original-width="526" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-sza5ImxNJVg/X_fsCi3aEqI/AAAAAAAAJfs/SlV0CLoGta8-_EnU177ZQZw1WVBOCeSmgCLcBGAsYHQ/s320/news.jpg" /></a></div><br />मुस्लिमांची संख्या जास्त आहे त्या भागातून रॅली काढू नका, अशी ही बातमी आहे.<p></p><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><b><span style="color: #0b5394;">सर्वसामान्य माणूस या बातमीकडे कसा पाहातो? अरे हे योग्यच आहे की. मुस्लिमबहुल भागातून रॅली का काढायची? विनाकारण माहोल का खराब करायचा ?. यामागे एक भावना असते की विनाकारण वाद नको. यामुळे गंगा जमनी तहजीब धोक्यात येईल. समाजाची एकता उसवली जाईल. वरवर पाहता हा विचार योग्यच आहे, असे वाटू शकते.</span></b></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">परंतु, इतका वरवरचा विचार करून सोडून देण्यासारखा हा विषय नाही, असा विचार करणारा एक मोठा वर्गही देशात आहे. तो वेगळ्या पद्धतीने विचार करतो. </div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">मुस्लिम इलाख्यातून रॅली का काढायची नाही? देशाच्या कोणत्याही भागातून रॅली काढण्याचा हक्क घटनेने दिला आहे की नाही? मुस्लिम इलाख्यातून रॅली काढायचा नाही, ही मागणी मान्य झाली तर उद्या हिंदूंनीही अशीच भूमिका घेतली तर? तर काय होईल? हिंदू इलाख्यात मशिदी नकोत, हिंदू इलाख्यात बांगचा आवाज ऐकायला येऊ नये, अशी मागणी लोकांनी करायला सुरूवात झाली तर देशात ऐक्य राहील काय? असा विचार करणारा एक मोठा वर्ग देशात तयार हाेत आहे.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">येथे मला एक उदाहरण आठवते. गुजरातमधील डांग जिल्ह्यातील ही घटना आहे. या वनवासी भागात फार मोठ्या प्रमाणात मतांतर झाले आहे. वनवासी बांधवांना प्रलोभने दाखवून, त्यांच्या गरीबीचा गैरफायदा घेऊन त्यांना ख्रिस्ती बनवण्यात आले आहे. कांॅग्रेस सत्तेत असताना भवानीशंकर नियोगी आयोग नेमला होता. त्यामध्ये याबद्दल फार विस्तृत माहिती आहे. ज्येष्ठ पत्रकार अरुण शौरी यांनीही याबद्दल पुष्कळ लेखन केले आहे.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">डांग जिल्ह्यातील एका गावात मतांतर झाल्याने ख्रिश्चन बनलेल्यांची संख्या अधिक झाली. त्या गावामध्ये एका मतांतर न केलेल्या व्यक्तीने आपल्या मालकीच्या जागेत मंदिर उभारण्याचे ठरवले. गाव ख्रिश्चनबहुल आहे आणि त्यामुळे तुम्हाला येथे आता नव्याने मंदिर बांधता येणार नाही, अशी भूमिका तेथील ख्रिश्चनांनी घेतली. तेथे यावरून दंगल उसळली. दोन दशकांपूर्वीची ही गोष्ट आहे. देशातील मुख्य वृत्तपत्रे आणि टीव्ही मीडियातील बहुतेकांनी तेथे हिंदुंनाच जातीयवादी ठरवले. ख्रिस्तीबहुल भागात मंदिर बांधायची गरजच काय, अशी भूमिका घेण्यात आली.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">अशीच एक घटना कोरोना काळात घडली. तामिळनाडूतील कन्याकुमारी जिल्ह्यातील एका गावातली ही घटना. ख्रिस्ती झालेल्यांची संख्या त्या गावात ५२ टक्के आहे. त्या गावातील एका मंदिराच्या आवारात भारतमातेची मूर्ती स्थापित करण्यात आली. तेथील काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसांत तक्रार दिली. रस्त्यावरुन जाताना ही मूर्ती दृष्टीस पडते आणि त्यामुळे आमच्या भावना दुखावतात, अशी ती तक्रार होती. लगेच पोलिसांनी कारवाई करत भारतमातेची मूर्ती कापडाने झाकून टाकली. मुद्दा मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावर मूर्ती मुक्त झाली.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">आपल्या देशात लाखो गावांमध्ये आजही हिंदू बहुसंख्येने आहेत. जेथे हिंदू बहुसंख्येने आहेत तेथे मशिदी आणि चर्च उभारायला नको, अशी भूमिका हिंदू समाजाने कधी घेतली आहे का? शहरांमधील कोणत्याही हिंदू भागात मशिदी, चर्च उभारू नका, म्हणून कोणत्या हिंदूने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे का? समजा असे निवेदन दिले तर तसे करणे योग्य होईल का? असे प्रश्न विचारणारा एक वर्ग समाजात तयार झाला आहे.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">असे प्रश्न निर्माण होतातच कशाला? हे समजून घेतले पाहिजे.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">जगात एकमेव माझाच रिलीजन किंवा मजहब खरा आहे. इतर सर्व लोकांनी मतांतर करून माझ्याच रिलीजन वा मजहबचा स्वीकार केला पाहिजे, असा विचार एकांतिक रिलीजनकडून शेकडो वर्षांपासून मांडण्यात आला आहे. दुसऱ्या धर्माचे अस्तित्वच स्वीकारायचे नाही, हा तो विचार आहे. जगभरात होणाऱ्या धर्मांतराच्या मागे हाच एकांतिक विचार आहे. मुस्लिम आणि ख्रिस्ती पंथांमध्ये हा संकुचित विचार प्रबळ आहे. संपूर्ण जग ख्रिस्ती बनले पाहिजे किंवा संपूर्ण जग दार उल इस्लाम बनले पाहिजे, असा विचार त्या त्या पंथांतील प्रमुख गटांकडून राबवण्याचा प्रयत्न होत असतो. यातूनच धर्मांतर, जिहाद वगैरे प्रकार पुढे येतात. आमच्या इलाख्यातून इतर धर्मियांची रॅली नको, गणपतीची मिरवणूक नको, आमच्या गावात मंदिर नको… वगैरे मागणीमागे माझाच एकमेव धर्म खरा हा संकुचित विचार आहे.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">हिंदू हा समावेशक धर्म आहे. सर्वच धर्म सत्य आहेत. कोणत्याही मार्गाने तुम्ही इश्वरापर्यंत पोहोचू शकता. ईश्वर कणाकणांत आहे. ईश्वर एक आहे पण तो अनेक रूपातून व्यक्त होतो, हा हिंदू विचार आहे. हिंदू धर्म हा इतर धर्मांचे, रिलीजनचे, पंथांचे अस्तित्व मान्य करतो. मुस्लिम आणि ख्रिश्चन पंथातील विचारी लोकांनीही इतर धर्मांचे अस्तित्व मान्य करावे, यातूनच जगात शांती नांदेल, असे आवाहन स्वामी विवेकानंद यांनी केले होते.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">थोडक्यात, गंगा जमनी तहजीब वाढायची असेल, समाजातील एकता वाढीस लागायची असेल तर आमच्या इलाख्यातून रॅली नको.. वगैरे भूमिका न घेता आम्ही रॅलीवर पुष्पवृष्टी करू.. आपण गुण्यागोविंदाने नांदू. मुस्लिम इलाख्यातून जाणाऱ्या मिरवणुका, रॅली यांचे स्वागत करू. सहकार्य करू अशी भूमिका घेतली पाहिजे. यामुळे मूळत:च सहिष्णू असणाऱ्या हिंदूंच्या मनात मुस्लिम समाजाविषयी शतपटीने प्रेमाची भावना निर्माण होईल. हिंदू मुस्लिम एकता ही समस्या राहाणार नाही. राजकीय लोक गैरसमज निर्माण करण्यासाठी पुढे येतील. त्यांना दूर करा. हिंदू – मुस्लिम यांनी एकमेकांचा आदर करणे हीच खरी मानवता आहे. ती वाढली पाहिजे. परंतु, ती वनवे असणार नाही. आमच्या इलाक्यात येऊ नका, असा फुटीर विचार करून विश्वासाचे वातावरण तयार होऊ शकत नाही.</div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; font-size: 15px; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;">सिद्धाराम</div><div dir="auto" style="font-family: inherit;">080121</div></div>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-55086982890593870322020-12-20T01:00:00.003+05:302020-12-20T01:06:27.188+05:30धन्य ते जीवन...<p></p><table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-9wbXV76MwH8/X95TkVKVNJI/AAAAAAAAJdg/lG5oOd2qTrU89lY-nPdNwXKAcJmMgZAzgCLcBGAsYHQ/s720/mgsp.jpg" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><span style="font-size: medium;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="720" src="https://1.bp.blogspot.com/-9wbXV76MwH8/X95TkVKVNJI/AAAAAAAAJdg/lG5oOd2qTrU89lY-nPdNwXKAcJmMgZAzgCLcBGAsYHQ/s320/mgsp.jpg" width="320" /></span></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="font-size: medium;">मा. गो. वैद्य यांच्यासोबत त्यांच्या घरी सिद्धाराम.</span></td></tr></tbody></table><span style="font-size: medium;"><br /><span style="background-color: white; color: #050505; font-family: inherit; white-space: pre-wrap;"><br /></span></span><p></p><h3 style="text-align: left;"><span style="color: #0b5394; font-size: medium;"><b><span style="background-color: white; font-family: inherit; white-space: pre-wrap;">स्थळ : नागपुरातील मा. गो. वैद्य यांचे घर.<br /></span></b><b><span style="background-color: white; font-family: inherit; white-space: pre-wrap;">११ सप्टेंबर २०१९. सायंकाळची वेळ. <br /></span></b><b><span style="background-color: white; font-family: inherit; white-space: pre-wrap;">ही त्यांची शेवटची भेट ठरली.</span></b></span></h3><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;">९६ वर्षांच्या ज्ञानाच्या क्षेत्रातील या ऋषींना<b> ‘ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी’ </b>या ग्रंथासाठी एक लेख लिहिण्याची विनंती केली. ते म्हणाले, ‘आता सध्या मी एका ग्रंथावर काम करत आहे. साधारण फेब्रुवारी २०२० ला लेख देऊ शकेन. चालणार आहे का?’. </span></div><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;">ग्रंथाचे प्रकाशन १९ जानेवारी २०२० ठरलेले असल्याचे मी सांगितले. त्यामुळे या ग्रंथात त्यांचे योगदान घेता आले नाही.</span></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="color: #050505; font-family: inherit;"><span style="font-size: medium;">९६ वर्षांची व्यक्ती याही वयात इतके नियोजनबद्ध काम करते, हे मा. गो. यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे असेच होते. </span></div><div dir="auto" style="color: #050505; font-family: inherit;"><span style="font-size: medium;">एखाद्या विषयावर लेख लिहून पाहिजे असल्यास त्यांचा पहिला प्रश्न असायचा की लेख कधीपर्यंत हवा?. </span></div><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="color: #cc0000; font-size: medium;"><b>सांगतिलेल्या दिवसापर्यंत शक्य असल्यास ते हो म्हणत, अन्यथा त्यांच्या नियोजनानुसार अमूक दिनांकापर्यंत चालणार आहे का, असे विचारत. ठरलेल्या दिनांकाच्या एक दोन दिवस आधी त्यांचा दूरध्वनी येणार. तुम्ही मागीतलेला लेख थोड्या वेळापूर्वी इ मेल केलाय. पाहून घ्या.</b></span></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;">शंभरीकडे वाटचाल सुरू असतानाही वेळेचे इतके काटेकोर नियोजन... धन्य ते जीवन. ज्या व्यक्तींचा माझ्या आयुष्यावर अमीट ठसा उमटला त्यापैकी एक श्री. मा. गो. वैद्य.</span></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;"><b><span style="color: #0b5394;">इतके ज्ञानवृद्ध व्यक्तिमत्व पण माझ्यासारख्या सामान्य तरुणाला त्यांनी खूपच सलगीने वागवलं. शेवटच्या भेटीत शेजारी बसवून फोटो काढण्यास लावले. त्यांचे आत्मचरित्र आपुलकीने भेट दिले. </span></b></span></div><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;"><span style="color: #050505;"><br /></span></span></div><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;"><span style="color: #050505;">विवेकानंद केंद्र कार्यकर्ता आणि पत्रकार असल्याचा मला व्यक्तिश: आजवर खूप लाभ झाला. एरव्ही जे अशक्य होते अशा अनेक महान व्यक्तित्वांना भेटु शकलो. त्यांच्या स्नेहास पात्र राहू शकलो. याची धन्यता वाटते. पूर्वजन्म पुण्याईमुळेच विवेकानंद केंद्र कार्यकर्ता अन् पत्रकारिततेची संधी मिळाली असावी. पत्रकारितेची सुरूवात सोलापूर तरुण भारतमधून होणे आणि तेथे रविवार पुरवणी संपादक अशी संधी मिळणे यामुळे मा. गो. यांच्याशी स्नेहबंध जुळू शकले.</span></span></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;">विवेक विचार मासिकाच्या जानेवारीच्या अंकात थोडं विस्तृत लिहीन.</span></div></div><div class="o9v6fnle cxmmr5t8 oygrvhab hcukyx3x c1et5uql ii04i59q" style="background-color: white; color: #050505; font-family: "Segoe UI Historic", "Segoe UI", Helvetica, Arial, sans-serif; margin: 0.5em 0px 0px; overflow-wrap: break-word; white-space: pre-wrap;"><div dir="auto" style="font-family: inherit;"><span style="font-size: medium;">हिंदुत्वाचे समर्थ भाष्यकार मा. गो. वैद्य यांच्या आत्मास सद्गती मिळो.</span></div></div>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-49311015368426556052020-10-25T17:59:00.000+05:302020-10-25T17:59:12.434+05:30वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKZkEO-LKS_HVjYn_uzLULVjlJiEfCq-Q0wK3m8-fwQMvVoltlVtH7Udn0tjoTLViYF0sf_8LbI2YMe1rkWAEYUpLjfjApysELQToGgUHhSufm0e6NdZfpZ2xmhScs5NkFy1lO4KYrsxuT/s2048/bookcover.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="2048" data-original-width="1341" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiKZkEO-LKS_HVjYn_uzLULVjlJiEfCq-Q0wK3m8-fwQMvVoltlVtH7Udn0tjoTLViYF0sf_8LbI2YMe1rkWAEYUpLjfjApysELQToGgUHhSufm0e6NdZfpZ2xmhScs5NkFy1lO4KYrsxuT/s320/bookcover.jpg" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Veershaiv Lingayat Hindu<br /></td></tr></tbody></table><br /><table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto;"><tbody><tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQiPzy6RPABvAoumo-OqRz1_hx09tnO1d8IqcPnXXK5UnZlbtwTF7p_oTTTZ5zcNVu169EfWgq610syKRhH42Ar-TWui7PQ8AM9p3bwzZstqWglJAxhHKkwY1qpF6gcrpOqcwPkVv_ZFzj/s2543/lingayatbook.jpg" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1236" data-original-width="2543" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhQiPzy6RPABvAoumo-OqRz1_hx09tnO1d8IqcPnXXK5UnZlbtwTF7p_oTTTZ5zcNVu169EfWgq610syKRhH42Ar-TWui7PQ8AM9p3bwzZstqWglJAxhHKkwY1qpF6gcrpOqcwPkVv_ZFzj/s320/lingayatbook.jpg" width="320" /></a></td></tr><tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="text-align: left;">वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी डावीकडून प्रा. गजानन धरणे, सिद्धाराम पाटील, शरद गंजीवाले, डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य, धर्मराज काडादी, राजेंद्र काटवे.</span><br /></td></tr></tbody></table><br /><div><br /></div><h3><span style="color: #660000;">वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाचे प्रकाशन </span></h3><div><u><span style="font-size: medium;"><span style="color: #ffa400;">सोलापूर : एखाद्या इमारतीचे खांब कापण्यासाठी कोणी येत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. अगदी त्याच पद्धतीने </span><span style="color: #0c343d;">हिंदू धर्मात असलेली आपली मुळं कापण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर आपण स्वस्थ बसू शकत नाही. वीरशैव आणि लिंगायत हे समानार्थी शब्द आहेत. वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच आहे आणि वीरशैव लिंगायत समाजात धर्मरक्षणाची परंपरा आदी जगद्गुरूंपासून चालत आलेली आहे, असे प्रतिपादन बृहन्मठ होटगी मठाचे डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी केले.</span><span style="color: #ffa400;"> सिद्धाराम पाटील आणि अप्पासाहेब हत्ताळे यांनी लिहिलेल्या ‘वीरशैव लिंगायत हिंदूच!’ या लघु ग्रंथाचे प्रकाशन अक्कलकोट रोड येथील महास्वामी यांच्या कार्यालयात झाले. यावेळी ते बोलत होते. जटायु अक्षरसेवा संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.</span></span><span style="color: #ffa400;"> </span></u></div><div><br /></div><div>जातवेद शिवाचार्य मुनींकडून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगदीक्षा घेतली होती. मी शैव होतो आता वीरशैव झालो, असे खुद्द महात्मा बसवेश्वर यांनी आपल्या वचनातून सांगितले आहे. त्यामुळे मतभेद सोडून वीरशैव लिंगायत समाजाने एकसंध झाले पाहिजे, असे आवाहन महास्वामी यांनी यावेळी केले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, हिंदू वीरशैव लिंगायत मंचचे प्रांत प्रमुख शरद गंजीवाले, धर्मजागरण प्रमुख हेमंत हरहरे, डाॅ. राजेंद्र हिरेमठ, राजेंद्र काटवे जिल्हा प्रमुख प्रा. गजानन धरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. </div><h3> <span style="color: #cc0000;">आरक्षणाच्या आशेने धर्म सोडणे मान्य नाही : काडादी </span></h3><div> आरक्षण मिळेल म्हणून धर्म मोडून काढणे कधीच योग्य नाही. वीरशैव िलंगायत समाज हा हिंदू धर्माचाच भाग आहे. त्यामुळे येत्या जनगणनेच्या वेळी धर्माच्या ठिकाणी हिंदू धर्म अशीच नोंद समाजबांधवांनी करावी, असे आवाहन श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केली. श्री. काडादी म्हणाले, “हजार वर्षे देशावर आक्रमणे झाली. तरीही आपण आपली संस्कृती जपून वाटचाल करत आहोत.<span style="background-color: #fcff01; font-size: medium;"> लिंगायत समाजात इतकी वर्षे पंचाचार्य आणि बसवेश्वर हा वाद पेटत राहील असा प्रयत्न सुरू होता. हा वाद आता मिटतोय असे दिसताच आरक्षणाच्या या काळात शब्दछल करून ‘वीरशैव वेगळे आणि लिंगायत वेगळे’ असे राजकारणातील मंडळींनी सांगायला सुरूवात केली आहे. वीरशैव लिंगायत हे हिंदूच नाहीत असे सांगण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गेल्या काही वर्षांत सुरू झाला आहे. </span><span style="background-color: #fcff01; color: red; font-size: medium;">लहान मुलाला चाॅकलेट दाखवले की ते मूल काही वेळासाठी संभ्रमित होते, तीच गत आरक्षण मुद्द्यावरून झाली आहे. आरक्षण नसल्याने समाजात भेदाची भावना निर्माण झाली आहे. आरक्षणारूपी चाॅकलेटच्या जवळ जाण्यासाठी हे प्रकार सुरू आहेत. आरक्षण मिळण्यासाठी प्रयत्न व्हावेत. परंतु, धर्म मोडून काढणे योग्य होणार नाही. वीरशैव लिंगायत हिंदूच या पुस्तकाने समाजाची दिशाभूल दूर करण्याचे काम केले आहे.’’ </span></div><h3> <span style="color: #cc0000;">काय आहे पुस्तकात ? </span></h3><div> महात्मा बसवेश्वर यांच्याआधी ३ हजार वर्षांपासून वीरशैव लिंगायत परंपरा प्रचलित होती, यासंबंधीचे शिलालेख व अन्य पुराव्यांची माहिती या पुस्तकात आहे. हिंदू धर्मातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश या प्रमुख त्रिदेवांपैकी महेश अर्थात शिव उपासना इष्टलिंग रूपात करणारा समाज हिंदू आहे. शिवयोगी सिद्धराम, महात्मा बसवण्णा यांच्या वचनांचा आधार घेत वीरशैव लिंगायत समाज हा हिंदूच असल्याचे ३७ मुद्दे या पुस्तकात साधार मांडले आहेत. बृहन्मठ होटगीचे धर्मरत्न डाॅ. मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.</div><div>9767284038 या क्रमांकावर व्हाटस् अॅप / एसएमएस करून पुस्तक मागवू शकता.</div><div>पृष्ठे ३६, मूल्य ३०/ </div><div>पुढील लिंकवरूनही पुस्तक मागवता येईल</div><div><span style="font-size: large;"><a href="jataau.com/shop">jataau.com/shop</a><br /></span></div><p> </p>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-24019261102766503762020-07-25T11:50:00.000+05:302020-07-25T11:50:33.394+05:30भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-dQ24QRvKNpQ/XxvOVbWoikI/AAAAAAAAIaw/o3BSEVRmhco2MVjTsrumUWn4wQiJ9bWPwCLcBGAsYHQ/s1600/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AD%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AA_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AE%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A7.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1463" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-dQ24QRvKNpQ/XxvOVbWoikI/AAAAAAAAIaw/o3BSEVRmhco2MVjTsrumUWn4wQiJ9bWPwCLcBGAsYHQ/s320/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AD%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AA_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AE%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A7.jpg" width="292" /></a></div>
श्री. भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन !<br />
फक्त तीन ते चार महिन्यात<br />
त्यांच्या प्रतिपक्ष या युट्यूब वाहिनीची सदस्यसंख्या एक लाखावर पोहोचली आहे.<br />
दृश्य संख्या 1 कोटी 19 लाख.<br />
<br />
एखाद्या वैचारिक विषयावरील<br />
युट्युब वहिनीला<br />
शंभर-सव्वाशे दिवसात<br />
इतके सदस्य मिळणे<br />
ही बाब साधारण नाही.<br />
<br />
पाठीमागे कोणतीही माध्यम संस्था नसताना<br />
एखाद्या पत्रकाराला<br />
अशी जनमान्यता मिळणे<br />
हे महाराष्ट्रातील<br />
पहिलेच उदाहरण ठरावे.<br />
<br />
येथे उल्लेखनीय बाब म्हणजे<br />
भाऊ यांना आपल्या ब्लॉगसाठी,<br />
आपल्या युट्यूब वाहिनीसाठी<br />
एका रुपयाची सुद्धा जाहिरात<br />
करावी लागली नाही.<br />
<br />
भेदक विश्लेषण, साठ वर्षांचा पत्रकारितेतील दांडगा अनुभव, सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत मांडण्याची शैली, प्रांजळपणा, मांडणीतील सातत्य, साधेपणा, निस्पृहता, दांडगी स्मरणशक्ती, तटस्थता, नवीन शिकण्याची जिद्द, परिश्रम, प्रसिद्धीने हुरळून न जाणे, स्वतःच्या मर्यादांची जाणीव, अभ्यासोनी प्रकट व्हावे या उक्तीचे पालन, सूक्ष्म निरीक्षण बुद्धी, निर्भिड स्वभाव आणि निरागसता...<br />
<br />
यामुळेच महाराष्ट्राने<br />
भाऊंना डोक्यावर घेतलं आहे.<br />
भाऊ ( Ganesh Torsekar )<br />
यांचे प्रबोधन कार्य असेच चालू दे...<br />
मनापासून शुभेच्छा...<br />
<br />
विशेष नोंद :<br />
कथित पुरोगामी मंडळींनी पोसलेला बुद्धीच्या क्षेत्रातील दहशतवाद<br />
मोडीत काढण्याचा मार्ग<br />
प्रशस्त करण्याचे ऐतिहासिक काम<br />
जोखीम पत्करून करणे<br />
हे एक मोठे धाडस आहे.<br />
असे धाडस<br />
निस्पृहतेमधूनच<br />
येत असते.<br />
कमालीची निस्पृहता<br />
ही भाऊंची ठळक ओळख आहे.<br />
<br />
(एक लाख सदस्य संख्या झाल्यानिमित्ताने भाऊंचे मनोगत...<br />
<a href="https://youtu.be/z2vSdR7tv3c" target="_blank">https://youtu.be/z2vSdR7tv3c</a>)<br />
<br />
--------------------<br />
नोंदी सिद्धारामच्या...<br />
<a href="http://psiddharam.blogspot.com/" target="_blank">psiddharam.blogspot.com</a>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-81892964452922707022020-07-23T14:36:00.000+05:302020-07-23T14:36:42.175+05:30व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यापूर्वी...<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-pzFdSGaSZvI/XxlSRbWF_9I/AAAAAAAAIaU/ANcF143k-TAYq_ndoEb6F8W-jdDSSdwrACLcBGAsYHQ/s1600/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AD%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A9_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25AA.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1012" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-pzFdSGaSZvI/XxlSRbWF_9I/AAAAAAAAIaU/ANcF143k-TAYq_ndoEb6F8W-jdDSSdwrACLcBGAsYHQ/s320/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AD%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A9_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25AA.jpg" width="202" /></a></div>
व्यंकय्या नायडू यांचा निषेध<br />
अवश्य झाला पाहिजे, परंतु<br />
तुमच्यामध्ये "हे" धाडस असेल तरच...<br />
<br />
छत्रपती उदयनराजे भोसले यांना<br />
राज्यसभेत शपथ घेताना<br />
"घोषणा देऊ नका", असे म्हटल्याने<br />
महाराजांचा अपमान झाला,<br />
असे सांगत<br />
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू<br />
यांचा निषेध करण्यात येत आहे.<br />
परंतु,<br />
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी<br />
म्हटले आहे की,<br />
"आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला,<br />
व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं,<br />
पवारसाहेबांना विचारा काय झालं ?"<br />
(<a href="https://youtu.be/e87EKLNExLM" target="_blank">https://youtu.be/e87EKLNExLM</a>)<br />
<br />
पवार साहेब याचे उत्तर देणार नाहीत.<br />
<br />
गेल्या 10 वर्षात<br />
शिवरायांची बदनामी करणारे एक पुस्तक<br />
बिनधास्त विकले जात आहे.<br />
त्या पुस्तकाच्या विरोधात<br />
कोणी माई का लाल<br />
आक्रमक झाल्याचे दिसला नाही.<br />
<br />
"शिवाजीचे उदात्तीकरण" हे ते पुस्तक.<br />
या पुस्तकात<br />
अत्यंत नीच भाषेत<br />
शिवाजी महाराजांची<br />
पानोपानी अवमानाना करण्यात आली आहे.<br />
शिवाजी महाराज यांच्यावर<br />
आक्षेपार्ह आणि दर्जाहीन आरोप आहेत.<br />
<br />
"महाराज हे महान नव्हते,<br />
ते खंडणी गोळा करायचे",<br />
अशी आक्षेपार्ह भाषा<br />
या पुस्तकात आहे.<br />
<br />
या पुस्तकात महाराजांविषयी<br />
असे काही लिहिले आहे की<br />
त्याचा या ठिकाणी<br />
उल्लेख करणेही शक्य नाही.<br />
या पुस्तकाची विक्री<br />
गेल्या दहा वर्षापासून<br />
आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे.<br />
(<a href="http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html?m=1" target="_blank">http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html?m=1</a>)<br />
<br />
या पुस्तका विरोधात काहीही न करता<br />
आजवर मूग गिळून बसलेल्या लोकांना<br />
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात<br />
रान उठवण्याचा काय अधिकार ?<br />
निषेधच करायचा असेल तर<br />
"जय शिवाजी जय भवानी" म्हणण्यास<br />
विरोध करणाऱ्या<br />
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.<br />
<br />
शिवाजी महाराजांना<br />
'जाणता राजा' म्हणू नका,<br />
असे म्हणणाऱ्या<br />
श्री. शरद पवार यांचा<br />
कोणी कधी निषेध केला आहे काय ?<br />
<br />
"नरेंद्र मोदी हे आजच्या<br />
काळातील शिवाजी आहेत",<br />
या पुस्तकावर तुटून पडणारे<br />
शरद पवार यांना "जाणता राजा"<br />
ही बिरुदावली वर्षानुवर्षे लावताना<br />
विरोध का केला नाही ?<br />
<br />
"तुम्ही छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्यावेत", असे म्हणत छत्रपतींच्या घराण्यावर<br />
अविश्वास दाखवण्याचा प्रमाद करणाऱ्या<br />
संजय राऊत यांच्या विरोधात<br />
निषेधाची ही धार का दिसली नाही?<br />
<br />
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू<br />
यांचा निषेध<br />
अवश्य झाला पाहिजे.<br />
परंतु,<br />
निषेधासाठी वापरलेली आपली भाषा<br />
स्वतः ला अभिमानाने मावळा म्हणवून घेता येईल अशीच आहे ना हे पाहीले पाहिजे.<br />
<br />
थोडक्यात -<br />
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आडोसा घेत कुरघोडीचे राजकारण करणे, हे आता सर्वच पक्षातील नेत्यांचे धोरण बनले आहे. शिवरायांचे आणि शंभुराजेंचे नाव घेणाऱ्या काही संघटना संबंधित व्यक्तीची जात, पक्ष, आणि विचारधारा पाहून निषेधाची तीव्रता आणि पातळी ठरवतात. वास्तविक पाहता या मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी, तत्वांशी काही देणे घेणे नसते. आपले उपद्रवमूल्य कायम ठेवणे हाच काय तो उद्देश असतो.<br />
<br />
काही संदर्भ :<br />
1. <a href="https://www.google.co.in/amp/s/www.lokmat.com/nagpur/bjp-demands-ban-book-shivajiche-udattikaran-padadyamagache-vastav/amp/" target="_blank">https://www.google.co.in/amp/s/www.lokmat.com/nagpur/bjp-demands-ban-book-shivajiche-udattikaran-padadyamagache-vastav/amp/</a>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-12347208772497928072020-06-04T23:25:00.001+05:302020-06-05T00:04:02.550+05:30शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-rwvR6UjiJME/Xtk-BBA3t8I/AAAAAAAAIYc/G7pl-KftASAwMQAoxouWPQLwrzg12xhsgCEwYBhgLKs4DAL1OcqwPEuzjgeJLtlJu9kQ6P1JeGPDBIv-zSUAukGkaK58V9wkl7uaaGQ_96PBfRK-xixhmth4XgFTy2vKCKuNsceZD2AaxzCYD6r2ZZPKDeuQj4IuDh3uy-XBt8JPrS7kEKXLd82geAYC5G4gYVOIVt9sNRSOJpURAWyOv_QzvHg0RsbZ-0cPwNTby4tWEW9TFBdjrtPoEplJGk1cCv0M7r2H_Ela1ToZPK6pXJsINwHlXfPKVU4aHzEk2yBtKovZx2-Xh292BfSgnO0p4zcUfkP6ZVytgMDM45BkI_JOB9m3CVugOlwWO1WyivpW9ytprz4ncBajUXxgeYych_WjmlHb_Ucymx3igpdwVL36e1OXutQO-uh_L46nTH4VmvZPHeHM98Y09Eb18s5crmxXmyu0jsZs2ggLKsV2WeRlQK1L7RBaz2BexJIY63Aa0tcoFyaI48zt5-98NqmunvrZDy2saDg6_zmmwKGJkW38GHVuPaQslP0wQAqPtcN_PVaGy0OM3vB9l9-mrV31s0Pygg2nva782vWnq6ejJc3bRC75SZsN-azof6uapNOZo_UKH7giyU6aJz-hAicRzuDBPlVBJ5uw6ihi4FtxjMMeB5fYF/s1600/2017-06-08%257EClipboard65_ns-1.webp" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="309" data-original-width="320" src="https://1.bp.blogspot.com/-rwvR6UjiJME/Xtk-BBA3t8I/AAAAAAAAIYc/G7pl-KftASAwMQAoxouWPQLwrzg12xhsgCEwYBhgLKs4DAL1OcqwPEuzjgeJLtlJu9kQ6P1JeGPDBIv-zSUAukGkaK58V9wkl7uaaGQ_96PBfRK-xixhmth4XgFTy2vKCKuNsceZD2AaxzCYD6r2ZZPKDeuQj4IuDh3uy-XBt8JPrS7kEKXLd82geAYC5G4gYVOIVt9sNRSOJpURAWyOv_QzvHg0RsbZ-0cPwNTby4tWEW9TFBdjrtPoEplJGk1cCv0M7r2H_Ela1ToZPK6pXJsINwHlXfPKVU4aHzEk2yBtKovZx2-Xh292BfSgnO0p4zcUfkP6ZVytgMDM45BkI_JOB9m3CVugOlwWO1WyivpW9ytprz4ncBajUXxgeYych_WjmlHb_Ucymx3igpdwVL36e1OXutQO-uh_L46nTH4VmvZPHeHM98Y09Eb18s5crmxXmyu0jsZs2ggLKsV2WeRlQK1L7RBaz2BexJIY63Aa0tcoFyaI48zt5-98NqmunvrZDy2saDg6_zmmwKGJkW38GHVuPaQslP0wQAqPtcN_PVaGy0OM3vB9l9-mrV31s0Pygg2nva782vWnq6ejJc3bRC75SZsN-azof6uapNOZo_UKH7giyU6aJz-hAicRzuDBPlVBJ5uw6ihi4FtxjMMeB5fYF/s1600/2017-06-08%257EClipboard65_ns-1.webp" /></a></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: left;">
शिवराज्याभिषेक दिनाला </div>
हिंदू साम्राज्य दिन असे म्हणतात. कारण...<br />
<br />
🚩 सर्वसामान्य जनता जेव्हा त्रस्त झाली होती, तेव्हा एक धर्मात्मा पुढे आला - त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी धर्मरक्षण केले.<br />
<br />
🚩 प्राचीन महाकाव्यांमध्ये वर्णन केलेली आदर्श राजाची सर्व लक्षणं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात होती.<br />
<br />
🚩 छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष होते. कारण ते हिंदू होते. अमेरिकेतील थोर विचारवंत लीसा मिलर म्हणतात, "जो इतर धर्मांचे अस्तित्व मानतो तो हिंदू. या दृष्टीने पाहिले तर आज जग हिंदू बनत आहे". (इतर धर्मांचे अस्तित्व मान्य न करणारे एकांतीक धर्म सदैव धर्मांतर घडवून आणण्यासाठी धडपडतात. स्वतःच्या धर्मियांची संख्या वाढविण्याचा खटाटोप करतात. हिंदू धर्म धर्मांतर घडवत नाही, कारण सर्व धर्म सत्य आहेत, अशी त्यांची धारणा असते.)<br />
<br />
🚩 ईश्वर एक आहे आणि तो अनेक रूपातून व्यक्त होतो. तो चराचरात आहे. सर्वत्र आहे. कोणत्याही मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते, हे हिंदू धर्माचे मर्म छत्रपती शिवाजी महाराज जाणून होते.<br />
<br />
🚩 माझा धर्म सत्य आहे तसे इतरांचेही धर्म सत्य आहेत, ही प्रत्येक हिंदूची धारणा असते. स्वाभाविकच महराजांचीही अशीच धारणा होती. परंतु, ते हिंदू धर्माभिमानीसुद्धा होते.<br />
<br />
🚩 धर्म व संस्कृतीवर होणाऱ्या आघातांबद्दल ते दक्ष होते. सद्गुणविकृतीला त्यांनी कधीच थारा दिला नाही.<br />
<br />
🚩 नीतिमत्ता न पाळणाऱ्या शत्रूला मारताना प्रसंगी पारंपरिक नियम दूर सारले पाहिजे, त्याच्या पोटात वाघनखं खुपसली पाहिजेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं.<br />
<br />
🚩 कोणी परधर्मी हिंदूंना बाटवून त्यांच्या रीलिजन मध्ये ओढत असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे, हे महाराजांनी दोन पाद्र्यांचे शिर धडावेगळे करून सांगितलं.<br />
<br />
🚩 कोणी धर्मांध मंदिर उद्ध्वस्त करून तेथे त्याच्या उपासनेचा ढाचा बनवत असेल तर योग्य वेळी तो ढाचा दूर सारून तेथे पुन्हा मंदिर उभारले पाहिजे, हे त्यांनी दक्षिण स्वारीच्या वेळी कृतीतून दाखवून दिलं.<br />
<br />
🚩 काही परिस्थितीत मुस्लिम बनलेल्या कोणाला पुन्हा हिंदू व्हायचं असेल तर त्याला सन्मानाने हिंदू होता आलं पाहिजे, याची व्यवस्था महाराजांनी निर्माण केली. तसे उदाहरण प्रस्तुत केले.<br />
<br />
🚩 महाराजांनी कधीही मशिद अथवा चर्च उद्ध्वस्त केले नाहीत. किंवा अन्य धर्मीयांचा छळ मांडला नाही.<br />
<br />
🚩 महाराजांनी त्यांच्या काळात कधीही कोठेही मशिदी उभारल्या नाहीत. कोणी तसे सांगत असेल तर ते निराधार आहे. महाराजांनी कधीही कोणत्याही दर्गा वा मशिदीला नव्याने इनाम दिले नाही.<br />
<br />
🚩 आपल्या भाषेवर होणारे परकीय शब्दांचे आक्रमणही परतवून लावले पाहिजेत, इतका सूक्ष्म विचार शिवराय करत होते. आणि त्यासाठी व्यवस्था निर्मितीही करत होते.<br />
<br />
🚩 हिंदू असणं म्हणजे सर्वसमावेशक असणं. छत्रपती शिवराय हे असे हिंदू होते. त्यांना आपल्या धर्म व संस्कृतीचा अभिमान होता.<br />
<br />
🚩 केवळ माझाच धर्म खरा, इतरांचे खोटे... इतकेच नाही तर इतरांचे धर्म नष्ट, भ्रष्ट केले पाहिजेत... मूर्तीपूजा करणाऱ्यांना आपल्या कळपात ओढले पाहिजे... अन्य धर्मीयांना आपल्या कळपात ओढताना त्यांची कत्तल करावी लागली तरी ते योग्यच आहे आणि या कार्यात मृत्यू आला तर आपल्याला स्वर्गात सुंदर स्त्रीया उपभोगायला मिळतील... इत्यादी प्रकारे विचार करणारे काही रानटी टोळ्या या जगात असू शकतात हे हजार वर्षांत कोणत्याही हिंदू राजाला ओळखता आले नाही. किंबहुना आजही बहुतांश लोकांना हे समजलेले नाही. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांना एकांतिक पंथातील धर्मांध टोळ्यांची नीती समजलेली होती. अतिशय मुत्सद्देगिरीने या संकटाला तोंड दिले पाहिजे याची त्यांना जाण होती.<br />
<br />
🚩या सर्व मुद्द्यांचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक होता. या सोहळ्याचे वर्णन हिंदू साम्राज्य दिन अशा शब्दात करणे यथार्थ आहे.<br />
<br />
🚩रा. स्व. संघाच्या प्रमुख उत्सवात या दिनाला फार महत्त्व आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी म्हणणारे बुद्धिजीवी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून स्वतःला दूर ठेवत होते तेव्हापासून, किंबहुना त्या आधीपासून रा. स्व. संघ हिंदू साम्राज्य दिन साजरा करीत आहे.<br />
<br />
🚩केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतवर्षात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अलौकिक कार्य पोहोचवण्याचे काम संघ गेल्या ९५ वर्षांपासून करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची सतत उपेक्षा करत आलेल्या गटातील काही मंडळी आज-काल "हिंदू साम्राज्य दिन" या शब्दावलीवर आक्षेप घेत आहेत. केवळ वैचारिक संभ्रम निर्माण करण्याचा हेतू यामागे आहे. बाकी काही नाही.<br />
<br />
- सिद्धाराम भै. पाटील<br />
psiddharam.blogspot.com<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-47939263539376878292020-05-28T14:25:00.000+05:302020-05-28T14:25:05.640+05:30भारत आता सावरकर मार्गाने पुढे जातोय; गांधी-नेहरूंचा मार्ग केंव्हाच मागे सुटलाय<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-F6-gueGdaBE/Xs97ef4CvBI/AAAAAAAAIXk/xkekZPFlwRQq8ASQU9fZHXy1HGy8Rb2lgCLcBGAsYHQ/s1600/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AE_%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1157" data-original-width="1600" height="231" src="https://1.bp.blogspot.com/-F6-gueGdaBE/Xs97ef4CvBI/AAAAAAAAIXk/xkekZPFlwRQq8ASQU9fZHXy1HGy8Rb2lgCLcBGAsYHQ/s320/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25AE_%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AC.jpg" width="320" /></a></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">चीन, पाकिस्तानसाठी </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">याची जाण आजच्या नेतृत्वात आहे. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">हा नवा भारत आहे. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">अन् जे जे घातक ते विषवत. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">देश आहे म्हणून आपण आहोत. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">हा सावरकर विचार आहे. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">हा शाश्वत विचार आहे. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">तारणारा आहे. </span></div>
<div style="font-family: sans-serif;">
<span style="color: blue; font-size: large;">सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.</span></div>
<br />
२७ मे - नेहरू पुण्यतिथी<br />
२८ मे - सावरकर जयंती<br />
<br />
अनेक विद्वानांनी यानिमित्ताने या दोन्ही नेत्यांची तुलना करण्याचा प्रयत्न आपापल्या आउटलेटवरून केला.<br />
<br />
मीही स्वतःला असे करण्यापासून आवरणार नाही. मी लहान असताना मला नेहरुही आवडायचे अन् सावरकरही.<br />
<br />
पुढे वाचन वाढत गेलं.<br />
त्यातून माझी स्वतः ची मते बनत गेली.<br />
<br />
माझ्या मते -<br />
<br />
"नेहरू आणि इतर काँग्रेसच्या नेत्यांमुळे आपले निर्णय चुकत गेले. परिणामी आपल्या मातृभूमीचे तुकडे पडले. काँग्रेसने फाळणी होऊ देणार नाही असे देशाला सांगितले. पण ऐनवेळी फाळणी स्वीकारली. देशाचा विश्वासघात केला. दंगली घडवून ब्लॅकमेल करून भारताच्या भूमीवर आपण पाकिस्तान बनवू शकतो याची आणि काँग्रेसचे नेते भित्रे, पुळचट अन् नेभळट असल्याची जिनाला खात्री होती.<br />
<br />
भारताच्या भूमीवर पाकिस्तान उगवले ते आपले पाप आहे, याची लाज आणि खंत काँग्रेसला कधीच वाटली नाही. उलट, येथील हिंदू, हिंदू संघटना यांना बदनाम कसे करता येईल, हेच धोरण रेटून चालवले. शालेय अभ्यासक्रमात काँग्रेसला अनुकूल तेवढेच शिकवत राहिले.<br />
<br />
धर्माच्या नावावर मुस्लिमांसाठी पाकिस्तान, बांगलादेश रूपात या देशाची भूमी तोडून देण्यात आली. तरी लांगूलचालन करणे काँग्रेसने सोडले नाही. काँग्रेस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी २००६ मध्ये हद्द केली. जाहीर रित्या सांगितले की, या देशाच्या साधनसंपत्तीवर पाहिलं हक्क मुसलमानांचा आहे. बाटला हाऊस येथे जिहादी अतिरेकी मारले गेले म्हणून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रडू कोसळले.<br />
<br />
थोडक्यात, काँग्रेसने देशभक्त मुस्लीम नेतृत्व कधीच पुढे आणले नाही. तोंडी सेक्युलर तत्वाचा जप करत प्रत्यक्षात मात्र कट्टरवादी, जिहादी गटांना बळ पुरवले. इतिहास लेखन, पाठ्यपुस्तक आणि इतर माध्यमातून वैचारिक संभ्रमाला खतपाणी घातले. या देशाचा तेजोभंग होत राहील अशी नीती राबवली. स्वार्थ आणि काँग्रेस हे १९२० नंतर<br />
जणू समानार्थी बनले.<br />
<br />
स्वतः चा स्तोम माजवत राहणे हे काैंग्रेसी नेत्यांचे व्यवच्छेदक लक्षण. माझ्या मते याला गांधीजी अपवाद नव्हते. अहिंसासारख्या व्यक्तिगत जीवनातील मूल्यांना ते देशावर लादू पाहत होते.<br />
<br />
स्वतंत्र भारताच्या इतिहासात काँग्रेसचे असे दोन पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी स्वतःलाच "भारतरत्न" पुरस्काराने सन्मानित केलं -<br />
१. जवाहरलाल नेहरू (१९५५)<br />
२. इंदिरा गांधी (१९७१).<br />
<br />
हे दोन्ही नेते निश्चितच महान होते. पण म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील उणीव दुर्लक्षित करता येणार नाही. कारण या बाबींमुळे देशाची अपरिमित हानी झाली आहे. यांनी स्वतः लाच पुरस्कार कसे दिले? त्यांना संकोच वाटला नाही का ? असे प्रश्न पडतात... असं कसं होऊ शकतं, याचं आश्चर्य वाटतं.<br />
<br />
समजा, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ला भारतरत्न पुरस्कार द्यायचे ठरवले तर किती हलकल्लोळ माजेल. मीडियात कशा प्रतिक्रिया उमटतील ?<br />
१९५५ आणि १९७१ मध्ये स्वतः लाच पुरस्कार देऊ केले म्हणून मीडियातून टीका टीपणी झाली होती का ? याचे संदर्भ मिळत नाहीत.<br />
<br />
आता या पार्श्वभूमीवर<br />
वि. दा. सावरकर यांचे जीवन पाहा.<br />
<br />
स्वार्थाचा लवलेश नाही.<br />
विचारांमध्ये स्पष्टता आहे.<br />
देशासमोरील खऱ्या आव्हानांची जाणिव असल्यानेच तरुणांना सैन्य भरतीसाठी त्यांनी चळवळ चालवली. यामुळे सैन्यातील हिंदूं सैनिक प्रमाण २५ टक्क्यावरून ६७ टक्याच्या पुढे गेले.<br />
सावरकर यांनी हे एकच कार्य केले असते तरी ते सर्व काँग्रेस नेत्यांच्या एकत्रित कार्यापेक्षा ते महान गणले गेले असते.<br />
<br />
सैन्यातील तरुणांची भरती झाली नसती तर कदाचित खंडित भारताचा आजचा नकाशा आता आहे त्याहून खूप आक्रसलेला असला असता.<br />
<br />
सावरकर आणि त्याग हे समानार्थी शब्द आहेत. सावरकर आणि तप हे एकच शब्द आहेत.<br />
तुजसाठी मरण ते जनन<br />
तुजवीण जनन ते मरण<br />
हे तत्त्व भारतीयांनी स्वीकारली असती तर मातृभूमीची फाळणी झाली नसती. दंगलखोर आणि हा देश दार उल इस्लाम करण्याची मनसुबे जोपासणाऱ्या जिहादी शक्ती यांना पायबंद घालण्यात अपयश आल्यानेच या भारतभूमीवर पाकिस्तान उगवला.<br />
देश तोडू पाहणाऱ्या शक्तींना वेसण घालण्याची क्षमता केवळ सावरकर विचारात आहे; गांधी आणि नेहरूंचे विचार फेल ठरले आहेत. देशाने याचा अनुभव घेतला आहे. त्याची फार मोठी किंमत दिली आहे.<br />
<br />
आपण सावरकर विचाराने चाललो तर एक दिवस सांस्कृतिक गुलामीत गेलेले आपले बांधवही पुन्हा आपल्या पूर्वजांची संस्कृती अभिमानाने अंगीकार करतील. राष्ट्रांच्या इतिहासात शे - पाचशे वर्षे फार नाहीत. शक्ती आणि संघटन याची कास धरू तर एक दिवस पवित्र सिंधू नदी पुन्हा या भूमीचा भाग होईल.<br />
<br />
सुदैवाने आज देशाचे नेतृत्व अशा लोकांच्या हाती आहे की जे या देशाच्या महापुरुषांच्या मध्ये भेदभाव करत नाहीत. त्यांच्यासाठी कोणीच अस्पृश्य नाहीत.<br />
<br />
त्यांच्यासाठी महात्मा गांधी वंदनीय आहेत.<br />
नेहरू महापुरुष आहेत.<br />
आंबेडकर, सावरकर प्रत: स्मरणीय आहेत.<br />
<br />
गांधींची कोणती मूल्ये आज घ्यायची<br />
अन् सावरकर, आंबेडकरांची कोणते विचार अमलात आणायचे याची योग्य जाण या नेत्यांमध्ये आहे.<br />
<br />
चीन, पाकिस्तानसाठी गांधी नव्हे सावरकर, आंबेडकर नीती हवी याची जाण आजच्या नेतृत्वात आहे.<br />
हा नवा भारत आहे.<br />
देशासाठी जे जे उपयुक्त ते ते अंगीकार करणे अन् जे जे घातक ते विषवत.<br />
कोणीही महापुरुष देशापेक्षा मोठा नाही.<br />
देश आहे म्हणून आपण आहोत.<br />
हा सावरकर विचार आहे.<br />
हा शाश्वत विचार आहे.<br />
तारणारा आहे. <br />
सर्व समावेशक आहे; पण भोंगळ नाही.<br />
<br />
भारत यापुढे<br />
सावरकरांच्या मार्गानेच चालेल...<br />
सावरकर हे<br />
काळाच्या पुढे शंभर वर्षे असतात...<br />
सावरकरांनी जे १०० वर्षांपूर्वी सांगितले ते या देशातील लोकांना आता पूर्णपणे समजले आहे.<br />
तसे नसते तर या देशातील लकांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या सरकारला इतक्या तगड्या बहुमताने सत्ता दिली नसती.<br />
<br />
तगड्या बहुमतमुळे आणि सावरकर नितीमुळेच तर ३७० हटले. काश्मीर खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले. सैन्यात आत्मविश्वास वाढला. सर्जिकल स्ट्राईक होऊ लागले.<br />
<br />
असो. सर्वांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंतीनिमित्त शुभेच्छा. सावरकर अभ्यास करण्यासाठी अनेक तरुणांनी पुढे यावे हे नम्र आवाहन.<br />
<br />
- सिद्धाराम भै. पाटीलpsiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-87006588776238402432020-05-25T18:03:00.000+05:302020-05-25T18:03:42.139+05:30भारतमातेच्या मुर्तीमुळे कन्याकुमारीत म्हणे "धार्मिक भावना" दुखावल्या<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-aQqMMNO6bHVEvfB1raepMr794brMCXD7RnD40H-2i1HFKZWxMYOQgHlNuBC0NQSl2bXAmO6ZtIrdBLAC3wspPhV9aS8QKPzdRHuuDO-5hJVr1mvA4r8_26MhFWfBMrvILXeOFe-VZIR7/s1600/image__3_.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1200" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg-aQqMMNO6bHVEvfB1raepMr794brMCXD7RnD40H-2i1HFKZWxMYOQgHlNuBC0NQSl2bXAmO6ZtIrdBLAC3wspPhV9aS8QKPzdRHuuDO-5hJVr1mvA4r8_26MhFWfBMrvILXeOFe-VZIR7/s320/image__3_.png" width="320" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-5CKN-X2X_N4/Xsu60ejVc1I/AAAAAAAAIXM/l51pL30EQzswMM26_L80_3Q48W_mHCD4wCLcBGAsYHQ/s1600/image__2_.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="750" data-original-width="1200" height="200" src="https://1.bp.blogspot.com/-5CKN-X2X_N4/Xsu60ejVc1I/AAAAAAAAIXM/l51pL30EQzswMM26_L80_3Q48W_mHCD4wCLcBGAsYHQ/s320/image__2_.png" width="320" /></a></div>
कन्याकुमारी जिल्ह्यातील पुलियुर या छोट्याशा गावातील ही घटना पहा.<br />
कन्याकुमारी जिल्ह्यात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या आहे 46.85 टक्के आणि हिंदू 48.65 टक्के. उर्वरित मुस्लिम.<br />
<br />
200 वर्षे प्राचीन असलेल्या इसक्की अम्मन (दुर्गादेवी) मंदिराच्या भूमीवर काही दिवसांपूर्वी भारत मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. हे मंदिर हिंदु व्यक्तीच्या मालकीचे आहे. एका हिंदू मजुराने पुढाकार घेऊन भारत मातेची ही मूर्ती बसवली.<br />
<br />
मंदिराजवळ राहणाऱ्या काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसात तक्रार दिली की यामुळे त्यांच्या "धार्मिक भावना" दुखावल्या. पोलिसांनी लगेच दखल घेतली. ही मूर्ती काढून टाका असे तेथील गावकऱ्यांना पीएसआयने 20 मे रोजी सांगितले. इतकेच नाही तत्परता दाखवत 21 मे रोजी पोलिसांनी निळ्या कापडाने भारत मातेची प्रतिमा झाकून टाकली.<br />
<br />
RSS, BJP आणि हिंदू मुन्नानी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. प्रकरण मुख्यमंत्री यांच्या पर्यंत नेले. आणि भारत मातेची प्रतिमा मुक्त केली.<br />
<br />
जेथे हिंदू समाज हा बहुसंख्य असतो तेथे अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उभारण्यास कधीही विरोध होत नाही. सर्व धर्म सत्य आहेत. ईश्वर एक आहे. तो सर्वत्र आहे. कणाकणात आहे. चराचरात आहे. आणि तो विविध रूपातून व्यक्त होतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. त्यामुळे हिंदू कधीही इतरांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.<br />
परंतु<br />
विस्तारवादी, एकांतिक धर्मीय व्यवस्थेचे असे नसते. "माझाच धर्म सत्य. माझाच देव सत्य. इतर देव खोटे खोटे. असत्य आहेत. जगातील इतर धर्मीय सारे माझ्याच धर्मात ओढून आणले पाहिजेत." यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ही यंत्रणा देशाची सीमा मानत नाही.<br />
<br />
धर्मांतर, जिहाद, क्रुसेड ... असे काहीही करून जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे असा धर्मवेड प्रबळ असतो. राष्ट्रवाद त्यांच्या मार्गातील काटा असतो. भारत मातेची प्रतिमा त्यांच्यासाठी धार्मिक भावना दुखावणारे असते. "धर्मांतरमुळे राष्ट्रांतर घडते" ते असे.<br />
<br />
महत्वाचे -<br />
पोलिस यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेतले पाहिजे. कोणीतरी चार जण एकत्र येऊन कोणाविरुद्ध तरी तक्रार देतात आणि पोलिस कामाला लागतात. धार्मिक भावना दुखावल्या ची तक्रार असेल तर पोलिस यंत्रणा हळवी होते. अशावेळी कायद्याची थोडीफार जाण असलेली संघटित शक्ती गरजेची असते. अन्यथा चूक आपली नसली तरी "आपली भारतमाता झाकून" आपल्यावरच अरेरावी केली जाते. सत्याचा जय तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा सत्याला सामर्थ्याची जोड असते.<br />
अन्यथा<br />
कधी काळी हिंदू असलेला अफगाणिस्तान भारताच्या सीमेबाहेर जातो. १९४७ पर्यंत भारताचा अविभाज्य भाग असलेली भूमी पाकिस्तान, बांगलादेश बनते.<br />
<br />
जाता जाता...<br />
1. काही वर्षांपूर्वी कन्याकुमारी जिल्ह्याचे नाव बदलून "कन्नी मेरी" (मेरी म्हणजे येशू ख्रिस्ताची आई) असे नामकरण करण्याची मागणी आणि आंदोलन झाले होते.<br />
2. कन्याकुमारी येथील समुद्रातील श्रीपाद शिला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारणी करण्यास एका गटाने मोठा विरोध केला होता. हे सेंट झेवियर्स रॉक आहे. येथे विवेकानंद स्मारक होऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.<br />
3. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही हिंदूंना आपल्याच जागेत एखादे मंदिर उभे करायचे असेल तर ते इतके सोपे नाही.<br />
यासंबंधीच्या काही बातम्या अधून मधून येत असतात. काही बातम्या मध्येच विरून जातात. बातमी मूल्य या निकषात अशा बातम्यांना कोण विचारतं ?<br />
<br />
- सिद्धाराम भै. पाटीलpsiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-89441868089420359502020-05-03T18:27:00.000+05:302020-05-03T18:27:06.454+05:30हमीद दाभोलकर, हमीद दलवाई आणि अंनिस<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-uLSiaJTj6DU/Xq6_RWH25ZI/AAAAAAAAIVI/HcrJ-bz2eNwZ2hoop4TN8N1c3KDHeP4eQCLcBGAsYHQ/s1600/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A9_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1270" data-original-width="1070" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-uLSiaJTj6DU/Xq6_RWH25ZI/AAAAAAAAIVI/HcrJ-bz2eNwZ2hoop4TN8N1c3KDHeP4eQCLcBGAsYHQ/s320/IMG_%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A9_%25E0%25A5%25A7%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25A9%25E0%25A5%25AC%25E0%25A5%25AB%25E0%25A5%25A9.jpg" width="269" /></a></div>
<br />
हमीद दलवाई यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्ताने हमीद दाभोलकर यांनी स्वतःचा एक जुना लेख आपल्या fb वर शेअर केला आहे. (https://m.facebook.com/story.php?story_fbid=790338144829584&id=100015602171173) हा लेख खूप प्रभावी अन् विचार करायला लावणारा आहे.<br />
त्यातील एका मुद्द्याने मला अस्वस्थ केले आहे. (तो मुद्दा येथे स्क्रीन शॉट ने जोडला आहे.)<br />
नाव हमीद अन् आडनाव दाभोलकर यामुळे हमीद दाभोलकर यांना शाळेत मुले लांड्या म्हणून चिडवू लागली. का चिडवत असतील तर हमीद दा. यांना वाटतं की, "चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवाजी व अफजल खान लढाई वर्णन आहे. त्यामुळेच हे घडले असावे."<br />
हा गंभीर मुद्दा आहे. अनेक प्रश्न पुढे येतात..<br />
१. शिवाजी - अफजल खान लढाई वर्णनात कोठेही लांड्या हा शब्द आलेला नाही. किंवा अफजल खानशी संबंधित हमीद नावाची व्यक्तिरेखा सुद्धा नाही. मग मुले चिडवण्याचे कारण शिवाजी - अफजल खान लढाई असेल का ?<br />
२. शिवाजी - अफजल लढाई वर्णन हे कारण असेल तर मग हा धडा अभ्यासक्रमात असू नये असे सुचवायचे आहे का ?<br />
३. रोज बातम्यांमध्ये कुठे हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ये तोयबा, जैश ए मोहम्मद, तालिबान, लादेन, दानिश, इंडियन मुजाहिद्दीन, अल कायदा, कसाब, जिना, अफजल गुरू, याकुब वगैरे अतिरेकी, जिहादी यांचा उल्लेख येत असतो. मुलांच्या पाहण्यात, वाचनात या बाबी येतातच. मग केवळ चौथीचा धडा वगळल्याने भागेल का?<br />
४. थोर नेते शरदचंद्र पवार सुचवतात त्याप्रमाणे तब्लीगी, जिहादी, अतिरेकी यांच्या बातम्याही प्रसिध्द करायच्या नाहीत, अशी मागणीही होऊ शकते. समजा ही मागणीसुद्धा मान्य झाली तर मूळ प्रश्न सुटणार आहे का ? (मूळ प्रश्न हिंदू - मुस्लीम एकता कशी नांदेल हा आहे.)<br />
५. थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती डॉ. APJ अब्दुल कलाम हे सर्व भारतीयांना वंदनीय आहेत. त्यांचे नाव उच्चारताना कोणीही विद्यार्थ्यांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हमीद यांना चिडवल त्या शब्दाचा वापर करत नाहीत, हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे.<br />
<br />
त्यामुळे शिवाजी - अफजल खान लढाई वर्णन ही अडचण असू शकत नाही. बातम्यांतून पुन्हा पुन्हा पुढे येणारी अतिरेक्यांची नावेही समस्या असणार नाहीत. समाजापुढे डॉ. APJ कलाम यांच्यासारखी चरित्रे आणावी लागतील आणि त्याच वेळी अफजल खान, अफजल गुरू अन् कसाब यासारख्या व्यक्तींची गत काय होते हेही पुढे आणावे लागेल.<br />
<br />
वाईट काम करेल त्याला दंडित केले जाते आणि चांगले काम केल्यास गौरव होतो. लोक डोक्यावर घेतात. येथे त्याचे नाव कोणत्या धर्मातील आहे, तो कोणत्या धर्माचा आहे, याला काही किंमत नसते. हे विचार नव्या पिढीवर बिंबवले पाहिजे. यासाठी अंनिस मोठी भूमिका निभावू शकते. हमीद दलवाई यांना हेच अपेक्षित असावे.<br />
परंतु, धार्मिक भेदाभेद वाढू नये म्हणून अफजल खान वध शिकवू नका, अतिरेकी काही केले तरी त्यावर बातम्या दाखवू नका... गप्प राहा.. डॉ. APJ यांच्या सारख्या महान व्यक्तीचा गौरव टाळा... अशी भूमिका अंनिस घेणार असेल तर पदरी फार काही पडणार नाही.<br />
<br />
- सिद्धारामpsiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-52234954875372124882020-04-29T16:47:00.000+05:302020-04-29T16:57:33.958+05:30संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-p6lyU5S1jaY/XqlhzFPSoxI/AAAAAAAAIUY/oJSCk3k-ITcvia6B_bHd_7fWOsc7YU6JgCLcBGAsYHQ/s1600/aparnatai1.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="736" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-p6lyU5S1jaY/XqlhzFPSoxI/AAAAAAAAIUY/oJSCk3k-ITcvia6B_bHd_7fWOsc7YU6JgCLcBGAsYHQ/s320/aparnatai1.jpg" width="147" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Aparna Ramtirthkar</td></tr>
</tbody></table>
<span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif; font-size: large;"><span style="color: blue;">चला नाती जपुया आणि आईच्या जबाबदार्या हे कौटुंबिक विषय घेऊन ज्यांनी महाराष्ट्रातील कानाकोपर्यांत तीन हजारांहून अधिक व्याख्याने दिली, लव्ह जिहादच्या सापळ्यात अडकलेल्या शेकडो मुलींना अलगद बाहेर काढून त्यांच्या पालकांना सोपवलं, शेकडो कुटुंबे घटस्फोटापासून, उद्ध्वस्त होण्यापासून ज्यांनी वाचवली त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर तथा अपर्णाताई यांचे मंगळवार, दि. 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी 11.45 वाजता सोलापूर येथील अश्विनी रुगणालयात उपचार सुरू असताना निधन झाले. </span></span><span style="font-size: large;">यानिमित्त<b><span style="color: #cccccc;"> </span><span style="color: #666666;">सिद्धाराम भै. पाटील</span></b> यांचा लेख </span><br />
<span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif; font-size: large;"><br /></span>
<span style="font-size: large;"><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">पक्षाघाताचा झटका आल्याने गुढी पाडव्याच्या दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिली अन् अखेर वयाच्या 65 व्या वर्षी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या मागे मुलगा आशुतोष, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><span style="color: #222222;">पती, पत्नी दोघेही विचारांचे पक्के होते. आपण घेतलेल्या भूमिकेसाठी कोणतीही किंमत मोजण्याची त्यांची तयारी होती. किंबहुना आपण स्वीकारलेला मार्ग हा खडतर आहे, काट्याकुट्याचा आहे, याची त्यांना पूर्ण जाणीव होती. </span><b><span style="color: red;">कटु असलेले सत्य मांडताना आडपडदा ठेवायचा नाही. सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करत नाही. सत्य थोडेही डायल्यूट न करता, तीव्रता कमी न करता थेट मांडणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान होते.</span></b></span></span><br />
<span style="font-size: large;"><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">कटु सत्य भेदकपणे मांडण्याची रामतीर्थकर शैली महाराष्ट्रातील सामान्य माणसाने सहज स्वीकारली. आपली मानली. पण, काही मतलबी बुद्धीजीवींनी आपल्या मनातील संकुचितता अपर्णाताईंना चिटकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. अपर्णाताई या मध्ययुगीन मानसिकतेच्या समर्थक आहेत येथपासून ते त्या स्त्री जातीच्या शत्रू आहेत, येथपर्यंत अनेक आरोप होत राहिले. पण याच वेळी समाजाने त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">महिन्यातील किमान 25 ते 28 दिवस प्रवास करणे ही त्यांची दिनचर्याच बनून गेली होती. पायात जणू भिंगरी. अफाट जनसंपर्क. महाराष्ट्रातील गावोगावी आणि बहुतेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांचे मोहोळ तयार केले होते. त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार्यांत शिवसेना, भाजपा, हिंदू जनजागरण समिती, विविध ज्ञाती संस्थांचे कार्यकर्त होते. तसे काँग्रेस-राष्ट्रवादीचे पडद्यामागून आयोजन करणारे कार्यकर्तेही होते. मठ-मंदिरांचे विश्वस्त, महिला मंडळे, प्रगतशील शेतकरी असे विविध थरातील कार्यकर्त्यांसाठी अपर्णाताई दैवत बनल्या होत्या. </span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">सगळा प्रवास लाल डब्यातून (एसटीने). गडचिरोली आणि चंद्रपूर सोडल्यास संपूर्ण महाराष्ट्रात व्याख्यानांच्या माध्यमातून समाजकार्याचा आणि धर्मकार्याचा यज्ञ मांडला होता. बहुतांश सभांना तीन-चार हजार गर्दी ठरलेली. काही सभांना 30 ते 40 हजारांची उपस्थिती.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><b><span style="color: #666666;">एखादी सामान्य स्त्री मनात जिद्द बाळगून पुढे आली तर ती असामान्य काम उभे करू शकते याचे अपर्णाताई या जीवंत उदाहरण.</span></b><span style="color: #222222;"> अपर्णाताई या मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. पतीची नोकरी बदलल्याने पुण्याहून सोलापूरला आल्या. मुलाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरं शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचे वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या.</span></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><b><span style="color: #8e7cc3;">रोज व्याख्यान म्हटलं की मानधनही मिळणारच. त्या मानधन स्वीकारत, पण आपल्या 75 लेकरांच्या उदरनिर्वाहासाठी. मोहोळ (जि. सोलापूर) येथे पारधी समाजाची मुलं त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणली. दरमहा 60 हजार रुपयांचा खर्च व्याख्यानाच्या मानधनातून उभा करत.</span></b></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><span style="color: blue;"><b>कामाची गरज ओळखून त्यांनी आपले जीवन अनेक अंगांनी फुलवले होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. त्यांच्या व्यक्तित्वाला त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचा पाया होता. जे काही करायचं ते समाजासाठी. आर्थिक स्थिती बेताची असतानाही जी निस्पृहता त्यांनी शेवटपर्यंत दाखवली त्याला तोड नाही. </b></span></span><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><b><span style="color: red;">पैशाविषयीचा जो भाव श्री रामकृष्ण परमहंस यांच्या ठायी होता तोच भाव रामतीर्थकर दाम्पत्याने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. त्यांच्या अंगी असलेले धाडस यातूनच आले असावे.</span></b></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><span style="color: #222222;">अपर्णाताई यांचा सहवास मिळालेला प्रत्येक जण त्यांच्या कुटुंबवत्सल आणि प्रेमळ स्वभावाने बांधला जात असे. खंबीर बोलणार्या अपर्णाताई मनाने खूपच हळव्या होत्या. सुलभ, सोप्या भाषेत लिहिणार्या अपर्णाताई सिद्धहस्त लेखिका होत्या. कुठे तरी चुकतंय हे दै. पुण्य नगरीतील साप्ताहिक सदर अनेक वर्षे महाराष्ट्रात गाजलं. दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या पत्नींशी हितगुज करणारे सदरही पत्रकारितेतील त्यांचा अधिकार सांगणारे ठरले. मराठी माध्यम जगताला टीव्ही पत्रकारिता नवी होती तेव्हा अपर्णाताई यांनी वृत्तदर्शन या स्थानिक वृत्तवाहिनीत मंथन नावाने प्रबोधन करणारी साप्हाहिक मालिका चालवली. प्रभावी वक्त्या म्हणून परिचित असलेल्या अपर्णाताई या हौशी कलावंत होत्या. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. </span><br /><b><span style="color: blue;">नाटक, समाजसेवा, कायदा, समुपदेशन असे कोणतेही क्षेत्र त्यांच्यासाठी वर्ज्य नव्हते. सोलापुरात पाखर संकुल आणि उद्योगवर्धिनी या संस्था नावारूपास आणण्यात अपर्णाताई यांचा वाटा सिंहाचा होता. या संस्थांनी हजारोंच्या संख्येने महिलांना स्वावलंबी बनवले.</span><span style="color: #20124d;"> </span></b><span style="color: #222222;">अंगी संघटन कौशल्य होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पु. भा. भावे हा मानाचा पुरस्कार मिळाला. त्यांचे जीवन अनुकरणीय होते. </span><b><span style="color: red;"> त्यांच्या व्याख्यानांवरून अनेकदा वादळ उठले तेव्हाही त्या अतिशय शांत होत्या. आपले संतुलन त्यांनी ढळू दिला नाही</span></b><span style="color: #222222;">. सनातन संस्थेचे संस्थापक डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्यावर अपर्णाताई यांची श्रद्धा होती. </span><span style="color: orange;"><b>अपर्णाताई यांचे जीवन हे एका तपस्विनीचे जीवन होते.</b></span></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">संघ गीताच्या पुढील ओळी त्यांना तंतोतंत लागू पडतात...</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><i><b><span style="color: #666666;"><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">पतझड के झंझावातों में</span><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">जग के घातों प्रतिघातों में</span><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">सुरभी लुटाता सुमन सिहरता</span><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">निर्जनता में भी खिलता है</span><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">दिव्य ध्येय की ओर तपस्वी</span><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">जीवनभर अविचल चलता है.</span></span></b></i><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><b><span style="color: #660000;">तीन जिस्म मगर एक जान</span></b></span></span><br />
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-ZxWmMv0vV-A/XqlhNLmHSLI/AAAAAAAAIUQ/7odY0Ehw5VEcYQbSRlrp41DHrMiXLw-AwCLcBGAsYHQ/s1600/aparnatai.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="568" data-original-width="1080" height="168" src="https://1.bp.blogspot.com/-ZxWmMv0vV-A/XqlhNLmHSLI/AAAAAAAAIUQ/7odY0Ehw5VEcYQbSRlrp41DHrMiXLw-AwCLcBGAsYHQ/s320/aparnatai.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">Shubhangi Buwa, Aparna Ramtirthkar & Chandrika Chauhan</td></tr>
</tbody></table>
<span style="font-size: large;"><span style="color: #660000;"><b><br style="background-color: white; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /></b></span><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;">अॅड. अपर्णा रामतीर्थकर, चंद्रिका चौहान आणि शुभांगी बुवा ही तीन नावे सोलापूरच्या सामाजिक विश्वात एकत्रितरीत्या घेतली जातात. सुमारे दोन तप म्हणजे 24 वर्षांहून अधिक काळ या तिघींनी पाखर संकुल, शुभराय मठ आणि उद्योगवर्धिनी या तिन्ही संस्था एकदिलाने नावारुपास आणल्या. कुटुंबपद्धती टिकून राहावी. देशभक्ती आणि हिंदुत्वाची भावना लोकांमध्ये रुजावी, ही तळमळ तिघींची समान प्रेरणा. या बाबतीत अपर्णाताई अगदी कट्टर होत्या. याबद्दल चंद्रिका चौहान म्हणतात, आम्ही तिघी खूप भांडत होतो. नंतर रडतही होतो. पण बाहेर समाजासमोर येताना आम्ही तिघी एकत्रच. तीन जिस्म मगर एक जान है हम, असे आम्ही गंमतीने म्हणत असू. बाबा म्हणजे अपर्णाताईंचे पती अरुण रामतीर्थकर बुद्धीवादी. मोठे विचारवंत. मी बायको, मला काही येत नाही. मी तर सामान्य गृहिणी, अशी अपर्णाताईंची भावना. शिक्षणही अर्धवट होतं. पण पतीकडून शिकण्याची जिद्द मात्र होती. पतीकडून सर्वकाही शिकल्या. पतीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पिंजून वैचारिक प्रबोधन करू लागल्या. बाबा गेले. ताई खचू लागल्या. मार्चच्या शेवटच्या दिवसांत पक्षाघाताने गाठलं. अपर्णाताई कालवश झाल्या. त्यामुळे तीन पैकी एक खांब निखळला.</span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><br /></span></span><br />
<span style="font-size: large;"><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><b><span style="color: blue;">अपर्णाताई यांचे निवडक विचार त्यांच्याच शब्दांत</span></b></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><span style="color: #222222;">1. वृध्दाश्रमांमध्ये वाढ होतेय. घरगुती कलहामुळे कोर्टकचेर्या वाढताहेत. समाजाचं वास्तव चिंताजनक आहे. उच्च आणि प्रतिष्ठित पदावरील एका व्यक्तीची पत्नी (जी एम.एस्सी., बी.एड. शिकली आहे) घरी सासू-सासरे नको म्हणून माहेरी गेली. चार वर्षं परत आलीच नाही. शेवटी कुटुंब तुटलं. हे उदाहरण अपवाद नाही. किचन नका संस्कृती येऊ घातलीय. शीला की जवानी यासारख्या गाण्यावर आईच नाचते, अशी दृश्यंही पाहायला मिळताहेत. नात्यांमधला समजूतदारपणा, आदर कमी होतो आहे. त्यामुळेही घरं दुभंगताना दिसताहेत. तसंच, </span><b><span style="color: red;">नाती जपताना संस्कार आणि धर्म याच्याशी फारकत घेतल्यास लव्ह जिहादला रोखणं अवघड आहे. त्यामुळे नाती जपत असताना स्वधर्माचं नेमकं ज्ञान, संस्कार याला पर्याय नाही.</span></b></span><br style="background-color: white; color: #222222; font-family: Arial, Helvetica, sans-serif;" /><span style="background-color: white; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif;"><span style="color: #222222;">2. लव्ह जिहादची वाढती विषवेल पाहता आणखी नियोजनबध्दरीत्या जागृती होण्याची गरज वाटते. </span><b><span style="color: #999999;">हिंदू धर्मातून बाहेर जायला दरवाजे आहेत पण परतायला नाहीत, ही स्थितीही हळूहळू बदलतेय. लव्ह जिहादमधून सुटून आलेल्या मुलींशी लग्न करायला आम्ही तयार आहोत, असं सांगणारे तरुण पुढे येताहेत.</span></b><span style="color: #222222;"> अशा तीन मुलींची लग्ने करण्यात आली आणि ती यशस्वी झाली. हा शुभसंकेत वाटतो. याला चळवळीचे रूप यावं, असं वाटतं.</span></span></span><span style="background-color: white; color: #222222; font-family: "arial" , "helvetica" , sans-serif; font-size: large;"><br /></span><br />
<b><span style="color: #666666;">महत्वाचे लेख पुढील लिंकवर </span></b><br />
<span style="font-size: large;"><span style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;">अपर्णा ताई यांनी स्वत:विषयी लिहिलेला लेख</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;"> </span><a href="http://psiddharam.blogspot.in/2015/11/blog-post_8.html" style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;" target="_blank"><b><span style="color: orange;">वादळाशी केला संसार </span></b></a><br style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;" /><br style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;" /><span style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;">लव जिहाद संबधी अपर्णा ताई यांची मुलाखत</span><br style="background-color: white; color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif;" /><a href="http://www.psiddharam.blogspot.in/2013/03/blog-post_9.html" style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; text-decoration-line: none;" target="_blank"><b><span style="color: #274e13;">लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई </span></b></a></span>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-32177919929754248292020-04-28T13:27:00.001+05:302020-04-29T16:59:19.207+05:30अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-QL0lEoh9YqY/Xqfh5_xgK-I/AAAAAAAAIUA/Vu2mRz_UFL8mB6wLbgrsq4-Di_7rU9IdQCLcBGAsYHQ/s1600/IMG20191018171125.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="737" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-QL0lEoh9YqY/Xqfh5_xgK-I/AAAAAAAAIUA/Vu2mRz_UFL8mB6wLbgrsq4-Di_7rU9IdQCLcBGAsYHQ/s320/IMG20191018171125.jpg" width="147" /></a></div>
सोलापूर । ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अॅड. अपर्णा अरुण रामतीर्थकर यांचे मंगळवारी सकाळी 11.45 वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. पक्षाघाताचा झटका आल्याने गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मृत्यूसमयी त्या 65 वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे. ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत.<br />
मुलाचं शिक्षणपूर्ण होईपर्यंत फक्त घर सांभाळलं. मुलगा स्वावलंबी होताच 1996 मध्ये अपुरे शिक्षण पूर्ण करत बी.ए.ची पदवी घेतली. त्यानंतर लगेच एलएलबी झाल्या. कोर्टात पीडित महिलांची दु:खं आणि वकिलांचं वर्तन पाहून त्यांनी अशी वकिली करायची नाही असं ठरवलं. अशील आणि प्रतिवादी यांच्यात समेट घडवून आणू लागल्या. नकळत त्या हजारो घरांपर्यंत पोहोचल्या. 2001पासून त्या सामाजिक कार्यात आहेत. 2008पासून ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदार्या’ या विषयांवर त्यांनी तीन हजाराहून अधिक भाषणं दिली आहेत. तुटणारी घरं वाचली पाहिजेत आणि लव्ह जिहादच्या आक्रमणापासून आपल्या मुलीबाळींना अन् स्त्रियांना वाचवलं पाहिजे, या भावनेने त्या कार्य करत होत्या.<br />
महिन्यातून 26 ते 28 दिवस एसटी बसने प्रवास करून व्याख्याने देणार्या श्रीमती अपर्णा रामतीर्थकर यांच्या भूमिकेवरून अनेकदा वादही झाले. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांवर त्या अखेरपर्यंत कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्रांसाठी महिला आणि इतर विषयावर त्यांनी पुष्कळ स्तंभलेखन केले. आपले संपूर्ण मानधन सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील पारधी मुलांच्या वसतीगृहासाठी देऊन अनेक वर्षे त्यांनी तेथील आश्रमशाळा उभी केली.<br />
<br />
<h3 class="post-title entry-title" itemprop="name" style="background-color: white; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-stretch: normal; font-variant-east-asian: normal; font-variant-numeric: normal; line-height: normal; margin: 0px; position: relative;">
<a href="https://psiddharam.blogspot.com/2020/04/blog-post_29.html" style="text-decoration-line: none;"><span style="color: orange; font-size: large;">संन्यस्त जीवन जगणारी धाडसी गृहिणी</span></a></h3>
<span style="font-size: large;"><br /></span>
<a href="http://psiddharam.blogspot.in/2015/11/blog-post_8.html" style="background-color: white; color: #6699cc; font-family: arial, tahoma, helvetica, freesans, sans-serif; font-size: x-large;" target="_blank"><b>वादळाशी केला संसार </b></a><br />
<span style="font-size: large;"><br /></span>
<a href="http://www.psiddharam.blogspot.in/2013/03/blog-post_9.html" style="background-color: white; font-family: arial, tahoma, helvetica, freesans, sans-serif;" target="_blank"><span style="color: #274e13; font-size: large;"><b>लव्ह जिहादपासून वाचवणाऱ्या ताई </b></span></a>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-11640508092620027112020-01-14T21:48:00.000+05:302020-01-14T22:17:35.178+05:30विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी<h3>
<span style="color: red;">ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशनात भाऊ तोरसेकर यांचे मत</span></h3>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-4ScGz9vxSlY/Xh3oGMGezqI/AAAAAAAAIPM/_dDTdrC2IOQ6DLP3bm_kkZmkSUEHv9bNgCLcBGAsYHQ/s1600/DSC_2507.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="213" src="https://1.bp.blogspot.com/-4ScGz9vxSlY/Xh3oGMGezqI/AAAAAAAAIPM/_dDTdrC2IOQ6DLP3bm_kkZmkSUEHv9bNgCLcBGAsYHQ/s320/DSC_2507.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन</td></tr>
</tbody></table>
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-aFbrz47w7xA/Xh3oGe0-3cI/AAAAAAAAIPY/qPPTRg3HXVoSzzpxijy_zqIpTqU7cc6cACEwYBhgL/s1600/DSC_2496.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="213" src="https://1.bp.blogspot.com/-aFbrz47w7xA/Xh3oGe0-3cI/AAAAAAAAIPY/qPPTRg3HXVoSzzpxijy_zqIpTqU7cc6cACEwYBhgL/s320/DSC_2496.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी ग्रंथ प्रकाशन</td></tr>
</tbody></table>
<span style="color: blue;">पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले.</span><br />
<div dir="auto">
<a name='more'></a></div>
<div dir="auto">
ब्रह्मर्षी विवेकानंद ते राजर्षी नरेंद्र मोदी या जटायु अक्षरसेवा प्रकाशित ग्रंथाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त कोथरूडच्या स्वस्तिक सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ, रा. स्व. संघाचे रवींद्र वंजारवाडकर, ग्रंथाचे संपादक संतोष जाधव, गोसेवा प्रमुख रवींद्र रबडे, पत्रकार सिद्धाराम पाटील आदी उपस्थित होते. </div>
<div dir="auto">
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-pOpG43yf5_8/Xh3vsxek6kI/AAAAAAAAIPg/1xP4OYo6jNkoDp1bWDkHe9HXsgp30ocegCLcBGAsYHQ/s1600/DSC_2520.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1068" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-pOpG43yf5_8/Xh3vsxek6kI/AAAAAAAAIPg/1xP4OYo6jNkoDp1bWDkHe9HXsgp30ocegCLcBGAsYHQ/s320/DSC_2520.jpg" width="213" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">भाऊ तोरसेकर</td></tr>
</tbody></table>
<br /></div>
<div dir="auto">
देशविदेशातील 27 विद्वानांच्या चिंतनशील लेखांचे संकलन या पुस्तकात आहे. अमेरिकेतील विद्वान डेव्हिड फ्रॉली, केंद्रीय गृहमंत्रालयात अवर सचिव राहिलेले आरव्हीएस मणी, ज्येष्ठ पत्रकार अभिलाष खांडेकर, यमाजी मालकर, रमेश पतंगे, विवेक घळसासी, तुषार दामगुडे, मिलिंद कांबळे, वेणु धिंगरा, प्रमोद डोरले, अरुण करमरकर, अभिराम दीक्षित, विजय तिवारी आदी लेखकांचा यात समावेश आहे. 9767284038 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या अन् ग्रंथ मागवा अशी वाचक केंद्र पद्धत वापरल्याचे जाधव यांनी सांगितले.</div>
<div dir="auto">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-4iJvpLvijBQ/Xh3v4zAkzuI/AAAAAAAAIPk/ny7sYEU4r-0qV_2j67_LSxYPAa5hXsExACLcBGAsYHQ/s1600/DSC_2495.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="213" src="https://1.bp.blogspot.com/-4iJvpLvijBQ/Xh3v4zAkzuI/AAAAAAAAIPk/ny7sYEU4r-0qV_2j67_LSxYPAa5hXsExACLcBGAsYHQ/s320/DSC_2495.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">संपादक संतोष जाधव</td></tr>
</tbody></table>
<br /></div>
<div dir="auto">
या ग्रंथातील एक लेखक असलेले श्री. तोरसेकर म्हणाले, नरेंद्र ते नरेंद्र अशी सव्वाशे वर्षांची भारताची वाटचाल या ग्रंथात आहे. ब्रह्मर्षी हा विचार असतो. तो कृतीत आणतो तो राजर्षी असतो. स्वामींनी मिळालेल्या मोजक्या मिनीटात आपल्या मोजक्या शब्दांनी जग जिंकले होते आणि मोदींनी मिळालेल्या मोजक्या संधींचा नेमका उपयोग करून आज जग आपल्या मताशी जुळवून घेऊन इथपर्यंत वेळ आणली आहे. एक स्वभावाने व जगण्याने संन्यासी होता आणि दुसरा राजसत्तेवर आरुढ झालेला असला तरी मनाने व स्वभावाने संन्याशीच राहिलेला आहे. कुटुंब नातेगोते वा संसारी जीवनावर तुळशीपत्र ठेवून बाहेर पडलेला हा संन्याशी ब्रह्मर्षी नाही, तर राजर्षी आहे, असे ते म्हणाले.<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-BpTQIiIhxI4/Xh3wM9TJ-kI/AAAAAAAAIPw/7AGD1Ov20L4Ce3TWqJl66Ne-hd6m3PVZQCLcBGAsYHQ/s1600/DSC_2491.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="213" src="https://1.bp.blogspot.com/-BpTQIiIhxI4/Xh3wM9TJ-kI/AAAAAAAAIPw/7AGD1Ov20L4Ce3TWqJl66Ne-hd6m3PVZQCLcBGAsYHQ/s320/DSC_2491.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">सिद्धाराम पाटील</td></tr>
</tbody></table>
</div>
<div dir="auto">
संपादक संतोष जाधव म्हणाले, आज भारतवर्षाची विविध क्षेत्रांत होत असलेली वाटचाल, धोरणांतील स्पष्टता आणि कणखर नेतृत्व पाहता जगद्गुरू भारताची लक्षणे ठळक होताना दिसत आहेत. विशेष उल्लेखनीय म्हणजे, अगदी किशोर वयापासून ज्यांनी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी आपले जीवन घडवले, त्याग आणि सेवा हे भारतवर्षाचे शाश्वत आदर्श ज्यांनी आपली जीवननिष्ठा बनवली, अशी समर्पित व्यक्ती आज नेतृत्वस्थानी आहे. नव्या भारताची पायाभरणी सुरू आहे. अशा वेळी जगद्गुरू भारत (स्वामी विवेकानंद) आणि नवा भारत (नरेंद्र मोदी) या संकल्पनांची सजग चर्चा व्हावी, राष्ट्रीयतेचे विविध आयाम समोर यावेत, या दृष्टीने या ग्रंथाची निर्मिती केली आहे.</div>
psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-37528135498631018892019-09-16T01:43:00.001+05:302019-09-16T01:43:54.885+05:30भाजपातील मेगाभरतीकडे तुम्ही कसे पाहता ?<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-Vgt2FcR8cBc/XX6bWD9YcNI/AAAAAAAAID8/4bCW64d_UbU85MudQV4cq1gqh9Gu4eBVwCLcBGAsYHQ/s1600/bjp.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="713" data-original-width="960" height="237" src="https://1.bp.blogspot.com/-Vgt2FcR8cBc/XX6bWD9YcNI/AAAAAAAAID8/4bCW64d_UbU85MudQV4cq1gqh9Gu4eBVwCLcBGAsYHQ/s320/bjp.jpg" width="320" /></a></div>
<br />
कांॅग्रेस आणि राष्ट्रवादी कांॅग्रेस या पक्षांचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अर्थातच ही स्थिती अभूतपूर्व आहे. या प्रकाराकडे पाहायचे कसे याबद्दल अनेक मतमतांतरे आहेत. ज्या मंडळींनी सदैव भाजपावर टीका टिप्पणी करण्यात धन्यता मानली, त्यांच्यासाठी हा धक्का फार मोठा आहे. या धक्क्यातून सावरायला त्यांना आणखी काही दिवस तरी लागतीलच. इतकेच काय जे भाजपाच्या विचारधारेचे कट्टर समर्थक आहेत त्यांच्यासाठीही हे अनपेक्षित आहे. त्यामुळे यावर कसे व्यक्त व्हावे, हा आकलनापलीकडचा विषय बनला आहे.<br />
ज्यांनी कालपर्यंत कांॅग्रेसमध्ये राहून सत्तेची फळे चाखली, त्यांना भाजपात घेऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करणे सुरू असल्याची प्रतिक्रिया फार बोलकी आहे. सदैव भाजपाच्या विचारधारेचा दुश्वास करणारी मंडळीही असे मत व्यक्त करण्यात आघाडीवर आहेत.<br />
पण मला वाटतं की... जे चालले आहे ते चांगले चालले आहे....<br />
आऊट आॅफ बाॅक्स जाऊन काही विचार केलं गेलंय असं मला वाटतं...<br />
माझ्या मते ९९ टक्के राजकारणी मंडळींना (नेत्यांना) विचारधारेशी फार देणे - घेणे असत नाही. आपण निवडून येणे आणि सत्तेत वाटा मिळवणे, हेच त्यांचे ध्येय असते. ते स्वाभाविकही आहे. अर्थातच याला कोणताही पक्ष अपवाद नाही. हे वास्तव आहे.<br />
येथे दोन उदाहरणे पाहा...<br />
दोन आठवड्यापूर्वी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील शिर्पनहळ्ळी या गावी कांॅग्रेसचे आमदार श्री. सिद्धाराम म्हेत्रे गेले. त्यांनी ग्रामस्थांची एक बैठक घेतली. मी भाजपात जावं म्हणतोय. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही पाठिशी असाल ना? त्यावर गावकऱ्यांनी सकारात्मक माना डोलावल्या. ते म्हणाले, समजा भाजपात उमेदवारी नाही मिळाली तर मात्र मी कांॅग्रेसमधूनच उभारेल. तेव्हाही तुम्ही सहकार्य करा. त्यावरही बहुतेकांनी माना डोलावल्या. पण तेथे उपस्थित भैरीनाथ बिराजदार या तरुण शेतकऱ्याने वेगळा विचार मांडला. साहेब, या गाववाल्यांवर विश्वास ठेवू नका. भाजपातून उभारलात तरच मते पडतील. कांॅग्रेसकडून उभारलंत तर गावातून किती मते पडतील हे परवाच्या लोकसभा निवडणुकीतून तुमच्या ध्यानात आले असेलच. या तरुण शेतकऱ्याला म्हेत्रे यांनी दाद दिली. त्यांना समजायचे ते समजले.<br />
दुसरे उदाहरण कांॅग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांचे. शिवसेनेत जाण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरळ सांगून टाकलं की येत्या किमान १५ वर्षात तरी कांॅग्रेस पुन्हा येण्याची शक्यता नाही. मग पक्षात राहून करायचं काय?<br />
हा व्यवहारी विचार आहे. ज्याने व्यवहाराकडे पाठ फिरवली, तो कुठल्याच कामाचा राहात नाही. कांॅग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते व्यवहारी विचार करून भाजपा व सेनेत दाखल होत आहेत. त्यांच्यासमोर पर्यायच नाही. अर्थातच याला लोकांची बदललेली विचार करण्याची पद्धत कारणीभूत आहे.<br />
माझ्या मते सामान्य जनतेला या मेगाभरतीचे वावडे नाही.<br />
कांॅग्रेस व राष्ट्रवादीवाल्यांप्रमाणे तुम्ही वागू नका इतकीच अपक्षा जनतेची आहे.<br />
भाजपा - सेनावाले या अपेक्षेला किती खरे उतरतात यासाठी काही काळ जावा लागेल.<br />
थोडक्यात,<br />
लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणे नेते मिळतात. लोकांची समज वाढू लागली की नेतेही चांगले निपजू लागतील.<br />
मराठा मूकमोर्चा, भीमा कोरेगाव या दोन्ही घटना/विषय खूप ज्वलंत, स्फोटक होत्या. भाजपा नेतृत्वाने हे विषय अतिशय मॅच्युरिटीने हाताळले. यात थोडीशीही चूक झाली असती तर महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी हानी ठरली असती.<br />
जातींच्या आडून क्षुद्र राजकारण करणारे, हिंदू धर्माच्या प्रतिकांचा सतत द्वेष करणारे, तोंडी सतत शाहू-फुले-आंबेडकर या महापुरुषांची नाव घेत, सेक्युलॅरिझमचा जप करत स्वार्थाचे राजकारण करणारे दूर फेकले गेले आहेत. मेगाभरती आणि मेगागळतीच्या या गदारोळात समाजाच्या ऐक्याला नख लावू पाहणारे घटक शेवटच्या घटका मोजत आहेत. एकवेळ व्यवहारी नेते परवडले पण समाजात विष पसरवून स्वार्थ साधू पाहणाऱ्या शक्ती निस्तेज झाल्या आहेत. ती विषवेल उखडून टाकण्याचे मोठे काम मेघाभरतीतून झाले आहे, असे मला प्रामाणिकपणे वाटते.<br />
<br />psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-41881506473772641192018-08-26T18:59:00.000+05:302018-08-26T18:59:17.420+05:30सनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-oTttfW5lOSI/W4KqyGkNdhI/AAAAAAAAHjE/5hRCmvtCemk3TnT38qv63Z02v0nOYAd_gCLcBGAs/s1600/ss.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="161" data-original-width="314" src="https://2.bp.blogspot.com/-oTttfW5lOSI/W4KqyGkNdhI/AAAAAAAAHjE/5hRCmvtCemk3TnT38qv63Z02v0nOYAd_gCLcBGAs/s1600/ss.jpg" /></a></div>
<span style="color: blue;"><span style="font-size: large;">ज्याला कायद्याचे
थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार
नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक प्रक्रिया आहे. आवश्यक
बाबींची पूर्तता न करता घातलेली बंदी न्यायालयात टिकत नाही. </span></span><br />
<a name='more'></a><br />
सनातन संस्थेची
कठोर तपासणी व्हावी आणि तपासात ही संस्था दोषी आढळली तर योग्य कारवाई
व्हावी, अशी मागणी करणे रास्त आहे. परंतु, अशी मागणी होताना दिसत नाही.
चौकशी न करताच सनातनवर बंदी घातली पाहिजे, यासाठी काहीजण आकांडतांडव करताना
द<span class="text_exposed_show">िसत आहेत. पोलिस आणि न्यायालय यांना
त्यांचे काम करू दिले पाहिजे. दुसरी, महत्वाची बाब म्हणजे, एखाद्या
संस्थेचा कार्यकर्ता एखाद्या गुन्ह्यात दोषी ठरला म्हणून संबंधित संस्थेवर
कारवाई करता येत नाही. त्यासाठी संबंधित गुन्ह्यात खुद्द संस्था सहभागी
असल्याचे सिद्ध व्हावे लागते. काही वर्षांपूर्वी ओरिसातील कंधमाल येथे
दुर्गम भागात शिक्षण पोहोचवण्याचे कार्य करणारे स्वामी लक्ष्मणानंद यांची
हत्या झाली. त्या हत्येत चर्चचे अनेक पाद्री सक्रीयपणे सहभागी होते, हे
न्यायालयात सिद्ध झाले. दोषींना शिक्षा ठोठावण्याात आली. चर्चची रचना पाहता
ती एक संस्था आहे. एका चर्चमधील पाद्री दोषी ठरले म्हणून संपूर्ण चर्च
यंत्रणेवर बंदी घाला अशी मागणी कोणी केली नाही. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात
अनेक राजकीय पक्षांचे नेते दोषी आढळतात, तेव्हा संपूर्ण पक्षावरच कारवाई
करा अशी मागणी कोणी करत नाही. काही पक्षांचे कार्यकर्ते जिहादी अतिरेकी
कारवायांत सापडल्याच्या घटना महाराष्ट्राला नवीन नाहीत. पण म्हणून संबंधित
राजकीय पक्षाला अतिरेकी ठरवून बंदी घालण्याची मागणी कोणी केली नाही. </span><br />
<span class="text_exposed_show">सनातनच्या सगळ्याच विचारांशी सर्वांनीच सहमत असले पाहिजे असे नाही. मतभेद
असू शकतात. सनातनच्या विचारांशी सहमत नाही म्हणून थेट त्या संस्थेवर बंदी
घालण्याची मागणी करणे दिवळखाेरपणाचेच आहे. </span><br />
<span class="text_exposed_show">सनातन संस्थेने आजवर हिंदू
समाजात जागृती आणण्याच्या दृष्टीने मोठे कार्य केले आहे. सनातन संस्थेने
अनेक सामान्य लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणले आहे. भंपक
सेक्युलॅरिझमचे भूत उतरवण्याचे सनातनने केलेले कार्य आदर्शवत आहे.
गणेशोत्सवातील पावित्र्य टिकवण्याकामी सनातनने केलेले कार्य मोठे आहे.
प्लास्टिक राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यासाठी सनातन परिवाराने मोठी जनजागृती
केली आहे. सनातन संस्थेच्या ईश्वरी कार्यासाठी शुभेच्छा. सनातन संस्थेवर
बंदी येणार नाही. कोणी तसा प्रयत्न केला तरी बंदी न्यायालयात टिकणार नाही.
सत्यमेव जयते.</span>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-58802920501116650212018-08-26T18:54:00.001+05:302018-08-26T18:54:47.142+05:30एक आठवण फखरुद्दीन बेन्नूर यांची<div class="_5pbx userContent _3576" data-ft="{"tn":"K"}" id="js_27">
<br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;"><b> </b></span></span><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span style="font-size: large;"><b><a href="https://2.bp.blogspot.com/-pZESY_ZhiiA/W4KpaW3FAvI/AAAAAAAAHi4/VL5s7tdpUvML6nrfzIJ8idcrdWhl2HkRACLcBGAs/s1600/ff.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="553" data-original-width="830" height="213" src="https://2.bp.blogspot.com/-pZESY_ZhiiA/W4KpaW3FAvI/AAAAAAAAHi4/VL5s7tdpUvML6nrfzIJ8idcrdWhl2HkRACLcBGAs/s320/ff.jpg" width="320" /></a></b></span></div>
<span style="font-size: large;"><b>वार्तालाप सुरू झाला. बेन्नूर सरांची
विद्वत्ता स्तिमित करणारी हाेती. मांडणीही खूप सुंदर. परंतु, थोड्याच वेळात
मी अस्वस्थ झालो. स्तब्ध होण्याची वेळ माझ्यावर आली. <br /> बेन्नूर सर
सांगत होते....</b></span> <br />
<br />
<a name='more'></a><br />
माझी पत्रकार बनण्याची प्रक्रिया सुरू होती तेव्हाची गोष्ट. पत्रकारितेत
मी खूपच नवखा होतो. दमाणी पुरस्कार जाहीर होणार होते. त्या पत्रकार
परिषदेला मला पाठवण्यात आले. <br /> सोलापूरच्या जाम मिलमध्ये ती पत्रकार
परिषद होती. मी पहिल्यांदाच भय्या चौक ओलांडून त्या भागात गेलो. शोधत
गेल्यामुळे जायला उशीर झालेला. माझ्यासाठी ही पहिलीच पत्रकार परिषद होती.<br />
मी पोहोचलो तेव्हा ती संपत आलेली. तेथील पत्रकारांत मीही मिसळून गेलो. पण
समोर बसलेले मान्यवर काेण आहेत, याची मला कल्पना नव्हती. ज्यांच्यात मी
बसलो होतो, त्यातील एकाही व्यवसायबंधूला मी ओळखत नव्हतो. <br /> मी भीत भीतच शेजारच्या पत्रकाराला विचारले, "आता बोलत हाेते ते कोण?’. <br /> त्या पत्रकाराने अतिशय तुच्छतेने पाहिले आणि म्हटले, मग आलासच कशाला?. <br /> थोडक्यात, माझ्या अज्ञानाबद्दल त्यांना कीव वाटली. <br /> मी गांगरून गेलो होतो. <br /> नंतर मला समजले की ते मोठे लेखक आहेत. <br /> वात्रटीकाकार आहेत. <br /> रामदास फुटाणे त्यांचं नाव. <br /> शिंदे साहेबांचे ते फार जवळचे असल्याचे मी ऐकले होते. <br /> सोलापुरात अशी अनेक मोठी नावं आहेत. त्यापैकीच एक फक्रुद्दीन बेन्नूर. त्यांचे नुकतेच निधन झाले. थोर पुरोगामी विचारवंत होते ते. <br /> मी त्यांच्याबद्दल ऐकून होतो. पण प्रत्यक्ष कधी पाहिलो नव्हतो. तो योग सोलापूर श्रमिक पत्रकार संघामुळे जुळून आला.<br />
तत्कालीन राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम आपल्या पदावरून निवृत्त होणार
होते. संपुआ सरकारने या पदासाठी प्रतिभाताई पाटील यांचे नाव पुढे आणले
होते. यावर देशात मोठी चर्चा सुरू होती. <br /> काहींचे म्हणणे होते की डाॅ.
कलाम यांना पुन्हा संधी मिळावी. अशा वेळी राष्ट्रपतिपदाची निवडणूक असते
कशी... इत्यादी बाबींवर पत्रकारांना सखोल माहिती व्हावी, या हेतूने जाणकार व
विद्वान व्यक्ती म्हणून प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर यांच्याशी पत्रकारांचा
वार्तालाप ठेवला होता. <br /> पत्रकारितेत आता मी थोडा स्थिरावलो होतो. आणि
बेन्नूर सरांच्या वार्तालापाला मला पाठवण्यात आले. नवीन काही शिकायला
मिळणार याची उत्सुकता होती.<br /> वार्तालाप सुरू झाला. बेन्नूर सरांची
विद्वत्ता स्तिमित करणारी हाेती. मांडणीही खूप सुंदर. परंतु, थोड्याच वेळात
मी अस्वस्थ झालो. स्तब्ध होण्याची वेळ माझ्यावर आली. <br /> <span style="color: red;"><span style="font-size: large;"><b>बेन्नूर सर
सांगत होते, "डाॅ. कलाम हे कुठले शास्त्रज्ञ, ते तर केवळ टेक्निशियन आहेत.
लोकांनी त्यांना विनाकारण चढवून ठेवले आहे...' असा एकूण आशय होता त्यांच्या
मांडणीचा. त्याच वार्तालापात त्यांनी अरुंधती राॅय यांचा संदर्भ देत अफजल
गुरू याच्यावर अन्याय होत असल्याची मांडणी केली. देशाच्या सर्वोच्च
न्यायालयाने ज्याला दोषी मानले त्याचे हे उदात्तीकरण माझ्यासाठी नवीन होतं.
<br /> आणि तेथे कोणीही या मुद्द्यावर काही विचारले नाही. </b></span></span><br /> बेन्नूर
सरांना प्रश्न करावं, असं मनात वाटू लागलं. पण धाडस होत नव्हतं. इतर सारे
अनुभवी पत्रकार होते. त्यांच्यासमोर आपण कसं विचारावं अशी भीती होती. <br /> वार्तालाप संपून आभार प्रदर्शनाला सुरुवात होणार तेव्हढ्यात मन घट्ट करून मी म्हटलं, ‘सर, मला प्रश्न विचारायचाय..’. <br /> त्यांनी अनुमती दिली. <br />
<span style="font-size: large;"><span style="color: blue;">मी म्हटलं, ‘ज्यांना अख्खं जग मिसाइल मॅन म्हणतं. ज्यांच्या
देशप्रेमाबद्दल सारेच नतमस्तक होतात, अशा डाॅ. कलाम यांना आपण हिणवता अन्
न्यायालयाने देशद्रोही ठरवलेल्या अफजल गुरूची बाजू घेता हे कसं?’</span></span> <br /> माझ्या प्रश्नाने एकदम शांतता पसरली. सगळे माझ्याकडे पाहू लागले. छातीत धडधड होत होती.<br />
<span style="font-size: large;"><span style="color: red;">बेन्नूर सर म्हणाले, "होय. त्याला कारण आहे. गुजरातेत हजारो लोकांची कत्तल
होत असताना ही व्यक्ती राष्ट्रपती पदावर होती. तिने एक चकार शब्द उच्चारला
नाही.’ </span></span><br /> बेन्नूर सरांच्या या तर्काचं मला फार नवल वाटलं. <br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;">तेव्हढ्याच तत्परतेने मी म्हटलं, ‘सर असेच विचार करायचे झाले तर... १९८९
नंतर काश्मिरमध्ये हजारो लोकांची कत्तल झाली. महिलांवर अत्याचार झाले. लाखो
लोकांना राहतं घर, गाव सोडून आपल्याच मायभूमीतून परागंदा व्हावं लागलं...</span></span> <br /> त्यावेळी कोणीतरी राष्ट्रपती पदावर असेलच की... त्यांच्याबद्दल तुम्ही का नाही बोलले?’<br /> माझ्या या फालतू प्रश्नाने अनेक पत्रकार माझ्यावर क्रुद्ध झाल्याचे दिसत होते. <br />
माझा हा प्रश्न कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याचा लायकीचा आहे, असे अनेकांना
वाटले असावे. त्यामुळे घाई गडबड आहे, असे दाखवत वार्तालाप कार्यक्रम संपवून
आभार प्रदर्शनाला सुरुवात झाली.<br /> माझ्यासाठी हा फार मोठा धक्का होता. पुरोगामी म्हणजे काय? प्रतिगामी म्हणजे काय? वगैरे प्रश्न मला आणखीनच छळू लागले. <br /> दुसऱ्या दिवशी सगळ्या वृत्तपत्रात काय छापून येणार याची मला प्रचंड उत्सुकता लागून राहिली. <br />
सकाळी सात रस्ता चौकात जाऊन सगळी वृत्तपत्रे आणली. उत्सुकतेने चाळली. मी
चकित झालो. कोणत्याच वृत्तपत्रात मी विचारलेल्या प्रश्नांची दखल घेतल्याचे
दिसले नाही. <br /> मी तरुण भारतचा पत्रकार होतो. तरुण भारतमध्ये मी दिलेली बातमी कलाम-अफजल गुरू मुद्द्यांसह आली होती. <br /> थोडं बरं वाटलं. <br /> परंतु, असं का झालं, यावर मी फार विचार केला. मला उत्तर मिळाले नाही.<br />
चार महिन्यांनंतर मला समजले की, बेन्नूर सरांची बातमी का दिली... तसं काही
घडलंच नव्हतं... असे सांगण्यासाठी काही पत्रकार मंडळींनी आमचे संपादक व
संचालक मंडळ यांची भेट घेऊन गेले होते. परंतु, संपादक किंवा संचालक यांनी
मला तेव्हाच का विचारणा केली नाही, असा प्रश्न पडला. <br /> त्याचं उत्तर मी
शोधून काढलं ते असं. संचालकांनी विचारलं, रिपोर्टिंगला कोण गेलं होतं?.
रिपोर्टिंगला मी होतो, हे समजलं. त्यावर त्यांनी अरे मग काय प्राॅब्लेम
नाही म्हणून सोडून दिलं.<br /> माझ्या रिपोर्टिंगवरचा हा विश्वास मला सुखावून गेला. <br /> अर्थात, संपूर्ण वार्तालापाचे तेव्हाच्या वाहिन्यांनी चित्रीकरण केल्याचे मला माहित होते. तो एक आधार होता.<br />
पत्रकारांच्या माध्यमातून बेन्नुर सर जनतेला जे सांगू पाहत होते ते मी
प्रामाणिकपणे पोचवले. बेन्नूर सरांना माझी बातमी नक्कीच आवडली असेल. <br />
परंतु, काही पत्रकार मंडळींनी का तक्रार केली हे मला समजले नाही. ते माझ्या
प्रश्नाने अस्वस्थ का झाले होते हे मला अद्याप समजले नाही.<br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;">थोडक्यात, बेन्नूर सरांच्या वार्तालापाने माझा आत्मविश्वास वाढवला. त्यांना खूप धन्यवाद आणि भावपूर्ण श्रद्धांजली.</span></span></div>
psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-18301539965041816522018-05-24T14:57:00.000+05:302018-05-24T15:02:11.029+05:30अन्वयार्थ : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा <div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-GbeDpX7Kgbk/WwaDnmbOegI/AAAAAAAAHaM/G5rTjhSVnN869kDL4QdTJIu1z2gmf74awCLcBGAs/s1600/1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="960" height="180" src="https://1.bp.blogspot.com/-GbeDpX7Kgbk/WwaDnmbOegI/AAAAAAAAHaM/G5rTjhSVnN869kDL4QdTJIu1z2gmf74awCLcBGAs/s320/1.jpg" width="320" /></a></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<span style="color: blue; font-size: x-large;"><b><br /></b></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="color: red; font-family: "arial" , sans-serif; font-size: x-large;"><b>गाफील रहाल तर 2004 ची पुनरावृत्ती अशक्य नाही</b></span><br />
<div style="font-family: arial, sans-serif;">
<span style="color: blue;"><b>कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि तरीही रणनीतीत काँग्रेसने भाजपवर यशस्वी मात केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांमध्ये आशावाद जागवण्यात काँग्रेसला यश मिळाले. दुसरीकडे भाजपने कर्नाटकात जोरदार मुसंडी मारली. 2019 साठी दक्षिण भारताचा दरवाजा उघडला. परंतु, सत्ता स्थापनेच्या खेळात भाजपावर तोंडघशी पडण्याची वेळ आली. नामुष्की पत्करावी लागली. थोडक्यात सांगायचे तर, सर्व राष्ट्रवादी शक्तींना सावध करणारा कौल कर्नाटकने दिला आहे. गाफील रहाल तर 2004 ची पुनरावृत्ती होणे अशक्य नाही, हा संदेश गडद झाला आहे.</b></span></div>
</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://2.bp.blogspot.com/-Ahmzw3RoeFc/WwaD2dKtkPI/AAAAAAAAHaQ/1n891GQ0l54vDkQOrcZ8HidVaYIy8AeXgCLcBGAs/s1600/3.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="346" data-original-width="660" height="167" src="https://2.bp.blogspot.com/-Ahmzw3RoeFc/WwaD2dKtkPI/AAAAAAAAHaQ/1n891GQ0l54vDkQOrcZ8HidVaYIy8AeXgCLcBGAs/s320/3.jpg" width="320" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<a name='more'></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
23 मे 2018 रोजी बंगळुरूत जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या समारंभात व्यासपीठावर देशभरातील जवळजवळ सारे मोदीविरोधक एकवटले. 11 पक्षांचे नेते एकत्र येऊन 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे मोदीविरोधी चित्र उभे केले. युपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील जवळीक आणि सोनियांनी मायावतींशी व्यासपीठावर घेतलेली गळाभेट लक्ष वेधून घेणारे होते. या सर्व नेत्यांमध्ये एक साम्य होते, ते म्हणजे त्यांच्याकडे आता गमावण्यासारखे काहीही राहिलेले नाही. ही एकच बाब या सार्यांना एकत्र आणणारी ठरली, हे सत्य आहे.</div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<b><span style="color: red;">विरोधकांचे अशा पद्धतीने एकत्र येणे ही बाब केवळ टवाळी करून सोडून देण्याएवढी क्षुल्लक नक्कीच नाही. 2004 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे पाहिले तर ही बाब अधिक स्पष्ट होऊ शकते. तेव्हा भाजपला केवळ 138 तर काँग्रेसला 145 जागा मिळाल्या होत्या. केवळ सात जागांचा फरक होता. पण हा पराभव भाजपसाठी अगदी अनपेक्षित आणि धक्कादायक होता. </span></b></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<span style="color: #222222;">भाजपने राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली त्याच पद्धतीने काँग्रेसनेही समविचारी पक्षांची आघाडी केली होती. भाजपचा पराभव होण्यामागचे हे एक प्रमुख कारण होते. काँग्रेसने तेव्हा आंध्र प्रदेशात तेलंगणा राष्ट्र समिती, तामिळनाडूत द्रमुक, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव व रामविलास पासवन यांच्या पक्षांशी निवडणूकपूर्व आघाडी केली होती. महाराष्ट्रात राष्ट्रवादी ही काँग्रेससोबत होती. काँग्रेससोबत गेलेल्या विविध प्रादेशिक पक्षांनी भाजपच्या जागा रोखल्या होत्या.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
काँग्रेसला मिळालेल्या मतांची टक्केवारी 1999 पेक्षा 2004 मध्ये घटली होती. तरीही केवळ प्रादेशिक पक्ष सोबत असल्यामुळे जागा मात्र 114 वरून 145 झाल्या होत्या. या मुद्द्याचा विचार केला तर कर्नाटकच्या निकालानंतर एकवटलेले विरोधक हे भाजपसाठी मोठे आव्हान असणार आहे. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
निर्मिती करण्यासाठी अधिक परिश्रम, नियोजन आणि सात्यत्य याची आवश्यकता असते. विद्ध्वंस करणे त्यामानाने कित्येक पटीने सोपे असते. आताच्या विरोधकांपुढे मोदी सरकारला सत्तेतून घालवणे आणि स्वत:च्या गढी सुरक्षित ठेवणे या पलीकडे कोणताही उदात्त हेतू नाही. हीच बाब मोदी सरकारसाठी बलस्थान ठरू शकते, हेही विसरून चालणार नाही. यासाठी केवळ विरोधकांच्या तकलादू आरोपांचे स्पष्टीकरण देण्यात ऊर्जा खर्च करण्याऐवजी मोदी सरकारच्या कल्याणकारी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यावर अधिक भर देणे शहाणपणाचे ठरणार आहे.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://3.bp.blogspot.com/-y_39vghWJjc/WwaEGZhgBOI/AAAAAAAAHac/eamfYnIBD48lpdxJzN_AbPZjho-CxFYTgCLcBGAs/s1600/2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="422" data-original-width="759" height="177" src="https://3.bp.blogspot.com/-y_39vghWJjc/WwaEGZhgBOI/AAAAAAAAHac/eamfYnIBD48lpdxJzN_AbPZjho-CxFYTgCLcBGAs/s320/2.jpg" width="320" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन अद्याप फार काळ झालेला नाही. काँग्रेस सत्तास्थानी असताना रोज होणारे घोटाळे, हिंदू समाजाचा वारंवार होणारा तेजोभंग आणि जिहादी प्रवृत्तींना मिळणारे खतपाणी, धर्मांतर घडवणार्या ख्रिस्ती मिशनरींचा वाढलेला प्रभाव आदी बाबी सर्वसामान्य भारतीय माणूस अद्याप विसरलेला नाही. काँग्रेसच्या मनमोहन सरकारचा 10 वर्षांचा कार्यकाळ आणि भाजपच्या मोदी सरकारचा 4 वर्षांचा कार्यकाळ याची तुलना होणारच आहे. यामध्ये मोदी सरकार अनेक आघाड्यांवर उजवी ठरली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीपर्यंत झालेल्या जवळजवळ सर्वच निवडणुकांनी यावर शिक्कामोर्तब केल्याचे दिसत आहे. कर्नाटकच्या जनतेने भाजपवर दाखवलेला विश्वास, भाजपच्या 104 पर्यंत वाढलेल्या जागा, काँग्रेसचा ढासळलेला किल्ला हे सारे सकारात्मक आहे.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
‘परंतु, भाजपने कर्नाटकात सत्ता स्थापण्याचा दावा करून मुखभंग करून घेतला, तसे करण्याची आवश्यकताच नव्हती. भाजपने नैतिकता पाळायला हवी होती. नाहीतरी काँग्रेस आणि जेडीएस फार दिवस एकत्र रहाणे शक्य नव्हतेच. काँग्रेस आणि जेडीएस एकत्र आले तेव्हाच भाजपने माघार घेणे आवश्यक होते. त्यानंतर काँग्रेस-जेडीएस गाफील राहिले असते. आणि दरम्यान, त्यातील एक गट फोडता आला असता...’ अशा प्रकारचे विश्लेषण अनेक जण करताना दिसत आहेत.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
अशा प्रकारे विचार करणे हा फार मोठा बदल आहे. राष्ट्रीय विचाराच्या पक्षांवर नैतिकतेच्या बाता करून मानसिक दडपण आणायचे, खच्चीकरण करायचे आणि कथित धर्मनिरपेक्ष शक्तींसाठी रान मोकळे करून द्यायचे, ही रणनीती मीडियातील डाव्या गटाकडून नेहमीच अवलंबली जाते. या मंत्रयुद्धाला भीक न घालण्याचे धोरण मोदी - शहा नेतृत्वाने गेल्या 4 वर्षांत स्वीकारल्याचे दिसत आहे. सद्गुणविकृतीच्या जोखडातून मुक्त होऊन नीतिनिर्धारण करण्यास सुरूवात करणे, ही बाब आपल्या देशाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे. त्यामुळे व्यावहारिक निर्णय घेण्याच्या प्रयोगात एखादा निर्णय चुकीचा ठरला तरी त्याचे फार सुतक पाळण्याचे काहीही कारण नाही.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-_GI7mN18-Hc/WwaENUnGJXI/AAAAAAAAHag/Xj1OSgO52f8pG9nvG9D_VwKo2rrK_xU6ACLcBGAs/s1600/4.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="802" data-original-width="960" height="267" src="https://1.bp.blogspot.com/-_GI7mN18-Hc/WwaENUnGJXI/AAAAAAAAHag/Xj1OSgO52f8pG9nvG9D_VwKo2rrK_xU6ACLcBGAs/s320/4.jpg" width="320" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
जिहादी आक्रमक प्राचीन काळी युद्धप्रसंगी भारतीय सैन्यापुढे गायींचा तांडा सोडून द्यायचे. शस्त्र चालवल्यास गोहत्या होऊन पाप लागेल असा विचार करून आपले सैन्य शस्त्र खाली ठेवत. परिणाम, सारा देश जिहादी वरवंट्याखाली भरडला गेला. तेव्हा शे - पाचशे गायी मृत्यूमुखी पडल्या असत्या आणि युद्ध जिंकले असते तर पुढील हजार - बाराशे वर्षे रोज होणारी हजारो गायींची कत्तल झाली नसती. तात्पर्य असे की, उद्देश योग्य असेल, लोकहिताचा असेल तर फार नैतिक, अनैतिक वगैरे मायाजालात न फसता व्यावहारिक निर्णय घेणे योग्य असते. सध्याचे मोदी सरकार याच नितीने वाटचाल करत आहे. ही एक समाधानाची बाब म्हटली पाहिजे.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
वाजपेयी सरकार आणि मोदी सरकार यामध्ये काही मूलभूत फरक असल्याचे दिसून येते. पहिली गोष्ट म्हणजे, वाजपेयी सरकारला आताप्रमाणे तगडे बहुमत नव्हते. वाजपेयी सरकार हे अनेकदा निर्णय योग्य असूनही सेक्युलर लॉबीच्या दबावाला बळी पडत असे. आता तसे होताना दिसत नाही. वाजपेयी सरकारच्या काळात सरकार आणि संघ परिवार यामध्ये परस्पर विश्वास निर्माण होईल, याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, राजकारणाशी संबंध नसलेला पण राष्ट्रीय मूल्यांवर श्रद्धा असणारा कार्यकर्त्यांचा एक फार मोठा वर्ग 2004 च्या निवडणुकीच्या वेळी सक्रीय दिसला नाही. त्याचा मोठा फटका बसला. सध्या तशी स्थिती दिसत नाही. संघ आणि संघ विचारांनी प्रेरित संघटनांमध्ये सध्याच्या सरकारविषयी आपलेपणा वाटतो. याला अनेक कारणे आहेत. विश्व योग दिवस, सर्जिकल स्ट्राईक, परदेशी पैशावर चालणार्या परंतु, त्याचा हिशेब न ठेवणार्या सुमारे 9 हजार एनजीओंची मान्यता रद्द करणे, ईशान्य भारताच्या विकासावर दिलेला भर, शेजारील देशांशी मैत्रीचे आणि प्रसंगी कणखर भूमिका, सीमावर्ती भागातील रस्तेबांधणी, जनधन, मुद्रा आदी लोककल्याणकारी योजना, धनिकांनी वंचित बांधवांसाठी गॅस सबसिडी नाकारणे अशा अनेक बाबींमुळे संघ आणि संबंधित संस्थांतील लक्षावधी कार्यकर्ते समाधानी आहेत. राजकारणाशी थेट संबंधित नसलेल्या या कार्यकर्त्यांची शक्ती ही 2019 मध्ये मोठे बलस्थान असणार आहे. </div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<span style="color: red; font-size: large;"><b>कर्नाटकातील पराभवाचे विश्लेषण करताना 15 मे 2018 रोजी काँग्रेसचे नेते मोहन प्रकाश म्हणाले होते की, ‘आमच्याजवळ आरएसएस नाही, त्यामुळे आम्ही हरलो.’ </b></span><span style="color: #222222;">यातील अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी राष्ट्रीय विचारांवर निष्ठा असणारा कार्यकर्त्यांचा मोठा वर्ग किती सक्रीय राहील, ही बाबही 2019 च्या निवडणुकीवर परिणाम करणारा ठरणार आहे. कर्नाटकातील ताज्या घडामोडींनी कार्यर्त्यांच्या या वर्गाला सावध केले आहे, हे निश्चित.</span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<b><span style="color: blue;">लोकसभा निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी 1 वर्ष म्हणजे जून 2013 मध्ये श्री. नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले होते. तेव्हाचे वातावरण नरेंद्र मोदी यांना काही प्रमाणात अनुकूल होते. परंतु, हे वातावरण वर्षभरापर्यंत टिकवून ठेवून मे 2014 मध्ये विजय मिळवता येईल काय, असा प्रश्न होता. तेव्हा केंद्रातील सत्ता काँग्रेसच्या ताब्यात होती. आज नरेंद्र मोदी हे केंद्रात सत्तेत आहेत. <span style="font-size: large;">आपले नेतृत्व आणि कर्तृत्व याच्या बळावर महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, आसामसह बहुतेक राज्यातून काँगेसचा सफाया करण्यात ते यशस्वी झाले आहेत. बंगाल, केरळसारख्या भाजपसाठी वाळवंट समजले जाणार्या राज्यांमध्ये भाजपची वाढलेली पत आशादायी अशीच आहे. ईशान्य भारतातील कामगिरी चमत्कार वाटावा अशी आहे. जगभरात उजळलेली देशाची प्रतिमा ही जमेची बाजू आहेच. पुरस्कार वापसी, असहिष्णुता वगैरे उठाठेव करूनही दिवसेंदिवस दलित व बहुजन समाजात भाजपला मिळत असलेली स्वीकारार्हता बलस्थान बनली आहे. </span></span></b></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
या पार्श्वभूमीवर कर्नाटकात सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्तेपासून अपमानास्पदरीत्या वंचित राहण्याची वेळ भाजपवर आली. आणि देशातील जवळजवळ सर्व भाजपविरोधक एकवटले आहेत. सावध होण्याची हीच योग्य वेळ आहे. संघर्ष जितका मोठा, विजयही तितकाच रोमहर्षक असतो. त्यामुळे सर्व विरोधक एकत्र येणे ही बाब मोदी सरकारसाठी मोठी संधी आहे. पुढील वर्षभरात राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाचे असणार्या मुद्द्यावर व्यापक चर्चा घडण्यासाठी हा काळ अनुकुल आहे. </div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<b><span style="font-size: large;">लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. इतर वेळी प्रादेशिक पक्षांना जवळ करणारी जनतासुद्धा लोकसभेला मात्र भारतीय जनता पक्षाला भरभरून मतदान करते, हे अनेकदा दिसून आले आहे. याचा अर्थ भाजपच्या लोकप्रतिनिधींनी समजून घेण्याची गरज आहे. विरोधक एकवटले आहेत. सर्व काही मोदीजी करतील, आपण निवांत राहू ही प्रवृत्ती भाजपच्या बहुतांश लोकप्रतिनिधींना सोडून कामाला भिडावे लागेल. अन्यथा दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कर्नाटक निवडणुकीनंतरच्या घडामोडींचा हाच संदेश आहे.</span></b></div>
psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-88168734793332027762018-04-06T20:24:00.002+05:302018-04-06T20:24:23.544+05:30वीरशैव लिंगायत : हिंदू नाहीत तर मग कोण ?<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-9pvrm8-qyUo/WseIhIOTZPI/AAAAAAAAHXk/k9gDidgV3R8ND_5rmzrZUctS4erJRhL4ACLcBGAs/s1600/dm5april18.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1303" data-original-width="1405" height="296" src="https://4.bp.blogspot.com/-9pvrm8-qyUo/WseIhIOTZPI/AAAAAAAAHXk/k9gDidgV3R8ND_5rmzrZUctS4erJRhL4ACLcBGAs/s320/dm5april18.jpg" width="320" /></a></div>
<div class="_5pbx userContent _3576" data-ft="{"tn":"K"}" id="js_p">
<br />
<b><span class="_5mfr _47e3"><img alt="" class="img" height="16" role="presentation" src="https://static.xx.fbcdn.net/images/emoji.php/v9/fb7/1/16/1f58b.png" width="16" /><span class="_7oe">🖋</span></span>सिद्धाराम भै. पाटील</b><br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;">जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी,
गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे
करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना
श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी
शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे
असणे कसं शक्य आहे?</span></span><br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;"> </span></span><br />
<a name='more'></a><br />
लिंगायत समाजाला हिंदू धर्मापासून वेगळे करून स्वतंत्र धर्माचा दर्जा
देण्याचा निर्णय कर्नाटकातील काँग्रेस सरकारने घेतला आहे. प्रक्रियेनुसार
आता हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे गेल्यानंतर केंद्रालाच याचा अंतिम निर्णय
घ्यायचा आहे. केंद्र सरकारला तरी याचे अधिकार आहेत का, हा प्रश्नही
अनुत्तरित आहे. परंतु, यानिमित्ताने वीरशैव लिंगायत समाज हा हिंदू धर्माचीच
शाखा आहे की स्वतंत्र धर्म हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.<br />
जे भगवान शिवाचे उपासक आहेत. जे दसरा, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशचतुर्थी,
गुढी पाडवा (उगादी), मकर संक्रात, होळी, नागपंचमी आदी सण उत्सव साजरे
करतात, बारा ज्योतिर्लिंग, कैलास पर्वत, मानसरोवर या स्थळांना
श्रद्धाकेंद्र मानतात, शक्तिदेवीची आराधना करतात आणि बसव, सिद्धराम आदी
शिवशरणांबद्दल श्रद्धाभाव बाळगतात ते वीरशैव लिंगायत हिंदू धर्माहून वेगळे
असणे कसं शक्य आहे?<br />
<span style="color: blue;"><b>१४ नोव्हेंबर २०१३ रोजी भारताच्या रजिस्ट्रार
जनरल यांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या
कार्यालयाला लिहिलेले एक पत्र पुढे आले आहे. </b></span>तेव्हाच्या गृहमंत्रालयाने
भारताच्या रजिस्ट्रार जनरलचे मत मागवले होते. रजिस्ट्रार जनरलने
लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा प्रस्ताव फेटाळला होता. याची
दोन प्रमुख कारणे सांगितली होती. एक म्हणजे लिंगायत हे हिंदू धर्माचाच एक
घटक आहेत, हे स्पष्ट करताना रजिस्ट्रार जनरलने सरकारचेच जुने निर्णय,
कर्नाटक हायकोर्टाचे मत आणि आधीच्या जनगणनेचा हवाला दिला होता. लिंगायतांना
आधी वीरशैव म्हटले जायचे, ती हिंदू धर्मातीलच एक जात आहे. दुुसरे
महत्त्वाचे कारण म्हणजे लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा दिला तर या
समाजातील अनुसूचित जातींच्या लोकांना सध्या मिळणाऱ्या आरक्षणापासून वंचित
रहावे लागेल. या पार्श्वभूमीवर आता कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीआधी हा
विषय पुढे आणल्याने राजकीय समीकरणे डोळ्यांसमोर ठेवूनच हा विषय पुढे
रेटल्याचे स्पष्ट होत आहे.<br /> <span style="color: blue;"><b>स्वतंत्र धर्माची मागणी करणाऱ्यांचा एक
महत्त्वाचा दावा आहे की लिंगायत धर्माची स्थापना महात्मा बसवेश्वरांनी
बाराव्या शतकात केली. परंतु, हे खरे नाही. लिंगायत समाज हा महात्मा
बसवेश्वर यांच्या आधीपासून अस्तित्वात होता, याचे सबळ पुरावे खुद्द बसवण्णा
आणि शिवयोगी सिद्धाराम यांच्या वचनांमध्येच ठायी ठायी आढळतात.</b></span> बसवेश्वरादी
शिवशरण समाजसुधारक होते. त्यांनी तत्कालीन समाजात धर्माच्या नावाखाली
चालणाऱ्या कुप्रथांवर प्रहार केले. प्रबोधनासाठी वचनसाहित्य निर्माण केले.
त्यातील ठरावीक वचनांचा संदर्भ तोडून सोयीचा अर्थ लावत बसवण्णांना
धर्मसंस्थापक ठरवण्याचा प्रयत्न स्वतंत्र धर्माची मागणी करणारे करताना
दिसतात.<br /> बसवण्णांनी जातीभेदासारख्या प्रथांना नाकारले. ‘प्रसंगी
वेदांना बासनात गुंडाळून टाकेन, शास्त्रांना साखळदंड लावेन, आगमांचे नाक
कापेन' अशी भूमिका घेतली. अशा वचनांवरून त्यांनी स्वतंत्र धर्माची स्थापना
केली असे म्हणणे म्हणजे<br /> ‘तरुणांनो, गीता वाचण्यापेक्षा मैदानावर जाऊन
फुटबाॅल खेळा' असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले म्हणून ते भगवदगीतेचे
विरोधक होते असे म्हणण्यासारखे होईल. बसवण्णांच्या सर्व वचनांचा एकत्रित
अभ्यास केला तर कोणाच्याही सहज ध्यानात येईल की त्यांनी त्या काळी
उपनिषदांतली शाश्वत तत्त्वे लोकभाषेत आणली.<br /> लिंगायत स्वतंत्र धर्माची
मागणी करणाऱ्यांचे एक प्रमुख म्हणणे असते की, ‘लिंगायत धर्म पुनर्जन्म आणि
कर्म सिद्धांत मानत नाही म्हणून तो हिंदू धर्मापेक्षा वेगळा आहे.’ परंतु,
वस्तुस्थिती तशी नाही. लिंगायत समाज हा कर्मसिद्धांत आणि पुनर्जन्म दोन्ही
मानतो. लिंगायतांमध्ये समाधिक्रिया करतानाच्या वेळी करण्यात येणारा विधी
हाच सर्वात मोठा पुरावा आहे.<span style="color: red;"><b> (वीरशैव लिंगायतांमधे मृत्युनंतर *दफन* करीत
नाहीत तर *समाधिक्रिया* केली जाते. दफन म्हणजे शवपेटीत झोपलेल्या अवस्थेत
पुरणे. समाधिक्रिया म्हणजे संतपुरुषाप्रमाणे आसनमांडी घालून ध्यानस्थ
अवस्थेमध्ये पुरणे. दफन अाणि समाधी यांमधील हा फरक लक्षात घ्यावा.)</b></span><br />
‘अनेक जन्मानंतर हा मनुष्यजन्म मिळाला, आम्ही शिवाचे उपासक असल्यामुळे आता
पुन्हा जन्म नाही.’ हा अाशय व्यक्त करणारा विधी अंत्यसंस्कार प्रसंगी असतो.
याचा अर्थ पुनर्जन्म सिद्धांत नाकारला असा होत नाही.<br /> महात्मा
बसवेश्वरांनी स्थापलेल्या अनुभव मंटपाचे प्रमुख राहिलेले बसवण्णांचे
समकालीन शिवशरण म्हणजे शिवयोगी सिद्धराम. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती
केली. त्यातील ३ हजार वचने आजही उपलब्ध आहेत. त्यातील एक वचन
पुढीलप्रमाणे... ‘इन्नु निम्म शरणुवोक्के नागि, ना निम्मनेंदू ...’ भावार्थ
: अनेक वेळा जन्म घेऊनही मी आपले खरे स्वरूप समजून न घेता माझे जीवन
व्यर्थ घालवले. आता मी तुम्हाला शरण आलो आहे... हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना
मला कर्मबंधनातून मुक्त करावे, ही एकच मागणी आहे.<br /> शिवयोगी सिद्धराम
आणि बसवण्णा यांच्या वचनांमध्ये हिंदू धर्माची मूलभूत तत्त्वे प्रतिपादित
करणारी शेकडो उदाहरणे आहेत. ईश्वर एक आहे आणि तो सर्वव्यापी आहे. चराचरात
ईश्वर व्यापून आहे. त्यामुळे जातीभेद आदी बाबी अज्ञान प्रदर्शित करणाऱ्या
आहेत हा या शिवशरणांच्या वचनांचा सार आहे. कुडलसंगमदेव आणि कपिलसिद्ध
मल्लिकार्जुन यांच्यावरील अनन्य भक्ती प्रत्येक वचनांतून झळकते.
योगशास्त्र, वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आदी महाकाव्यातील अनेक संदर्भ
या वचनांमध्ये विपुल प्रमाणात आहेत.<br /> आपल्या गळ्यात लिंग धारण करतो तो
लिंगायत असे ढोबळपणे सांगितले जाते. लिंगायताने गळ्यात शिवलिंग धारण करावे,
अशी अपेक्षा असते. परंतु, प्रत्येक लिंगायत लिंग धारण करतोच अशी आजची
स्थिती नाही. शुद्ध आचरण असेल तर लिंग धारण केले नाही तरी चालते आणि अशुद्ध
आचरण असणाऱ्याने लिंगधारण केले तरी उपयोग नाही, इतके स्पष्ट विचार
सिद्धरामांच्या वचनांतून पाहायला मिळतात.<br /> हिंदू धर्मात आगम आणि निगम
यांचे स्थान मोलाचे मानले जाते. पारमेश्वरागम पटल १ मधील श्लोक ५८ पुढील
प्रमाणे आहे... <b>‘ब्राह्मणः, क्षत्रिया, वैश्याः, शूद्रा येच अन्यजातयः |
लिंगधारणमात्रेण शिवएव न संशयः।।’ भावार्थ :<span style="color: blue;"> ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य,
शूद्र अथवा अन्य कोणत्याही जातीचा असला तरी लिंगधारण केल्यानंतर तो शिवच
समजावा यात संशय नाही. या आशयाचे अनेक श्लोक आगमामध्ये आहेत.</span></b><br />लिंगधारण,
स्त्री-पुरुष समानता, वर्णजातिभेद संपवणे ही या आगामांतील शिकवण आहे जी
वीरशैव संप्रदायासाठी सांगितलेली आहे. बाराव्या शतकादरम्यान वीरशैव
संप्रदायाला ग्लानी आली होती. महात्मा बसवेश्वरांनी हेच विचार लोकभाषेतून
मांडले. लिंगायत समाजात नवचैतन्य आणले. त्यांनी कोणताही नवीन धर्म स्थापन
केलेला नसून "मी शैव होतो वीरशैव झालो’ असे स्पष्ट सांगितले आहे. <br />
थोडक्यात, लिंगायतांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळाली की अल्पसंख्याक
म्हणून आरक्षणाचे लाभ मिळतील, असे आमिष दाखवल्याने अनेकांचा बुद्धिभेद
झाला आहे. लिंगायतांमधील काही शिक्षणसंस्थाचालक आदींना वाटते की एकदा नवीन
धर्माची मान्यता मिळाली की अल्पसंख्याक म्हणून बरेच काही पदरात पाडून घेता
येईल. सोशल मीडियावरील चर्चेकडे पाहिले की ध्यानात येते की, हिंदू धर्माचा
द्वेष करणाऱ्या काही संस्था, संघटना स्वतंत्र लिंगायत धर्म मागणीचे जोरदार
समर्थन करत आहेत. लिंगायत धर्म समर्थकांना लिंगायतांबद्दल फार प्रेम आहे
असे नसून हिंदू धर्माचे तुकडे पडतात याचा त्यांना अधिक आनंद आहे. या शक्ती
गेल्या दोन-तीन दशकांपासून लिंगायतांमधील काही मंडळींना हाताशी धरून
स्वतंत्र धर्मासाठी प्रयत्न करत आहेत. <br /><span style="color: red;"><b>यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे
लिंगायत समाजात मान्यता असलेल्या केदार, काशी, उज्जैन, रंभापुरी आणि
श्रीशैलम् या पाचही धर्मपीठाच्या शिवाचार्यांनी लिंगायत हे हिंदूच आहेत असे
सांगितले आहे.</b></span> आता या विषयाला राजकीय वळण मिळाल्यामुळे पुढील काळात यावर
चर्चा होत राहील. यामुळे लिंगायत समाजात दोन तट पडून समाज विभागला जाईल की
समाज एकसंध राहून राजकीय नेत्यांना दूर सारेल हे समजण्यासाठी काही काळ वाट
पाहावी लागेल.<br />
00<br /> <span style="font-size: large;"><b>बसवेश्वर हे धर्मसुधारक, संस्थापक नव्हे</b></span><br />
<span style="font-size: large;"><span style="color: blue;">सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि बसव वाङमयाचे अभ्यासक डाॅ. ईरेश
स्वामी म्हणतात, वीरशैव धर्म महात्मा बसवेश्वरांच्या आधीपासून आहे. स्वत:
बसवेश्वरांनी जातवेद मुनींकडून दीक्षा घेतली, असा उल्लेख आहे. खुद्द
बसवेश्वरांनी सांगितले आहे, की आचरणाच्या दृष्टीने सर्वसामान्यांना कळेल
असे वचन साहित्य माझ्या आधी होऊन गेलेल्या कवींनी सांगितले आहे. बसवेश्वर
हे धर्म सुधारक होते, धर्म संस्थापक नव्हते.</span></span><br />
(हा लेख दैनिक दिव्य मराठीत ५ एप्रिल २०१८ रोजी प्रसिद्ध झाला आहे.)</div>
<br />psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-32554489896416237222017-11-11T14:02:00.001+05:302017-11-11T14:02:15.931+05:30हासन हास्यास्पद का ठरला ?<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-BmYAgb8fjXA/WgarWB3877I/AAAAAAAAHG4/VkKkOsTQ9QAALtpBktJK1qba4h_mC93ewCLcBGAs/s1600/Kamal.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="454" data-original-width="660" height="220" src="https://1.bp.blogspot.com/-BmYAgb8fjXA/WgarWB3877I/AAAAAAAAHG4/VkKkOsTQ9QAALtpBktJK1qba4h_mC93ewCLcBGAs/s320/Kamal.jpeg" width="320" /></a></div>
<span style="font-size: small;"><span style="color: blue;"><b>2013 मध्ये कमल हासनचा विश्वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला
काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच
घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट
त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून
विश्वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी
घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान
झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे
रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्या बायका -
मुलांवर काढणार्या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका
राहिली आहे.</b></span></span><br />
<br />
तामीळनाडू हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य. पण मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असलेले डीएमकेचे ज्येष्ठ नेते करुणानिधी हे आपल्या घरातील कलहामुळे हतबल झाले आहेत. त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन हे अधूनमधून हिंदू मंदिरांना भक्तिभावाने भेटी देत आहेत. डीएमके हा हिंदू भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, असा संकेत देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांची स्टॅलिन यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली आहे.<br />सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. पलानीस्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली जवळीकता काही लपून राहिलेली नाही. एकूणच भारतीय जनता पक्ष हा 2019 मध्ये होणार्या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच वेळी तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात रूतत चालले आहेत. थोडक्यात, तामिळनाडूत काँग्रेस कुठेही स्पर्धेत दिसत नाही.<br /><b><span style="color: #cc0000;">या पार्श्वभूमीवर तामीळ चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलावंत रजनीकांत आणि कमल हासन यांच्या नावांची चर्चा होणे अतिशय स्वाभाविक आहे. कारण तामीळ राजकारणातून चित्रपटसृष्टी वजा केली तर काहीच राहणार नाही. तामिळी जनतेने आजवर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना नेता म्हणून डोक्यावर घेतल्याचा अनुभव आहे. म्हणूनच भारतीय जनता पक्षाने रजनीकांतला पक्षात आणण्याचा प्रयत्न चालवला होता. दरम्यान, रजनीकांतमध्ये नेता होण्यासाठीचे गुण नाहीत, असे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.</span></b><br /><span style="color: blue;"><b>तामीळ जनता सिने नट - नट्यांना स्वीकारते याचा अर्थ प्रत्येक सुपरस्टारमध्ये नेतृत्वगुण असतीलच असे नाही. कदाचित रजनीकांतला याची जाणीव असावी. आपले आरोग्य, वय आणि मर्यादा ओळखून त्याने राजकारणात सक्रीय होणे टाळले असावे असे वाटते.</b></span><br />या पार्श्वभूमीवर 63 व्या वर्षी तामीळ अभिनेता कमल हासन गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. हासन याची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यातील त्याची बदलत गेलेली भूमिका पाहाणे आवश्यक ठरते.<br /><span style="background-color: #ffe599;"><span style="color: #660000;"><b>तामिळनाडूत भाजपसाठी अनुकुल वातावरण असल्याचे पाहून कमल हासन सुरूवातीला म्हणाला की, जनतेच्या भल्यासाठी वेळ पडल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी सिनेमात काम करणेही सोडून देईन. भाजपला माझी विचारधारा माहीत आहे. राज्याच्या हिताचा विचार केल्यास आणि त्यांना माझ्या विचारधारेचा अडथळा वाटत नसेल तर मी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. जनतेच्या भल्यासाठी मी राजकारणात कोणतीही अस्पृश्यता मानत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हासनची नुकतीच भेट घेऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यानंतरचे हासन याचे हे वक्तव्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे. </b></span></span><br />त्याच्या विवेकवादी भूमिकेबद्दल विचारले असता, तो म्हणाला माझ्या मते विवेकवादी असणे म्हणजे मंदिर उद्ध्वस्त करणे नव्हे. तुम्ही रातोरात कोणाच्याही श्रद्धेला नष्ट करू शकत नाही, ते आपोआप होईल. माझी विचारधारा सर्वश्रूत आहे. काही मार्क्सवादी आणि समाजवाद्यांचा मी चाहता आहे. डावी विचारधारा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. मी केवळ थोडीशी तडजोड करतोय.<br />काँग्रेस किंवा डीएमकेमध्ये प्रवेश करणार का?, या प्रश्नावर तो म्हणतो, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा लोकांसोबत मला जायचे नाही.<br />म्हणजे, कमल हासन जाणून आहे की काँग्रेस आणि डीएमकेमध्ये भवितव्य नाही. अण्णा द्रमुकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शक्यताच नाही. या पार्श्वभूमीवर भाजप प्रवेश करण्याची त्याची तयारी आहे. परंतु, भाजप त्याला स्वीकारण्यास उत्सुक दिसला नाही. त्याचा परिणाम म्हणजे कमल हासनने मांडलेली वादग्रस्त भूमिका होय.<br />
<a href="https://4.bp.blogspot.com/-aXP3ynckhUw/WgaxCQt3CcI/AAAAAAAAHHI/Sk3iSkTstwgEXujYOXliC2ORR8syPkt0ACLcBGAs/s1600/k1.jpeg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="266" data-original-width="189" src="https://4.bp.blogspot.com/-aXP3ynckhUw/WgaxCQt3CcI/AAAAAAAAHHI/Sk3iSkTstwgEXujYOXliC2ORR8syPkt0ACLcBGAs/s1600/k1.jpeg" /></a>तामिळ साप्ताहिक ‘आनंद विकटन’ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणतो, ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. पूर्वी कडवे हिंदू चर्चा करत असत, आता ते हिंसा करतात. हिंदूत्ववादी संघटनांमधे दहशतवाद पसरलेला आहे. ‘सत्यमेव जयते’वरचा हिंदूंचा विश्वास उडाला असून बळी तो कान पिळी ही भावना त्यांच्यात बळावते आहे. उजव्या हिंदूत्ववादी संघटना आधी चर्चेवर भर द्यायच्या. त्या आता हिंसेवर भर देत आहेत.’<br />यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. दरम्यान, 7 नोव्हेंबरला आपल्या वाढदिनी तो नवीन पक्षाची घोषणा करेल अशी चर्चा सुरू असताना त्याने यू टर्न घेतला. त्याने स्वच्छ सांगून टाकले, ‘हिंदूंना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. फक्त एखाद्या धर्माच्या नावावर हिंसा करण्याला माझा विरोध आहे. मी कधीही ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचा उल्लेखच केला नाही.’<br />तीनच महिन्यांत मारलेल्या या कोलांटउड्यांनी हासनला हास्यास्पद बनवले आहे. कमल हासन हा एक प्रतिभावंत अभिनेता असला तरी नेता म्हणून तो अपरिपक्व असल्याचेच यातून पुढे आले आहे. तो पुढील काळात राजकारणात सक्रीय होईल का, स्वत:चे पक्ष काढेल काय किंवा केरळातील डाव्यांशी हातमिळवणी करून तामिळनाडूत नशीब आजमावेल याचा अंदाज करणे आजच्या क्षणी कठीण आहे. परंतु, स्वत:ला कट्टर मार्क्सवादी समजणारा आणि हिंदूंच्या श्रद्धा नष्ट होण्याची स्वप्ने पाहणार्या कमल हासनने हिंदू दहशतवादाचा वाद जाणीवपूर्वकच निर्माण केला असेल, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. इस्लामी दहशतवादावर मौन बाळगणे आणि काल्पनिक भीती दाखवत हिंदूंचा तेजोभंग करणे ही डाव्या बुद्धीजीवींची रणनीती राहिली आहे.<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://4.bp.blogspot.com/--njXQpkJ-dM/WgayWW-uulI/AAAAAAAAHHY/s3T0Ufy6l248CwPgOHVqOgAEXVwQpaBMACLcBGAs/s1600/v.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="430" data-original-width="1170" height="117" src="https://4.bp.blogspot.com/--njXQpkJ-dM/WgayWW-uulI/AAAAAAAAHHY/s3T0Ufy6l248CwPgOHVqOgAEXVwQpaBMACLcBGAs/s320/v.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">विश्वरूपम</td></tr>
</tbody></table>
<br />
2013 मध्ये कमल हासनचा विश्वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्या बायका - मुलांवर काढणार्या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे.<br />साहित्य, कला आणि चित्रपटसृष्टीत अशा कणाहीन भेकडांची एक मोठी जमातच आहे. मुस्लिम किंवा ख्रिश्चन कट्टरतावादाविषयी ब्र बोलणार नाहीत, पण काल्पनिक हिंदू दहशतवादाबद्दल रान उठवणार.<br />
<b><span style="color: blue;"> <table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-xTXzRcgTKRw/Wgax3onr3wI/AAAAAAAAHHQ/Nr05e0-VAiM-85gj_emXjQhs0N9a-gRlACLcBGAs/s1600/k2.JPG" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="540" data-original-width="362" height="320" src="https://1.bp.blogspot.com/-xTXzRcgTKRw/Wgax3onr3wI/AAAAAAAAHHQ/Nr05e0-VAiM-85gj_emXjQhs0N9a-gRlACLcBGAs/s320/k2.JPG" width="214" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><b><span style="color: blue;">गिरीश कर्नाड हे तसे मोठे दिग्गज
साहित्यिक आणि कलावंत. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार असलेले
कर्नाडही टिपू सुलतानची बाजू मांडताना म्हणाले, ‘टिपू सुलतानने फक्त केरळ,
तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले. पण त्याने कर्नाटकात आदर्श
राजकारभार केला. त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही.’</span></b></td></tr>
</tbody></table>
</span></b><br />
<br /><span style="font-size: large;"><span style="background-color: yellow;">टीपू सुलतान हा धर्मांध होता. केरळात त्याने लाखो हिंदू आणि ख्रिश्चनांना बळजबरीने बाटवले. मुस्लिम होण्यास नकार देणार्या हजारो हिंदूंची त्याने क्रूरतेने कत्तल केली. याचे ढीगभर पुरावे आज उपलब्ध आहेत. तरीही टीपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यासाठी ही मंडळी आकाशपाताळ एक करतात.</span><span style="background-color: #b6d7a8;"> पण, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, परमवीरचक्र प्राप्त अब्दुल हमीद आदी महान देशभक्तांना मुस्लिमांचे आदर्श म्हणून सादर करत नाहीत. देशात सर्वाधिक मंदिरे पाडणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी. त्याचे उदात्तीकरण करण्यासही ही मंडळी पुढे मागे पाहात नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या नावाखाली हे सारे चालते.</span></span><br /><span style="background-color: #fce5cd;"><span style="font-size: large;"><a href="https://3.bp.blogspot.com/-GTQeDUnZE-4/Wgazn-j2ePI/AAAAAAAAHHk/6Rr1Op5ARcUjzfE_DUsYY4EAUWvPlBL0QCLcBGAs/s1600/pfi.jpg" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="306" data-original-width="460" height="212" src="https://3.bp.blogspot.com/-GTQeDUnZE-4/Wgazn-j2ePI/AAAAAAAAHHk/6Rr1Op5ARcUjzfE_DUsYY4EAUWvPlBL0QCLcBGAs/s320/pfi.jpg" width="320" /></a>गेल्या काही दशकांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जिहादी विस्तारवाद सुरू आहे. लव्ह जिहादचे अड्डे राजरोस काम करत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी पुराव्यासह याचा भांडाफोड केला. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले. आणि याच वेळी कमल हासनने हिंदू दहशतवादाचा तकलादू मुद्दा चर्चेत आणला</span>.</span> सर्वच धर्मांमध्ये दहशतवाद असतो पाहा, असे बिंबवण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असतो. डावे बुद्धीजीवी यात माहीर आहेत. काँग्रेसशी संबंधीत शहजाद पूनावाला यांनी लगेच लिहूनही टाकले की, ‘दहशतवादाला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे. दहशतवाद हा हिंदू अथवा मुस्लिम नसतो. सर्व अतिरेकी हे द्वेष पसरवतात. हे आयसिस आणि आरएसएस दोघांसाठीही खरे आहे.’<br />1 सप्टेंबर 2017 रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेऊन आल्यानंतर कमल हासन म्हणाला होता की, ‘चित्रपटांमध्ये तुम्ही माझे अनेक रंग पाहिले असतील, पण भगवा नाही.’<br />
<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://2.bp.blogspot.com/-VdLmb_4GJEI/Wga0X0uXwjI/AAAAAAAAHHs/aXIRO14IblEaVg_XEs9MIBLjNCz7kIRzwCLcBGAs/s1600/udduiki.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="422" data-original-width="759" height="177" src="https://2.bp.blogspot.com/-VdLmb_4GJEI/Wga0X0uXwjI/AAAAAAAAHHs/aXIRO14IblEaVg_XEs9MIBLjNCz7kIRzwCLcBGAs/s320/udduiki.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><b><span style="color: blue;"><span style="background-color: white;">पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण
त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल
हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. पाॅप्युलर फ्रंट ही लव्ह जिहादचा कारखानाही चालवते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नुकतीच या संघ्टनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली.</span></span></b></td></tr>
</tbody></table>
<br />मूळ मुद्दा शिल्लक राहातो की, ही मंडळी असे का वागतात? हिंदू धर्माबद्दल मनात इतका आकस का ? या प्रश्नाचे उत्तर आहे हिंदूंमध्ये खोलवर रूजलेली गुलामी मानसिकता. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. ख्रिश्चन आणि इस्लामी विस्तारवादाविरुद्ध कोणी काही बोलले की त्यांना अनेक स्तरावर वाळित टाकले जाते. तुम्ही बोलता ते सत्य असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही, असे वातावरण अनेक क्षेत्रात आहे. थोर विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी याला ‘पुरोगामी दहशतवाद’ हा शब्द वापरला आहे.<br />केवळ हिंदू धर्मच इतर धर्मांचे अस्तित्व मानतो. माझा धर्म सत्य त्याप्रमाणे इतरांचेही धर्म सत्य आहेत, हा विचार केवळ हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे धर्मांतरासारखे प्रकार हिंदू धर्मीय कधीच करत नाहीत. याउलट इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्म विस्तारवादी आहेत. त्यांच्या मते केवळ त्यांचाच धर्म खरा असतो. त्यासाठीच ते धर्मांतरासारखे प्रकार अवलंबतात. त्यासाठी हिंसा करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. लव्ह जिहाद हे त्याचेच अपत्य. जिहादी आणि ख्रिस्ती विस्तारवादाची मानसिकता असलेले अनेक बुद्धीजीवी समाजाच्या विविध क्षेत्रात सेक्युलरतेचा जप करत वावरतात. आतून जिहादी असले तरी बाहेर धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवतात. चर्चप्रेरित अनेक एनजीओ मूलनिवासी, द्रविड चळवळ आदीच्या माध्यमातून हिंदूंना संभ्रमित करत असतात. यातूनच पुरोगामी दहशतवाद फोफावला. याला प्रसिद्धी माध्यमांतील मुख्य प्रवाहाने नेहमीच खतपाणी घातले. परंतु, पुरोगामी थोतांड हे असत्यावर आधारित असल्यामुळे त्याचा पाया ठिसूळ आहे. <b><span style="color: blue;">गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा उदय झाल्यामुळे सत्य झाकून ठेवणे इतके सोपे राहिले नाही. परिणामी, पुरोगामी भोंगळपणा उघड होऊ लागला.</span></b><br />हिंदू दहशतवादाची काल्पनिक भीती दाखवूनही देशात सत्तांतर झाले. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. न्यूयॉर्क टाइम्सने या घटनेची नोंद घेताना म्हटले, की, ‘1947 ला भारतातून ब्रिटीश सत्ता गेली असली तरी मे 2014 मध्ये भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.’<br />
प्रखर राष्ट्रवादी विचारांचा नेता नरेंद्र मोदी देशाच्या प्रमुखपदी येणे ही देशाच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. जिहादी, ख्रिस्ती विस्तारवादी आणि देशबाह्य निष्ठा असलेल्या शक्तींना याची जाणीव आहे. सत्तांतरानंतर या शक्तीचे कंबरडे मोठ्या मोडले गेले आहे. आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहून असहिष्णुता वाढल्याचा बनाव करून पाहिला. तरीही अनेक राज्यात हिंदुत्व विचारावर श्रद्धा असणारी सरकारे येऊ लागली.<br />
<br />
<span style="color: blue;"><span style="font-size: large;">आता 2019 जवळ येत आहे. 2019 मध्ये कसल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी सत्तेत येऊ नये यासाठी सर्व सेक्युलर जमात आकाशपाताळ एक करणार हे तर स्पष्ट आहे. नरेंद्र मोदी यांना रोखता नाही आले तरी फार बहुमताने येणार नाही याची रणनीती आखण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून आगामी काळात हिंदू दहशतवादापासून ते खोट्या बातम्या पेरण्यापर्यंत अनेक उपद्व्याप सुरूच राहातील. यामध्ये कमल हासनसारख्यांची अवस्था हास्यास्पद होणे हे ठरलेलेच आहे.</span></span>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-7580076670673721542017-09-13T13:56:00.000+05:302017-09-13T13:56:58.542+05:30प्रिय भारतीय मित्रा प्रिय भारतीय मित्रा,<br />
<br />
हे राष्ट्र संविधानाची निर्मिती होण्याआधीपासून<br />
अस्तित्वात आहे, हे तुला माहीत नाही काय?<br />
<br />
भारत १९४७ ला स्वतंत्र झाला याचाच अर्थ<br />
तो त्यापूर्वीही होता.<br />
<br />
२३ टक्के मुसलमानांसाठी<br />
भारतभूमी तोडून देण्यात आली.<br />
उर्वरित भारताने तरीही स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणून घोषित केले, त्याचे कारण हिंदू हे स्वभावत:च धर्मनिरपेक्ष आहेत.<br />
<br />
जामा मशिदीच्या कट्टर इमामानेही मान्य केले की भारतातील हिंदूंमुळेच हा देश धर्मनिरपेक्ष आहे.<br />
<br />
या देशातील लोकांनी घटना तयार केलीय,<br />
त्यामुळे ती धर्मनिरपेक्ष आहे.<br />
<br />
घटनेत हिंदुस्थान शब्द नाही म्हणून<br />
काही फरक पडत नाही.<br />
भारत, इंडिया, हिंदुस्थान, जंबुद्विप ही नावे समानार्थी आहेत.<br />
<br />
हिंदू म्हणवून घेण्याची लाज कशाला बाळगतो?<br />
अभिमानाने म्हण मी हिंदू आहे.<br />
हिंदू हा देशभक्त आहे.<br />
तो या भूमीचा पुत्र आहे.<br />
<br />
आणि हो हे ही खरेच आहे की<br />
काही बुद्धीजीवींना आपण हिंदू असल्याची लाज वाटते,<br />
ते सतत जिहादी प्रव्रुत्तीची तळी उचलतात,<br />
त्यांच्यावर एकांतिक रिलीजन्सचा प्रभाव असतो,<br />
हे जिहादींपेक्षा अधिक घातक असतात,<br />
अभ्यासू पत्रकार तुफेल अहमद यांनी<br />
अशा देशबुडव्या हिंदूंचे वर्णन<br />
"अब्राह्मिक हिंदू" या शब्दावलीत केले आहे.<br />
<br />
अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला<br />
धर्मनिरपेक्ष अथवा काम्रेड / डावे म्हणवून घेत असतात.<br />
हे लोक मुस्लिमांमधे सुधारणावादी नेत्रुत्व निर्माण होण्यातील सर्वात मोठा अडथळा आहे.<br />
<br />
स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या जगप्रसिद्ध भाषणात सांगितले होते की, "सनातन हिंदू धर्म हा नाना धर्मांचे उगमस्थान आहे."<br />
<br />
भारतवर्षात उगम पावलेले सर्व पंथ व संप्रदाय (रिलीजन्स) मिळून हिंदू धर्म बनला आहे. हा विशाल विचार नाकारणारे अब्राह्मिक हिंदू हे स्वत:ला उदार म्हणवतात आणि भारतात उगम पावलेल्या सर्व पंथांना ( उदा. जैन, बौद्ध, लिंगायत आदी) एका सूत्रात बांधणार्या हिंदुत्वाला संकुचित ठरवण्यासाठी आटापिटा करतात.<br />
<br />
ब्रह्मदेश तोडून तेथे इस्लामस्थान करण्यासाठी रक्तपात करणारे रोहिंग्या मुसलमान निर्वासित बनतात तेव्हा घळाघळा पाझरणारे सेकुलरवादी ह्रुदय काश्मीरात हिंदू निर्वासित होतात तेव्हा पाषाण बनून जाते.<br />
<br />
रोहिंग्या मुस्लिमांना काश्मीरात वसवण्याचे समर्थन अब्राह्मिक हिंदू करतात. पण तेथे निर्वासित हिंदूंना वसवल्यास काश्मीरियतला धोका पोचतो असे सांगून कोकलणारेही हेच असतात.<br />
<br />
जेथून हिंदू कमी झाला तो भाग देशापासून तुटला<br />
हे त्यांना माहित नाही असे थोडेच आहे.<br />
<br />
काश्मीर, नागालैंडमधे आज ८० टक्के हिंदू असते तर तेथे देशद्रोही डोके वर काढले असते काय?<br />
<br />
विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी शिकागो भाषणातून जगाला सांगितलं, "मी अशा धर्माचा प्रतिनिधी आहे की जो म्हणतो, माझा धर्म सत्य आहे तसे तुमचेही धर्म सत्य आहेत."<br />
<br />
जगात एवढा उदार धर्म कुठे आहे काय? मग हिंदूस्थान, हिंदू शब्द उच्चारताना लाज कसली?<br />
<br />
अभिमानाने म्हण की हा देश हिंदुस्थान आहे. याला भारत, जंबुद्विप, इंडिया अशी अनेक नावे आहेत.<br />
<br />
- एक भारतीयpsiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-52401572085070631122017-08-14T19:17:00.001+05:302017-08-14T19:18:48.033+05:30देशभक्तीचे दुसरे नाव : स्वामी विवेकानंद<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-BqRBEhxY45E/WZGhojq1eSI/AAAAAAAAG-s/kJx09uyYATY01AdYwheK8jhXTgvKuXOVQCLcBGAs/s1600/sv.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="738" data-original-width="792" height="298" src="https://1.bp.blogspot.com/-BqRBEhxY45E/WZGhojq1eSI/AAAAAAAAG-s/kJx09uyYATY01AdYwheK8jhXTgvKuXOVQCLcBGAs/s320/sv.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small; text-align: start;">
<span style="color: blue;"><span style="font-size: medium;">स्वामी विवेकानंद यांचे वर्णन अनेक विद्वानांनी घनीभूत देशभक्ती या शब्दावलीत केले आहे. अतिशय सार्थ असे हे वर्णन आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे गाढे अभ्यासक आणि इतिहासकार संकरी प्रसाद बसू म्हणतात की, 'फ्रान्सच्या क्रांतीवर रूसोचा जेवढा प्रभाव होता किंवा रशिया आणि चीन या देशात घडलेल्या क्रांतीवर मार्क्सचा जेवढा प्रभाव होता, तेवढाच प्रभाव भारतीय चळवळीवर विवेकानंदांचा होता.'</span><span style="font-size: medium;"> </span><span style="font-size: medium;">भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जवळजवळ सर्वच नेत्यांवर स्वामी विवेकानंदांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव होता याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांच्या पाश्चात्य शिष्या भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगादान सुवर्णाक्षरांनी नोंदवावे असेच आहे. </span></span></div>
</td></tr>
</tbody></table>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<br /></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #444444;">विशेष लेख -</span><span style="color: #222222;"> </span><span style="color: #666666;">सिद्धाराम भै. पाटील</span></span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #3d85c6;">विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून... </span><span style="color: #222222;"> </span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="background-color: white;">स्वामी विवेकानंदांच्या काळापासून आपल्या देशात खूप मोठे परिवर्तन झाले. त्या काळी तमोगुण, अकर्मण्यता तसेच निष्क्रियता लोकांच्या रोमारोमांत भिनली होती. नाही म्हणायला असंतोष आणि परिवर्तनाची मंद मानसिकता तयार होत होती. परंतु, स्वातंत्र्याविषयी विचार करावे इतके साहसी लोक तेव्हा नव्हते. </span><span style="background-color: yellow;">त्या काळातील अत्यंत प्रबुद्ध व्यक्तीसुद्धा इंग्रजांसमोर सीमित प्रतिनिधित्वाची विनंती, आर्जव करीत होते. ते लोक इंग्रजांची राजवट म्हणजे भारताच्या हितासाठी ईश्वरी संकेत समजायचे. अशा मानसिकतेच्या लोकांमुळे स्वामी विवेकानंद व्यथित झाले होते.</span><span style="background-color: white;"> स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी यामध्ये मोठे परिवर्तन झाले. ब्रिटिशांच्या गुलामीतील भारतात स्वाभिमान जागवण्याचे काम स्वामी विवेकानंद यांनी केले. </span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><br /></span></div>
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: left; margin-right: 1em; text-align: left;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-na9gpVlByKY/WZGii6Ko9TI/AAAAAAAAG-0/IrqK9tvisP8EIE2N28X5AMWFrEK94ij9wCLcBGAs/s1600/dharampal.jpg" imageanchor="1" style="clear: left; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="213" data-original-width="200" src="https://1.bp.blogspot.com/-na9gpVlByKY/WZGii6Ko9TI/AAAAAAAAG-0/IrqK9tvisP8EIE2N28X5AMWFrEK94ij9wCLcBGAs/s1600/dharampal.jpg" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;"><span style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: medium; text-align: start;">प्रा. धरमपाल</span></td></tr>
</tbody></table>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #222222;">थोर चिंतक प्रा. धरमपाल यांच्या शब्दांत सांगायचे तर स्वामी </span><span style="color: red;">विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायला शिकवलं. त्यांनी निद्रित अवस्थेतील भारताचा आत्मा जागवला. आणि यातून देशात जागृतीचे एक लाट उसळली. विवेकानंदांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन अनेक जण स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व करू लागले. </span><span style="color: #222222;">देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे या मागणीमागची प्रेरणाही विवेकानंदच होते. याची परिणिती पुढे जाऊन भारताला स्वातंत्र्य मिळण्यात झाली. <br />लोकमान्य टिळक यांच्या शब्दांत स्वामी विवेकानंद हे राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता होते. कोट्यवधी देशबांधव, शेकडो क्रांतिकारक आणि नेत्यांमधे देशभक्तीची भावना जागवली. यातून भारत स्वतंत्र झाला. स्वामी विवेकानंदांनी केवळ इतकेच कार्य केले असते तरी त्यांचे वर्णन घनीभूत देशभक्ती किंवा देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद या शब्दावलींनी करता आले असते. परंतु, स्वामी विवेकानंदांच्या कार्याचे महत्त्व केवळ येवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांच्या कार्याचे इतरही अतिशय महत्त्वाचे आयाम आहेत.</span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><br /></span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-zw71GyBo0YQ/WZGjTHOcwYI/AAAAAAAAG_A/IEcUZZXh-9olRISglAt3jnIeOIu5jbK0gCLcBGAs/s1600/partition.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="222" data-original-width="227" src="https://4.bp.blogspot.com/-zw71GyBo0YQ/WZGjTHOcwYI/AAAAAAAAG_A/IEcUZZXh-9olRISglAt3jnIeOIu5jbK0gCLcBGAs/s1600/partition.jpg" /></a></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="background-color: white;">स्वातंत्र्य आंदोलनातील नेते स्वामी विवेकानंदांच्या विचारांशी घनिष्ट बांधलेले होते तेव्हा म्हणजे १९०५ मध्ये कर्झनने देशाची हिंदू-मुस्लिम आधारावर फाळणी केली; त्याविरुद्ध प्रचंड आंदोलन उभे राहिले. ब्रिटिशांना फाळणी रद्द करावी लागली. परंतु, १९४७ च्या सुमारास जेव्हा प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळण्याची वेळ आली तेव्हा घात झाला. </span><span style="background-color: lime;">स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या तत्कालीन धुरीणांनी स्वामी विवेकानंदांच्या विचारांना सोडचिठ्ठी दिली. भ्रामक विचार आणि स्वार्थ प्रबळ झाला. देशाला स्वातंत्र्य मिळाले पण ते खंडित होते. देशाचे तुकडे झाले. आपल्या देशाची भूमी आज जिहादी इस्लामच्या गुलामीत आहे. जग त्या भूमीला आज पाकिस्तान आणि बांगलादेश म्हणून ओळखते. स्वामी विवेकानंदांच्या विचारांपासून दूर गेल्याचा, एकांतिक धर्मांचा धोका न ओळखल्याचा हा परिणाम होता.</span></span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="color: #222222; font-size: medium;">साऱ्या जगाला सर्वधर्मसमभावाचा संदेश देणा</span><span style="color: #222222; font-size: medium;">ऱ्या</span><span style="color: #222222; font-size: medium;"> स्वामी विवेकानंदांनी जिहादी इस्लाम आणि धर्मांतरणाला चटावलेल्या ख्रिस्ती मिशनऱ्यां</span><span style="font-size: medium;"><span style="color: #222222;">चा या देशाला असलेला धोका अतिशय स्पष्टपणे सांगितला होता. त्याकडे दुर्लक्ष केल्याचा परिणाम आज आपला देश भोगत आहे. खंडित भारतातही एकांतिक धर्मीय धर्मांतराच्या माध्यमातून देशाच्या एकतेला नख लावण्याचे काम करत आहेत. </span><br /><span style="color: blue;">काश्मीर, नागालॅन्ड, त्रिपुरा, केरळ आदी राज्यातील धर्मांतरे आणि फुटीर चळवळीचे लोण इतर भागातही पोहोचत आहेत. स्वामी विवेकानंदांच्या वाङमयात या धोक्यावरील उपाय अतिशय नि:संदिग्ध शब्दांत सांगितलेले आहेत. आज या आव्हानाला थोपवण्यासाठी देशात ज्या संस्था आणि व्यक्ती कार्य करत आहेत त्या साऱ्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंद आहेत. स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा हा अतिशय महत्त्वाचा आयाम आहे.</span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">स्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">स्वामी विवेकानंदांनी पूर्ण भारतभर भ्रमण केलेले होते आणि भारताच्या बाहेरही त्यांनी ब</span><span style="font-size: medium;">ऱ्या</span><span style="font-size: medium;">च देशांतून भ्रमंती केलेली होती. त्यामुळे त्यांना जगाचे दर्शन अगदी जवळून घेण्याची संधी प्राप्त झाली होती. माणसांच्या कमतरता आणि शक्तिस्थाने, विविध संस्कृती तसेच मानवाच्या जीवनावर प्रभाव गाजविण्याची त्यांची शक्ती यांचेही दर्शन त्यांना घडलेले होते. या संबंधात शतकभरात जगभर झालेले विचारमंथन स्वामी विवेकानंद यांनी समजून घेतले होते.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे केलेली होती. अतिशय गरीब आणि अतिशय श्रीमंत, अशिक्षित आणि सुशिक्षित, तंत्रकुशल आणि तंत्रज्ञान वंचित, जेते असल्याचा गर्व बाळगणारे उन्मत्त राज्यकर्ते आणि त्यांच्या जुलमी राजवटीखाली दबले जाणारे गुलाम, आस्तिक आणि नास्तिक अशा सर्व प्रकारच्या श्रोत्यांना त्यांनी मार्गदर्शन केलेले होते. </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">त्यांनी संबोधित केलेल्या श्रोत्यांमध्ये हे विश्व म्हणजे एका सत्याचाच विस्तार आहे असे मानणारे लोकही होते आणि त्याच्या विपरीत जगाला सश्रद्ध आणि अश्रद्ध अशा दोनच गटात वाटणारे कट्टर धर्मपंथीसुद्धा होते. सर्वांच्या कल्याणासाठी परमेश्वराची प्रार्थना करणारे लोकही त्यांच्या श्रोत्यांत होते आणि आमची देवाची व्याख्या मान्य करतील त्यांचेच फक्त कल्याण होईल असे मानणारे अभिनिवेशी लोकही होते. त्यांना अशा प्रकारे विविध प्रकारच्या श्रोत्यांपुढे भाषणे करावी लागली. त्यांचे भाषण हे त्यांच्या वक्तृत्वाचे प्रदर्शन घडविण्यासाठी होत नसे, तर त्यांचे भाषण म्हणजे त्यांच्या उत्कट अंत:करणाचा सहज आविष्कार असे. त्यांनी लोकांना आध्यात्मिकदृष्ट्या आहे त्या स्तरावरून वरच्या स्तरावर नेण्यासाठीच सातत्याने भाषणे केली. </span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-mNO0R12v8tM/WZGlLFy6qDI/AAAAAAAAG_M/-uinRPLoz5MU_TMTIt5R96NpyM2Prb8hwCLcBGAs/s1600/ctoa.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="475" data-original-width="297" height="320" src="https://4.bp.blogspot.com/-mNO0R12v8tM/WZGlLFy6qDI/AAAAAAAAG_M/-uinRPLoz5MU_TMTIt5R96NpyM2Prb8hwCLcBGAs/s320/ctoa.jpg" width="200" /></a></div>
<div style="font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="background-color: white; color: #222222;">भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय तरुणांसाठी व्याख्यानांची एक मालिका गुंफली. कोलंबो ते अल्मोडा किंवा भारतीय व्याख्याने या ग्रंथात ही संकलित करण्यात आली आहेत. </span><br /><span style="background-color: white; color: blue;">स्वामी विवेकानंद हे विश्व दिग्विजय करून भारताच्या भूमीवर पाऊल ठेवले ते कोलंबो (श्रीलंका) येथे. श्रीलंकेतील जनता तेव्हा स्वत:ला भारतीयच समजत होती हे आपल्या कोलंबोवासीयांनी स्वामी विवेकानंदांना दिलेल्या मानपत्रावरून दिसून येते.</span><span style="background-color: yellow; color: #222222;"> कोलंबो येथे स्वामी विवेकानंदांनी दिलेले पहिले व्याख्यान म्हणजे महान राष्ट्रद्रष्टा संन्याशाने दिलेला राष्ट्रमंत्रच होय. या देशाचे पुनरुत्थान कसे करता येईल, यासाठीच्या कार्याची दिशा काय असेल यासंबंधीची स्पष्टता आणि दूरदृष्टी त्यांच्या व्याख्यानातून दिसून येते. भारताच्या पुनरुत्थानाची महान योजना त्यात मांडली आहे. (जिज्ञासूंनी अधिक जाणून घेण्यासाठी भारतीय व्याख्याने हे पुस्तक वाचावे.)</span></span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<span style="color: #222222; font-size: medium;"> </span><span style="color: blue; font-size: large;"><b>भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर स्वामी विवेकानंदांचा मोठा प्रभाव होता, हे खरे असले तरी केवळ राजकीय स्वातंत्र्यापुरताच तो मर्यादित नव्हता. पुढील हजारो वर्षे भारत परतंत्र होणार नाही याची पायाभरणी त्यांनी केली आणि जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली आणि त्यासाठीचे तत्त्वज्ञानही उभे केले. </b></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">वेदांत हा भावी जगाचा धर्म असेल असेही त्यांनी सांगितले. भारताने जगाकडून शिकले पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे खरेच आहे; पण त्या बदल्यात भारताने जगाला अध्यात्माचे ज्ञान दिले पाहिजे. ही भारताची नियती आहे असे ठाम प्रतिपादन स्वामीजींनी केले.</span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: red;">स्वामी विवेकानंद आपल्याला इशारा देतात की, अध्यात्माचा संदेश देणे म्हणजे तत्त्वज्ञान देणे आहे. आपण वर्षानुवर्षे छातीशी कवटाळून बसलो आहेत त्या अंधश्रद्धा आणि रूढी देणे नाही. त्या आपल्याला या आपल्या देशातही नष्ट करायच्या आहेत, फेकून द्यायच्या आहेत. त्या कायमच्या संपाव्यात यासाठी त्यागायच्या आहेत. </span><span style="color: #444444;">(खंड ३ पृष्ठ २७७-२७८) </span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">मानवी जातीचे हे आध्यात्मीकरण कसे होणार आहे? हे सांगताना स्वामीजींनी शत्रूंपासून सावधही केले होते.</span></div>
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="float: right; margin-left: 1em; text-align: right;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://2.bp.blogspot.com/-Wp_HD_bYR24/WZGmC-CQ_tI/AAAAAAAAG_U/TsxkSegQj1kB-PpXTY3QpyTrcssBnNgZwCLcBGAs/s1600/shivaji.jpg" imageanchor="1" style="clear: right; margin-bottom: 1em; margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="600" data-original-width="600" height="320" src="https://2.bp.blogspot.com/-Wp_HD_bYR24/WZGmC-CQ_tI/AAAAAAAAG_U/TsxkSegQj1kB-PpXTY3QpyTrcssBnNgZwCLcBGAs/s320/shivaji.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">प्रतीकात्मक चित्र </td></tr>
</tbody></table>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #222222;">स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते, </span><span style="color: blue;">''शूर लोकच जगाचा उपभोग घेऊ शकतात. तुमचे शौर्य दाखवून द्या, त्याचा कालानुरूप आविष्कार घडवा, तुमच्या शत्रूत फूट पाडा, भेद निर्माण करा, वेळ पडल्यास लाच द्या, त्यांच्यात बंडखोरीची पेरणी करा आणि तुमच्या शत्रूविरुद्ध उघड युद्ध पुकारा, त्याला जिंका आणि जगाचा आनंद लुटा. तरच तुम्ही खरे धार्मिक राहाल, अन्यथा इतरांनी तुम्हाला लाथाडले, सतत अपमानित केले आणि तरी तुम्ही ते अपमान गिळून अध:पतित जीवन जगत राहाल, तर तुमचे आयुष्य म्हणजे एक नरकवास ठरेल! नंतर तर तुम्हाला नरकात जावे लागेलच, हेच शास्त्राने सांगितले आहे.''</span></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="background-color: white; font-size: medium;">विजयासाठी वाट्टेल ते करण्याचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद दुस</span><span style="background-color: white; font-size: medium;">ऱ्या</span><span style="font-size: medium;"><span style="background-color: white;"> ठिकाणी म्हणतात, </span><span style="background-color: yellow;">''माझ्या आयुष्यात मी एक मोठा धडा शिकलो आहे की, आपण जे साध्य करतो, ते साध्य तर पवित्र असले पाहिजेच, परंतु त्यासाठी वापरलले साधनसुद्धा शुद्ध असले पाहिजे. किंबहुना मी तर असे म्हणेन की, आपण जे साध्य करतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा ते कोणत्या मार्गाने साध्य करतो, यावर जास्त लक्ष देणे हेच यशाचे रहस्य आहे.''</span></span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #222222;">या दोन्ही गोष्टी वरवर पाहता परस्परविरोधी वाटू शकतील. परंतु, स्वामी विवेकानंद यांचे समग्र जीवन अभ्यासले तर ध्यानात येईल की, स्वामीजींनी उदात्त विचारांच्या नावाखाली भारतासमोरील धोक्यांकडे दुर्लक्ष केलेले नाही. सर्व धर्म सत्य आहेत. </span><br /><span style="color: blue;">सर्व धर्मांचा आम्ही आदर करतो असे सांगणारे स्वामीजी एकांतिक धर्मीयांच्या धर्मांतरण आणि विस्तारवादाकडे दुर्लक्ष करत नाहीत. एका हिंदूंने धर्मांतर केल्यास आपली संख्या एकाने कमी होते, इतकेच नाही तर शत्रूची एकाने वाढते हे सांगायलाही स्वामीजी विसरत नाहीत. स्वामीजींनी समर्थ भारतासंबंधी वास्तववादी विचार केला आहे, असे दिसते. </span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">भारत जगला तर जगाला मार्गदर्शन करेल. भारत जगायचा असेल तर येथील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य घडवून आणले पाहिजे. भारताचे ऐक्य म्हणजे भारतातील आध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, असे स्वामीजी सांगतात. स्वामी विवेकानंदांचे विचार हे शाश्वत विचार आहेत. </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">बलशाली भारतासाठी स्वामीजी सांगतात, </span></div>
<div style="font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="background-color: yellow; color: #222222;">''तुमच्या धमन्या बळकट करा. आपल्याला हवे आहेत पोलादी स्नायू आणि पोलादी धमन्या. आपण खूप रडलो आहोत. आता हे रुदन थांबवा. आता आपल्या पायावर उभे राहा आणि 'पुरुष' व्हा. आपल्याला असे पुरुष निर्माण करणारा धर्म हवा आहे. आपल्या मनुष्य-निर्माणाचे सिद्धांत हवे आहेत. आपल्याला सर्वांगीण मनुष्य-निर्माण करणारे शिक्षण हवे आहे. इथेच सत्याची पारख होणार आहे. जे तुम्हाला शारीरिकदृष्ट्या दुबळे करते, बौद्धिक दास्यात टाकते आणि आध्यात्मिक संभ्रमात लोटते त्याला विषसमान मानून अव्हेरा. त्यात काही जीव नाही. ते सत्य नव्हेच. जे आपल्याला सामर्थ्यशाली बनवते तेच सत्य होय. उपनिषदांकडे चला. देदीप्यमान, सामर्थ्य प्रदान करणारे झळाळते तत्त्वज्ञान त्यात आहे. आपल्याला दुबळे करणार्या सर्व गोष्टींपासून दूर राहा. वेगळे व्हा. उपनिषदातली सत्ये आपल्या समोर आहेत. त्यांचा स्वीकार करा. त्यांच्यासह जगायला शिका. भारत भूमीच्या मुक्तीचा मार्ग तुम्हाला गवसेल.'' </span><span style="background-color: white;"><span style="color: #666666;">(खंड ३ पृष्ठ २२४-२२५)</span></span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">स्वामी विवेकानंदांनी जगाला जागृत करण्याबाबत खूप काही सांगितले आहे पण त्यांनी आपल्यालाही आठवण करून दिली आहे. </span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: blue;">''आम्ही कधी हातात तलवारी घेऊन आमच्या विचारांचा प्रसार केलेला नाही. आमचे काम सावकाश पण मूक, शुभ प्रभाती पडणार्या दंवासारखे न दिसणारे, न ऐकू येणारे, तरीही खूप मोठे ङ्गलदायी, शांत, संयत आहे. सर्व सहन करणार्या आध्यात्मिक स्वभावाच्या जातीचे हे कार्य विचार विश्वात झिरपणारे आहे.'' </span><br /><span style="color: #666666;">(खंड ३ पृष्ठ ११०).</span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">----</span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="background-color: #fff2cc;"><span style="font-size: medium;">लोकमान्य टिळक यांच्या मते स्वामी विवेकानंद हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आध्यात्मिक जनक होते. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातील जहाल, मवाळ, क्रांतिकारी अशा सर्वच प्रवाहांवर स्वामीजींचा अमिट प्रभाव होता. गोपाळ कृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक, बिपिनचंद्र पाल, ऍनी बेझंट, नेताजी सुभाषचंद्र बोस, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, योगी अरविंद, जवाहरलाल नेहरू ते विनोबा भावे यांच्यापर्यंत सा</span><span style="font-size: medium;">ऱ्या</span><span style="font-size: medium;"> देशभक्तांवर स्वामी विवेकानंदांचा थेट प्रभाव होता. लोकमान्य टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे पिता मानत होते.</span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">----</span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="background-color: #9fc5e8; font-size: medium;"> स्वामीजी हे मातृभूमीचे उत्कट भक्त होते. ते भारताशी तादात्म्य पावलेले देशभक्त होते. भारतभक्ती त्यांच्या नसानसांत होती. भारताचे उत्थान म्हणजे येथील सामान्य माणसाचे उत्थान ही त्यांची धारणा होती. भारतातील एक कुत्राही जोवर उपाशी आहे, तोवर मला मुक्ती नको, असे म्हणण्याचे धाडस करणारा संन्याशी म्हणून त्यांची ओळख आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल तर आधी विवेकानंद वाचा.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">----</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-hGTCrEC274Q/WZGoEIsi6RI/AAAAAAAAG_g/15tqB5cfoB0gnT74RjNR6Y_tcTeYesC0gCLcBGAs/s1600/sv1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1024" data-original-width="423" height="320" src="https://4.bp.blogspot.com/-hGTCrEC274Q/WZGoEIsi6RI/AAAAAAAAG_g/15tqB5cfoB0gnT74RjNR6Y_tcTeYesC0gCLcBGAs/s320/sv1.jpg" width="132" /></a></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="color: #222222;">ज्यांच्या मनात भारताविषयी प्रेमआणि आस्था नव्हती त्यांनी भारतीयांमधील स्वाभिमान मारला. आपल्या देशातील बुद्धिजीवी भारतावर टीका करण्यात धन्यता मानू लागले. भारतात सुधारणा करायच्या असतील तर भारतावर टीका केली पाहिजे. येथील परंपरांवर आघात केले पाहिजे, अशी एक चळवळ त्याकाळी उदयास आली. स्वामीजींनी ती आत्मवंचना थांबवली. </span><br /><span style="color: #222222;">भारतासाठी काही चांगले करता येत नसेल तर किमान शिव्याशाप देणे तरी करू नका. आधी भारतावर प्रेमकरा. आपल्या देशबांधवांमध्ये तुम्हाला शेकडो दोष दिसतील, पण ते दोष येथील रक्ताचे आहेत हे विसरू नका. येथील सर्वसामान्यांसंबंधीच्या उत्कटतेतून तुमच्या हृदयात प्रेमस्फुरू द्या. भारतातील दीन दलित आणि गरिबांची सेवा ही मोक्षप्राप्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे. देशबांधवांप्रतीच्या आत्यंतिक प्रेमातून आपल्या क्षमता विकसित होतात. भारतीय तरुणांच्या क्षमता विकसित होण्यातूनच भारत उभा राहणार आहे. या सर्वसामान्य तरुणांमधूनच माझे कार्यकर्ते पुढे येतील. त्याग आणि सेवा या महान आदर्शांच्या आधारेच भारताचे पुनरुत्थान घडून येईल. माझ्या मृत्यूनंतरही माझे विचार कार्य करत राहतील. तरुणांना जागे करत राहतील, असा विश्वास स्वामी विवेकानंदांनी व्यक्त केला होता. </span><span style="color: blue;">आज शेकडो, हजारो तरुण स्वामीजींच्या विचारांने प्रेरित होऊन भारताच्या कानाकोपर्यांत भारताच्या पुनरुत्थानासाठी कार्य करत आहेत, यातून स्वामीजींचे द्रष्टेपण स्पष्ट होते.</span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">-----------</span></div>
<div style="background-color: white; font-family: arial, sans-serif;">
<span style="color: red; font-size: large;">देशभक्तीसंबंधीची माझी स्वत:ची अशी खास कल्पना आहे. प्रथम तुमच्या अंत:करणात भावना जागृत होऊ द्या. आज तुमचे लक्षावधी देशबांधव उपाशी आहेत, याची तुम्हाला जाणीव आहे का? आपल्या देशावर अज्ञानाच्या अंधाराचे सावट पडले आहे, याची खंत तुम्हाला वाटते का? यामुळे तुम्ही कधी अस्वस्थ होता का? लोकांच्या दु:खामुळे तुम्ही जवळजवळ वेडे होऊन जाता का?... देशभक्तहोण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"> ----------</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-EoJjB7uFZwY/WZGoqszkLZI/AAAAAAAAG_o/TUEO72WvN_cC7SCAjkRxujwz8TarZcW-ACLcBGAs/s1600/andmt.jpg" imageanchor="1" style="clear: right; float: right; margin-bottom: 1em; margin-left: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1039" height="320" src="https://4.bp.blogspot.com/-EoJjB7uFZwY/WZGoqszkLZI/AAAAAAAAG_o/TUEO72WvN_cC7SCAjkRxujwz8TarZcW-ACLcBGAs/s320/andmt.jpg" width="207" /></a></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;">तुमच्या भावना जागृत होतील, परंतु लोकांना या जीवन्मृत अवस्थेतून वर काढण्याचा व्यावहारिक मार्ग तुम्हाला सापडला आहे का? लोकांना त्यांच्या दैन्यावस्थेत कशी मदत करावी, हे तुम्हाला समजले आहे का? पण असे ज्ञान तुम्हाला झालेतरी पुरेसे नाही. तुमच्या मार्गातील अडचणींचे डोंगर ओलांडण्याचा निर्धार तुमच्याजवळ आहे का? उत्कट भावना, समस्यांची सोडवणूक करण्याचा व्यावहारिक मार्ग आणि दुर्दम्य इच्छाशक्ती या तीन गोष्टी जर तुमच्याजवळ असतील, तर तुमच्यापैकी प्रत्येकजण परमेश्वराची कृपा लाभलेल्या या आपल्या देशात अपूर्व चमत्कार घडवून आणू शकेल. देशभक्तीची माझी कल्पना ही अशी आहे. राष्ट्रभक्तीचा महामंत्रच स्वामी विवेकानंदांनी वरील ओळींतून दिला आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऋषी बंकीमचंद्र यांच्या आनंदमठ या ऐतिहासिक कादंबरीचे एक वेगळे स्थान आहे. कादंबरीच्या शेवटी दिलेला संदेश सामान्य वाचकाला गोंधळात पाडतो. परंतु, स्वामी विवेकानंदांचे जीवनकार्य पाहिले की त्या संदेशाचा अर्थबोध होतो.</span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><span style="background-color: white;">तात्कालिक राजकीय संदर्भाने शत्रूशी दिलेला लढा हा आवश्यक असला तरी त्याचा दीर्घकाळ उपयोग नाही. या राष्ट्राच्या शाश्वत मूल्यांसाठी लढा उभारणे, मनुष्य निर्माण करणे हे खरे कार्य आहे. स्वामी विवेकानंदांनी या कार्याची पायाभरणी केली. वर्षामागून वर्षे, शतकामागून शतके जातील तसे हे कार्य वाढत जाणारे आहे. स्वामी विवेकानंदांची काळावर पडलेली सावली ही वाढत जाणारी आहे. मनुष्य निर्माणातून राष्ट्र पुनरुत्थान हा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. त्याग आणि सेवा या शाश्वत मूल्यांचे महत्त्व सांगितले. </span><span style="background-color: yellow;">त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रासाठी जीवन समर्पित करणा</span></span><span style="background-color: yellow;"><span style="font-size: medium;">ऱ्या</span><span style="font-size: medium;"> तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शेकडो युवक पुढे येत आहेत. विवेकानंद विचारांच्या मुशीतून घडलेले अनेक जण आज देशाच्या नेतृत्वस्थानी येत आहेत, हा योगायोग नाही; ही या देशाची नियती आहे. </span></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><br /></span></div>
<div style="background-color: white;">
<span style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: medium;">स्वामी विवेकानंद म्हणतात, </span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><b>स्वदेशासाठी सर्वस्व अर्पण करणारे आणि पूर्णपणे निष्कपट असे लोक जेव्हा तुमच्यामधये निपजतील तेव्हा हिंदुस्थानही सर्व दृष्टींनी महान होईल. माणसांनीच तर देश महान बनत असतो. नुसत्या जमिनीच्या तुकड्यात काय आहे.</b></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<span style="font-size: medium;"><br /></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://4.bp.blogspot.com/-pHINhoQQ-oQ/WZGpb5DkWYI/AAAAAAAAG_w/jw1KsvQ2Os4qvfFEtuqhUAtNXVrNA-tlwCLcBGAs/s1600/VivekVicharAug17_Page_06%2BNew.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1049" data-original-width="1600" height="209" src="https://4.bp.blogspot.com/-pHINhoQQ-oQ/WZGpb5DkWYI/AAAAAAAAG_w/jw1KsvQ2Os4qvfFEtuqhUAtNXVrNA-tlwCLcBGAs/s320/VivekVicharAug17_Page_06%2BNew.jpg" width="320" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://1.bp.blogspot.com/-RiWsdr-JDjM/WZGpcw3bAxI/AAAAAAAAG_0/IqoN-L7SJd42U4jlc9SPb7IbBic42GxlwCLcBGAs/s1600/VivekVicharAug17_Page_08%2BNew.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1027" data-original-width="1600" height="205" src="https://1.bp.blogspot.com/-RiWsdr-JDjM/WZGpcw3bAxI/AAAAAAAAG_0/IqoN-L7SJd42U4jlc9SPb7IbBic42GxlwCLcBGAs/s320/VivekVicharAug17_Page_08%2BNew.jpg" width="320" /></a></div>
<h2 style="color: #888888; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 13px; font-stretch: normal; margin: 0.5em 0px; text-transform: uppercase;">
<span style="color: blue;"><span style="font-family: arial, sans-serif; font-size: medium;">राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा... </span><span style="font-family: arial, sans-serif; font-size: medium;"> </span></span></h2>
<b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">लोकमान्य टिळक </span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">सुरेंद्रनाथ बॅनर्जी</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">बिपिनचंद्र पाल</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">गोपाळकृष्ण गोखले</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान </span><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #444444; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">वि. दा. सावरकर</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: #660000;">महात्मा गांधी</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #660000; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">नेताजी सुभाषचंद्र बोस</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. </span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">रवींद्रनाथ टागोर</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">जवाहरलाल नेहरू</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">इंदिरा गांधी</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">सर्वपल्ली राधाकृष्णन</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: red;">डॉ. एपीजे कलाम</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: red; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: blue;">नरेंद्र मोदी</span></b><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: blue; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">-------</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">स्वामी विवेकानंद म्हणतात,</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><span style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;">मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !</span><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><br style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;" /><b style="color: #333333; font-family: Arial, Tahoma, Helvetica, FreeSans, sans-serif; font-size: 14.85px; line-height: 20.79px;"><span style="color: #444444;"><i>विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार </i></span></b><span style="font-size: medium;"><a href="http://vivekvichar.vkendra.org/" style="color: #1155cc;">vivekvichar.vkendra.org</a></span></div>
<br />psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-36805722015771811132017-08-03T18:41:00.000+05:302017-08-14T17:32:59.146+05:30घनीभूत देशभक्ती : स्वामी विवेकानंद<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://1.bp.blogspot.com/-vaoisWQfl_Y/WYMgTt900sI/AAAAAAAAG9M/glXTup1r9P48YQtwD5HddbV1lUwY3EN1ACLcBGAs/s1600/VivekVicharAug17_Page_08%2BNew.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1028" data-original-width="1600" height="205" src="https://1.bp.blogspot.com/-vaoisWQfl_Y/WYMgTt900sI/AAAAAAAAG9M/glXTup1r9P48YQtwD5HddbV1lUwY3EN1ACLcBGAs/s320/VivekVicharAug17_Page_08%2BNew.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">स्वामी विवेकानंद यांच्याविषयी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सर्वपल्ली राधाकृष्णन, एपीजे कलाम आणि नरेंद्र मोदी आदी प्रभावी नेत्यांनी केलेला उल्लेख पाहता विवेकानंद यांना घनीभूत देशभक्ती म्हणणे सार्थ ठरते. विवेक विचार । आॅगस्ट २०१७ मधून</td></tr>
</tbody></table>
<h2>
<span style="color: blue;"><span style="font-family: arial, sans-serif; font-size: large;">राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा... </span><span style="font-family: arial, sans-serif; font-size: large;"> </span></span></h2>
<b><span style="color: red;">लोकमान्य टिळक </span></b><br />
<span style="color: red;">दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">सुरेंद्रनाथ बॅनर्जी</span></b><br />
<span style="color: blue;">सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">बिपिनचंद्र पाल</span></b><br />
<span style="color: red;">बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">गोपाळकृष्ण गोखले</span></b><br />
<span style="color: blue;">गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान </span><span style="color: blue;">विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</span></b><br />
<span style="color: red;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.</span><br />
<span style="color: #444444;">(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">वि. दा. सावरकर</span></b><br />
<span style="color: blue;">क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.</span><br />
<br />
<b><span style="color: #660000;">महात्मा गांधी</span></b><br />
<span style="color: #660000;">आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">नेताजी सुभाषचंद्र बोस</span></b><br />
<span style="color: blue;">सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. </span><br />
<br />
<b><span style="color: red;">रवींद्रनाथ टागोर</span></b><br />
<span style="color: red;">रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">जवाहरलाल नेहरू</span></b><br />
<span style="color: blue;">चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">इंदिरा गांधी</span></b><br />
<span style="color: red;">इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">सर्वपल्ली राधाकृष्णन</span></b><br />
<span style="color: blue;">डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">डॉ. एपीजे कलाम</span></b><br />
<span style="color: red;">डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.</span><br />
<br />
<b><span style="background-color: white; color: blue;">नरेंद्र मोदी</span></b><br />
<span style="background-color: white; color: blue;">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.</span><br />
<br />
-------<br />
<br />
स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.<br />
<br />
स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.<br />
<br />
स्वामी विवेकानंद म्हणतात,<br />
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !<br />
<br />
<b><span style="color: #444444;"><i>विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार </i></span></b><br />
<b><span style="color: #444444;"><i><a href="http://vivekvichar.vkendra.org/" target="_blank">vivekvichar.vkendra.org</a></i></span></b><br />
<div>
<br /></div>
<br />
psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-3080011127979150876.post-58843301911889480892017-08-03T18:36:00.000+05:302017-08-14T17:33:31.903+05:30देशभक्तीचे दुसरे नाव - स्वामी विवेकानंद<table align="center" cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://4.bp.blogspot.com/-OzgY0ZM1nBM/WYMejJHONUI/AAAAAAAAG9A/vXX9fNOuGXU2QnAdnuw9CDfSvaH0jlMrQCLcBGAs/s1600/VivekVicharAug17_Page_06%2BNew.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="1050" data-original-width="1600" height="209" src="https://4.bp.blogspot.com/-OzgY0ZM1nBM/WYMejJHONUI/AAAAAAAAG9A/vXX9fNOuGXU2QnAdnuw9CDfSvaH0jlMrQCLcBGAs/s320/VivekVicharAug17_Page_06%2BNew.jpg" width="320" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">स्वामी विवेकानंद यांच्याविषयी लोकमान्य टिळक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, वि. दा. सावरकर, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळकृष्ण गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आदी महापुरुषांनी केलेला उल्लेख पाहता विवेकानंद यांना घनीभूत देशभक्ती म्हणणे सार्थ ठरते. विवेक विचार । आॅगस्ट २०१७ मधून</td></tr>
</tbody></table>
<h2>
<span style="color: blue;"><span style="font-family: arial, sans-serif; font-size: large;">राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते काय म्हणतात पाहा... </span><span style="font-family: arial, sans-serif; font-size: large;"> </span></span></h2>
<b><span style="color: red;">लोकमान्य टिळक </span></b><br />
<span style="color: red;">दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">सुरेंद्रनाथ बॅनर्जी</span></b><br />
<span style="color: blue;">सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">बिपिनचंद्र पाल</span></b><br />
<span style="color: red;">बिपिनचंद्र पाल लिहितात, आपल्या राष्ट्रभक्तीच्या भावनेचे सर्वोच्च पुरस्कर्ते व महापुरुष होण्याचा मान विवेकानंदांचाच आहे. आपल्या देशाबद्दलच्या व संस्कृतीबद्दलच्या ज्वलंत भावनेची तार त्यांनीच प्रथम छेडली.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">गोपाळकृष्ण गोखले</span></b><br />
<span style="color: blue;">गोपाळ कृष्ण गोखलेंच्या धर्मासंबंधी कल्पनांमध्ये विवेकानंदांच्या प्रभावामुळे बदल घडल्याचे दिसून येते. त्यांच्या सामाजिक कल्पना, बहुजन समाजाच्या उद्धारावरील त्यांचा भर याचे स्फूर्तिस्थान </span><span style="color: blue;">विवेकानंद होते हे म्हणणे साधार आहे.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर</span></b><br />
<span style="color: red;">डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भगवान बुद्ध यांच्यानंतर कोणी महापुरुष या भारतवर्षात अवतरीत झाला असेल तर ते स्वामी विवेकानंद होत.</span><br />
<span style="color: #444444;">(संदर्भ : रिमेन्सेस ऑफ नेहरू एज, लेखक : एम. ओ. मथाई)</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">वि. दा. सावरकर</span></b><br />
<span style="color: blue;">क्रांतिकारकांचे मुकुटमणी वि. दा. सावरकर लिहितात, 1898च्या सुमारास उभा हिंदुस्थान विवेकानंदांच्या पुस्तकांनी भारला होता. ती पुस्तके आणि व्याख्याने माझ्या बंधूंनी आणि त्यांच्या नादाने मीही वाचली. राष्ट्रासाठी जीवनाचे बलिदान करण्याची प्रेरणा यातूनच मिळत होती.</span><br />
<br />
<b><span style="color: #660000;">महात्मा गांधी</span></b><br />
<span style="color: #660000;">आपली देशभक्तीची भावना प्रचंडतेने प्रखर होण्याचे कारण सांगताना महात्मा गांधी म्हणतात, मी विवेकानंदांच्या समग्र वाङमयाचे अध्ययन केले आहे. त्याचमुळे माझ्या ठायी असलेले मातृभूमीवरील प्रेमहजारोपटीने वाढले आहे.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">नेताजी सुभाषचंद्र बोस</span></b><br />
<span style="color: blue;">सुभाषचंद्र बोस वारंवार हेच लिहित की, त्यांचे जीवन विवेकानंद यांच्या प्रभावाखाली घडवले गेले; आणि युवकांनीही विवेकानंदांचा आदर्श समोर ठेवावा असाच त्यांचा आग्रह असे. त्यांच्या मते, चारित्र्य निर्माणाचा सर्वोच्च आदर्श देशापुढे जर कुणी ठेवला असेल तर तो विवेकानंदांनी. </span><br />
<br />
<b><span style="color: red;">रवींद्रनाथ टागोर</span></b><br />
<span style="color: red;">रवींद्रनाथ टागोर लिहितात, तुम्हाला भारत जाणून घ्यायचा असेल, तर स्वामी विवेकानंदांचा अभ्यास करा. स्वामी विवेकानंदांनी मानवाच्या संपूर्ण विकासाचा मूलमंत्र दिला व त्यातून देशाच्या उद्धारासाठी अनेक तरुण कार्यप्रवृत्त झाले व अनेकांनी सर्वोच्च त्यागही केला.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">जवाहरलाल नेहरू</span></b><br />
<span style="color: blue;">चिनी आक्रमण होत असताना तरुणांपुढे आदर्श म्हणून ठेवण्यास नेहरुंनी सामर्थ्याची व तेजाची मूर्तिमंत प्रतिमा असलेल्या विवेकानंदांची निवड केली.विवेकानंदांबद्दल ते म्हणतात : ते कोणी राजकारणी नव्हते... आणि तरीही भारतातील राष्ट्रीय आधुनिक चळवळ सुरू करणारे ते एक थोर संस्थापक होते.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">इंदिरा गांधी</span></b><br />
<span style="color: red;">इंदिरा गांधी यांचा स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मठाशी घनिष्ट संबंध होता. भारतीय तरुणांसमोर स्वामी विवेकानंदांचा आदर्श असला पाहिजे, अशी त्यांची भावना होती. १२ जानेवारी हा विवेकानंद जयंतीचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून घोषित करण्याचे त्यांनीच ठरवले. राजीव गांधी यांनी या निर्णयाला मूर्त रूप दिले.</span><br />
<br />
<b><span style="color: blue;">सर्वपल्ली राधाकृष्णन</span></b><br />
<span style="color: blue;">डॉ. राधाकृष्णन म्हणतात, मातृभूमीच्या चैतन्याची विवेकानंद प्रत्यक्षमूर्ती होते. तिच्या आध्यात्मिक आशा आकांक्षा व त्यांची परिपूर्ती याचे ते प्रतीक होते. आणि हेच ते चैतन्य की जे आमच्या भक्तजनांच्या काव्यातून, द्रष्ट्यांंच्या तत्त्वज्ञानातून, पूजा प्रार्थनांतून व्यक्त झाले.</span><br />
<br />
<b><span style="color: red;">डॉ. एपीजे कलाम</span></b><br />
<span style="color: red;">डॉ. एपीजे कलाम म्हणतात, लोकांमध्ये विवेकानंदांच्या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे खूप महत्त्वाचे आहे. मानव सेवा आणि मनुष्य निर्माण या संबंधात स्वामीजींची किमान १० बोधवाक्ये आधुनिक इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि चमकणार्या बोर्डाद्वारे जागोजागी प्रचारित केली पाहिजेत. आणि लोकांना आवाहन केले पाहिजे की त्यांनी यातील किमान एका संदेशाचे जीवनभर पालन करावे.</span><br />
<br />
<b><span style="background-color: white; color: blue;">नरेंद्र मोदी</span></b><br />
<span style="background-color: white; color: blue;">पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. श्री. मोदी हे १७ वर्षांचे असताना स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांमुळे अतिशय प्रभावित होऊन सत्याच्या शोधासाठी घराबाहेर पडले होते. संन्याशी बनण्यासाठी राजकोट येथील रामकृष्ण मठात गेले होते. त्यांच्यावरील विवेकानंदांच्या प्रभावामुळेच द गार्डियनने आपल्या संपादकीयात लिहिले, १६ मे २०१४ पर्यंत भारतात ब्रिटिशांचेच राज्य होते आणि नरेंद्र मोदी यांच्या निवडीमुळे भारत खर्या अर्थाने स्वतंत्र झाला.</span><br />
<br />
-------<br />
<br />
स्वामी विवेकानंदांनी आधुनिक काळामध्ये जगद्गुरू भारताची संकल्पना मांडली. समर्थ भारताशिवाय जगद्गुरू भारत ही संकल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही, याची जाण स्वामीजींना होती.<br />
<br />
स्वामी विवेकानंदांनी स्वातंत्र्य आंदोलनाला गती दिली, इतकेच नाही तर पुढील काळात भारत कधीच परतंत्र बनणार नाही यासाठीची पायाभरणीही केली. जे कार्य त्यांच्या पश्चातही हजारो वर्षे चालू राहणार आहे. आणि वृद्धिंगत होत राहणार आहे.<br />
<br />
स्वामी विवेकानंद म्हणतात,<br />
मी भविष्यकाळात डोकावून पाहात नाही. तसे करण्याची मला आवश्यकता वाटत नाही. पण एक चित्र माझ्या दृष्टीपुढे साक्षात् उभे राहते : ही प्राचीन माता पुन्हा एकदा जागी झाली आहे. सर्व वैभवांसह पुनश्च आपल्या सिंहासनावर आरूढ झाली आहे. शांतिमंत्रांनी आणि आशीर्वचनांनी तिचे आगमन जगापुढे प्रकट करू या !<br />
<br />
<b><span style="color: #444444;"><i>विवेकानंद केंद्राचे मासिक - विवेक विचार । ऑगस्ट २०१७ मधून साभार </i></span></b><br />
<b><span style="color: #444444;"><i><a href="http://vivekvichar.vkendra.org/" target="_blank">vivekvichar.vkendra.org</a></i></span></b>psiddharam.blogspot.comhttp://www.blogger.com/profile/18184899212716592024noreply@blogger.com0