Friday, November 28, 2008

मुंबई अटैक...


आज एकदा पुन्हा

सिंहनाद होऊ दे ऽऽऽ


मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला।

त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा लेख...

धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या मर्यादा नष्ट होत असता- हे भजन, पूजन, ध्यान आदी काय कामाचे ?
-गुरु गोविंदसिंह


गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू जनजागृती समितीतर्फे सोलापुरात हिंदू धर्मजागृती सभेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री इस्लामी अतिरेक्यांनी मुंबईवर अतिशय क्रूर हल्ला चढवला. 80 हून अधिक निष्पाप लोक ठार झाले. शेकडो जखमी. सोलापुरात पोलीस आयुक्त राहिलेले अशोक कामटे, विख्यात पोलीस अधिकारी विजय साळसकर, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, शशांक शिंदे यांच्यासह 14 पोलिसांनी अतिरेक्यांशी लढताना आपले प्राण गमावले. राज्यातील सव्वा लाख पोलिसांवर कोसळलेली ही भीषण आपत्ती होती.
सारा देश हळहळला. सारी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांचे तरुण पत्रकार जीव तोडून रिपोर्टिंग करीत राहिले. बुधवार आणि गुरुवारच्या रात्री मुंबईतील थराराच्या बातम्या पाहत कित्येकांनी जागून काढल्या. पोलिसांच्या बाजूने जनमानस उभा राहिला. सोलापुरातील चौकाचौकातून फलकांवर अशोक कामटे आणि अन्य वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोट्यवधी लोकांनी एसएमएस आणि ई-मेल्सच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावनांचे आदान-प्रदान केले. श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या. काही भावनाशील लोकांनी हौतात्म्य पत्करलेल्यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली.
हे सारे स्वाभाविक असले तरी जी गोष्ट केली पाहिजे तीच गोष्ट आम्ही सारे विसरून गेलो. नेहमी नेहमी आपण हीच गोष्ट विसरत आलो आहोत. अतिरेक्यांच्या विरोधात, देशद्रोह्यांच्या विरोधात मानसिकता तर आहे. अन्यायाविरुद्ध, देशद्रोह्यांविरुद्ध युद्ध करून विजय मिळविण्याची इच्छाही सर्व देशवासीयांमध्ये आहे. साऱ्या पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तर ही भावना ओतप्रोत आहे. दुष्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी रणांगणावर उभा असलेल्या अर्जुनामध्येही अशीच भावना होती, परंतु अर्जुन संभ्रमित झाला होता.
आज आमच्या देशातील बहुतांश लोकांची, तरुणांची, तरुण पत्रकारांची अवस्था अर्जुनासारखीच झाली आहे. युद्ध कोणाविरुद्ध करायचे आहे, याबाबतच त्यांच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम जोवर दूर होणार नाही तोवर युद्ध लढताच येणार नाही. शत्रू ओळखता नाही आला, तर विजय कदापि शक्य नाही. हौतात्म्य पत्कराणाऱ्या वीर जवानांची मालिका मात्र लांबत जाईल.
भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व. स्वामी विवेकानंद म्हणतात, "हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे'.
परंतु आज या देशातील बहुतांश लोक हिंदुत्वावरूनच संभ्रमित आहेत. हिंदुत्व म्हणजे संकुचित काही असेल असे जाणीवपूर्वक ठसविले गेले आहेे. जात आहे. हिंदुत्व म्हणजे लाजीरवाणे, किळसवाणे अशी भावना तयार करण्याचाही सातत्याने प्रयत्न होतो आहे, परंतु सत्य स्थिती वेगळीच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे अभ्यासांती म्हटले आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हेही एक कटू सत्य आहे.
तसे पाहिले तर इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांचा उदय होण्यापूर्वी म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी येथील जीवनपद्धतीला सनातन धर्म म्हणून संबोधले जायचे. आपापल्या आवडी निवडीनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य या देशात होते, परंतु इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांनी आमचाच धर्म खरा आहे. सारे जग हे ख्रिस्ताला मानणारे किंवा अल्लाला मानणारे असले पाहिजे, असा विचार घेऊन थैमान घालू लागले. ऑस्ट्रेलिया, ऑफ्रिका, अमेरिका येथील कोट्यवधी मूळनिवासी लोकांच्या कत्तली ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी घडवून आणल्या. याला इतिहास साक्षी आहे. मुस्लिमांच्या रानटी टोळ्यांनीही हेच केले. हिंदू धर्म हा या एकांतिक पंथांपेक्षा भिन्न आणि सर्वसमावेशक आहे, हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.
एक उदाहरण पाहा. एक तुपाचे दुकान चालविणारा मनुष्य "महालक्ष्मी तुपाचे दुकान' हे नाव बदलून "महालक्ष्मी शुद्ध तुपाचे दुकान' असे नामकरण करतो. त्याला अनेकजण विचारू लागतात, तुम्ही नाव का बदलले ? दुकानदार सांगतो की बाजारात वनस्पती तुपाचे आगमान झाल्यामुळे असे करावे लागले. वनस्पती तुपाहून आमचे तूप वेगळे आणि शुद्ध आहे, ही गोष्ट सांगण्याची गरज उत्पन्न झाली म्हणून हा बदल केला. अगदी असाच प्रकार या देशातील जीवनपद्धतीबद्दल आहे.
इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांपेक्षा सनातन धर्म वेगळा आहे, हे सांगण्यासाठी हिंदू धर्म हे सर्वमान्य नाव योग्यच आहे. आम्ही भारतीय स्वत:ला काहीही म्हणवून घेतले तरी सारे जग आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखते, हे ध्यानात घेणे पहिली गरज आहे.
विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, ""जीवनात आव्हानांचे भारी महत्त्व असते. जीवनात आव्हाने नसतील, तर मनुष्य निष्क्रिय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परंतु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील, तर पुढील दोनपैकी एक गोष्ट होऊ शकते...
1) आव्हाने समजून घेतली नाही, तर त्या आव्हानांना बळी पडून नष्ट व्हावे लागते.
किंवा
2) आव्हाने समजून घेऊन त्यांना प्रतिसाद दिला, तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''
जी गोष्ट मनुष्याला लागू पडते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागू पड़ते. त्यामुळे राष्ट्रासमोरील आव्हाने समजून घेणे आवश्यक आहे.
ही आव्हाने समजून घेणार नसू तर...

आपल्याला मेधा पाटकर, अरुंधती रॉयसारखी मंडळी अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांना फाशी देण्यात येऊ नये यासाठी का धडपडतात हे कळू शकणार नाही ?

हेमंत करकरे यांच्यासारख्या बहादूर आणि धाडसी पोलीस अधिकाऱ्यांसही "काल्पनिक हिंदू दहशतवादाच्या भ्रमात' कसे अडकविले जाते हेही आपल्याला समजणार नाही।

आसाममध्ये दीड महिन्यापूर्वी 90 गावांवर बांगलादेशी घुसखोरांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन हल्ला केला. ही गावं जाळून टाकण्यात आली. तेथील पोलीस अधीक्षक (जो मुस्लिम समाजाचा होता) काहीही कारवाई केली नाही म्हणून त्याला निलंबित केले गेले आहे. आज त्या 90 गावांतील 80 हजारांहून अधिक हिंदू (बोडो) आसामध्ये आपल्याच देशात निर्वासित बनून छावण्यांमध्ये दुर्दैवी जीवन जगत आहेत, आजही ही स्थिती आहे. तेथील ख्रिस्ती जिल्हाधिकाऱ्याची बढती देऊन बदली करण्यात आली. या हल्ल्याचा कट आसामातील महसूलमंत्र्याने (जो बांगलादेशी घुसखोर मुसलमान आहे) रचला होता, परंतु इतके सारे होऊनही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मानवाधिकारवाले याविरुद्ध काहीही आवाज उठवत का नाहीत हेही आपल्याला समजणार नाही।

गेल्या महिन्यात सोलापुरातील ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये आमदाराच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. हे कसे काय हेही आपल्याला समजणार नाही।

तिरुपती देवस्थानमच्या पैशाने हिंदूंनाच ख्रिस्ती बनविण्याचा उद्योग मध्यंतरी कसा काय चालला होता, हेही आपल्याला कळणार नाही.
अशी शेकडो उदाहरणे आहेत. पण मूळ मुद्दा असा की, असे प्रश्न आपल्याला जोवर पडत नाहीत तोवर आपण चुकीच्या राजकीय पक्षांना मतदान करीत राहू. म्हणजेच आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारीत राहू.
या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरू आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे.
या साऱ्या आव्हानांना लोकशाही मार्गाने तोंड देण्यासाठीच देशामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहेत. या सभांना समाजातील सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे, हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल.
या धर्मसभांच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटित शक्तीचे दर्शन होणार आहे. संघटित शक्तीचे रूप पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला एकत्रित यावे लागेल. भारतासमोरील सर्व आव्हानांना एकच उत्तर आहे... "संघटित हिंदू-समर्थ भारत।'

................................

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापुरात
रविवार, दि। 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा।
नॉर्थकोट मैदान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे
आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...
-सिद्धाराम भै. पाटील
३० नवम्बर, २००८ , दै। तरुण भारत, आसमंत पान 1

Friday, November 21, 2008

शिवधर्म समजून घेऊ या...


""जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंदकाय आहे शिवधर्म ?
खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील शंभर टक्के लोकांना शिवधर्म काय आहे हे माहीत नाही; शिवधर्म चळवळीतील काही शे लोकांना शिवधर्म चळवळ माहीत आहे (शिवधर्माची विचारधारा या अर्थाने).
पुण्यातील भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा मात्र महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावे एक संघटना आहे याची बऱ्याच जणांना माहीती झाली. अलीकडच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल ऐकायला, वाचायला मिळू लागले आहे. तरीही केवळ मराठा समाजालाच नव्हे तर या चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांनाही शिवधर्म चळवळीची खरी ओळख नाही, हे एक कटुसत्य आहे आणि शिवधर्माचे बलस्थानही.
मराठा समाजाचे हित पाहणारी ही संघटना असावी, असे वाटून मराठा समाजातील काही तरुण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांकडे वळतात, ही खरी गोष्ट आहे. शिवधर्म, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची मातृसंघटना आहे मराठा सेवा संघ. श्री पुरुषोत्तम खेडेकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक समजले जातात. ( आता मराठा सेवा संघ विद्‌वेषमूलक भूमिका घेत आहे असे वाटल्याने डॉ. आ. ह. साळूंखे हे चळवळीपासून दूर झाले आहेत, अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहीती आहे.)
शिवधर्म म्हणजे ब्राह्मणद्‌वेष असे समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. शिवधर्मवाल्या मंडळींकडून प्रकाशित होणारी नियतकालिके आणि पुस्तके यांत किमान 80 टक्के भाग ब्राह्मणद्‌वेषासाठी खर्च केलेली असतात. (ब्राह्मणद्‌वेष का, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शिवधर्म समजून घेताना शिवधर्माची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना शिवधर्माने देवतास्थानी मानले आहे. छत्रपती शिवरायांना देवतास्थानी मानले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा विरोध शिवधर्माने आपल्या कृतीतून चालविला आहे.
हिंदू मनातील तळपत राहणारे महाप्रखर तेजस्वी सूर्य अर्थात शिवप्रभू. त्यांचा तेजस्वी प्रकाश आणि प्रताप महाराष्ट्राच्या डोंगर-दऱ्यातून वाट काढीत अखिल भारताला प्रभावित करीत आला आहे. एका महान आदर्शाच्या रूपात ते यापुढेही अखिल भारतवर्षाला प्रभावित करीत राहतील.
"भारताला छत्रपती शिवरायांच्या मार्गानेच वाटचाल करावी लागेल. आपल्या मुखात एकच घोषणा असू द्या- शिवाजी, शिवाजी आणि थोर शिवाजी', असे उद्‌गार नेताजी सुभाषचंद्रांनी काढले होते.स्वामी विवेकानंद म्हणतात, "छत्रपती शिवराय म्हणजे वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात वर्णन केलेल्या उच्च आदर्शांचे मूर्तीमंत उदाहरण होत. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होतेे.'शिवरायांची हिंदुत्व रक्षणाची कमालीची तळमळ पाहून उत्तर हिंदुस्थानातील कवी भूषण इतका भारावला की, त्याने तो शिवप्रताप आपल्या काव्यात बद्ध करून हिंदुस्थानभर ऐकविला आणि हिंदूंमधली स्फूर्ती जागवली. किती ओजस्वी काव्यपंक्ती आहेत त्या...
""जैसे अरण्यास दावानल
हरीण कळपास चित्ता
भव्य गजास वनराज
घोर तमास सूर्य अन्‌
कंसास श्रीकृष्ण असे
तैसे म्लेंच्छांच्या रानटी
टोळ्यांस राजा शिवछत्रपती !''
याच हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवरायांनी स्वत:च आपल्याकडे कमीपणा घेऊन, दिल्लीश्वराच्या इंगिताप्रमाणे चालून आलेल्या मिर्झाराजा जयसिंहाचे हिंदुत्व व हिंदूपणा जागृत करून, ते कायम राखण्यासाठी त्याच्याशी बोलून गेले की, ""तुम्ही या, मी निर्माण करीत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे अधिपती व्हा नि या औरंगजेबी शासनाला नष्ट करून, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू साम्राज्याची ध्वजा उभारा. मी तुमच्या मदतीला आहेच - तुमच्या अश्वाची लगाम सावरण्याकरिता नि सांभाळण्याकरिता!'' महाराजांच्या मनाचा हा मोठेपणा होता. शिवरायांचा हा धर्माभिमान शिवधर्मवाल्यांनी त्यांचेच नाव घेऊन पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवरायांच्याच नाव घेत हिंदुत्वाला नष्ट करण्याच्या इराद्याने शिवधर्माची स्थापना करण्यात आली आहे. ही मंडळी स्वत:ला हिंदूधर्माचे मानत नाहीत. इतकेच नव्हे तर हिंदू देवदेवतांची ओंगळवाण्या शब्दांत निंदानालस्ती आणि अवमान करण्यात या मंडळींचे आयुष्य चालले आहे. माता तुळजाभवानीचा अवमान करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचे थडगे शिवरायांनी उभारले, परंतु आज शिवधर्मवाले माता जिजाऊ आणि शिवरायांच्या नावाचा जयजयकार करीत सरस्वतीची, गणपतीची अवमानना करीत आहे.
सरस्वतीची मूर्ती फोडण्याचे धाडस आता अन्यधर्मीय करू शकत नाहीत, हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत गलिच्छ शब्दांत लिहिण्याचे धाडसही करू शकत नाहीत. हे काम आता शिवधर्माच्या माध्यमातून हिंदूनांच हिंदूविरुद्ध उभे करून केेले जात आहे. हिंदूंच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करा, धर्मश्रद्धा नष्ट झालेला हिंदू कणाहीन, तेजहीन आणि भ्याड बनेल. त्याला यथावकाश आकाशाच्या बापाच्या कळपात किंवा अल्लाच्या दरबारात घेऊन जाणे सोपे राहील, असे यामागे षड्‌यंत्र तर नसेल ना अशी शंका अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.शिवरायांनी "हर हर महादेव'ची ललकारी देतच मावळ्यांना संघटित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते, हे शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाही. (शिवराय हे तुळजाभवानीचे भक्त होते याला पुरावा काय, असे त्यांचे विचारणे असते. त्या काळात तुळजाभवानीची पूजा करताना शिवरायांनी फोटो काढून जपून ठेवायला हवा होता की काय?)हिंदुस्थानात मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी येथील पंथांचे लोक दुसऱ्या पंथाचा आदर करीत. दुसऱ्याची श्रद्धा, विचार यांचा आदर करणे हे हिंदुधर्मीयांचे वैशिष्ठ्ये आहेत. आमच्या दृष्टीने जन्मलेला प्रत्येकजण हा हिंदू असतो, त्यामुळे कोणाचे धर्मांतर करणे किंवा फेरधर्मांतर हे प्रश्र्नच कधी उद्‌भवले नाहीत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर करीत होता. मुस्लिम आक्रमकांनी येथे आल्यावर तलवारीच्या धाकाने असंख्य हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. अशारीतीने मुस्लिम झालेल्यास पुन्हा हिंदू करून घेण्याची कोणतीच सोय हिंदू धर्मात नव्हती. जबरदस्तीने मुसलमान झालेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती, परंतु परतीचा मार्ग उपलब्ध नव्हता. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या ही त्रुटी लक्षात आली. मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेण्याची विनंती महाराजांनी धर्ममार्तंडांना केली, तेव्हा एखाद्याला हिंदू करून घेण्याचा कोणताच विधी नाही असे उत्तर महाराजांना मिळाले. त्यांनी लगेच धर्ममार्तंडांना सांगितले की विधी नसेल तर तुम्ही तयार करा. अशारीतीने मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. बजाजी पुन्हा हिंदू झाला तरी त्याच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी महाराजांनी आपली मुलगी बजाजीच्या मुलास देऊन त्याला व्याही करून घेतले आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजाची गरज असेल अशावेळी समाजाला पचेल, रुचेल अशा नवीन प्रथा सुरू करायच्या असतात. परधर्मी झालेल्यांना पुन्हा हिंदु करून घेऊन शिवाजी महाराजांनी हे केले.आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद आदी संघटना हिंदू धर्मातून ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात आणण्याचे काम करीत आहेत. शिवरायांनी घालून दिलेल्या संकेतानुसार हे कार्य आहे, परंतु शिवधर्मवाली मंडळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात काम करण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. आज पूर्वांचल भारतातील नागालॅंडसारख्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 70 टक्केहून अधिक वनवासी हिंदूंना ख्रिस्ती केले आहे. ओरिसासारख्या राज्यात ख्रिस्ती मिशनऱ्या जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील वनवासी भागच नाही तर पुणे, सोलापूरसारख्या शहरी भागातही ख्रिस्ती मिशनऱ्या फसवून धर्मांतरे करीत आहेत. याविरोधात आंदोलन चालवणे तर दूरच राहिले. याउलट समाजात हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम शिवधर्मवाली मंडळी करीत आहेत.
शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले, जिजामातेने शिवरायांना बालपणी रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार केले या गोष्टी शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाहीत. त्यांच्या मते शिवराय आणि जिजाऊ हे आस्तिक नव्हते. शिवधर्मवाल्या मंडळींच्या मते हिंदू देवदेवतांची पूजा करणे सोडून दिले पाहिजे.
मातेची जो थाने फाडी। तया जोडी कोण ते ।।1।।
वेदां निंदी चांडाळ। भ्रष्ट सुतकीया खळ ।।2।।
वेद श्रृति ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचे वचन न मानी तो ।3।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवा नये ।।4।।
हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ- वेदांसंबंधी संत तुकारामांचे हे विचार आहेत. तरीही त्यांना विद्रोही म्हणून प्रस्तूत करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवधर्मवाले करीत असतात.
"बोलिली लेकुरे। वेडी वाकुडी उत्तरे।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाही विचारिला। अधिकार म्या आपुला।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपे किंकरा।।'
ज्ञानेश्वरांकडे मागणे मागणाऱ्या संत तुकोबारायांना जातीच्या बंधनात अडकावून ज्ञानेश्वर विरुद्ध तुकाराम असे चित्र उभे करण्याचा उपद्‌व्यापही शिवधर्मवाले करीत असतात.
एकूणच काय तर शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा जयजयकार एका तोंडाने करायचे आणि हिंदू धर्माला खिळखिळे करायचे अशी कार्यपद्धती शिवधर्मवाल्या मंडळींची आहे. शिवधर्मवाल्या मंडळींच्या आचार आणि विचारांतही प्रचंड तफावत आहे, यामुळेच त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसावे असे वाटते. उदाहरणादाखल म्हणून काही मुद्दे पाहा...
1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.)
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''


-सिद्धाराम भै. पाटील

Tuesday, November 11, 2008

शैव धर्म ?

भैय्या :काय पाटिल साहेब तुम्हाच्या जातीचे लोक् आता आम्हाला हिन्दू म्हनू नका आम्ही शैव आहोत आणि हिन्दू आम्हाचे शत्रु आहेत असे म्हणत आहेत आणि डॉ शिवानद स्वामी हे कट्टर हिन्दू विरोधक आहेत त्यांचे करोडो समर्थक आहेत तुम्ही शैव समाज च्या विरुध्द आहत का ?आणि शैव लोक् स्वत त्यांचा शैव धर्म मानतात आता ते या पुढे शैव म्हणुन ओलाखाले जाणार आहेत हिन्दू म्हनने त्याना आवडत नाही मग तुम्ही त्या शैव लोकाना विरोध कराल का?
siddharam patil: भैय्या हि खुप जुनी गोष्ट आहे। स्वताला हिन्दू न म्हनवुन घेणारे मराठा समाजात काही लोक आहेत तसे ते लिंगायत आणि अन्य समाजात सुद्धा आहेत। या लोकांची इतकी कालजी करण्याची आवश्यकता नाही। परक्या विचारांच्या उष्ट्यावर पोसलेल्या लोकांकडून दूसरी काय अपेक्षा करणार ?हिन्दू समाजातील विविध जाती स्वताच्या जातीला धर्म मानू लागतील तेंव्हा हिन्दुत्वच अधिक बलकट होणार आहे।
siddharam patil:
हिन्दू समाजातील विविध जाती स्वताच्या जातीला धर्म मानू लागतील तेंव्हा हिन्दुत्वच अधिक बलकट होणार आहे. हे कसे काय ...उदाहरनार्थ समजा शैव जातीचे / समाजाचे

लोक स्वताला शैव धर्माचे समजू लागले. तर ते त्यांच्या कथित शैव धर्मावर अधिक श्रद्धा ठेवू लागतील. शैव तत्वद्न्यान समजून घेण्याचा, अभ्यासन्याचा अधिक प्रयत्न करतील (आजच्या पेक्शा अधिक प्रमाणात.). म्हणजेच ते भगवान शिवाप्रती अधिक जोडले जातील. बारा ज्योतिर्लिंग_ वाराणसी, श्रीशैल, रामेश्वरम, केदारनाथ, सोमनाथ, उज्जैन, आदि स्थान त्यांच्यासाठी श्रद्धास्थाने असतील. आपल्या समाजाच्या उन्नतीचा ते अधिक प्रयत्न करतील. आपल्या समाजातील लोक धर्मांतर करू नयेत यासाठी ते प्रयत्न करतील. भैय्या, तुम्ही मला सांगा हिंदुत्वा म्हणजे याहून वेगले काय आहे ? हाँ, शिवधर्मवाले करतात तसे अन्य जातींचा द्वेष करण्याला मात्र आमचा विरोध आहे. पहा हे विचार तुम्हाला पटले पाहिजेच हा माझा दुराग्रह नाही... मात्र तुम्ही विचार करू शकता. तुम्ही शिव धर्मवाले तुमच्या धर्माचा प्रसार करा, अभिमान बालगा , पण हिन्दू धर्माला शिव्या घालू नका. हिन्दू धर्माला शिव्या घालने म्हणजे स्वताला शिव्या घलान्यसराखे आहे।

ॐ Vijaykumar ۞☺♪:
भाषा, प्रान्त, जाती, देश विषयक अभिमान सर्व समाजा असला पाहिजे आणि तो राहतो,हे प्रत्येक समाज बांधवांचे कर्त्तव्य आणि अधिकार आहे, पण इथे परस्पर संबंधांची जाणीवआणि आदर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आम्हास काही संबोधित करून घेवू पण पूर्णजग आम्हास हिन्दू म्हनुनच संबोधित करणार.

शिव धर्म आणि धर्मांतर.

हुतात्मा स्वामी laxmananand यांची ख्रिस्ती mishanaryanni हत्या केली। त्यानानंतर मी आसमंत पुरवनित एक लेख लिहिला ।
http://psiddharam.blogspot.com/2008/08/blog-post_28.html
तो भैय्या पाटिल कड़े पाठविला । त्यानंतर झालेली ही चर्चा...

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
जय जिजाऊ आता स्वत रस्त्या वर उतरणार की आम्हाच्या बहुजन लोका ना सागुन दगा सुरु करायला लावणार


सिद्धराम: भैया स्वताला बहुजन म्हनवुन घेण्यात तुम्हाला खुप आनंद वाटतो, ही चांगली गोष्ट आहे. तुमचे पूर्व गृह की जे यथार्थ नाहीत ते दूर ठेवा. वस्तुस्थिति समजुन घ्या.
siddharam patil:
तुम्हाला मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांबद्दल pulakaa आहे, ही चांगली गोष्ट आहे। पण ती एकतर्फी नको. तुमचे विचार माननारे नाहीत त्याना तुम्ही बहुजनान्पसून दूर लोट न्याचा प्रयत्न करू नका.देशाची falani विसरु नका. घंटाकर्ण होऊ नका. भेटत राहू.

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
जय जिजाऊ आम्हाला ब्राम्हण ख्रिस्ती आणि मुस्लिम लोका बद्दल पुलका नाही आहे ब्राम्हण हे दगा पेतवनारे आणि घरी बसून मज्जा बगनारे आहेत ते स्वत कधी लढत नाहीत फ़क्त सर्व सामान्य लोका ना भडकावा न्य चे काम करायचे V नतर मिल्नारा मलीदा खायचा बाबरी माजिद च्या येळी एक तरी ब्राम्हण मेला होता का?बिचारे गोर गरीब मेले त्यात ८४ हजार लोक मेले होते मात्र नतर मलीदा ब्राम्हण च खातात
siddharam patil:
मी ब्रह्मण नाही. त्यांच्या किंवा अन्य जातीच्या लाकंच्या चूका गौराविन्याचे कारण नाही. पण धर्मांतर होत असता त्याकडे दुर्लक्ष करने आणि येनकेन प्रकार ब्रह्मानना झोदपने शहन्पनाचे नाही.
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
ब्राम्हण RSS ने महाराष्ट्र मध्ये नागालैंड आणि म्जोरम तसेच इतर राज्य मधील मूल ना आणून येथे त्यांच्या जीवन चा तमाशा करत आहेत त्याना शिक्षन न देता त्याना वाईट गोष्टी कड़े वलवले जाते त्याना शिकू देत त्याना तुम्ही बरबाद करत असतल तर त्यानी या धर्मं मध्ये कशाला रहावे त्याना कुणी मुलभुत सोयी व योग्य शिक्षन देत असतील आणि गुलाम मन्हुन न जगाता स्वतंत्र जगाता आले तर वाईट काय आहे आणि ते बल जबरी थोडेच करत आहेत
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
महाराष्ट्र मध्ये आदिवासी लोका नि ख्रिस्ती धर्म स्वकराला आज त्यांची प्रगति जाली आहे कारन हिन्दू म्हणुन जागत असताना त्या जाती वर ब्राम्हण लोका नि भरपूर बदन घातली होती आज कुणी ही कोणताही धर्म स्वीकारू शकतो कुणी बलजबरी करू शकत नाही आम्ही आता शिवधर्म स्वीकारला आहे
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
तुम्ही कर्नाटक आणि अधर प्रदेश मधील वातावरण शी परिचित आहत आज तिकडे ब्राम्हण विरोधी चलवल किती मजबूत आहे हेही तुम्हाला माहित असेल त्यानी तर ३० वर्षा पूर्वी ब्राम्हण ना हाकलून लावले होते आज ते प्रगत आहेत कारन त्या राज्य मध्ये ब्राम्हण लोका ना हाकलले आहे तुम्ही लिगायत आहत तुम्हाच्या जाती मधील लोक ब्राम्हण जाती ला मानत नाहीत आम्हाच्या कड़े बरेच लिगायत आहेत

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
माजे एक च मत आहे गोर गरीब लोका ना त्यांच्या जीवन मधून उठाऊ नका तुम्ही स्वत काय bangadi करायच्या आहेत त्या करा फ़क्त बहुजन समाज त्या पासून दूर राहिला पाहिजे

siddharam patil:
भैय्या तुम्हाला संघ आणि ब्रह्मण द्वेशाची जबरदस्त कवील झाली आहे। rss च्या एक छदामहि काम तुमच्या संघटनेने केलेले नाही. काही बरळत सुटता, हे ठीक नाही. संघ नागालैंड आणि मिझोरम मधे काय काम करते ते तुम्हाला कालने शाक्य नाही. माझ्या परिचायाची या राज्यातील १५ हुन अधिक तरुण आहेत. rss बद्दल गैरसमज पसराविने हा तुमचा धंदा झाला आहे.
siddharam patil:
khristi dharm swikaralyane pragati hote ha tumacha bhram ahe। tase asate tar dalit khrishtian jamaat udayala aali asati ka? aarakshanachi bhik tyani magitali nasati.
siddharam patil:
तसे तर प्रत्येक जातित दोष आहेत। एवढेच काय तुमच्या शिव धर्मं वाल्यांचे ढीगभर ढोंग मी तुम्हाला दाखवू शकतो. पण तो माझा धंदा नाही. तुमची इच्छा असेल तर मात्र माझा नाइलाज आहे. केवल जातीचा विचार तुम्ही करता असे दिसते. हे बरोबर नाही. प्रत्येक जातित दोष आणि चांगल्या गोष्टी आहेत.
siddharam patil:
ब्रह्मनांची खुपच धास्ती तुम्ही घेतली आहे। खरे तर अशी धास्ती घेण्याचे कारण नाही. तुम्ही शिव्प्रेमी आहात. हिंदुत्वाबद्दल प्रेम बालगा. ब्रह्मनांची भीती मनातून काढून टाका.

siddharam patil:
भैय्या, तुम्ही आणि तुमची संघटना कधीही बंगलादेशी घुसखोर आनी इस्लामी अतिरेकी यांच्याबद्दल बोलत नाही। कधी अफाजखानाच्या कबरिबद्दल बोलत नाही. केवल ब्रह्मानना शिव्या दिल्याने काय साध्य होणार आहे? कोणतेही विधायक चलवल दीर्घकाल चालवायचे तर द्वेशाचा आधार उपयोगाचे नाही हे ध्यानी घ्या.

siddharam patil:
गोर गरिबांना स्वताच्या पायावर उभे करण्याचे काम संघ परिवार करते, जीवनातून uthavinyache नाही। भानगडी करण्याची rss ची रीत नाही.बरे झाले तुम्ही शिवारांच्या काली नह्वातात. नाही तर मावल्यान्ना सैन्यात घेऊ नाका असा सुर तुम्ही आवलायाला कमी केला नसता. देश धर्म संकटात असताना त्याचा प्रतिकार करने हां धर्म आहे, हीच प्रेरणा आम्ही शिवारयान्पसुं घेतली आहे.

पंढरीच्या लोका,:
tya bhaiyaala sanga.........ki 84000 lok॥ kadhi mele..de purave mhanav.. 84000 ha nanin shodh ahe shakti kapoor shobtoy.. bhaiya..
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
ही चर्चा सप्टेम्बर च्या पहिल्या आथावाद्यत झाली आहे।

Monday, November 10, 2008

शिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा

शिवधर्म समजून घेऊ या...


""जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंदकाय आहे शिवधर्म ?
खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील शंभर टक्के लोकांना शिवधर्म काय आहे हे माहीत नाही; शिवधर्म चळवळीतील काही शे लोकांना शिवधर्म चळवळ माहीत आहे (शिवधर्माची विचारधारा या अर्थाने).
पुण्यातील भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा मात्र महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावे एक संघटना आहे याची बऱ्याच जणांना माहीती झाली. अलीकडच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल ऐकायला, वाचायला मिळू लागले आहे. तरीही केवळ मराठा समाजालाच नव्हे तर या चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांनाही शिवधर्म चळवळीची खरी ओळख नाही, हे एक कटुसत्य आहे आणि शिवधर्माचे बलस्थानही.
मराठा समाजाचे हित पाहणारी ही संघटना असावी, असे वाटून मराठा समाजातील काही तरुण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांकडे वळतात, ही खरी गोष्ट आहे. शिवधर्म, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची मातृसंघटना आहे मराठा सेवा संघ. श्री पुरुषोत्तम खेडेकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक समजले जातात. ( आता मराठा सेवा संघ विद्‌वेषमूलक भूमिका घेत आहे असे वाटल्याने डॉ. आ. ह. साळूंखे हे चळवळीपासून दूर झाले आहेत, अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहीती आहे.)
शिवधर्म म्हणजे ब्राह्मणद्‌वेष असे समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. शिवधर्मवाल्या मंडळींकडून प्रकाशित होणारी नियतकालिके आणि पुस्तके यांत किमान 80 टक्के भाग ब्राह्मणद्‌वेषासाठी खर्च केलेली असतात. (ब्राह्मणद्‌वेष का, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शिवधर्म समजून घेताना शिवधर्माची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना शिवधर्माने देवतास्थानी मानले आहे. छत्रपती शिवरायांना देवतास्थानी मानले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा विरोध शिवधर्माने आपल्या कृतीतून चालविला आहे.
हिंदू मनातील तळपत राहणारे महाप्रखर तेजस्वी सूर्य अर्थात शिवप्रभू. त्यांचा तेजस्वी प्रकाश आणि प्रताप महाराष्ट्राच्या डोंगर-दऱ्यातून वाट काढीत अखिल भारताला प्रभावित करीत आला आहे. एका महान आदर्शाच्या रूपात ते यापुढेही अखिल भारतवर्षाला प्रभावित करीत राहतील.
"भारताला छत्रपती शिवरायांच्या मार्गानेच वाटचाल करावी लागेल. आपल्या मुखात एकच घोषणा असू द्या- शिवाजी, शिवाजी आणि थोर शिवाजी', असे उद्‌गार नेताजी सुभाषचंद्रांनी काढले होते.स्वामी विवेकानंद म्हणतात, "छत्रपती शिवराय म्हणजे वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात वर्णन केलेल्या उच्च आदर्शांचे मूर्तीमंत उदाहरण होत. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होतेे.'शिवरायांची हिंदुत्व रक्षणाची कमालीची तळमळ पाहून उत्तर हिंदुस्थानातील कवी भूषण इतका भारावला की, त्याने तो शिवप्रताप आपल्या काव्यात बद्ध करून हिंदुस्थानभर ऐकविला आणि हिंदूंमधली स्फूर्ती जागवली. किती ओजस्वी काव्यपंक्ती आहेत त्या...
""जैसे अरण्यास दावानल
हरीण कळपास चित्ता
भव्य गजास वनराज
घोर तमास सूर्य अन्‌
कंसास श्रीकृष्ण असे
तैसे म्लेंच्छांच्या रानटी
टोळ्यांस राजा शिवछत्रपती !''
याच हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवरायांनी स्वत:च आपल्याकडे कमीपणा घेऊन, दिल्लीश्वराच्या इंगिताप्रमाणे चालून आलेल्या मिर्झाराजा जयसिंहाचे हिंदुत्व व हिंदूपणा जागृत करून, ते कायम राखण्यासाठी त्याच्याशी बोलून गेले की, ""तुम्ही या, मी निर्माण करीत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे अधिपती व्हा नि या औरंगजेबी शासनाला नष्ट करून, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू साम्राज्याची ध्वजा उभारा. मी तुमच्या मदतीला आहेच - तुमच्या अश्वाची लगाम सावरण्याकरिता नि सांभाळण्याकरिता!'' महाराजांच्या मनाचा हा मोठेपणा होता. शिवरायांचा हा धर्माभिमान शिवधर्मवाल्यांनी त्यांचेच नाव घेऊन पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवरायांच्याच नाव घेत हिंदुत्वाला नष्ट करण्याच्या इराद्याने शिवधर्माची स्थापना करण्यात आली आहे. ही मंडळी स्वत:ला हिंदूधर्माचे मानत नाहीत. इतकेच नव्हे तर हिंदू देवदेवतांची ओंगळवाण्या शब्दांत निंदानालस्ती आणि अवमान करण्यात या मंडळींचे आयुष्य चालले आहे. माता तुळजाभवानीचा अवमान करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचे थडगे शिवरायांनी उभारले, परंतु आज शिवधर्मवाले माता जिजाऊ आणि शिवरायांच्या नावाचा जयजयकार करीत सरस्वतीची, गणपतीची अवमानना करीत आहे.
सरस्वतीची मूर्ती फोडण्याचे धाडस आता अन्यधर्मीय करू शकत नाहीत, हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत गलिच्छ शब्दांत लिहिण्याचे धाडसही करू शकत नाहीत. हे काम आता शिवधर्माच्या माध्यमातून हिंदूनांच हिंदूविरुद्ध उभे करून केेले जात आहे. हिंदूंच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करा, धर्मश्रद्धा नष्ट झालेला हिंदू कणाहीन, तेजहीन आणि भ्याड बनेल. त्याला यथावकाश आकाशाच्या बापाच्या कळपात किंवा अल्लाच्या दरबारात घेऊन जाणे सोपे राहील, असे यामागे षड्‌यंत्र तर नसेल ना अशी शंका अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.शिवरायांनी "हर हर महादेव'ची ललकारी देतच मावळ्यांना संघटित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते, हे शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाही. (शिवराय हे तुळजाभवानीचे भक्त होते याला पुरावा काय, असे त्यांचे विचारणे असते. त्या काळात तुळजाभवानीची पूजा करताना शिवरायांनी फोटो काढून जपून ठेवायला हवा होता की काय?)हिंदुस्थानात मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी येथील पंथांचे लोक दुसऱ्या पंथाचा आदर करीत. दुसऱ्याची श्रद्धा, विचार यांचा आदर करणे हे हिंदुधर्मीयांचे वैशिष्ठ्ये आहेत. आमच्या दृष्टीने जन्मलेला प्रत्येकजण हा हिंदू असतो, त्यामुळे कोणाचे धर्मांतर करणे किंवा फेरधर्मांतर हे प्रश्र्नच कधी उद्‌भवले नाहीत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर करीत होता. मुस्लिम आक्रमकांनी येथे आल्यावर तलवारीच्या धाकाने असंख्य हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. अशारीतीने मुस्लिम झालेल्यास पुन्हा हिंदू करून घेण्याची कोणतीच सोय हिंदू धर्मात नव्हती. जबरदस्तीने मुसलमान झालेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती, परंतु परतीचा मार्ग उपलब्ध नव्हता. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या ही त्रुटी लक्षात आली. मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेण्याची विनंती महाराजांनी धर्ममार्तंडांना केली, तेव्हा एखाद्याला हिंदू करून घेण्याचा कोणताच विधी नाही असे उत्तर महाराजांना मिळाले. त्यांनी लगेच धर्ममार्तंडांना सांगितले की विधी नसेल तर तुम्ही तयार करा. अशारीतीने मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. बजाजी पुन्हा हिंदू झाला तरी त्याच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी महाराजांनी आपली मुलगी बजाजीच्या मुलास देऊन त्याला व्याही करून घेतले आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजाची गरज असेल अशावेळी समाजाला पचेल, रुचेल अशा नवीन प्रथा सुरू करायच्या असतात. परधर्मी झालेल्यांना पुन्हा हिंदु करून घेऊन शिवाजी महाराजांनी हे केले.आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद आदी संघटना हिंदू धर्मातून ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात आणण्याचे काम करीत आहेत. शिवरायांनी घालून दिलेल्या संकेतानुसार हे कार्य आहे, परंतु शिवधर्मवाली मंडळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात काम करण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. आज पूर्वांचल भारतातील नागालॅंडसारख्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 70 टक्केहून अधिक वनवासी हिंदूंना ख्रिस्ती केले आहे. ओरिसासारख्या राज्यात ख्रिस्ती मिशनऱ्या जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील वनवासी भागच नाही तर पुणे, सोलापूरसारख्या शहरी भागातही ख्रिस्ती मिशनऱ्या फसवून धर्मांतरे करीत आहेत. याविरोधात आंदोलन चालवणे तर दूरच राहिले. याउलट समाजात हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम शिवधर्मवाली मंडळी करीत आहेत.
शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले, जिजामातेने शिवरायांना बालपणी रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार केले या गोष्टी शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाहीत. त्यांच्या मते शिवराय आणि जिजाऊ हे आस्तिक नव्हते. शिवधर्मवाल्या मंडळींच्या मते हिंदू देवदेवतांची पूजा करणे सोडून दिले पाहिजे.
मातेची जो थाने फाडी। तया जोडी कोण ते ।।1।।
वेदां निंदी चांडाळ। भ्रष्ट सुतकीया खळ ।।2।।
वेद श्रृति ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचे वचन न मानी तो ।3।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवा नये ।।4।।
हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ- वेदांसंबंधी संत तुकारामांचे हे विचार आहेत. तरीही त्यांना विद्रोही म्हणून प्रस्तूत करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवधर्मवाले करीत असतात.
"बोलिली लेकुरे। वेडी वाकुडी उत्तरे।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाही विचारिला। अधिकार म्या आपुला।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपे किंकरा।।'
ज्ञानेश्वरांकडे मागणे मागणाऱ्या संत तुकोबारायांना जातीच्या बंधनात अडकावून ज्ञानेश्वर विरुद्ध तुकाराम असे चित्र उभे करण्याचा उपद्‌व्यापही शिवधर्मवाले करीत असतात.
एकूणच काय तर शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा जयजयकार एका तोंडाने करायचे आणि हिंदू धर्माला खिळखिळे करायचे अशी कार्यपद्धती शिवधर्मवाल्या मंडळींची आहे. शिवधर्मवाल्या मंडळींच्या आचार आणि विचारांतही प्रचंड तफावत आहे, यामुळेच त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसावे असे वाटते. उदाहरणादाखल म्हणून काही मुद्दे पाहा...
1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.)
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी