Sunday, April 19, 2009

मत कोणाला ?

आपल्या देशात हजारोंनी अशी गावं होती की, ज्या गावांना पक्के (डांबरी) रस्ते नव्हते। पावसाळ्यात या गावांच्या रस्त्यावरून सायकल नेणेही मुश्कील असायचे। आपल्या गावाला डांबरी रस्ता होऊ शकतो, असे स्वप्नातही या ग्रामस्थांना वाटले नसेल, परंतु वाजपेयी सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविली आणि छोटे छोटे खेडे डांबरी रस्त्यांनी जोडले. लाखो गावं जोडली गेली. 50 वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाने जेवढे रस्ते बांधले नाहीत त्याहून अधिक रस्ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ 6 वर्षांत बांधले. चांगले रस्ते असणे ही विकासासाठीची पहिली गरज असते.

दि. 23 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. सोलापुरात याच दिवशी मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जवळ येत आहे तसे प्रचाराचे अनेक पैलू समोर येत आहेत. सोलापूर मतदारसंघात भाजपाचे ऍड. शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात थेट लढत आहे. सदैव सुशीलकुमारांच्या पाठिशी उभा राहिलेला दलित समाज यावेळी भाजपा, बसपा आणि कॉंग्रेस या तीन पक्षांत विभागला गेल्याचे दिसत आहे. कणबससारख्या खेड्यातील बौद्ध वस्त्यांमध्ये भाजपाचे झेंडे डौलाने फडकताना दिसत आहेत. असे पहिल्यांदाच होत आहे. यामुळे गोंधळलेले कॉंग्रेसचे नेते भाजपा जातीयवादी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र खरा जातीयवादी कॉंग्रेसच आहे, असे त्यांना प्रत्युत्तर मिळत आहे. बाबासाहेबांनी कॉंग्रेसला जळते घर म्हटल्याचा दाखला देण्यात येत आहे. बाबासाहेबांना जिवंतपणी यातना देणारा कॉंग्रेस पक्षच होता. बाबासाहेबांच्या हयातीत 15 खासदार निवडून आले होते, परंतु आज रिपब्लिकन पक्षाचा एकच खासदार कॉंग्रेसवाल्यांच्या दयेवर निवडून येतो. कॉंग्रेसमुळेच दलित चळवळीचे वाटोळे झाल्याची भावना प्रबळ होत असल्याचे दिसत आहे.
ग्रामीण भागातून कॉंग्रेसला नेहमी अनुकूलता असते. मात्र यावेळी ग्रामीण भागात शिंदेंविरुद्ध तीव्र असंतोष दिसत आहे. गेल्या 60 वर्षांमध्ये कॉंग्रेसला मते देऊनही गावांना कॉंग्रेसवाले पाणीही देऊ शकले नाहीत, ते काय विकास करणार, असा प्रश्न ग्रामीण भागातून विचारण्यात येत आहे. एका गावात ग्रामस्थांनी ग्रामीण विकास मंत्र्यांची सभा उधळून लावल्याचेही वृत्त प्रसिद्ध झाले आहे. कॉंग्रेसला विकास करायचा होता तर गेल्या 60 वर्षांत का केला नाही? असा रोकडा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
कितीही कॉंग्रेसविरोधी वातावरण असले तरी शेवटच्या दोन रात्रींमध्ये "अर्थ'पूर्ण बैठका आणि संपर्कातून वातावरण बदलून जाईल असे भाकित या क्षेत्रातील जाणकार ठामपणे करीत आहेत. आम्हाला पैसे वाटण्यात आले तर आम्ही प्रसंगी पैसे घेऊ, पण आमच्या मनातील उमेदवारालाच मत देऊ, अशी व्यावहारिक आणि चतुर भूमिका युवक मतदार घेताना दिसत आहे.
गेल्या वर्षभरात सावरकर विचार मंचच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले गेले आहेत. क्रांतिसूर्य सावरकर, सावरकर जयंतीचा भव्य कार्यक्रम आदींतून शेकडो तरुण हिंदुत्वाकडे आकर्षित झाले आहेत. नॉर्थकोट आणि कामगार मैदान येथे हिंदू जनजागरण समितीने घेतलेल्या धर्मसभांचा प्रभाव शहरात अजूनही टिकून आहे. शेळगी, बापूजी नगर, जुळे सोलापूर आदी भागांतून राजकारणापासून अलिप्त असलेले, परंतु तळागाळापर्यंत प्रत्यक्ष संपर्क असलेले हिंदू जनजागरण समितीचे शेकडो कार्यकर्ते हिंदू हितासाठी मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. एका बाजूला असे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूला दिग्गज नेतेमंडळी खोटे बोलण्याच्या स्पर्धेत उतरली आहेत. सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारही या स्पर्धेत मागे नाहीत.
अँटोनिया मायनो ऊर्फ सोनिया गांधी यांचा बसता उठता जप करणारे सुशीलकुमारजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका गावात प्रचाराच्यावेळी म्हणाले, "कॉंग्रेसचा घराणेशाहीला विरोध आहे.' कमजोर पंतप्रधान म्हणून विख्यात झालेले मनमोहनसिंग म्हणतात, "राहुल गांधी (राऊल विन्सी या नावाने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे) यांच्यात पंतप्रधान बनण्याचे सारे गुण आहेत.' गेल्यावेळी उज्ज्वलाताई शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. प्रश्न त्या निवडणुकीत हरल्या याचा नाही; धडधडीत खोटे बोलण्याचा आहे. सतत खोटी आश्वासने आणि खोटी विधाने ऐकून सामान्य जनतेस खरे काय आणि खोटे काय असा प्रश्न पडल्यास आश्चर्य नको.
ज्यांनी कधी स्वत:च्या फायद्याशिवाय समाजाचा, देशाचा विचार केला नाही, ज्यांना "साहेबांशी' असलेल्या ओळखीमुळे चांगले दिवस आले, साहेबांच्या मर्जीत राहिल्यामुळे सात पिढ्या बसून खातील इतकी "माया' जमा करता आली, साहेबांमुळे स्वत:च्या बायकोला पुरस्कार मिळाले, त्यांच्या समवेत फोटो काढून दिवाणखाण्यात लावता आला, साहेबांमुळे आपल्या हॉस्पिटलचा, उद्योगाचा, कंत्राटदारीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा झाला अशा लोकांना मत कोणाला द्यावे, असा प्रश्नच पडत नाही. (येथे साहेब म्हणजे गोड-गोड बोलून समाजाचे नेतृत्व करणारा, केवळ कार्यकर्त्यांची (चेल्यांची) गरिबी दूर करणारा, स्वत:च्या पदासाठी, स्थान पक्के ठेवण्यासाठी देशाच्या स्वाभीमानाचा विचार न करणारा नेता असा अर्थ घ्यावा.) किंबहुना अशी मंडळीच प्रचारकाळात रान उठवत असतात.
पक्ष कोणताही असो, चांगले आणि लबाड लोक कमी-अधिक प्रमाणात असतातच. अशावेळी त्या पक्षाचा इतिहास तपासणे आवश्यक बनते. जवळपास 50 वर्षांहून अधिक काळ या देशावर राज्य केलेल्या कॅंाग्रेसच्या नेत्यांनी या देशाचा काहीच विकास केला नाही, असे म्हणणे पूर्णपणे बरोबर होणार नाही. कणभर काम करून जनतेच्या डोळ्यात मणभर धूळ फेकत देशाच्या संपत्तीची या मंडळींनी कशी लूट केली याचा पुराव्यांसह पर्दाफाश करणारे थोर विचारवंत एस. गुरुमूर्ती यांचा याच "आसमंत'मधील लेख पाहा म्हणजे ध्यान्यात येईल.
आपल्या देशात हजारोंनी अशी गावं होती की, ज्या गावांना पक्के (डांबरी) रस्ते नव्हते. पावसाळ्यात या गावांच्या रस्त्यावरून सायकल नेणेही मुश्कील असायचे. आपल्या गावाला डांबरी रस्ता होऊ शकतो, असे स्वप्नातही या ग्रामस्थांना वाटले नसेल, परंतु वाजपेयी सरकारने पंतप्रधान ग्राम सडक योजना राबविली आणि छोटे छोटे खेडे डांबरी रस्त्यांनी जोडले. लाखो गावं जोडली गेली. 50 वर्षांमध्ये कॉंग्रेस पक्षाने जेवढे रस्ते बांधले नाहीत त्याहून अधिक रस्ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केवळ 6 वर्षांत बांधले. चांगले रस्ते असणे ही विकासासाठीची पहिली गरज असते.
भारतातील शेतकरी सुखी व्हावा, शेती सुजलाम सुफलाम व्हावी यासाठी 2016 पर्यंत भारतातील सगळ्या प्रमुख नद्यांना जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली. भारतातील प्रत्येक खेड्यामध्ये सार्वजनिक दूरध्वनी पोचविण्याची योजना अमलात आणून 85 टक्के गावांमध्ये दूरध्वनी सेवा सुरू केली. वाजपेयी सरकार सत्तेत येण्यापूर्वी दूरध्वनी मिळविण्यासाठी लोकांना वर्षानुवर्षे रांगा लावाव्या लागत असत, पण वाजपेयी सरकारने चमत्कार केला. ग्रामीण भागातील शेतमजूरदेखील मोबाईल फोनवरून बोलताना दिसू लागला. स्वयंपाकाचा गॅस घरपोच मिळणे सहजशक्य झाले. देशाच्या विकासाच्या दृष्टीने देशात अभूतपूर्व क्रांती झाली.
कॉंग्रेसप्रणित आघाडी सरकारने काय प्रगती केली हे आपल्यासमोर आहे. गगनाला भिडलेले जीवनावश्यक वस्तूंचे आजचे भाव आणि 5 वर्षांपूर्वीचे भाव याची तुलना करा. म्हणजे नेमका फरक ध्यानात येईल. खेड्यांमध्ये 12-12 तास 14-14 तास वीज उपलब्ध नसते. भाजपाचे राज्य असलेल्या गुजरातकडे पाहा तिथे 24 तास सतत वीजपुरवठा केला जातो. लोकाभिमुख सरकारे भारतीय जनता पक्षाने राबविली आहेत. मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात ही राज्ये याची उदाहरणे आहेत. कॉंग्रेसच्या दृष्टीने विकासाची व्याख्या समजून घेताना मला अनुभवास आलेली एक घटना सांगतो, म्हणजे यावर अधिक भाष्य करण्याची गरज भासणार नाही. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. कॉंग्रेस प्रवेशाचे समर्थन करताना त्या बाई मला म्हणाल्या, "पाहा, मी गेल्या 15-20 वर्षांपासून शिवसेनेत काम करीत होते, पण मला रिक्षानेच ये-जा करावे लागायचे. आता मी कॉंग्रेसमध्ये गेलेय- पुढील वर्षभरात माझ्या घरासमोर चारचाकी दिसेल.'
विकासाच्या बाबतीत आनंदी आनंद असणाऱ्या कॉंग्रेसप्रणित सरकारचे मुसलमानांप्रतिचे आणि ख्रिश्चनांप्रतिचे धोरणही हिंदूंवर अन्याय करणारेच राहिले आहे.
"मग जेव्हा निषिद्ध महिने लोटतील तेव्हा त्या अनेकेश्वरवादींना ठार करा, जेथे सापडतील तेथे त्यांची नाकेबंदी करा व प्रत्येक पातळीवर त्यांचा समाचार घेण्यासाठी सज्ज राहा...' कुराण (9.5)
"आकाशातून पडलेले पाणी या ना त्या मार्गाने अंती सागराला जाऊन मिळते, त्याप्रमाणे कोणत्याही ईश्वराची केलेली उपासना अंती एकाच ईश्वराला जाऊन मिळते....' (शिवमहिम्न स्तोत्र)
मुस्लिम आणि हिंदू विचारांमधील हा फरक कॉंग्रेसच्या नेत्यांनी कधीच समजून घेतलेला नाही. याचाच परिणाम म्हणजे 1947 साली 23 टक्के मुस्लिमांसाठी भारताची फाळणी करण्यात आली. 23 टक्के (ही आकडेवारीसुद्धा बोगस होती) मुस्लिमांसाठी 30 टक्के भारतभूमी देण्यात आली. लोकसंख्येची अदलाबदलही झाली नाही. 23 टक्क्यांपैकी काहीच टक्के पाकिस्तानात गेले. आज भारतातील मुस्लिमांचे लांगूलचालन करण्यात कॉंग्रेस पक्षाने कोणतीही कसूर ठेवलेली नाही.
सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरासमोरील कृत्रिम थडग्यामुळे रस्त्याला होणारा अडथळा असो की 2002 च्या सोलापूर दंगलीतील आरोपींना पाठिशी घालणे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने सदैव धर्मांधांना पाठिशी घातले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत कॉंग्रेसचे हेच धोरण राहिले आहे. अतिरेक्यांची तळी उचलून धरण्याचा निर्लज्जपणा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. कोणत्याही दिवशीचा दै. सनातन प्रभात काढून पहा उदाहणांसह हे लांगूलचालन आपल्या नजरेत येईल.
देशभरात थैमान घालत असलेल्या इस्लामी दहशतवादाला आणि ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाच्या कारवायांना पायबंद घालायचा असेल तर केंद्रातील सरकार बदलणे आवश्यकच आहे.

Friday, April 3, 2009

खाटीक मशिदीने केले रस्त्यावर अतिक्रमण

सोलापूर (खास प्रतिनिधी): शुक्रवार दि. 3 एप्रिल रोजी येथील सोन्यामारुतीसमोरील खाटीक मशिदीने रस्त्यावर अतिक्रमण सुरू केले आहे. आधीच अरुंद झालेल्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्याने येथील रस्त्याचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मशिदीने रस्त्याकडील बाजूस रस्त्यावर खड्डा खणून बांधकाम सुरू केल्याची कुणकुण जागरूक नागरिकांना लागली. जागरुक नागरिकांनी लागलीच पोलिसांना याची खबर दिली. दुपारी पोलिस तत्काळ पोचले.
आधीच्या अतिक्रमणामुळे अरुंद बनलेल्या रस्त्यावर नव्याने मशिदीलगत सुमारे 3 ते 4 फूट रुंदीचे अतिक्रमण सुरू आहे. रस्त्यावर बांधकामाचे साहित्य आणून टाकण्यात आले आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी