
अरुणाचल प्रदेश हा भारताचा सौभाग्यालंकार आहे. सूर्यनारायणाची चाहूल भारतात पहिल्यांदा याच प्रदेशाला लागते. निसर्गरम्य असलेल्या या प्रदेशावर कपटी चीनचा डोळा आहे. सुमारे 55 हजार चौरस किलोमीटरची भारतभूमी गिळंकृत करूनही चीनची मुजोरी थांबलेली नाही. चीनमधल्या शालेय अभ्यासक्रमाच्या पुस्तकांतून अरुणाचल हा चीनचा भूप्रदेश असल्याचे व भारताने बळकवल्याचे शिकविले जाते. चीनच्या कुरापत्या कमी म्हणून की काय ख्रिस्ती मिशनऱ्यांनी गेल्या तीन दशकांपासून अरुणाचलात उच्छाद मांडला आहे.