Pages

Monday, October 31, 2011

कृष्णाचा मॅनेजमेंट फंडा

माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा मारणे वगैरे आपण विसरूनच गेले आहोत. कुटुंबं संकुचित होण्यामागे हीच कारणं आहेत. व्यक्तिगत लाभ, उन्नती आणि आनंदाची भावना यालाच आपण विश्व समजून बसत आहोत.

सस्नेह निमंत्रण

प्रती,
बंधू - भगिनी,
विवेकानंद केंद्राच्या वतीने दिवाळी अंक प्रकाशन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे निमंत्रण पत्रक ठेवत आहे. ज्यांच्यापर्यंत पत्रिका पोहोचू शकली नाही त्यांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास यावे ही विनंती.