Pages

Monday, April 23, 2012

सुधारक संत महात्मा बसवेश्‍वर

या समाजाचे ऐक्य म्हणजे येथील अध्यात्मिक शक्तींचे ऐक्य होय, हे तत्त्व
बसवण्णा जाणून होते. भारतातील अध्यात्माचे ऐक्य साधण्यासाठीच त्यांनी
'अनुभव मंडप' ही संस्था स्थापन केली. या संस्थेत प्रवेश घेण्यास कोणासही
बंदी नव्हती. स्त्रियांनासुद्धा संस्थेचे सभासद होता येत होते.