Pages

Saturday, May 26, 2012

अण्णा हजारे आणि स्वामी विवेकानंद
सन २०११ या वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव राहिला. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. संपूर्ण जगाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. कोट्यवधी भारतीयांनी त्यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला. अण्णांनी राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणारा आहे. समाजाची काळजी असणा-या अण्णांसारख्या काही लोकांमुळेच या देशाला माहितीचा अधिकार मिळाला. आज याच माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत.