सोलापूर
- ‘आमच्या राज्यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही, त्यामुळे
स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत’, अशी माहिती सोलापुरात
आलेल्या ताकेलूम बिलाई या अरुणाचलच्या तरुणाने दिली. ताकेलूम हा गेली पाच
वर्षांपासून पुणे येथे विधी कायद्याचे शिक्षण घेत आहे. अरुणाचल प्रदेशात
लग्न मुलीकडेच असते, पण लग्नप्रसंगाचे गावभोजन मात्र मुलाने द्यायचे असते.
तेथे हुंडा देण्याची पद्धत नाही, असे तो म्हणाला.