ज्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंचा एक जत्था
भारतात येऊ पाहत होता, त्या वेळी; ते भारतात गेले तर बदनामी होईल, या
भीतीने वाघा सीमेवर त्यांना रोखण्यात आले. नंतर एक बातमी आली की, भारतात
जाऊन पाकिस्तानची बदनामी करायची नाही, असे वचन घेऊन पाकिस्तानी
अधिकार्यांनी त्यांना वाघा सीमा ओलांडून भारतात जाऊ दिले. ही चांगली बाब
म्हणावी लागेल. कारण प्रत्येकच इसम आपली प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी झटत
असतो. पाकिस्तानसारख्या देशाजवळ स्वतःची प्रतिमा मलिन होण्यापासून
रोखण्यासाठी उरले तरी काय आहे? हे तेथील अधिकार्यांनाही माहीत असताना, जर
हा देश प्रतिमा जपण्याच्या गोष्टी करत असेल, तर मात्र ती गोष्ट गंभीर आहे,
असे समाजायला हवे.