Pages

स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-book-on-swami-vivekanand-and-dr-babasaheb-ambedkar-4237448-NOR.html