समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’