Pages

Thursday, September 26, 2013

सोलापुरात होणार विवेकानंद साहित्य संमेलन

१५० व्या जयंतीवर्षानिमित्त ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन
सोलापूर | युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर २०१३ रोजी सोलापूरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. हिंदी साहित्यातील प्रख्यात लेखक श्री. नरेंद्र कोहली (दिल्ली) यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.