Pages
▼
Tuesday, September 15, 2015
डोळस विश्वबंधुत्वाच्या दिशेने दमदार पाऊल
व्हीआयएफच्या देखण्या सभागृहात 3
आणि 4 सप्टेंबर रोजी जागतिक हिंदू-बौध्द संमेलन पार पडले. विवेकानंद
इंटरनॅशनल फाउंडेशन, जपानची थिंक टँक समजली जाणारी टोकियो फाउंडेशन आणि
जगभरातील बौध्दांची सर्वोच्च संस्था इंटरनॅशनल बुध्दिस्ट कॉन्फिडरेशन या
जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या तीन संस्थांनी मिळून या संमेलनाचे आयोजन
केले होते. केवळ माझाच धर्म खरा म्हणणाऱ्या धर्मांचा अनुभव घेतलेल्या
जगासाठी हा विचार नवीन आणि आश्वासक होता. हा विश्वबंधुत्वाचा विचार आजही
एकांतिक धर्मीयांनी स्वीकारलेला नाही. धर्मांतरणे घडवून आणण्यासाठी ते
कोणत्याही थराला चालले आहेत. त्यामुळे जगातील संघर्ष टाळण्यासाठी एका सशक्त
पुढाकाराची गरज होती. जागतिक हिंदू-बौध्द संमेलनाकडे या पार्श्वभूमीवर
पाहिले पाहिजे..
Friday, September 11, 2015
गोविंद पानसरे यांची हत्या आणि काही प्रश्न
ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता?
हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता?
हिंदू-बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल
![]() |
hindu buddhist initiative / दै. दिव्य मराठी, पान ७, दि. १० सप्टेंबर |
hindu buddhist initiative |
Sunday, September 6, 2015
#हिंदू_बौद्ध_ऐक्य_नवी_सुरूवात
आता सोलापूरकडे निघालोय.
दिल्लीतील चार दिवसांपैकी दोन दिवस विवेकानंद इंटरनैशनल फौंडेशनमधे परिसंवादात गेले. असा परिसंवाद की ज्याच्या आयोजनात दोन देशांच्या (जपान आणि भारत) पंतप्रधानांची आत्मीयता होती. परिसंवादाची सुरूवात जपानचे पंतप्रधान आबे सिंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले.
दिल्लीतील चार दिवसांपैकी दोन दिवस विवेकानंद इंटरनैशनल फौंडेशनमधे परिसंवादात गेले. असा परिसंवाद की ज्याच्या आयोजनात दोन देशांच्या (जपान आणि भारत) पंतप्रधानांची आत्मीयता होती. परिसंवादाची सुरूवात जपानचे पंतप्रधान आबे सिंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले.