Pages

Sunday, September 6, 2015

#हिंदू_बौद्ध_ऐक्य_नवी_सुरूवात

आता सोलापूरकडे निघालोय.
दिल्लीतील चार दिवसांपैकी दोन दिवस विवेकानंद इंटरनैशनल फौंडेशनमधे परिसंवादात गेले. असा परिसंवाद की ज्याच्या आयोजनात दोन देशांच्या (जपान आणि भारत) पंतप्रधानांची आत्मीयता होती. परिसंवादाची सुरूवात जपानचे पंतप्रधान आबे सिंझो यांच्या प्रक्षेपित भाषणाने झाली. मुख्य भूमिका भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली. दोन पंतप्रधानांनी या ऐतिहासिक परिसंवादाबद्दल दाखवलेली आत्मीयता ही गौरवास्पद बाब असल्याचे जगभरातून आलेल्या बौद्ध धर्मातील सर्वोच्च धर्मगुरूंनी बोलून दाखवले.