Monday, May 25, 2020

भारतमातेच्या मुर्तीमुळे कन्याकुमारीत म्हणे "धार्मिक भावना" दुखावल्या


कन्याकुमारी जिल्ह्यातील पुलियुर या छोट्याशा गावातील ही घटना पहा.
कन्याकुमारी जिल्ह्यात ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या आहे 46.85 टक्के आणि हिंदू 48.65 टक्के. उर्वरित मुस्लिम.

200 वर्षे प्राचीन असलेल्या इसक्की अम्मन (दुर्गादेवी) मंदिराच्या भूमीवर काही दिवसांपूर्वी भारत मातेची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली. हे मंदिर हिंदु व्यक्तीच्या मालकीचे आहे. एका हिंदू मजुराने पुढाकार घेऊन भारत मातेची ही मूर्ती बसवली.

मंदिराजवळ राहणाऱ्या काही ख्रिस्ती लोकांनी पोलिसात तक्रार दिली की यामुळे त्यांच्या "धार्मिक भावना" दुखावल्या. पोलिसांनी लगेच दखल घेतली. ही मूर्ती काढून टाका असे तेथील गावकऱ्यांना पीएसआयने 20 मे रोजी सांगितले. इतकेच नाही तत्परता दाखवत 21 मे रोजी पोलिसांनी निळ्या कापडाने भारत मातेची प्रतिमा झाकून टाकली.

RSS, BJP आणि हिंदू मुन्नानी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. प्रकरण मुख्यमंत्री यांच्या पर्यंत नेले. आणि भारत मातेची प्रतिमा मुक्त केली.

जेथे हिंदू समाज हा बहुसंख्य असतो तेथे अन्य धर्मियांची प्रार्थना स्थळे उभारण्यास कधीही विरोध होत नाही. सर्व धर्म सत्य आहेत. ईश्वर एक आहे. तो सर्वत्र आहे. कणाकणात आहे. चराचरात आहे. आणि तो विविध रूपातून व्यक्त होतो, अशी हिंदूंची श्रद्धा असते. त्यामुळे हिंदू कधीही इतरांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत नाहीत.
परंतु
विस्तारवादी, एकांतिक धर्मीय व्यवस्थेचे असे नसते. "माझाच धर्म सत्य. माझाच देव सत्य. इतर देव खोटे खोटे. असत्य आहेत. जगातील इतर धर्मीय सारे माझ्याच धर्मात ओढून आणले पाहिजेत." यासाठी एक यंत्रणा काम करत असते. ही यंत्रणा देशाची सीमा मानत नाही.

धर्मांतर, जिहाद, क्रुसेड ... असे काहीही करून जग माझ्याच धर्माचे झाले पाहिजे असा धर्मवेड प्रबळ असतो. राष्ट्रवाद त्यांच्या मार्गातील काटा असतो. भारत मातेची प्रतिमा त्यांच्यासाठी धार्मिक भावना दुखावणारे असते.  "धर्मांतरमुळे राष्ट्रांतर घडते" ते असे.

महत्वाचे -
पोलिस यंत्रणा किंवा कोणतीही यंत्रणा कशी काम करते, हे समजून घेतले पाहिजे. कोणीतरी चार जण एकत्र येऊन कोणाविरुद्ध तरी तक्रार देतात आणि पोलिस कामाला लागतात. धार्मिक भावना दुखावल्या ची तक्रार असेल तर पोलिस यंत्रणा हळवी होते. अशावेळी कायद्याची थोडीफार जाण असलेली संघटित शक्ती गरजेची असते. अन्यथा चूक आपली नसली तरी "आपली भारतमाता झाकून" आपल्यावरच अरेरावी केली जाते. सत्याचा जय तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा सत्याला सामर्थ्याची जोड असते.
अन्यथा
कधी काळी हिंदू असलेला अफगाणिस्तान भारताच्या सीमेबाहेर जातो. १९४७ पर्यंत भारताचा अविभाज्य भाग असलेली भूमी पाकिस्तान, बांगलादेश बनते.

जाता जाता...
1. काही वर्षांपूर्वी कन्याकुमारी जिल्ह्याचे नाव बदलून "कन्नी मेरी" (मेरी म्हणजे येशू ख्रिस्ताची आई) असे नामकरण करण्याची मागणी आणि आंदोलन झाले होते.
2. कन्याकुमारी येथील समुद्रातील श्रीपाद शिला येथे स्वामी विवेकानंद यांचे स्मारक उभारणी करण्यास एका गटाने मोठा विरोध केला होता. हे सेंट झेवियर्स रॉक आहे. येथे विवेकानंद स्मारक होऊ देणार नाही, अशी त्यांची भूमिका होती.
3. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही हिंदूंना आपल्याच जागेत एखादे मंदिर उभे करायचे असेल तर ते इतके सोपे नाही.
यासंबंधीच्या काही बातम्या अधून मधून येत असतात. काही बातम्या मध्येच विरून जातात. बातमी मूल्य या निकषात अशा बातम्यांना कोण विचारतं ?

- सिद्धाराम भै. पाटील

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी