Pages

Tuesday, November 1, 2011



पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

मुलं ही केवळ संपत्ती नव्हे तर कर्तव्यही !

कुटुंबाचा आधार आहे गृहस्थी आणि गृहस्थीची धुरा टिकलेली असते दांपत्य जीवनावर. साधारणपणे लोक कुटुंब, गृहस्थी आणि दाम्पत्य हे तीन्ही एकच समजतात. परंतु या तीन्हीत सूक्ष्म अंतर आहे हे मात्र खरे. पती-पत्नीतील वैयक्तीक संबंधांवर आधारित असते ते दांपत्य. पती-पत्नीसोबतच मुलांच्या जबाबदा-याही असतात याला म्हणतात गृहस्थी. यात आर्थिक, मानसिक आणि भौतिक या तीन्ही स्तरांचा समावेश असतो. या सा-यांचे समग्र रूप म्हणजे कुटुंब होय. कुटुंबात पती, पत्नी आणि मुलं यांच्याशिवाय अन्य नात्यांचाही समावेश असतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-gruhasti-and-children-2532794.html

कुटुंब ही संपत्ती आहे आणि प्रेरणाही !

घर किंवा कुटुंब म्हणजे एक माळ आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्यात गुंफली जाते. घरातील सारे सदस्य या माळेतील मोती आहेत. एकही मोती कमी असेल किंवा धागा तुटलेला असेल तर माळेचे सौंदर्य नष्ट होते. माळ विखुरली जाते.
घरातील प्रत्येक सदस्याचे महत्त्व हे समसमान असते. आपण कुटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्यावर कोणतीही परिस्थिती येवो, कितीही संकटे येवोत, आपण सदैव कुटुंबासोबत राहिले पाहिजे. कुटुंबाला एकत्र ठेवले पाहिजे. कुटुंब म्हणजे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे स्थान आहे.
महाभारतातील पांडवांकडे पाहा. किती अडचणी आल्या, इंद्रप्रस्थ निर्माण असो की वनवास, पांडव सदैव एकत्र राहिले. द्युतात हार झाल्यानंतर
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-kutumb-aikya-what-to-do-2532811.html