विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे केले आयोजन
प्रतिनिधी । सोलापूर
निसर्गाच्याव्यवस्थेतील प्रत्येक घटक विघटित होतो. माणसांचे केंद्रीकरण अन्् प्रगतीच्या दिखाव्यामुळे कचऱ्याची निर्मिती होते. स्वत:ला वगळून कचऱ्याचे निर्मूलन अशक्य आहे. कचारानिर्मितीच होणार नाही, यासाठी प्रयत्न करणे हाच त्यावरील एकमेव शाश्वत पर्याय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी (कुडाळ, रत्नागिरी) यांनी केले. विवेकानंद केंद्राच्या पर्यावरण मंडळातर्फे गुरुवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम अध्यक्षस्थानी तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, नगरप्रमुख प्रा. प्रशांत स्वामी डॉ. वासुदेव रायते पर्यावरण मंडळाचे प्रमुख अजित आेक आदी उपस्थित होते.