Sunday, January 22, 2012

अलिगड मुस्लिम विद्यापीठामुळे शांततेला धोका

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद (प्राचीन नाव रत्नपूर) तालुक्यातील व खुलताबाद शहराजवळील दत्त संस्थान श्रीक्षेत्र शूलिभंजन ग्रामपंचायतीच्या गट क्रमांक 5 मधील 332 एकर 11 गुंठे जमीन अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या उभारणीसाठी देण्यास महाराष्ट्र शासनाने तत्त्वत: मान्यता दिली असल्याचे कळते.
26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार अलिगड मुस्लिम विद्यापीठ ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय संस्था म्हणून घोषित झाली. 1968, 1981, 1991 व 2005 या वर्षी माननीय सर्वोच्च न्यायालयाने अलिगड मुस्लिम विद्यापीठास मुस्लिम तुष्टीकरणाबाबत फटकारले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-aligarh-muslim-university-contro-chnadrakant-khaire-appose-2766807.html?RHS-badi_khabare=


24 एप्रिल 2006 रोजी सर्वोच्च न्यायालयाने अलिगड मुस्लिम विद्यापीठाबाबत संसदेला आपल्या अधिकारकक्षा ओलांडण्याबाबतदेखील फटकारले व पुनश्च मुस्लिम तुष्टीकरण थांबवून शैक्षणिक गुणवत्ता व स्वायत्तता राखा, असा निर्णय दिला. अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा दहशतवादी कारवायांत सहभाग असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. देशाचे तत्कालीन संरक्षणमंत्री विद्यापीठास भेट देणार म्हणून पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून सुरक्षा दलाने तपासणी मोहीम हाती घेताच, तपासणीही नको व संरक्षणमंत्र्यांची भेटही नको म्हणून आंदोलन झाले व भेट नाकारण्यात आली. अलिगड मुस्लिम विद्यापीठाच्या वर्तमान कुलगुरूंवरही भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत.
1947 ला भारतास खंडित स्वरूपात स्वातंत्र्य मिळाले. यात अलिगड मुस्लिम विद्यापीठाची भूमिका लपून राहिली नाही. पाकिस्तानचे निर्माते बॅ. मोहंमद अली जिना यांनी घोषणा केली की, 'अलिगड मुस्लिम विद्यापीठ भारत का शस्त्रागार है.' आजही मुस्लिम विद्यापीठ त्याच मार्गावर चालत आहे.
मराठवाड्यात औरंगाबादला 23 ऑगस्ट 1958 रोजी मराठवाडा विद्यापीठाद्वारे शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. मराठवाड्यातील मागास भागातून हजारो विद्यार्थी या विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. जेथे या विद्यापीठाची स्थापना झाली, तो परिसर म्हणजे नागसेनवन. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या परिसरात खुद्द बाबासाहेबांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. 14 जानेवारी 1994 रोजी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ' असा विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला. या विद्यापीठापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावरच अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्याचा कुटिल घाट सत्ताधारी राजकारण्यांनी घातला आहे. प्रश्न केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्तित्व व अस्मितेचा आहे. औरंगाबाद जि. प. नेही 'अलिगड'च्या स्थापने विरोधात ठराव (क्र. 585) संमत केला आहे. शासनाने याचीही दखल घेतलेली नाही. ती गांभीर्याने घ्यावी. 
औरंगाबाद हे जागतिक नकाशावरील महत्त्वाचे स्थान असून, जिल्ह्यात अजिंठा, वेरूळ, पैठण, देवगिरी किल्ला, घृष्णेश्वर ही जागतिक स्मारके व संतभूमी आहे. संपूर्ण देशात हवाई, रेल्वे, रस्ता मार्गाद्वारे हे नामवंत पर्यटन राजधानीचे शहर शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक जडणघडणीचे महत्त्वाचे केंद्र आहे. शासनाच्या या अशा निर्णयाने परिसरातील शांतता-सुव्यवस्थेची परिस्थिती धोक्यात येऊ शकते. राज्याची पर्यटन राजधानी, ऐतिहासिक व संवेदनशील असणा-या अशा या शहरात कोणतीही मागणी नसताना अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापण्यास  का महत्त्व दिले जात आहे, हे गूढच आहे.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. के. अब्दुल अजीज, कालिकत विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. अन्वरजहां जुहेरी, प्रा. जावेद अख्तर, प्रा. इक्राम हुसेन, प्रा. एन. ए. के. दुर्राणी यांच्यासह अल्पसंख्याक राज्यमंत्री फौजिया खान, अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती टक्केकरा, सचिव सय्यद हाशमी यांनी ऑक्टोबर महिन्यात शूलिभंजन येथे विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी पाहणी केली व त्यांनी महाराष्ट्र शासनास 'हीच जागा आम्हाला द्या, कारण खुलताबाद येथे औरंगजेबाची कबर आहे. हीच जागा आमच्या विद्यापीठाला मिळाली पाहिजे' असा आग्रह धरला होता.
देवगिरी किल्ल्याच्या मागील बाजूस असलेली शूलिभंजन येथील ही जागा संत जनार्दन स्वामी व संत एकनाथ या गुरू-शिष्यांची तपोभूमी आहे. तसेच दत्त दिगंबराचे व देवी पार्वतीचे वास्तव्यस्थान म्हणूनही ओळखली जाते. अशा या पवित्र जागेवर महाराष्ट्रातील सर्व संत दर्शनासाठी संतनगरी म्हणून उभारण्याची एक योजना संतश्रेष्ठ भय्यू महाराज यांनी आखली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे या जागेची मागणीही केली होती; परंतु त्यांना ही पवित्र जागा न देता सरकार ती अलिगड मुस्लिम विद्यापीठास का देते, हा एक मोठा प्रश्नच आहे.
अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा इतिहास देशविरोधी कारवायांना खतपाणी घालण्याचाच राहिला आहे. तसेच राजकीय स्वार्थापोटी व मतांच्या लांगूलचालनासाठी सरकारने रचलेले हे षड्यंत्रच आहे. अलिगड मुस्लिम विद्यापीठाद्वारे महाराष्ट्रात कोणत्याही शैक्षणिक   सुधारणा शक्य नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अस्मिता व अस्तित्वाचे काय होणार? औरंगाबादजवळील पवित्र धार्मिक जागेतच ते स्थापन करण्याच्या षड्यंत्रामागे असलेल्या शासनाला अलिगड मुस्लिम विद्यापीठ उभारणीस सर्वांनीच कडाडून विरोध केला पाहिजे. हे शैक्षणिक विद्यापीठ नसून दहशतवादी  फॅक्ट्रीच म्हणावे लागेल, यात कोणाचेही दुमत असणार नाही.
अस्मितेचा प्रश्न
खुलताबादजवळच्या शुलिभंजन परिसरात अलिगड मुस्लिम विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्याचा कुटिल घाट सत्ताधारी राजकारण्यांनी घातला आहे. प्रश्न केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्तित्व व अस्मितेचा आहे. वास्तविक, औरंगाबाद जिल्हा परिषदेनेही या विद्यापीठाच्या स्थापनेच्या विरोधात ठराव (क्र. 585) संमत केला आहे. शासनाने याचीही दखल घेतलेली नाही.
हे उपकेंद्र औरंगाबाद जिल्ह्यात व्हावे, असे आपणास वाटते काय?
आपले उत्तर 9765415923 या क्रमांकावर Y किंवा N  या स्वरूपात एसएमएसद्वारे 20 जानेवारीपर्यंतच अवश्य पाठवा.
(उत्तरातून केवळ एक सर्वेक्षण होईल. पाठवणा-यांचे क्रमांक आणि नावांबद्दल गुप्तता पाळली जाईल.)

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी