Sunday, October 30, 2011

विजय! पूर्ण विजय!!



युवाशक्तीला घातलेली साद



31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि. बुलढाणा) येथे महाशिबीर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून 1377 तरुण-तरुणी या शिबिरात सहभागी झाले होते. युवा शक्तीला सकारात्मक साद घालणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.

स्थळ : शेगावजवळील आनंदसागर विसावा.
दि. 31 डिसेंबर 2008 ची संध्याकाळ.
18 ते 25 वयोगटांतील तरुण-तरुणी झुंडी-झुंडीने, घोळक्याने दाखल होत आहेत. यात सांगली-कोल्हापूरचे तरुण-तरुणी आहेत, तसे ठाणे-मुंबई-रत्नागिरीचेही आहेत. नागपूर-गडचिरोली-वर्ध्याचे आहेत तसे सोलापूर-लातूर-धाराशिवचेही आहेत. पुणे-नगरचे आहेत तसे अकोला-भंडारा-नांदेड-संभाजीनगर-परभणीचेही आहेत. एसटी बस आणि रेल्वेने आलेल्या तरुणांची एकच लगबग सुरू आहे.
प्रवेशद्वारात नोंदणी सुरू आहे. झुंडी-झुंडीने येणारे विविध गणांमध्ये विभागून शिस्तीच्या कोंदणात बसत आहेत. 25-25 जणांचे गण आपल्या गणप्रमुखाच्या मार्गदर्शनानुसार सभामंडपाकडे कूच करीत आहेत. "भारत माता की - जय', "जय भवानी- जय शिवाजी', "कौन चले भाय कौन चले- स्वीमीजी के वीर चले' या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मुख्य सभामंडपात गणश: आणि क्षेत्रश: शिबिरार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. उभ्या रांगा आणि आडव्या ओळीत बसलेले 1500 तरुण ॐकार उच्चारण करीत भजनसंध्येत सहभागी झालेत. येथूनच चार दिवसांच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. उद्यापासून या साऱ्यांना पहाटे 4.30 वा. उठून पहाटेच्या योगसत्रासाठी तयार व्हायचंय. सगळेजणं आपले भ्रमणध्वनी बंद करून आपापल्या गणप्रमुखांकडे दिले आहेत. शरीर, मनाने स्वत:च्या घडणीसाठी सिद्ध झालेत. ( photos http://poornvijay.blogspot.com/search?updated-max=2009-02-06T02%3A43%3A00-08%3A00&max-results=6)

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...


मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.

- महानायक... मृत्यूचे रहस्य ... netaji




टीम अण्णा आणि rss - मा. गो. वैद्य यांचे भाष्य


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सामान्य जनमानस प्रभावित झाले असतानाच, त्यांच्या चमूतील दौर्बल्य प्रकट होऊ लागले. या दौर्बल्याचा, त्यांच्या आंदोलनाच्या परिणामकारकतेवर फार विपरीत परिणाम होईल, असे मला वाटत नाही. परंतु, अण्णांच्या विरोधकांना मात्र, त्यांच्यावर आघात करण्यासाठी एक शस्त्र मिळाले, हे मान्य करावे लागेल.

अण्णा, rss तुमच्यासाठी अस्पृश्य आहे ?

नुकतीच टीम अण्णाची पत्रकार परिषद tv वर पाहत होतो. rss विषयावर बोलताना प्रशांत भूषण म्हणाले की, आम्ही आमच्या मंचावर rss च्या लोकांना येवू दिले नाही. टीम अण्णाने कोणाला सोबत घ्यावे, कोणाला घेवू नये, हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे खरेच. पण तरीही मनात प्रश्न येतो की, यांना जामा मशिदीचे इमाम बुखारी आपल्या मंचावर आणावे वाटले ( किरण बेदी यांनी बुखारी यांच्या घरी जावून त्यांना विनवण्या केल्या होत्या. 'भारत मत की जय', 'वंदे मातरम' म्हणणार नाही, असे आश्वासन दिल्यास राम लीलावर येण्याचा विचार करेन असे ते म्हणाले. ), अफझल गुरु याला फाशी होऊ नये असे मनापासून वाटणाऱ्या मेधाबाई पाटकर टीम अण्णात असू शकतात (पाटकर बाईंच्या पत्रकार परिषदेला मी सोलापूर पत्रकार संघात उपस्थित होतो, तेंव्हा त्या अरुंधती रॉय यांचा बचाव करताना अफझल गुरुची कड घेताना दिसल्या होत्या.), नक्सलवादी कारवायांशी जवळीक ठेवणारे,

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी