Sunday, April 28, 2013

तरुण भारतवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न


तारीख: 27 Apr 2013 20:46:53

-पोलिसांच्या सतर्कता; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध
प्रतिनिधी
जळगाव, दि. २६ -
दैनिक तरुण भारतमधील प्रकाशित बातमीचा राग येऊन मुस्लिम समाजातील काही युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जमून नंतर तरुण भारतच्या गोलाणी मार्केटमधील कार्यालयाावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गोलाणी मार्केट परिसरात आल्यानंतर मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगत आणि शांततेचे आवाहन करुन हा प्रयत्न हाणून पाडला.

ड्रॅगनची पुन्हा आगळीक


तारीख: 27 Apr 2013 18:25:47

ले. जनरल दत्तात्रय शेकटकर 
 १५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी सूर्योदय होत असताना लद्दाख-चीन सीमा क्षेत्रात लाईन ऑफ कंट्रोलवर सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याकरता जबाबदार आयटीबीपीच्या (इंडिया टिबेट बॉर्डर पोलिस) अधिकारी व जवानांनी, दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ.) क्षेत्रात, एक आश्‍चर्यजनक व धक्कादायक सत्य समोर पाहिलं. ज्या जागेवर चीनचे सैन्य १९६२ च्या युद्धानंतर कधीपण स्थानीय रूपाने राहिले नव्हते, त्या जागेवर चिनी सैन्याचे जवळ जवळ ३० ते ४० सैनिक टेंट लावून उपस्थित दिसले! ही संख्या चिनी सैन्याच्या एका प्लाटूनची (एका प्लाटूनमध्ये ५० सैनिक असतात) होती. जरी चीनचे सैन्य या क्षेत्रात पेट्रोलिंगकरता येत होते, परंतु त्यांनी टेंट (तंबू) कधीच लावले नव्हते! ही जागा भारतीय क्षेत्रात जवळ जवळ १० किलोमीटर आत आहे!

हे चमकते आमचे आदर्श नव्हेत


-शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळचे वर्णन करताना इतिहासकारांनी म्हटले आहे- ‘‘त्या काळी महाभयंकर स्थिती होती. हिंदूंना बाटविले जात होते.पवित्र मूर्तींच्या ठिकर्‍या होत होत्या. गायींची सर्रास हत्या होत होती. हिंदू स्त्रियांना सरळ उचलून घेऊन जात होते. तलवारीच्या टोकावर धर्मांतरे चालू होती...’’

Thursday, April 25, 2013

गुजरात: कॉग्रेसच्या हिंसक हिंदूत्वाची प्रयोगशाळा

भाऊ तोरसेकर  
१९६९ च्या गुजरात दंगलीच्या वेळी जाफ़रभाई सरेशवाला अवघा पाच वर्षाचा पोरगा होता. सतत वर्ष दोन वर्षानंतर उसळणार्‍या दंगली तो बघतच होता, त्यांचे चटके भोगतच होता. पण नंतर जीवन उध्वस्त करणारी पुढली मोठी दंगल गुजरातमध्ये झाली, ती १९८५ सालात. तेव्हा तर संपुर्ण देशातच भाजपाची धुळधाण उडालेली होती आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. तेव्हा तर एकट्या अहमदाबाद शहरात सलग दोनशे दिवस म्हणजे सात महिने कुठल्या ना कुठल्या भागात संचारबंदी चालूच होती.  संसदेत तर राजीव गांधींनी अफ़ाट बहूमत मिळवलेले होत. पण म्हणून गुजरातच्या मुस्लिमांना सुरक्षा लाभली नव्हती. दोन वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री बदलला तरी हिंदू-मुस्लिम दंगली काही संपत नव्हत्या.

Wednesday, April 24, 2013

वृत्तपत्र बनतं कसं ? (माहितीपट)

 मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी ' वृत्तपत्र बनतं कसं ?' या विषयावर माहितीपट सादर केला. जिज्ञासूंसाठी माहितीपट पुढील youtube लिंकवर  उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा.
वृत्तपत्र बनतं कसं ?

Monday, April 22, 2013

शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!


Thursday, April 18, 2013

धर्मसंस्थापना हीच खरी सेवा!


 समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’

Wednesday, April 17, 2013

स्वामी विवेकानंद आणि डॉ आंबेडकर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

स्वामी विवेकानंद  आणि डॉ आंबेडकर पुस्तक  प्रकाशन कार्यक्रमात प्रस्तावना  करताना सिद्धाराम पाटील 

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????




स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-book-on-swami-vivekanand-and-dr-babasaheb-ambedkar-4237448-NOR.html

Tuesday, April 16, 2013

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकाननंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन
श्रीनिवास दासरी । सोलापूर
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे सावरकरांनी म्हटले आहे. परंतु बौद्ध धर्माविषयी ते लागू होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन समरसता मंचचे प्रांताध्यक्ष रमेश पांडव (औरंगाबाद) यांनी केले. धर्म आणि धम्म समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय समाजात खºया अर्थाने समरसता येणार नाही, असेही ते म्हणाले.
vishwas lapalkar, chandrakant gadekar, bhante sumedhji, ramesh pandaw, vikram kamble, vilas bet
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-swami-vivekanad-and-dr-4237385-NOR.html

Sunday, April 14, 2013

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

दिव्य सिटी, दिव्य मराठी, 14 april 2013


सोलापूर- जातीपातीत विभागलेला समाज, अस्पृश्यता, धर्माचा विकृत अर्थ लावून होणारी फसवणूक आणि असंघटितपणा या आपल्या देशासमोरील मूलभूत समस्या आहेत. या दोषांतून मुक्त कसे होता येईल, याचा विचार स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक अंगाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक संदर्भांच्या आधारे केला. आपला समाज दोषमुक्त व्हावा, हीच तळमळ दोनही महापुरुषांची होती, असे विचार ‘विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांतून समान मुद्दे शोधण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे असे ते म्हणाले.

Saturday, April 13, 2013

गुगलचे महत्त्व अधिक, की देशाच्या घटनेचे?

गुगल ही जगातील सर्वांत मोठी ई-मेल अथवा वेब साईटशी संबंधित सूचना अथवा संवाद सुविधा पुरविणारी कंपनी आहे. संवादासाठी या माध्यमाचा वापर करणार्‍यांची संख्या अब्जावधीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित, मानचित्र निर्मिती तथा सर्वेक्षण क्षेत्रातील भारतीय सर्वेक्षण विभाग गुगलविरुद्ध दिल्लीच्या आर. के. पुरम्‌‌ येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास बाध्य झाला आणि सर्वांचे कान टवकारले गेले.

विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर पुस्तकाचे १४ एप्रिल रोजी प्रकाशन



सोलापूर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीतर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ऍम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रकाशन होत आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे व्याख्यान यावेळी होईल. याशिवाय प्रा. विक्रम कांबळे व प्रा. विलास बेत हे पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्‍वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.या पुस्तकामुळे बहुतेक करून दुर्लक्षित राहिलेले स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार आणि त्याच पद्धतीने दुर्लक्षित राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक विचार यांचे दर्शन होते, अशी माहिती संयोजक वल्लभदास गोयदानी यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने पुष्कळ लेखन केलेले लेखक रमेश पतंगे यांनी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. तो आढावा घेताना त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये किती साम्य होते, हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.

((here I am giving the details of photo used on front page of ambedkar book. This photo is basically was from Babasahebs Buddhis deeksha samaroh. The photo was published in outlook magazine of 20 August 2012 issue in the article 
named The Apostate Children Of God.
link of the same is
http://www.outlookindia.com/article.aspx?281931 ))

बाबासाहेब आम्हाला क्षमा करा


आज जरी आम्ही राजकीय, सामाजीक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो आहे तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखिल आम्ही 'एक-राष्ट्र' म्हणुन उभे राहू. एक दिवस अअसाही येईल की, फाळणीची मागणी करणार्‍या मुस्लिम लीगला पण 'अखंड हिंदुस्थानच' हिताचा वाटू लागेल."                         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन

बाबासाहेब, म्हणाले होते, "जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम, सर्वांना भस्मिभूत करुन टाकले आहे." आता हा कूपमंडुक समाज कुठे आपलीही अशीच दशा करणार नाही ना, अशी भयशंका मनाला व्याकूळ करते. म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.

हिंदुत्वात धर्मांतरास परवानगी नाही

Friday, April 12, 2013

लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट



भारतीय स्त्रिया पाश्‍चिमात्यांप्रमाणेच विचारक्षम व्हाव्यात, परंतु त्यांच्या चारित्र्याची किंमत देऊन मात्र नव्हे ! विचारक्षमता हे काही श्रेष्ठतम इप्सित नाही. नैतिक बल आणि अध्यात्मबल आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते. आमच्याकडील स्त्रिया काही फार शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे आचरण अत्यंत पवित्र असते. स्त्री, पुरुष हा भेद विसरून आपण केवळ माणसे आहोत, अशा भूमिकेतून काम करायला शिकल्याशिवाय स्त्रियांचा खरा विकास होणार नाही. एरवी स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. घटस्फोटांचे मुख्य कारण हेच आहे. जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधीच एका पंखाने उडू शकत नाही.                        - स्वामी विवेकानंद


वाचक बंधू-भगिनी,
सध्या आपल्या देशातील घडामोडी आणि देशाची धुरा वाहण्याची जबाबदारी असलेल्यांचे वर्तन पाहा. देशाच्या हिताला नख लावणार्‍या शक्ती प्रबळ झाल्याचे दिसून येत आहे. संस्कार आणि नीतीमूल्ये यापासून दूर गेल्याने समाजाची होत असलेली घसरण रोखण्याऐवजी भारत सरकारमध्ये बसलेल्या मुखंडांनी अध:पतनाची परीसीमाच गाठल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय १६ वर्षे करण्याचे विधेयक संसदेसमोर आणले गेले. रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतात, तसला हा प्रकार. समाजात अनाचार माजवण्याचाच हा प्रयत्न.
भारतामध्ये लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट आहे विवाह.विवाहाला भारतीय संस्कृतीत संस्कार मानले गेले आहे.

Thursday, April 11, 2013

बाळ ठाकरे यांच्यावरील एक प्रभावी लेख

Bal Thackeray’s strength was his courage

To his followers he was god. To his detractors he was demon. To the liberals he was fascist. To the seculars he was communal. To the system he was challenge. To the media he was enigma. To politics he was toast. To the Hindus he was protector. To the Muslims he was question mark. Yet his personal physician was a Muslim just as the personal physicians of Jinnah were Hindus. This is Bal Thackeray 360 degrees.

साडेतीन टक्क्यांचा पद्मश्री उपरा - लक्ष्मण माने


Sunday, April 7, 2013

यशवंतराव चव्हाण आरएसएस बद्दल म्हणतात…

संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, या खोट्या प्रचाराला त्यांनी जणूकाही उत्तरच दिलेले आहे. ते म्हणतात, ‘‘थोडे मागे वळून पाहिले किंवा इतिहासाची पाने उलटली, तर रा. स्व. संघावर टीका करणारे कोण आढळतात? रा. स्व. संघ ही ब्राह्मणांची संघटना आहे, ही टीका प्रथम राष्ट्रसेवा दलाच्या गोटातूनच केली गेलेली आहे. राष्ट्रसेवा दलाच्या मार्गदर्शकांना ही माहिती असावी, असलीच पाहिजे. याउलट रा. स्व. संघाचे महाराष्ट्रातील आणि बाहेरचेही स्वरूप मी पाहिले आहे; त्यामुळे या संघटनेत एकाच जातीचे लोक आहेत, असे मी म्हणू शकत नाही. जनसंघाचेही तेच आहे. समाजातले निरनिराळे वर्ग त्यात आहेत, याचीही मला माहिती आहे.’’

Saturday, April 6, 2013

स्वमी विवेकानंद चित्र

स्वामी विवेकानंदा यांच्या १५० व्या जयंती निमित्त रामकृष्ण मठ,पुणे येथे भरवलेल्या स्वमी विवेकानंद चित्र प्रदर्शनातील एक चित्र !!

Friday, April 5, 2013

धन्यवाद ! पृष्ठदृश्ये एक लाखाच्या पुढे …

वाचक बंधू - भगिनी,
आताच ब्लॉग पृष्ठदृश्यांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली. या ब्लॉगवर आपण करत असलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले.
खूप धन्यवाद !
आपल्या सूचना, अभिप्राय, मत, प्रतिक्रिया यांचे सदैव स्वागत आहे. 

तुमचाच,
सिद्धाराम भै. पाटील9325306283

मोठी माणसे

DR.A.P.J.Abdul Kalam

रिद्धपुरात मंदिर व मशिदीचा वाद उफाळला

 मंदिरालगतच्या मशिदीमागे असलेल्या याच शासकीय जागेवरून वाद आहे

तभा वृत्तसेवा
शिरजगाव बंड, ३ एप्रिल

महानुभाव पंथियांची काशी मानल्या जाणार्‍या श्री क्षेत्र रिद्धपूरमध्ये दोन धर्मस्थळांच्या वादातून बुधवार, ३ रोजी जातीय तणाव निर्माण झाल्याने प्रचंड तणावाचे वातावरण आहे. संतप्त जमावाने पोलिसांवरही दगडफेक केल्याने त्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे.

महास्वार्थी व्हा! सेवा करा !!

सार्ध शतीच्या निमित्ताने सर्वत्र स्वामी विवेकानंदांच्या जीवनाचा पाठपुरावा होत आहे.आपणही या सदरात नरेंद्रच्या नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या घडणीच्या अद्भुत प्रक्रियेचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. युवा मनात हा विचार यायला हवा की, हे कशासाठी? काळ बदलला, परिस्थितीही बदलली. स्वामीजींच्या समाधीलाही १११ वर्षे झाली, मग त्यांच्या आयुष्याचा आज मला काय उपयोग? हा प्रश्‍न उद्धटपणाचा नाही. अत्यंत आवश्यक आहे. जोवर आपण स्वत:चा संबंध या विवेचनाशी जोडत नाही, तोवर हे सगळे निष्फळच. म्हणूनच सेवेच्या तंत्राचा विचार करण्याआधी आज हा विषय काढला.

जर बाबरी मक्का-मदिनात असती तर...

सौदी अरब तो देश आहे, जेथे पैगंबर हजरत मोहम्मद साहाब यांचा जन्म झाला होता. पवित्र मक्केत इस्लाम धर्माचा पाया रचला गेला. हे तेच शहर आहे, जेथे पवित्र कुराण लिहिले गेले. यासाठी हे शहर मुस्लिमांसाठी सर्वांत पवित्र आणि धर्माच्या दृष्टीने सर्वोच्च मानले जाते. दरवर्षी आयोजित होणारी हज यात्रा याच मक्का शहरात होते. यासाठी मक्का हे शहर व्हॅटिकन आणि हरिद्वारसारखेच जगविख्यात आहे. मक्केत घडणार्‍या घटनांना जगाच्या पाठीवर वसलेल्या मुसलमानांसाठी आदर्श म्हणून मानले जाते.

अतिरेक्यांवर विश्वास अन रॉ वर शंका ???????

सेक्युलर दहशतवाद 

दहशतवादी लियाकत शाह
राज्यातील पोलिस आणि गुप्तचर विभाग यांच्यात गोपनीय माहितीचे आदान-प्रदान करणे ‘मॅक’चे प्रमुख कार्य आहे. लियाकतला अटक होण्याच्या अवघ्या काही वेळ आधीच मॅकने एक दूरध्वनी संभाषण टेप केले होते. ज्यात म्हटले होते की, ‘‘तू दिल्लीतील जामा मशीद भागात जा. तेथील एका गेस्ट हाऊसमध्ये तुला सामान मिळेल आणि माणसेही तुला तेथेच भेटतील.’’ हे संभाषण लियाकत आणि पाकिस्तानात बसलेला हिजबुलचा दहशतवादी इरफान यांच्यात झाले होते.

Thursday, April 4, 2013

दहशत पसरवण्यासाठी 'ते' तयार


दीप्तीमान तिवारी । नवी दिल्ली ( महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन वृत्त )

भारतात सक्रिय असणा-या दहशतवादी संघटनांना दहशतवादी कृत्यांसाठी तरुण मुले शोधण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार नसल्याचे दिसत आहे. सध्या धर्मांध तरुणांचे गट स्वत:हून दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. मुसलमानांवर अत्याचार होत असल्याची भावना या तरुणांच्या मनात रुजत असल्याने ते स्वत:च या कडव्या संघटनांकडे जात आहेत. भारतात सक्रिय असणा-या दहशतवादी संघटनांपैकी इंडियन मुजाहिदीन (आयएम) आणि लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांची हैदराबाद बॉम्बस्फोटासंबंधी चौकशी केल्यानंतर हे धक्कादायक सत्य समोर आले आहे. जास्त कष्ट न करता तरुण स्वत:हूनच दहशतवादी संघटनामध्ये काम करण्यास तयार होत असल्याचा हा नवीन ट्रेण्ड चिंतेचा विषय असल्याचे मत गुप्तचर संघटनांनी व्यक्त केले आहे. दहशतवादी संघटनांमध्ये स्वेच्छेने येणा-या तरुणांना आपल्याच देशाच्या विरोधात वागण्याचा पश्चाताप होत नसल्याची माहिती सैय्यद मकबूल, इमरान खान आणि ओबैद उर रहमान यांनी राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एनआयए) अधिका-यांना दिली.

हिंदू आतंकवाद ? सरकारचा खोटारडेपणा उघड

दैनिक भास्कर ऑनलाईन वृत्त / लखनऊ.
केंद्रीय गृह मंत्री सुशील कुमार शिंदे बीजेपी और आरएसएस पर भले ही आतंक का ट्रेनिंग कैंप चलाने का आरोप लगाते हैं लेकिन भारत सरकार के पास इसे साबित करने के लिए कोई सुबूत नहीं है। इतना ही नहीं, केंद्र सरकार यह भी बताने में विफल रही कि देश में अल्‍पसंख्‍यकों पर अत्याचार की कुल कितनी वारदातें हुई हैं। ये सूचना का अधिकार कानून के तहत मांगी गई सूचना में सामने आया है। आरटीआई कार्यकर्ता उर्वशी शर्मा को दी गई जानकारी में केंद्र सरकार यह भी बताने में विफल रही कि देश में घुसपैठ की कुल कितनी घटनाएं हुईं और विद्रोह कहां-कहां हुआ। 

विवेक विचारचा एप्रिल महिन्याचा अंक

विवेकानंद केंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारचा एप्रिल महिन्याचा अंक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा …
विवेक विचार एप्रिल 2014



बराक ओबामांची योगासनांना पसंती


वॉशिंग्टन। दि. १ (वृत्तसंस्था)
हिंदुत्ववादास चालना मिळत असल्याचे सांगून अमेरिकेतील काही शाळांनी योगाविरोधी भूमिका घेतली असताना व्हाईट हाऊसने मात्र लाभदायी शारीरिक कसरत म्हणून योगाचा मन:पूर्वक अंगीकार केला आहे.

Tuesday, April 2, 2013

विज्ञानाला अज्ञात असलेल्या 11 प्रजाती शोधणारा संशोधक

वर्धापन दिन विशेष : सोलापूरची जागतिक ओळख


प्राचीन काळी सोन्नलपूर नावाने प्रसिद्ध असलेले सोलापूर हे ऐतिहासिक शहर आहे. भुईकोट किल्ला, तलावाच्या मध्यभागी वसलेले ग्रामदैवत सिद्धेश्वराचे मंदिर या वैशिष्ट्यांसोबतच जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोग्या अनेक गोष्टी सोलापूरशी निगडित आहेत.

Monday, April 1, 2013

कर्तबगार राज्यकर्ता - छत्रपती संभाजी

ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी लागणारा दृढनिश्‍चय, त्यासाठीचे प्रयत्न, प्रयत्नातील सातत्य आणि आक्रमक पवित्रा ही सर्व तंत्रे आत्मसात करून, शत्रूंचा मुकाबला करणारा महान पराक्रमी राज्यकर्ता म्हणून छत्रपती संभाजी राजे यांचा उल्लेख करावा लागेल. प्रचंड पराक्रमी छत्रपतींचा पुत्र असल्याकारणाने त्यांच्या कर्तबगारीशी संभाजी राजांची प्रत्येकाने तुलना केल्यामुळे, मोठी गफलत झालेली दिसून येते.

फुले यांची संघर्षशीलता आणि हेडगेवार यांची संघटनशरणता

--पेशवाईचा अस्त १८१८ साली झाला आणि महाराष्ट्रात अव्वल इंग्रजी शासनाचा कालखंड सुरू झाला. १८३२ सालापासून महाराष्ट्रात प्रबोधनपर्वास सुरुवात झाली, असे मानण्यात येते. आपण पारतंत्र्यात का गेलो? त्यासाठी आपले सामाजिक दोष कसे कारणीभूत झाले आहेत? आपल्या धर्मात काही मूलगामी दोष निर्माण झाले आहेत का? याचे चिंतन आणि मनन सुरू झाले. बाळशास्त्री जांभेकर, न्यायमूर्ती रानडे, आगरकर आणि महात्मा जोतिराव फुले आदी थोर पुरुषांची नावे या प्रबोधनपर्वाशी जोडली गेलेली आहेत. यांपैकी महात्मा जोतिराव फुले हे महाराष्ट्रातील आणि देशातीलही बहुजन समाजातील पहिले समाजक्रांतिकारक आहेत.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी