Monday, April 22, 2013

शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!



पुण्यातील कबीर कला मंचच्या माध्यमातून सक्रिय असलेल्या साठे व माळी यांच्याविरुद्ध वर्षभरापूर्वी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून फरार असलेल्या या दोघांनी नुकतेच विधिमंडळाजवळ उभ्या असलेल्या पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या दोघांच्या अटकेवरून संपूर्ण महाराष्ट्रात काहूर उठले आहे. या दोघांचे सध्या अटकेत असलेल्या अँजेला सोनटक्के या नक्षलवादी महिलेसोबत संबंध होते या एकाच कारणावरून त्यांना नक्षलवादी ठरवले जात आहे, असा आरोप पुरोगामींच्या वर्तुळातून केला जात असला तरी प्रत्यक्षात हे दोघेही २०११च्या नोव्हेंबरपासून २०१२च्या एप्रिल महिन्यापर्यंत उत्तर गडचिरोलीच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत सक्रिय होते, अशी माहिती आता समोर आली आहे.
याच भागात सक्रिय असलेल्या एका प्लॉटून कमांडरसह चार नक्षलवाद्यांनी गेल्या मार्चमध्ये गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या चौघांची चौकशी सुरू असताना त्यांना शीतल साठे व सचिन माळी यांची छायाचित्रे इतर काही छायाचित्रांमध्ये मिसळवून दाखवण्यात आली. या चौघांनी नेमके या दोघांना ओळखले असा दावा पोलिसांनी केला आहे. जंगलातील चळवळीत सक्रिय असताना शीतल साठे जानकी या नावाने वावरली. नक्षलवाद्यांचे दलम छत्तीसगडमध्ये गेल्यानंतर तिला शबनम व वंदना या दोन नावाने ओळख देण्यात आली. शीतलचा पती सचिन माळी या काळात समर या नावाने चळवळीत वावरला. हे दोघेही नक्षलवाद्यांच्या राज्य समितीचा सचिव मिलिंद तेलतुंबडे ऊर्फ दीपक याच्यासोबत राहिले. २०१२च्या जानेवारी महिन्यात गोंदिया जिल्हय़ातील दरेकसा भागात झालेल्या नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीच्या बैठकीला सुद्धा हे दोघे हजर होते.
या सहा महिन्यांच्या काळात तीनदा या भागातील नक्षलवाद्यांची पोलिसांसोबत चकमक उडाली. तेव्हाही हे दोघे सोबत होते. जंगलातील वास्तव्याच्या काळात शीतल साठे व माळी यांनी नक्षलवादी चळवळीच्या प्रसाराची जबाबदारी असलेल्या कला पथकांना प्रशिक्षण दिले. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारविरोधी सूर कसा लावायचा या संबंधीचे हे प्रशिक्षण होते. यासाठी या दोघांनी 'जयभीम कॉम्रेड' या नावाच्या पथनाटय़ाच्या काही सीडीजसुद्धा सोबत आणल्या होत्या. त्या अनेक बैठकांमधून चळवळीतील सदस्यांना दाखवण्यात आल्या. हे दोघेही पुणे व ठाणे भागात सक्रिय असलेल्या पश्चिम विभागीय समितीचे सदस्य आहेत, अशी ओळख मिलिंद तेलतुंबडेने प्रत्येक बैठकीच्या वेळी करून दिली होती, असा जबाब आत्मसमर्पण केलेल्या चार नक्षलवाद्यांनी दिलेला आहे. या दोघांचा चळवळीशी कोणताही संबंध नाही, केवळ विद्रोही विचार बाळगला म्हणून त्यांना अटक करण्यात आली, असा कांगावा करत राज्यातील काही राजकीय नेत्यांनी या दोघांना विधिमंडळासमोर समर्पण करायला लावले होते. मात्र, केवळ गर्भवती असल्यामुळेच जाणीवपूर्वक शीतल साठे व तिच्या पतीने समर्पणाचा पर्याय स्वीकारला, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
साठे व माळी हे दोघेही नक्षलवादी चळवळीत सक्रिय असल्याचा भक्कम पुरावा आमच्याजवळ असून या दोघांना लवकरच चौकशीसाठी गडचिरोलीत आणले जाणार आहे, असे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना सांगितले. शाहिरी अथवा विद्रोही कविता करणे वेगळे आणि शस्त्रधारी नक्षलवाद्यांना सोबत करणे यात फरक आहे, असे ते म्हणाले.
************
SHEETAL

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

नक्षल चळवळीशी संबंध असल्याचा आरोप ठेवून अटक वॉरंट जारी केल्यानंतर दहशतवादविरोधी पथकासमोर शरण आलेले शाहीर शीतल साठे आणि सचिन माळी या पती-पत्नीला जेलमध्ये मारहाण करू नये, त्यांना नीट वागणूक द्यावी अशी विनंती करणारी पत्र जगभरातून मुंबईच्या ऑर्थर रोड जेल आणि भायखळा येथील महिला कारागृहाला प्राप्त होत आहे. यात अनेक पत्र फ्रान्स, कॅनडा, ब्रिटन, थायलंड, पोर्तुगाल आणि जर्मनी या देशांमधून आलेली आहेत. ही पत्र इंग्रजी आणि फ्रेंच भाषेत लिहिलेली आहेत. या दोघांनाही शारीरिक त्रास देऊ नये आणि सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या शीतल साठेला वैद्यकीय मदत द्यावी अशी विनंती पत्रांद्वारे करण्यात आली आहे.

जेल निरिक्षकांकडे आतापर्यंत फॅक्सद्वारे ३० पत्रे आलेली आहेत. तर ५० पत्रे परदेशातून आली आहेत. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या कार्यालयाला सुद्धा अशाच आशयाची बरीच पत्र मिळाली आहेत.

राज्याचे पोलीस महानिरिक्षक (कारागृह) विनोद लोखंडे यांना उद्देशून लिहिलेल्या एका पत्रात म्हटले आहे, 'शीतल साठे आणि सचिन माळी या दोघांना २ एप्रिल रोजी अटक करण्यात आली. त्या दोघांच्या चिंतेपोटी मी हे पत्र तुम्हाला लिहित आहे. पोलिसांकडून होणारी मारहाण आणि वागणुकीमुळे त्यांचं जीवन धोक्यात आले आहे.'

सततच्या येणाऱ्या पत्रांमुळे जेल अधिकाऱ्यांनी फॅक्स मशीन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 'आमच्याजवळ जास्त स्टेशनरी नाही. सर्व पत्रांचा मजकूर एकसारखाच आहे. पाठविणारे मात्र वेगवेगळे आहेत.' असं एका जेलमध्ये तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

गावा गावात जाऊन शाहिरी जलशांमधून जनजागृती करणाऱ्या 'कबीर कला मंच' या सांस्कृतिक संघटनेचे सदस्य असलेल्या या दोघांना पोलिसांनी २ एप्रिल रोजी ताब्यात घेतले होते. बहुजन महासंघाचे नेते, माजी खासदार प्रकाश आंबेडकर, भाकपचे कॉ. प्रकाश रेड्डी, आणि प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक आनंद पटवर्धन यांच्या समक्ष हे दोघे पोलिसासमोर हजर झाले होते.http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19666174.cms
************
ublished: Wednesday, April 3, 2013
कबीर कला मंचचे कार्यकर्ते शीतल साठे (२७)आणि सचिन माळी (३०) मंगळवारी दुपारी पोलिसांना शरण आले. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना अटक केली. नक्षलवादी चळवळींशी संबंध असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गेल्या दोन वर्षांपासून ते भूमिगत होते.
सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास शीतल आणि सचिन कार्यकर्त्यांसोबत विधानभवनाच्या आवारात आले. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्यांनी घोषणा देत आंदोलन केले. त्यांच्या सोबत रिपाईचे नेते प्रकाश आंबेडकर, मार्क्‍सवादी पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, भालचंद्र कांगो, आनंद पटवर्धन आणि इतर कार्यकर्ते हजर होते. पोलिसांनी ठेवलेल्या खोटय़ा आरोपांचा त्यांनी निषेध केला. मरिन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन नंतर दहशतवादविरोधी पथकाकडे सुपूर्द केले.
याप्रकरणी न्यायालयात आव्हान देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दहशतवादविरोधी पथक आणि राज्य पोलीस त्यांच्या मागावर होते.
शरण जाण्यापूर्वी शीतल आणि सचिन यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडण केले.
 २०११ साली दहशतवाद विरोधी पथकाने एंजला सोनटक्के (वय ४२) यांना ठाण्यातून तर सुषमा रामटेके यांना (२७) पुण्यातून अटक केली होती. त्याच्या नंतर पोलिसांनी अटकसत्र सुरूच ठेवत जेनी (२३) ज्योती चोरघे (१९) आणि अनुराधा सोनुले (२३) यांनाही पुण्यातून अटक केली होती.http://www.loksatta.com/mumbai-news/shital-sathe-and-sachin-mali-surrender-92248/

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी