Monday, July 2, 2012

सांस्कृतिक मुळांपासून तुटणारे काश्मीर

बलबीर पुंज 
सध्या काश्मीरमध्ये असलेल्या कथित शांतीमागे लपलेले नेमके सत्य काय आहे? काश्मीर खोर्‍याची पर्यटकांना सामावून घेण्याची जेवढी क्षमता आहे त्याच्या कितीतरी पट अधिक पर्यटक यंदा जम्मू-काश्मिरात आले, कुठेही काहीही अप्रिय घटना घडली नाही. परंतु, काश्मिरातील ही शांती खरोखरच स्थायी स्वरूपाची आहे काय आणि काश्मीरची संस्कृती आपल्या मूळ स्वरूपात परतली आहे असे आम्ही मानायचे काय? यामागचे कटु सत्य हेच आहे की, सध्या दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची स्थिती आहे. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे दहशतवादामुळे त्रस्त स्थानिक सामान्य जनतेकडून पाठिंबा मिळत नसल्यामुळे दहशतवादी सध्या ‘तात्पुरते’ निष्क्रिय आहेत आणि दुसरीकडे फुटीरवादाची समस्या सध्या भूमिगत आहे. गेल्या काही दशकांत काश्मीर खोर्‍यात जो प्रचंड सांस्कृतिक विनाश झाला आहे त्याबाबत केंद्र सरकार आणि उर्वरित भारताने तडजोडच केली आहे आणि ही सांस्कृतिक हानी भरून काढण्याचे प्रयत्न कधीही झालेले नाहीत. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती ठेवण्याचे धोरण राबवण्यात येत आहे.

डॉ. कलाम यांनीच सोनियांना रोखले होते

ते’ पत्र सार्वजनिक करण्याची मागणी
 वृत्तसंस्था
 नवी दिल्ली, १ जुलै
 कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला असता तर त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केलेल्या दाव्याला जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिले आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी