Sunday, February 20, 2011

लज्जास्पदच..

माघी वारीसाठी गावातील भाविकांसमवेत एक आठरा वर्षीय तरुणी पंढरीला जाते. तिथे गावतीलच उनाड पोरं तिची छेड काढतात, इतकेच नाही तर वारीतून गावी परतल्यानंतर ही पोरं त्या घटनेची वाच्यता करतात आणि त्यामुळे घडल्या घटनेची गावात कुजबूज सुरू होते. यामुळे होणारा मनस्ताप सहन न होऊन ती तरुणी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न करते, ही मोहोळ तालुक्यातील एका छोट्या खेड्यातील दुर्घटना समाजासाठी लज्जास्पदच आहे. ही तरुणी त्या कामांधांचा डटून मुकाबला करते यासाठी तिचा गौरव करून गावकर्‍यांनी त्या उनाड पोरांना दंडित केले पाहिजे होते. परंतु तसे काहीच झाले नाही. उलट त्या कन्येवर आत्महत्या करण्याची नामुष्की आली. आपला समाज आतून तुटत चालल्याचे हे लक्षण आहे. असा आतून तुटलेला समाज पंढरीच्या कितीही वार्‍या केल्या तरी पदरी पुण्य पडणे कसे शक्य आहे? आज आमच्या ग्रामीण समाजाला संकुचिततेचा रोग जडला आहे. त्याचे कान खूपच हलके झाले आहेत. पूर्वी गावांमध्ये असलेला एकोपा आता राहिलेला नाही. 'मी आणि माझं घर' या पलिकडे त्याला दिसेनासे झाले आहे. माणूस जेवढा स्वार्थी तेवढा तो अनीतीमान बनतो. तो ऐकीव गोष्टींची चर्चामिटक्या मारून करू लागतो आणि त्यातून असे प्रकार घडतात. त्यामुळे वारीला जाऊनही गावातील दुष्ट शक्तींना दंडित करण्याची धमक ग्रामस्थांत येत नसेल तर ही वारी, चंद्रभागास्नान, भजन-पूजन काय कामाचे? 

दुसरी कडे स्वत:ला सुशिक्षित समजणारा शहरी समाज मात्र स्वैर आणि कोडगा झाल्याचे दिसत आहे. देशातील एका नामवंत इंग्रजी दैनिकाच्या कालच्या रविवार पुरवणीच्या मुखपृष्ठावर तीन उच्चभ्रू आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या मध्यमवयीन महिलांची छायाचित्रे आहेत. त्या म्हणतात, 'माझा मुलगा समलिंगी आहे, याचा मला अभिमान आहे.' आणि हे मुखपृष्ठावर मोठ्या अक्षरांत छापले आहे. आतील पानांत यावर विस्तृत लेख आहे. जे अनैसर्गिक आहे, जे विकृत आहे, जे लज्जास्पद आहे ते मिरविण्याची ही घातक पद्धत आहे. याने समाजाचे काहीही भले होणार नाही. ठळकपणे समोर आलेले हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. समाजप्रबोधनाची बाब दूर राहिली, या विकृत 'बाळां'चा अभिमान बाळगणार्‍या माता या 'धाडसी आणि समजूतदार' असल्याचे प्रशस्तीपत्रक प्रस्तुत संपादकाने दिले आहे. ही अधोगती रोखलीच पाहिजे, त्यासाठी समाजातील विचारी लोक सक्रिय होतील ?

-सिद्धाराम भै. पाटील
... तर मग पती-पत्नी बनून राहू लागतील दोन महिला !

4 comments:

  1. छान लिहिले आहे तुम्ही.
    त्या तरुणीला आत्महत्या करावी लागली हा खरच दुर्देवी प्रकार आहे. :-(
    माझ्या ब्लॉगचा पत्ता:http://prashantredkarsobat.blogspot.com/

    ReplyDelete
  2. ज्यांचा धाक वाटावा असे नेतृत्वच गावांमध्ये उरलेले नाही ही अनेक गावांची शोकांतिका आहे.
    www.nisargvarta.blogspot.com

    ReplyDelete
  3. Anonymous10.12.11

    सर, पहिली घटना खरंच लज्जास्पद व समाजमूल्यांना काळिमा फासणारी आहे ह्यात वाद नाही... :(

    पण पाटिल साहेब, ज्यांना तुम्ही "स्वैर", "कोगडे", "विकृत", "अनैसर्गिक" म्हणत आहात, त्यांच्यापेक्षा तुमची मानसिकता अतिशय सडकी व समाजाला अधिक हानिकारक नाही का?
    उलट मी त्या सर्व समलैंगिक individualsना सलाम करतो, जे आपली नैसर्गिक ओळख लपवून न ठेवता तिला स्विकार करण्याचं धाडस बाळगतात. केवळ पालकांच्या व समाजिक दबावामुळे भिन्नलिंगी व्यक्तिशी संसार करणारे अनेक लोक आहेत, पण त्यांच्या ह्या निर्णयामुळे जर स्वतःच्या, जोडिदाराच्या व इतर अनेकांच्या आयुष्याचं वाटोळं होत असेल, तर अशा समाजव्यवस्थेला काय अर्थ आहे?
    "तुमचं वाचन कमी पडतंय राव!" आधी basic concepts clear करा! नैसर्गिक-अनैसर्गिक ठरवण्याआधी संशोधन करा. त्यासाठी इंटरनेट वर असंख्य संसाधनं उपलब्ध आहेत... :P
    http://www.miloonsaryajani.com/node/450 हा लेख जरूर वाचावा ही विनंती. अर्थात तो वाचल्याने आपले पूर्वग्रह नक्कीच नष्ट होणार नाहीत ह्याची मला खात्री आहे. शेवटी तुमची मानसिकता ह्या पुरोगामीत्वाच्या पलीकडची आहे! :P
    आणखी एक... तुम्ही "अनैसर्गिक" म्हणून कितीही भुंकलात, तरीही "समलैंगिकता" तेवढीच नैसर्गिक व समाजमान्य राहाणार! :)

    ReplyDelete
  4. अंबाला / चंदीगड - अंबाला येथे दोन महिलांनी आपसात विवाह केल्यानंतर त्यांना संरक्षण देण्याच्या प्रश्नावर पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात सुनावणी सुरु आहे. हायकोर्टाने समलैंगिक विवाहाच्या वैधतेवर एमिक्स क्युरीची ( न्यायालय मित्र ) नियुक्ती केली आहे. समलैंगिक विवाहावर हिंदू विवाह कायद्याच्या परिप्रेक्ष्यातून न्यायालयात सुनावणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

    शुक्रवारी न्यायालय मित्र व वरिष्ठ वकील अनुपम गुप्ता यांनी आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ मागितली. दोन महिलांच्या विवाहाला कायद्याने मान्यता नसल्याने या विवाहाला अवैध मानण्यात यावे, अशी मागणी हरियाणा सरकारने न्यायालयाकडे केली आहे.

    अशा प्रकारच्या विवाहांना मान्यता मिळाल्यास समाजात अनैतिकता फैलावेल, अशी भूमिका पोलिसांनी मांडली आहे. दोन्ही महिलांनी दाखल केलेल्या याचिकेत आपल्या जीविताला धोका असल्याचे म्हटले आहे.

    ... तर मग पती-पत्नी बनून राहू लागतील दोन महिला !
    याचिकाकर्त्यांना आपल्या संरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार आहे, परंतु त्यांचा विवाह वैध ठरवला जाऊ शकत नाही, असे सरकारने म्हटले आहे. महिलांनी याचिकेत म्हटले आहे की, त्या आपल्या पतीपासून वेगळे राहात आहेत. तीन वर्षांपासून त्या दोन्ही महिलांची मैत्री होती, नंतर ते एकमेकांवर प्रेम करू लागले. गेल्या वर्षभरापासून ते पती-पत्नीसारखे राहात आहेत.
    http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-marriage-between-two-gay-women-first-time-hearing-2629803.html

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी