Thursday, November 10, 2011

'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न

हिंदू विचारांवर श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. अन्य धर्म जन्मास येण्यापूर्वीही हिंदू धर्म अस्तित्वात होता. तेव्हा या धर्माला सनातन धर्म म्हणत. जगातील अन्य भागातील लोकांना कपडे घालायचीही बुद्धी नव्हती तेव्हा या भारत देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती.
नंतर काळाच्या ओघात आपल्या जीवनपद्धतीत अनेक दोष येत गेले आणि अवनती होत गेली. असे असले तरी हिंदू धर्म हा विकसित होत जाणारा धर्म आहे. विज्ञानाशी सुसंगत आहे. हिंदू धर्मात शिरलेल्या वाईट गोष्टी दूर करून हिंदूंचे प्रबळ संघटन करणे हे हिंदू संघटनांचे कार्य आहे. अशाच एका संघटनेच्या माध्यमातून काम करणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे.
हिंदू संघटनेचा कार्यकर्ता म्हणजे तो असहिष्णूच असला पाहिजे, अशी एक समज पसरलेली आहे. स्वत:ला सेक्युलरवादी म्हणविणारे नेहमीच या समजाला चलाखीने खतपाणी घालतात आणि त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये हा समज पक्का होत जातो. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीसारखी एखादी हिंदू संघटना देऊळसारख्या चित्रपाटील गाण्याला विरोध करण्यास सरसावते तेव्हा सर्वसामान्य हिंदूच नव्हे तर अन्य छोट्या-मोठ्या हिंदू संघटनांचे कार्यकर्तेही संभ्रमित होतात.
देऊळ चित्रपटाचे दिग्दर्शन अतिशय सशक्त आहे. कलाकारांनी अतिशय कसदार भूमिका केली आहे. त्यामुळे चित्रपट मनाचा ठाव घेतो. पण म्हणून हिंदू जनजागृती समितीचा विरोध गैर ठरतो काय, हा मला पडलेला प्रश्न आहे.
चित्रपटातील एका गाण्याला विरोध करणारी हिंदू जनजागृती समिती काय काम करते, हे पाहणे येथे गरजेचे वाटते. गेल्याच महिन्यातली एक बातमी आहे. ही बातमी देशातील सर्वाधिक खप असणा-या दै. भास्करमध्ये प्रसिद्ध झाली होती. देशात फायनान्स क्षेत्रात काम करणा-या मुथूट फायनान्स अ‍ँड गोल्ड लोन या कंपनीने १७ मार्च २०११ रोजी एक आदेश जरी केला होता. कंपनीचे सेक्रेटरी शाईनी थॉमस यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते की, महिला आपल्या बोटात केवळ वेडिंग रिंग घालू शकतील. महिलांना मंगळसूत्र किंवा कानातले अलंकार घालता येणार नाही. पुरुष कर्मचारी घड्याळ घालू शकतील, गळ्यात चेन आणि बोटात अंगठी घालू शकतील मात्र कपाळावर गंध लावू शकणार नाहीत. मनगटावर रक्षाबंधनाच्या दुस-या दिवशी राखीही घालू शकणार नाही. जगात ख्रिश्चन धर्म हाच एकमेव धर्म आहे, असे वाटणा-या लोकांकडून असा आदेश काढण्यात आला होता. याविरुद्ध हिंदू जनजागृती समितीने लोकशाही मार्गाने आवाज उठवला आणि संबंधित कंपनीने माफी मागून हिंदूंचा अपमान करणारा आदेश मागे घेतला.
हिंदू देव देवतांची आणि भारतमातेची नग्न चित्रे काढणा-या एम एफ हुसेनच्या विरोधातही लोकशाही मार्गाने लढा देऊन देशभरात हजारो पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या. हुसेनने शेवटी या देशातून पळ काढणे पसंद केले.
आपल्या भाषणांतून हिंदू धर्माची हेटाळणी करणे, हिंदू देव-देवतांचा अवमान करणे सर्रास सुरू होते. हिंदू जनजागृती समितीमुळे अलीकडच्या काळात या प्रकाराला आळा बसला आहे. गणेशोत्सव आणि अन्य उत्सवांमध्ये चालणारे गैरप्रकार थांबविण्यात या संघटनेने मोलाची कामगिरी बजावली आहे. हिंदू धर्मच खरा धर्म आहे अणि इतर धर्म खोटे आहेत आणि ते नष्ट केले पाहिजेत अशी भूमिका या संघटनेने कधीच घेतली नाही, कारण तशी हिंदू धर्माची शिकवण नाही. आकाशातून पडणारे पाणी शेवटी सागराला जाऊन मिळते, तद्वत तुम्ही कोणत्याही देवाची पूजा केली तरी ती एकाच ईश्वराला जाऊन मिळते ही हिंदू संस्कृतीची शिकवण आहे. परंतु अन्य काही धर्म हिंदू धर्माचे लचके तोडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. कधी धर्मांतरण करतात तर कधी जिहादच्या नावाखाली शिरकाण करतात. जगात आमचाच धर्म एकमेव सत्य धर्म आहे आणि अन्य धर्मियांना आपल्या धर्मात ओढले पाहिजे, ही त्यांची समजूत असते. त्या समजूतीपोटी ते विविध उपदव्याप करीत असतात. या कारवायांना पायबंद घालण्याचे काम ही संघटना यथाशक्ती करीत असते.
परंतु हिंदू शब्द उच्चारले तरी हा शब्द इतर धर्माच्या विरोधात आहे असा गंड बाळगणारे ही बाब कशा रीतीने समजून घेतील. आपल्या मुलाने घरी व्यायाम करू नये कारण व्यायाम करणे म्हणजे शेजारच्या माणसाचा द्वेष केल्यासारखे होईल असा विचार करणे जसे मूर्खपणाचे आहे, तसेच हिंदूंनी संघटना बांधणे म्हणजे ते अन्य धर्मियांच्या विरोधात आहेत, असे समजणेही मूर्खपणाचेच. हिंदू धर्म सोडून इतर सर्वच धर्म धर्मांतरावर विश्वास ठेवतात. कारण माझाच धर्म खरा अशी त्यांची भावना असते. हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणजे या धर्मीयांनी अन्यायही मुकाट्याने सहन केला पाहिजे असा भ्रम हिंदू धर्मावर श्रद्धा नसलेल्या बुद्धिवाद्यांनी पसरवलेला आहे.
या ठिकाणी आयबीएन लोकमतवर नुकतीच  झालेली चर्चा आठवते. 'देऊळ'ला विरोध का, या विषयावर चर्चा होती. चर्चेत सहभागी झालेले बुद्धीवादी सांगण्याचा प्रयत्न करीत होते की, देऊळला विरोध म्हणजे हिंदू धर्म असहिष्णू होत असल्याचे दिसते. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी समर्पक उदाहरण दिले. नोव्हेंबर २०११ च्या पहिल्या आठवड्यात युरोपातील एका देशात एका वृत्तपत्राने महंमद पैगंबर यांच्यावर टिपण्णी केली. दुस-या दिवशी तेथील मुस्लिम जमावाने ते वृत्तपत्र कार्यालय जाळून टाकले. हे उदाहरण देऊन शिंदे म्हणाले की, आमची संघटना लोकशाही मार्गाने विरोध करते त्याला तुम्ही असहिष्णू म्हणणार का ?
हिंदू धर्मीय सहिष्णू आहेत. परंतु एक हजार वर्षांच्या गुलामीमुळे आणि सेक्युलरवादाच्या भ्रमामुळे अनेक बुद्धीजीवींची अवस्था गांडूळासारखी कणाहीन झाली आहे. मान-अपमान यातील फरकही त्याला कळेनासे झाले आहे. भारतमाता, देवी सरस्वतीची नग्न चित्रे काढली तरी त्याला ती अपमान न वाटता कला वाटते. गोरगरीब, दु:खी हिंदूंना पाहून त्याचे हृदय कळवळत नाही. अन्यधर्मीय लोक हिंदूंचे फसवून धर्मांतर करतात, हे पाहून यांचे रक्त सळसळत नाही. त्यामुळे भगवान श्री दत्तात्रेय यांचा आयटम सॉंगच्या तालावर वापर झाल्यानंतर ते अपमान वाटेल असे कसे शक्य आहे ? 'देवा तुला शोधू कुठं' या भजनात अनावश्यक प्रणयसदृश्य कामुक दृश्ये पाहून भावना दुखावतील याची शक्यताच नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून निदर्शने करण्याचीही शक्यता कमी आहे. परंतु ज्यांच्या भावना अद्याप बोथट झालेल्या नाहीत, ज्यांच्या मनात धर्मप्रेमाची आग धगधगते आहे, ज्यांनी वैयक्तीक स्वार्थापलीकडे जाऊन  आपल्या दिनक्रमातील अधिकाधिक वेळ धर्मकार्यासाठी दिले आहे अशा हिंदू जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना त्या गाण्याला विरोध करण्याचा नैतिक अधिकार आहेच. ते इतरांसारखे आत्मविस्मृत नाहीत हा काय त्यांचा दोष आहे ? भगवान दत्तात्रेय यांचा आयटम सॉंगमध्ये वापर होऊ नये यासाठी लोकशाही मार्गाने विरोध करणे ही त्यांची चूक आहे काय ?

6 comments:

  1. Anonymous11.11.11

    namaskar sir, tumcha lekh avadala. deul chitraptachya ganyala virodh karne patle.parantu tya ganya pekshya hi nirlajja gani hindi chitrapatanmadhye pahayala miltat. tya ganyanwar hi sangatna ka aakshep ghet nahi. he tyanche kartya nahi ka? kuthali hi snaghatna aso tiche tatwa sarwana saman asawe. mi pan ek hindu aahe mala mazya pavitra hindu dharmat andhshrwdhyechi ghan gallogalli baghyala milate. tya wele mazi talmal hote. he sarwa tumchya sanghatnela disat nahi ka. tatparya yewdhech swarup paha.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. गिरीश कुलकर्णी यांची दांभिकता उघड
    पुणे, २९ नोव्हेंबर (वार्ता.) - आज तंत्रज्ञानाची क्रांती होत असतांना भरमसाठ देवळे उभारली जात आहेत. त्यामुळे ‘आता देव विसर्जित करा’, हे समाजाला सांगण्यासाठीच ‘देऊळ’ चित्रपटाची निर्मिती केली, असे चित्रपटाचे लेखक, अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी साने गुरुजी सभागृहात आयोजित केलेल्या ‘देऊळ : श्रद्धा कि अंधश्रद्धा’ या परिसंवादात विचार मांडतांना सांगितले. त्यामुळे ‘आयबीएन् लोकमत’ या वाहिनीवरील ‘आजचा सवाल’ कार्यक्रमात ‘देऊळ’ चित्रपटाच्या संदर्भातील चर्चासत्रात ‘आम्ही दत्तभक्तच आहोत. राजकारणासाठी देवळांचा केला जाणारा वापर थांबावा, यासाठी हा चित्रपट निर्माण केला’, असे सांगणार्‍या गिरीश आणि उमेश कुलकर्णी यांची दांभिकता उघड झाली. या वेळी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी, साहित्यिक संजय जोशी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते.

    १. गिरीश कुलकर्णी पुढे म्हणाले, ‘‘समाजाला थेट देव विसर्जित करा, असे सांगितले असते, तर माझ्या घरावर दगड पडले असते. मला मात्र हा संदेश केवळ बुद्धीजीवी लोकांपर्यंत नव्हे, तर सर्वांपर्यंत पोहोचवायचा होता. लोकांना भावूक होऊन एखादी गोष्ट सांगितली, तर ती पचनी पडते. म्हणून भावूकपणे चित्रपटातून मी हा संदेश दिला.’’
    २. ‘तुमचा देवावर विश्वास आहे का’, या प्रश्नाचे उत्तर देतांना गिरीश कुलकर्णी म्हणाले, ‘‘हो, नक्की आहे; पण मी कशाला देव मानतो, हे तुम्हाला काय माहीत ?’’

    डॉ. दाभोलकर म्हणाले, ‘‘चित्रपटातून देवाला विसर्जित करण्याचा संदेश देऊन कुलकर्णी यांनी डॉ. श्रीराम लागू यांची धुरा खांद्यावर घेतली आहे. आज गणेशोत्सव, नवरात्र, जन्माष्टमी, दत्तजयंती, गणेशजयंती, रामनवमी आदी सण साजरे केले जातात. हे क्रमशः होत असलेले धर्माचे व्यापारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण आहे.’’

    या चित्रपटातून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देण्याचा विचार होता का, असे चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘लोकांना कोणताही संदेश देण्याची आमची भूमिका नव्हती.’’ त्यांचे हे वक्तव्य लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या ‘देव विसर्जित करा’, या भूमिकेशी पूर्णपणे विसंगत होते.
    हिंदू जनजागृती समितीने चित्रपटाला विरोध केला आहे. समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला अंनिस विरोध करतो. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या अर्थाने कुलकर्णी द्वयींनी अंनिसची संधान साधलेले दिसते, तर दुसर्‍या बाजूने हिंदूंना दुखावून चालणार नाही, हे माहीत असल्याने चित्रपटाचे लेखक धर्मद्रोही वक्तव्ये करतात, तर दिग्दर्शक कुलकर्णी सौम्य भूमिका घेऊन हिंदूंची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

    ‘हिंदूंचे श्रद्धास्थान नष्ट करण्याचा आणि हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचा हेतू या चित्रपटाच्या निर्मितीमागे असल्याची हिंदु जनजागृती समितीने मांडलेली भूमिका योग्यच होती, हे गिरीश कुलकर्णी यांच्या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे. ‘देऊळ’ चित्रपटाच्या नावाखाली नास्तिकवादाचा प्रचार करण्याचा आणि समाजाला नास्तिक बनवण्याचाच उद्देश दिसून येतो. त्यामुळे समस्त भाविक, दत्तभक्त आणि धर्माभिमानी हिंदू यांनी ‘देऊळ’ चित्रपटावर आणि गिरीश अन् उमेश कुलकर्णी यांच्या येणार्‍या प्रत्येक चित्रपटावर बहिष्कार टाकावा, असे आम्ही आवाहन करतो.’ - श्री. रमेश शिंदे, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.

    ReplyDelete
  4. Anonymous27.10.12

    andhashraddha nirmulan samiti var chikhal udvine aata band kara, nikop drishti denyachi ani swata la saksham banavnya chi kshamata asaleli hi sanghatana aahe. deva chi sankalpana agrahane mandanari navhe, ki jyamule vyakti ani asamaj nishkriy banat chalala aahe. tyach pramane asha kahi hindu sanghatana hinsak paddhati ne dahashat majavat ahet, tyanche samarthan kadhich karata yenar nahi, anyatha talibani pravrutti ani ase hinsak hindu yanchyat kay farak aahe?

    ReplyDelete
  5. Aekach ganapatichi 1000 lokanni puja keli tar chalat nahi ka ? dharmacha danda jya sanajane mandala aahe va tyakarita sarva dharma niyam payadali tudavalet tya samajala kaya mhanayache ?

    ReplyDelete

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी