Saturday, November 11, 2017

हासन हास्यास्पद का ठरला ?

2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्‍वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्‍या बायका - मुलांवर काढणार्‍या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे.

तामीळनाडू हे दक्षिण भारतातील एक महत्त्वाचे राज्य. पण मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर तेथील राजकीय वर्तुळात एक अभूतपूर्व पोकळी निर्माण झाली आहे. वयाच्या शंभरीकडे वाटचाल करत असलेले  डीएमकेचे ज्येष्ठ नेते करुणानिधी हे आपल्या घरातील कलहामुळे हतबल झाले आहेत. त्यांचे पुत्र आणि पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन  हे अधूनमधून हिंदू मंदिरांना भक्तिभावाने भेटी देत आहेत. डीएमके हा हिंदू भावनेचा आदर करणारा पक्ष आहे, असा संकेत देण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. दरम्यान, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात चेन्नई भेटीवर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करुणानिधी यांची स्टॅलिन यांच्या उपस्थितीत सदिच्छा भेट घेतली आहे.
सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षातील माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम आणि विद्यमान मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांच्यातील दुरावा वाढतच चालला आहे. पलानीस्वामी यांची पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेली जवळीकता काही लपून राहिलेली नाही. एकूणच भारतीय जनता पक्ष हा 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूत जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि याच वेळी तामिळनाडूतील काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांचे पुत्र कार्ती चिदंबरम् हे भ्रष्टाचाराच्या जाळ्यात रूतत चालले आहेत. थोडक्यात, तामिळनाडूत काँग्रेस कुठेही स्पर्धेत दिसत नाही.
या पार्श्‍वभूमीवर तामीळ चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज कलावंत रजनीकांत आणि कमल हासन यांच्या नावांची चर्चा होणे अतिशय स्वाभाविक आहे. कारण तामीळ राजकारणातून चित्रपटसृष्टी वजा केली तर काहीच राहणार नाही. तामिळी जनतेने आजवर चित्रपटसृष्टीतील अभिनेत्यांना नेता म्हणून डोक्यावर घेतल्याचा अनुभव आहे. म्हणूनच  भारतीय जनता पक्षाने रजनीकांतला पक्षात आणण्याचा प्रयत्न चालवला होता. दरम्यान, रजनीकांतमध्ये नेता होण्यासाठीचे गुण नाहीत, असे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.
तामीळ जनता सिने नट - नट्यांना स्वीकारते याचा अर्थ प्रत्येक सुपरस्टारमध्ये नेतृत्वगुण असतीलच असे नाही. कदाचित रजनीकांतला याची जाणीव असावी. आपले आरोग्य, वय आणि मर्यादा ओळखून त्याने राजकारणात सक्रीय होणे टाळले असावे असे वाटते.
या पार्श्‍वभूमीवर 63 व्या वर्षी तामीळ अभिनेता कमल हासन गेल्या तीन महिन्यांपासून चर्चेत आहे. हासन याची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी गेल्या तीन महिन्यातील त्याची बदलत गेलेली भूमिका पाहाणे आवश्यक ठरते.
तामिळनाडूत भाजपसाठी अनुकुल वातावरण असल्याचे पाहून कमल हासन सुरूवातीला म्हणाला की, जनतेच्या भल्यासाठी वेळ पडल्यास मी भाजपमध्ये प्रवेश करेन. त्यासाठी सिनेमात काम करणेही सोडून देईन. भाजपला माझी विचारधारा माहीत आहे. राज्याच्या हिताचा विचार केल्यास आणि त्यांना माझ्या विचारधारेचा अडथळा वाटत नसेल तर मी भाजपमध्ये प्रवेश करू शकतो. जनतेच्या भल्यासाठी मी राजकारणात कोणतीही अस्पृश्यता मानत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कमल हासनची नुकतीच भेट घेऊन पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यानंतरचे हासन याचे हे वक्तव्य आहे, हे ध्यानात घेतले पाहिजे.
त्याच्या विवेकवादी भूमिकेबद्दल विचारले असता, तो म्हणाला माझ्या मते विवेकवादी असणे म्हणजे मंदिर उद्ध्वस्त करणे नव्हे. तुम्ही रातोरात कोणाच्याही श्रद्धेला नष्ट करू शकत नाही, ते आपोआप होईल. माझी विचारधारा सर्वश्रूत आहे. काही मार्क्सवादी आणि समाजवाद्यांचा मी चाहता आहे. डावी विचारधारा सोडण्याचा प्रश्‍नच येत नाही. मी केवळ थोडीशी तडजोड करतोय.
काँग्रेस किंवा डीएमकेमध्ये प्रवेश करणार का?, या प्रश्‍नावर तो म्हणतो, मी भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे. अशा लोकांसोबत मला जायचे नाही.
म्हणजे, कमल हासन जाणून आहे की काँग्रेस आणि डीएमकेमध्ये भवितव्य नाही. अण्णा द्रमुकमध्ये मुख्यमंत्रीपदाची शक्यताच नाही. या पार्श्‍वभूमीवर भाजप प्रवेश करण्याची त्याची तयारी आहे. परंतु, भाजप त्याला स्वीकारण्यास उत्सुक दिसला नाही. त्याचा परिणाम म्हणजे कमल हासनने मांडलेली वादग्रस्त भूमिका होय.
तामिळ साप्ताहिक ‘आनंद विकटन’ला दिलेल्या मुलाखतीत कमल हासन म्हणतो, ‘हिंदू दहशतवाद अस्तित्वात नाही असे तुम्ही म्हणू शकत नाही. पूर्वी कडवे हिंदू चर्चा करत असत, आता ते हिंसा करतात. हिंदूत्ववादी संघटनांमधे दहशतवाद पसरलेला आहे. ‘सत्यमेव जयते’वरचा हिंदूंचा विश्‍वास उडाला असून बळी तो कान पिळी ही भावना त्यांच्यात बळावते आहे. उजव्या हिंदूत्ववादी संघटना आधी चर्चेवर भर द्यायच्या. त्या आता हिंसेवर भर देत आहेत.’
यावर सर्व स्तरातून टीका होऊ लागली. दरम्यान, 7 नोव्हेंबरला आपल्या वाढदिनी तो नवीन पक्षाची घोषणा करेल अशी चर्चा सुरू असताना त्याने यू टर्न घेतला. त्याने स्वच्छ सांगून टाकले, ‘हिंदूंना दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता. फक्त एखाद्या धर्माच्या नावावर हिंसा करण्याला माझा विरोध आहे. मी कधीही ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचा उल्लेखच केला नाही.’
तीनच महिन्यांत मारलेल्या या कोलांटउड्यांनी हासनला हास्यास्पद बनवले आहे. कमल हासन हा एक प्रतिभावंत अभिनेता असला तरी  नेता म्हणून तो अपरिपक्व असल्याचेच यातून पुढे आले आहे. तो पुढील काळात राजकारणात सक्रीय होईल का, स्वत:चे पक्ष काढेल काय किंवा केरळातील डाव्यांशी हातमिळवणी करून तामिळनाडूत नशीब आजमावेल याचा अंदाज करणे आजच्या क्षणी कठीण आहे. परंतु, स्वत:ला कट्टर मार्क्सवादी समजणारा आणि हिंदूंच्या श्रद्धा नष्ट होण्याची स्वप्ने पाहणार्‍या कमल हासनने हिंदू दहशतवादाचा वाद जाणीवपूर्वकच निर्माण केला असेल, असे म्हणायला पुरेसा वाव आहे. इस्लामी दहशतवादावर मौन बाळगणे आणि काल्पनिक भीती दाखवत हिंदूंचा तेजोभंग करणे ही डाव्या बुद्धीजीवींची रणनीती राहिली आहे.
विश्‍वरूपम

2013 मध्ये कमल हासनचा विश्‍वरूपम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला काही मुस्लिम संघटनांनी विरोध केला. तामिळनाडूत या चित्रपटावर अघोषित बंदीच घातली. तेव्हा कमल हासनने हा इस्लामी दहशतवाद आहे असे म्हटले नाही. उलट त्याने शेपूट घालण्याची भूमिका घेतली. मुस्लिम संघटनांसोबत बैठक करून विश्‍वरूपम चित्रपटातील 5 दृश्य कापून टाकली आणि मुस्लिम संघटनांची परवानगी घेतली. मुस्लिम गटांनी चित्रपट बंद पाडल्याने 400 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले म्हणून रडणारा कमल हासन हिंदू गट दहशतवादी आहेत असे म्हणणे म्हणजे रस्त्यावर सपाटून मार खाल्ल्यावर घरी येऊन त्याचा राग बिचार्‍या बायका - मुलांवर काढणार्‍या भेकड माणसाप्रमाणे झाले. डाव्यांची ही नेहमीची भूमिका राहिली आहे.
साहित्य, कला आणि चित्रपटसृष्टीत अशा कणाहीन भेकडांची एक मोठी जमातच आहे. मुस्लिम किंवा ख्रिश्‍चन कट्टरतावादाविषयी ब्र बोलणार नाहीत, पण काल्पनिक हिंदू दहशतवादाबद्दल रान उठवणार.
 
गिरीश कर्नाड हे तसे मोठे दिग्गज साहित्यिक आणि कलावंत. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखक आणि नाटककार असलेले कर्नाडही टिपू सुलतानची बाजू मांडताना म्हणाले, ‘टिपू सुलतानने फक्त केरळ, तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले. पण त्याने कर्नाटकात आदर्श राजकारभार केला. त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही.’


टीपू सुलतान हा धर्मांध होता. केरळात त्याने लाखो हिंदू आणि ख्रिश्‍चनांना बळजबरीने बाटवले. मुस्लिम होण्यास नकार देणार्‍या हजारो हिंदूंची त्याने क्रूरतेने कत्तल केली. याचे ढीगभर पुरावे आज उपलब्ध आहेत. तरीही टीपू सुलतानचे उदात्तीकरण करण्यासाठी ही मंडळी आकाशपाताळ एक करतात. पण, डॉ. एपीजे अब्दुल कलाम, परमवीरचक्र प्राप्त अब्दुल हमीद आदी महान देशभक्तांना मुस्लिमांचे आदर्श म्हणून सादर करत नाहीत. देशात सर्वाधिक मंदिरे पाडणारा क्रूरकर्मा अल्लाउद्दीन खिलजी. त्याचे उदात्तीकरण करण्यासही ही मंडळी पुढे मागे पाहात नाही. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या नावाखाली हे सारे चालते.
गेल्या काही दशकांपासून दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात जिहादी विस्तारवाद सुरू आहे. लव्ह जिहादचे अड्डे राजरोस काम करत आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात देशातील प्रमुख टीव्ही वाहिन्यांनी पुराव्यासह याचा भांडाफोड केला. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाई करण्याचे संकेत केंद्र सरकारने दिले. आणि याच वेळी कमल हासनने हिंदू दहशतवादाचा तकलादू मुद्दा चर्चेत आणला. सर्वच धर्मांमध्ये  दहशतवाद असतो पाहा, असे बिंबवण्याच्या रणनीतीचा हा एक भाग असतो. डावे बुद्धीजीवी यात माहीर आहेत. काँग्रेसशी संबंधीत शहजाद पूनावाला यांनी लगेच लिहूनही टाकले की, ‘दहशतवादाला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे. दहशतवाद हा हिंदू अथवा मुस्लिम नसतो. सर्व अतिरेकी हे द्वेष पसरवतात. हे आयसिस आणि आरएसएस दोघांसाठीही खरे आहे.’
1 सप्टेंबर 2017 रोजी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांची भेट घेऊन आल्यानंतर कमल हासन म्हणाला होता की, ‘चित्रपटांमध्ये तुम्ही माझे अनेक रंग पाहिले असतील, पण भगवा नाही.’
पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. पाॅप्युलर फ्रंट ही लव्ह जिहादचा कारखानाही चालवते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी नुकतीच या संघ्टनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली.

मूळ मुद्दा शिल्लक राहातो की, ही मंडळी असे का वागतात? हिंदू धर्माबद्दल मनात इतका आकस का ? या प्रश्‍नाचे उत्तर आहे हिंदूंमध्ये खोलवर रूजलेली गुलामी मानसिकता. पाप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने केरळमध्ये एका प्राध्यापकाचे हात तोडले कारण त्याने इस्लामी कट्टरतावाद वाढत असल्याचे लिहिले होते. या घटनेवर कमल हासनपासून एकाही कलाकाराने ब्रही काढले नाही. ख्रिश्‍चन आणि इस्लामी विस्तारवादाविरुद्ध कोणी काही बोलले की त्यांना अनेक स्तरावर वाळित टाकले जाते. तुम्ही बोलता ते सत्य असले तरी त्याबद्दल बोलायचे नाही, असे वातावरण अनेक क्षेत्रात आहे. थोर विचारवंत प्रा. शेषराव मोरे यांनी याला ‘पुरोगामी दहशतवाद’ हा शब्द वापरला आहे.
केवळ हिंदू धर्मच इतर धर्मांचे अस्तित्व मानतो. माझा धर्म सत्य त्याप्रमाणे इतरांचेही धर्म सत्य आहेत, हा विचार केवळ हिंदू धर्मातच आहे. त्यामुळे धर्मांतरासारखे प्रकार हिंदू धर्मीय कधीच करत नाहीत. याउलट इस्लाम, ख्रिस्ती आदी धर्म विस्तारवादी आहेत. त्यांच्या मते केवळ त्यांचाच धर्म खरा असतो. त्यासाठीच ते धर्मांतरासारखे प्रकार अवलंबतात. त्यासाठी हिंसा करायलाही ते मागेपुढे पाहात नाहीत. लव्ह जिहाद हे त्याचेच अपत्य. जिहादी आणि ख्रिस्ती विस्तारवादाची मानसिकता असलेले अनेक बुद्धीजीवी समाजाच्या विविध क्षेत्रात सेक्युलरतेचा जप करत वावरतात. आतून जिहादी असले तरी बाहेर धर्मनिरपेक्ष असल्याचे दाखवतात. चर्चप्रेरित अनेक एनजीओ मूलनिवासी, द्रविड चळवळ आदीच्या माध्यमातून हिंदूंना संभ्रमित करत असतात. यातूनच पुरोगामी दहशतवाद फोफावला. याला प्रसिद्धी माध्यमांतील मुख्य प्रवाहाने नेहमीच खतपाणी घातले. परंतु, पुरोगामी थोतांड हे असत्यावर आधारित असल्यामुळे त्याचा पाया ठिसूळ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोशल मीडियाचा उदय झाल्यामुळे सत्य झाकून ठेवणे इतके सोपे राहिले नाही. परिणामी, पुरोगामी भोंगळपणा उघड होऊ लागला.
हिंदू दहशतवादाची काल्पनिक भीती दाखवूनही देशात सत्तांतर झाले.  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. न्यूयॉर्क टाइम्सने या घटनेची नोंद घेताना म्हटले, की, ‘1947 ला भारतातून ब्रिटीश सत्ता गेली असली तरी मे 2014 मध्ये भारत खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाला.’
प्रखर राष्ट्रवादी विचारांचा नेता नरेंद्र मोदी देशाच्या प्रमुखपदी येणे ही देशाच्या इतिहासातली फार मोठी घटना आहे. जिहादी, ख्रिस्ती विस्तारवादी आणि देशबाह्य निष्ठा असलेल्या शक्तींना याची जाणीव आहे. सत्तांतरानंतर या शक्तीचे कंबरडे मोठ्या मोडले गेले आहे. आपले अस्तित्वच धोक्यात येत असल्याचे पाहून असहिष्णुता वाढल्याचा बनाव करून पाहिला. तरीही अनेक राज्यात हिंदुत्व विचारावर श्रद्धा असणारी सरकारे येऊ लागली.

आता 2019 जवळ येत आहे. 2019 मध्ये कसल्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी सत्तेत येऊ नये यासाठी सर्व सेक्युलर जमात आकाशपाताळ एक करणार हे तर स्पष्ट आहे. नरेंद्र मोदी यांना रोखता नाही आले तरी फार बहुमताने येणार नाही याची रणनीती आखण्यात येत आहे. त्याचा भाग म्हणून आगामी काळात हिंदू दहशतवादापासून ते खोट्या बातम्या पेरण्यापर्यंत अनेक उपद्व्याप सुरूच राहातील. यामध्ये कमल हासनसारख्यांची अवस्था हास्यास्पद होणे हे ठरलेलेच आहे.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी