Thursday, July 23, 2020

व्यंकय्या नायडू यांचा निषेध करण्यापूर्वी...

व्यंकय्या नायडू यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे, परंतु
तुमच्यामध्ये "हे" धाडस असेल तरच...

छत्रपती उदयनराजे भोसले यांना
राज्यसभेत शपथ घेताना
"घोषणा देऊ नका", असे म्हटल्याने
महाराजांचा अपमान झाला,
असे सांगत
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध करण्यात येत आहे.
परंतु,
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी
म्हटले आहे की,
"आक्षेप काँग्रेस-राष्ट्रवादीने घेतला,
व्यंकय्या नायडूंनी उलट त्यांना थांबवलं,
पवारसाहेबांना विचारा काय झालं ?"
(https://youtu.be/e87EKLNExLM)

पवार साहेब याचे उत्तर देणार नाहीत.

गेल्या 10 वर्षात
शिवरायांची बदनामी करणारे एक पुस्तक
बिनधास्त विकले जात आहे.
त्या पुस्तकाच्या विरोधात
कोणी माई का लाल
आक्रमक झाल्याचे दिसला नाही.

"शिवाजीचे उदात्तीकरण" हे ते पुस्तक.
या पुस्तकात
अत्यंत नीच भाषेत
शिवाजी महाराजांची
पानोपानी अवमानाना करण्यात आली आहे.
शिवाजी महाराज यांच्यावर
आक्षेपार्ह आणि दर्जाहीन आरोप आहेत.

"महाराज हे महान नव्हते,
ते खंडणी गोळा करायचे",
अशी आक्षेपार्ह भाषा
या पुस्तकात आहे.

या पुस्तकात महाराजांविषयी
असे काही लिहिले आहे की
त्याचा या ठिकाणी
उल्लेख करणेही शक्य नाही.
या पुस्तकाची विक्री
गेल्या दहा वर्षापासून
आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे.
(http://shodh-bodh.blogspot.com/2012/07/blog-post_29.html?m=1)

या पुस्तका विरोधात काहीही न करता
आजवर मूग गिळून बसलेल्या लोकांना
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात
रान उठवण्याचा काय अधिकार ?
निषेधच करायचा असेल तर
"जय शिवाजी जय भवानी" म्हणण्यास
विरोध करणाऱ्या
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा झाला पाहिजे.

शिवाजी महाराजांना
'जाणता राजा' म्हणू नका,
असे म्हणणाऱ्या
श्री. शरद पवार यांचा
कोणी कधी निषेध केला आहे काय ?

"नरेंद्र मोदी हे आजच्या
काळातील शिवाजी आहेत",
या पुस्तकावर तुटून पडणारे
शरद पवार यांना "जाणता राजा"
ही बिरुदावली वर्षानुवर्षे लावताना
विरोध का केला नाही ?

"तुम्ही छत्रपतींचे वारस असल्याचे पुरावे द्यावेत", असे म्हणत छत्रपतींच्या घराण्यावर
अविश्वास दाखवण्याचा प्रमाद करणाऱ्या
संजय राऊत यांच्या विरोधात
निषेधाची ही धार का दिसली नाही?

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू
यांचा निषेध
अवश्य झाला पाहिजे.
परंतु,
निषेधासाठी वापरलेली आपली भाषा
स्वतः ला अभिमानाने मावळा म्हणवून घेता येईल अशीच आहे ना हे पाहीले पाहिजे.

थोडक्यात -
छत्रपती शिवाजी महाराज यांचा आडोसा घेत कुरघोडीचे राजकारण करणे, हे आता सर्वच पक्षातील नेत्यांचे धोरण बनले आहे. शिवरायांचे आणि शंभुराजेंचे नाव घेणाऱ्या काही संघटना संबंधित व्यक्तीची जात, पक्ष, आणि विचारधारा पाहून निषेधाची तीव्रता आणि पातळी ठरवतात. वास्तविक पाहता या मंडळींना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांशी, तत्वांशी काही देणे घेणे नसते. आपले उपद्रवमूल्य कायम ठेवणे हाच काय तो उद्देश असतो.

काही संदर्भ :
1. https://www.google.co.in/amp/s/www.lokmat.com/nagpur/bjp-demands-ban-book-shivajiche-udattikaran-padadyamagache-vastav/amp/

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी