Sunday, August 12, 2012

धर्मांध मुस्लिमांचा मुंबईत जिहाद

धर्मांध मुस्लिमांचा मुंबईत जिहाद
‘फोर्ट’ परिसरात जाळपोळ, हिंसाचार, पोलिसांवर हल्ला
२ ठार ५२ जखमी
म्यानमार, आसामवरुन महाराष्ट्रात हैदोस
चॅनेल्सच्या ३ ओबी व्हॅन, पोलिसांच्या गाड्या जाळल्या
बेस्ट बसेससह अनेक वाहनांची तोडफोड
लोकल वाहतुकीवर परिणाम, नागरिक भयभीत
धार्मिक स्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढविला
पुण्यात ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर हल्ल
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) - हजारो किलोमीटरवर असलेल्या आसाम आणि म्यानमारमधील जातीय हिंसाचारावरून आपल्या जातभाईंसाठी गळा काढत आज धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत ‘जिहाद’ पुकारला. आझाद मैदानात मोर्चाला जमलेल्या तब्बल ५० हजारांच्या हिंसक जमावाने ‘इंडियन गव्हर्न्मेंट मुर्दाबाद’, ‘मीडियावाले चोर है’ अशी बांग देत पोलीस आणि मीडियावर हल्ला चढवला. जाळपोळ, दगडफेक करीत जमावाने फोर्ट परिसरात अक्षरश: हैदोस घातला. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातही घुसून तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात २ ठार, तर पोलीस आणि छायाचित्रकारांसह ५३ हून अधिकजण जखमी झाले. दुपारी दोनच्या सुमारास धर्मांधांनी सुरू केलेला हिंसाचार साडेतीनच्या सुमारास पोलिसांनी नियंत्रणात आणला. मात्र या घटनेनंतर तणाव कायम आहे.
http://www.saamana.com/
अमर जवान स्तंभाची नासधूस

पालिका मुख्यालयासमोरच उभारण्यात आलेल्या २६/११ च्या स्मृतिस्तंभाशेजारील ‘अमर जवान’ स्मृतिस्तंभाची धर्मांधांनी नासधूस केली. १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला आहे. स्मृतीस्तंभावर चपला फेकून शहिदांचाही त्यांनी अवमान केला. इतकेच नव्हे तर त्या स्मारकातील बंदूक उखडून टाकल्यानंतर ती उंचावत तिथेच नंगानाच घातला.
उन्माद आणि थैमान
पोलीस आणि मीडियाच्या गाड्या जळत असताना धर्मांध हसत होते. मोबाईलच्या कॅमेर्‍यातून फोटो टिपत होते.
‘इस्लाम खतरे में’ची बांग
आजच्या मोर्चाची तयारी गेल्या काही दिवसांपासून जोरदार सुरू होती. मुस्लिमांना आवाहन करणारी भडक पोस्टर्स मुंबईच्या मुस्लिमबहुल भागांमध्ये अतिक-ए-रसूल अवाम कमिटीच्या ‘कुफ ए बाम’च्या नावाने लावली होती.
‘ए मुसलमानों, अब न निकलोगे
अपने घर से तो क्या इस्लाम
खत्म होने के बाद निकलोगे...
...
ए मुसलमानों, अगर आपके
भाई-बहनों को बचाना चाहते हो
तो ये मोर्चे में आपको
शामील होना ही पडेगा’

आंदोलनाला माणसे आणली कुठून?
छोट्या-मोठ्या सुमारे २० ते २५ मुस्लिम संघटनांच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. फेसबुक, एसएमएसवरून आंदोलनाला माणसे आमंत्रित करण्यात आली. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे या ठिकाणाहून जथेच्या जथे मिळेल त्या वाहनाने मुंबईत येत होते.
मुंबईत रेड ऍलर्ट जारी
नुकतेच पुण्यामध्ये झालेले बॉम्बस्फोट, मुस्लिमांचा सुरू असलेला रमझान महिना, काही दिवसांवर येऊन ठेपलेला गणेशोत्सव आणि त्यातच जातीयवादी संघटनांद्वारे घडविण्यात आलेला हिंसाचार या पार्श्‍वभूमीवर मुंबईत रेड ऍलर्ट जारी करण्यात आला. मुंबई तसेच उपनगरातील संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
तपास क्राइम ब्रँचकडे : मुख्यमंत्री
या घटनेची क्राईम बॅचतर्फे चौकशी करण्यात येईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ‘यामागे कोणाचा हात आहे, हे शोधून काढण्यात येईल. यासाठी यंत्रणेला त्या दिशेने तपास करण्याचे आदेश दिले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी हज हाऊस येथे आयोजित केलेली इफ्तार पार्टी रद्द केली.
आसामची समस्या काय आहे?
‘जातभाई खतरे में’ अशी बांग देत मुंबईत धर्मांध मुस्लिम उतरले असले तरी ते ज्यांच्यासाठी गळा काढत आहेत ते बांगलादेशी घुसखोर आहेत. आसामला लागून असलेल्या १३४ किलोमीटरच्या बांगलादेश सीमेवर हिंदुस्थानची पुरेशी सुरक्षा यंत्रणा नाही. त्यामुळे सीमेवरील आसाममधील जवळपास चार जिल्हे बांगलादेशी घुसखोरांनी काबीज केले आहेत. तेथील बोडो आदिवासींच्या जमिनी हडप करून या घुसखोरांनी त्यांचे जीणे हराम केले आहे. त्यामुळे बोडो आदिवासी विरुद्ध घुसखोर मुसलमान असा संघर्ष वारंवार उडतो. गेल्या दहा वर्षांत सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सहा वेळा दंगली भडकल्या. शेकडो निष्पाप मारले गेले, पण केंद्र सरकार घुसखोरांचा बंदोबस्त करू शकलेले नाही.
काय घडलं, ठिणगी कुठे पडली
आसाम हिंसाचाराच्या निषेधार्थ मुस्लिमांच्या २० ते २५ संघटनांनी एकत्र येऊन आझाद मैदान येथे एका सभेचे आयोजन केले होते. सभा सुरू असताना एक मौलवी उठला आणि हिंदुस्थानच्या प्रसारमाध्यमांचा निषेध करीत गरळ ओकू लागला. येथेच हिंसाचाराची ठिणगी पडली. मौलवीने निषेध सुरू करताच जवळपास ५० हजारांच्या संख्येने पूर्ण तयारीत आलेल्या मुस्लिमांनी पोलीस व प्रसारमाध्यमांवर हल्ला चढवत अक्षरशः धुमाकूळ घातला.
४५ पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारले
हजारो मुस्लिमांचा जमाव पोलिसांवर चाल करून गेला. चॉपर व तलवारीचा धाक दाखवून गाड्यांमध्ये बसलेल्या पोलिसांना बाहेर काढले आणि त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात ४५ पोलीस जखमी झाले. पोलिसांची चार मोठी वाहने, पाच मोटारसायकल्सना आग लावली. शिवाय पोलिसांच्या सात ते आठ गाड्यांवर दगडफेक करून तोडफोड केली.
मावळचे शेतकरी आणि मराठवाड्यातील वारकर्‍यांवर गोळ्या घालणारे सरकार धर्मांधांपुढे षंढ ठरले
मावळमध्ये शेतकर्‍यांवर आणि जालन्यात वारकर्‍यांवर गोळ्या घालणारे सरकार आज धर्मांधांपुढे मात्र षंढ ठरले. मावळमध्ये शांततेच्या मार्गाने शेतकरी पाण्यासाठी आंदोलन करीत होते. तरीही ‘वरच्या’ आदेशावरून पोलिसांनी बेछूट गोळीबार करून आंदोलन चिरडले. चार शेतकर्‍यांचा त्यात हकनाक बळी गेला. जालन्यातही तेच झाले. एक भरधाव कंटेनर पालखीत घुसला आणि १२ वारकरी जागीच ठार झाले. या घटनेने तणाव वाढला. पालखीला पोलीस संरक्षण नव्हते त्याचा जाब विचारण्यासाठी वारकर्‍यांनी आंदोलन केले. मात्र आंदोलकांचे काहीच ऐकून न घेता पोलिसांनी गोळीबार केला. दोन वारकर्‍यांचा बळी घेऊन पोलिसांनी मर्दुमकी गाजवली. आज मात्र धर्मांधांचा मॉब बेकाबू झाला असताना पोलिसांना मार पडत असतानाही हवेत गोळीबार आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यापलीकडे सुरक्षा यंत्रणा काहीच करू शकल्या नाहीत.
पुण्यात ईशान्येकडील विद्यार्थ्यांवर हल्ला
आसाम दंगलीचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातही उमटत आहेत. पुण्यातील मुस्लिमबहुल वस्तीत राहणार्‍या आसाम, मणिपूर, मिझोराममधील विद्यार्थ्यांवर प्रामुख्याने हल्ले केले जात आहेत. पूना कॉलेजमध्ये बारावीच्या प्रेमानंद बिजोमनी क्रोमा (मणिपूर) याला शुक्रवारी नऊजणांनी मारहाण केली. अन्य दहा विद्यार्थ्यांना मारहाण करण्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती माय होम इंडिया या स्वयंसेवी संघटनेच्या मयूर कर्जतकर यांनी दिली.
गणपतीची तसबीर तोडली
धर्मांधांच्या जमावाने छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणार्‍या भुयारी मार्गालगतच्या ‘आराम वडापाव’ दुकानातील गणपतीच्या तसबिरीची विटंबना केली. आसाममध्ये सुरू असलेल्या दंगलीचे कव्हरेज मीडिया दाखवत नसल्याचा आरोप करत एका पत्रकाराला कापून टाकू’ अशी धमकी दिली.
मध्य, हार्बर ठप्प; चाकरमान्यांचे हाल आणि घबराट
धर्मांध मुस्लिमांचा हजारोंचा जमाव तलवारी, चॉपर आदी हत्यारे घेऊन हार्बर मार्गावरील लोकलने छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकात येत होता. अचानक मुस्लिम तरुण हत्यारे घेऊन आझाद मैदानाच्या दिशेने धाव घेऊ लागले. हे पाहून अर्ध्या दिवसाने सुटून घरी निघालेल्या चाकरमान्यांमध्ये प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच काही वेळ लोकल थांबविल्या गेल्याने चाकरमानी खूपच भयभीत झाले. जो तो जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागला.
माथेफिरू तरुणांचे कृत्
दंगल भडकवणारे बहुतेक विशीतले माथेफिरू तरुणच होते. १९९२ मध्ये भडकलेल्या जातीय दंगलीवेळी यातील काहींचा जन्मही झालेला नसेल किंवा ते तेव्हा लहान असतील. दंगल काय असते हे समजण्याएवढी जाणही त्यांना नसेल. त्यामुळेच त्यांनी आजचा आततायीपणा केल्याचे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे होते.
गृहराज्यमंत्र्यांची फाजील घाई
तास दीड तासात संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. तरीही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी मात्र फाजील घाई करीत लोकांना घाबरवण्याचे काम केले. ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’ असे आवाहन त्यांनी केले. वृत्तवाहिन्यांवरून ते आवाहन सतत झळकत होते. त्यामुळे मुंबईभर लोकांची गाळण उडाली. दंगल पसरल्याच्या अफवांनी सगळेच हादरले. कामानिमित्त घराबाहेर असलेल्यांना संपर्क साधून लवकरात लवकर घर गाठण्यासाठी सांगितले जात होते.
चॅनेलवाले टरकले
धर्मांधांनी हैदोस घातल्यानंतरही चॅनेलवाल्यांना जाग आली नाही. ऊठसूट ‘ब्रेकिंग न्यूज’ आणि ‘लाइव्ह कव्हरेज’ देणारे चॅनेलवाले थंड पडले. रात्री आठनंतर दंगलीची बातमी बंद करून इतर कार्यक्रम सुरू केले. चॅनेलवाल्यांची धर्मांध मुस्लिमांपुढे चांगलीच टरकली. चॅनेलवालेही घाबरल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून निषेध
आसाम दंगलीच्या निषेधार्थ आयोजित केलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले. या घटनेत प्रसारमाध्यमांच्या गाड्यांना लक्ष्य करण्यात आले तसेच वृत्तपत्रांचे चार छायाचित्रकारही जखमी झाले. या घटनेचा मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी निषेध केला असून घटनेस जबाबदार असणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मीडिया टार्गेट
आसाम आणि म्यानमार येथे मुस्लिमांवर झालेल्या हिंसाचाराची मीडियाने दखल घेतली नाही. मीडिया आमच्या विरोधात आहे. त्यामुळे या निषेध सभेचे निमित्त करून धर्मांध मुस्लिमांनी मीडियावर हल्ला करायचा पूर्व कट रचला होता. त्या कटानुसार अचानक हजारोंच्या संख्येने हातात चॉपर, तलवार, रॉकेल, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक घेऊन छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरात घुसलेल्या मुस्लिमांनी थेट छायाचित्रकार, पत्रकारांना जबर मारहाण करीत ओबी व्हॅन जाळल्या.
कायदा हातात घेऊ नका - तावडे
आसाम आणि म्यानमार येथे झालेल्या हिंसाचाराचा आम्हीदेखील निषेध करतो. तेथे झालेल्या हिंसाचाराचा मुंबईत अशाप्रकारे निषेध करण्याची आवश्यकता नाही. मुस्लिमांनी आज कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवला. जर ते कायदा हातात घेणार असतील तर दुसरेही कायदा हातात घेऊ शकतात असा इशारा देत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी गृहखात्यावर आर. आर. पाटील यांची अजिबात पकड नाही, सरकार कुचकामी ठरत असल्याची टीका केली.
अफवा पसरविणार्‍यांवर कारवाई करू - सुशीलकुमार
आसाममध्ये गेले तीन दिवस शांतता असताना तेथील हिंसाचाराबाबत काहीजण अफवा पसरवित आहेत. त्यंाच्याविरुद्ध कडक कारवाई करू, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिला आहे. गृहमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनाईक यांच्याशी फोनवरून संपर्क साधून माहिती घेतली. आसाममध्ये परिस्थिती नियंत्रणात असताना अफवा पसरवू नये, असेही ते म्हणाले.
हिंसाचाराशी संबंध नाही
आमचा या हिंसाचाराशी काहीच संबंध नाही. आमचे विरोध प्रदर्शन सुरू होते. काही मौलवींनी आसाममधील हिंसाचार दाखवत नसल्यामुळे टीका केली. विरोध प्रदर्शन संपल्यानंतर अचानक मैदानाबाहेर आगडोंब उसळला. हिंसा करणारे तरुण कोण होते, ते कुठून आले याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही, पण हे पूर्वनियोजित होते. आमची एकी विस्कटण्याचा हा प्लॅन होता.
समशेरखान पठाण, अवामि विकास पार्टी
दोषींना सोडणार नाही - गृहमंत्री
सांगली दौर्‍यावर निघालेले गृहमंत्री आर. आर. पाटील मुंबईत परतले. जे दंगलीला कारणीभूत असतील त्यांना पोलीस सोडणार नाहीत. योग्य ती कारवाई केली जाईल असे पाटील यांनी सांगितले.
- पोलिसांशी बाचाबाची झाल्यानंतर काही तरुण भडकले असतील पण सगळ्यांना दोष देऊ नका, असे सांगत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मोर्चा काढणार्‍यांची बाजू घेतली. मात्र त्यांच्याबरोबर असलेले काही तरुण वातावरण तापवत होते.
हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश - नवाब मलिक
गुप्तचर यंत्रणांच्या गाफीलपणामुळेच आजचा प्रसंग उद्भवला असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले. मोर्चाला परवानगी देताना मोर्चा काढणारी संघटना कोणती आहे, त्याची आधीची पार्श्‍वभूमी काय आहे, कोणते लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत, याची माहिती आधी गोळा करण्याची जबाबदारी पोलिसांच्या गुप्तचर विभागाची असते, त्यांनी ते केले नाही.
केंद्राने अहवाल मागविला
केंद्र सरकारने तातडीने राज्य सरकारकडे या घटनेचा अहवाल मागितला आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला जी मदत हवी असेल ती देऊ असे केंद्राने कळवले आहे.
सेंट जॉर्जेस रुग्णालयात जाऊन जखमी पोलिसांच्या प्रकृतीची विचारपूस करताना शिवसेना खासदार अनिल देसाई. सोबत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ, खासदार देसाई यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. आर. कुलकर्णी आणि उप-अधीक्षक डॉ. जगदीश भवानी यांचीही भेट घेऊन जखमींवर सुरू असलेल्या उपचारांबाबत माहिती घेतली.
रिझवान दयावानचा हात
आसाममधील हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर निषेधाच्या नावाखाली मुंबईत मुस्लिमांचा मोर्चा काढून त्यामागे दंगल भडकवायची असा हेतू रझा अकादमीच्या रिझवान दयावानचा असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गेले काही दिवस या मोर्चाच्या निमित्ताने मुस्लिम समाजाला, विशेषतः मुस्लिम तरुणांना पद्धतशीरपणे भडकावण्यात आले. पोस्टर्सबरोबर एसएमएस तसेच एमएमएस इत्यादीद्वारे ‘इस्लाम खतरें में’ असे सांगून त्यांची दिशाभूल करण्यात आली. परिणामी ५० हजारांपेक्षा जास्त लोक (यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग) मोर्चाला आले. आसामच्या परिस्थितीविषयी निषेध नोंदवायचा होता तर मग त्यासाठी धर्माचा आधार घेण्याचे काय कारण होते, असा सवाल उपस्थित झाला आहे.
रिझवानचा मंत्री नसीम खान यांच्याबरोबर वावर!
वस्त्रोद्योग व अल्पसंख्याक मंत्री नसीम खान यांच्याबरोबर रिझवान दयावानचा सतत वावर असतो. कुर्ला, घाटकोपर तसेच या परिसरातील बर्‍याच कार्यक्रमांत रिझवान नसीम खानबरोबर असल्याचे सातत्याने दिसून आले आहे. विशेष म्हणजे या परिसरातील लोकही रिझवान हा नसीम खान यांचा अगदी विश्‍वासू व्यक्ती असल्याचे सांगतात.
मृतांची नावे
आफताब हैदर (१८)
मोहमद उमर (२२)
सेंट जॉर्जेस रुग्णालय
जखमी पोलीस

पद्माकर जुईकर, आसिफ शेख, अरुण साठे, सत्यपाल यादव, बाबूराव पाटील, हनुमंत दारकर, जुकीन शेख, हनुमंत माने, श्रीधर थोरे, मनोहर अडके, मनोहर चौधरी, विठोबा साळवी, मनोहर तळेकर, राजू त्रिपुलू, पी. सानप, युवराज बाबूजी, भागूराम सोनावणे, सूर्यकांत पाटील, सतीश बरोदे, युवराज चौधरी, महेश पाटील, नितीन खामकार, प्रशांत नाकूर, डी. सी. राठोड, एच. डी. भोराटे, पी. जी. आढाव, फैझान
जखमी नागरिक
सिद्दिकी शाहराज, फहीम पटेल, अतुन शेख, अकबर अली खान, प्रशांत सावंत, अल्ताफ शेख, मोहम्मद उमर
जी. टी. रुग्णालय
जखमी पोलीस

अनिल आव्हाड, शकील मुख्तार जगताप, शिवाजी चव्हाण, साधू साळेकर, पवन काळे, गुरूदास साळगावकर, अनिल चव्हाण, दिगंबर मुदकर, भगवान गर्जे, योगेश शेडके, दिलीप निंबाळकर, मनोज गफूर, दीपक पाटील, तानाजी धोत्रे, कुंदनसिंग ठाकूर, माणिकराव सुर्वे, भूषण पाथरवट, अर्जुन विलेकर, विवेक जाधव, पंकज चाळके, लक्ष्मण भोसले, मधुकर आव्हाड, स्वाती कांबळे, वंदना साळवे, छाया मेमाने, तेजस्विनी साठवणे,
जखमी नागरिक
तौफिक मोहम्मद युसूफ (१८), मोहम्मद नासीर (६०), अतुल कांबळे (३९)
जे. जे. रुग्णालय
जखमी नागरिक
नासीर अहमद सिध्दिकी (३५, पवई), जुनैद शेख (२२, कुर्ला), राजेंद्र यादव (५२, परेल), इर्शाद शेख (२१, गोवंडी), अकबर रौनक अली खान (२७, मालाड)
पोलिसांच्या वेदना
- मोबाईल व्हॅनमधून बाहेर खेचून मारले
जमाव हातामध्ये बांबू, लोखंडी सळ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करत होता. त्यांना आवरण्यासाठी आझाद मैदानाजवळ पोलिसांची तितकी संख्या नव्हती. त्यामुळे साऊथ कंट्रोलला फोन करून अतिरिक्त कुमक पाठवण्यासाठी मी वज्र मोबाईल व्हॅनमध्ये बसलो असताना हा जमाव तिथे आला. सुमारे २५ जणांनी मला आणि चालकाला गाडीतून खेचून बाहेर काढले. जमिनीवर आडवे पाडले आणि अक्षरशः तुडवून काढले. आमचा प्रतिकार त्यांच्यासमोर कमी पडला. माझा चेहरा सुजला. पोटात, पाठीवर त्यांनी मुक्क्यांनी मारले. मारामारीत माझी नेम प्लेटही त्यांनी खेचून तोडली. नंतर आमची गाडीही पेटवली.
- जाकीर हमीद शेख (पोलीस शिपाई, लष्कर विभाग).
- बांबू, हातोड्याने पोलिसांची गाडी फोडली
हातात बांबू आणि हातोडे घेऊन जमावाने आमच्या गाडीवर हल्ला केला. मोबाईल व्हॅनची तोडफोड केली. हातोड्याने गाडीच्या काचा फोडल्या. मला खेचून बाहेर काढले. आधी गाडीवर दगडफेक केली. छत्रपती शिवाजी टर्मिनससारख्या विभागात इतके दगड आले कुठून? हातोडा कुठे मिळाला त्यांना? मला लाथाबुक्क्यांनी त्यांनी मारहाण केली.
- राजू सिद्राम तुर्भे (पोलीस शिपाई, लष्कर विभाग).
- खाकी वर्दीला लक्ष्य केले!
मुसलमानांचा जमाव आझाद मैदानातून बाहेर पडला आणि मागेपुढे न पाहता त्यांनी समोरच्या गाड्यांची तोडफोड सुरू केली. मीडियाच्या गाड्या पेटवल्या. त्यांना आवरण्यासाठी पुढे गेलेल्या पोलिसांवरही त्यांनी दगडफेक केली. एक दगड वरून माझ्या डोक्याला पाठीमागून लागला. खाकी गणवेशातल्या पोलिसांना त्यांनी लक्ष्य केल्याचे दिसत होते.
- नितीन खामकर (पोलीस शिपाई, मरोळ).
- लोखंडी सळ्यांनी मारले!
पोलीस जवळ जाताच जमावाने दगडफेक केली. तरीही त्यांना आवरण्यासाठी आम्ही पुढे सरसावलो. छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न आम्ही केला, परंतु जमावाकडे इतके दगड कुठून आले कळत नाही. एकापाठोपाठ एक दगड येऊन आमच्यावर पडत होते. आमचे अनेक पोलीस जखमी झाले. एक दगड माझ्याही डोक्याला लागला. जमावातील लोकांच्या हातात बांबू आणि लोखंडी सळ्याही होत्या. मोर्चाला बांबू आणि लोखंडी सळ्या कशासाठी?
- अरुण जुईकर (वरिष्ठ निरीक्षक, एमआरए पोलीस ठाणे).
- चारही बाजूंनी हल्ला!
जमाव पांगवण्यासाठी आम्ही पुढे गेलो. जमाव चारी बाजूला विखुरला होता. जोरदार दगडफेक करत होता. एक दगड समोरून माझ्या डोक्याला लागला. पोलिसांवरच त्यांनी दगडफेक जास्त केली.
- अकील राजू जामदार (पोलीस शिपाई).
जखमी पोलीस अधिकारी हनुमंत दरेकर यांना पुढील उपचारासाठी सेंट जॉर्जेसमधून मुंबई रुग्णालयात हलवण्यात आले अशी माहिती अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

बेकाबू जमाव आणि हतबल पोलीस
- आझाद मैदानातून हटवल्यानंतर धर्मांधांचा जमाव रेल्वे ट्रॅकवर उतरला.
- हम बाल बाल बच गए!
आझाद मैदान परिसरात हजारोंच्या संख्येने आलेल्या मुस्लिमांनी अचानक हिंसाचार सुरू केला. प्रसारमाध्यम व पोलिसांना टार्गेट करून त्यांनी हल्ला चढवला. त्यांनी जाळपोळ देखील केली. ‘मामला बहुत संगीन था, पर हम बाल बाल बचे है’ असे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी सांगितले. हल्ल्याबाबत समजताच मी अवघ्या सहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचलो. लगोलग सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, डीसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच कॉन्स्टेबल, दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी धाव घेतली. मी स्वतः त्यांच्या मंचावर जाऊन सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. पोलिसांना नरम भूमिका घेण्यास सांगितले. जमावाला शांत करण्यासाठी आम्ही पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा रस्त्यावर उतरवला असता तर कदाचित परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी आणखी चिघळली असती. पण आम्ही कौशल्यपूर्ण परिस्थिती हाताळून अवघ्या तासाभरात ती पूर्वपदावर आणल्याचेही पटनायक म्हणाले.
- संतप्त जमावाने एबीपी माझा या वृत्तवाहिनीची ओबी व्हॅन सर्वप्रथम जाळली.
- म्यानमारमधील संघर्ष १९४८ पासून
मुंबईतील धर्मांध मुस्लिमांनी हैदोस घातला त्यामागे म्यानमारमधील हिंसाचार हेही एक कारण असल्याचे सांगितले जाते. वास्तविक म्यानमारमधील संघर्ष हा त्या देशाचा अंतर्गत प्रश्‍न असून तो १९४८ पासूनचा आहे. पूर्वीचे बर्मा आणि आताचे म्यानमार १९४८ मध्ये ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाले. म्यानमारमध्ये बौद्ध समाज बहुसंख्य आहे, तर मुस्लिम अल्पसंख्याक आहेत. मुस्लिम हे मोठ्या संख्येने म्यानमारच्या उत्तर भागातील राखिनी राज्यात राहतात. हे मुस्लिम घुसखोर असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नेहमीच म्यानमार या परिसरात दंगली होतात. हा प्रश्‍न
१९४८ पासूनचा असताना मुंबईतील रझा अकादमी आणि धर्मांधांना आताच का एवढा पुळका आला, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.
- छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवेशद्वारावर चपलांचा खच पडला होता. अनेकांनी आपली वाहने रस्त्यावरच टाकून जीवाच्या आकांताने पळ काढला. बेस्टच्या बसही धर्मांधांच्या लक्ष्य बनल्या. फोर्ट परिसरात काचा, चपला, जळून खाक झालेल्या गाड्या आणि जखमी पोलिसांचे सांडलेले रक्त असे मन सुन्न करणारे विदारक चित्र होते.
- सर्व छाया : संादीप पागडे, सचिन वैद्य, रूपेश जाधव.

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी