Sunday, February 1, 2009

मोची समाज जागा होतोय...

दि। 8 जानेवारी 2009 रोजी सोलापुरातील उपलप मंगलकार्यालात मोची समाजाचा मेळावा झाला. यावेळी ख्रिस्ती बनलेल्या तरुण दांपत्याने पुन: स्वधर्मात प्रवेश केला.

सोलापूर हे महाराष्ट्राच्या दक्षिणेला आणि कर्नाटक-आंध्रच्या सीमेजवळ वसलेले एक महत्त्वाचे शहर आहे. हुतात्म्यांची नगरी अशीही या शहराची ओळख आहे. शिवयोगी सिद्धराम हे येथील ग्रामदैवत आहे. हे शहर हिंदूबहुल आहे. या शहरात लिंगायत, पद्मशाली, मराठा आणि अन्य समाज मोठ्या प्रमाणात राहतो. सुमारे 2 लाख संख्येने राहणारा मोची समाज हा येथील एक प्रमुख घटक आहे. मादिगा किंवा मातंग समाज म्हणूनही या समाजाला ओळखले जाते. रामायण काळात वीर हनुमंताला लंका उड्डाणासाठी तयार करणाऱ्या वीर जांबुवंतांचा वारसा या समाजाला लाभला आहे.
गेल्या दोन-तीन दशकांपासून या शहराला एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हिंदूबहुल सिद्धेश्वर पेठेत आता हिंदू घरांची संख्या हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच राहिली आहे. अधूनमधून होणाऱ्या दंगलींच्या वेळी या कुटुंबाना दहशतीत वावरावे लागते. लक्ष्मी मंडईजवळ रमजान ईदच्या दिवशी दुकान चालू का ठेवले म्हणून धर्मांधांनी हल्ला चढविल्याची घटना अजून ताजी आहे. मुस्लिमबहुल वस्त्यांमधून आणि कॉलेजमधून हिंदू मुलींना गळाला लावून मुस्लिम बनविण्याचे प्रकार सोलापुरात आता अपवाद राहिले नाहीत. पद्मशाली समाजात याबद्दल काही प्रमाणात जागृती आली असली तरी उर्वरित हिंदू समाजात तेवढी जागृती दिसत नाही. हिंदूबहुल सोलापुरात हिंदू अल्पसंख्यक तर होणार नाहीत ना, अशी शंका मनात येत आहे.
तीन-चार दशकांपूर्वी शहरात दत्त चौकाजवळ एक चर्च होते. ख्रिश्चन समाजाची लोकसंख्याही मोजकीच होती. मशिदींची संख्याही आजच्यासारखी फोफावलेली नव्हती. मुस्लिम बांधव हिंदूंमधे मिळून-मिसळुन राहत होते. दरम्यानच्या काळात आपल्या मूळ स्वभावानुसार हिंदू राजकारणी सर्वधर्मसमभावाचा जप करीत राहिले. अन्य धर्मीयांची विस्तारवादी रणनीती समजून घेण्याची दृष्टी नसल्यामुळे गाफील राहिले. गठ्ठा मतांसाठी दाढी कुरवाळण्याची नीती अवलंबिणाऱ्या नेत्यांचे प्रस्थ राहिल्यामुळे शहरात अन्यधर्मीयांचे वर्चस्व वाढतच राहिले.
शहराच्या विविध भागांमध्ये ख्रिस्ती मिशनरी पैशाच्या बळावर ख्रिस्तीकरणाची मोहीम राबवू लागले. शहराच्या अनेक भागांमध्ये चर्चेसची संख्या वाढू लागली. समाजमंदिरांचे चर्चमध्ये रूपांतर होऊ लागले. हिंदू लोकप्रतिनिधींनी आपल्या मुलीबाळींची लग्ने ख्रिस्ती पद्धतीने चर्चमध्ये लावण्यापर्यंत परिस्थितीत परिवर्तन आले.
ख्रिस्ती मिशनऱ्यांचा सर्वाधिक आघात झाला असेल तर तो येथील मोची (मादिगा) समाजावर. सोलापूरच्या जडणघडणीत या समाजाचा वाटा मोलाचा राहिला आहे. समाजात शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी आहे, पण व्यवसाय मग ते हातमागावर कपडे विणणे असो की विडी वळणे, यात आघाडीवर आहे. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळेच ख्रिश्चन मिशनऱ्यांनी या समाजाला लक्ष्य केलं. ख्रिश्चन मिशनरी या लोकांना नोकरीची आमिषे तर कधी पैशाची लालूच दाखवून धर्मांतरं घडवून आणू लागले. मोची समाज जो मोठ्या प्रमाणात होता त्याची दिवसेंदिवस संख्या घटू लागली. ख्रिश्चनांच्या संख्येला मात्र सूज येत राहिली. हे इथेच थांबले असते तर ठीक, पण ख्रिश्चन समाजात लग्न करून गेलेल्या मुली या परत घरी येऊ लागल्या. सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून येणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच होती.
सुरुवातीला समाजातील लोकांचे याकडे लक्ष नव्हते. हिंदू समाजातील मुलींची ख्रिश्चन मुलांशी बेधडक लग्ने होत होती, मात्र याउलट होत नव्हते. हिंदू मुलाला ख्रिस्ती बनलेल्या मुलीशी लग्न करायचे असेल तर मुलाला ख्रिस्ती बनणे बंधनकारकच होते. मोची समाजातील धुरिणांनी वेळीच धोका ओळखला. समाज जागरूक झाला. ख्रिस्ती मिशनऱ्यांची चालाखी मोची समाजाच्या ध्यानात आली. समाजाने काही नियम बनविले. परिणामी मोची समाजातून ख्रिस्ती बनण्याचा प्रकार थांबला. मोची समाजातील मुलींची लग्ने मोची मुलांशीच होऊ लागली. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी मोची समाजातील काही नेत्यांना वश करण्याचा प्रयत्न केला, पण समाजाने भीक घातली नाही.
हिंदू देवदेवतांबद्दल बदनामीकारक, ओंगळ माहिती देऊन हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करणे. मूर्तीपूजा चुकीची आहे असे सांगणे. तुम्ही मूर्तीपूजा केलात तर नरकात जाल, अशी भीती दाखविणे. आकाशातल्या बापाच्या कळपात आलात तर तुमचे कल्याण होईल असे सांगणे. तुमच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो, असे सांगणे. चमत्कारांचे कुंभाड रचून देवामुळे चमत्कार घडतोय. जीझस तुमचा कल्याण करेल असे सांगत, धर्मांतरण करणे या प्रकारांनी लोकांना खूप काळ वेड्यात काढणे शक्यच नव्हते. दरम्यान ख्रिस्ती मिशनऱ्यांचा भोंगळपणा उघड करणाऱ्या पुस्तकांचा प्रसार, हिंदू धर्म जागृती सभा आणि व्याख्याने यांमधून मिशनऱ्यांचा खोटेपणा उघड होऊ लागला. स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ख्रिस्ती मिशनऱ्यांची लबाडी ओळखली होती. माझ्या हातात सत्ता आली तर प्रथम मी या मिशनऱ्यांना देशाबाहेर काढेन, असे गांधीजी म्हणाले होते. हे सारे विचार मोची समाजासमोर येऊ लागले.
मोची समाजाचा गौरवशाली इतिहास जांबमुनी महोत्सवातून समोर आणण्यात येऊ लागला. मोची समाजाला स्वत:ची ओळख होऊ लागली. मोची समाजात आत्मविश्वास आला. समाज संघटित होऊ लागला. समाजातील तरुण एक झाले. याचा खूप चांगला परिणाम झाला. अज्ञानामुळे, चुकीने, फसले गेल्यामुळे ख्रिश्चन बनलेले बांधव पुन्हा हिंदू समाजात, मोची समाजात दाखल होऊ लागले.
दि. 8 जानेवारी 2009 रोजी सोलापुरातील उपलप मंगल कार्यालयात हिंदू मोची समाजाचा मोठा मेळावा झाला. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. पूर्णानंद भारती महाराज आणि षडाक्षर मुनी स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्याला तोडमे गुरुजी, मल्लया महाराज शरदराव ढाले, तायप्पा म्हेत्रे, प्रा. नरसिंग आसादे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अंबादास म्हेत्रे यांनी आपल्या पत्नीसह पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला. उपस्थित मोची समाजाने अतिशय आनंदात त्यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर जांबमुनी महाराजांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली होती. मोची समाज आता जागा होत आहे. लबाड ख्रिस्ती मिशनऱ्यांनो आता सावध राहा.
स्वामी विवेकानंदांच्या विचारांची या प्रसंगी आठवण होत आहे. विवेकानंद म्हणतात, ""येशू भारतात आला आहे आणि आकाशातल्या बापाचा आदेश लौकरच फळाला येणार आहे!, असे डंके पिटणाऱ्यांनो, तुम्ही उघड्या कानांनी ऐका, जीझस्‌ही इथे आलेला नाही आणि येहोवा त्याहून आलेला नाही. ते येण्याची सुतराम शक्यताही नाही. आपापल्या चुली सांभाळताना त्यांना इथे यायला उसंत देखील होणार नाही !
तुम्हाला जर ही दैवते सोसत नसली तर रामराम! तुमच्यासारख्या मूठभर करंट्यांसाठी काय या देशाने दम उखडावा आणि मुलखाचे नीरस जीवन पत्करावे? एवढे जग तुमच्यापुढे पडले आहे. शोधा की, तुम्हाला सोयीचे कुरण मनमुक्त चरायला! पण हे मूठभर करंटे असे गुण्यागोविंदाने जातील थोडेच? तसे करायलाही हिंमत लागते. ते शिवाच्या या भूमीतच पोटे भरून घेतील, पण शिवाचीच बदनामी करतील आणि कोण्या परक्या प्रेषिताचे गोडवे गातील!''
-सिद्धाराम भै. पाटील २९ जनुअरी ०९
www.psiddharam.blogspot.com
mobile: 9325306283

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी