Wednesday, December 24, 2014

विमर्श - चीनशी वागायचं कसं?

ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला उपस्थित श्रोते.

चीनच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री करून मुकाबला शक्य

ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन

डावीकडून दुर्गाप्रसाद मिणीयार, हेमंत महाजन, बसवराज देशमुख आणि सिद्धाराम पाटील
प्रतिनिधी । जपान आणि इतर अनेक शेजारी देशांबरोबर चीनचे वादाचे संबंध आहेत. शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने त्या देशांबरोबर आपली मैत्री वाढवत चिनी ड्रॅगनशी मुकाबला करणे शक्य आहे. केंद्रातील नवे सरकार मोदींच्या नेतृत्त्वाखाली या दिशेने पावले टाकत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन यांनी केले.

Tuesday, November 18, 2014

द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण

एकनाथजी रानडे

सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंदांचे स्मारक



भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Tuesday, September 23, 2014

पाकिस्तानी जिहादी बनलाय भारतीय राज्यसभेचा खासदार

📎पाकिस्तानातून अहमद हसन उर्फ इम्रान नावाचा माणूस भारतात येतो. ISI साठी काम करतो. सिमी या जिहादी अतिरेकी संघटनेचा पश्चिम बंगाल राज्याचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करतो.

📎यावर कळस म्हणजे ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे खासदार म्हणून त्याला राज्यसभेत पाठवले जाते. मग सगळा भांडाफोड होतो.

📎 लोकसभा निवडणूक प्रचारात ममता यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते की, बांगलादेशी मुस्लिमांना हात तर लावून दाखवा.

📎पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील एक वरिष्ठ महिला अधिकारी इस्लाम कबूल करून पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होती. आता पाकिस्तानी नागरिक असलेल्या जिहादी माणसाला खासदार बनवून थेट संसदेत पाठवणाय्रा ममता बैनर्जीबद्दल संशय बळावला आहे. ममता बैनर्जी या जिहादींसाठी काम करताहेत की काय?

📎 साधूवेषातील "रावणा"ला ओळखणे कठीण असते. भारतातील अनेक "सेक्युलर" बुद्धीजीवी, पत्रकार आणि राजकारणी देशविरोधी शक्तींसाठी काम करतात, हे मध्यंतरी उघड झाले होते. भारतातील उदारमतवादी वातावरणाचा गैरफायदा घेतात, हे अनेकदा पुढे आले आहे. कायद्यातील पळवाटा व सबळ पुराव्याअभावी या मंडळींचे फावते.

📎बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणि आताच्या नव्या गौप्यस्फोटामुळे ममता यांच्यावरील संशय गडद झाला आहे. ममता यांची चौकशी झाली पाहिजे.

📎संदर्भ - The New Indian Express - http://www.newindianexpress.com/nation/Mystery-Surrounds-Pakistan-Citizens-TMC-MP-Post/2014/09/22/article2442700.ece

#नोंदी सिद्धारामच्या
www.psiddharam.com

Sunday, September 21, 2014

लव्ह जिहादमुळे नाही भाजपचा पराभव

पोटनिडणुकांचा निकाल - बीबीसीचे विश्लेषण

सप्टेंबर २०१४ मध्ये देशातील काही राज्यांमध्ये ३३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांहून अधिक जागा जिंकल्या. पण सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या की भाजपाचा दारुण पराभव, मोदी लाट झाली सपाट इत्यादि. परंतु, या निकालाचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण बीबीसी हिंदीच्या संकेतस्थळावर वाचायला मिळाले, जे अधिक तर्कसंगत वाटले.

Friday, September 19, 2014

असे होते विवेकानंदांचे हिंदुत्व

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या काळातही अशीच स्थिती होती. आज ज्या ज्या कारणांसाठी हिंदुत्वाला बदनाम करण्यात येत आहे, त्याच कारणांसाठी शंभर वर्षांपूर्वीही केले जात होते. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा अतिशय प्रभावीपणे हिंदुत्व आणि देशहित यावर आघात करणार्‍यांना उघडे पाडले होते. यातील काही प्रमुख मुद्द्यांवर स्वामी विवेकानंदांची काय भूमिका होती हे त्यांच्याच शब्दांत पाहणे उचित होईल.

भारत - चीन आणि मोदी

व्हाटस अपच्या स्वाध्याय ग्रुपवर झालेल्या चर्चेचा निवडक अंश
विमर्श - 1
चीन हा निद्रीस्त राक्षस आहे, असे स्वामी विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी म्हटले होते. त्याचा दाहक अनुभव देशाने १९६२ ला घेतला.

Tuesday, September 9, 2014

एक अघोषित युद्ध - लव जिहाद

लव्ह जिहाद रोखणे काही खूप सोपे आहे असे नाही. कारण लव्ह जिहाद नावाची काही चीज नाहीच, असे समाजात बिंबवण्यासाठीही एक मोठा गट काम करत आहे. ही मंडळी समाजात सेक्युलरवादी म्हणून वावरतात. पत्रकार, विचारवंत म्हणून समाजात मान्यता असलेला हा वर्ग आहे. धर्मनिरपेक्षतेची भाषा या मंडळींना चांगलीच अवगत आहे. सेक्युलॅरिझमच्या आडोशाने लव्ह जिहादला विरोध करणारेच कसे जातीयवादी आहेत, हे सांगण्याचे काम बुद्धीजीवी जिहादी करत असतात.

Saturday, August 30, 2014

जपान, मोदी, अबे सिंझो आणि विवेकानंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौय्रावर जात आहेत. त्यावरून एक आठवण २२ ऑगस्ट २००७ ची.
त्या दिवशी जपानचे  पंतप्रधान एबे सिंझो यांनी भारताच्या संसदेसमोर भाषण केले होते.
भाषणाची सुरुवात त्यांनी विवेकानंदांचा संदर्भ देऊन केली.

Friday, August 29, 2014

देशोदेशींचा गणपती

Displaying indonesia2000yrs.jpg
२००० वर्षापूर्वीची इंडोनेशिया येथील मूर्ती
शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपं असलेला गणपती हिंदू धर्मातील पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गणपती हा लहान मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात. दशदिशांत आनंदाची उधळण करणारा गणपती देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगती, साहित्याचा ज्ञाता, केलेचा उद्गाता, भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून रणभूमीपर्यंत अग्रस्थानी राहणारा तो नेता आहे. म्हणूनच हिंदू धर्माच्या मुख्य शाखा असणाऱ्या शैव, वैष्णव, जैन, बौद्ध आदी विविध पंथांमध्ये गणपती पूजला जातो.

Thursday, August 21, 2014

विवेक विचार'तर्फे मुजफ्फर हुसेन यांचे आज व्याख्यान

सोलापूर. विवेकानंदकेंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारतर्फे शुक्रवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी सायंकाळी वाजता पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday, August 14, 2014

गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना

जगातील सर्वाधिक विज्ञाननिष्ठ कालगणनेचे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. वर्षप्रतिपदा, नवसंवत्सर, संवत्सरी या नावांनीही हे भारतीय नवीन वर्ष साजरे करण्यात येते. युगाचा आदी अर्थात युगाचा प्रारं दिवस म्हणूनही युगादी किंवा उगादी म्हटले जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. सृजनाला सुरुवात झाली अन् वेळेलाही प्रारं झाला. मुकुल कानिटकर, नागपूर यांचा स्वैर अनुवादित लेख 

Sunday, June 8, 2014

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

विवेकानंदांच्या विचारप्रकाशात नरेंद्र मोदी 

स्वाभिमानी. कणखर. भारतीय संस्कृतीचा कट्टर अभिमानी. भारताला जगद्गुरूपदी विराजमान करण्याची तीव्र तळमळ असलेला. देशभक्त. त्याग आणि सेवा या मूल्यांवर श्रद्धा ठेवून संपूर्ण जीवन कळत्या वयातच राष्ट्रार्पण केलेला. गरिबांप्रती ईश्वरी भाव बाळगणारा. प्रसंगी लीन होणारा अन्‌ आवश्यक तेव्हा वज्राहून कठोरता दाखवणारा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपले जीवन घडवलेला. हिंदुत्वाप्रती मनात गौरवाची भावना मिरवणारा आणि त्याच वेळी अन्य धर्मांप्रती हृदयात सद्भाव धारण करणारा नेता देशाच्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. 

Monday, May 5, 2014

विवेकानंद केंद्रातर्फे त्र्यंबकेश्‍वरजवळ १६ मेपासून योग शिबिराचे आयोजन

सोलापूर | विवेकानंद केंद्राच्या वतीने त्र्यंबकेश्‍वरजवळ (जि. नाशिक) पिंपळद येथे १६ मे ते ३० मे २०१४ या कालावधीत निवासी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकपासून तीन किलोमीटरवर सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत रम्य परिसरात विवेकानंद केंद्राचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी रोज सकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत विविध सत्रांचे आयोजन असेल.

Wednesday, April 23, 2014

नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीमधील एक सर्वोत्कृष्ट मुलाखत


शाज़ी ज़मां: नरेंद्र मोदी जी आपका बहुत स्वागत है.
 नरेंद्र मोदी: मेरे दर्शकों को मेरा नमस्कार

Monday, April 21, 2014

आर्य आणि अनार्य


जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.

युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !

कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच !

रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? - लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? - ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? - हा खुळेपणा आता पुरे !

महासरितांच्या विस्तीर्ण पात्रांनी खंडित झालेला विराट, समतल आणि समशीतोष्ण सुखद असा आर्यभूमीचा या भूभाग आर्यसंस्कृतीच्या महावस्त्राचा भाग आहे. येथील धागा उच्च संस्कृतीच्या, विकसनशील संस्कृतीच्या आणि वनवासी संस्कृतीच्या मानवांनी - बह्वंशी आर्यांनी घडविला आहे. वर्णाश्रमधर्माच्या चौकटीत या वस्त्राची निर्मिती होत आहे. निसर्गातील स्पर्धा आणि संग्राम यांच्यावर विधायक बुद्धीने विजय मिळविण्याच्या आकांक्षेच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हेमंगल वस्त्र विणले आहे. युरोपीय लोकांनो ! मला असे सांगा की, कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश तुम्हाला जिथे जिथे आढळले,तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात. तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत. हे आजतागायत चाललेले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय सांगतो ? तिथल्या मूळच्या जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी, तशी तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे. ज्या ठिकाणी असे करणे तुम्हाला शक्य झाले नाही, त्या ठिकाणची राष्ट्रे अद्यापही जिवंत आहेत.

हिंदुस्थानने असे कधीच केले नाही. आर्य हे सहृदय, उदार होते. त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उतुंग होती. त्यात या पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते.आणि माझ्या देशातल्या मूर्खांनो ! मी तुम्हाला विचारतो की, हिंदुस्थानात एतद्देशीयांच्या कत्तली झाल्या असल्या तर चतुर्वर्णांची रचना अस्तित्वात तरी आली असती काय ?

स्वत: जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे ध्येय आहे. आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य करणे हे आहे. युरोपीयांचे साधन शस्त्र हे आहे. आर्यांचे साधन चतुर्वर्णांची रचना हे आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी समाजाची चार वर्णात विभागणी करणे आर्यांना आवश्यक वाटले. वर्णांचे कप्पे कडेकोट नव्हते. जो तो आपल्या साधनेने उच्च वर्णात प्रविष्ट होऊ शके. युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे. भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे. म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत.

(पूर्व आणि पश्चिम, स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय, खंड ५)


****

आधुनिक काळातील संशोधन आणि पुरावे
Introduction
Oriental Renaissance
Motives of the British East India Company 
Implication of Aryan Invasion Theory
Voices of dissent
Indian protests

Challenging the infallible façade of Western scholarship
Indological MacCarthyism

Race, Religion and Philology in the 19th Century 

Colonial Indology - Acceptance of A Racist Theory
California Textbook Controversy
CAPEEM Fights Discrimination Against Hindu Children with a Lawsuit
Disparaging/Sarcastic text of Ramayana in American Textbooks?
Background on Aryan Invasion Theory
Scientific Racism
India's Cultural Unity

Harmful Theory
Evidence from Indian tradition
Evidence from Archaeology
Conclusion

***
source : http://www.hinduwisdom.info/aryan_invasion_theory.htm

Wednesday, April 16, 2014

मोदींसाठी एव्हढे कराच

केलीच पाहिजेत अशी कामे...  

१. स्वतः मतदान करणे.
२. किमान ११ मित्र/नातेवाईक/परिचितांना भेटून/फोन करून मतदान करण्याची विनंती करणे.

३. ज्यांच्याकडे लोकसंवादाचे कौशल्य आहे, ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना यासाठी सक्रिय करण्याचा प्रयत्न करणे.

४. युद्धाची खूप तयारी केलीय पण युद्धभूमीवर उतरलाच नाही तर काय उपयोग? मतदानाचा दिवस एकप्रकारे युद्धाचाच दिवस. आजच्या काळात मतदानाद्वारेच युद्ध लढले व जिंकले जातात. म्हणून १७ एप्रिलचा दिवस अख्खा मतदान वाढण्यासाठीच खर्ची घाला.

५. मोदी पीएम होणारच आहेत, पण तगडे बहुमत मिळण्यासाठी लोकसभेची प्रत्येक जागा, प्रत्येक मत मोलाचे असणार आहे. त्या यशात माझंही योगदान असणं हा सर्वोच्च आनंदाचा विषय आहे.

६. मतदान वाढण्यासाठी आपापल्या स्तरावर जे काही करता येण्यासारखं आहे ते सारं करण्याचा संकल्प घेऊ या.

अबकी बार... मोदी सरकार

नव्या युगाची देशभक्ती
मोदींना देऊया मतशक्ती

किमान ११ जणांना हा संदेश पाठवावा, ही विनंती.
(भगतसिंग ग्रुप))

Monday, April 14, 2014

मत कुणाला देणार?


देशात सध्या निवडणुकांचे दिवस सुरू आहेत. विजयी होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. राजकारण्यांची एक प्रकारे परीक्षाच सुरू आहे. मतदारांचीसुद्धा ही एक प्रकारे परीक्षाच आहे. डोळे उघडे ठेवून देशातल्या घडामोडींकडे पाहून आपल्याला निर्णय करावा लागणार आहे. असं म्हणतात की जनतेला त्यांच्या पात्रतेप्रमाणे राज्यकर्ते मिळतात, कारण हे राज्यकर्ते जनतेतूनच आलेले असतात. म्हणून जनतेत जागरुकता आणण्यासाठी काम करण्याची आज गरज आहे.

सत्तेतील राजकारणी धूर्तपणे आश्‍वासनांची खैरात करून, पैसे, भेटवस्तू वाटून, अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करून, विरोधी उमेदवारांची निंदानालस्ती करून, सत्तेत येण्यासाठी आपला कुचकामीपणा भरून काढण्याचा प्रयत्न करतीलच. अकार्यक्षम आणि कणाहीन लोकांना क्षमा न करणे हेच आपल्या हाती आहे. आपल्या देशासमोरील खर्‍या प्रश्‍नांना समजून घेऊनच आपण ही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.
गेल्या शतकात आपण काय काय सहन केले नाही? देशाची धुरा ज्यांच्या हाती देण्यात आली, त्यांच्या सत्तामोहापायी आपल्या महान देशाचे तुकडे होताना पाहण्याची पाळी आपल्यावर आली. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून पाकिस्तान बनवण्यात आले. यानंतरही केवळ मतांच्या लाचारीसाठी देशहिताला नख लावणारे राज्यकर्ते आपल्या नशिबी आले.
‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीने ९ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेत केले. देशाच्या गृहमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने ३० सप्टेंबर २०१३ रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ‘कोणत्याही निरागस, निष्पाप मुसलमान तरुणांना संशयावरून अटक करू नका. चुकीने कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला अटक केल्यास त्या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’, असे त्या पत्रात म्हटले होते. चुकीने कोणा हिंदूला किंवा ख्रिश्‍चनाला अटक केले तर चालते की काय? चुकीने कोणासही अटक करू नका असे का सांगण्यात येऊ नये?
‘मुसलमानांना तुटपुंजे कर्ज देऊ नका. त्यांना ५० लाखांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास महामंडळाने दिले पाहिजे. तसेच जर ते कर्ज मुसलमान फेडत नसतील तर सरकारची त्याला हरकत राहता कामा नये. तेवढी सूट त्यांना दिल्याने काही बिघडत नाही.’, असे प्रतिपादन देशावर अनेक दशके राज्य केलेल्या पक्षाच्या कर्नाटक प्रदेशाचे अध्यक्ष यांनी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी केले.
अशी शेकडोंनी उदाहरणे देता येतील. पण या उदाहरणांपेक्षा अधिक घातक बाब आहे, या मंडळींची विचारधारा. स्वामी विवेकानंदांनी ‘हिंदुत्वाला’ या देशाचे प्राणतत्व संबोधले. या हिंदुत्वाला नष्ट करणे हीच या मंडळींची विचारधारा बनली आहे.
आज स्वार्थप्रेरित शक्तींच्या हाती देशाची सत्ता आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेल्या ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांनी या देशाचा आत्मा समजून घेतला नाही. परकीय आक्रांतांच्या मानसिकतेतूनच या देशाकडे पाहण्याची सवय या देशाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी देशवासीयांच्या अंगी बाणवली. परिणामी त्याग आणि सेवा या राष्ट्रीय मूल्यांची उपेक्षा झाली.
फसवून धर्मांतरण करणारे मिशनरी आणि जिहादी दहशतवाद या मायावी आणि मुजोर शक्तींकडे केवळ स्वार्थासाठी दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. जिहादी दहशतवादाला पाठीशी घालण्यासाठी ‘हिंदू दहशतवादाचे’ कुंभाड रचण्यात आले. या देशाची सुरक्षा करणार्‍या वीर जवानांमध्ये धर्माच्या आधारावर शिरगणती करून मुस्लिम समाजात फुटीरता दृढ करण्याचा प्रयत्नही सत्ताधार्‍यांनी करून पाहिला. आता कारगिल विजयात कोणत्या धर्माचे किती सैनिक, याचीही जाहीर चर्चा होत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व नामोहरम करण्यासाठी सर्वच बाजूने ‘सेक्युलॅरिझमचे’च्या नावाखाली हाकाटी पिटण्यात येत आहे. राष्ट्रीय विचारधारेचे आणि विकासाचे प्रबळ प्रतिनिधी बनलेल्या आश्‍वासक नेतृत्त्वाला संपवण्यासाठी सर्वच कथित सेक्युलरवादी आकाशपाताळ एक करत आहेत.
या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांना दूर करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. भारतीय जीवनमूल्यांप्रती श्रद्धा असणार्‍यांना आपले मत दिले पाहिजे. आपल्या एका - एका मतातून आपल्या राष्ट्राला बळ मिळणार आहे. मतदान हा केवळ आपला अधिकार नाही, त्याहून जास्त आपले कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी, विचारांसाठी कोण उभा आहे, हे जाणण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपला समाज विखुरलेला आहे असे समजून आपल्याकडे न पाहणार्‍यांना, राजकारण्यांना दरवाजा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. योग्यतेला, योग्य व्यक्तीला, योग्य पक्षाला, योग्य कारणांसाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या या छोट्याशा कृतीने फक्त ५ वर्षे शक्तिशाली राष्ट्रच लाभणार नाही, तर त्यासोबतच शाश्‍वत अशा विकासाची चेतनाही मिळेल.
सिद्धाराम भै. पाटील

Sunday, March 2, 2014

माझी पहिला कविता

काल मराठी दिवस होता. आज आमच्या कार्यालयात स्वलिखित कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम आयोजले गेले. कविता लिहिण्यासाठी खूप आग्रह झाल्याने मीही एक लंगडा प्रयत्न केला अन लिहिली माझी पहिली कविता…

माझी पहिला कविता

कन्नड माझी मातृभा
षा, शिक्षणाची भाषा मराठी
घरात, मित्रांत कानडी, शाळेत मात्र मराठी
संवाद होतसे
 कानडीवाचन, लेखन मराठी
बालभारती, कुमारभारतीतून शिकत गेलो मराठी
त्यातून अभिलाषा जागली, व्हावे लेखक मराठी

पुढल्या शिक्षणासाठी शहर गाठले
मराठी
बोलताना तारांबळ उडू लागली
बोलण्याच्या ओघात कानडी घुसू लागली
वाचन वाढत गेलं, वृत्तपत्रांचा लळा लागला
विचारांशी मैत्री झाली
अन् पत्रकार बनलो

कामाची गरज म्हणून लेखन करू लागलो
अनेक विषयांवर लेख पाडू लागलो
लेखांना वाचक मिळाला, कौतुकही झाले
स्वांतसुखाय लिहू लागलो, पण लेखक झालो काय?
आग्रहास्तव कविता लिहिली, पण कवी बनलो काय?

- सिद्धाराम

Saturday, January 18, 2014

विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान

 
युवक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी सोलापूर युवारत्न पुरस्कारांचे वितरण झाले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर सभागृहात कार्यक्रम झाला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते युवकांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचे औचित्य साधून ‘दिव्य मराठी’चे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील यांचे विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान झाले. अमित रोडगे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. राज सलगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आठ वाजता सुरुवात झाली मात्र गृहमंत्री रात्री 10.20 वाजता आले आणि पुरस्कारांचे वितरण झाले.

Thursday, January 9, 2014

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

विज्ञान आणि अध्यात्म, युवा विचार आणि बुजुर्ग चिंतन अशा कित्येक द्वंद्वांचा अद्भुत संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला स्वामीजींची 151 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त..

सिद्धाराम भै. पाटील, सोलापूर

Monday, January 6, 2014

मुस्लिमांवर अन्याय करणारी गोष्ट

५ जानेवारीच्या सोलापूर तरुण भारतात प्रसिद्ध झालेला देवल बुक्का यांचा एक विचार करायला लावणारा लेख.
२४ डिसेंबर २०१३ रोजी रात्री सोलापुरातून दोघांना अटक झाली. सिमीच्या अतिरेक्यांना मदत केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. महमद सादिक लुंजे आणि ओमर दंडोती हे ते दोघे. ओमर याच्याकडून बॉंब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. मध्यप्रदेश व मुंबई दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि सोलापूर व संभाजीनगरच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

पत्रकारांची सक्रियता
मंगळवारी कारवाई झाली. सोलापूरच्या पत्रकार सृष्टीत वावरणारे चौघे पत्रकार सक्रीय झाले. त्यांनी ‘शोधपत्रकारिता’ केली. पकडण्यात आलेले तरुण निष्पाप असल्याचा त्यांना साक्षात्कार झाला. हे पत्रकार सामाजिक कार्यकर्त्याच्या भूमिकेत शिरले. संशयीत अतिरेक्यांच्या कुटुंबियांकडे गेले. त्यांना पत्रकार परिषद घेण्यासाठी आत्मविश्‍वास दिला. योगायोग असा की हे पत्रकार मित्र मुस्लिम समाजाचे होते.
 

मास्तर आले धावून
सादिक आणि ओमर दोघे निर्दोष असल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले. लगेच धर्माला अफूची गोळी मानणार्‍या पक्षाचे नरसय्या आडम धावून आले. नरेंद्र मोदी यांना हिरो ठरवण्यासाठीच मध्यप्रदेशच्या एटीएसने दोन्ही तरुणांना अटक केल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही निर्दोष असल्याचे प्रमाणपत्रही त्यांनी दिले. या कारवाईत मुंबई एटीएस आणि सोलापूर व संभाजीनगरचे पोलिस सहभागी होते, याचे भानही या महाशयांना राहिले नाही. 


हाय रे, त्यांचे दुर्दैव
न्यायाधिशाच्या भूमिकेत जाऊन त्या तरुणांना निर्दोष ठरवताना ऍडम बनलेल्या मास्तरांना थाडाही संकोच वाटला
नाही. हे कमी होते म्हणून की काय, जमियत ए उलमा या संघटनेच्या बॅनरखाली नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. अटक केलेल्यांना त्वरित सोडण्याची मागणी झाली. शेकडो मुस्लिम धर्मगुरू होते. ऍड. यू. एन. बेरिया, माजी महापौर आरिफ शेख यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. पण, हाय रे, त्यांचे दुर्दैव, दोन जानेवारी रोजी पुन्हा कारवाई झाली.

आणखी दोघांना पकडले
गुरुवारी मध्यप्रदेश, पुणे आणि सोलापूरच्या एटीएसने संयुक्तपणे छापा टाकला. इरफान मुच्छाले आणि ईस्माईल माशाळकर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. घातपात आणि कटाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे सोलापूरचे पोलिस आयुक्त प्रदीप रासकर यांनी सांगितले.

पद्धतशीर होताहेत प्रयत्न
पोलिसांकडे असलेले पुरावे सबळ असतील तर सोलापुरातून अटक झालेल्या तरुणांना शिक्षा होईल. पुरावे नसतील तर ते निर्दोषही सुटतील. परंतु सोलापुरात सीमीच्या अतिरेक्यांपेक्षा अधिक घातक विषवेल अतिशय बेमालुमपणे पसरत आहे. त्याकडे कुणाचेच लक्ष नाही. संशयित अतिरक्यांना पडल्याची चर्चा तर मोठ्या प्रमाणात होते. परंतु अतिरेक्यांपेक्षाही अधिक घातक स्थिती सोलापुरात तयार करण्याचा पद्धतशीर प्रयत्न होतोय, याकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही, हे दुर्दैवच. सीमीच्या अतिरेक्यांपेक्षा घातक काय आहे, हे समजून घेण्यासाठी पुढील बातम्या पाहा.

स्वार्थासाठी देशहिताला नख
भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे, असे विधान पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ९ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेत केले.
देशाच्या गृहमंत्रीपदावर विराजमान असलेले सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांनी ३० सप्टेंबर २०१३ रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ‘कोणत्याही निरागस, निष्पाप मुसलमान तरुणांना संशयावरून अटक करू नका. चुकीने कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला अटक केल्यास त्या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’, असे त्या पत्रात म्हटले होते.

‘मुसलमानांना तुटपुंजे कर्ज देऊ नका. त्यांना ५० लाखांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास महामंडळाने दिले पाहिजे. तसेच जर ते कर्ज मुसलमान फेडत नसतील तर सरकारची त्याला हरकत राहता कामा नये. तेवढी सूट त्यांना दिल्याने काही बिघडत नाही.’, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्‍वर यांनी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी केले.

मुस्लिमांवर अन्याय करणारी बाब
मुसलमानांची गठ्ठा मते कशी मिळतील यासाठी स्वार्थी राजकारण्यांचे हे वर्तन आणि इस्लामी अतिरेक्यांबद्दल पळपुटी भूमिका घेणारे स्वयंघोषित पुरोगामी यांच्याबद्दलच्या रागाचं पर्यवसान सामान्य मुस्लिमांविरुद्धच्या रागात होत आहे. ही वाढती भावना नक्कीच मुस्लिमांवर अन्याय करणारी आहे. सामान्य हिंदू ज्याप्रमाणे धर्मांध नाही, त्याप्रमाणे सामान्य मुस्लिमही धर्मांध नाही. त्याचं या देशावर प्रेम आहे आणि इस्लामी अतिरेक्यांच्या विध्वंसक कारवायांबद्दल त्यालाही चीड आहे. असं असताना इस्लामी अतिरेक्यांबद्दलच्या लोकांच्या मनात असलेल्या रागाची झळ सामान्य मुस्लिमांना सोसावी लागणे हे अन्यायकारक आहे.

सोलापूर ज्वालामुखीच्या तोंडाकडे
सामान्य मस्लिमांवरच्या या अन्यायाला सुशिलकुमार शिंदे, आडम मास्तर, मनमोहनसिंग यासारखे राजकारणी हातभार लावतात. सर्वसामान्य मुसलमानांनाही या पापाचे धनी करण्याचे कारस्थान सोलापुरात गेल्या काही वर्षांपासून मुस्लिम समाजातील स्वत:ला पुरोगामी समजणार्‍या काही बुद्धीजीविंकडून होत आहे. आणि याला माजी महापौरांसह सर्वसामान्य मुस्लिम जनता अजाणतेपणी बळी पडत आहे. ही स्थिती सिमीच्या अतिरेक्यांपेक्षाही अधिक घातक आहे. हा प्रकार सोलापूरला ज्यालामुखीच्या तोंडाकडे नेणारा ठरू शकतो.

पत्रकार संघातील वार्तालाप
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपून नव्या राष्ट्रपतीच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाची ही घटना आहे. सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाने राष्ट्रपती निवड प्रक्रियेसंबंधी संघाच्याच सभागृहत एका वार्तालापाचे आयोजन केले होते. मुस्लिम समाजातील एक ‘पुरोगामी’ विचारवंत पत्रकारांशी संवाद साधत होते. डॉ. कलाम कुठले शास्त्रज्ञ, ते तर टेक्निशियन आहेत, असे सांगत या महोदयांनी संसद हल्ल्यातील अतिरेकी अफझल गुरू याची आडमार्गाने बाजू घेण्याची कसरत केली. (तेव्हा तरुण भारतने याचे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध केले होते.)

बुद्धीजीवींचा असाही जिहाद
‘‘पवित्र महिने उलटल्यानंतर जिथे जिथे तुम्हाला मूर्तिपूजक दिसतील, तेथे त्यांना ठार करा. त्यांना पकडा, त्यांना वेढा घाला, त्यांच्यासाठी दबा धरून बसा व ते दिसताच त्यांना मारा. पण त्यांना पश्‍चात्ताप झाला, इस्लामचा त्यांनी स्वीकार केला, गरिबांसाठी द्यावयाचा दंड त्यांनी दिला तर त्यांना सुखरूप जाऊ द्या.’’ हा इस्लामी धर्मग्रंथातील आदेश. तो थेट देण्याऐवजी या आदेशाचे पालन करणार्‍या धर्मांधांना मुस्लिम समाजात हिरो म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रकार अतिशय गंभीर असला तरी याला रोखू शकणारा कायदा सध्या अस्तित्वात नाही.

कट्टरतेला प्रोत्साहनयातूनच आता औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याला सुफी संत म्हटले जात आहे तर शेकडो हिंदूंची कत्तल आणि लक्षावधी हिंदूंना जबरदस्तीने मुसलमान करणार्‍या टिपू सुलतानाला मुस्लिम समाजासमोर आदर्श म्हणून ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अलीकडे टिपू सुलतानची जयंती मोठ्या धडाक्यात होईल यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहेत. यंदा सोलापुरातही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झाली. यातून इस्लाम विदाऊट जिहाद निर्माण होण्याऐवजी कट्टरतेला प्रोत्साहन मिळते.

आडमार्गाने भिनवतात धर्मांधता
माजी खासदार आणि सुधारणावादी म्हणून प्रतिमा असलेले डॉ. रफिक झकेरिया म्हणाले होते, ‘डॉ. कलाम हे खरे मुसलमान नाहीत. त्यांना मुसलमान राष्ट्रपती म्हणू नका.’ मुस्लिम समाजाचे नेतृत्त्व करणारे नेते डॉ. कलामांना सामान्य मुस्लिमांसमोर हिरो म्हणून सादर करत नाहीत. आडमार्गाने धर्मांधता भिनवण्याचे काम मात्र करतात.

मुख्यालय मशिद प्रकरण
सोलापूरच्या पोलिस मुख्यालयातील मशिदीचे प्रकरणही असेच आहे. प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघात मुस्लिम समाजाची संख्या अधिक आहे. मुस्लिम मते आपल्याकडेच वळावित यासाठी माकपचे नरसय्या आडम आणि कॉंग्रेसचे नेते अतिशय घातक राजकारण खेळत आहेत. त्या मशिदीतून देशविघातक कारवाया करणार्‍या लोकांचा वावर असल्याचे पुढे आल्याने बाहेरील लोकांना नमाज करण्यास बंदी घालण्यात आल्याचे सांगितले जाते.

कणखर भूमिका पोलिसांची
पोलिसांच्या ठाम भूमिकेमुळे आजवर केंद्रीय गृहमंत्री शिंदे, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना अनेकदा साकडे घालूनही मशिद खुली झाली नाही. राज्याचे मोठे पोलिस अधिकारी मशिद प्रकरणाचा आढावा घेऊन गेले. आडम मास्तर यांनी आंदोलनाची भाषा केली. कॉंग्रेसमधील काही मुस्लिम नेत्यांनी पक्ष गेला उडत, मशिद खुली करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका घेतली. या राजकीय कुरघोडीतील एक भाग म्हणून आडम मास्तर यांनी संशयीत अतिरेक्यांना निर्दोष ठरवून पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगितले. त्याला उत्तर म्हणून बेरियासह कॉंग्रेसमधील मुस्लिम नेते पकडण्यात आलेल्यांना निर्दोष असल्याचे सांगितले. हे खूपच घातक आहे.

तुमचे राजकारण होते...
मुस्लिम समाजातील पत्रकार, बुद्धीजीवी आणि नेते यांनी समाजाला दिशा देण्याची गरज आहे. हे करणे शक्य नसेल तर शांत बसा पण सामान्य मुस्लिमांच्या मनात विष पेरू नका. तुमचे राजकारण होते आणि या बिचार्‍यांचे जीवन उद्ध्वस्त होते. परिणाम मोठे असतात त्यामुळे परिणामांची चर्चा अधिक होते. कारणे सूक्ष्म असतात. त्या अजिबात चर्चा होत नाही. हे सर्वसामान्यांना सहजगत्या ध्यानात येत नाही.

करता येतील हे उपाय
समाजाची दिशाभूल करणार्‍यांविरुद्ध सर्वसामान्य मुस्लिम समाजाने पुढे आले पाहिजे.

डॉक्टर्स, वकिल, उद्योजक, शिक्षक, अभियंते अशा विभिन्न क्षेत्रात काम करणार्‍या संघटनांनी दिशाभूल करणार्‍या राजकारण्यांच्या विरोधात तत्काळ निवेदने प्रसिद्धीला दिली पाहिजेत.

हिंदू मुस्लिमांमध्ये सौहार्दाची भावना वाढीस लागण्यासाठी दोन्ही बाजूने विविध प्रयत्न व्हावेत.
मुस्लिम धर्मगुरूंनी धर्मांधता पसरवणार्‍यांविरोधात सक्रीय व्हावे.

गठ्ठा मतांसाठी लांगूलचालनाचे धोरण आखणार्‍यांना सर्वांनीच मतपेटीतून धडा शिकवले पाहिजे. असे झाले तर कोणी पुढारी समाजाला तोडण्याचे राजकारण करेल काय ?





.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी