Tuesday, June 25, 2013

शिवबारत्न पुरस्कार वितरण

शिवबारत्न बहुउद्देशीय संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डावीकडून अँड. महिबूब कोथिंबिरे, काशिनाथ भतगुणकी, यशवंत सादूल, रामचंद्र भोसले, संभाजी पवार, दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील, कुबेर शिंदे, पूजा कदम, मीना लवटे, शोभा पाडळे. बसलेले डावीकडून अँड. गाजोद्दीन सय्यद, अजय दासरी, महेश गादेकर, डॉ. शिवरत्न शेटे, निरंजन बोद्धूल आदी.

Monday, June 24, 2013

उदारहृदयी नेतृत्वाची आवश्यकता

उत्तराखंड पुराच्या भयानक व विनाशकारी संकटाशी झुंजत आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि हेमकुंडसाहिब येथील यात्रेचे सर्व मार्ग ठप्प पडले आहेत. अगदी अशीच अवस्था गेल्या वर्षी झाली होती. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पावसामुळेही अशीच परिस्थिती ओढवली होती. स्वातंत्र्यानंतर ते अगदी आजपर्यंत प्रत्येक पुराच्या आणि दुष्काळाच्या वेळी सरकार, पीडित नागरिकांना मोठी आर्थिक मदत देते. या (संकटकाळातील) मदतनिधीतील वितरणाच्या माध्यमातून व मोठमोठ्या आश्‍वासनांच्या माध्यमातून अधिकारी आणि नेतेमंडळी नवी वाहने आणि बंगले खरेदी करतात. पूर आणि दुष्काळाच्या समस्येवर आजपर्यंत स्थायी तोडगा का काढण्यात येऊ शकला नाही? जे नागरिक नदीच्या किनार्‍यावर राहतात, घाम गाळून व प्रचंड कष्ट उपसून ज्यांनी आपली घरे बांधली आहेत ती नदीच्या पुरात वाहून जाऊ नयेत म्हणून आजपर्यंत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? डॉ. नित्यानंद सध्या ८८ वर्षांचे आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक महनीय व संतसमान प्रचारक राहिले आहेत. त्यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती की, प्राचीन काळी तीर्थयात्रांसाठी पर्वतात जेवढे रस्ते तयार झाले त्यांचे नद्यांना आलेल्या पुरामुळे किंवा भूस्खलनामुळे एवढे नुकसान कधीच झाले नव्हते. तेव्हा मानवी वसाहती आणि रस्ते नद्यांच्या वर आणि मोठमोठे शिलाखंड असलेल्या पर्वतीय क्षेत्रांत अतिशय विचारपूर्वक निर्माण करण्यात येत होते. ते लोक अनुभवी होते, भलेही ते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर नसतील. या अनुभवांचा लाभ वर्तमान सरकारे घेऊ शकत नाहीत काय? मात्र, यासाठी प्रबळ इच्छा आणि उदारहृदयी नेतृत्वाची आवश्यकता आहे, जे विकासाला जाती, प्रांत आणि गटबाजीत हरवू देणार नाही.
हिंदुस्थान कात टाकू इच्छित आहे. विश्‍वातील सर्वांत तरुण देश २०२० मध्ये महासत्तेची स्वप्ने बघत आहे, तर २०५० चे भविष्यातील चित्र रंगवत आहे. जर मनात आणले तर आम्ही चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकू शकू. चांगले लोक सर्वच पक्षात आहेत. काय त्या सगळ्यांचा देशाप्रती विश्‍वास संपून जाईल? बर्‍याच वर्षांनंतर संपूर्ण राष्ट्र एक अशा समर्थ नेतृत्वाची सामूहिक कामना करीत आहे जे वर्षानुवर्षांची घुसमट, असुरक्षितता आणि आर्थिक विवंचनेतून आमची मुक्तता करेल. आम्ही आपल्याच तलावातील गाळात फसून विकासाच्या समुद्रापर्यंतचा प्रवास अयशस्वी करणार आहोत काय? जर अशी निर्णायक वेळ आलीच आहे, तर अर्जुनाप्रमाणे केवळ विजयसाधनेच्या दिशेनेच सर्वांना एकत्र येऊन लक्ष केंद्रित करावे लागेल.
तरुण विजय यांच्या लेखातून

हनुमंत उपरे यांची चळवळ निव्वळ थोतांड

'कर्मकांडा'ला सरसकट विरोध करण्याचे आवाहन, हे थोतांडच
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्यशोधक ओबीसी परिषद धर्मातर करण्यासंबंधी अभियान चालवत आहे. 'ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर' या अभियानांतर्गत पाचवी जनजागृती परिषद येत्या २२ सप्टेंबर रोजी नाशकात होईल. पुढील ३६५ दिवस एकही धार्मिक कर्मकांड करायचे नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही चळवळ निव्वळ थोतांड आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे.

मोदी यांनी आपलं वेगळेपण पुन्हा सिद्ध केलं

 ...अन् मोदींनी गुजराथींना वाचवलं!

मटा ऑनलाइन वृत्त । डेहरादून

'ते' उत्तराखंडला गेले... व्हीआयपी ट्रिटमेंट नको म्हणाले... सरकारी यंत्रणेवर त्यांनी कुठलाही दबाव टाकला नाही... फक्त आपल्या काही विश्वासू अधिका-यांना ते सोबत घेऊन गेले होते आणि सर्व परिस्थितीचं योग्य नियोजन करून त्यांनी तब्बल १५ हजार गुजराथी यात्रेकरूंसह अनेकांना सुखरूप घरी पोहोचवलं...

उत्तर भारतातील महाप्रलय - काही छायाचित्रे


Srinagar
 

Rishikesh
 

सिद्धाराम पाटील यांना ‘शिवबारत्न’

सोलापूर - शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या शिवबारत्न पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सोमवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता फडकुले सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी दिली.

Saturday, June 15, 2013

शरत्चंद्र बसू यांना सुभाषचंद्र बोस यांचे पत्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण कटक येथे पूर्ण झाले. ज्यावेळी ते कटकमधील रेविनशा शाळेत दहावी इयत्तेत शिकत होते, त्यांच्यापेक्षा मोठे असलेले त्यांचे मधले भाऊ लंडनमध्ये शिकत होते. मॅट्रिक परीक्षेच्या तयारीदरम्यान सुभाषने त्यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी भारताच्या चिंताजनक स्थितीचा उल्लेख केला होता आणि भारताच्या पुनरुत्थानाविषयी विश्वास प्रकट केला होता. सुभाषचे सर्व पत्रे त्यांच्या मोठ्या भावाने सांभाळून ठेवली आणि आपल्या मृत्यूच्या आधी त्या पत्रांना `नेताजी रीसर्च ब्युरो'कडे सोपवले. बांग्लामध्ये लिहिलेल्या एका पत्राचा अनुवाद आम्ही येथे देत आहोत.

Tuesday, June 11, 2013

हिंदुत्व को बडा धोका=आम आदमी पा पार्टी

आम आदमी पक्षच मोदींना रोखेल!
 
म . टा . प्रतिनिधी , औरंगाबाद

येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना रोखण्याची ताकद फक्त आम आदमी पक्षात असून , मुस्लिमांना हाच एकमेव पर्याय उपलब्धअसल्याचा दावा पक्षाच्या मुस्लिम नागरिक संवाद सभेत करण्यात आला .

आम आदमी पक्षाच्या वतीने सलीम अली सरोवराजवळीत मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी मुस्लिम नागरिक संवाद सभाघेण्यात आली . या सभेत पक्षाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सराटे , जिल्हा प्रवक्ते हरमितसिंघ संघा , निमंत्रक निसार अहमद खान ,सय्यद अमजद , ऐतहेशाम अली , झाकीर अली यांनी मते व्यक्त केली . ' भाजपने नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचार समिती प्रमुखपदीघोषित केले आहे . त्यांची पंतप्रधानपदाकडे वाटचाल सुरू असून , त्यांना रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही . समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशात अडकून पडला असून , इतर स्थानिक पक्षांकडून मोदींना रोखण्याची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे . काँग्रेस पक्ष गलितगात्रझाल्यामुळे मुस्लिमांसमोर आम आदमी पार्टी हाच एक पर्याय आहे ,' असे जिल्हा समन्वयक सराटे म्हणाले . मुस्लिमांच्या विकासासाठीसच्चर आयोग , रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी , अशी पक्षाची भूमिका आहे . मुस्लिमांच्या विकासासाठी विशेष स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे .देशातील राजकीय परिवर्तनाच्या या लढाईत मुस्लिमांनी सामील व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

हिंदू हिताला प्राधान्य दिल्यास पाठिंबा

द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठराव 
प्रतिनिधी । रामनाथी ( गोवा) 
जो राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीत हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी, भ्रष्ट शक्तीला संधी देईल त्याला विरोध करू आणि जो राजकीय पक्ष निवडणुकीच्या घोषणापत्रात हिंदू हिताला प्राधान्य देईल त्यालाच पाठिंबा देण्याचा ठराव गोव्यातील हिंदू अधिवेशनात मंजूर करण्यात आला. 

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास गोव्यात प्रारंभ


रामनाथी, गोवा-  बहुचर्चित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला रामनाथी,गोवा येथील रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात गुरुवारी सकाळी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. 10 जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार असून पहिल्या दिवशी देशविदेशातील हिंदू संघटनांचे नेते व विचारवंत असे मिळून 300 प्रतिनिधी सहभागी झाले. हिंदू व्हाइसचे संपादक पी. देवमुथ्थू, केरळ हिंदू हेल्पलाईनचे प्रदीश विश्वनाथ, हिंदू संहतीचे तपन घोष, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यासह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात हिंदू हितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. राज्यघटनेत घुसवण्यात आलेले ‘सेक्युलर’ शब्द हटवण्याची आवश्यकता आणि आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठांची रणनीती कशी असावी याबद्दल परिसंवादात दीर्घ चर्चा झाली. हिंदुंचे हितरक्षण आणि हिंदू राष्ट्रनिर्मिती या उद्देशाने भरवण्यात येणारे अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण http:/www.hindujagruti.org/summit   या मार्गिकेवरून सुरू आहे.

हिंदू अधिवेशनात ठरतेय लोकसभेची रणनीती


सिद्धाराम भै. पाटील | Jun 10, 2013, 01:29AM IST
रामनाथी (गोवा) - पणजीजवळील फोंड्याच्या रामनाथी मंदिराच्या सभागृहात सुरू असलेल्या पाच दिवसीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा सोमवारी (10 जून) समारोप होत आहे. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीची विस्तृत रणनीती ठरवली जात आहे.

हिंदू अधिवेशनाच्या समारोप

सिद्धराम भै. पाटील | Jun 11, 2013, 05:06AM ISTरामनाथी (गोवा) - भारत हे स्वयंभू हिंदू राष्‍ट्र असून हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी भारताला हिंदू राष्‍ट्र घोषित करण्यात यावे, असा एकमुखी ठराव द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आज ‘जयतु जयतु हिन्दुराष्‍ट्रम’च्या उद्घोषात संमत झाला. अधिवेशनात सहभागी 21 राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी भारत हिंदू राष्‍ट्र होण्यासाठी राष्‍ट्रव्यापी हिंदू संघटनांचा समान कृती कार्यक्रम निश्चित केला.

Sunday, June 2, 2013

नक्षलींचा आतंक आणि अपयशाचे महामेरू!

देवेंद्र गावंडे
२००६च्या फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस. तारीख आता नक्की आठवत नाही, पण छत्तीसगडमधील बिजापूरजवळच्या गंगालूर गावात हजारो आदिवासी एकत्र आलेले.. 'सलवा जुडूम'च्या नावावर गोळा झालेले व नक्षलवाद्यांच्या विरुद्ध उघडपणे नारेबाजी करणारे हे आदिवासी, त्यांचे नेते महेंद्र कर्माच्या आगमनाची वाट बघत आहेत. कर्मा येताच साऱ्यांमध्ये संचारलेला जोश, त्यानंतर गाजलेली सभा, त्यातील कमार्ंचे मुख्य भाषण, सारे कसे आता स्वप्नवत डोळय़ासमोरून सरकत आहे. त्यानंतरचा गेल्या आठवडय़ातला २५ मेचा दिवस. सात वषार्ंनंतर आलेला. कर्मा ठार झाले हे ठाऊक असूनसुद्धा २०० नक्षलवादी त्यांच्या पार्थिवावर गोळय़ा झाडत आहेत. त्याआधी चाकूचे ७८ वार कर्माच्या देहाने झेलले. एका लोकनेत्याला आलेल्या या अत्यंत निर्घृण आणि दुर्दैवी मरणाबद्दल सध्या देशात सर्वत्र हळहळ, संताप व्यक्त होत असला तरी नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित केले आहेत.

पुन्हा तोच प्रश्न : आंबेडकर की मार्क्‍स?

मधु कांबळे
आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या निमित्ताने दलित चळवळीमध्ये मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नुकताच केलेला हल्ला या प्रश्नावर कायम गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या बडय़ा राजकीय पक्षाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे.  नेत्यांवर हल्ला करण्याचे धाडस नक्षलवाद्यांना राजकीय कुरघोडीतूनच आल्याचे दिसत आहे. हिंसाचार कुठलाही असो, त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली तरच अशा चळवळी मोडून काढता येणे शक्य आहे..

प्रकाश आंबेडकरांचा नातेवाईकच नक्षलवाद्यांचा 'मास्टरमाईंड' !

भास्कर न्यूज नेटवर्क   |  May 30, 2013, 17:22PM IST
नवी दिल्ली- 'दंडकारण्य' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'जेथे शिक्षा दिली जाते असे जंगल' असा होतो. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या स‍ीमावर्ती भागात सुमारे 93 हजार किलोमीटर परिसरात दंडकारण्य (नक्षलवादी व्याप्त भाग) पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात 'समांतर सरकार' चालवणारा 47 वर्षीय मिलिंद तेलतुंबडे याचे  नाव मोठ्या आदराने घेतले जाते. भा‍रिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील सीपीआयचा (माओवादी) सचिव असून सध्या तो फरार आहे.

‘राज’कडून वर्षा बनसोडेंना लोकसभेसाठी विचारणा

सिद्धाराम पाटील | May 31, 2013, 11:31AM IST
सोलापूर-  आगामी लोकसभा निवडणुकांना आणखी वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय चाचपणी आणि जुळवाजुळव याला कधीच सुरुवात झाली आहे. अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आगामी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बुधवारी जाहीर केला. रिपाइंचे नेते रामदास आठवले हे महायुतीकडून सोलापुरात उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अ‍ॅड. बनसोडे यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांना सोलापूर लोकसभेसाठी विचारणा केल्याचा दुजोरा शरद बनसोडे यांनी दिला आहे.

विवेकानंदांनी पाहिले आधुनिक भारताचे स्वप्न - प्रणव मुखर्जी


मुंबई - देशाला बळकट करण्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार, तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी आहे. सामाजिक बदलांच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक भारत घडवण्याचे स्वप्न पाहिले होते, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी केले.

नक्षलवादाविरुद्ध ‘ऑपरेशन’ची गरज


अभिलाष खांडेकर | May 29, 2013, 02:00AM IST

मध्य प्रदेश  हे त्या वेळी एक मोठे अखंड राज्य होते. छत्तीसगडचा जन्म व्हायचा होता. छोटी छोटी राज्ये बनवायची की नाहीत, याबद्दल दिल्लीत अधूनमधून ज्या राजकीय चर्चा होत असत, त्यात तेलंगणा, विदर्भ, उत्तराखंड, झारखंड व छत्तीसगड अशी नावे प्रामुख्याने घेतली जात असत. छोटी राज्ये प्रशासकीयदृष्ट्या अधिक व्यवस्थितपणे चालवली जाऊ शकतात, असा त्यामागचा युक्तिवाद होता. यातील तीन राज्ये अस्तित्वात आली ती बिहार, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या अवाढव्य राज्यांतून. विदर्भ आणि तेलंगणावर साधकबाधक चर्चा सुरू आहे आणि आंध्रमध्ये तर यावर जाळपोळ, दंगे झालेले आहेत. वर्ष 2000 मध्ये ‘छोटं’ राज्य छत्तीसगड अस्तित्वात आलं आणि तिथेच नक्षलवाद प्रचंड बोकाळलेला आहे, असं चित्र परवाच्या भयंकर घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी