Tuesday, September 23, 2014

पाकिस्तानी जिहादी बनलाय भारतीय राज्यसभेचा खासदार

📎पाकिस्तानातून अहमद हसन उर्फ इम्रान नावाचा माणूस भारतात येतो. ISI साठी काम करतो. सिमी या जिहादी अतिरेकी संघटनेचा पश्चिम बंगाल राज्याचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करतो.

📎यावर कळस म्हणजे ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे खासदार म्हणून त्याला राज्यसभेत पाठवले जाते. मग सगळा भांडाफोड होतो.

📎 लोकसभा निवडणूक प्रचारात ममता यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते की, बांगलादेशी मुस्लिमांना हात तर लावून दाखवा.

📎पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील एक वरिष्ठ महिला अधिकारी इस्लाम कबूल करून पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होती. आता पाकिस्तानी नागरिक असलेल्या जिहादी माणसाला खासदार बनवून थेट संसदेत पाठवणाय्रा ममता बैनर्जीबद्दल संशय बळावला आहे. ममता बैनर्जी या जिहादींसाठी काम करताहेत की काय?

📎 साधूवेषातील "रावणा"ला ओळखणे कठीण असते. भारतातील अनेक "सेक्युलर" बुद्धीजीवी, पत्रकार आणि राजकारणी देशविरोधी शक्तींसाठी काम करतात, हे मध्यंतरी उघड झाले होते. भारतातील उदारमतवादी वातावरणाचा गैरफायदा घेतात, हे अनेकदा पुढे आले आहे. कायद्यातील पळवाटा व सबळ पुराव्याअभावी या मंडळींचे फावते.

📎बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणि आताच्या नव्या गौप्यस्फोटामुळे ममता यांच्यावरील संशय गडद झाला आहे. ममता यांची चौकशी झाली पाहिजे.

📎संदर्भ - The New Indian Express - http://www.newindianexpress.com/nation/Mystery-Surrounds-Pakistan-Citizens-TMC-MP-Post/2014/09/22/article2442700.ece

#नोंदी सिद्धारामच्या
www.psiddharam.com

Sunday, September 21, 2014

लव्ह जिहादमुळे नाही भाजपचा पराभव

पोटनिडणुकांचा निकाल - बीबीसीचे विश्लेषण

सप्टेंबर २०१४ मध्ये देशातील काही राज्यांमध्ये ३३ विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाने अन्य पक्षांहून अधिक जागा जिंकल्या. पण सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या की भाजपाचा दारुण पराभव, मोदी लाट झाली सपाट इत्यादि. परंतु, या निकालाचे वेगळ्या पद्धतीने केलेले विश्लेषण बीबीसी हिंदीच्या संकेतस्थळावर वाचायला मिळाले, जे अधिक तर्कसंगत वाटले.

Friday, September 19, 2014

असे होते विवेकानंदांचे हिंदुत्व

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे स्वामी विवेकानंदांच्या काळातही अशीच स्थिती होती. आज ज्या ज्या कारणांसाठी हिंदुत्वाला बदनाम करण्यात येत आहे, त्याच कारणांसाठी शंभर वर्षांपूर्वीही केले जात होते. स्वामी विवेकानंदांनी तेव्हा अतिशय प्रभावीपणे हिंदुत्व आणि देशहित यावर आघात करणार्‍यांना उघडे पाडले होते. यातील काही प्रमुख मुद्द्यांवर स्वामी विवेकानंदांची काय भूमिका होती हे त्यांच्याच शब्दांत पाहणे उचित होईल.

भारत - चीन आणि मोदी

व्हाटस अपच्या स्वाध्याय ग्रुपवर झालेल्या चर्चेचा निवडक अंश
विमर्श - 1
चीन हा निद्रीस्त राक्षस आहे, असे स्वामी विवेकानंदांनी १०० वर्षांपूर्वी म्हटले होते. त्याचा दाहक अनुभव देशाने १९६२ ला घेतला.

Tuesday, September 9, 2014

एक अघोषित युद्ध - लव जिहाद

लव्ह जिहाद रोखणे काही खूप सोपे आहे असे नाही. कारण लव्ह जिहाद नावाची काही चीज नाहीच, असे समाजात बिंबवण्यासाठीही एक मोठा गट काम करत आहे. ही मंडळी समाजात सेक्युलरवादी म्हणून वावरतात. पत्रकार, विचारवंत म्हणून समाजात मान्यता असलेला हा वर्ग आहे. धर्मनिरपेक्षतेची भाषा या मंडळींना चांगलीच अवगत आहे. सेक्युलॅरिझमच्या आडोशाने लव्ह जिहादला विरोध करणारेच कसे जातीयवादी आहेत, हे सांगण्याचे काम बुद्धीजीवी जिहादी करत असतात.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी