Sunday, December 28, 2008

सारखी लायकी


सारखी लायकी नको बढायकी
कुणी कुणासंग भांडायचं न्हाय
गावकीत अमुच्या ठरलच हाय ।।धृ।।

जमीन जुमला अन्‌ गोठ्यातली गाय
कर्जापाण्यापायी इकायची न्हाय
मौजेत पुख्खा ताडीन्‌ माडी
आल्यागेल्याबरूबर प्यायाचं न्हाय ।।1।।

इठुरखुमाईच्या भक्तीशिवाय
गावून डोलून त्या भजनात काय
सरसी करायला तालासुरांची
डोस्क्यात टाळ कुणी घालायची न्हाय ।।2।।

गावोगावी वर्ग सुरूच हाय
केंद्राबिगर गाव सोभायचं न्हाय
आपल्याच गावात ऱ्हायाचं थाटात
भिवूनशान्‌ आता भागायचं न्हाय ।।3।।

Tuesday, December 23, 2008

समर्थ भारत


जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे।
कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे।
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते। जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.
1077 उपनगरीय रेल्वे केवळ 288 ट्रॅकवर धावतात, ही आश्चर्यजनक किमया आहे।
जगातली पहिली 4 stroke gear scooter बजाज कंपनीने 25 जुलै 1991 रोजी बाजारात आणली।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
जय हिंद! जय हिंद की सेना॥ भारताची भूदल सेना (1 कोटी 10 लाख) जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
"जयपूर फुट' artificial limbs of Jaipur जगात प्रसिद्ध आहे।
भारतात 5195 औद्योगिक कंपन्या असून जगात भारत यात दुसऱ्या क्रमांकावर आहे।
संस्कृत ही प्राचीन भारतीय भाषा संगणकासाठी सर्वाधिक उपयुक्त असल्याचे जगाने मान्य केले आहे।
पाणिनी व्याकरणाची तत्वे सांकेतिक भाषेतून आज software निर्मितीत वापरली जातात।
अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही संस्था जगातील अग्रगण्य संस्थांत गणली जाते।
जगातील सर्वात मोठे टपाल खाते भारतात आहे।
सोलापूर वालचंद कॉलेजमधील प्रा। सयाजीराव गायकवाड (वय 35) यांनी विज्ञानाला अज्ञात असलेल्या 10 वनस्पती शोधल्या आहेत.
कॅन्सरवर effective painkiller चा शोध भारतातील प्रा। अश्रु सिन्हा व त्यांच्या सहकाऱ्यांनी लावला.
अभिनव बिंद्रा यांनी 600 पैकी 600 गुण मिळवून नेमबाजीत जागतिक विक्रम केला आहे।
रेल्वे नेटवर्किंग आणि अधिक सुरक्षित प्रवास यातही भारत सर्वप्रथम आहे।
जगात 8 व्या नंबरची लोकप्रिय व्यक्ती नारायणमूर्ती (Infosys चे अध्यक्ष) असून ते जनसेवेसाठी उत्पन्नातील 12 कोटी रुपये दरवर्षी राखून ठेवतात।
लता मंगेशकर यांनी 1991 पर्यंत 20 भारतीय भाषांतून 30 हजार गाणी ध्वनिमुद्रित केली होती।
जगात सर्वाधिक सिमेंट उत्पादन करणारा देश भारत आहे।
जपान, अमेरिकेनंतर super computer बनवणारा भारत हा एकमेव देश आहे।
स्वत:ची उपग्रह प्रक्षेपण क्षमता असणाऱ्या जगातल्या 6 देशांत भारताचा समावेश आहे। इतर देशांचे उपग्रह भारत भाडेतत्वावर प्रक्षेपित करतो.
जगातली सगळ्यात मोठी चित्रपट सृष्टी भारतात असून सर्वात जास्त चित्रपट भारतात बनविले जातात।
UNESCO कडून पुस्तकांची राजधानी म्हणून 2003 साली दिल्लीची निवड करण्यात आली।
विनोद धाम हे Hardware (pentium) चे पिता म्हणविले जातात।
Hotmail चे निर्माते साबिर भाटिया हे भारतीयच।
जगातली पहिली महिला विमानचालक भारतीय आहे।
जगात सर्वाधिक सायकली भारतात निर्माण केल्या जातात। हीरो सायकली दरवर्षी 60 लाख या संख्येत तयार केल्या जातात.
जगात सर्वश्रेष्ठ हातपंप India Mark 2 भारताने विकसित केले आहे।
India Mark 2 ची दरवर्षी 1 लाख पंपनिर्मिती केली जाते। जगातील अनेक देशांना निर्यातही केल्या जातात.
जर येथील लोक संगठित, प्रशिक्षित आणि मोठ्या ध्येयाने प्ररित केले तर लोकसंख्या ही समस्या नव्हे आपले बलस्थान बनेल।
भारतात प्रति हेक्टर कृषि भूमीवर 5।5 लोक अशी स्थिती आहे. जपानमध्ये हे प्रमाण 30.2, युरोपात 5.9 आहे.
आम्ही भारताचे ऋणी आहोत, कारण त्यांनीच आम्हाला गणित शिकवलं, नसता आजचे वैज्ञानिक शोध लागलेच नसते। - -अल्बर्ट आईन्स्टाइन
जगातल्या कोणत्याही देशापेक्षा भारतातली भूमी दुपटीहून अधिक उपजाऊ आहे।वर्षातून तीन पिके घेण्यासाठी आवश्यक वातावरणही भारतातच आहे.
यज्ञवेदी तयार करणाऱ्या प्राचीन ऋषींनी भूमितीतील अनेक प्रमेये शोधून काढली।
शून्याचा शोध भारताने लावला।

Monday, December 22, 2008

राष्ट्रभक्ती ले हृदय में


राष्ट्रभक्ती ले हृदय में हो खडा यदी देश सारा
संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा ।।धृ।।

क्या कभी किसने सुना है, सूर्य छिपता तिमीर भय से
क्या कभी सरिता रूकी है, बांध से वन पर्वतोंसे
जो न रूकते मार्ग चलते, चीर कर सब संकटोंको
वरण करती कीर्ती उनका, तोडकर सब असूर दल को
ध्येय मंदीर के पथीक को, कंटकों का ही सहारा ।।1।।

हम न रूकने को चले है, सूर्य के यदि पुत्र है तो
हम न हटने को बढे है, सरित की यदी प्रेरणा तो
चरण अंगद ने रखा है, आ उसे कोई हटा दे
दहकता ज्वालामुखी यह आ उसे कोई बुझा दे
मृत्यू की पीकर सुधा हम चल पडेंगे ले दुधारा ।।2।।

ज्ञान के विज्ञान के भी, क्षेत्र में हम बढ पडेंगे
नील नभ के रूप के नव, अर्थ भी हम कर सकेंगे
भोग के वातावरण में, त्याग का संदेश देंगे
त्रास के घन बादलोंसे, सौख्यकी वर्षा करेंगे
स्वप्न यह साकार करने, संघटित हो हिंदू सारा ।।3।।

विजय की यदि प्रेरणा ले, चल पडेंगे हम सभी
संकटोंके दल यहां से, भाग जाएंगे सभी
संघटन के सूत्र मे हम, हृदय जोडेंगे तभी
मातृभूको हम सजाएँ, वैभवोंसे हम सभी
परम वैभव प्राप्त करने, संचरित हो केंद्र धारा ।।4।।

Monday, December 15, 2008

कसाबचे कैवारी


कसाबचे कैवारी
काय संतापजनक अवस्था आली आहे पाहा, पाकिस्तानातून 25 अतिरेकी बॉंब, बंदुका घेऊन थेट मुंबईत शिरतात. 10 मारले जातात 15 गायब होतात. मुंबईतच काय देशातील कोणत्याही शहरात त्यांना प्रेमाने आश्रय देणारे कमी नाहीत. एकजण जिवंत सापडला त्याचे कबुलीजबाब सविस्तर प्रसिद्ध होत आहेत. मेलेल्या 10 अतिरेक्यांचे दफन करण्यास मुस्लिमांनी नकार दिला तर कसाब नावाच्या मानवी कसायाचे वकीलपत्र घेण्यास मुंबईच्या वकिलांनी नकार दिला. या दोन्ही घटना देशप्रेमाचे दर्शन घडवत असताना काहीजणांच्या पोटांत कायद्याच्या राज्याचा मुरडा झाला आहे. या मुरडा झालेल्यात एकेकाळी पाकिस्तानातून जीव वाचवण्यासाठी भारतात निर्वासित म्हणून आलेल्या राम जेठमलानींसारखा माणूसही कसाबला कायद्याची मदत मिळाली पाहिजे, असे ठासून सांगतो तेव्हा 1947 साली सिंध प्रांतात जे हजारो हिंदू कापले गेले त्यात हे का नव्हते, असा विचार येतो. निर्वासित म्हणून आलेल्या या इसमास दुजाभाव न दाखवता देशाचा कायदामंत्री केले, त्याचे चांगले पांग या इसमाने फेडले. आधी देश महत्त्वाचा; तो शिल्लक राहिला तर देशाचा कायदा राहतो. देशाच्या मुळावर आलेल्यांना कसला कायदा? या कसाबला गेट वे ऑफ इंडिया समोरच हजारोंच्या उपस्थितीत जाहीरपणे फाशी द्यावी, अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे. हा प्रकार रानटी वाटला तरी शठम्‌ प्रति शाठ्यम्‌ या न्यायाने दहशतवाद अणि दहशतवादी यांचा रानटीपणानेच नि:पात केला पाहिजे. कायद्याने जाऊन महंमद अफजल हा फाशी न जाता तिहार तुरुंगात रोज मटन-बिर्याणी खातोय आणि त्याच्या हातून मारल्या गेलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना अद्याप पुरेसा आधार मिळालेला नाही. कायद्याचे पालन केल्यानंतर कायद्याचेच असे धिंडवडे निघतात. त्यापेक्षा रानटीपणाने प्रकरण संपवण्यात काय गैर आहे?
कॉंग्रेसच्या कृपेने एक अफझल रोज बिर्याणी खायला घालून गेली 5 वर्षे आपण पोसतच आहोेत. आता त्यात कसाबची भर पडेल की काय, असे वाटते. कायद्याने जाऊन त्याला फाशी झाली तरी तो अफझलच्या शेजारच्या कोठडीत जाऊन बसेल. असे आणखी हल्ले होतील. निर्वासित जेठमलानींच्या म्हणण्यानुसार खटले होतील. फाशी होईल. असे फाशीचे 4-5 कैदी झाले की एखादे विमान पळवले जाईल किंवा 200-250 मुलांच्या बालवाडीवर हल्ला करून 250 बालकांना ओलीस ठेवून या 4-5 जणांची मुक्तता होईल. तो अफझल हा कसाब, हे सर्व मसूद अझहरसारखे भारतीय तुरुंगातून सुटून थेट पाकव्याप्त काश्मीरमधील अड्ड्यावर जातील. नव्या हल्ल्याची योजना आखू लागतील. पाकिस्तानातून निर्वासित म्हणून आलेल्या जेठमलानी यांना हेच हवे आहे का? कायद्याचे राज्य आणि न्यायव्यवस्था यांच्यावर जेठमलानी यांचा विश्वास आहे, ही गोष्टच विनोदी आहे. कायदामंत्री असताना सर्वोच्च न्यायालयाशी खालच्या पातळीवर जाऊन भांडणे आणि या अक्षम्य अपराधाबद्दल वाजपेयींकडून मंत्रिमंडळातून हकालपट्टी होणे असा प्रकार जेठमलानींच्या बाबत घडला. तेच जेठमलानी आज कसाबचा कळवळा येऊन बोलतात यात त्यांचा बुद्धीभ्रम झाला आहे. मुंबई बार असोसिएशनला "रबिश' अशी शिवी देणाऱ्या जेठमलानी यांचे कायद्याचे ज्ञान उतु जात असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा. ते स्वत: आणि त्यांच्यासारख्या लाखो सिंधी लोकांची घरे, वहाने, शेतवाडी, दुकाने, बॅंकेतील पैसे पाकिस्तानातच आहे. पाकिस्तानकडून प्रत्येक सिंधी निर्वासिताला नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी जेठमलानी यांनी प्रयत्न करावेत. कसाबचा कळवळा येणे ही गोष्ट सवंग प्रसिद्धीसाठी आहे. जेठमलानीच काय मुंबईतील आणखी एका वकिलाने असेच भंपक विधान केले. कसाबचे वकीलपत्र घेऊन मिळणारी प्रसिद्धी हा त्यामागचा हेतू आहे. असले दळभद्री लोक आपल्यात आहेत हे दुर्दैव.
कसाब हा पाकिस्तानी नागरिक असून, त्याचा अपराध असा आहे की, भारतीय कायद्याचा त्याला उपयोग होऊच शकत नाही। त्याचा खटला विशेष न्यायालयात चालवून फार तर पाकिस्तानी वकिलाकडून त्याचा बचाव व्हावा. कोणी पाकिस्तानी वकील तयार होतो का हेही दिसेल. सद्दाम हुसेन याच्यावरील खटल्याचे जसे जगभर प्रक्षेपण होत होते तसे या खटल्याचेही जगभर प्रक्षेपण व्हावे. त्यातून दहशतवादाचे मूळ पाकिस्तानच आहे हे साऱ्या जगाला कळाले पाहिजे. पाकिस्तानच्या संदर्भात सौहार्दता, सुसंस्कृतपणा दाखवणे आता बास करावे. त्या 10 अतिरेक्यांची मढी जे.जे. शवागारात दोन आठवडे पडून आहेत. मढं सांभाळायाचे म्हणजेही खर्च आहे. त्यांना पाकिस्तान घ्यायला तयार नाही, देशातील मुस्लिम दफनाला तयार नाहीत. दफन झाल्याशिवाय त्यांना जन्नत मिळणार नाही. त्यांचा गुपचुप कोठेतरी दफनविधी उरकला जाण्याची दाट शक्यता आहे. देशाच्या या शत्रूंना 80 गज काय अर्धा गजही जमीन मिळता कामानये. एक तर त्यांचे दहन करावे किंवा ज्या गेट वे मधून ते आले त्याच गेट वे मधून त्यांचे मृतदेह बाहेर काढून खोल समुद्रात फेकून द्यावेत. मानवाधिकार कायदा या गोष्टी येथे उपस्थित न करता कसाब प्रकरण हाताळावे. तथाकथित कायदे पंडितांनी कसाबचा कैवार न घेता थोबाड बंद ठेवावे. हा कसाब म्हणजे दुसरा अफझल होऊ नये याची आतापासूनच काळजी घ्यायला हवी.

अग्रलेख , १६ दिसम्बर २००८, तरुण भारत सोलापुर

Saturday, December 13, 2008

गायी गोपालक संघास

मदरशातून जप्त केलेल्या गायी

गोपालक संघास देण्याचा आदेश

सोलापूर : जोडभावी पेठेतील चिराग अली तकियाजवळील मदरशातून जप्त केलेले 58 बैल आणि 11 गायी सांभाळ करण्यासाठी गोपालक संघाकडे देण्याचा आदेश न्याय दंडाधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिला.
सोलापूर जिल्ह्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच निकाल आहे. 58 बैल खाटकांना देण्याची मागणी न्यायालयाने गुरुवारी फेटाळली होती. 9 डिसें.ला बकरी ईददिवशी बेकायदा कत्तलींसाठी आलेल्या या जनावरांची हिंदुत्ववादी संघटनांनी सुटका केली. नंतर पोलिसांनी ही जनावरे कोंडवाड्यात ठेवली होती. आज न्यायालयात अंतिम सुनावणी झाली. त्याचबरोबर 8 जनावरांची कत्तल ही टळली.
मदरशातून मुक्त करण्यात आलेल्या गायी-बैलांचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने अर्जाद्वारे न्यायालयासमोर दाखवली होती. न्यायालयाने गुरुवारी यावरील निर्णय राखून ठेवला होता. शुक्रवारी संध्याकाळच्या सत्रात न्यायाधीश डागा यांनी हा निकाल दिला. गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर, ऍड. म्हाळस व रमा कणबसकर यांनी काम पाहिले, तर विरोधी बाजूने ऍड. कोथिंबिरे यांनी काम पाहिले.
पोलीस निरीक्षक काणे यांनी गोपालक संघाच्या गोशाळेस भेट देऊन पाहणी केली. गायी-बैलांचा सांभाळ करण्याची व्यवस्था गोपालक संघाकडे असल्याची खात्री काणे यांनी करून घेतली. तसा अहवाल न्यायालयाकडे सादर केला. त्यानंतर न्यायालयाने निकाल दिला. गोपालक संघ गायी-बैलांचा मालक नाही, असा युक्तिवाद ऍड. कोथिंबिरे यांनी केला. गोपालक संघ ही सामाजिक संस्था आहे. संस्थेकडे गायी-बैलांना सांभाळण्यासाठी पुरेशी जागा आहे. गायी-बैलांच्या संरक्षणाची व्यवस्था आहे, अशी बाजू न्यायालयापुढे मांडण्यात आली.
कायदेशीर तरतुदी
प्राणीरक्षण कायदा अधिनियम 6 नुसार गायी-बैल आणि म्हशींच्या कत्तलींवर पूर्णपणे बंदी आहे. 15 वर्षे वयापर्यंतचा बैल शेतीसाठी उपयुक्त असल्याने, त्याच्या कत्तलीवरही बंदी आहे. काही कारणाने बैल शेतीकामासाठी उपयुक्त नसेल तरच बैलांची कत्तल करण्यास परवानगी आहे. (गायीच्या नव्हे); परंतु अशा बैलांची कत्तल करण्याआधी पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र आवश्यक असते. कत्तल करण्यासाठी परवानगी दिलेल्या बैलाच्या शरीरावर खूण करून कोणत्या कत्तलखान्यात कत्तल करण्यात येणार आहे. याची निश्चितीही संबंधित अधिकारी करतात. या कायद्याचा भंग करणाऱ्यास 1 हजार रुपये दंड किंवा 1 वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात।

दै। तरुण भारत, पान ५, १३ दिसम्बर २००८

Friday, December 12, 2008

खाटीक कड़े गायी देण्यास नकार


खाटकांच्या ताब्यात

58 बैल देण्यास

कोर्टाचा साफ नकार

सोलापूर, (विशेष प्रतिनिधी) :- जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया जवळील मदरश्यातून जप्त केलेल्या 58 बैलांना खाटकांच्या पुन्हा ताब्यात देण्याची मागणी दंडाधिकाऱ्यांनी गुरूवारी फेटाळून लावली. दरम्यान 58 बैल आणि 11 गायींचा सांभाळ करण्याची तयारी गोपालक संघाने दाखविली असून त्यांच्या अर्जावर आज निर्णय अपेक्षित आहे.
मंगळवारी 9 डिसेंबर रोजी बकरी ईद निमित्त कत्तल करण्यासाठी आणलेल्या 11 गायी व 58 बैलांची सुटका सोलापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी केली. दरम्यान चिरागअली तकिया जवळील मदरश्यात गायींच्या कत्तली झाल्या. या संदर्भात अखेर संतप्त तरुणांच्या दबावानंतर पोलिसांनी या मदरश्यातून गायी व बैल ताब्यात घेऊन त्यांची कोंडवाड्यात रवानगी केली. तसेच काल आ. आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजातील मंडळींनी कोंडवाड्यातील जप्त गायी व बैलांची मागणी केली. पण आयुक्त डॉ. उपाध्याय यांनी फेटाळून तुम्हाला हवे असेल तर न्यायालयात जा असे सुनावले. यासंदर्भात गुरुवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्र. 3 चे न्यायाधिश डागा यांच्या समोर सुनावली झाली. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी , जप्त केलेल्या 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल पोलिसांना दिला होता. तो न्यायालयाकडे सादर करण्यात आला.
तसेच संबंधित मुस्लिम बांधवांनी आमचा खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून सबब जप्त केलेली जनावरे ताब्यात देण्याची मागणी न्यायालयाकडे केली. पण न्या. डागा यांनी त्यांचा अर्ज फेटाळून लावला. ऍड. कोतींबिरे यांनी यावेळी बाजू मांडली. तर गोपालक संघाच्या वतीने ऍड. कणबसकर यांनी बाजू मांडली असून सर्व 58 बैल, आणि 11 गायींचा गोपालक संघ सांभाळणार असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. पण न्यायालयाने निर्णय राखून ठेवला असून शुक्रवारी निर्णय अपेक्षित आहे।

आरोपींना अटक नाही

मंगळवारी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला। त्यास 48 तास उलटून गेल्यानंतरही अद्याप एकासही अटक झालेली नाही. संबंधित आरोपी न्यायालयातून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नशील आहेत.

दै। तरुण भारत, पान ५, १२ दिसम्बर २००८

मदरसा आणि गाय


मदरसा आणि गाय


"मदरसा' हा शब्द वर्तमानपत्रे आणि वाहिन्या यांच्यामधून नेहमी ऐकायला मिळतो. मुस्लिम पंथाच्या मुलांना धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेला "मदरसा' म्हटले जाते. मदरशांमध्ये काय शिक्षण दिले जाते, याबद्दल मात्र मतमतांतरे आहेत. मदरशांमधून केवळ नैतिकतेचे, धार्मिकतेचे शिक्षण देण्यात येते असे सांगण्यात येते. मदरसा म्हणजे कडवे आणि धर्मांध मुसलमान बनविण्याचा कारखाना असतो, असाही आरोप होत आला आहे. या आरोपाला पुष्टी देणाऱ्या बऱ्याच गोष्टी वारंवार जगासमोर आल्या आहेत. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांसारख्या देशांमध्ये मदरशांमधून अतिरेकी निर्माणाचे काम घाऊक प्रमाणात सुरू असते, याबद्दल संशय घेण्याचे कारण नाही. अफगाणिस्तानातील तालिबान आणि पाकिस्तानच्या लाल मशिदीतील गाजलेला मदरसा ही त्याची ठळक उदाहरणे होत.
भारतातील सर्वच मदरशांमधून असे शिक्षण देण्यात येत नसले तरी काही मदरशांमधून धर्मांध पिढी निर्माणाचे काम सुरू असते, हे काही लपून राहिलेले नाही. हैदराबादेतील मदरशांमध्ये देण्यात येणाऱ्या आक्षेपार्ह प्रशिक्षणाचा विस्तृत अहवाल एका हिंदी वृत्तवाहिनीने काही महिन्यांपूर्वी ठळकपणाने दाखविला होता. मदरशांवरील हा कलंक पुसला जावा, असे सर्वसामान्य मुस्लिम बांधवांना वाटणे स्वाभाविकच म्हटले पाहिजे, परंतु मंगळवारी बकरी ईदच्या दिवशी सोलापुरातील एका मदरशाच्या आवारात झालेल्या गायींच्या कत्तलीमुळे सोलापुरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. हिंदू धर्मामध्ये गायीला पवित्र मानले गेले आहे. गायीला 33 कोटी देवतांचे वसतीस्थान मानले गेले आहे. भारतासारख्या कृषिप्रधान देशात गायींचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्या आधीपासूनच गोहत्या बंदीची मागणी संपूर्ण भारतभरातून होत आलेली आहे. महात्मा गांधी म्हणतात, "माझ्या हाती सत्ता आली तर सर्वप्रथम मी गोहत्या बंदीचा कायदा करेन.' थोडक्यात सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, भारतातील बहुसंख्य असलेल्या समाजाची गोहत्या बंद व्हावी, ही तळमळीची मागणी आहे. हा हिंदूंच्या भावनेचा आणि श्रद्धेचा मुद्दा तर आहेच, शिवाय आर्थिक, पर्यावरणाच्या दृष्टीनेही गोहत्येवर बंदी आली पाहिजे, ही सर्वमान्य झालेली बाब आहे. या स्थितीत मुसलमानांनी उत्स्फूर्तपणे गोहत्या न करण्याची शपथ घेतली आणि तशी कृती केली तर हिंदू-मुस्लिम ऐक्य खऱ्याअर्थाने साध्य होणार आहे.
थोर विचारवंत आणि स्तंभलेखक पद्मश्री मुजफ्फर हुसैन आणि अन्य अनेक मुस्लिम विचारवंतांनी गोहत्या मुस्लिमांनी स्वयंस्फूर्तीने बंद केली पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. भारतभूमीतील संस्कृतीच अशी आहे की, मुस्लिमांनी गोहत्या आणि गोमांसभक्षण बंद केले तर नैसर्गिकपणे भारतातील मुस्लिम समुदाय येथील जनमनाशी एकरूप होऊन जाईल. केवळ गोहत्या आणि गोमांसभक्षण यामुळेच येथील मुस्लिम आणि हिंदू समुदायात खोल दरी निर्माण झाली आहे. मुस्लिमांनी समजुतदारपणा दाखविला तर शेकडो वर्षांचा दुरावा नष्ट होऊन एकोपा निर्माण होऊ शकतो, परंतु ज्यांना हिंदू-मुस्लिम एकोपा नको आहे, असे तत्त्व सदैव गोहत्येचा आग्रह धरतात.
सोलापुरातील मदरशाच्या आवारात गायींची कत्तल होणे किती गंभीर बाब आहे, हे सोलापुरातील मुस्लिम समुदायाने समजून घेतले पाहिजे. मदरशांमध्ये बेकायदा कत्तलखाना चालविणे, या गोष्टीला मुस्लिमांनीच आक्षेप घेणे गरजेचे आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या जागरुकतेमुळे 69 गायी आणि बैलांचे प्राण वाचले, ही अभिनंदनीय गोष्ट आहे! सोलापुरातील मुस्लिम संस्था, नेते आणि अन्य सामाजिक संघटनांनी या कार्यकर्त्यांचे सार्वजनिक कार्यक्रम करून अभिनंदन केले पाहिजे.
मुक्त करण्यात आलेल्या 58 बैलांना खाटकांच्या ताब्यात देण्याला कोर्टाने साफ नकार दिला आहे. तसेच पशुसंवर्धन अधिकारी डॉ. मोहोळकर यांनी जप्त केलेले 58 पैकी 42 बैल शेती आणि प्रजोत्पादनास उपयुक्त असल्याचा अहवाल दिला होता, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, परंतु आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी काही मुस्लिम नेत्यांना सोबत घेऊन कोंडवाड्यातील गायी-बैलांची पोलीस आयुक्तांकडे मागणी करणे निषेधार्ह आहे. आडम मास्तर हे आता "ऍडम' मास्तर झाले आहेत. गेल्याच महिन्यात त्यांनी आपल्या कन्येचा ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये विवाह लावून दिला आहे. आडम मास्तर यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. इथपर्यंत सहन करण्यासारखे आहे, परंतु आता "ऍडम' मास्तर यांचे नाव पुढे करीत कोणी ख्रिस्ती धर्मप्रसार करीत असेल तर मात्र हिंदूंना विचार करावाच लागेल. "ऍडम' मास्तर यांनी गायींना खाटकांच्या ताब्यात द्या, अशी मागणी करून स्वत:ची "खरी' ओळख करून दिली आहे. अशा मतलबी राजकारण्यांपासून हिंदू आणि मुस्लिमांनी सावध झाले पाहिजे.
मदरशांचे पावित्र्य जपत तेथे केवळ नैतिक आणि धार्मिक शिक्षणच दिले जाईल. तसेच हिंदूंसाठी श्रद्धास्थान असलेल्या गोमातेचा आदर राखला जाईल, यासाठी मुस्लिम बांधवांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे आम्हास वाटते. शहरात शांतता आणि सुव्यवस्था नांदण्यासाठी हाच राजमार्ग आहे. अन्यथा शांतता रॅली, शांतता कमिटीच्या बैठका आणि सर्वधर्मसमभावाच्या घोषणा या तकलादू आणि दिखावू ठरतील, याबद्दल आमच्या मनात शंका नाही.

दै। तरुण भारत, अग्रलेख , १३ दिसम्बर 2008

Wednesday, December 10, 2008

मदरशात 8 गायींच्या कत्तली


हिंदुत्ववाद्यांच्या जागरुकतेमुळे

69 गायींचे प्राण वाचले

सोलापूर : बकरी ईदचे निमित्त करून मंगळवारी जोडभावी पेठेतील चिरागअली तकीया मदरशात आठ गायींच्या कत्तली करण्यात आल्या. दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या जागरुकतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले. मुस्लिम तरुणांच्या हटवादी भूमिकेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, जेलरोड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याखाली बापू मोतीवाला, महंमद इसाक अब्दुल सत्तार खडके, अब्दुल समद इसाक माडी, सिकंदर उस्मान अलमेलकर, अब्दुल रसिद अली शेख व इतर 3 ते 4 खाटीक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात नरेंद्र काळे यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळावरून 11 जिवंत गाई व 58 बैल तसेच 125 किलो जनावरांचे मांस मिळून आल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे. जोडभावी पेठ येथे चिराग अली रोशन मशिदीच्या समोर मदरशाचे मोठे आवार आहे. या आवारात जनावरांचा बेकायदा कत्तलखाना आहे. येथे मोठ्या संख्येने गायी बांधून ठेवण्यात आल्याची माहिती हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यावरून मंगळवारी सकाळी 40-45 कार्यकर्ते या ठिकाणी गेले असता आठ गायींची कत्तल झाल्याचे आढळून आले. कार्यकर्त्यांनी तात्काळ या घटनेची पोलिसांना खबर दिली आणि तेथे बांधलेल्या गायी ताब्यात घेतल्या. यावेळी मदरसा कम्‌ कत्तलखान्यातील लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोन्ही बाजूने गर्दी झाली होती. दरम्यान कत्तल झालेल्या गायींचे मांस पोत्यात भरून दुसरीकडे हलविण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी गायी गोशाळेत सांभाळण्यासाठी देण्याची मागणी केली, तर कत्तलखान्याच्या लोकांनी गायी आमच्या आहेत, त्या देणार नाही! असे सांगितले. यावरून दोन्ही गटात वादावादी सुरू झाली, तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप केला. मदरशात बेकायदा बांधून ठेवण्यात आलेल्या 69 गायी ताब्यात घेऊन पालिकेच्या कोंडवाड्यात पाठवून दिल्या. बकरी ईदच्या दिवशी बकरीशिवाय अन्य जनावरांची कत्तल करू नये आणि गोहत्या करू नये असा कायदा आहे, तरीही बिनबोभाट गोहत्या करण्याचा प्रकार घडल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले होते. गोहत्याबंदीचा शासकीय आदेश कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखविला तेव्हा पोलिसांनी सर्व गायी ताब्यात घेऊन कोंडवाड्यात पाठवून दिल्या. गोहत्याबंदीच्या कायद्याविषयी पोलीस अज्ञानी असल्याचे आढळून आल्याने घटनास्थळी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. तणावपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सर्व जनावरांची सोडवणूक झाल्यानंतर त्यांना कोंडवाड्यात सोडताना अज्ञात लोकांनी किरकोळ दगडफेक केली. त्यामध्ये चंदुभाई देढीया यांच्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनाचे सुमारे 10 हजार रुपयांचे नुकसान झाले. तर काहीजणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ताब्यात घेऊन नंतर सोडून देण्यात आले. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काणे करीत आहेत.

मदरशाच्या आवारात
बेकायदा कत्तलखाना

हिंदुत्ववादी संघटनांच्या सतर्कतेमुळे 69 गायींचे प्राण वाचले तरी काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत. जोडभावी पेठेतील चिराग अली तकिया मशिदीसमोरील मदरशाच्या आवारात बेकायदा कत्तलखाना किती दिवसांपासून सुरू आहे? महापालिकेने परवानगी दिली का? तसे असेल तर कोणत्या आणि कशा गायींची कत्तल केली जाते? त्या गायींची तपासणी होते का? ज्या मदरशाचा कत्तलखाना म्हणून वापर होतो ती जागा कोणाच्या मालकीची आहे? रोज किती जनावरांची कत्तल होते, याची नोंद आहे का? मशीद आणि मदरसा यासमोरील सार्वजनिक रस्ताच मोठे लोखंडी फाटक बसवून नियंत्रित करण्यात आला आहे. हे अतिक्रमण महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून सुटले कसे? गोहत्याबंदी असताना धाडसाने जनावरांची, गायींची कत्तल होते. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो? असे अनेक प्रश्न गोहत्येच्या निंद्य प्रकाराने उपस्थित झाले आहेत.

दै। तरुण भारत, पान १

१० दिसम्बर २००८

Monday, December 8, 2008

बापूसाहेब नावाचा दीपस्तंभ



अरुण करमरकर, मुंबई, हिंदुस्थान समाचार

पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या प्रचारक कार्यकर्त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील परंपरा अत्यंत समृद्ध आहे। ऐन उमेदीच्या वयात व्यक्तिगत आकांक्षा आणि निजी जीवनाची उभारणी (आजच्या परिभाषेत करिअर) पूर्णपणे बाजूला सारून नि:संगपणाच्या वाटेवर काही पावले चालण्याची प्रेरणा आजवर हजारो तरुणांंच्या मनात जागविण्यात ही संघ परंपरा यशस्वी ठरली आहे. अगदी प्रारंभीच्या काळात अनेकांनी याच वाटेवर आपली मार्गक्रमणा अखंडितपणे करून आपली जीवनयात्रा संपन्न केली. तर अन्य अनेकांनी काही वर्षांनंतर प्रचारकी दिनक्रम थांबवून व्यक्तिगत जीवनाचा मार्ग पत्करला. मात्र व्यक्तिगत जीवनाकडेही त्यांनी साधना म्हणूनच पाहिले. प्रचारकी जीवनाच्या काळात प्राप्त केलेल्या जीवनदृष्टीच्या प्रकाशातच प्रत्येक पाऊल टाकण्यात आणि आपल्या कौटुंबिक जीवनाचा प्रत्येक पैलू घडविण्यात इतिकर्तव्यता मानली. चं.प. तथा बापूराव भिशीकर हे अशा तपस्वी व्यक्तिमत्त्वांपैकीच एक.

एकूण 93 वर्षांच्या आयुष्यातील 5-6 वर्षे बापूसाहेब संघाचे प्रचारक राहिले। त्यानंतरच्या 65 वर्षांमध्येही प्रचारकी मानसिकतेचा एक क्षणासाठीही त्यांनी कधी विसर पडू दिला नाही. सामूहिकता, अनामिकता, साधनसुचिता, गुणग्राहकता, मूल्यांबाबतच्या निष्ठा, प्रथमपुरुषी एकवचनी वृत्तीतून स्वत:प्रती कठोर आणि अन्यांप्रति क्षमाशीलतेचे औदार्य या साऱ्या बाबींचा विकटस्पर्श त्यांच्या वृत्तीप्रवृत्तींनी सतत जोपासून ठेवला. संघाच्या वाट्याला आलेल्या संघर्षात साहस, संयम आणि दृढनिष्ठेने सामोरे जाणाऱ्या आघाडीच्या फळीतले स्वयंसेवक ही भूमिकाही कधी सोडली नाही. विभाजनपूर्व कराची- सिंध भागात त्यांनी संघप्रचारक म्हणून काम केले, तो काळ तर सतत संघर्षाचा आणि जोखमीचा. नंतरही पत्रकार- संपादक या नात्याने ज्या तरुण भारतच्या उभारणीत त्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यालाही (तरुण भारतला) सतत संकटांनी घेरलेल्या वातावरणातच वाटचाल करावी लागत आली. तशाही स्थितीत सत्य जपत आणि स्वत्वाशी तडजोड न करता त्यांनी तरुण भारत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला आणि लौकिकप्राप्त बनवला. पुढे ज्यांनी पत्रकार-स्तंभलेखक-लेखक म्हणून मानमान्यता मिळविली, अशा अनेकांना लिहिते करण्याचे श्रेय बापूसाहेबांच्याच नावावर लिहिले जाते. आणीबाणी आली, हुकुमशाहीचा बेजुमान वरवंटा लोकशाही मूल्यांना चिरडत निघाला, वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या चिंधड्या उडवल्या गेल्या. सुमार बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे सरकारी अधिकारी सेन्सॉरशिपच्या नावाखाली वृत्तपत्राच्या कार्यालयात बसून मुजोर हडेलहप्पी करू लागले. अशा अत्यंत विपरित परिस्थितीत मोठ्या कुशलतेने पण खंबीरपणे मोजक्याच पत्रकारांनी वृत्तपत्रस्वातंत्र्याची नौका हाकत ठेवली. बापूसाहेबांचे नाव अशा पत्रकार/ संपादकांच्या यादीत अग्रभागी तळपले. संघविचारावरील अतूट, अविचल निष्ठा आणि अस्सल पत्रकाराची तटस्थता यांच्यातील समतोल सांभाळण्याचे कौशल्य त्यांच्या ठायी होते. अनिष्ट, अनौचित्यावर कठोर प्रहार करताना त्यांची लेखणी कधीच थरथरली नाही, पण भाषेचे साधन, सौष्ठव, सभ्यता, शालीनता, यांच्या मार्यादांचाही त्यांनी कधी अतिक्रम केला नाही.

शाश्वत नीतिमूल्ये, सुसंस्कार यांचा पाझर तर त्यांच्या लेखणीतून अखंड स्त्रवत असे. संपादकीय आणि विविध विषयांवर विविध नियतकालिकांमधून त्यांनी दीर्घकाळ केलेले स्तंभलेखन असो. साध्या, सोप्या, सुगम आणि नेमक्या शब्दांमध्ये अर्थगर्भ लिखाण कसे करावे याचा आदर्श वस्तुपाठच बापूसाहेबांचे लेखन साकार करीत आले. म्हणूनच सध्याच्या काळात पत्रकारितेत फोफावलेल्या सवंगपणाने आणि उथळपणाने ते व्यथित होत असत. दोनच वर्षांपूर्वी राष्ट्रीय पत्रकारिता न्यासातर्फे देण्यात येणारा ज्येष्ठ पत्रकाराचा नामवंत पुरस्कार त्यांना सांगली येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या ज्येष्ठ पत्रकार बापूराव लेलेंचे सहकारी, समकालीन या नात्यानेच बापूसाहेब भिशीकर संपादक म्हणून पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरले. त्यामुळे बापूराव लेलेंच्या नावाचा पुरस्कार बापूसाहेब भिशीकर यांना हा एक अपूर्व समसमा संयोग होता. त्या समारंभात बापूसाहेबांनी केलेल्या भाषणामधून त्यांनी आजच्या पत्रकारितेवर केलेले भाष्य अतिशय मोलाचे होते. नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाने प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात केलेल्या क्रांतीचे त्यांनी आपल्या भाषणातून मुक्तपणे स्वागत केले, पण त्याचबरोबर यांत्रिक झगमगाटाने दीपून न जाण्याचा, पत्रकारितेच्या मूलमंत्रांचा विसर पडू न देण्याचा संदेशही आजच्या पत्रकारांना देण्यास ते विसरले नाहीत. एखाद्या मोठ्या समारंभात बापूसाहेबांनी केलेले बहुधा ते शेवटचेेच मोठे भाषण असावे. व्यक्तिगत संवादातून आजच्या साऱ्या ज्वलंत विषयांवर मनोज्ञ चर्चा करण्याचा क्रम आणि उत्साह मात्र त्यांनी अखेरच्या क्षणांपर्यंत टिकविला हे विशेष. त्यांच्यापाशी बसून ही उत्साही उद्‌बोधक चर्चा करण्याचे भाग्य मला अगदी अलीकडच्या दिवसांपर्यंत लाभत राहिले.
सध्याच्या राजकीय, सामाजिक वातावरणाबाबतची त्यांच्या मनात दाटून राहिलेली खंत त्यांच्या गप्पांमधून जाणवत असे, पण तरीही त्यांचा सूर आणि त्यांच्या वृत्ती कधीही निराशावादाकडे झुकल्या नाहीत हे विशेष। कार्यकर्त्यांमधील अभ्यासूवृत्ती, व्यासंग कमी होत चालल्याबद्दल जशी त्यांच्या मनात व्यथा होती, तशीच अनौपचारिक स्नेहसंबंध, परस्परसंवाद, संपर्क आणि त्यातून परस्परांबद्दल निर्माण होणारा विश्वास यांना ओहोटी तर लागली नाही ना ही शंका त्यांना भेडसावत असे. अडवाणी- अटलजी यांच्याविषयी सरसंघचालकांनी दिलेल्या मुलाखतीवरून प्रसारमाध्यमांनी माजवलेला गदारोळ, अडवाणी यांनी जिनांविषयी, पाकिस्तान दौऱ्यात, काढलेल्या उद्‌गारांच्या विषयावरून स्वयंसेवकांच्या वर्तुळात निर्माण झालेले अस्वस्थतेचे वातावरण, अन्यान्य राजकीय पक्षांबरोबरच भारतीय जनता पक्षातही प्रसंगी अनुभवाला येणारे निराशाजनक प्रसंग अशा अतिशय नाजूक विषयांबाबत त्यांनी प्रत्यक्ष चर्चेत तेसच पत्रांच्या द्वारे केलेले मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव पथदर्शक राहील.

नव्वदी उलटल्यानंतरही शरीर मनाची सर्व गात्रे बऱ्यापैकी सक्षम स्थितीत राहिली हा अर्थातच त्यांच्या सात्विक आणि तपस्वी जीवनशैलीचा परिणाम होता। शेवटपर्यंत त्यांची लेखणी लिहिती होती हे विशेष. पत्रकार या नात्याने राजकारणावर जितक्या अधिकारवाणीने ते बोलू- लिहू शकत, तितक्याच किंबहुना त्यापेक्षा कांकणभर जास्तच अधिकाराने ते अध्यात्म सांगत- लिहित राहिले. हा अधिकार त्यांना अर्थातच व्यासंगाने आणि तपश्चर्येने प्राप्त झाला होता.

सर्वार्थाने बापूसाहेब "एक दीपस्तंभ' या विशेषणाला पात्र ठरतात. पत्रकार म्हणून स्वयंसेवक म्हणून आणि माणूस म्हणूनही त्यांचे जीवन सदैव दीपस्तंभासारखेच मार्गदर्शन करीत राहील, यात शंका नाही.


ऋषी संपादक : बापूसाहेब भिशीकर


ऋषी संपादक :
बापूसाहेब भिशीकर

पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

रात्रंदिवस आपण रहात असलेली जमीन आपल्याला केवळ वजनापुरताच आधार देत असते असे नव्हे तर पावलोपावली आपल्याला सांभाळून घेत असते. "अतिपरिचयात अवज्ञा' असल्याने आपल्याला त्या आधाराची किंमत कळत नाही. ऋषीमुनी जेंव्हा त्या पायाखालच्या जमिनीबाबत बोलतात, तेंव्हा "पादस्पर्शम्‌ क्षमस्व मे' असे उद्‌गार काढूनच पुढचे बोलायला सुरुवात करतात. आज या पायाखालच्या जमिनीची आठवण येण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात गेली सत्तर वर्षे ज्यांनी आपल्या राष्ट्रवादी चिंतन, पत्रकारितेतून प्रखर लेखन आणि संतवाङ्‌मयातून महाराष्ट्रातील फार मोठ्या वर्गाला जमिनीचा आधार वाटावा, अशी जीवनमूल्यांची बैठक दिली, त्या श्री.बापूराव भिशीकर यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.
ज्या वेळी सिंधमध्ये पाकिस्तान निर्मितीच्या प्रक्रियेची धग सामान्य हिंदूला बसण्यास सुरुवात झाली होती, त्या काळात तेथे जावून संघाचे प्रचारक म्हणून काम केलेले बापूराव, महाराष्ट्रात तरुण भारत वाढावा व त्याच्या अधिकाधिक आवृत्त्या निघाव्या म्हणून आणिबाणीसारख्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संपादक म्हणून काम करणारे बापूराव आणि गेली तीस वर्षे संतवाङ्‌मयाच्या माध्यमातून संस्कार बांधणीचा एक नवा अध्याय रचणारे बापूराव असा त्यांचा बहुआयामी परिचय महाराष्ट्रातील तीन पिढ्यांना आहे.गेली तीस वर्षे बापूराव प्रामुख्याने संतवाङ्‌यावर व जीवनमूल्ये मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या संस्कारप्रक्रियेवर लिहित आहेत. पण त्यांचा हा एकमेव परिचय नाही. आपल्या समाजाची आणि देशाची उभारणी ही प्रखर राष्ट्रवादाच्या आधारे व्हावी, यावर ते जवळजवळ सत्तर वर्षे लिहीत आहेत. 1948साली महात्मा गांधी यांची हत्या झाल्यावर संघावर बंदी आली, त्यामुळे ती उठवण्यासाठी भूमिगत राहून आपले म्हणणे प्रखरपणे मांडत राहणे हे काम त्यानी केले व त्यासाठी आवश्यक ती किंमतही मोजली. ते सहा महिने कारावसातही होते. बापूराव हे एम ए होते, येवढाच परिचय करून दिला तर तो उल्लेख "बायोडाटा' सारखा वाटेल पण सत्तर वर्षापूर्वीच्या नागपूरच्या डॉ. केशव बळिराम हेडगेवार हे संघ कामाची आधार शीला रचत असतानाच्या वातावरणात "जे करू ते अत्युत्कृष्ट करू' असे म्हणून जीवन देण्यास तयार झालेली जी तरुळमंडळी होती, त्यात बापूराव यांचा समावेश होता, त्यामुळे त्या काळात सायकलवरून दररोज काही मैल जावून शाखा घेणे हा त्यांचा दिनक्रम होता, त्याच प्रमाणे एम ए परीक्षा द्यायची असेल तर तेथे असलेले सुवर्णपदक हे आपल्या अभ्यासाने आपल्याकडेच आले पाहिजे, असे ठरविणाऱ्या तरुणांच्यापैकी ते होते, त्यामुळे त्यांच्या सुवर्णपदक मिळवण्यास राष्ट्रउभारणीच्या कामात पायाभूत होण्याची उंची आहे. त्याच वेळी त्यांच्या कामाच्या विरोधकांनी त्यांच्यावर जेंव्हा हल्ला करून त्यांचे काम बंद पाडण्याचा जेंव्हा प्रयत्न झाला, तेंव्हा हल्ला करण्यासाठी आलेल्या पन्नास जणांशी दोन होत करून सर्व शक्तिनिशी त्यातून निसटण्याचे कौशल्यही त्यानी दाखवले आहे. पण मराठी मनावर त्यांच्या लेखनाची जी छाप आहे ती प्रखर पण संयमित लेखकाची.
दैनिक वृत्तपत्रांच्या विषयांची व्याप्ती ही मोठी असते. तेथे धारदार टीकेचीही आवश्यकता असते पण हळुवार संवादाचीही आवश्यकता असते. या दोन्ही कसोट्यांचा बापूराव यांचे लेखक हे वस्तुपाठ आहेत, याची प्रचीती कालपर्यंत त्यांचे लेखन वाचताना येते. अलिकडे त्यानी राजकीय संदर्भ असलेले लेखन कमी केले होते. तरीही अतिरेक्यांचे देशात व सीमावर्ती प्रदेशात होणारे हल्ले, ईशान्य भारतातील पंचमस्तंभीयांचा प्रश्र्न, सत्तेवर असणाऱ्या त्या त्या वेळच्या राज्यकत्यार्ंची "कच खाऊ भूमिका' ही त्याना अस्वस्थ करायची आणि नव्वदी ओलांडल्यानंतरच्या वयातही ते धारदार लेखन करीत. असे असले तरी त्याना टीका करताना "आपल्या विचाराच्या विरोधकाचा कोठेही संबंध आला तर लगेच कर टीका' सरधोपट मार्ग स्वीकारण्याची वेळ त्यांच्यावर कधी येत नाही. त्यांचे लेखन येवढे संयमित असते की, कोणत्याही कारणाने अस्वस्थ झालेल्या कोणालाही मन शांत करून घ्यायचे असेल तर त्यानी बापूराव भिशीकर यांचा कोणताही लेख वाचावा.
अडतीस साली म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बापूराव सिंधमध्ये प्रचारक म्हणून गेले. त्या काळी पाकिस्ताननिर्मितीची धग सामान्य माणसास जाणवण्यास सुरुवात झाली होती. त्या काळात त्यानी पाच वर्षे काम केले. त्यांच्या त्या वेेळच्या कामाचा त्यानी संघात आणलेले माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी अतिशय गौरवपूर्वक उल्लेख केला आहे. 1943 मध्ये सिंधमधून आले आणि संघाच्या कार्यकर्त्यामंडळींनी सुरु केलेल्या नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक झाले. या काळात बापूराव यानी संघाच्या कामावर बरेच लेखन केले. काही काळ ते एका साप्ताहिकाचे संपादकही होते. 1949 मध्ये त्यावेळचे संघाचे वरीष्ठ पदाधिकारी श्री बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकाराने श्री.ग.त्र्यं.माडखोलकर यांचा तरुणभारत हा नरकेसरी या संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आला. त्यात संपादक म्हणून काम करत असलेले श्री.माडखोलकर यांचे सहकारी म्हणून बापूराव काम करू लागले. वृत्तपत्राच्या संपादक विभागाच्या कामाचे सर्व प्रकारचे अनुभव त्याना येथे घेता आले. 1957 मध्ये तरुणभारतची पुण्यात आवृत्ती काढण्यात आली व त्याचे संपादक म्हणून श्री ग वि केतकर यांनी जबाबदारी स्वीकारली. 1963 मध्ये त्यानी पुणे तरुणभारतची संपादक म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या पंधरा वर्षाच्या कार्यकालात पुणे तरुणभारत हे संपूर्ण मराठवाडा, नाशिक विभाग, कोल्हापूर, सोलापूर, कोकण या भागात सर्वात अधिक गावी जाणारे दैनिक म्हणून पसरू शकले. त्याकाळी दैनिकांचे कमाल खप हे एक ते दीड लाख या घरात असत आणि बापूराव यांनी निवृत्तीच्या वेळी जेंव्हा तरुणभारतची जबाबदारी हस्तांतरीत केली, तेंव्हा त्यात तरुण भारतचा समावेश असे. त्या अतिशय प्रतिकूल काळात तरुणभारतची प्रगती कशी झाली किंवा कोणत्या समस्या उभ्या राहिल्या हा स्वतंत्र अध्याय आहे. पण एक गोष्ट खरी की, महाराष्ट्रात फार मोठा जनसंपर्क, नवनवीन विषय हाताळण्यासाठी परिश्रमी सहकारी मंडळींनी केलेले सहकार्य आणि प्रतिकूल परिस्थितीला न डगमगण्याची संघभावना हे तरुणभारतच्या यशाचे रहस्य आहे. त्यात आणिबाणीतील दहशतवादाचे वातावरण आणि वृत्तपत्रावरील प्रसिद्धिपूर्वतपासणीची बंधने हा सारा वेदनाकर विषय असायचा.
रस्त्यावर सायकलला दिवा नसणे किंवा डबलसीट नेणे अशा स्वरुपाच्या गुन्ह्यावर कारवाई करणाऱ्या पोलीस मंडळीवर अचानक वृत्तपत्रावर प्रसिद्धीपूर्व बंधने हाताळण्याची वेळ आली होती, त्यामुळे रात्रीअपरात्री बापूराव यांच्या घरी जावून दरडवायलाही ही मंडळी मागेपुढे बघत नसत. त्याकाळात त्यावेळच्या सरकारची अशी इच्छा असायची की, कोणत्याही कारणाने का होईना तरुण भारत बंद पडावा, त्यासाठी अधिकाधिक अपमामित करण्याचा सपाटा सरकारने लावला होता. हा हेतू लक्षात आल्यावर अपमानाची पर्वा न करता तरुण भारत चालू ठेवण्याचा चंग त्यावेळच्या जबाबदार मंडळींनी बांधला आणि त्याला यशही मिळाले. पुण्याच्या एका आवृत्तीतून नंतर महाराष्ट्रात सुरु झालेल्या चार आवृत्त्या आजही आपल्या संकल्पसिद्धिसाठी जिद्दीने उभ्या आहेत.

त्या काळातील सरकारी बंधनामुळे राजकीय विरोध करणारा एखादा जरी शब्द कच्च्या प्रुफात दिसला तरी कार्यालयावर हत्यारी पोलीसांचा बंदोबस्त वाढायचा. पण या प्रतिकूलतेतून मार्ग काढण्यासाठी बापूराव यानी तरुणांशी संवाद करून त्यावर लेखन करण्याचा एक निराळाच मार्ग स्वीकारला आणि त्यातून एका नव्या लेखन प्रकारालाच सुुरुवात झाली. आणिबाणीचा एक सर्वात मोठा परिणाम म्हणजे तरुणांमध्ये अशाश्र्वततेची भावना निर्माण झाली होती. भारतासारख्या खंडप्राय देशात कोणी एक हुकुमशहा उभा राहतो आणि देशातील कोट्यवधी तरुणांपुढे अनिश्र्चिततेचे प्रश्र्न चिन्ह निर्माण करतो,असे वातावरण तयार झाले होते.यातून सावरण्यासाठी त्यानी भक्कम जीवनमूल्यांच्या आधारे आणि त्यांच्याच घरच्यांशी संवाद करून त्याना आत्मविश्र्वास निर्माण करण्यावर त्यानी भर दिला.दर आठवड्याला या विषयावर एक लेख साप्ताहिक अंकात असे आणि त्याला महाराष्ट्रात फार मोठा वाचक वर्ग असे. आजूबाजूच्या परिस्थितीने अस्वस्थ झालेल्या प्रत्येकाला काही तरी म्हणायचे असायचे आणि बापूराव त्यांची वेदना व्यक्त करत. प्रत्येकाची वेदना निराळी असली तरीही त्याचे स्वरुप प्रातिनिधिक असे. त्याला कधी जीवनातील उदाहरणाचा दृष्टांत दे तर कधी संत वाङमयाचा आधार दे, यातून सुरु झालेला तो संवाद आजही सुरु आहे.
1978साली बापूराव निवृत्त झाले.त्यांच्या निरोपसमारंभाच्या अध्यक्षपदी त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार होते. गेल्या पन्नास वर्षात जे फार थोडे लक्षात राहण्यासारखे निरोप समारंभ झाले, त्यात त्या कार्यक्रमाचा समावेश करावा लागेल. बापूराव यांच्या वृतस्थ जीवनावर शरदराव यानी केलेले विवेचन हे आजही अनेकांच्या स्मरणात असेल.
बापूराव निवृत्त झाले म्हणजे वृत्तपत्राच्या दररोजच्या धबडग्याच्या कामातून बाजूला झाले येवढेचे काय ते. पण दररोजचे लेखन, ग्रंथनिर्मिती, नव्या नव्या लोकांशी संवाद आणि कूट वाटणाऱ्या समस्या त्याच्यावरील उपायासह सोप्या भाषेत मांडणे हे त्यांचे काम कालपर्यंत अविरतपणे सुरु होतेे. त्यानी त्यांचे बरेच व्याप कमी केल्यावरही पंचवीस गं्र्रथांची निर्मिती झाली आहे. त्यांच्या गं्रथांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो म्हणजे संघजीवनावरील वाङ्‌मयाचा. डॉ.हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांच्या जीवनावर लिहिण्याचा अधिकार फार थोड्याना प्राप्त झाला आहे आणि तो अधिकार त्यागाने प्राप्त झाला आहे. बापूराव यांचे लेखन लक्ष लक्ष संघस्वयंसेवकांच्या दररोजच्या वाचनात आहे. संघटना जीवनात अनेक प्रसंग असे असतात की, जेथे संघटना वाढणाऱ्या, काम वाढणाऱ्या आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या परामर्षाची आवश्यकता असते, अशावेळी बापूराव हे आधारवड वाटतात. गेली तीस वर्षे संतवाङमयांचा वेध घेत त्यानी राष्ट्रबांधणीच्या आपल्या ध्येयाच्या कामात भर टाकली आहे. भारतातील संतांनी ईश्र्वरी आराधनेच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीचे काम केले आहे आणि तेच काम आपल्याला पुढे न्यायचे आहे हा श्री गुरुजींचा विचार बापूराव यानी कदाचित काही हजार लेखातून पुढे नेला. सकाळ, पुढारी, तरुण भारत अशा दैनिकातून कधी साप्ताहिक सदर तर कधी दैनंदिनी सदर यातून तो मांडला. बापूराव यांच्या आजपर्यंतच्या लेखांची सर्व प्रकाराच्या लेखाचे संकलन करणे हा कदाचित स्वतंत्र कामाचा विषय होईल. अर्थात त्यांच्या या कामात प्रामुख्याने सौ. कुसुमताई आणि मुले, सूनबाई, नातवंडे या साऱ्यांचा त्यांच्या त्यांच्या परीने सहभाग आहे.
बापूराव यांचे मार्गदर्शन हे कार्यकर्त्यांना ईश्र्वरीप्रसादाची अनुभूती देऊन जात असे. बातूसाहेबांनी निर्माण केलेल्या वाङमयातूनही ही अनुभूती येऊ शकते.
कै. बापूसाहेब भिशीकर यांना तरुण भारत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

मोरेश्वर जोशी, पुणे प्रतिनिधी

चं. प. भिशीकर यांचे निधन


तरुण भारतचे माजी संपादक

चं. प. भिशीकर यांचे निधन
सोलापूर: पुणे तरुण भारतचे माजी संपादक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक चंद्रशेखर परमानंद तथा बापूसाहेब भिशीकर यांचे सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील हराळी ज्ञानप्रबोधिनी केंद्रात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात कन्या डॉ. स्वर्णलता भिशीकर आणि पुत्र आनंद हे आहेत.
सोमवार दि. 8 डिसेंबर रोजी पुणे येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यंसंस्कारासाठी पुण्याकडे रवाना करण्यात आले आहे.
अल्प परिचय: बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक. एम.ए. पर्यंतचे शिक्षण नागपूरमध्ये झाले. 1938 ते 1943 या कालावधीत विभाजनपूर्व सिंध प्रांतात- कराची येथे संघ प्रचारक म्हणून कार्य केले. संघबंदी काळात कारावास. नागपूर तरुण भारतमध्ये सहसंपादक, पुणे तरुण भारतचे प्रारंभी कार्यकारी संपादक व नंतर प्रमुख संपादक. आणीबाणीच्या काळात उमेद वाढविणारे लेखन. प्रारंभापासून 1979 पर्यंत पुणे तरुण भारतमध्ये 15 वर्षे "हितगुज' हे अत्यंत लोकप्रिय सदर. संतवाङमयावर प्रवचने. पू. स्वामी माधवनाथ यांचा अनुग्रह. दै. सकाळमध्ये दोन वर्षे भक्तीरंग आणि भक्तिगंगा ही दैनिक सदरे. वरील दोन्हीचीही पुस्तके भारतीय विचार साधनेतर्फे प्रकाशित. लेखन व सामाजिक-राष्ट्रीय जागरण कार्याबद्दल अनेक पुरस्कार. विश्व हिंदू परिषद, ज्ञान प्रबोधिनी-सोलापूर, विवेक विचार (विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक) इ. कार्यांना वैचारिक मार्गदर्शन. समर्थांच्या स्फूट रचनांवर अलीकडेच 700 पानी ग्रंथ प्रकाशित.

Monday, December 1, 2008

मोदी जिंकले...


मोदी जिंकले,

मीडिया हरली !


गेल्या वर्षी याच डिसेंबर महिन्यात मीडियाने मोदीविरोधी वातावरण निर्माण केले होते। परंतु मोदी जिंकले... त्यावेळी लिहिलेला हा लेख...


गुजरातेत भारतीय जनता पक्षाला खणखणीत बहुमत मिळाले आहे. त्यामुळे ढोंगी धर्मनिरपेक्षतावाद्यांना सणसणीत चपराक बसली आहे, परंतु नाक कापले तरी *** शिल्लक आहे! अशा वृत्तीने सेक्युलर मुखंड वागताना दिसत आहेत.
नरेंद्र मोदी हे निष्कलंक आहेत. प्रामाणिक आहेत. क्षमतावान आहेत. कुशल संघटक आहेत. प्रखर देशभक्त आहेत. भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ आहेत. प्रशासनावर त्यांची भारी पकड आहे. इस्लामी अतिरेक्यांचे ते यमदूत आहेत. हिंदुत्वावर त्यांची श्रद्धा आहे. ते अष्टावधानी आहेत. ते उत्तम वक्ते आहेत. ते तत्त्वज्ञ आणि विचारवंत आहेत. नरेंद्र मोदी हे उत्तम लेखक आणि कवी आहेत... ही यादी आणखीही लांबविता येईल, परंतु असे असतानाही केवळ हिंदुत्व द्वेषावर पोषण झालेल्या मीडियातल्या स्वयंघोषित विचारवंतांनी मोदींचा दुस्वास केला आणि करीत आहेत. अशा कावळ्यांच्या शापाने काहीही फरक पडत नाही हेच खरे.
भारतीय जनता पक्ष जेव्हा केव्हा सत्तेत येईल तेव्हा नरेंद्र मोदी हे निश्चित पंतप्रधान बनतील. बनू शकतील असे माझे म्हणणे नाही - ते पंतप्रधान बनतीलच! कारण ती क्षमता त्यांच्यात आहे. हा निष्कर्ष कदाचित अनेकांना रुचणारा नसेलही, परंतु सत्याकडे आपण किती काळ दुर्लक्ष करू शकतो? तुमच्या आमच्या म्हणण्याने विदूषक लालूप्रसाद तत्त्वज्ञ बनणार नाही आणि अब्दुल करीम तेलगी काही धर्मराज बनणार नाही.
खूप कमी लोकांना माहीत असेल की, दिल्ली येथील भाजपाचे मुख्यालय 11, अशोका रोडच्या मागे एका छोट्या खोलीत नरेंद्र मोदी कितीतरी वर्षे राहात होते. त्यांच्यासोबत होते भाजपाचे दुसरे महासचिव गोविंदाचार्य. त्यांच्या खोलीत एकच फोन होता. त्यांचे अंथरूण जमिनीवरच असायचे. नरेंद्र मोदींच्या कार्यालयाचा दरवाजा सताड उघडा असायचा...
नरेंद्र मोदी हे विद्यार्थी दशेत असताना नवनिर्माण आंदोलनात त्यांनी केलेले युवा संघटन पाहून लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी त्यांची पाठ थोपटली होती. हा तरुण पुढे देशाचे नेतृत्व करेल असे संकेतही त्यांनी दिले होते. साधेपणा, नम्रता, प्रामाणिकपणा यांचे संस्कार त्यांच्यावर स्वयंसेवक आणि प्रचारक राहिल्याने आहेतच, परंतु मीडियाने त्यांची प्रतिमा मग्रूर आणि सहकाऱ्यांशी फटकून वागणारा, कोणालाही दाद न देणारा अशी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. गुजरातेतील विजय हा भाजपाचा विजय नसून तो नरेंद्र मोदींचा आहे, हिंदुत्वाचा विजय नसून तो मोदित्वाचा विजय आहे, असे तारे तोडण्याचाही प्रयत्न जोरकसपणे सरू आहे. काहीही करून उलट्या बोंबा मारण्याचाच हा प्रयत्न आहे.
नरेंद्र मोदी यांचे पाय जमिनीवर असतात. भगवद्‌गीतेत भगवंताने सांगितलेली स्थितप्रज्ञ पुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्यात दिसतात. संघटित कार्याला ते प्राधान्य देतात. गुजरातेत मतदान होण्यापूर्वी दोन महिने नरेंद्र मोदी यांनी एक लाख 30 हजार भाजपा कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेतली होती. प्रत्येक बूथचे नियोजन होते. स्वत: नरेंद्र मोदी यांच्याकडेही एका बूथची जबाबदारी होती. कार्यकर्त्यांच्या स्तरावर वावरणारा हा नेता व्यक्तिकेंद्री आहे, असा अपप्रचार करणे हा अपप्रचार करणाऱ्या बुद्धिजीवींचा खुजेपणाच म्हटला पाहिजे.
खूप कमी राजकीय नेते असे असतात की, जे केंद्रीय राजकारणाच्या मुख्य धारेत नसतात, मात्र केंद्रीय राजकारण त्यांच्याभोवती घुटमळत असते. अशा नेत्यांत नरेंद्र मोदी यांचे नाव अग्रस्थानी आहे. 57 वषार्र्ंचा हा ताठ कण्याचा नेता देशाच्या पंतप्रधानपदी यावा, असे भारतातील कोट्यवधी लोकांना वाटते. संत तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे नरेंद्र मोदी हे विचार आणि तत्त्वांशी प्रामाणिक असतात, मग बहुमत काहीही असो. हा कणखरपणाच त्यांच्या यशाचे गमक आहे.
नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी आले तर साऱ्या मुसलमानांचा ते सफाया करतील, असा गैरसमज पसरवण्यात येतो, मात्र त्यात तथ्य नाही. एक खरे की नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी आले तर ते मुस्लिमांचा पर्सनल लॉ रद्द करतील, काश्मिरात अनिश्चित काळासाठी आणीबाणी आणतील, 370 कलम रद्द करतील, आयोध्येत भव्य राममंदिराचे निर्माण करतील. दररोज सकाळी 8 वाजल्यापासूनच लॅपटॉवर बसून प्रशासन हाकणारा हा नेता भारताला वैभवावर नेईल.
विचारांसाठी, आदर्शांसाठी कार्य करा- कोणा व्यक्तीसाठी नव्हे, या स्वामी विवेकानंदांच्या संकेतानुसार वाटचाल करणारा हा नेता आहे. आपण ओबीसी आहोत, असा बाऊ त्यांनी कधी केला नाही. सोनियाबेनप्रमाणे नरेंद्र मोदी हे टपकलेले नेते नाहीत. लोकशाही पद्धतीने त्यांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
""मी 7 ऑक्टोबर 2001 रोजी सी.एम. बनलो नाही. मी मूलत: सी.एम.च आहे. मी आज सी.एम. आहे. पुढेही सदैव सी.एम. राहीन. माझ्या दृष्टीने सी.एम. म्हणजे कॉमन मॅन.'' नरेंद्र मोदींच्या या मोजक्या शब्दांत खूप अर्थ भरलेला आहे.
अत्यंत कठीण समयी धीराने आणि संयमाने वागणारा हा नेता आज विजयश्री गळ्यात पडलेली असतानाही तेवढाच शांत आणि संयमी आहे. विजयश्री खेचून आणणारा योद्धा मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे त्रिवार अभिनंदन!
-सिद्धाराम भै. पाटील
दि. 24 डिसेंबर 2007, दै. तरुण भारत पान 4

Friday, November 28, 2008

मुंबई अटैक...


आज एकदा पुन्हा

सिंहनाद होऊ दे ऽऽऽ


मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला।

त्या पार्श्वभूमीवर लिहिलेला हा लेख...

धर्म, संस्कृती आणि राष्ट्राच्या मर्यादा नष्ट होत असता- हे भजन, पूजन, ध्यान आदी काय कामाचे ?
-गुरु गोविंदसिंह


गेल्या दोन महिन्यांपासून हिंदू जनजागृती समितीतर्फे सोलापुरात हिंदू धर्मजागृती सभेच्या आयोजनाची तयारी सुरू आहे. सनातन संस्था आणि अन्य समविचारी संघटनांचे शेकडो कार्यकर्ते ही धर्मजागृती सभा यशस्वी करण्यासाठी दिवस-रात्र एक करून काम करीत आहेत.
दरम्यान, बुधवारी रात्री इस्लामी अतिरेक्यांनी मुंबईवर अतिशय क्रूर हल्ला चढवला. 80 हून अधिक निष्पाप लोक ठार झाले. शेकडो जखमी. सोलापुरात पोलीस आयुक्त राहिलेले अशोक कामटे, विख्यात पोलीस अधिकारी विजय साळसकर, दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, शशांक शिंदे यांच्यासह 14 पोलिसांनी अतिरेक्यांशी लढताना आपले प्राण गमावले. राज्यातील सव्वा लाख पोलिसांवर कोसळलेली ही भीषण आपत्ती होती.
सारा देश हळहळला. सारी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांचे तरुण पत्रकार जीव तोडून रिपोर्टिंग करीत राहिले. बुधवार आणि गुरुवारच्या रात्री मुंबईतील थराराच्या बातम्या पाहत कित्येकांनी जागून काढल्या. पोलिसांच्या बाजूने जनमानस उभा राहिला. सोलापुरातील चौकाचौकातून फलकांवर अशोक कामटे आणि अन्य वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कोट्यवधी लोकांनी एसएमएस आणि ई-मेल्सच्या माध्यमातून आपल्या तीव्र भावनांचे आदान-प्रदान केले. श्रद्धांजली सभा घेण्यात आल्या. काही भावनाशील लोकांनी हौतात्म्य पत्करलेल्यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली.
हे सारे स्वाभाविक असले तरी जी गोष्ट केली पाहिजे तीच गोष्ट आम्ही सारे विसरून गेलो. नेहमी नेहमी आपण हीच गोष्ट विसरत आलो आहोत. अतिरेक्यांच्या विरोधात, देशद्रोह्यांच्या विरोधात मानसिकता तर आहे. अन्यायाविरुद्ध, देशद्रोह्यांविरुद्ध युद्ध करून विजय मिळविण्याची इच्छाही सर्व देशवासीयांमध्ये आहे. साऱ्या पोलीस आणि लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तर ही भावना ओतप्रोत आहे. दुष्ट शक्तींना पराभूत करण्यासाठी रणांगणावर उभा असलेल्या अर्जुनामध्येही अशीच भावना होती, परंतु अर्जुन संभ्रमित झाला होता.
आज आमच्या देशातील बहुतांश लोकांची, तरुणांची, तरुण पत्रकारांची अवस्था अर्जुनासारखीच झाली आहे. युद्ध कोणाविरुद्ध करायचे आहे, याबाबतच त्यांच्या मनात संभ्रम आहे. हा संभ्रम जोवर दूर होणार नाही तोवर युद्ध लढताच येणार नाही. शत्रू ओळखता नाही आला, तर विजय कदापि शक्य नाही. हौतात्म्य पत्कराणाऱ्या वीर जवानांची मालिका मात्र लांबत जाईल.
भारतीय समाज हा हजारो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही टिकून राहिला याला कारण आहे या देशाचा जीवनप्रवाह अर्थात हिंदुत्व. स्वामी विवेकानंद म्हणतात, "हिन्दुत्व या देशाचा आत्मा आहे. प्राण आहे'.
परंतु आज या देशातील बहुतांश लोक हिंदुत्वावरूनच संभ्रमित आहेत. हिंदुत्व म्हणजे संकुचित काही असेल असे जाणीवपूर्वक ठसविले गेले आहेे. जात आहे. हिंदुत्व म्हणजे लाजीरवाणे, किळसवाणे अशी भावना तयार करण्याचाही सातत्याने प्रयत्न होतो आहे, परंतु सत्य स्थिती वेगळीच आहे. सर्वोच्च न्यायालयानेही हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असल्याचे अभ्यासांती म्हटले आहे. हिंदुत्वाची जीवनधारा ज्या भागात कमकुवत झाली तो भाग या भारतवर्षापासून तुटला, हेही एक कटू सत्य आहे.
तसे पाहिले तर इस्लाम आणि ख्रिस्ती पंथांचा उदय होण्यापूर्वी म्हणजे दोन हजार वर्षांपूर्वी येथील जीवनपद्धतीला सनातन धर्म म्हणून संबोधले जायचे. आपापल्या आवडी निवडीनुसार उपासना करण्याचे स्वातंत्र्य या देशात होते, परंतु इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांनी आमचाच धर्म खरा आहे. सारे जग हे ख्रिस्ताला मानणारे किंवा अल्लाला मानणारे असले पाहिजे, असा विचार घेऊन थैमान घालू लागले. ऑस्ट्रेलिया, ऑफ्रिका, अमेरिका येथील कोट्यवधी मूळनिवासी लोकांच्या कत्तली ख्रिस्ती धर्मप्रसारकांनी घडवून आणल्या. याला इतिहास साक्षी आहे. मुस्लिमांच्या रानटी टोळ्यांनीही हेच केले. हिंदू धर्म हा या एकांतिक पंथांपेक्षा भिन्न आणि सर्वसमावेशक आहे, हे आपण आधी ध्यानात घेतले पाहिजे.
एक उदाहरण पाहा. एक तुपाचे दुकान चालविणारा मनुष्य "महालक्ष्मी तुपाचे दुकान' हे नाव बदलून "महालक्ष्मी शुद्ध तुपाचे दुकान' असे नामकरण करतो. त्याला अनेकजण विचारू लागतात, तुम्ही नाव का बदलले ? दुकानदार सांगतो की बाजारात वनस्पती तुपाचे आगमान झाल्यामुळे असे करावे लागले. वनस्पती तुपाहून आमचे तूप वेगळे आणि शुद्ध आहे, ही गोष्ट सांगण्याची गरज उत्पन्न झाली म्हणून हा बदल केला. अगदी असाच प्रकार या देशातील जीवनपद्धतीबद्दल आहे.
इस्लाम आणि ख्रिस्ती या एकांतिक पंथांपेक्षा सनातन धर्म वेगळा आहे, हे सांगण्यासाठी हिंदू धर्म हे सर्वमान्य नाव योग्यच आहे. आम्ही भारतीय स्वत:ला काहीही म्हणवून घेतले तरी सारे जग आपल्याला हिंदू म्हणूनच ओळखते, हे ध्यानात घेणे पहिली गरज आहे.
विख्यात जागतिक इतिहासकार अर्नाल्ड तोयान्बी म्हणतात, ""जीवनात आव्हानांचे भारी महत्त्व असते. जीवनात आव्हाने नसतील, तर मनुष्य निष्क्रिय बनत जातो आणि शेवटी तो नष्ट होतो. परंतु व्यक्तीच्या जीवनात आव्हाने असतील, तर पुढील दोनपैकी एक गोष्ट होऊ शकते...
1) आव्हाने समजून घेतली नाही, तर त्या आव्हानांना बळी पडून नष्ट व्हावे लागते.
किंवा
2) आव्हाने समजून घेऊन त्यांना प्रतिसाद दिला, तर त्यातून मनुष्याचा विकास होतो.''
जी गोष्ट मनुष्याला लागू पडते तीच समाजाला आणि राष्ट्रालाही लागू पड़ते. त्यामुळे राष्ट्रासमोरील आव्हाने समजून घेणे आवश्यक आहे.
ही आव्हाने समजून घेणार नसू तर...

आपल्याला मेधा पाटकर, अरुंधती रॉयसारखी मंडळी अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांना फाशी देण्यात येऊ नये यासाठी का धडपडतात हे कळू शकणार नाही ?

हेमंत करकरे यांच्यासारख्या बहादूर आणि धाडसी पोलीस अधिकाऱ्यांसही "काल्पनिक हिंदू दहशतवादाच्या भ्रमात' कसे अडकविले जाते हेही आपल्याला समजणार नाही।

आसाममध्ये दीड महिन्यापूर्वी 90 गावांवर बांगलादेशी घुसखोरांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन हल्ला केला. ही गावं जाळून टाकण्यात आली. तेथील पोलीस अधीक्षक (जो मुस्लिम समाजाचा होता) काहीही कारवाई केली नाही म्हणून त्याला निलंबित केले गेले आहे. आज त्या 90 गावांतील 80 हजारांहून अधिक हिंदू (बोडो) आसामध्ये आपल्याच देशात निर्वासित बनून छावण्यांमध्ये दुर्दैवी जीवन जगत आहेत, आजही ही स्थिती आहे. तेथील ख्रिस्ती जिल्हाधिकाऱ्याची बढती देऊन बदली करण्यात आली. या हल्ल्याचा कट आसामातील महसूलमंत्र्याने (जो बांगलादेशी घुसखोर मुसलमान आहे) रचला होता, परंतु इतके सारे होऊनही वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, मानवाधिकारवाले याविरुद्ध काहीही आवाज उठवत का नाहीत हेही आपल्याला समजणार नाही।

गेल्या महिन्यात सोलापुरातील ख्रिश्चनांच्या चर्चमध्ये आमदाराच्या मुलीच्या लग्नाचे आयोजन करण्यात आले होते. हे कसे काय हेही आपल्याला समजणार नाही।

तिरुपती देवस्थानमच्या पैशाने हिंदूंनाच ख्रिस्ती बनविण्याचा उद्योग मध्यंतरी कसा काय चालला होता, हेही आपल्याला कळणार नाही.
अशी शेकडो उदाहरणे आहेत. पण मूळ मुद्दा असा की, असे प्रश्न आपल्याला जोवर पडत नाहीत तोवर आपण चुकीच्या राजकीय पक्षांना मतदान करीत राहू. म्हणजेच आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारीत राहू.
या राष्ट्राची जीवनधारा खंडीत करण्याचे प्रयत्न परकीय आणि भोगवादी विचारांवर पोसलेल्या स्वाकियांकडून मुजोरपणाने सुरू आहेत. ख्रिस्ती मिशनरी अनेक मार्गाने हिन्दू धर्माचे लचके तोडून येथील सहिष्णु जीवन प्रवाह खंडित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. इस्लामी आतंक हा अतिरेकी, घुसखोरी आणि प्रचंड जननदर या माध्यमातून या राष्ट्राला ग्रासत आहे.
या साऱ्या आव्हानांना लोकशाही मार्गाने तोंड देण्यासाठीच देशामध्ये हिंदू जनजागृती समितीच्या वतीने हिंदू धर्मजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहेत. या सभांना समाजातील सर्व राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांकडून पाठिंबा मिळत आहे, हे एक सुचिन्हच म्हणावे लागेल.
या धर्मसभांच्या माध्यमातून हिंदूंच्या संघटित शक्तीचे दर्शन होणार आहे. संघटित शक्तीचे रूप पाहण्यासाठी पुन्हा पुन्हा आपल्याला एकत्रित यावे लागेल. भारतासमोरील सर्व आव्हानांना एकच उत्तर आहे... "संघटित हिंदू-समर्थ भारत।'

................................

हिंदू जनजागृती समितीच्या वतीने सोलापुरात
रविवार, दि। 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वा।
नॉर्थकोट मैदान येथे हिंदू धर्मजागृती सभेचे
आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने...
-सिद्धाराम भै. पाटील
३० नवम्बर, २००८ , दै। तरुण भारत, आसमंत पान 1

Friday, November 21, 2008

शिवधर्म समजून घेऊ या...


""जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंदकाय आहे शिवधर्म ?
खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील शंभर टक्के लोकांना शिवधर्म काय आहे हे माहीत नाही; शिवधर्म चळवळीतील काही शे लोकांना शिवधर्म चळवळ माहीत आहे (शिवधर्माची विचारधारा या अर्थाने).
पुण्यातील भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा मात्र महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावे एक संघटना आहे याची बऱ्याच जणांना माहीती झाली. अलीकडच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल ऐकायला, वाचायला मिळू लागले आहे. तरीही केवळ मराठा समाजालाच नव्हे तर या चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांनाही शिवधर्म चळवळीची खरी ओळख नाही, हे एक कटुसत्य आहे आणि शिवधर्माचे बलस्थानही.
मराठा समाजाचे हित पाहणारी ही संघटना असावी, असे वाटून मराठा समाजातील काही तरुण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांकडे वळतात, ही खरी गोष्ट आहे. शिवधर्म, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची मातृसंघटना आहे मराठा सेवा संघ. श्री पुरुषोत्तम खेडेकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक समजले जातात. ( आता मराठा सेवा संघ विद्‌वेषमूलक भूमिका घेत आहे असे वाटल्याने डॉ. आ. ह. साळूंखे हे चळवळीपासून दूर झाले आहेत, अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहीती आहे.)
शिवधर्म म्हणजे ब्राह्मणद्‌वेष असे समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. शिवधर्मवाल्या मंडळींकडून प्रकाशित होणारी नियतकालिके आणि पुस्तके यांत किमान 80 टक्के भाग ब्राह्मणद्‌वेषासाठी खर्च केलेली असतात. (ब्राह्मणद्‌वेष का, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शिवधर्म समजून घेताना शिवधर्माची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना शिवधर्माने देवतास्थानी मानले आहे. छत्रपती शिवरायांना देवतास्थानी मानले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा विरोध शिवधर्माने आपल्या कृतीतून चालविला आहे.
हिंदू मनातील तळपत राहणारे महाप्रखर तेजस्वी सूर्य अर्थात शिवप्रभू. त्यांचा तेजस्वी प्रकाश आणि प्रताप महाराष्ट्राच्या डोंगर-दऱ्यातून वाट काढीत अखिल भारताला प्रभावित करीत आला आहे. एका महान आदर्शाच्या रूपात ते यापुढेही अखिल भारतवर्षाला प्रभावित करीत राहतील.
"भारताला छत्रपती शिवरायांच्या मार्गानेच वाटचाल करावी लागेल. आपल्या मुखात एकच घोषणा असू द्या- शिवाजी, शिवाजी आणि थोर शिवाजी', असे उद्‌गार नेताजी सुभाषचंद्रांनी काढले होते.स्वामी विवेकानंद म्हणतात, "छत्रपती शिवराय म्हणजे वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात वर्णन केलेल्या उच्च आदर्शांचे मूर्तीमंत उदाहरण होत. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होतेे.'शिवरायांची हिंदुत्व रक्षणाची कमालीची तळमळ पाहून उत्तर हिंदुस्थानातील कवी भूषण इतका भारावला की, त्याने तो शिवप्रताप आपल्या काव्यात बद्ध करून हिंदुस्थानभर ऐकविला आणि हिंदूंमधली स्फूर्ती जागवली. किती ओजस्वी काव्यपंक्ती आहेत त्या...
""जैसे अरण्यास दावानल
हरीण कळपास चित्ता
भव्य गजास वनराज
घोर तमास सूर्य अन्‌
कंसास श्रीकृष्ण असे
तैसे म्लेंच्छांच्या रानटी
टोळ्यांस राजा शिवछत्रपती !''
याच हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवरायांनी स्वत:च आपल्याकडे कमीपणा घेऊन, दिल्लीश्वराच्या इंगिताप्रमाणे चालून आलेल्या मिर्झाराजा जयसिंहाचे हिंदुत्व व हिंदूपणा जागृत करून, ते कायम राखण्यासाठी त्याच्याशी बोलून गेले की, ""तुम्ही या, मी निर्माण करीत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे अधिपती व्हा नि या औरंगजेबी शासनाला नष्ट करून, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू साम्राज्याची ध्वजा उभारा. मी तुमच्या मदतीला आहेच - तुमच्या अश्वाची लगाम सावरण्याकरिता नि सांभाळण्याकरिता!'' महाराजांच्या मनाचा हा मोठेपणा होता. शिवरायांचा हा धर्माभिमान शिवधर्मवाल्यांनी त्यांचेच नाव घेऊन पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवरायांच्याच नाव घेत हिंदुत्वाला नष्ट करण्याच्या इराद्याने शिवधर्माची स्थापना करण्यात आली आहे. ही मंडळी स्वत:ला हिंदूधर्माचे मानत नाहीत. इतकेच नव्हे तर हिंदू देवदेवतांची ओंगळवाण्या शब्दांत निंदानालस्ती आणि अवमान करण्यात या मंडळींचे आयुष्य चालले आहे. माता तुळजाभवानीचा अवमान करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचे थडगे शिवरायांनी उभारले, परंतु आज शिवधर्मवाले माता जिजाऊ आणि शिवरायांच्या नावाचा जयजयकार करीत सरस्वतीची, गणपतीची अवमानना करीत आहे.
सरस्वतीची मूर्ती फोडण्याचे धाडस आता अन्यधर्मीय करू शकत नाहीत, हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत गलिच्छ शब्दांत लिहिण्याचे धाडसही करू शकत नाहीत. हे काम आता शिवधर्माच्या माध्यमातून हिंदूनांच हिंदूविरुद्ध उभे करून केेले जात आहे. हिंदूंच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करा, धर्मश्रद्धा नष्ट झालेला हिंदू कणाहीन, तेजहीन आणि भ्याड बनेल. त्याला यथावकाश आकाशाच्या बापाच्या कळपात किंवा अल्लाच्या दरबारात घेऊन जाणे सोपे राहील, असे यामागे षड्‌यंत्र तर नसेल ना अशी शंका अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.शिवरायांनी "हर हर महादेव'ची ललकारी देतच मावळ्यांना संघटित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते, हे शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाही. (शिवराय हे तुळजाभवानीचे भक्त होते याला पुरावा काय, असे त्यांचे विचारणे असते. त्या काळात तुळजाभवानीची पूजा करताना शिवरायांनी फोटो काढून जपून ठेवायला हवा होता की काय?)हिंदुस्थानात मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी येथील पंथांचे लोक दुसऱ्या पंथाचा आदर करीत. दुसऱ्याची श्रद्धा, विचार यांचा आदर करणे हे हिंदुधर्मीयांचे वैशिष्ठ्ये आहेत. आमच्या दृष्टीने जन्मलेला प्रत्येकजण हा हिंदू असतो, त्यामुळे कोणाचे धर्मांतर करणे किंवा फेरधर्मांतर हे प्रश्र्नच कधी उद्‌भवले नाहीत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर करीत होता. मुस्लिम आक्रमकांनी येथे आल्यावर तलवारीच्या धाकाने असंख्य हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. अशारीतीने मुस्लिम झालेल्यास पुन्हा हिंदू करून घेण्याची कोणतीच सोय हिंदू धर्मात नव्हती. जबरदस्तीने मुसलमान झालेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती, परंतु परतीचा मार्ग उपलब्ध नव्हता. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या ही त्रुटी लक्षात आली. मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेण्याची विनंती महाराजांनी धर्ममार्तंडांना केली, तेव्हा एखाद्याला हिंदू करून घेण्याचा कोणताच विधी नाही असे उत्तर महाराजांना मिळाले. त्यांनी लगेच धर्ममार्तंडांना सांगितले की विधी नसेल तर तुम्ही तयार करा. अशारीतीने मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. बजाजी पुन्हा हिंदू झाला तरी त्याच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी महाराजांनी आपली मुलगी बजाजीच्या मुलास देऊन त्याला व्याही करून घेतले आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजाची गरज असेल अशावेळी समाजाला पचेल, रुचेल अशा नवीन प्रथा सुरू करायच्या असतात. परधर्मी झालेल्यांना पुन्हा हिंदु करून घेऊन शिवाजी महाराजांनी हे केले.आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद आदी संघटना हिंदू धर्मातून ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात आणण्याचे काम करीत आहेत. शिवरायांनी घालून दिलेल्या संकेतानुसार हे कार्य आहे, परंतु शिवधर्मवाली मंडळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात काम करण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. आज पूर्वांचल भारतातील नागालॅंडसारख्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 70 टक्केहून अधिक वनवासी हिंदूंना ख्रिस्ती केले आहे. ओरिसासारख्या राज्यात ख्रिस्ती मिशनऱ्या जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील वनवासी भागच नाही तर पुणे, सोलापूरसारख्या शहरी भागातही ख्रिस्ती मिशनऱ्या फसवून धर्मांतरे करीत आहेत. याविरोधात आंदोलन चालवणे तर दूरच राहिले. याउलट समाजात हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम शिवधर्मवाली मंडळी करीत आहेत.
शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले, जिजामातेने शिवरायांना बालपणी रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार केले या गोष्टी शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाहीत. त्यांच्या मते शिवराय आणि जिजाऊ हे आस्तिक नव्हते. शिवधर्मवाल्या मंडळींच्या मते हिंदू देवदेवतांची पूजा करणे सोडून दिले पाहिजे.
मातेची जो थाने फाडी। तया जोडी कोण ते ।।1।।
वेदां निंदी चांडाळ। भ्रष्ट सुतकीया खळ ।।2।।
वेद श्रृति ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचे वचन न मानी तो ।3।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवा नये ।।4।।
हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ- वेदांसंबंधी संत तुकारामांचे हे विचार आहेत. तरीही त्यांना विद्रोही म्हणून प्रस्तूत करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवधर्मवाले करीत असतात.
"बोलिली लेकुरे। वेडी वाकुडी उत्तरे।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाही विचारिला। अधिकार म्या आपुला।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपे किंकरा।।'
ज्ञानेश्वरांकडे मागणे मागणाऱ्या संत तुकोबारायांना जातीच्या बंधनात अडकावून ज्ञानेश्वर विरुद्ध तुकाराम असे चित्र उभे करण्याचा उपद्‌व्यापही शिवधर्मवाले करीत असतात.
एकूणच काय तर शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा जयजयकार एका तोंडाने करायचे आणि हिंदू धर्माला खिळखिळे करायचे अशी कार्यपद्धती शिवधर्मवाल्या मंडळींची आहे. शिवधर्मवाल्या मंडळींच्या आचार आणि विचारांतही प्रचंड तफावत आहे, यामुळेच त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसावे असे वाटते. उदाहरणादाखल म्हणून काही मुद्दे पाहा...
1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.)
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''


-सिद्धाराम भै. पाटील

Tuesday, November 11, 2008

शैव धर्म ?

भैय्या :काय पाटिल साहेब तुम्हाच्या जातीचे लोक् आता आम्हाला हिन्दू म्हनू नका आम्ही शैव आहोत आणि हिन्दू आम्हाचे शत्रु आहेत असे म्हणत आहेत आणि डॉ शिवानद स्वामी हे कट्टर हिन्दू विरोधक आहेत त्यांचे करोडो समर्थक आहेत तुम्ही शैव समाज च्या विरुध्द आहत का ?आणि शैव लोक् स्वत त्यांचा शैव धर्म मानतात आता ते या पुढे शैव म्हणुन ओलाखाले जाणार आहेत हिन्दू म्हनने त्याना आवडत नाही मग तुम्ही त्या शैव लोकाना विरोध कराल का?
siddharam patil: भैय्या हि खुप जुनी गोष्ट आहे। स्वताला हिन्दू न म्हनवुन घेणारे मराठा समाजात काही लोक आहेत तसे ते लिंगायत आणि अन्य समाजात सुद्धा आहेत। या लोकांची इतकी कालजी करण्याची आवश्यकता नाही। परक्या विचारांच्या उष्ट्यावर पोसलेल्या लोकांकडून दूसरी काय अपेक्षा करणार ?हिन्दू समाजातील विविध जाती स्वताच्या जातीला धर्म मानू लागतील तेंव्हा हिन्दुत्वच अधिक बलकट होणार आहे।
siddharam patil:
हिन्दू समाजातील विविध जाती स्वताच्या जातीला धर्म मानू लागतील तेंव्हा हिन्दुत्वच अधिक बलकट होणार आहे. हे कसे काय ...उदाहरनार्थ समजा शैव जातीचे / समाजाचे

लोक स्वताला शैव धर्माचे समजू लागले. तर ते त्यांच्या कथित शैव धर्मावर अधिक श्रद्धा ठेवू लागतील. शैव तत्वद्न्यान समजून घेण्याचा, अभ्यासन्याचा अधिक प्रयत्न करतील (आजच्या पेक्शा अधिक प्रमाणात.). म्हणजेच ते भगवान शिवाप्रती अधिक जोडले जातील. बारा ज्योतिर्लिंग_ वाराणसी, श्रीशैल, रामेश्वरम, केदारनाथ, सोमनाथ, उज्जैन, आदि स्थान त्यांच्यासाठी श्रद्धास्थाने असतील. आपल्या समाजाच्या उन्नतीचा ते अधिक प्रयत्न करतील. आपल्या समाजातील लोक धर्मांतर करू नयेत यासाठी ते प्रयत्न करतील. भैय्या, तुम्ही मला सांगा हिंदुत्वा म्हणजे याहून वेगले काय आहे ? हाँ, शिवधर्मवाले करतात तसे अन्य जातींचा द्वेष करण्याला मात्र आमचा विरोध आहे. पहा हे विचार तुम्हाला पटले पाहिजेच हा माझा दुराग्रह नाही... मात्र तुम्ही विचार करू शकता. तुम्ही शिव धर्मवाले तुमच्या धर्माचा प्रसार करा, अभिमान बालगा , पण हिन्दू धर्माला शिव्या घालू नका. हिन्दू धर्माला शिव्या घालने म्हणजे स्वताला शिव्या घलान्यसराखे आहे।

ॐ Vijaykumar ۞☺♪:
भाषा, प्रान्त, जाती, देश विषयक अभिमान सर्व समाजा असला पाहिजे आणि तो राहतो,हे प्रत्येक समाज बांधवांचे कर्त्तव्य आणि अधिकार आहे, पण इथे परस्पर संबंधांची जाणीवआणि आदर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही आम्हास काही संबोधित करून घेवू पण पूर्णजग आम्हास हिन्दू म्हनुनच संबोधित करणार.

शिव धर्म आणि धर्मांतर.

हुतात्मा स्वामी laxmananand यांची ख्रिस्ती mishanaryanni हत्या केली। त्यानानंतर मी आसमंत पुरवनित एक लेख लिहिला ।
http://psiddharam.blogspot.com/2008/08/blog-post_28.html
तो भैय्या पाटिल कड़े पाठविला । त्यानंतर झालेली ही चर्चा...

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
जय जिजाऊ आता स्वत रस्त्या वर उतरणार की आम्हाच्या बहुजन लोका ना सागुन दगा सुरु करायला लावणार


सिद्धराम: भैया स्वताला बहुजन म्हनवुन घेण्यात तुम्हाला खुप आनंद वाटतो, ही चांगली गोष्ट आहे. तुमचे पूर्व गृह की जे यथार्थ नाहीत ते दूर ठेवा. वस्तुस्थिति समजुन घ्या.
siddharam patil:
तुम्हाला मुस्लिम आणि ख्रिस्ती लोकांबद्दल pulakaa आहे, ही चांगली गोष्ट आहे। पण ती एकतर्फी नको. तुमचे विचार माननारे नाहीत त्याना तुम्ही बहुजनान्पसून दूर लोट न्याचा प्रयत्न करू नका.देशाची falani विसरु नका. घंटाकर्ण होऊ नका. भेटत राहू.

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
जय जिजाऊ आम्हाला ब्राम्हण ख्रिस्ती आणि मुस्लिम लोका बद्दल पुलका नाही आहे ब्राम्हण हे दगा पेतवनारे आणि घरी बसून मज्जा बगनारे आहेत ते स्वत कधी लढत नाहीत फ़क्त सर्व सामान्य लोका ना भडकावा न्य चे काम करायचे V नतर मिल्नारा मलीदा खायचा बाबरी माजिद च्या येळी एक तरी ब्राम्हण मेला होता का?बिचारे गोर गरीब मेले त्यात ८४ हजार लोक मेले होते मात्र नतर मलीदा ब्राम्हण च खातात
siddharam patil:
मी ब्रह्मण नाही. त्यांच्या किंवा अन्य जातीच्या लाकंच्या चूका गौराविन्याचे कारण नाही. पण धर्मांतर होत असता त्याकडे दुर्लक्ष करने आणि येनकेन प्रकार ब्रह्मानना झोदपने शहन्पनाचे नाही.
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
ब्राम्हण RSS ने महाराष्ट्र मध्ये नागालैंड आणि म्जोरम तसेच इतर राज्य मधील मूल ना आणून येथे त्यांच्या जीवन चा तमाशा करत आहेत त्याना शिक्षन न देता त्याना वाईट गोष्टी कड़े वलवले जाते त्याना शिकू देत त्याना तुम्ही बरबाद करत असतल तर त्यानी या धर्मं मध्ये कशाला रहावे त्याना कुणी मुलभुत सोयी व योग्य शिक्षन देत असतील आणि गुलाम मन्हुन न जगाता स्वतंत्र जगाता आले तर वाईट काय आहे आणि ते बल जबरी थोडेच करत आहेत
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
महाराष्ट्र मध्ये आदिवासी लोका नि ख्रिस्ती धर्म स्वकराला आज त्यांची प्रगति जाली आहे कारन हिन्दू म्हणुन जागत असताना त्या जाती वर ब्राम्हण लोका नि भरपूर बदन घातली होती आज कुणी ही कोणताही धर्म स्वीकारू शकतो कुणी बलजबरी करू शकत नाही आम्ही आता शिवधर्म स्वीकारला आहे
๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
तुम्ही कर्नाटक आणि अधर प्रदेश मधील वातावरण शी परिचित आहत आज तिकडे ब्राम्हण विरोधी चलवल किती मजबूत आहे हेही तुम्हाला माहित असेल त्यानी तर ३० वर्षा पूर्वी ब्राम्हण ना हाकलून लावले होते आज ते प्रगत आहेत कारन त्या राज्य मध्ये ब्राम्हण लोका ना हाकलले आहे तुम्ही लिगायत आहत तुम्हाच्या जाती मधील लोक ब्राम्हण जाती ला मानत नाहीत आम्हाच्या कड़े बरेच लिगायत आहेत

๑۩๑भैया पाटिल๑۩๑:
माजे एक च मत आहे गोर गरीब लोका ना त्यांच्या जीवन मधून उठाऊ नका तुम्ही स्वत काय bangadi करायच्या आहेत त्या करा फ़क्त बहुजन समाज त्या पासून दूर राहिला पाहिजे

siddharam patil:
भैय्या तुम्हाला संघ आणि ब्रह्मण द्वेशाची जबरदस्त कवील झाली आहे। rss च्या एक छदामहि काम तुमच्या संघटनेने केलेले नाही. काही बरळत सुटता, हे ठीक नाही. संघ नागालैंड आणि मिझोरम मधे काय काम करते ते तुम्हाला कालने शाक्य नाही. माझ्या परिचायाची या राज्यातील १५ हुन अधिक तरुण आहेत. rss बद्दल गैरसमज पसराविने हा तुमचा धंदा झाला आहे.
siddharam patil:
khristi dharm swikaralyane pragati hote ha tumacha bhram ahe। tase asate tar dalit khrishtian jamaat udayala aali asati ka? aarakshanachi bhik tyani magitali nasati.
siddharam patil:
तसे तर प्रत्येक जातित दोष आहेत। एवढेच काय तुमच्या शिव धर्मं वाल्यांचे ढीगभर ढोंग मी तुम्हाला दाखवू शकतो. पण तो माझा धंदा नाही. तुमची इच्छा असेल तर मात्र माझा नाइलाज आहे. केवल जातीचा विचार तुम्ही करता असे दिसते. हे बरोबर नाही. प्रत्येक जातित दोष आणि चांगल्या गोष्टी आहेत.
siddharam patil:
ब्रह्मनांची खुपच धास्ती तुम्ही घेतली आहे। खरे तर अशी धास्ती घेण्याचे कारण नाही. तुम्ही शिव्प्रेमी आहात. हिंदुत्वाबद्दल प्रेम बालगा. ब्रह्मनांची भीती मनातून काढून टाका.

siddharam patil:
भैय्या, तुम्ही आणि तुमची संघटना कधीही बंगलादेशी घुसखोर आनी इस्लामी अतिरेकी यांच्याबद्दल बोलत नाही। कधी अफाजखानाच्या कबरिबद्दल बोलत नाही. केवल ब्रह्मानना शिव्या दिल्याने काय साध्य होणार आहे? कोणतेही विधायक चलवल दीर्घकाल चालवायचे तर द्वेशाचा आधार उपयोगाचे नाही हे ध्यानी घ्या.

siddharam patil:
गोर गरिबांना स्वताच्या पायावर उभे करण्याचे काम संघ परिवार करते, जीवनातून uthavinyache नाही। भानगडी करण्याची rss ची रीत नाही.बरे झाले तुम्ही शिवारांच्या काली नह्वातात. नाही तर मावल्यान्ना सैन्यात घेऊ नाका असा सुर तुम्ही आवलायाला कमी केला नसता. देश धर्म संकटात असताना त्याचा प्रतिकार करने हां धर्म आहे, हीच प्रेरणा आम्ही शिवारयान्पसुं घेतली आहे.

पंढरीच्या लोका,:
tya bhaiyaala sanga.........ki 84000 lok॥ kadhi mele..de purave mhanav.. 84000 ha nanin shodh ahe shakti kapoor shobtoy.. bhaiya..
००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००
ही चर्चा सप्टेम्बर च्या पहिल्या आथावाद्यत झाली आहे।

Monday, November 10, 2008

शिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा

शिवधर्म समजून घेऊ या...


""जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे ! मी जोडे चांगले शिवू शकतो आणि तुम्ही राज्य चांगले चालवू शकता, परंतु त्याचा अर्थ हा नाही, की तुम्ही मला पायदळी तुडवावे.
मी छातीठोकपणे सांगतो की, आजची अवनती ही धर्मामुळे झालेली नसून, धर्मतत्वांचे योग्यरीतीने पालन न केल्यानेच झालेली आहे. धर्म निर्दोष आहे, दोषी आहेत धर्माचा व्यापार करणारे दलाल!
एखादे कालचे पोर - जे काल जन्मले आणि उद्या मरणार. त्या पोराचे ऐकून मी जर माझ्या भोवतालचे जग बदलायचे ठरविले तर मी हास्यास्पद ठरेन. त्यांना सांगा की, तुम्ही स्वत: एक समाजरचना निर्माण करून दाखवा -मग आम्ही तुमचे ऐकू.
आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तू छिन्न करण्यात काय लाभ ? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
लाकडाचा तुकडा जसा त्याच्या रेषांवरून कापला तर चटकन कापला जातो. तसेच पुरातन हिंदू धर्मात शिरलेले दोष, त्या धर्माच्या माध्यमातूनच दूर होतील. त्यासाठी दिखाऊ, बेगडी, सुधारकी चळवळींची मुळीच गरज नाही !''
- स्वामी विवेकानंदकाय आहे शिवधर्म ?
खरे सांगायचे झाले तर महाराष्ट्रातील शंभर टक्के लोकांना शिवधर्म काय आहे हे माहीत नाही; शिवधर्म चळवळीतील काही शे लोकांना शिवधर्म चळवळ माहीत आहे (शिवधर्माची विचारधारा या अर्थाने).
पुण्यातील भांडारकर संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता, तेव्हा मात्र महाराष्ट्रात संभाजी राजांच्या नावे एक संघटना आहे याची बऱ्याच जणांना माहीती झाली. अलीकडच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे यासाठी काही ठिकाणी आंदोलने करण्यात आली, त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतेक लोकांना संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघाबद्दल ऐकायला, वाचायला मिळू लागले आहे. तरीही केवळ मराठा समाजालाच नव्हे तर या चळवळीत काम करणाऱ्या बहुतेक कार्यकर्त्यांनाही शिवधर्म चळवळीची खरी ओळख नाही, हे एक कटुसत्य आहे आणि शिवधर्माचे बलस्थानही.
मराठा समाजाचे हित पाहणारी ही संघटना असावी, असे वाटून मराठा समाजातील काही तरुण संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांकडे वळतात, ही खरी गोष्ट आहे. शिवधर्म, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांची मातृसंघटना आहे मराठा सेवा संघ. श्री पुरुषोत्तम खेडेकर आणि डॉ. आ. ह. साळुंखे हे मराठा सेवा संघाचे संस्थापक समजले जातात. ( आता मराठा सेवा संघ विद्‌वेषमूलक भूमिका घेत आहे असे वाटल्याने डॉ. आ. ह. साळूंखे हे चळवळीपासून दूर झाले आहेत, अशी विश्वसनीय सूत्राकडून मिळालेली माहीती आहे.)
शिवधर्म म्हणजे ब्राह्मणद्‌वेष असे समीकरण अलीकडच्या काळात निर्माण झाले आहे. शिवधर्मवाल्या मंडळींकडून प्रकाशित होणारी नियतकालिके आणि पुस्तके यांत किमान 80 टक्के भाग ब्राह्मणद्‌वेषासाठी खर्च केलेली असतात. (ब्राह्मणद्‌वेष का, हा एक स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)
शिवधर्म समजून घेताना शिवधर्माची विचारधारा समजून घेणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांना शिवधर्माने देवतास्थानी मानले आहे. छत्रपती शिवरायांना देवतास्थानी मानले तरी छत्रपती शिवरायांच्या जीवन आणि कार्याचा विरोध शिवधर्माने आपल्या कृतीतून चालविला आहे.
हिंदू मनातील तळपत राहणारे महाप्रखर तेजस्वी सूर्य अर्थात शिवप्रभू. त्यांचा तेजस्वी प्रकाश आणि प्रताप महाराष्ट्राच्या डोंगर-दऱ्यातून वाट काढीत अखिल भारताला प्रभावित करीत आला आहे. एका महान आदर्शाच्या रूपात ते यापुढेही अखिल भारतवर्षाला प्रभावित करीत राहतील.
"भारताला छत्रपती शिवरायांच्या मार्गानेच वाटचाल करावी लागेल. आपल्या मुखात एकच घोषणा असू द्या- शिवाजी, शिवाजी आणि थोर शिवाजी', असे उद्‌गार नेताजी सुभाषचंद्रांनी काढले होते.स्वामी विवेकानंद म्हणतात, "छत्रपती शिवराय म्हणजे वेद, उपनिषदे आणि महाकाव्यात वर्णन केलेल्या उच्च आदर्शांचे मूर्तीमंत उदाहरण होत. असा राजा, कणखर नेता, महात्मा कोठे झाला आहे काय? छत्रपती शिवराय म्हणजे राष्ट्राच्या आत्मशक्तीचे तेजस्वी प्रगटीकरण होतेे.'शिवरायांची हिंदुत्व रक्षणाची कमालीची तळमळ पाहून उत्तर हिंदुस्थानातील कवी भूषण इतका भारावला की, त्याने तो शिवप्रताप आपल्या काव्यात बद्ध करून हिंदुस्थानभर ऐकविला आणि हिंदूंमधली स्फूर्ती जागवली. किती ओजस्वी काव्यपंक्ती आहेत त्या...
""जैसे अरण्यास दावानल
हरीण कळपास चित्ता
भव्य गजास वनराज
घोर तमास सूर्य अन्‌
कंसास श्रीकृष्ण असे
तैसे म्लेंच्छांच्या रानटी
टोळ्यांस राजा शिवछत्रपती !''
याच हिंदुत्वाच्या अभिमानाने शिवरायांनी स्वत:च आपल्याकडे कमीपणा घेऊन, दिल्लीश्वराच्या इंगिताप्रमाणे चालून आलेल्या मिर्झाराजा जयसिंहाचे हिंदुत्व व हिंदूपणा जागृत करून, ते कायम राखण्यासाठी त्याच्याशी बोलून गेले की, ""तुम्ही या, मी निर्माण करीत असलेल्या हिंदवी स्वराज्याचे अधिपती व्हा नि या औरंगजेबी शासनाला नष्ट करून, संपूर्ण हिंदुस्थानात हिंदू साम्राज्याची ध्वजा उभारा. मी तुमच्या मदतीला आहेच - तुमच्या अश्वाची लगाम सावरण्याकरिता नि सांभाळण्याकरिता!'' महाराजांच्या मनाचा हा मोठेपणा होता. शिवरायांचा हा धर्माभिमान शिवधर्मवाल्यांनी त्यांचेच नाव घेऊन पायदळी तुडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
शिवरायांच्याच नाव घेत हिंदुत्वाला नष्ट करण्याच्या इराद्याने शिवधर्माची स्थापना करण्यात आली आहे. ही मंडळी स्वत:ला हिंदूधर्माचे मानत नाहीत. इतकेच नव्हे तर हिंदू देवदेवतांची ओंगळवाण्या शब्दांत निंदानालस्ती आणि अवमान करण्यात या मंडळींचे आयुष्य चालले आहे. माता तुळजाभवानीचा अवमान करणाऱ्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून त्याचे थडगे शिवरायांनी उभारले, परंतु आज शिवधर्मवाले माता जिजाऊ आणि शिवरायांच्या नावाचा जयजयकार करीत सरस्वतीची, गणपतीची अवमानना करीत आहे.
सरस्वतीची मूर्ती फोडण्याचे धाडस आता अन्यधर्मीय करू शकत नाहीत, हिंदू देवदेवतांविषयी अत्यंत गलिच्छ शब्दांत लिहिण्याचे धाडसही करू शकत नाहीत. हे काम आता शिवधर्माच्या माध्यमातून हिंदूनांच हिंदूविरुद्ध उभे करून केेले जात आहे. हिंदूंच्या माध्यमातून हिंदूंच्या धर्मश्रद्धा नष्ट करा, धर्मश्रद्धा नष्ट झालेला हिंदू कणाहीन, तेजहीन आणि भ्याड बनेल. त्याला यथावकाश आकाशाच्या बापाच्या कळपात किंवा अल्लाच्या दरबारात घेऊन जाणे सोपे राहील, असे यामागे षड्‌यंत्र तर नसेल ना अशी शंका अनेक विचारवंतांनी व्यक्त केली आहे.शिवरायांनी "हर हर महादेव'ची ललकारी देतच मावळ्यांना संघटित केले होते. छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभवानीचे भक्त होते, हे शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाही. (शिवराय हे तुळजाभवानीचे भक्त होते याला पुरावा काय, असे त्यांचे विचारणे असते. त्या काळात तुळजाभवानीची पूजा करताना शिवरायांनी फोटो काढून जपून ठेवायला हवा होता की काय?)हिंदुस्थानात मुस्लिम आक्रमक येण्यापूर्वी येथील पंथांचे लोक दुसऱ्या पंथाचा आदर करीत. दुसऱ्याची श्रद्धा, विचार यांचा आदर करणे हे हिंदुधर्मीयांचे वैशिष्ठ्ये आहेत. आमच्या दृष्टीने जन्मलेला प्रत्येकजण हा हिंदू असतो, त्यामुळे कोणाचे धर्मांतर करणे किंवा फेरधर्मांतर हे प्रश्र्नच कधी उद्‌भवले नाहीत. प्रत्येकजण दुसऱ्याच्या उपासना पद्धतीचा आदर करीत होता. मुस्लिम आक्रमकांनी येथे आल्यावर तलवारीच्या धाकाने असंख्य हिंदूंना मुसलमान होण्यास भाग पाडले. अशारीतीने मुस्लिम झालेल्यास पुन्हा हिंदू करून घेण्याची कोणतीच सोय हिंदू धर्मात नव्हती. जबरदस्तीने मुसलमान झालेल्यांना परत हिंदू धर्मात येण्याची इच्छा होती, परंतु परतीचा मार्ग उपलब्ध नव्हता. युगपुरुष शिवाजी महाराजांच्या ही त्रुटी लक्षात आली. मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला पुन्हा हिंदू करून घेण्याची विनंती महाराजांनी धर्ममार्तंडांना केली, तेव्हा एखाद्याला हिंदू करून घेण्याचा कोणताच विधी नाही असे उत्तर महाराजांना मिळाले. त्यांनी लगेच धर्ममार्तंडांना सांगितले की विधी नसेल तर तुम्ही तयार करा. अशारीतीने मुस्लिम झालेल्या बजाजी निंबाळकराला महाराजांनी पुन्हा हिंदू करून घेतले. बजाजी पुन्हा हिंदू झाला तरी त्याच्याशी रोटी-बेटी व्यवहार करायला कोणी तयार नव्हते. अशावेळी महाराजांनी आपली मुलगी बजाजीच्या मुलास देऊन त्याला व्याही करून घेतले आणि त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. समाजाची गरज असेल अशावेळी समाजाला पचेल, रुचेल अशा नवीन प्रथा सुरू करायच्या असतात. परधर्मी झालेल्यांना पुन्हा हिंदु करून घेऊन शिवाजी महाराजांनी हे केले.आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून बजरंग दल, विश्र्व हिंदू परिषद आदी संघटना हिंदू धर्मातून ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मात गेलेल्यांना परत स्वधर्मात आणण्याचे काम करीत आहेत. शिवरायांनी घालून दिलेल्या संकेतानुसार हे कार्य आहे, परंतु शिवधर्मवाली मंडळी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांच्या विरोधात काम करण्यात स्वत:ला धन्य समजत आहे. आज पूर्वांचल भारतातील नागालॅंडसारख्या राज्यांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 70 टक्केहून अधिक वनवासी हिंदूंना ख्रिस्ती केले आहे. ओरिसासारख्या राज्यात ख्रिस्ती मिशनऱ्या जबरदस्तीने धर्मांतरे घडवून आणायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील वनवासी भागच नाही तर पुणे, सोलापूरसारख्या शहरी भागातही ख्रिस्ती मिशनऱ्या फसवून धर्मांतरे करीत आहेत. याविरोधात आंदोलन चालवणे तर दूरच राहिले. याउलट समाजात हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम शिवधर्मवाली मंडळी करीत आहेत.
शिवरायांनी रायगडावर जगदीश्वराचे मंदिर बांधले, जिजामातेने शिवरायांना बालपणी रामायण-महाभारताच्या गोष्टी सांगून संस्कार केले या गोष्टी शिवधर्मवाल्या मंडळींना मान्य नाहीत. त्यांच्या मते शिवराय आणि जिजाऊ हे आस्तिक नव्हते. शिवधर्मवाल्या मंडळींच्या मते हिंदू देवदेवतांची पूजा करणे सोडून दिले पाहिजे.
मातेची जो थाने फाडी। तया जोडी कोण ते ।।1।।
वेदां निंदी चांडाळ। भ्रष्ट सुतकीया खळ ।।2।।
वेद श्रृति ग्रंथ ज्या प्रमाण। श्रेष्ठाचे वचन न मानी तो ।3।
तुका म्हणे मद्यपानाचे मिष्टान्न।
तैसा तो दुर्जन शिवा नये ।।4।।
हिंदू धर्माचे आधारभूत ग्रंथ- वेदांसंबंधी संत तुकारामांचे हे विचार आहेत. तरीही त्यांना विद्रोही म्हणून प्रस्तूत करण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवधर्मवाले करीत असतात.
"बोलिली लेकुरे। वेडी वाकुडी उत्तरे।।
करा क्षमा अपराध। महाराज तुम्ही सिद्ध।।
नाही विचारिला। अधिकार म्या आपुला।।
तुका म्हणे ज्ञानेश्वरा । राखा पायांपे किंकरा।।'
ज्ञानेश्वरांकडे मागणे मागणाऱ्या संत तुकोबारायांना जातीच्या बंधनात अडकावून ज्ञानेश्वर विरुद्ध तुकाराम असे चित्र उभे करण्याचा उपद्‌व्यापही शिवधर्मवाले करीत असतात.
एकूणच काय तर शिवाजी महाराज आणि जिजाऊ माता यांचा जयजयकार एका तोंडाने करायचे आणि हिंदू धर्माला खिळखिळे करायचे अशी कार्यपद्धती शिवधर्मवाल्या मंडळींची आहे. शिवधर्मवाल्या मंडळींच्या आचार आणि विचारांतही प्रचंड तफावत आहे, यामुळेच त्यांना म्हणावे तसे यश मिळत नसावे असे वाटते. उदाहरणादाखल म्हणून काही मुद्दे पाहा...
1. हिंदुत्वाला शिव्या-शाप देणारे शिवधर्माचे संस्थापक खेडेकर आणि त्यांच्या शिव्या-शापाला मंचावर बसूनच टाळ्या वाजविणाऱ्या रेखाताई खेडेकर हिंदुत्ववादी भाजपाच्या आमदार झाल्या होत्या.2. राष्ट्रीय स्वयंसेवक संघवाले हिंदुत्वद्रोही हिंदुकडे कानाडोळा करतात हे माहीत असल्यामुळे सोलापुरातील शिवस्मारकात दादोजी कोंडदेव यांचे शिल्प यांनी फोडले (अंदाज चुकल्याने त्याचा प्रसादही मिळाला.)
3. अफजलखानाच्या वधाचे चित्र खटकते म्हणून शिवधर्मवाले या चित्राला ते विरोध करतात, ढोंगीपणाचा हा आदर्श नमुनाच होय.
4. गणेशोत्सव साजरा करण्याला शिवधर्मवाल्यांचा विरोध आहे. का तर म्हणजे गणपती हा बामणांचा देव आहे. भगवान शिव हा भारतीयांचा मूळ देव आहे, असे काही शिवधर्मवाल्यांचे म्हणणे असते. ब्राह्मण नसलेल्या शिवाचा मुलगा गणपती ब्राह्मण कसा, हा प्रश्न या शिवधर्मवाल्यांना का पडत नसेल ?5. शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे नाव ठेवणाऱ्या, शिवरायांना बालपणात रामायण-महाभारताच्या पराक्रमकथा सांगणाऱ्या जिजामाता नास्तीक होत्या, अशी लोणकढी थापही शिवधर्मवाली मंडळी देतात.6. संत तुकाराम महाराजांचे शिवधर्मवाले सदैव गुणगाण करीत असतात. परंतु याचवेळी तुकाराम महाराज हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते हे विसरतात. तुकोबारायांनी नामाचा महिमा सांगितला आहे, हे ते सोयीस्करपणे विसरतात. पंढरी कोट्यवधी वारकरी जातात. आषाढी यात्रेला विरोध करण्याचे धाडस नाही, म्हणून ते वारीला विरोध करीत नाहीत. परंतु वारकऱ्यांमध्येही संतांच्या जातीवर जाऊन दुफळी माजविण्याचा अयशस्वी प्रयत्न मात्र यांनी करून पाहिला आहे.7. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडचे बहुतांश पदाधिकारी हे दरवर्षी गणेशोत्सव मंडळांचेही पदाधिकारी असतात. असो.मराठा समाजाच्या हितासाठी आम्ही काम करतो असे भासवून शिवधर्मवाली मंडळी समाजात स्थान मिळवतात हे खरे आहे. परंतु हिंदू धर्माच्या विरोधातली विचारधारा मात्र मराठा समाज तर सोडाच पण या संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडमध्ये काम करणाऱ्यांना मान्य नाही, हे त्यांच्या आचरणातून दिसून येते. मराठा समाजातील गरीबी, दारिद्य्र दूर करण्यासाठी काम करण्याची खूपच आवश्यकता आहे, हे कोणीही नाकारत नाही. परंतु यासाठी हिंदू धर्म नाकारण्याची काहीही आवश्यकता नाही.
काहीही विधायक कार्य न करता सतत केवळ विद्‌वेष पसरविल्याने काहीही साध्य होणार नाही हे सांगायला कोणा भविष्यवेत्याची गरज नाही. मात्र नुकतेच तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मराठा तरुणांच्या मनात हिंदूद्‌वेषाचे (आत्मद्वेषाचे) विष भिनविण्याचा प्रयत्न होत आहे, हे गंभीर आहे. समाजाला मागे खेचणारे आहे.
शिवधर्माचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्यांना वाटते की आपण समाजात सुधारणा घडवून आणत आहोत। या ठिकाणी मला स्वामी विवेकानंदांच्या उद्धरणांची आठवण होते.
स्वामी विवेकानंद म्हणतात, "" हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान करण्यासाठी या राष्ट्राचा धर्म आमूलाग्र बदलला पाहिजे, नव्हे मोडून टाकला पाहिजे अशा विचारांचे काही सुधारक आज आपल्यात आहेत. त्यांच्यापैकी काही खरोखर विचारवंत आहेत. पण बहुतेक लोक आंधळेपणाने पाश्चात्यांचे अनुकरण करणारे आहेत, मूर्खपणाने वागणारेही आहेत. त्याना आपण काय करतो आहोत तेही कळत नाही...
खरोखर हिंदुस्थानात सुधारकांची कधी वाण होती काय? हिंदुस्थानचा इतिहास तुम्ही वाचला आहे काय? रामानुज कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर आणि दादू कोण होते? हे सारे जण महान सुधारकच नव्हते काय?
रामानुजांच्या पोटी दलितांविषयीचा उत्कट जिव्हाळा नव्हता काय? आपल्या संप्रदायात भंग्यांपर्यंत सर्वांना प्रवेश असावा यासाठी ते शेवटपर्यंत झगडले नाहीत काय? अगदी मुसलमानांनीसुद्धा आपल्या उपासना पंथात यावे म्हणून ते झटले नाहीत काय? नानकांनी हिंदू आणि मुसलमान या दोघांनाही दीक्षा देऊन एक नवा पायंडा पाडला नाही काय? हे सर्व सुधारक होते। त्यांचे कार्य अद्यापही चालूच आहे. आत्ताच्या आणि त्यावेळच्या सुधारकांमध्ये फरक एवढाच की, आताच्या सुधारकांसारखा गाजावाजा त्या वेळच्या सुधारकांनी केला नाही. त्यांच्या ओठी कुणासाठी शिव्याशाप नव्हते- केवळ शुभतम आशीर्वादच होते!''

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी