Wednesday, August 31, 2011

जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने

हा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या
कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या
हल्ल्यामुळे होतो. मज्जातंतू हळूहळू निकामी करून या आजाराचा विषाणू बोटं,
पाय, हात आणि हळूहळू फुफ्फुसं आणि श्वसननलिकेवरही हल्ला करतो. लाखात केवळ
दोन-चारजणांना होणारा हा आजार! या आजारानं मला पछाडलं होतं. त्या
गोष्टीला आज 15 ऑगस्ट 2010 ला बरोबर 1 वर्ष झालं. हा भयंकर आजार पूर्णपणे
बरा व्हायलाही काही महिन्यांपासून ते दीड-दोन वर्षांचा कालावधी लागतो.
पूर्ण lekhasathi खाली क्लिक करा...
http://psiddharam.blogspot.com/2010/08/12.html

Monday, August 29, 2011

स्वामी विवेकानंदांवरील परिसंवादात रमली मुंबईची तरुणाई

मुंबई. स्वामी विवेकानंद यांना युथ आयकॉन समजले जाते. विवेकानंद जयंती देशभर युवा दिवस म्हणून साजरा होतो. दि. २५ आणि २६ ऑगस्ट रोजी मुंबईतील रुईया आणि जोशी बेडेकर महाविद्यालात स्वामी विवेकानंदांच्या तत्त्वज्ञावर राष्ट्रीय परिसंवाद पार पडले. या परिसंवादात युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.  
भारत जसा आहे तसा त्यावर प्रेम करा. भारतातल्या गरीब, दुखी-पिडीतांवर प्रेम करा. प्रत्येक जीव ईश्वराचेच रूप आहे त्यामुळे माणसातल्या ईश्वराची पूजा करणे सर्वश्रेष्ठ पूजा आहे, असा संदेश स्वामी विवेकानंदांनी दिला. तो विचार आज कृतीत आणण्याची गरज आहे असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बी. निवेदिता यांनी केले.
पूर्ण बातमीसाठी खाली क्लिक करा...

Wednesday, August 24, 2011

इमामाचा देशद्रोही फतवा

शाही इमाम बुखारी यांनी अण्णांच्या आंदोलनाच्या संदर्भात एक फतवा काढला आहे. अण्णांचे आंदोलन इस्लामविरोधी असल्याने या आंदोलनात मुस्लिमांनी भाग घेऊ नये, असे या फतव्यात म्हटले आहे. या फतव्यामध्ये अण्णांच्या आंदोलनाला इस्लामविरोधी ठरविण्यासाठी इमामाने जे कारण दिले आहे ते संताप आणणारे, कीव करण्यासारखे आहे. अण्णांच्या आंदोलनात 'भारत माता की जय' आणि 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या जात असल्याने हे आंदोलन इस्लामविरोधी असल्याची बांग शाही इमामाने दिली आहे. या देशातील कोणत्याही देशभक्त माणसाच्या संतापाचा भडका उडावा, असा हा फतवा आहे. भारत माता की जय याला जर यांचा विरोध असेल, तर यांना सडेतोडपणे सांगावे लागेल की अरे भारत माता की जय ही या देशाच्या राष्ट्रगीताचा भाग असणारी घोषणा आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनात देशातील सामान्यातला सामान्य माणूस जात, पात, पंथ सर्व विसरून देशभक्तीच्या भावनेने सहभागी झाला आहे. अशावेळी देशाच्या जयजयकाराच्या विरोधात इमामाने फूत्कार टाकणे हे संताप आणणारे आहे. लांगूलचालनाचा परिणाम राष्ट्रद्रोहाकडे कसा घेऊन जातो याचे हे मूर्तिमंत उदाहरण म्हटले पाहिजे. मात्र, इमामाच्या या फतव्याला मुस्लिम समाजातीलच काही लोकांनी धुडकावून लावले, हे बरे झाले. मुस्लिमांच्या उलेमा कौन्सिलने इमामाच्या फतव्याला कडाडून विरोध केला आहे. अण्णांच्या आंदोलनात मोठ्या संख्येने मुस्लिम समाजातील लोक सहभागी झालेले असून, इमामांचा फतवा चुकीचा आहे, असे या उलेमा कौन्सिलने म्हटले आहे. उलेमा कौन्सिलच्या या मतापाठोपाठ दोन हजार मुस्लिमांनी जनता दलाचे खासदार अली अन्वर यांच्या नेतृत्वाखाली मुद्दाम नॉर्थ एव्हेन्यू पासून रामलीला मैदानापर्यंत मोर्चा काढून अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देत रामलीला मैदानावर आंदोलनात सहभागी होण्याची कृती केली. इस्लामचा चुकीचा अर्थ काढून कोणी मुस्लिमांना गुमराह करत असतील, तर यापुढे या देशात हे चालणार नाही, हेच या मुस्लिमांनी जणू निक्षून जतावले आहे. सगळे मुस्लिम हे आपल्या हातात आहेत, अशा आविर्भावात त्यांच्या आधारे देशद्रोहाच्या टोकाला जाऊन वाटमारी करण्याचा धंदा यापुढे चालणार नाही, असा देशद्रोही धर्मांधांना हा इशारा आहे. यात आणखी एक शंका येते आहे ती कुजक्या राजकारणी, कॉंग्रेसी कारस्थानाची. अण्णांच्या आंदोलनात विक्षेप आणण्यासाठी ही मंडळी मुस्लिम, दलित यांना भडकावून देण्याचे कपटकारस्थान करण्याच्या मागे आहेत की काय? काही दलित संघटनांनी विनाकारण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत अण्णांच्या आंदोलनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. हा फार्स प्रायोजित असण्याची शक्यता होती. त्याच मालिकेत शाही इमामाचा हा फतवाही अण्णांचे आंदोलन ज्यांना सोयीचे नाही, त्या राजकीय नतद्रष्ट लोकांकडून प्रायोजित असू शकतो. या देशात अल्पसंख्यकांचे विषय संवेदनशील बनवून त्या आधारे भडका उडवून द्यायचा आणि त्या धगीवर राजकीय पोळ्या भाजण्याचा धंदा खूप आधीपासून चालू आहे. त्याचाच एक भाग म्हणून हे कारस्थान खेळले जात आहे. घटना हा दलित समाजाच्या श्रद्धेचा भाग बनवायचा आणि नको तेव्हा त्या श्रद्धेला आवाहन करून कामाला लावायचे, असा यांचा धंदा आहे. वास्तविक या देशात आजवर कपट कारस्थान करणार्‍या याच लोकांनी राजकीय खुर्ची वाचविण्यासाठी देशाची घटना गुंडाळून आणिबाणी आणली, अनेकदा सोयीनुसार घटनादुरुस्त्या केल्या. कितीतरी वेळा घटनेची पायमल्ली केली आणि आता केवळ अण्णांचे आंदोलन पराभूत करण्यासाठी हे दलित अस्मितेचे कार्ड खेळण्याचा सवंग डाव आखला गेला. अल्पसंख्यकांना भडकवून अण्णांच्या आंदोलनाला अपशकून करण्याचे कारस्थानही या लोकांनी केले असावे. शाही इमामांनी केवळ वंदे मातरम्, भारत माता की जय या घोषणांना विरोध नोंदवून गप्प बसायला हवे होते. तसे न करता इमामांनी, 'मुस्लिम समाजातील लोकांनी अण्णांच्या आंदोलनात भाग घेऊ नये' असे केलेले आवाहन वेगळीच शंका उत्पन्न करणारे आहे. शाही इमामांचा रोख वंदे मातरम्, भारत माता की जय यावर नाही. या दोन घोषणांचा हवाला देत इस्लामी समाजाला या आंदोलनापासून तोडण्याचे हे कारस्थान आहे, असे वाटू लागले आहे. ख्रिश्‍चन संघटनांनी मोर्चा काढून अण्णांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केल्याचे वृत्तही आले आहे. वास्तविक अण्णांचे आंदोलन सर्व जात, पंथ, भाषा यापासून मुक्त आहे. देशाच्या कानाकोपर्‍यातून सर्व जाती-पंथाचे लोक या आंदोलनात उतरले आहेत. अशावेळी केवळ ख्रिश्‍चन समाजाने वेगळा मोर्चा काढण्याची काही गरज नाही. भ्रष्टाचार हा एक दुर्गुण आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन या सर्वांनाच भ्रष्टाचाराचा त्रास होतो. या देशातून भ्रष्टाचार हद्दपार व्हावा, ही सगळ्यांचीच तीव्र इच्छा आहे. सर्वांनी मिळून लढा दिला तरच तो यशस्वी होईल. त्यातून वेगळी चूल मांडण्याची गरज नाही. अण्णांचे आंदोलन सुरू होण्यापूर्वी रा. स्व. संघाच्या मंगलोरजवळ पुत्तूर येथे झालेल्या बैठकीत भ्रष्टाचाराच्या निर्मूलनाचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर अण्णांचे आंदोलन सुरू झाले. त्याचाही दुरुपयोग करत अण्णांचे आंदोलन हे संघाचे कारस्थान आहे, अशा घाणेरड्या पातळीवर कॉंग्रेसच्या मंडळींनी कुप्रचार सुरू केला होता. आता तसे होऊ नये म्हणून संघाने अत्यंत संयमाने खबरदारी घेतलेली दिसते आहे. अण्णांचे आंदोलन बदनाम करण्याचा तो हुकमी मार्ग बंद झाल्याने इस्लाम, दलित या समाजघटकांना उत्तेजित करून, भडकवून देऊन हे आंदोलन हाणून पाडण्याची एक घाणेरडी खेळी आहे की काय? कोणी कसलीही खेळी करोत की राजकारण करोत आता यापुढे या देशात वंदे मातरम् आणि भारत माता की जय या घोषणांना, राष्ट्रगीतांना केलेला विरोध सहन केला जाणार नाही, हे निक्षून सांगण्याची वेळ आली आहे. ज्यांना वंदे मातरम् आणि भारत माता की जय मान्य नसेल त्यांना या देशाच्या भूमीवर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाही, हे आता कोणताही संदेह मनात न ठेवता अगदी स्पष्टपणे सांगितले पाहिजे. देशद्रोहाची भावना भडकवून देऊन आपले राजकीय स्वार्थ साधण्याचा आगीशी खेळ कोणी करत असेल, तर त्यांनाही कायमचा धडा देण्याची वेळ आता आली आहे. मुस्लिम, दलित समाजातील विचारी लोकांनीच त्या त्या वेळी पुढे येऊन मूळ राष्ट्रीय प्रवाहापासून त्यांना भडकवून देऊन तोडण्याचे जे कारस्थान खेळले जाते, ते हाणून पाडले पाहिजे. हे लांगूलचालनाचे, हे अस्मिता भडकवण्याचे, हे देशद्रोही सौदा करण्याचे प्रकार करण्याचा विचारही मनात येणार नाही, अशी शिक्षा अशा प्रकारचा खेळ करणार्‍या कुटिल लोकांना भारतातील सामान्य लोकांनी दिली पाहिजे. यापूर्वी लांगूलचालनाच्या असल्या घाणेरड्या प्रयोगांमुळेच स्वातंत्र्याच्या चळवळीत कॉंग्रेसच्या अधिवेशनात संपूर्ण वंदे मातरम् म्हणण्यास तत्कालीन कॉंग्रेस अध्यक्षाने विरोध केला. त्याला न जुमानता विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी वंदे मातरम् गायिले. कॉंग्रेस अध्यक्ष मंचावरून निघून गेले. त्याचवेळी त्यांना अडवून, जर तुम्हाला वंदे मातरम् मान्य नसेल तर स्वातंत्र्याच्या चळवळीत तुम्हाला काडीचे स्थान नाही, असे म. गांधींसारख्यांनी सांगितले असते तर पुढे कदाचित देशाची दुर्दैवी फाळणी झालीच नसती. आता तरी त्या चुका पुन्हा होता कामा नयेत. शाही इमामाने कोणत्याही हेतूने केलेले असेना, पण त्यांचा फतवा हा सरळ सरळ देशद्रोहाचे आवाहन करणारा असल्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून खटला भरण्याची गरज आहे.

( साभार : तरुण भारत )

Monday, August 22, 2011

रामलीला मैदानावरील जिवंत छायाचित्रे

या छायाचित्रांवर वेगळ्याने भाष्य करण्याची आवश्यकता नाही. ही खूपच बोलकी छायाचित्रे आहेत. ही छायाचित्रे स्वत पाहा... इतरांनाही पाठवा...
रामलीला मैदानावरील जिवंत छायाचित्रे ... साभार : दै. भास्कर 

 
 

 

 

 

 

 

 
 

 

 
 

 
 

 
 

 

 

मावळ फोडणे 'काका'ला जमले नाही...

मावळ हा पूर्वी जनसंघाचा व आत्ता भाजपचा बालेकिल्ला. तो फोडणे 'काका'ला जमले नाही. ७२ च्या निवडणुकीत मावळमधून कृष्णा भेगडे निवडून आले. 'काकांनी' आणीबाणीचा फायदा उठवला. भेगडे यांना  काँग्रेसमध्ये यायला भाग पाडले. आत्ता मावळचे आमदार भाजपाचे संजय भेगडे आहेत, तर खासदार शिवसेनेचे गजानन बाबर आहेत. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असताना मावळमध्ये तो नसल्यामुळेच मावळ प्रकरण हाताळताना संवेदनशीलता दाखविली गेली नाही, असे म्हणणे चुकीचे होईल काय ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
विचार महाराष्ट्राचा
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-mawal-firing-and-we-2370315.html?HT5=

मावळ्यांचे अश्रू तुम्हाला व्यथित करतात का ?

राज्यात गृहमंत्री राष्ट्रवादीचा. राहुल गांधींच्या भेटीने राष्ट्रवादीचे नाक कापले गेले अशी भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांची झाली. परिणामी अजित पवार यांनी वक्तव्य दिले की, 'अण्णा हजारे यांना अटक करून केंद्र सरकारने घोडचूक केली.' मावळचा हा उत्तर रंग. उट्टे काढून झाले. या सा-या प्रकरणाचे सेना-भाजप या पक्षांनी राजकारण केले, असा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला. विषय संसदेत गेला. एक दिवस देशाचे सर्वोच्च सभागृह बंद पाडले गेले. सरकारने पोलिस शिपायांना निलंबित करण्याची तत्परता दाखविली. (अर्थात काही दिवसांनी ते पुन्हा नोकरीवर रुजू होतील.) उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधिशाकरवी या प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

विचार महाराष्ट्राचा : पवनाकाठच्या मावळ्यांचे अश्रू तुम्हाला व्यथित


Friday, August 19, 2011

... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप

त्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे ? मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वेड्यात काढले जाते, जातीयवादाचा शिक्काही मारला जातो. तरीही मला वाटते की हा विषय लोकांपर्यंत नेणे देशहिताचे आहे. संत तुकोबा म्हणतात, 'सत्य काय आहे हे मला समजले आहे, त्यामुळे बहुमत काय आहे याची मला फिकीर नाही.'
या देशातील तथाकथित विचारवंत, धर्मनिरपेक्षवादी वगैरे काय बोलतात यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. सोनिया गांधी यांचा कल देशविरोधी शक्तींकडे असल्याचे पुरावे येथे देत आहे. सोनिया गांधी संचालक असलेली संस्था काय करते हे तुम्हीच त्या संस्थेवर पाहा...


या ग्रेट महाराणी को प्रेसिडेंट असलेल्या संस्थेच्या संकेत स्थळाच्या तळाशी पाहा... मग तुम्हीच ठरवा ही संस्था काय काम करते ते...

http://www.nancho.net/fdlap/fdlalert.html
हे दुसरे फई connection तर नाही ? UPA जागा हो... ISI विषयी प्रेम असलेली व्यक्ती तुमच्या अध्यक्षस्थानी आहे...
फई connection समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-fai-ghulam-nabi-and-kasmir-issue-2287104.html   


स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी

नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg0WN50SPUPRr6uNRE-BO-_wLjy6gWBVmm0RzYw8wSd7fWXYJfH2kVhkq8Ey0VgCve_MqPvwRUFHIUL_jwpKYFVNALjssZHpq5kjT6NQauDCKs-uuDw68sbgE1-zXdl5lNpf1IylFNfy16i/s1600/soniasudarshan.jpg



Monday, August 15, 2011

स्वातंत्र्य दिन विशेष : ... म्हणून भारत महान आहे !


जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे.

कांची पीठातर्फे चालवली जाणारी चेन्नई येथील शंकर नेत्रालय हे आधुनिकता आणि सेवा यात आशिया खंडात सर्वप्रथम आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे दररोज 59 लाख प्रवाशांची वाहतूक करते. जगातली ही सर्वाधिक संख्या आहे.

जगात सर्वात कार्यक्षम आणि सर्वात वजनाने हलकी, लहान लढाऊ विमान भारताने विकसित केले आहे.

Friday, August 12, 2011

माध्यमांनी सरकारचा दुटप्पीपणा देशासमोर आणावा : केजरीवाल

जनलोकपाल विधेयकाचा मसुदा तयार करणारे सदस्य हे निर्वाचित नसल्याचे सांगत केंद्र सरकार जनलोकपाल विधेयकाला विरोध करीत आहे. दुसरीकडे मात्र निर्वाचित नसलेल्या सदस्यांकडून तयार करवून घेतलेले 'प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनल अ‍ँड टार्गेटेड व्हायलन्स बिल' या पावसाळी अधिवेशनात मांडण्याची तयारी केंद्र सरकार करीत आहे. यावरून सरकारचा दुटप्पीपणा दिसून येतो. यापुढे आम्ही हा मुद्दा जोरकसपणे समाजासमोर मांडू, असे सूतोवाच सामाजिक कार्यकर्ते आणि अण्णा हजारे यांचे सहकारी अरविंद केजरीवाल यांनी केले आहे.
माध्यमांनी सरकारचा दुटप्पीपणा देशासमोर आणावा : केजरीवाल 
हिंदूंच्या जीवावर उठलेले "सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक"

Tuesday, August 9, 2011

काळ्या पैशाचा मित्र, पिता आणि तत्त्वज्ञ

गार्डियन या विख्यात इंग्रजी वृत्तपत्रात श्री राम जेठमलानी यांचा एक लेख ३ ऑगस्टच्या अंकात प्रकाशित झाला आहे. 'काळ्या पैशाचा मित्र, पिता आणि तत्त्वज्ञ - चिदंबरम' या मथळ्याखाली तो लेख प्रसिद्ध झाला आहे. हा लेख वाचून मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. देश चालविणाऱ्यांचे चारित्र्य कसे आहे, हे या लेखातून समोर येते... सर्वसामान्यांना राजकारणाशी तसे देणे घेणे नसते; परंतु देशाचे नेतृत्व चालविणारे देशाची लुट करीत असतील तर... ??? तरीही सामान्य माणसाने आपल्याला राजकारण घेवून काय करायचे असे म्हणून अशा गंभीर विषयांकडे कानाडोळा करावे का...???
राम जेठमलानी आणि डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या अभ्यासू व्यक्तींमुळे आजवर अनेक घोटाळे समोर आले आहेत. टू जी स्पेक्ट्रम घोटाळा केवळ डॉ. स्वामी यांच्या पाठपुराव्यामुळे समोर येवू शकला. जे जे विषय सोनिया गांधी आणि त्यांचे विश्वासू व्यक्तीना आरोपीच्या पिंजर्यात उभे करतात ते विषय सर्र्रास मीडियात वर्ज असतात. असे असताना गार्डियनने चिदंबरम यांचे असली रूप समोर आणले आहे. तो मूळ लेख जसेच्या तसे येथे देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी या लेखाचा अनुवाद करावा हि विनंती. त्यामुळे सर्वसामान्य वाचकापर्यंत हा विषय पोहोचेल.
मूळ लेख पाहा...
Friend, father & philosopher
of black money is Chidambaram
 
By Ram Jethmalani, The Sunday Guardian,
August 3, 2011
 
Palaniappan Chidambaram, whom I shall for the sake of brevity call just Chidambaram, is best seen through black and white. And please don't get me wrong and accuse me of racism. I refer not to epidermis or mane, but to the economic colour of money. Some of his greatest contributions to the economy of India are his brilliant pioneering initiatives for changing the colour of money from black to white. And this passion has never left him.
 Many of us have forgotten the Voluntary Disclosure of Income Scheme (VDIS) 1997, which he announced when he was Finance Minister with the United Front government, granting income-tax defaulters indefinite immunity from prosecution under the Foreign Exchange Regulation Act, 1973, Income Tax Act, 1961, Wealth Tax Act, 1957, and Companies Act, 1956, in exchange of self-valuation and disclosure of income and assets.
 The scheme was brilliantly conceived. While all schemes in the past valued declared assets at current prices, VDIS 1997 brought in an arbitrary date of 1 April 1987. Gold and silver hoarders, and large property holders got an exceptional bonanza on this valuation system. Further, proof of purchase was not insisted upon, which gave complete freedom to the confessors to fudge any date they wanted to their own financial advantage and further plunder of the country.
 So, even if gold was bought after 1987, it could be shown as having been bought before 1987, and it was a win-win game for all stakeholders to rake in the cuts. The Comptroller and Auditor General of India condemned the scheme in his report as abusive and a fraud on the genuine taxpayers of the country. But the issue was forgotten, and the illustrious career of Palaniappan Chidambaram rose to greater heights in the UPA regime.
 Those were his innocent days. What a long way he has come since the era when he was cooking up VDISs, so utterly transparent, that the loopholes and avenues to give relief to the looters stared you in the face. The world economy was also then a little simpler than it is today, and his best achievement was getting caught about his investments in Fairgrowth, which was involved in the Securities Scam of 1992.
 Chidambaram had to resign for this utterly transparent investment in a company whose scam would have paid rich dividends. Unfortunately, he was not Finance Minister at the time and did not have the machinery to hush things up, and could only remotely control the markets, unlike his present capabilities as former Finance Minister and thereafter.
 Being Finance Minister in the UPA government was his finest hour. He could fiddle around with share markets, capital markets, banks, financial instruments, such as, securities, participatory notes, tax treaties, not to speak of spectrum sale, and use his extraordinary innovative powers of black money magic to plunder our country with complete impunity.
 He assiduously cultivated the media with his clipped English accent (that led him down, now and then), occasional freebies, and sustained shadows of the Enforcement Directorate that he commanded.
 Chidambaram cannot get black money out of his blood. Dr Subramanian Swamy has clearly stated in his website, "I now have further information from my usually reliable sources in the Union Government that the tapping of Finance Minister Mr. Pranab Mukherjee and his close associate in the Ministry, enabled Mr. Robert Vadra the son-in-law of Ms. Sonia Gandhi and Mr. Karthik, son of Mr. P. Chidambaram, to use the data thereby collected to manipulate and rig the Mumbai stock market. Earlier these data were directly provided by the then Finance Minister Mr. Chidambaram. I demand that the SEBI be asked by PM to initiate 'Insider Trading' investigation and prosecution of Mr. Vadra and Mr. Karthik."
 If what is put out by Dr Subramanian Swamy is false why doesn't Chidambaram sue him?
 
The dark clouds of the 2G scam and the repeated evidence being given by A. Raja and other accused of his tacit involvement and other acts of omission and commission are menacingly closing in on Chidambaram. He is losing his cool, and more importantly, losing his carefully clipped English accent to its more indigenous roots more often.
 And like his colleague Digvijay Singh, his mind seems to be disintegrating to a stage where he has started talking gibberish. Take this, for example: in reply to the BJP demand for his resignation for his involvement in the 2G scam, Chidambaram claims that the BJP is targeting him since he initiated a probe by the NIA into Hindu terror. Can any rational person see the connection between the two?
 Take also his comments regarding the recent Mumbai blasts. As Home Minister, instead of taking stock of the situation, and providing leadership, the only intelligent thing he could think of saying was, "No intelligence is not intelligence failure." Even a college debating society expects better logic. It's something like saying "illness is not a failure of health" or "impotence is not a failure of potency".
 Chidambaram's special financial skills have diversified into electoral politics also. He has the distinction of having been declared defeated in the last Lok Sabha election, after which he galvanized his special skills and local machinery, in particular, a data entry operator, and doctored a marginal victory on the recount. That is quite a record for fraud. And can one forget how the Indian Bank was cleaned up and left with only non-performing assets thanks to him and his Tamil Maanila buddies?
 Chidambaram's record as Home Minister has been disastrous. Neither has he made any impact on internal security, with the worst massacres of his own paramilitary forces taking place in his time, nor on terrorism, which carries on in complete complacency because there are neither effective preventive or punitive systems in place, nor political will and national legislation to combat terrorism. It is on record and in the public domain that the Home Ministry gave incorrect names of India's most wanted list of terrorists allegedly hiding in Pakistan, some of whom were tracked living in India or in custody. Is this a testament to his fabled efficiency and commitment?
 What a laughing stock we must be before the world. It is almost as if India is determined that it shall not combat terrorism, shall not have enabling legislation as enacted by the US, such as the Homeland Security Act 2002, and the Prevention of Terrorism Act 2005 of UK and similar legislations in European governments. India is determined not to have an effective national agency on the lines of the Homeland Security Department of the US.
 The ramshackle National Investigation Agency showed itself as a complete failure during the recent Mumbai attacks. Understandable, because its only mandate appears to be to investigate "Hindu terror", the last refuge for failed and hopeless Congressmen like Chidambaram. The CCTNS, JIC, ARC, NTRO (presently in another scam), and NCTC remain effete, scattered and unmonitorable, even by the Home Ministry. With such an unequivocal determination by the UPA government not to address terrorism effectively, I can only grieve for my country.

Monday, August 8, 2011

तुम्ही 'दिव्य मराठी'ला भेट दिली का ?

नमस्कार,
 
इंटरनेटविश्वात तुम्ही आम्ही आपण सगळेच रोज वेगवेगळ्या वेबसाईट्सना भेट देतो. त्यातील काही वेबसाईट्सनी आपल्या मनाचा एक कोपरा कायमचा व्यापून टाकलेला असतो. घाईगडबडीतून आणि रोजच्या धावपळीतून वेळ काढून त्या वेबसाईटला आपण न चुकता रोज भेट देतोच. तिथल्या शब्दांवर आपला विश्वास बसलेला असतो. अगदी हक्कांनी तिथे आपले मत मांडत असतो.  अशीच एक वेबसाईट गेल्या काही महिन्यांपासून मराठी ऑनलाईन वाचकांसाठी सज्ज झालीये.

दैनिक भास्कर समुहातील 'दिव्य मराठी' ही मराठी साईट वैविध्यपूर्ण दालनांसह वाचकांच्या सेवेत दाखल झालीये. २४ x ७ अपडेट राहणारी ही साईट महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि छायाचित्रे निःपक्षपातीपणे वाचकांपर्यंत पोचवत आहे. आजूबाजूला क्षणाक्षणाला घडणाऱया घडामोडींबद्दल अपडेट राहण्यासाठी दिव्य मराठीच्या वेबसाईटला रोज भेट दिलीच पाहिजे आणि हक्काने आपले मतही मांडले पाहिजे. सोबत आपल्या साईटचा पत्ता दिला आहेच.
 
आता आम्ही वाट पाहतोय तुमच्या व्हिजिटची आणि प्रतिक्रियांची...

www.divyamarathi.in

Sunday, August 7, 2011

मला छळणारे प्रश्न ? तुम्हालाही छळतात का ?

आपला देश सेकुलर आहे. सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. अर्थात धर्मावरून भेदभाव होऊ नये, असा विचार यामागे असावा. मी गेल्या ८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे.

Friday, August 5, 2011

धक्कादायक मेलचा धुमाकूळ : सत्य काय आहे ?

'काळा पैसा' हा विषय भारतामध्ये खूपच संवेदनशील झाला आहे. भारताचे संपूर्ण राजकारण प्रभावित केलेला हा विषय एक रहस्य बनले आहे. राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यापासून ते अनेकांची नावे वेळोवेळी काळ्या पैशाशी जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु कोणाकडेच ठोस पुरावे नसल्यामुळे उघडपणे नाव घेण्याचे धाडस कुणीच करताना दिसत नाही. परंतु अलीकडे ज्युलिअन असांजे या धाडसी पत्रकारामुळे स्विस बँकेत पैसा ठेवणार्यांची नावे उघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सध्या इंटरनेटवर एका माहितीने धुमाकूळ घातला आहे. ही माहिती स्विस बँकेत कोणाकोणाची खाती आहेत आणि त्यात किती पैसा आहे याचे विवरण आहे. ही माहिती आतापर्यंत कोणत्याच वृत्तपत्राने छापण्याचे धाडस केलेले नाही; कदाचित या यादीत असलेली मोठी नावे किंवा या माहितीची विश्वासार्हता याबद्दल असलेली शंका यामुळे हि माहिती कोणीच प्रसिद्ध करायला तयार नाही. परंतु केरळातून चालविले जाणारे एक लोकप्रिय वेबसाईट यासाठी पुढे आले आहे. त्यांनी इंटरनेटवर विविध ग्रुपमध्ये फिरत असलेली हि माहिती आपल्या साईटवर प्रसिद्ध केली आहे. http://www.haindavakeralam.com/HKPage.aspx?PageID=14443&SKIN=B
हि माहित खरी कि खोटी...?
खोटी असल्यास ती कोठून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली याचा शोध सरकारी यंत्रणांनी घेतला पाहिजे. आणि भारतीय नेत्यांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

माहिती खरी असेल तर सबळ पुरावे गोळा करून या नेत्यांना गजा आड केले पाहिजे. आता सर्वोच्च न्यायालयाने काळा पैसा शोधण्याकामी पुढाकार घेतल्याने आशेचा एक किरण निर्माण झाला आहे. इंटरनेट वर धुमाकूळ घालत असलेल्या माहितीचा खरे खोटेपणा तपासण्यासाठी तपास यंत्रणांना
सर्वोच्च न्यायालयाची चमू आदेश देईल किंवा नाही याबद्दल सध्या तरी काहीच सांगता येत नाही.
अधिकृतपणे नावे उघड होईपर्यंत रामदेव बाबा यांच्या आंदोलनाला सदिच्छा देणे एवढेच आपल्या हातात आहे. नाही का ?

संबधित लेख वाचा ...
स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी

Thursday, August 4, 2011

विचार भारताचा... भ्रष्टाचाराला जबाबदार कोण ? कोण थोपवेल हा भ्रष्टाचार ?

गेल्या वर्षभरात सर्व भारतीय एकाच मुद्दयावर एकवटलेले दिसले, तो मुद्दा म्हणजे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार रोखणे. असे असले तरी भ्रष्टाचाराला जबाबदार कोण या प्रश्नाचे उत्तर मात्र अध्यापही धूसर आहे. अस्पष्ट आहे. तसे पाहिले तर राजकारणी आणि नोकरशहांवर खापर फोडून स्वत:ला मोकळे करणे तसे सोपे आहे. परंतु आपले काम करून घेण्यासाठी लाच देणे ही बाबसुद्धा गंभीरच नाही काय ?

आपण नेहमी ऐकतो की सरकारी खजिन्याला गळती लागली आहे आणि सर्वसामान्यांनी कररूपाने जमा केलेला पैसा टू जी, राष्ट्रकुल घोटाळा आदीतून लुटला जात आहे. एखादा मनुष्य वाहतूक पोलिसाकडे एक हजाराचा दंड भरण्याऐवजी शंभर रुपयाची लाच देतो, एखादा रेल्वे प्रवासी आपली जागा आरक्षित करण्यासाठी तिकिट तपातणीसाला लाच देतो, काही पालक मुलाला अभियांत्रिकी, मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविण्यासाठी डोनेशन भरतात. या सा-या गोष्टी भ्रष्टाचारात मोडत नाहीत की काय ? कदाचित या भ्रष्टाचाराची चर्चा होत नसेल, हा भ्रष्टाचार कमी रकमेचा असेल, परंतु यामागची भावना स्वार्थाचीच असते ना ?
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...

Wednesday, August 3, 2011

हिंदूंच्या जीवावर उठलेले "सांप्रदायिक हिंसाविरोधी विधेयक"

हेमंत पारसनीस
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल. या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्याकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल. दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.

सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय सल्लागार समितीने "धार्मिक व लक्ष्यित हिंसा प्रतिबंधक विधेयक 2011' (प्रिव्हेन्शन ऑफ कम्युनल अँड टार्गेटेड व्हायोलन्स (ऍक्सेस टू जस्टिस अँड रिपेरेशन) बिल 2011) या नावे एका नव्या कायद्याचा मसुदा तयार केला असून तो लोकांचे मत अजमावण्याकरिता buc.in/communal/com_bill.htm या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर लोकांची मते जाणून घेण्याची वेळ 10 जून 2011 ला संपली. आता आगामी संसदेच्या अधिवेशनात हा कायदा संमत करून घेण्यासाठी मांडला जाईल अशी शक्यता आहे. हा कायदा म्हणजे अल्पसंख्यांकांनी बहुसंख्यांकांना वेठीला धरण्यास दिलेली घटनात्मक मान्यता असून हा कायदा पारित झाला तर अल्पसं"याकांच्या मर्जीवर बहुसंख्यांकांना जगणे भाग पडेल व हे बहुसंख्यांक म्हणजे केवळ हिंदू. कारण स्वतंत्र भारतात ज्या काश्मीरच्या खोऱ्यात हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार झाले तिथे हा कायदा लागू नाही व पूर्वोत्तर राज्यात जिथे हिंदू अल्पसंख्य आहेत तिथेही हा हिंदूंनाच लागू कारण देशभरात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून.
या कायद्यात काय आहे?

गुन्ह्याला जात नसते, धर्म नसतो असे म्हणण्याची प्रथा आहे व कायद्यापुढे सर्व समान हे आपल्या घटनेचे तत्त्व आहे, असे आपण सांगत असतो. या दोन्ही तत्त्वांना या कायद्याने हरताळ फासला जाणार असून केवळ बहुसंख्यांक समाजाने केलेल्या गुन्ह्याचीच हा कायदा दखल घेणार आहे. म्हणजे खून, बलात्कार, मालमत्तेचे नुकसान, धार्मिक द्वेष पसरवणे, आर्थिक बहिष्कार इ. गुन्हे हे अल्पसंख्याकांनी केले तर ते या कायद्याच्या कक्षेत येणार नाहीत, परंतु एखाद्या बहुसंख्यांक व्यक्तीवर किंवा गट, संस्थेवर असे गुन्हे केल्याचा आरोप जरी केला तरी त्यावर कारवाई करणे भाग आहे. त्यातील आरोपींना जामीन मिळू शकणार नाही, त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते. या आरोपात तथ्य नाही, असे पोलिसांना वाटले तरी त्याचा उपयोग नाही, कारण जर त्यांनी तक्रारीवर कारवाई केली नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.
घटनाबाह्य प्रक्रिया
अण्णा हजारे आदींनी लोकपाल विधेयकाचा मसुदा तयार केल्यानंतर असा मसुदा तयार करणारे हे कोण? त्यांना लोकांनी निवडून दिले आहे काय? असा प्रश्न विचारला गेला. राष्ट्रीय सल्लागार समितीचे घटनात्मक स्थान काय? त्यांना असा मसुदा तयार करण्याचा अधिकार काय? हा मसुदा ज्यांनी तयार केला त्यांना लोकांनी निवडून दिले आहे काय? त्याचबरोबर लोकपालासार"या संसदेला जबाबदार नसणाऱ्या संस्थेच्या हाती नियंत्रणाची सूत्रे कशी सोपवणार? असा प्रश्न विचारला जात आहे. या कायद्यात मात्र या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी जे राष्ट्रीय प्राधिकरण करण्यात येईल त्यातील सातापैकी चार अल्पसंख्यांक असतील व अध्यक्ष व उपाध्यक्ष हे अल्पसंख्यांकच असतील. चौकशी, खटला भरणे, ते चालवणे, झडती घेणे, अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवणे असे व्यापक अधिकार दिले असून या कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली म्हणून त्याविरुद्ध किंवा सरकारविरुद्ध कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
या कायद्याचे नाव "सांप्रदायिक हिंसाविरोधी' असे असले तरी तो केवळ दंगलीच्यावेळी नाही तर सर्व काळ व सर्व स्थानी लागू असेल.
या कायद्यान्वये अत्याचार झाल्याची तक्रार करणारा फिर्यादी हा केवळ अल्पसंख्यांकच असेल व आरोपी हा बहुसंख्यांकच असेल.
दोन अल्पसंख्यांक समाजातील वाद, मारामारी, दंगली यांना हा कायदा लागू होणार नाही.
हा कायदा झाला तर त्या अंतर्गत पुढील विषयावर खोट्या तक्रारी टाकल्या जाऊ शकतात. धार्मिक द्वेष पसरवणे, अल्पसंख्यांकांचा सामाजिक व आर्थिक बहिष्कार, धार्मिक आधारावर अपमान करणे, घर भाड्याने अथवा विकत न देणे, नोकरी न देणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे, आरोय सेवा न पुरवणे, वाहनात न बसणे / किंवा न बसू देणे, दुकानातून माल न विकत घेणे किंवा देणे इ.
भारतीय राज्य घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे गदा येईल व बहुसंख्य समाज मोकळेपणाने आपले विचार मांडू शकणार नाही, किंवा कोणावर टीकादेखील करू शकणार नाही.
काही समाजातील लोकांची बहुसं"याकांविरुद्ध गुन्हे करण्याची हिंमत खूप वाढेल कारण या कायद्याअंतर्गत त्यांच्यावर तक्रारीच टाकता येणार नाहीत.
हिंदू संत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे हिंदू नेते - यांच्या कामावर प्रतिबंध येतील.
वैयक्तिक दुश्मनी व राजकीय सूड घेण्यासाठी या कायद्याचा वापर केला जाऊ शकतो.
वाड्या-वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीच्या व विविध प्रांतांच्या भारतीयांमध्ये तणावाचे व भयाचे वातावरण निर्माण होऊन त्यांचे जीवन फार कठीण होईल.
बहुसं"याकांकडून पैसे (ब्लॅकमेल करून) काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण होऊ शकतील.
आपण जन्माने हिंदू आहोत हाच आपला मोठा गुन्हा आहे अशी भावना हिंदूमध्ये निर्माण होऊन धर्मांतराचे प्रमाण वाढेल.
विरोध आवश्यक
या विधेयकाचा मसुदा वाचल्यानंतर असे लक्षात येते की हा तुघलकी कायदा म्हणजे मतपेढीचे राजकारण व अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाचे व लांगूलचालनाचे सर्वात घाणेरडे उदाहरण आहे. असे जुलमी कायदे फक्त पूर्वाश्रमीच्या दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया राजवटीत निग्रो विरुद्ध केले गेले होते.
या कायद्याचा मसुदा तयार करताना दहशतवादी व अन्य गंभीर गुन्हेगारी कायद्यातील कडक कलमे जशीच्या तशी उचलली आहेत. उदा. टाडा (जो या सरकारने रद्द केला), मोक्का, अमली पदार्थ विरोधी कायदा व अनलॉफूल ऍक्टिव्हिटीज (प्रिव्हेन्शन) ऍक्ट.
आता यावर एकच पर्याय शिल्लक आहे व तो म्हणजे जनआंदोलनाद्वारे लोकजागृती करून सरकारवर दबाव आणणे.
या कायद्यातील तरतुदी खालीलप्रमाणे आहेत.
या कायद्याअंतर्गत तीन महत्त्वाच्या व्याख्या केल्या आहेत.
1) गट(ग्रुप) म्हणजे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांक व अनुसूचित जाती जमाती.
2) व्हिक्टिम म्हणजे पीडित व्यक्ती जी कायद्याच्या दृष्टीने वरील समाजातील असेल.
3) साक्षीदार म्हणजे जिला झालेल्या घटनेचे ज्ञान आहे व खटला चालविण्याकरिता तिचा उपयोग होईल
.

या कायद्यांतर्गत येणारे काही गुन्हे
प्रकरण 1, कलम 3(एफ)- विशिष्ट समूहाविरुद्ध शत्रुत्वाचे / भीतीदायक वातावरण निर्माण करणे.
या अंतर्गत व्यवसायाचा बहिष्कार, जगण्यासाठी लागणारे पैसे कमवणे अशक्य करणे, भर लोकात अपमान करणे, काही मूलभूत सेवांपासून वंचित ठेवणे जसे की - शिक्षण, आरोग्य, घरे (निवास), दळणवळण (वाहतूक सेवा) व मौलीक (मूलभूत) अधिकार काढून घेणे इ.

प्रकरण 2, कलम 7 - लैंगिक अत्याचार - यामध्ये एका विशिष्ट समूहाविरुद्ध बलात्कार, सामूहिक बलात्कार, अनेकांवर बलात्कार, विनयभंग, कपडे काढून हिंडण्यासकट अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत.
प्रकरण 2, कलम 8 - एका विशिष्ट समूहाविरुद्ध वक्तव्यातून, लिखाण इत्यादीतून द्वेष पसरवणे
प्रकरण 2, कलम 9 - नियोजनबद्ध व लक्ष्यित हिंसाचार -
याचा अर्थ, एका किंवा अनेक व्यक्तींनी किंवा संघटनेनी एका विशिष्ट समूहाविरुद्ध केलेला नियोजनबद्ध लक्ष्यित हिंसाचार.
प्रकरण 2, कलम 10 - धार्मिक हिंसाचारासाठी आर्थिक, वस्तुरू पात किंवा अन्य मदत करणे.
प्रकरण 2, कलम 17 - गुन्हे करण्यासाठी चिथवणे किंवामदत करणे . प्रकरण 2, कलम 3 (जे) व शेड्युल 4 प्रमाणे मानसिक त्रास देणे किंवा मानसिक नुकसान करणे देखील गुन्हा आह
या विधेयकातील काही भयानक व एकतर्फी तरतूदी
प्रकरण 4, कलम 40 - अल्पसंख्यांक समाजातील पीडित /शोषित व्यक्तींची व अत्याचाराची माहिती देणाऱ्याची ओळख कायमस्वरूपी गुप्त ठेवण्यात यावी.
एखादे पत्र किंवा ई-मेलदेखील तक्रार म्हणून ग्राह्य धरले जाईल.
याचा अर्थ असा होतो का की, ज्या बहुसंख्य समाजाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे त्याला हे जाणून घ्यायचा सुद्धा हक्क नाही की त्याच्या विरुद्ध कोणी तक्रार केली आहे.
याचा अर्थ असाही होतो का की एखाद्या निनावी तक्रारीच्या आधारावर पोलीस बहुसं"य समाजाच्या व्यक्तीवर खटला दाखल करून त्याला अटक करतील.

प्रकरण 4, कलम 58 - या कायद्यांतर्गत येणारे सर्व गुन्हे हे दखलपात्र व अजामीनपात्र असतील.
याचा अर्थ असा की बहुसंख्यांकाविरुद्ध आलेल्या सर्व तक्रारींची पोलिसांना दखल घ्यावी लागेल व या कायद्यातील कुठल्याही गुन्ह्यासाठी अटक झाल्यास बहुसंख्य समाजाच्या आरोपीला जामीन मिळणार नाही.

प्रकरण 6, कलम 85 - नेहमीच्या कायदेशीर प्रक्रियेत 15 दिवसांच्यावर आरोपीला पोलीस कोठडीत ठेवता येत नाही. या कायद्याखाली अटक झालेल्या आरोपीला 30 दिवस पोलीस कोठडीत ठेवता येईल. तसेच 90 दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याची मुदत या कायद्यांतर्गत 180 दिवसापर्यंत नेऊ न ठेवण्यात आली आहे.
प्रकरण 6, कलम 74 - या कायद्यातील द्वेष पसरवणे व शत्रुत्वाचे वातावरण निर्माण करणे यातील विविध गुन्ह्यांतर्गत असे ग्राह्य धरले जाईल की आरोपींनी जाणूनबुजून हे गुन्हे अल्पसंख्यांकांविरुद्ध केले आहेत.
याचा अर्थ असा होतो का की आरोप लावला म्हणजे माणूस दोषी झाला व आरोपी स्वत:ची बाजूसुद्धा मांडू शकत नाही?
भारतीय न्यायव्यवस्थेप्रमाणे जरी आरोपीवर खटले चालू असले तरीही कोर्टातून दोषी सिद्ध होईपर्यंत त्याला निर्दोष मानले जाते. आपल्या राज्यघटनेतील व कायद्यातील या अतिशय महत्त्वाच्या तरतुदीला या कायद्यात केराच्या टोपलीत टाकले आहे का?

प्रकरण 9, कलम 138 - या कायद्यातील तरतुदी इतर कायद्यातील तरतुदींच्या अतिरिक्त असतील.
याचा अर्थ असा होतो का की एकाच गुन्ह्यासाठी आरोपीला दोन कायद्यांतर्गत दोनदा शिक्षा होऊ शकते?

प्रकरण 1, कलम 2 - या कायद्यांतर्गत अल्पसंख्यांकांविरुद्ध भारताबाहेर घडलेले गुन्हेदेखील भारतात घडले असे समजून कायदेशीर कारवाई केली जाईल.
प्रकरण 2, कलम 6 - अनसूचित जाती / अनुसूचित जमाती अत्याचार (अट्रॉसिटी) अधिनियम, 1989 व सांप्रदायिक आणि लक्ष्यित हिंसा अधिनियम हे दोन्ही कायदे अतिरीक्तरित्या लागू होतील.
याचा अर्थ असा का की, एकाच किंवा समान गुन्ह्यासाठी दोन्ही कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल?

प्रकरण 6, कलम 73 - कृत्याची प्रकृती आणि परिस्थिती वरून निष्कर्ष. याचा अर्थ असा की जेव्हा असा प्रश्न उद्‌भवेल की एखादा गुन्हा एका विशिष्ट समूहाच्या विरुद्ध मुद्दाम केला आहे का, तर असे गृहीत धरले जाईल की तो गुन्हा त्या आरोपीने हेतुपूर्वक केला आहे.
प्रकरण 6, कलम 82 - आरोपीवर खटला सुरू असताना, न्यायाधीश त्या आरोपीची मालमत्ता (प्रॉपर्टी) जप्त करण्याचे आदेश देऊ शकतील.
प्रकरण 6, कलम 83 - आरोपीचा दोष सिद्ध झाल्यानंतर, न्यायाधीश त्या आरोपीची मालमत्ता (प्रॉपर्टी) विकण्याचे आदेश देऊ शकतील.
प्रकरण 6, कलम 84 - तडीपारी - एखादी बहुसंख्य समाजाची व्यक्ती या कायद्यांतर्गत गुन्हा करू शकणार असेल तर त्याला त्याच्या भागातून तडीपार करण्यात येईल.
प्रकरण 6, कलम 64 - हया कायद्यांतर्गत सर्व साक्षी (जबाब) ह्या भारतीय दंड अधिनियम कलम 164 खाली मॅजिस्ट्रेटसमोरच नोंदवल्या जाऊ शकतील.
याचा अर्थ असा का की, एकदा साक्ष (जबाब) दिल्यानंतर कोणीही आपले वक्तव्य मागे घेऊ शकणार नाही किंवा असेही म्हणू शकणार नाही की मी कुठल्यातरी दबावाखाली स्टेटमेंट दिले.
प्रकर 3, कलम 20 - भारताच्या कुठल्याही राज्यात जर मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार झाला तर भारतीय राज्य घटनेतील कलम 355 वापरू न केंद" सरकार त्या राज्याचे सरकार बरखास्त करू न राष्ट्रपती राजवट लादू शकेल.
या कलमाचा गैरवापर करू न विरोधी पक्षाचे राज्य असलेले सरकार बरखास्त केले जाऊ शकते.
या संकल्पित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक प्रचंड अधिकार असलेली घटनाबाह्य यंत्रणा तयार केली जाणार आहे.

प्रकरण 4, कलम 21 - वरील संकल्पित कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक राष्ट्रीय प्राधिकरण निर्माण केले जाईल. त्यातील 7 पैकी कमीत कमी 4 सदस्य अल्पसं"याक समाजाचे असतील व त्या प्राधिकरणाचा प्रमुख (चेअरमन) व उप प्रमुख (व्हाईस चेअरमन) हे देखील अल्पसंख्यांक समाजाचे असतील.
प्रकरण 5, कलम 44 - वरील कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक राज्याच्या स्तरावर राज्य प्राधिकरण देखील निर्माण केले जाईल.
प्रकरण 4, कलम 29 - वरील प्राधिकरणाच्या उपयुक्ततेसाठी कमीत कमी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस रॅंकचा अधिकारी दिला जाईल.
प्रकरण 4, कलम 33 नुसार राष्ट्रीय प्राधिकरणाचे काही अधिकार खालीलप्रमाणे :
अ)सिव्हिल कोर्टाचे अधिकार - चौकशी व अन्वेषण करण्यासाठी
ब)साक्षीदारांना नोटीसा पाठवून हजर करू न साक्षी नोंदवण्याचे अधिकार
क) केंद" सरकार, राज्य सरकार इ. कडून माहिती मागवणे
ड) पाहिजे त्या वास्तूमध्ये शिरणे, झडती घेणे
इ) मिडीयावर कंट्रोल ठेवणे
फ) तणावपूर्ण वातावरण असताना सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे इ.
प्रकरण 4, कलम 38 - भारतीय सैन्य दलातील (आर्म फोर्सेसच्या) अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रारी आल्यास राष्ट्रीय प्राधिकरण सरकारकडून रिपोर्ट मागवू शकेल.
प्रकरण 9, कलम 130 - चांगल्या हेतूने केलेल्या कारवाईसाठी संरक्षण

या कायद्यांतर्गत कारवाई केल्यामुळे राष्ट्रीय प्राधिकरणावर किंवा सरकारविरुद्ध कुठल्याही कोर्टात दावा, तक्रार इ. करता येणार नाही.
आरोपीवर जबरदस्तीने कारवाई करण्यास भाग पाडण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकणाऱ्या या कायद्यातील काही तरतुदी
प्रकरण 3, कलम 18 -प्रत्येक सरकारी नोकर ज्याच्याकडे कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असेल त्याने विशिष्ट समूहाविरुद्ध शत्रुत्वाचे वातावरण निर्माण होणार नाही किंवा अन्य कुठला हिंसाचार होणार नाही यासाठी सर्व पावले उचलावीत.
प्रकरण 2, कलम 12 - कुठल्याही सरकारी नोकराने विशिष्ट समूहाच्या व्यक्तीला शारीरिक अथवा मानसिक पीडा / यातना देऊ नये. तसे झाल्यास तो गुन्हा ठरेल.
प्रकरण 2, कलम 13 - सरकारी नोकरांनी कर्तव्य न बजावणे - सरकारी नोकरांनी पिडीतांना संरक्षण देणे, तक्रारी नोंदवणे, तक्रांरींची चौकशी करणे, वैद्यकीय परीक्षण करणे, इ. गोष्टी नाही केल्या तर ते गुन्हे ठरतील.
प्रकरण 2, कलम 15 - कनिष्ठांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला अथवा पदाधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल.
प्रकरण 2, कलम 16 - वरिष्ठांच्या आज्ञेनुसार जरी कृत्य केले तरीही कनिष्ठांना देखील जबाबदार धरले जाईल.
प्रकरण 6, कलम 76 - सरकारी नोकरांवर खटले चालवण्यासाठी जी सरकारची परवानगी घ्यावी लागते, ती या कायद्यांतर्गत काढून टाकण्यात आली आहे.
प्रकरण 9, कलम 132 - सरकारने या कायद्याच्या तरतुदीला टी.व्ही., रेडीओ, वर्तमानपत्रे इ. माध्यमातून जास्तीत जास्त प्रसिद्धी द्यावी व सरकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्याच्या अंमलबजावणीचे प्रशिक्षण द्यावे.
प्रकरण 7, कलम 112 - जातीय व लक्ष्यित हिंसा आणि पुनर्वसन निधी - राष्ट्रीय प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार सरकारला निधी उपलब्ध करू न द्यावा लागेल.
प्रकरण 7, कलम 102 - बळीला नुकसानभरपाईची सर्व रक्कम 30 दिवसात देण्यात यावी.
मानसिक त्रास होणे यासाठी देखील पिडीताला भरपाई मिळेल.
प्रकरण 7, कलम 110 - पीडिताला देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम दोषींकडून वसूल केली जाईल.
प्रकरण 7, कलम 112 (3) - दोषींवर शिक्षेपोटी लावण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमा वरील पुनर्वसन निधीमध्ये टाकण्यात येतील.
प्रकरण 7, कलम 90,92,93 - पुनर्वसन शिबीर - अशा शिबीरांमध्ये सर्व प्रकारच्या सवलती असतील जसे की 24 तास पोलीस संरक्षण, उत्कृष्ट जेवण, चांगले पिण्याचे पाणी, कपडालत्ता, वैद्यकीय सुविधा, संडास, बाथरूम, मानसिक सल्लागार, लहान मुलांसाठी पाळणाघर, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था इ.
प्रकरण 7, कलम 99 -पुनर्वसन -विस्थापितांची घरे बांधणे, नोकरी / व्यवसायाची सोय करणे, अन्य सोयीसुविधा पुरवणे, प्रार्थना स्थळ बांधून देणे इ.
प्रकरण 6, कलम 61 - कमीत कमी डेप्युटी सुप्रिटेंडेंन्ट ऑफ पोलीस रॅंकच्या अधिकाऱ्यांनी 7 दिवसाच्या आत पुनर्वसन शिबिराला भेट देऊन विस्थापितांची चौकशी करावी व तक्रारी नोंदवून घ्याव्या.
काही विशेष तरतुदी
प्रकरण 6, कलम 67 - या कायद्यांतर्गत गुन्हा ठरतील असे कुठलेही इ-मेल, एस.एम.एस., ऑडीओ, व्हिडीओ किंवा अन्य संदेशाला सरकार जप्त करू शकेल व पुढे प्रसारण होण्यापासून रोखू शकेल.
प्रकरण 6, कलम 78 - विशेष सरकारी वकील - आरोपीवर खटले चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमले जातील, ज्यातील कमीत कमी एक तृतीयांश अल्पसं"याक समाजाचे असतील. प्रकरण 5, कलम 56 - मानव अधिकार प्रतिरक्षक - प्रत्येक जिल्ह्यामध्ये गरज लागेल तितके मानव अधिकार प्रतिरक्षक नेमले जातील, बळीला त्याचे भारतीय घटनेतील सर्व अधिकार मिळवून देणे हे त्यांचे काम असेल. प्रकरण 6, कलम 79 - विशेष न्यायाधीशांची नियुक्ती - या कायद्यातील गुन्ह्यांचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायाधीशांची नियुक्ती केली जाईल, ज्यांना तक्रार न येता सुद्धा गुन्ह्याची दखल घ्यावी लागेल. प्रकरण 6, कलम 72 - या कायद्यांतर्गत नियोजनबद्ध व लक्ष्यित हिंसेच्या गुन्ह्यांसाठी पोलीसांव्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या नायाधीशातर्फे चौकशी केली जाईल. शोषिताला सर्व संरक्षण, मात्र आरोपीच्या मानवाधिकारांचा विचारही नाही
प्रकरण 6, कलम 86 - प्रत्येक बळीला विनामूल्य कायदेशीर मदत मिळेल व तो पॅनेलवर उपलब्ध असलेल्यांपैकी वकीलाची निवड करू न त्याच्या सेवेचा लाभ घेऊ शकेल. प्रकरण 6, कलम 69 - सुप्रिटेन्डेन्ट ऑफ पोलीस रॅंकच्या अधिकाऱ्यांना, प"त्येक बळीला वेळोवेळी खटल्याची माहिती द्यावी लागेल जसे की आरोपीला अटक झाली आहे का, आरोपपत्र दाखल झाले आहे का, दोष सिद्ध झाले आहेत का इ.
प्रकरण 6, कलम 59 - जी माहिती नोंदवली जाईल ती पोलिसांनी बळीला 7 दिवसांच्या आत त्याला समजेल त्या भाषेत द्यावी. ई-मेल व फॅक्स वर आलेली माहिती देखील नोंदवून घ्यावी लागेल. प्रकरण 6 , कलम 70 - जर बळीला असे वाटले की त्याला पोलिसांकडून न्याय मिळत नाही तर तो तशी तक्रार राष्ट्रीय किंवा राज्य प्राधिकरणाकडे करू शकेल. प्रकरण 6, कलम 71 - तत्स्वरू पी राष्ट्रीय किंवा राज्य प्राधिकरण पुनश्च चौकशीसाठी आदेश देऊ शकेल.
प्रकरण 6, कलम 62 - गुन्ह्याची चौकशी व अन्वेषण हे कमीत कमी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्यानी करावे लागेल.
प्रकरण 6, कलम 66 - पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडीयोग्राफी व फोटोग्रफीचा वापर करण्यात यावा.
या संकल्पित कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षा व दंड
या संकल्पित कायद्यांतर्गत दिल्या जाणाऱ्या कठोर शिक्षा व दंड
प्रकरण 8, कलम 114 - लैंगिक अत्याचारासाठी शिक्षा - कमीत कमी 10, 12, 14 वर्षे ते आजीवन कारावास - सर्व सक्तमजुरी व आरोपीला दंड
प्रकरण 8, कलम 115 - द्वेष पसरवणे - 3 वर्षे कारावास व दंड. प्रकरण 8, कलम 116 - नियोजनबद्ध लक्ष्यित हिंसा - आजीवन कारावास (सक्तमजुरी) व दंड
प्रकरण 8, कलम 117 - गुन्हे करण्यासाठी आर्थिक व इतर साह्य - 3 वर्षे कारावास व दंड
प्रकरण 8, कलम 119 - यातना / पीडा / दु:ख देणे - कमीत कमी 7 वर्षे कारावास (सक्तमजुरी) व दंड
प्रकरण 8, कलम 120 - सरकारी नोकराने आपले कर्तव्य न बजावणे - 2 ते 5 वर्षे कारावास व दंड
प्रकरण 8, कलम 123 - जो कोणी गुन्हा करण्याचा प"यत्न करेल त्याला प"त्यक्ष गुन्हा झाल्याची शिक्षा दिली जाईल
प्रकरण 8, कलम 124 - गुन्हा करण्यासाठी चिथावणे - यासाठी प"त्यक्ष गुन्हा करणाऱ्याचीच शिक्षा दिली जाईल.
या कायद्यात असे म्हटले आहे की भरपाई / नुकसान भरपाई सर्व भारतीयांना मिळेल. पण इथे असा प्रश्न उद्‌भवतो की या कायद्यांतर्गत जर बळी हा जर फक्त अल्पसं"याकच असेल तर मग बहुसंख्य समाजाला काही बाबतीत भरपाई / नुकसान भरपाई कशी मिळेल ?

शेडयुल 4 नुसार पीडीताला नुकसान भरपाई
अ) मृत्यू - कमीत कमी रुपये 15 लाख भरपाई ब) अपंगत्व - रुपये 3 ते 5 लाख भरपाई. क) एखाद्याच्या घरात किंवा जमिनीत त्याच्या इच्छेविरुद्ध शिरणे - रुपये 2 लाख भरपाई. ड) अपहरण - रुपये 2 लाख भरपाई. इ) बलात्कार - कमीत कमी रुपये 5 लाख भरपाई. फ) इतर लैंगिक अत्याचार - कमीत कमी रुपये 4 लाख भरपाई.
ग) मानसिक त्रास - रुपये 3 लाख भरपाई. ह) संपत्तीचे नुकसान - नुकसान भरपाईची रक्कम त्या संपत्तीचे नुकसान झाल्याच्या वेळी असलेल्या किंमतीएवढी असेल.

भारतीयांच्या आलेल्या प्रतिक्रियांच्या आधारावर राष्ट्रीय सल्लागार परिषदेने 49 कलमांमध्ये बदल केले आहेत व ते दि. 22 जून 2011 रोजी आपल्या संकेत स्थळावर टाकले आहेत.
जरी त्यांना बदल म्हटले आहे तरी त्यात काही नवीन कलमे / मुद्दे देखील टाकले आहेत. काही कलमे जास्ती कडक केली आहेत. तर थोडीच कलम शिथील केली आहेत. पण मसुद्याचा मूळ कणा आहे तितकाच पक्षपाती व बहुसंख्यांकांविरुद्ध ठेवला आहे. आधीची कलमे व 49 बदलांसकट हा मसुदा आता ऍडीशनल सॉलिसिटर जनरलकडे त्यांच्या प्रतिक्रियांसाठी पाठविण्यात आला आहे.
1 ऑगस्ट, 2011 रोजी सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे अधिनियम कायदा म्हणून संमत करण्यासाठी मांडले जाऊ शकते. शासनाच्या संकेत स्थळावर या अधिनियमाचा मसुदा हिंदी व इंग्रजीमध्येच उपलब्ध असल्यामुळे सरकारला त्याचे भाषांतर अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करायची विनंती करू न त्यावर प्रतिक्रिया पाठवयाची मुदत (जी 10 जून 2011 पर्यंत होती) वाढवून मागणे गरजेचे आहे.


भारतसरकारला ई-मेल पाठवायचा पत्ता खालील प्रमाणे आहे.
E-mail ID : wgcvb@nac.nic.in
भारत सरकारला पत्र पाठवायचा पत्ता खालीलप"माणे आहे.
सेक्रेटरी, नॅशनल ऍडवायजरी कौन्सिल, मोतीलाल नेहरू प्लेस, अकबर रोड,
नवी दिल्ली - 110011.


Monday, August 1, 2011

मार्क्सवाद्यांची अवस्था संग्रहालयातील वस्तूंसारखी

दि. 30 जुलैच्या न्यू इंडियन एक्सप्रेसच्या संपादकीय पानावर भारतीय विचार केंद्रम आणि विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय परमेश्वरनजी यांचा लेख प्रकाशित झाला आहे. मार्क्सवाद्यांची अवस्था आता संग्रहालयातील वस्तुंसारखी या मथळ्याखाली हा लेख प्रकाशित झाला आहे. मराठी वाचकांच्या सोयीसाठी या लेखातील मुख्य बिंदू येथे मांडत आहे. संपूर्ण लेख इंग्रजीतूनही येथे दिला आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी