Saturday, November 24, 2012

योद्धा सम्राटासारखेच जगले बाळासाहेब

$img_titleएका व्यंग्यचित्रकारापासून हिंदुहृदयसम्राटापर्यंतचा प्रवास गाठणार्‍या बाळासाहेब ठाकरेंनी आठवणींचा अनंत ठेवा मागे ठेवला आहे. या आठवणी स्वतःच वैशिष्ट्यपूर्ण ठरतील, यात शंकाच नसावी.

हिन्दुत्व जीता सेकुलरवाद हारा

 

Wednesday, November 21, 2012

"कसाब' निर्मिती कारखान्याचे काय ? ? ?


कसाबला शिक्षा म्हणजे दरोडेखोराच्या पोराला शिक्षा. खरा सूत्रधार तर पाकिस्तान आहे. कसाबला तयार करून, प्रशिक्षित करून आमच्या घरात अराजक माजविण्यासाठी धाडणारा दहशतवादी राक्षस तर पाकिस्तानच आहे. अर्थात कसाबला फासावर लटकवले ते योग्यच...

Tuesday, November 20, 2012

कोण आहेत एस. गुरुमूर्ती ?

S Gurumurthy

Next
Shobha Warrier
After charges against Bharatiya Janata Party President Nitin Gadkari were splashed by the TV channels, one person who was seen most on TV was Chartered Accountant S Gurumurthy. He was seen coming out of senior BJP leader L K Advani's house and was seen meeting other top BJP leaders. He was also seen outside Nitin Gadkari's house.

Sunday, November 18, 2012

हिंदुहितावर गझनीसारखे आघात


हैदराबादचे प्राचीन आणि मूळ नाव भाग्यनगर होते. मुस्लिम आक्रमणानंतर त्या शहराचे नाव बदलून हैदराबाद ठेवण्यात आले. तेथे चारमिनारच्या शेजारी एक छोटेसे मंदिर असून, त्याला भाग्यलक्ष्मी मंदिर असे संबोधले जाते. या शहराच्या प्राचीन नावाच्या आधारे मंदिरात स्थापन करण्यात आलेल्या देवीला भाग्यलक्ष्मी म्हटले जाते. तथापि, फुटपाथवर स्थापन करण्यात येणार्या छोट्याशा मंदिरासारख्या देवालयाला भाग्यलक्ष्मीसारखे भारदस्त नाव देणे, हे हिंदूंच्या संकुचित होण्याचे आणि आकुंचन पावण्याचेच उदाहरण ठरावे.

सिंहस्त...

आम्हा घरी धन शब्दचीच रत्ने... हे खरे असले, तरीही काही व्यक्तींना शब्दांच्या रत्नांमध्येही तोलता येत नाही. संपादकीय नि:शब्द होतात असे त्यांचे कर्तृत्व असते. शब्दांच्या चिमटीत त्यांना पकडता येत नाही. आधुनिक संगणक प्रणालीत अक्षरे आणि मधली मोकळी ‘स्पेस’ यांचे ‘कॅरेक्टर’ होते. असे कितीही कॅरेक्टर खर्च केले तरी त्यांच्या जगण्याची मूल्यं तोलता येत नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांना अशा कुठल्याच उत्कट शब्दांमध्ये बांधता येत नाही. कितीही अन् काय-काय सांगून झालं तरीही बरंच काही उरतंच... ते एका भारलेल्या, सामाजिक कळवळ्यानं पेटलेल्या सुसंस्कारित कलंदर कलावंताचे जगणे होते. कलावंतांच्या पंखांनी आभाळही झाकता येते अन् मग प्रतिज्ञा पूर्णत्वास जाऊ शकली नाही म्हणून गलितगात्र झालेला एखादा पार्थ अग्निकाष्ठ भक्षण करायला निघाला असताना आपल्या पंखांनी सूर्य झाकोळून सांज उभी करत हा पूर्णपुरुष कलावंत निराश पार्थाला सांगतो, ‘‘हा सूर्य अन् हा जयद्रथ...!’’ बाळ केशव ठाकरे नामक कलावंताने विझलेल्या मराठी पार्थांना उपेक्षेने झाकोळलेल्या सांजेला आपल्या तेजस्वी कुंचल्याने सूर्य साकारून सांगितले, ‘‘हा सूर्य अन् तुम्हाला उपेक्षेने संपविणारे हे सारे जयद्रथ!’’

वाघ गेला!


हिंदुत्वाच्या विचारांची डरकाळी घुमविणारा वाघ आज आपल्यातून गेला आहे. झंझावात या शब्दाचे मूर्तिमंत रूप असलेला नेता, राजकारणाची दिशा बदलण्याचे सामर्थ्य असणारा लोकनेता, समाजजीवनावर आपल्या संघटनकौशल्याने दबदबा निर्माण करणारा संघटक, जनतेच्या मनातले विचार सडेतोड शब्दांत मांडणारा जनतेचा आवाज, समाजात चुकला की ठोकला, अशा शैलीत काढलेली व्यंग्यचित्रे म्हणजे रंगकुंचल्याचे फटकारे कसे असतात ते रूढ करणारा अलौकिक कलाकार, समाजातील दैन्य, देशद्रोही आणि समाजविरोधी तत्त्वांवर ठाकरी भाषेत प्रहार करणारा एक झुंझार पत्रकार, जनतेच्या वेदना शब्दांचे चाबूक फटकारत मांडणारा सव्यसाची संपादक आज हरपला आहे.

Saturday, November 10, 2012

वाचा विवेक विचार दिवाळी अंक

नमस्ते,
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मराठी मासिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...


आमिरखान सत्याच्या नावावर धंदा करत होता...


भाऊ तोरसेकर यांचा लेख 




   आमिरखान या लोकप्रिय अभिनेत्याने सहा महिन्यांपुर्वी प्रथमच छोट्या पडद्यावर आगमन केले. तसे त्याच्या आधी बहुतेक लोकप्रिय अभिनेत्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. पण आमिरखान आपल्या नेहमीच्या स्टाईलने वेगळेपणा दाखवण्यात चतूर आहे. तेव्हा त्याने नेहमीच्या कथाप्रधान मालिकेपेक्षा वेगळे रूप घेऊन पदार्पण केले. त्याने ‘सत्यमेव जयते’ नावाची एक मालिका स्वत:च निर्माण केली. त्यातून आजच्या भारतीय समाजाला भेडसावणार्‍या विविध समस्या लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मोठीच खळबळ माजली होती.

दलित मुस्लिम-दलित ख्रिश्‍चन?


रविवारचे भाष्य दि. जुलै २०१२ करिता
गेल्या आठवड्यात, दिल्लीहून प्रकाशित होणार्या ऑर्गनायझरया इंग्रजी साप्ताहिकात' Who is Secular? And what is Secular' या शीर्षकाचा माझा लेख प्रकाशित झाला होता. त्याची दखल सर्वत्र घेतली गेली याचा मला आनंद आहे. इंडियन एक्सप्रेसनेही आपल्या दि. जुलैच्या अंकात व्ह्यू फ्रॉम् राईटया स्तंभात पुरेशा विस्ताराने त्याचा सारांश प्रकाशित केला आहे. त्या लेखानंतर, मला अनेक ठिकाणांहून अभिनंदनाचे संदेशही आले. हिंदुस्थान टाईम्सया सुप्रसिद्ध इंग्रजी दैनिकाच्या एका वार्ताहराने मला एक दूरध्वनी करून, प्रश् विचारला की, ‘‘दलित ख्रिस्ती दलित मुस्लिम यांना आरक्षण देण्याला संघाचा विरोध आहे, असे बिहारचे मुख्य मंत्री नीतीशकुमार यांनी म्हटले आहे, आपले मत काय?’’ मी म्हणालो, ‘‘मी माझे वैयक्तिक मत देईन.’’ आणि त्यांनाच प्रश् केला की, ‘‘आपण ऑर्गनायझरमधील लेख वाचला आहे काय?’’ त्यांनी तो वाचलेला नव्हता. मग मी एवढेच म्हणालो की, ‘‘धर्माच्या आधारावर आरक्षणाला आपल्या संविधानाची मान्यता नाही आणि सर्वोच्च न्यायालयानेही तसाच निर्णय दिला आहे. आपण माझा लेख वाचा आणि मग प्रश् विचारा.’’ त्यानंतर त्यांचा पुन: दूरध्वनी आला नाही.

भाजपाची अ-स्वस्थता

-मा. गो. वैद्य
रविवारचे भाष्य दि. ११ नोव्हेंबर २०१२ करिता 
भाजपात अस्वस्थता आहे. भाजपावर टीका करण्यासाठी किंवा त्या पार्टीची निंदा करण्याकरिता मी हे म्हणत नाही. भाजपाचे स्वास्थ्य चांगले दिसत नाही, असे मला जाणवते. त्या पार्टीचे स्वास्थ्य चांगले रहावे, तीत एकजूट रहावी, तिच्या कार्यकर्त्यांनी आणि विशेषत: नेत्यांनी, आपल्याच पक्षाला कमजोर करू नये, या इच्छेने मी हे म्हणत आहे; आणि असे वाटणार्‍यांमध्ये मी एकटाच नाही. भाजपाविषयी सहानुभूती असणार्‍या, २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाने अग्रेसरत्व प्राप्त करावे अशी इच्छा असणार्‍या असंख्य लोकांना असे वाटते. विशेष म्हणजे असे वाटणार्‍यांमध्ये जे भाजपामध्ये सक्रिय आहेत, लहानमोठ्या पदांवर आहेत, त्यांनाही असे वाटते.

Friday, November 9, 2012

national हेराल्ड, सोनिया गांधी आणि ...

National Herald affair: It’s fraud all the way

08th November 2012 07:42 AM
The bare facts exposed by Dr Subramanian Swamy on the National Herald affair this month are eloquent, needing very little prose. The fraud is explicit without exposition. Here are the basic facts. Financial crisis forced Associated Journals Limited (AJL), the publishers of National Herald newspaper founded by Pandit Nehru, to close down the paper in 2008. To pay off the employees to help the closure, the Congress Party had given interest-free loan of Rs 90 crore plus to AJL, then. With the newspaper shut, AJL had become a mere real estate company in 2008, with property in Delhi, Lucknow and Mumbai worth over Rs 2,000 crore in its balance sheet. Against this, AJL owed just Rs 90-crore plus to the Congress. It had very little liability, besides. The balance real estate of AJL, left after paying off the dues to Congress, legally and morally belonged to AJL’s thousand plus shareholders. Big and small, they had contributed Rs 89 lakh to AJL’s capital, when the Rupee was hundred times more valuable. If AJL’s real estate had been sold and cash distributed to the shareholders,     Brahm Dev Narain, a teacher holding just 41 equity shares in AJL, would have got some Rs 84,000. Hundreds of others would have got similar sums.

मावळत्या दहशतवादाचे प्रतीक बनेल का मलाला?

मुजफ्फर हुसेन
मिहिलांच्या संदर्भात मुस्लिम देशांमध्ये अलीकडे कोणती ना कोणती घडामोड होतच असते. पाकिस्तान तर प्रारंभापासूनच या विषयात सर्वांच्या समोर आहे. मुख्तारन बी चे प्रकरण जेव्हा घडले, तेव्हा संपूर्ण जग स्तंभित झाले होते. एका कबिल्याने, एका महिलेवर आठ जणांनी बलात्कार करावा, असा फतवा काढला आणि त्या असहाय महिलेवर आठ जणांनी अत्याचार केला. पाकिस्तानात अजूनही कबिल्यांचे जागोजागी प्रस्थ असल्यामुळे, तेथे असे फतवे निघणे ही नित्याचीच बाब झाली आहे.

Tuesday, November 6, 2012

मोदी पंतप्रधान झाले तर...

भाऊ तोरसेकर  





   नुकतेच गेल्या रविवारी, विसनगर, गोविंदचकला पटेलवाडीमध्ये विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्या उपस्थितीत सक्रीय कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात वाघेला यांनी आपल्या भाषणात एक टिप्पणी केली. ’गुजरातमध्ये गेल्या २० वर्षांपासून कॉंग्रेस हरत आली आहे. अजून एखाद्या वेळी कॉंग्रेस हरेलही, पण जर का गुजरातमध्ये भाजप हरला तर नरेंद्रभाई मोदींचे काय होईल?’

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी