Saturday, December 31, 2011

आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ...

माझ्या हिंदुस्थाना ! तुला धोका आहे तो इथेच. पाश्चात्यांच्या अंधानुकारणाचा तुला एवढा मोठा शाप आहे की, एखादी गोष्ट चांगली की वाईट हे बुद्धीच्या, विवेकाच्या किंवा शास्त्राच्या सहाय्याने तू ठरवतच नाहीस. गोरी माणसे जे रीतीरिवाज पाळतात, ज्या कल्पना मनाशी बाळगतात, त्याच चांगल्या; त्यांना जे आवडत नाही ते ते सारे वाईट ! अरेरे, बुद्धीभ्रष्टतेचा, मूर्खपणाचा याहून कोणता पुरावा हवा ?
- स्वामी विवेकानंद 

आंग्ल नवीन वर्षाच्या शुभेच्छा; पण ... एका अटीवर. 
वक्तशीरपणा, शिस्त, अनुशासन, भान विसरून एखाद्या गोष्टीचे ज्ञान मिळविणे आदी पाश्चात्यांच्या चांगल्या गोष्टी सोडून

Tuesday, December 27, 2011

२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर

रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html

Sunday, December 25, 2011

कब दुनिया को हिन्दु करने घर घर मे नरसंहार किया

आजच्याच दिवशी सन १९२४ रोजी श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशाला कर्मभूमी बनविलेले वाजपेयी आज वृद्धापकाळामुळे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची मोहिनी देशवासीयांवर आजही पाहायला मिळते.

Tuesday, December 20, 2011

गीतेवरील बंदीमागे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च

नवी दिल्ली  - गीतेच्या 'महाभारता'वरून रशियामध्ये काम करणा-या भारत, बांगलादेश, नेपाळसह अनेक देशांतील हिंदू समुदायातील लोकांनी हिंदू कौन्सिलची स्थापना करून प्रस्तावित बंदीला विरोध केला आहे. साधुप्रिय दास यांची इस्कॉनच्या रशियन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपली संघटना मॉस्को येथील भारतीय दूतावासाशी व पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे, असे दास यांनी म्हटले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html

Sunday, December 18, 2011

मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर...

निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअ‍ॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअ‍ॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.

श्रीकृष्णावरही चालला होता मजेशीर खटला

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक देशभक्तांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवत गीतेवर बंदी आणण्याचा प्रयत्न रशियात सुरु आहे. २००७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने भगवत गीतेला भारताचे राष्ट्रीय धर्मशास्त्र घोषित करावे, असे म्हटले होते. http://divyamarathi.bhaskar.com//article/REL-bhagadgeeta-russia-ban-2650519.html
 

Saturday, December 17, 2011

या 3 गोष्टींमुळे चिदंबरम ठरतात राजापेक्षाही मोठे गुन्हेगार

नवी दिल्ली - गृहमंत्री पी. चिदंबरम हे 2 जी प्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यापेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत, असा आरोप या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी स्वामी यांनी तीन आरोपांचा आधार घेतला आहे.http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-swamy-to-testify-against-chidambaram-in-2g-case-today-2647784.html?HT1=

'लष्कर'ने वाहिली होती श्रद्धांजली

मुंबई - बहुचर्चित इशरत जहान चकमकप्रकरणी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) २० गुजरात पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांवारही गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Friday, December 16, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 4)

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.

... झलक पाहूनच अमेरिकेने घाबरून काढला होता पळ


१६ डिसेंबरला जगाच्या इतिहासात एक वेगळे महत्व आहे. ४० वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले होते. १९४७ साली ब्रिटिशांनी भारतवर्षाचे तुकडे करून पाकिस्तान जन्मास घातले. त्यापैकी पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखल्या जाणा-या पूर्व बंगाल प्रांताला  भारताने मुक्त केले होते. या युद्धात आणखी एका देशाने महत्वाची भूमिका बजावली होती, तो देश म्हणजे रशिया.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indo-pak-war-and-usa-us-2644811.html?HF=

केवळ ३००० बहादूर जवानांनी जिंकले होते पूर्व पाकिस्तान

1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यातून जगाच्या नकाशावर बांगला देश या नव्या देशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे. या युद्धाचे भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगाचा सार्वभौम सम्राट होण्याचे स्वप्न पाहणार्‍या सिकंदराचा सरसेनापती सेल्यूकसचा पराभव इ.स. पूर्व 303 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी केला होता. भारत खंडावर परकीयांनी केलेल्या आक्रमणाचा संपूर्ण बीमोड करणारा गेल्या अडीच हजार वर्षांतील हा पहिला विजय म्हणून नोंदवला गेला.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-india--bangladesh-divya-marathi-special-2644388.html?HT1=

Thursday, December 15, 2011

लोकपाल नको, जल्लाद हवा

औरंगाबाद - लोकपालप्रकरणी जंतर मंतरवर देशभक्तीची गाणी वाजवून काय होणार? 'भारतमाता की जय' याचा अर्थ भारतमातेवर हल्ला करणार्‍यांना जिवंत ठेवू नका. तुमचा तो लोकपाल हे सर्व करणार आहे काय? न्यायालयाने एका राष्ट्रद्रोह्यास फाशी ठोठावली. त्याला फाशी द्या. लोकपालापेक्षा देशाला एका जल्लादाची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तोफ डागली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख लिहितात, http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-bal-thakare-on-lokpal-and-afazal-guru-2641802.html?HT1=

Saturday, December 10, 2011

चाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण

धर्म डेस्क
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-
अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।
वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।
आचार्य चाणक्य सांगतात की, http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-secret-wife-economy-life-management-2629881.html 

Friday, December 9, 2011

पाकिस्तानींनाही आहे नरेंद्र मोदींचे आकर्षण

अहमदाबाद - चीन आणि गुजरात सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एशिया इंटर-डाय-एग्झिबिशनमध्येही नरेंद्र मोदींची लोकप्रियता दिसून आली.
येथे उपस्थित पाकिस्तानी उद्योगपतींमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत उभे राहून फोटो काढण्यासाठी चढाओढ दिसून आली. यावेळी मोदींनी आपल्या कोणत्याही चाहत्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी सर्वांना पर्सनल ऑटोग्राफ तर दिलेच, शिवाय त्यांच्यासोबत फोटोही काढून घेतले.

व्हिडीओत पाहा ऑटोग्राफसाठी चढाओढ http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-narendra-modi-pakistan-gujarat-ahamadabad-china-industrialists-2627477.html

सोनिया गांधी 'विषकन्या' - सुब्रमण्यम स्वामी

दिव्य मराठी वेब टीम - देशातील आजवरचा सर्वात मोठा घोटाळा असलेल्या २ जी प्रकरणी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची भूमिका बजावणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर त्यांच्या वाढदिवशी जहरी टिपण्णी केली आहे. 'विषकन्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या नसतात', या शब्दांत स्वामी यांनी ट्विट केले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-dr-2627188.html 

Thursday, December 8, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 गुरु गोविंदसिंहांनी आपल्या बांधवांसाठी अपरंपार सोसले
तसे सारे काही आपल्या हिंदू बांधवांसाठी सोसायची
तुमची तयारी असेल तरच तुम्ही हिंदू आहात.
हिंधू धर्मासाठी गुरु गोविंदसिंहांनी
रणभूमीवर स्वत:च्या रक्ताचे सिंचन केले.
त्यांच्या दोन पुत्रांनी रणांगणात बलिदान केले.
ज्यांच्याकरिता गुरूंनी

Wednesday, December 7, 2011

प्राण शक्ती, श्वास आणि प्राणायाम


प्राणायामाच्या नियमित अभ्यासाने श्वासावर नियंत्रण येते. प्राणशक्तीचे नियमन होते. श्वास आणि प्राण याविषयीची एक महत्वाची बातमी ...

Tuesday, December 6, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 2 )

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 माझे हे शब्द स्मरणात असू द्या :
'हिंदू' हा शब्द उच्चारताच
अपूर्व चैतन्याची लहर जर तुमच्यात सळसळून जात असेल
तर आणि तरच तुम्ही हिंदू आहात.

... रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही

मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''

सोनिया गांधी यांच्याबद्दल अक्षेपार्ह प्रसिद्ध झाल्यामुळे...


नवी दिल्ली - सोशल नेटवर्किंग साईट्सवर कॉंग्रेसची वक्रदृष्‍टी पडली आहे. या वेबसाईट्सवरुन प्रसारित होणा-या माहितीवर अंकूश आणण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न सुरु आहे. कॉंग्रेसच्या अध्‍यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍याबद्दल फेसबुक, ट्विटर, गुगल इत्‍यादी साईट्सवरुन आक्षेपार्ह माहिती प्रसारित होत आहे. त्‍यामुळे सरकारने अशा माहितीवर नजर ठेवण्‍याचा निर्णय घेतला आहे. 
... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप
स्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी
नागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे

Monday, December 5, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )


गांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस  म्हणतात, आज स्वामी विवेकानंद असते, तर मी त्यांची गुरुस्थानी स्थापना केली असती.  जवाहरलाल नेहरू म्हणतात की, विवेकानंद हे अध्यात्म आणि विज्ञान यांचा समन्वय करणारे महापुरुष होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्यापासून ते जमशेटजी टाटा यांच्यापर्यंत शेकडो महापुरुषांनी विवेकानंदांच्या जीवन व विचारातून प्रेरणा घेतली. योद्धा, संन्यासी आणि कोट्यवधी तरुणांचे स्फूर्तिस्थान म्हणजे स्वामी विवेकानंद.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सर्वच स्तरांतील लोकांचे जीवन गतिमान झाले आहे. जीवनात अचानक आलेल्या या गतीमुळे सर्वसामान्यांची स्थिती भांबावल्यासारखी झाली आहे. ज्ञानार्जन करू पाहणार्‍या तरुणांची स्थितीही याहून वेगळी नाही. अशा स्थितीत मनाला स्थैर्य देऊन आपल्या प्रगतीला सहाय्यक ठरणार्‍या विचारांची निकड आहे. अशावेळी ‘फोटोग्राफिक मेमरी’साठी प्रसिद्ध असलेल्या स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्या मदतीला धावून येतात. म्हणूनच  विवेकानंदांच्या शक्तीदायी विचारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करीत आहे. नोबेल परितोषिक विजेते आणि विख्यात विचारवंत गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात, ‘‘तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल, तर विवेकानंदांचा अभ्यास करा. त्यांच्यात सर्वच सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही.’’

सकारात्मक विचारांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. सकारात्मक विचारामुळे जीवनाचे नंदनवन होऊ शकते, परंतु केवळ सकारात्मक विचार उपयोगाचे नसून, माणसाला आपल्या ध्येयाची निश्‍चितीही करता आली पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात की, ‘‘एखादे ध्येय निश्‍चित केलेला मनुष्य शंभर चुका करीत असेल, तर ध्येय नसलेला मनुष्य दहा हजार चुका करतो.’’ तात्पर्य असे की, ध्येयामुळे आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो, परंतु असे असले, तरी ध्येयाची निवड देखील महत्त्वाची बाब असते.

स्वामी विवेकानंदांच्या जीवन वाङ्‌मयातून आपल्याला उच्च ध्येयमार्गासाठीची दिशा मिळते.स्वामी विवेकानंदांचे जीवन पाहा. गुरुदेव रामकृष्णांच्या प्रयाणानंतर स्वामीजींनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले आहे. भारत म्हणजे काही केवळ कागदावरचा नकाशा नाही. भारत म्हणजे भारतातले लोक. इथली गावं, इथल्या नद्या, पर्वत, इथे होऊन गेलेले ऋषीमुनी, इथले तत्त्वज्ञान आणि खूप काही... जोवर आपण खरा भारत समजून घेत नाही, तोवर तिच्याप्रती मनात भक्तीभाव निर्माण होणे कसे शक्य आहे? एखाद्या व्यक्तीप्रती प्रेम किंवा तिरस्कार तेव्हाच निर्माण होते, जेव्हा आपल्याला तिच्या गुण-दोषांची ओळख होते. देशाच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. आपण इतिहास वाचलेला असतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाने आपला ऊर अभिमानाने भरून येतो. हा अनुभव आपल्या सार्‍यांचाच आहे. म्हणूनच केवळ प्राचीन भारत ग्रंथातून अभ्यासून न थांबता स्वामी विवेकानंदांनी संपूर्ण वर्तमान भारत पायी फिरून अनुभवला.शेवटी स्वामीजी देशाच्या दक्षिण टोकाला- कन्याकुमारी येथे आले. तिथल्या श्रीपाद शिलेवर की, जिथे देवी पार्वतीने कैलासातल्या शिवशंकरासाठी एका पायावर तपश्‍चर्या केली होती, तिथे २५, २६ आणि २७ डिसेंबर १८९२ या तीन दिवस-रात्री त्यांनी ध्यान केलं.

हा पहिला सन्यासी होता की, ज्याने आपल्याला वैयक्तिक मोक्ष अथवा मुक्ती मिळावी म्हणून ध्यान साधना केली नाही. भारताला पुन्हा तिचं गतवैभव कसे मिळवता येईल हा त्यांच्या ध्यानाचा केंद्रबिंदू होता.एकेकाळी वैभवावर असलेल्या या देशाचे भग्नावशेष त्यांनी जागोजागी भ्रमणकाळात पाहिले होते. पाश्‍चात्य देशातील लोकांना जेव्हा कपडे घालण्याचीही बुद्धी नव्हती. तेव्हा या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती, हेही त्यांना माहीत होते, परंतु आज मात्र भारत गुलामीत होता. भारताचा स्वाभिमान ब्रिटिशांनी पायदळी तुडवला होता. दारिद्र्याने आणि लाचारीने कळस गाठला होता. जातीभेद स्पृशास्पृशतेसारख्या घातक रूढींनी उच्छाद मांडला होता.

अज्ञानाचा अंध:कार गडद झालेला होता. अशा स्थितीतून पुन्हा भारताचे उत्थान घडवून आणायचे तर काय करावे लागेल हा त्यांच्या ध्यानाचा विषय होता. अखेर एक शक्तिशाली विचार घेऊन स्वामीजी त्या शिलेवरून उठले. आपण आत्मविश्‍वास गमावलेला आहे, त्यामुळेच आजची अधोगती झाली. या देशाला पुन्हा आत्मविश्‍वास मिळवून देणे हे विवेकानंदांच्या जीवनाचे ध्येय बनले. जगावर राज्य करणार्‍या लोकांच्या देशात जाऊन आमच्या देशाचा तरुण विजय मिळवतो, ही घटना समस्त भारतीयांना आत्मविश्‍वास देणारी ठरली. यातूनच खर्‍या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाला बळ मिळाल्याचा इतिहास आहे.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना भारताकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहायची दृष्टी दिली.

स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती. त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्‍वास होता. भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील, असा त्यांना विश्‍वास होता. देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. संपूर्ण जगात सुख-शांती नांदण्यासाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन लाखमोलाचे ठरले होते. म्हणूनच तर सार्‍या जगासाठी असा काय संदेश स्वामीजींनी दिला होता, तेही समजून घेतले पाहिजे. अन्यथा मोठा गोंधळ होईल.

दोन वर्षांपूर्वी जपानचे पंतप्रधान भारतात आले होते. संसदेला संबोधित करताना पंतप्रधान ऍबे सिंझो म्हणाले की, जपान भारताचा ऋणी आहे. कारण जपानचे शिल्पकार तेनशिन ओकाकुरा यांनी स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. ते पुढे असे म्हणाले की, जगाचे नेतृत्व करण्यासाठी जपान आणि भारत या दोन्ही देशांनी पुढाकार घेतला पाहिजे.‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’ या विख्यात पुस्तकाचे लेखक आणि नामवंत इतिहासकार सॅम्युअल हंटिग्टन म्हणतात की, जगात तिसरे महायुद्ध झालेच तर ते एकांतिक विचारधारा मानणार्‍या धर्मीयांकडून होईल. माझाच धर्म खरा या दुराग्रहामुळे होईल. यातून वाचण्याचा एकच मार्ग असेल, तो म्हणजे भारतीय मार्ग अर्थात हिंदू विचारधारा. आकाशातून पडणारे पाणी शेवटी या ना त्या मार्गाने समुद्राला मिळते. त्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही ईश्‍वराची उपासना केली तरी ते अंती एकाच ईश्‍वराला पोचते, अशी भारतीय विचारधारा आहे. हाच हिंदू विचार अर्थात वेदांत हा भावी जगाचा मार्ग असणार आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. हाच विचार आहे की, जो जगात शांती आणू शकतो, परंतु यासाठी हा विचार सांगणारा देश दुर्बल असून, चालणार नाही.

भारताने गेल्या दहा हजार वर्षांत कोणत्याही देशावर आक्रमण केले नाही. कारण दुसर्‍यांना पायदळी तुडविणे हा भारताचा स्वभाव नाही, परंतु जगाला शांतीचा आणि शाश्‍वत मार्ग दाखवायचा असेल, तर भारताने बलशाली झालेच पाहिजे. त्याला पर्याय नाही. भारताला बलशाली करण्याच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलणे हेच आपल्यासमोरचे सर्वोच्च ध्येय असू शकते. तुम्ही विद्यार्थी असा की, शिक्षक, शिपाई असा की, अधिकारी, शेतकरी असा की, सौनिक तुम्ही कोणीही असा, आपले सर्वोच्च ध्येय भारत पुनरुत्थानाच्या कार्यात योगदान देणे हेच असू द्या. स्वामी विवेकानंदांच्या शब्दांत सांगायचे तर आगामी काळात हे राष्ट्र हेच तुमचे दैवत असू द्या. एकदा ध्येय ठरले की, कार्य करण्याची दिशा आपोआप गवसून जाईल.

संघटित कार्य करण्याचा मंत्र स्वामीजींनी दिला आहे. संघटित कार्यात सहभागी झाल्याने आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचा वेग वाढतो. विवेकानंदांच्या शब्दांत, करावयास लागा म्हणजे कळून येईल की, तुमच्यात किती प्रचंड सामर्थ्य आहे. व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी शक्तीदायी विचारांची सोबत आवश्यक असते. विवेकानंदांचे शक्तीदायी विचार तरुणांपर्यंत आणि जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीतर्फे १५० व्या जयंतीच्या निमित्ताने आगामी ३ वर्षे विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. आज देशभरात विविध ठिकाणी या ‘सार्ध शती समारोहा’ची सुरुवात होत आहे.

स्वामी विवेकानंद यांची १५० वी जयंती २०१३ साली असून त्यानिमित्त १२ जानेवारी २०११ ते १२ जानेवारी २०१४ या कालावधीत विवेकानंदांचे शक्तीदायी विचार समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांची योजना करण्यात आली आहे. महाविद्यालयीन युवकांसाठी ‘सिंहनाद’ हा राज्यव्यापी वक्तृत्त्च विकास कार्यक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमांतर्गत आगामी ३ वर्षांत लहान, मोठी अशी एक़ूण १५० पुस्तके प्रकाशित करण्यात येणार असून ती माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माणूस घडविणारे आणि राष्ट्रभक्ती चेतविणारे विवेकानंदांचे विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरू असलेल्या या उपक्रमास शुभेच्छा.
 

***************************************************
आजपासून स्वामी विवेकानंदांचे शक्तिशाली विचार येथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. यानिमित्ताने मला स्वत:ला पुन्हा एकदा या विचारांचे सानिध्य मिळावे हा हेतू आहे. १९६३ साली स्वामी विवेकानंदांची जन्मशताब्दी होती. त्या आधी एक वर्ष - १९६२ साली चीन कडून आपला दारूण पराभव झाला होता. त्यानंतर देशातील तरुण पिढीत आलेले नैराश्य दूर करण्याचे महत्वाचे काम स्वामी विवेकानंदांच्या ' Rousing Call To Hindu Nation ' या पुस्तकाने केले होते.

देवानंद आणि राजकारण : आणले होते इंदिरा गांधी यांच्या नाकी नऊ

औपचारिकरीत्या राजकारणात पदार्पण करणारा पहिला अभिनेता म्हणून देवानंद यांची नोंद घ्यावी लागेल. स्वत: देवानंद हे राजकारणात अधिक काळ रमले नाहीत, पण त्यांनी फिल्मी हस्तींना राजकारणात उतरण्याचा मार्ग दावला.
१९७७ साली देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केल्यानंतर देवानंद यांनी राजकारणात उतरण्याचा आणि त्यांना धडा शिकविण्याचा निर्णय घेतला. देवानंद यांनी 'नेशनल पार्टी ऑफ इंडिया'ची स्थापना केली आणि या माध्यमातून राजकीय जीवनाला सुरुवात केली.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indira-gandhi-dev-aanand-emergency-india-sanjay-gandhi-2616888.html?HF=

मार्केट इकॉनॉमी की मार्केट सोसायटी (FDI)

गेले काही दिवस FDI या विषयावर उलट सुलट चर्चा सुरु आहे. FDI ला विरोधकांकडून जोरदार विरोध झाला. संपुआमधील घटक पक्षांनीच नव्हे तर केरळमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस मुख्यमंत्र्यांनीही विरोध केला. बहुतांश वृत्तपत्रांची भूमिका FDI ला पाठींबा देण्याची राहिली. त्यामुळे परकीय गुंतवणूक काशी फायदेशीर आहे, बाजू जोरदारपणे समोर येत राहिली. दुसरी बाजू ठीक प्रकारे समजलीच नाही. विख्यात अर्थ तज्ज्ञ एस. गुरुमूर्ती यांचा या विषावरील दुसरी बाजू मांडणारा एक लेख वाचण्यात आला. पाहा ही बाजू कशी वाटते ? ज्यांना शक्य आहे त्यांनी या लेखाचे मराठी रुपांतर करावे, ही विनंती. 

Saturday, December 3, 2011

तब्बल 811 वर्षांनंतर उभारला देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ

दिव्य मराठी नेटवर्क । मोहाली (पंजाब) - पंजाबमधील ऐतिहासिक चप्पडचिडी या गावात मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी बुधवारी देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ 'मिनार-ए-फतेह'चे उद्घाटन केले. नांदेड येथील बाबा बंदासिंग बहादूर यांनी 300 वर्षांपूर्वी पंजाबमधील सरहिंदचा नवाब वजीर खानावर मिळवलेल्या यशाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला आहे. कुतुबमिनारनंतर 811 वर्षांनी उभारण्यात आलेला हा देशातील सर्वांत उंच विजयी स्तंभ आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-minar-e-fateh-in-panjab-2611963.html

Friday, December 2, 2011

मला भावलेली एक मेल

मित्रांनो, आपल्या इन बॉक्समध्ये अनेक मेल येत असतात. त्यातील काही मनाला भावून जातात. माझ्या इन बॉक्समध्ये नुकतीच एक मेल पडलेली दिसली. 'Save the Indian Rupee ........ Save India' ही मेल विचार प्रवृत्त करून गेली. ती मेल येथे देत आहे...

Thursday, December 1, 2011

धन्य आहे ते न्यायालय आणि धन्य ती मिडिया !

गुजरात उच्‍च न्‍यायालयाने बहुचर्चित इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्‍वेषन विभागाकडे (सीबीआय)  सोपवण्‍याचा आदेश दिला आहे. यापूर्वी याप्रकरणाचा तपास करणा-या विशेष्‍ा तपास पथकाच्‍या (एसआयटी) टीमने इशरत जहॉं एन्‍काऊंटर प्रकरण बनावट असल्‍याचे म्‍हटले होते. 

Monday, November 28, 2011

Truth of Secular Media




Tehelka armtwisted Goa govt into funding its literary fest

A crusader turns collector
Devika Sequeira, Nov 12, Panaji:
http://www.deccanherald.com/content/204473/a-crusader-turns-collector.html

After several preliminaries and high-power calls-some of them from Sonia

Gandhi's political adviser Ahmed Patel -''Tehelka'' publisher and chief
operating officer Neena Tejpal met Chief Minister Digambar Kamat in Goa
weeks ahead of ''Think 2011'', the magazine's 'festival of ideas' that
was held here from November 4 to 6.

युरेनियम साठ्यावर बसलेले भुजंग - ख्रिश्‍चन मिशनरी

एस. गुरुमूर्ती ( लेखक हे राजकीय विश्लेषक आणि विख्यात विचारवंत आहेत. )
गेल्या काही आठवड्यांपासून  कुडनकुलम च्या अणुवीज केंद्राच्या विरोधातले आंदोलन टीव्हीवरच्या रिऍलिटी शोप्रमाणे सुरू आहे. सतत बातम्यांच्या शोधात असणार्‍या दृकश्राव्य माध्यमांनी, १३ हजार कोटी रूपये खर्चुन पूर्ण झालेले आणि पूर्णत्वास आलेले हे ऊर्जा केंद्र बंद पाडण्यासाठी सुरू असलेल्या या आंदोलनाला काही माध्यमांनी तर मॅटिनी शोचे स्वरूप आणले आहे. या सार्‍या प्रकारात अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची भ्रष्ट नक्कल केली जात आहे. आणि माध्यमे त्यातले नाट्य वाढवायचा प्रयत्न करीत आहेत. इथली जनता हतबल झाली असून ती जगण्याचा हक्क मागत आहे, असे माध्यमांकडून दाखवले जात आहे.

Saturday, November 19, 2011

सुखी गृहस्थी जीवनासाठी...

यशस्वी गृहस्थी जीवनाचा आधार सुखी दांपत्य असतो. पती-पत्नींमध्ये एकमेकांप्रती सन्मानाची भावना असेल आणि स्वाभिमानाची मर्यादा न ओलांडण्याचा विवेक असेल तरच दांपत्य जीवन सुखी बनणे शक्य आहे. पती पत्नीशी किंवा पत्नी पतीशी सन्मानाने वागत नसल्यास तिथे परामात्मा राहू शकत नाही. परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ज्या घरात प्रेम आणि सन्मानाचे वातावरण असेल तिथेच त्याचा वास असतो.

Wednesday, November 16, 2011

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती

भारताला बलशाली होण्यापासून रोखाणा-या शक्ती कशा रीतीने कार्यरत आहेत, हे सांगणारा एस. गुरुमूर्ती यांचा हा लेख कोणाच्याही डोळ्यात अंजन घालू शकेल. या अतिशय महत्वाच्या विषयावरील या लेखाचा अनुवाद करून कोणीतरी मराठीत आणेल का ? असे लेख मराठीतूनही प्रकाशित झाले पाहिजेत. ( कृपया कोणी या लेखाचा अनुवाद केलाच तर तो psiddharam@ gmail.com या पत्त्यावर पाठवावा ही विनंती.)

Forces halting our n-surge
The agitation against the Koodankulam Nuclear Power Plant has been running as a TV reality show for weeks now. The news-starved visual media has reduced the Koodankulam nuclear plant — a national investment of Rs 13,000 crore and just about to start — to a day-matinee-night show.

Thursday, November 10, 2011

'देऊळ' पाहून मनात आलेले काही प्रश्न

हिंदू विचारांवर श्रद्धा असलेला मी एक कार्यकर्ता आहे. अन्य धर्म जन्मास येण्यापूर्वीही हिंदू धर्म अस्तित्वात होता. तेव्हा या धर्माला सनातन धर्म म्हणत. जगातील अन्य भागातील लोकांना कपडे घालायचीही बुद्धी नव्हती तेव्हा या भारत देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती.

सरकारलाही नाही माहित, सोनिया गांधींनी कुठे कुठे केला परदेश दौरा

नवी दिल्ली. वृत्तसंस्था . संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कुठे कुठे परदेश दौरा केला याची माहिती सरकारच्या कोणत्याच मंत्रालयाकडे उपलब्ध नाही, असे दिसते. माहितीच्या अधिकाराखाली दाखल झालेल्या अर्जातून ही बाब समोर आली आहे. सोनिया गांधी यांच्या परदेश दौ-याविषयी माहिती मागणारा एक अर्ज माहितीच्या अधिकाराखाली दाखल झाला आहे आणि हा अर्ज सध्या वेगवेगळ्या विभागात फिरत आहे.

Tuesday, November 8, 2011

चाणक्य नीती 13 : मूर्खपणा आणि जवानीपेक्षाही घातक आहे ही गोष्ट

कष्ट, दु:ख, अडचणी या सतत येत असतात. या प्रकारच्या काही गोष्टींवर आपले काहीही नियंत्रण नसते तर काही गोष्टी मात्र आपल्या कर्मानेच उत्पन्न होत असतात. आपण जाणते-अजाणतेपणी अशी काही कामे करतो की भविष्यात ती कामे आपल्यासमोर अडचणी बनून येतात. यासंदर्भात आचार्य चाणक्य म्हणतात...

'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा








सतरा सुरक्षा जवान जखमी



वृत्तसंस्था । श्रीनगर

अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी करणारे आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षात सतरा सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. 'बकरी ईद'च्या प्रार्थनेनंतर हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Monday, November 7, 2011

नास्तिकांना युधिष्ठिराने मूर्ख का म्हटले असेल ?

'नास्तिक: कच उच्यते? की मूर्ख:?'
'नास्तिक कोणाला म्हणावे? मूर्ख कोण?'
युधिष्ठिराचे उत्तर :
'नास्तिको मूर्ख: उच्यते।'
मूर्ख, मूढ, गोंधळलेला, भ्रमिष्ट, अज्ञ, बालिश, वैधेय: व यथाजात: इतक्या शब्दांनी मूर्खाला संबोधिले जाते.

विवेकानंद केंद्राला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

धर्मशाला. विवेकानंद केंद्र या अध्यात्मप्रेरित सेवा संघटनेला यंदाचा सतपाल मित्तल राष्ट्रीय घोषित झाला आहे. कन्याकुमारी येथे मुख्यालय असलेल्या विवेकानंद केंद्राने देशाच्या विविध भागात मानवता जपत सेवाकार्ये उभी केली केली आहेत, त्याची दखल घेत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Sunday, November 6, 2011

भाजपाचे काँग्रेसीकरण होत आहे काय? - मा. गो. वैद्य

'देशोन्नती'च्या संपादकांनी, आपल्या दैनिकाच्या दिवाळी अंकासाठी, वरील विषयावर माझा लेख मागितला आणि मी तो देण्याचे मान्य केले. लेखाचे शीर्षक प्रश्नात्मक आहे आणि माझे उत्तर आहे 'होय.' काँग्रेसीकरणाच्या वाटेवर भाजपाची 'प्रगती' होत आहे. पण काँग्रेस पक्षाने 'प्रगती' करीत जो पल्ला गाठला आहे, तो मात्र भाजपाने गाठला नाही; बहुधा तो गाठूही शकणार नाही.

एकदा तुम्हाला ते गवसले की...

आपल्याला लवकरच मृत्यू येणार आहे याची जाणीव म्हणजे  काहीतरी भव्य-दिव्य  करण्यासाठीचे साधन हाती लागल्याचा आनंद देणारी गोष्ट आहे. कारण  सर्व अपेक्षा,अभिमान, अपयशाने येणारे नैराश्य आणि वैषम्य या सर्व गोष्टी मृत्यूच्या पाश्र्वभूमीवर  नगण्य  ठरतात आणि  सर्वात खरोखरच जे महत्वाचे आहे तेच शिल्लक राहाते.

Friday, November 4, 2011

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...

चाणक्य नीती 12 : तुम्हाला जर घाणीत सोने दिसले तर...
दररोजच्या व्यवहारात आपण अनेकांना भेटत असतो, त्यात काही जण चांगल्या चरित्र आणि स्वभावाचे असतात तर काहींचा स्वभाव आणि वर्तणूक वाईट असते. चांगल्या लोकांकडून शिकण्यासारखे आणि घेण्यासारखे खूप काही असते. परंतु आपण वाईट लोकांकडूनही काही चांगल्या गोष्टी शिकू शकतो. या संबंधात आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की,
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti--life-management-tips-of-chanakya-niti-2541831.html 

कष्टाशी तडजोड न करण्यातच जीवनाचे खरे सौंदर्य - प्रकाश पाठक

सोलापूर. दिव्य मराठी नेटवर्क. जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवी मूल्यांवर श्रद्धा, कष्टाशी तडजोड न करता निरंतर कष्ट करण्याची वृत्ती आणि समर्पण भावना असल्यास जीवन ख-या अर्थाने फुलते. याचवेळी वैयक्तिक अपमान विसरून सामूहिक अपमानाविरोधात खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धारही असला पाहिजे, असे मत भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक प्रकाश पाठक यांनी व्यक्त केले. विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार दिवाळी अंक प्रकाशनाच्या निमित्ताने आयोजित 'आयुष्यावर ऐकू काही' या विषयावर पाठक यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-KOL-vivek-vichar-diwali-issue-2541614.html

Tuesday, November 1, 2011



पत्रकाराचे लेखन कसे असावे, याबाबत लोकमान्य टिळक यानी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की, पत्रकाराची लेखणी ही धीरगंभीर नदीच्या प्रवाहासारखी असावी. तिच्या प्रवाहाला खळखळीचा वेग नसावा पण कोठे तुंबूनही राहता कामा नये. थोडक्यात तिला कोठेतरी पोहोचण्याची घाई नसावी आणि वाया घालवायला वेळही नसावा. या साऱ्या वर्णनाची प्रचीती बापूराव यांच्या लेखनातून नेहेमी येते.

मुलं ही केवळ संपत्ती नव्हे तर कर्तव्यही !

कुटुंबाचा आधार आहे गृहस्थी आणि गृहस्थीची धुरा टिकलेली असते दांपत्य जीवनावर. साधारणपणे लोक कुटुंब, गृहस्थी आणि दाम्पत्य हे तीन्ही एकच समजतात. परंतु या तीन्हीत सूक्ष्म अंतर आहे हे मात्र खरे. पती-पत्नीतील वैयक्तीक संबंधांवर आधारित असते ते दांपत्य. पती-पत्नीसोबतच मुलांच्या जबाबदा-याही असतात याला म्हणतात गृहस्थी. यात आर्थिक, मानसिक आणि भौतिक या तीन्ही स्तरांचा समावेश असतो. या सा-यांचे समग्र रूप म्हणजे कुटुंब होय. कुटुंबात पती, पत्नी आणि मुलं यांच्याशिवाय अन्य नात्यांचाही समावेश असतो.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-gruhasti-and-children-2532794.html

कुटुंब ही संपत्ती आहे आणि प्रेरणाही !

घर किंवा कुटुंब म्हणजे एक माळ आहे. ही माळ प्रेमाच्या धाग्यात गुंफली जाते. घरातील सारे सदस्य या माळेतील मोती आहेत. एकही मोती कमी असेल किंवा धागा तुटलेला असेल तर माळेचे सौंदर्य नष्ट होते. माळ विखुरली जाते.
घरातील प्रत्येक सदस्याचे महत्त्व हे समसमान असते. आपण कुटुंबाशिवाय अपूर्ण असतो. आपल्यावर कोणतीही परिस्थिती येवो, कितीही संकटे येवोत, आपण सदैव कुटुंबासोबत राहिले पाहिजे. कुटुंबाला एकत्र ठेवले पाहिजे. कुटुंब म्हणजे ऊर्जा आणि प्रेरणा देणारे स्थान आहे.
महाभारतातील पांडवांकडे पाहा. किती अडचणी आल्या, इंद्रप्रस्थ निर्माण असो की वनवास, पांडव सदैव एकत्र राहिले. द्युतात हार झाल्यानंतर
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-kutumb-aikya-what-to-do-2532811.html

Monday, October 31, 2011

कृष्णाचा मॅनेजमेंट फंडा

माणसासाठी सर्वात अवघड काम काय असेल ? आपले कर्मक्षेत्र आणि कुटुंब यात ताळमेळ घालणे. या ठिकाणी भले भले अपयशी होतात. जे बिझनेसमध्ये पडले त्यांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष झाल्याचे तर ज्यांनी कुटुंबाकडे लक्ष्य दिले ते बिझनेसमध्ये मागे पडल्याचे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळते. पैशाच्या भुकेने आपल्या प्रेमाच्या भुकेवर मात केल्याचे दिसते. आज घरातील लोकांसमवेत बसून जेवण करणे, गप्पा मारणे वगैरे आपण विसरूनच गेले आहोत. कुटुंबं संकुचित होण्यामागे हीच कारणं आहेत. व्यक्तिगत लाभ, उन्नती आणि आनंदाची भावना यालाच आपण विश्व समजून बसत आहोत.

सस्नेह निमंत्रण

प्रती,
बंधू - भगिनी,
विवेकानंद केंद्राच्या वतीने दिवाळी अंक प्रकाशन व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. येथे निमंत्रण पत्रक ठेवत आहे. ज्यांच्यापर्यंत पत्रिका पोहोचू शकली नाही त्यांनी हेच निमंत्रण समजून कार्यक्रमास यावे ही विनंती.

Sunday, October 30, 2011

विजय! पूर्ण विजय!!



युवाशक्तीला घातलेली साद



31 डिसेंबर 2008 ते 4 जानेवारी 2009 या कालावधीत महाराष्ट्रातील युवाशक्तीचे शेगाव (जि. बुलढाणा) येथे महाशिबीर झाले. संपूर्ण महाराष्ट्रातून 1377 तरुण-तरुणी या शिबिरात सहभागी झाले होते. युवा शक्तीला सकारात्मक साद घालणाऱ्या या उपक्रमाचा वेध घेणारा हा लेख.

स्थळ : शेगावजवळील आनंदसागर विसावा.
दि. 31 डिसेंबर 2008 ची संध्याकाळ.
18 ते 25 वयोगटांतील तरुण-तरुणी झुंडी-झुंडीने, घोळक्याने दाखल होत आहेत. यात सांगली-कोल्हापूरचे तरुण-तरुणी आहेत, तसे ठाणे-मुंबई-रत्नागिरीचेही आहेत. नागपूर-गडचिरोली-वर्ध्याचे आहेत तसे सोलापूर-लातूर-धाराशिवचेही आहेत. पुणे-नगरचे आहेत तसे अकोला-भंडारा-नांदेड-संभाजीनगर-परभणीचेही आहेत. एसटी बस आणि रेल्वेने आलेल्या तरुणांची एकच लगबग सुरू आहे.
प्रवेशद्वारात नोंदणी सुरू आहे. झुंडी-झुंडीने येणारे विविध गणांमध्ये विभागून शिस्तीच्या कोंदणात बसत आहेत. 25-25 जणांचे गण आपल्या गणप्रमुखाच्या मार्गदर्शनानुसार सभामंडपाकडे कूच करीत आहेत. "भारत माता की - जय', "जय भवानी- जय शिवाजी', "कौन चले भाय कौन चले- स्वीमीजी के वीर चले' या घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. मुख्य सभामंडपात गणश: आणि क्षेत्रश: शिबिरार्थींची बैठक व्यवस्था केली आहे. उभ्या रांगा आणि आडव्या ओळीत बसलेले 1500 तरुण ॐकार उच्चारण करीत भजनसंध्येत सहभागी झालेत. येथूनच चार दिवसांच्या शिबिराला सुरुवात झाली आहे. उद्यापासून या साऱ्यांना पहाटे 4.30 वा. उठून पहाटेच्या योगसत्रासाठी तयार व्हायचंय. सगळेजणं आपले भ्रमणध्वनी बंद करून आपापल्या गणप्रमुखांकडे दिले आहेत. शरीर, मनाने स्वत:च्या घडणीसाठी सिद्ध झालेत. ( photos http://poornvijay.blogspot.com/search?updated-max=2009-02-06T02%3A43%3A00-08%3A00&max-results=6)

डॉक्टर साहेब,

हेही समजून घ्या थोडं...


मी काही वैद्यक क्षेत्रातला जाणकार नाही. डॉक्टर मंडळींना उपदेशाचे डोस द्यावेत असाही माझा विचार नाही. तरीही मला आलेल्या अनुभवामुळे हा लेख लिहित आहे.
चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. दुपारी संपादकीय पानाचे काम आटोपले होते म्हणून कार्यालयातच वृत्तपत्रे चाळीत बसलो होतो. घरून लहान भावाचा फोन आला. तो घाबरलेला होता. "बाबाग्‌ यान्‌ अरे आग्याद्‌...' म्हणत तो सांगू लागला. माझ्या वडिलांना (वय साधारण 58) शेतात काम करताना अचानक पाठीत दुखायला लागले होते. तीव्र वेदना होत होत्या.

- महानायक... मृत्यूचे रहस्य ... netaji




टीम अण्णा आणि rss - मा. गो. वैद्य यांचे भाष्य


अण्णा हजारे यांच्या आंदोलनाने सामान्य जनमानस प्रभावित झाले असतानाच, त्यांच्या चमूतील दौर्बल्य प्रकट होऊ लागले. या दौर्बल्याचा, त्यांच्या आंदोलनाच्या परिणामकारकतेवर फार विपरीत परिणाम होईल, असे मला वाटत नाही. परंतु, अण्णांच्या विरोधकांना मात्र, त्यांच्यावर आघात करण्यासाठी एक शस्त्र मिळाले, हे मान्य करावे लागेल.

अण्णा, rss तुमच्यासाठी अस्पृश्य आहे ?

नुकतीच टीम अण्णाची पत्रकार परिषद tv वर पाहत होतो. rss विषयावर बोलताना प्रशांत भूषण म्हणाले की, आम्ही आमच्या मंचावर rss च्या लोकांना येवू दिले नाही. टीम अण्णाने कोणाला सोबत घ्यावे, कोणाला घेवू नये, हे ठरविण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे, हे खरेच. पण तरीही मनात प्रश्न येतो की, यांना जामा मशिदीचे इमाम बुखारी आपल्या मंचावर आणावे वाटले ( किरण बेदी यांनी बुखारी यांच्या घरी जावून त्यांना विनवण्या केल्या होत्या. 'भारत मत की जय', 'वंदे मातरम' म्हणणार नाही, असे आश्वासन दिल्यास राम लीलावर येण्याचा विचार करेन असे ते म्हणाले. ), अफझल गुरु याला फाशी होऊ नये असे मनापासून वाटणाऱ्या मेधाबाई पाटकर टीम अण्णात असू शकतात (पाटकर बाईंच्या पत्रकार परिषदेला मी सोलापूर पत्रकार संघात उपस्थित होतो, तेंव्हा त्या अरुंधती रॉय यांचा बचाव करताना अफझल गुरुची कड घेताना दिसल्या होत्या.), नक्सलवादी कारवायांशी जवळीक ठेवणारे,

Saturday, October 29, 2011

...अन् पाकिस्तानने तोडून घेतले काश्मीर

दिव्य मराठी नेटवर्क. एका छोट्याशा घटनेमुळे आज आपल्याजवळ पूर्ण काश्मीर नाहीय. दुर्दैवाने काश्मीरचे महाराजा हरि सिंह आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संबंध चांगले नव्हते. याची किंमत देशाला मोजावी लागली आणि आजही त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. राजा हरिसिंह यांना शेख अब्दुल्ला यांची कुटिल नीती, स्वार्थी आणि फुटीर वृत्ती माहीत होती. 'क्विट काश्मीर' आंदोलनाच्या आडून शेख अब्दुल्ला हे महाराजा हरिसिंहांना हटवून स्वत: सत्ता मिळवू इच्छित होते. याची हरिसिंहांना कल्पना होती.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-neharu-and-kasmir-issue-2529050.html

Wednesday, October 26, 2011

हनुमानजींकडून शिका, 'माणसं कशी ओळखायची ?'

या व्यवहारी जगात आपला कोण आणि परका कोण, हे ओळखणे तसे कठीण आहे. कधी कधी आपण आपल्या हितचिंतकांना दूर सारतो आणि शत्रूंना जवळ करतो. काही लोकांना वाटतं की व्यावसायिक नाते हे ठराविक मर्यादेपर्यंतच ठीक असतात, परंतु हे खरे नाही.
व्यावसायिक नात्यांतही आपण जर आपले आणि परके ओळखू शकलो आणि त्या नात्यांला थोडे प्रेम आणि विश्वास याचे सिंचन केले तर हे नातेही दीर्घकाळ टिकू शकतात. जीवनाला अर्थ प्राप्त करण्यासाठी हे आवश्यकही आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-hanumaan-sys-how-to-identify-friends-and-enemy-2525664.html

Tuesday, October 25, 2011

चाणक्य नीती 10 : अशा स्त्री, मित्र किंवा नोकरासोबत कधीही राहू नका

आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपले नातेवाईक असतात, काही मित्र, नोकर आदी असतात तर काही अनोळखी. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही चांगल्या स्वभावाचे असतात तर काही दुष्ट स्वभावाचे. आचार्य चाणक्य यांनी आपल्याला कशा लोकांसोबत राहू नये याचे मार्गदर्शन केले आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात,
दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।
या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-woman-wife-friend-servant-life-management-2524385.html

 

नोटांवर शिवाजी महाराज, महाराणा प्रताप...

 
 हिंदुस्तान वरील १५० वर्षांचे ब्रिटीश साम्राज्य उधळून फेकणे हे काही एका व्यक्ती कडून शक्य नव्हते. त्या साठी हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या.
परंतु गांधीवादी (?) कॉंग्रेस सरकार सर्व श्रेय फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांनाच देते.
आम्हाला गांधींचा विरोध नाही परंतु १० पासून १००० रुपयांच्या नोटांवर फक्त गांधीच, असे का?
फक्त त्यांच्या एकामुळे स्वातंत्र्य शक्यच नव्हते.

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-shivaji-maharaj-on-indian-currency-2524288.html?HF=

 

Monday, October 24, 2011

पंतप्रधान, राष्ट्रपतींसमोर खुर्शिद करणार ‘वादग्रस्त’ नाटक

नवी दिल्ली - सलमान खुर्शिद आता आपल्यातील 'छुपी कला' पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यासमोर सादर करतील. २८ ऑक्टोबरला राष्ट्रपती भवनमध्ये 'सन्स ऑफ बाबर' नावाचे वादग्रस्त ठरलेले नाटक सादर होणार आहे. या नाटकाच्या माध्यमातून बहादूर शहा जाफर यांच्यासारख्या देशभक्त राजाला बाबरसारख्या या देशावर क्रूर राजवट लादणा-याच्या पंक्तीत बसविल्याबद्दल मे २०११ मध्ये गोव्यातील काही संघटनांनी विरोध दर्शविला होता. सलमान खुर्शीद यांनी या देशावर आक्रमण करणाऱ्या बाबर या राजाचे उदात्तीकरण केल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.
पूर्ण बातमीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-salman-khurshid-will-act-in-play-2522265.html?HT4=

Sunday, October 23, 2011

कपाळावर टिकली, गंध लावायचे नाही, अन्यथा...

रोहतक. महिला कर्मचारी ऑफिसला येताना साडी किंवा सलवार कुर्त्यात येऊ शकतील मात्र त्यांनी सौभाग्याचे चिन्ह टिकली, सिंदूर लावता कामा नये. मंगळसूत्रही घालता येणार नाही. पुरुष कर्मचा-यांनाही ऑफिसला येताना गंध लावून येता येणार नाही. मनगटावर पवित्र धागाही बांधता येणार नाही. हे नियम केले आहेत देशात फायनान्स क्षेत्रात काम करणा-या मुथूट फायनान्स अ‍ँड गोल्ड लोन या कंपनीने. या कंपनीचे मुख्यालय केरळमध्ये असून ही कंपनी सोने गहाण ठेवून घेऊन सोन्याच्या किंमतीच्या 80 टक्के कर्ज देते.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT--muthoot-finance-and-gold-loan-2520492.html

Tuesday, October 11, 2011

विवेक विचार दिवाळी अंक

नमस्ते बंधू भगिनी,
यंदा विवेक विचार मासिकाचे दिवाळी अंक प्रकाशित होत आहे. त्याचे हे मुखपृष्ठ. विवेक विचार हे विवेकानंद केंद्राचे मुखपत्र आहे.
ओम
निमंत्रण पत्रिका
विवेक विचार
विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे मराठी मासिक
--------------------------------------------------------------------------------------------------------------
दिवाळी अंक प्रकाशन व व्याख्यानप्रति,
------------------------------------------------
------------------------------------------------
बंधू-भगिनी,
विवेकानंद केंद्र ही एक वैचारिक चळवळ आहे. घराघरापर्यंत संस्कारशील साहित्य आणि राष्ट्रभक्तीचे विचार पोहोचावेत यासाठी विवेक विचार या मासिकाच्या माध्यमातून विवेकानंद केंद्र प्रयत्नशील आहे. यंदा दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचे निमित्त साधून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. आपण या कार्यक्रमास यावे ही आग्रहाची विनंती.

व्याख्यान विषय : आयुष्यावर ऐकू काही
वक्ते : माननीय प्रकाश पाठक, भोसला मिलिटरी स्कूलचे संचालक व संस्कार भारतीलचे प्रदेशमंत्री
प्रमुख उपस्थिती : यतीन शहा, उद्योजक
स्थळ : शिवछत्रपती रंगभवन, सोलापूर.
वेळ : सायं. 6 ते 7.30 वा.

आपले स्रेहांकित,दीपक पाटील                                                                  
सिद्धाराम भै. पाटील
संचालक, विवेकानंद केंद्र सोलापूर                                        संपादक, विवेक विचार

टीप : कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. कृपया वेळेआधी 5 मिनिटे उपस्थित राहावे, ही विनंती.

www.vkvivekvichar.blogspot.com

Sunday, October 9, 2011

...विवेकानंदांना सांगितली होती ही गोष्ट

स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण भारताचे भ्रमण केले होते. या भ्रमण काळात त्यांना अनेक संत महापुरुष भेटले. एका संतांने त्यांना पवहारी बाबांची गोष्ट सांगितली. ती कथा पुढीलप्रमाणे होती...
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-swami-vivekananda-and-pawahari-baba-2487427.html


Wednesday, October 5, 2011

ओ... जेरुसलेम!

अलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. 'रूट्स'. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्रिकन पूर्वजांची पाळं मुळं शोधून काढतात. अक्षरश: खिळवून ठेवते ही कादंबरी. मुळांशी घट्ट बांधलेलं असणं हा मानवी स्वभाव असेल कदाचित; पण ज्यूंच्या बाबतीत हे बंध इतरांहून खूप घट्ट आहेत.

Tuesday, October 4, 2011

सोनिया गांधींचे जावईबापू लष्करप्रमुखांपेक्षाही मोठे!

रॉबर्ट वडेरा देशाचे भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांपेक्षाही मोठे असल्याचे सिद्ध झाले आहे. कारण ज्या लोकांना देशांतर्गत विमानतळावर तपासणीतून जावे लागत नाही, अशा लोकांच्या यादीत रॉबर्ट यांच्या नावाचा समावेश आहे. तसे पाहिले तर ज्या लोकांचा या यादीत समावेश आहे, त्यांना त्यांच्या पदानुसार ही सूट मिळालेली आहे. मात्र, रॉबर्ट वडेरा व तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा हे कोणत्याही अधिकृत पदांवर नसतानाही त्यांची नावे या यादीत आहेत. 28 सप्टेंबर 2005 रोजी रॉबर्ट यांचे नाव या यादीत आले होते. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सेक्युरिटीने देशभरात एक पत्रक काढले होते. रॉबर्ट वडेरा जेव्हा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपसह प्रवास करतील तेव्हा त्यांची तपासणी करण्यात येऊ नये, असे या पत्रकात म्हटले होते. देशाच्या भूदल, नौदल व हवाई दलाच्या प्रमुखांनाही तपासणीतून जावे लागते, मग रॉबर्ट वडेरांना ही सूट कशासाठी असा प्रश्न तेव्हा उपस्थित झाला होता. अनेकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली.
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-sonia-gandhi-son-in-law-robert-vadra-property-2478503.html?HT5=

Monday, October 3, 2011

विनायक सेनचा 'असली' चेहरा

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा तिसरा भाग.
नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्याच्या वल्गना पंतप्रधानांपासून लुंग्या सुंग्यापर्यंत केल्या जातात.

Saturday, October 1, 2011

अमरसिंग झोपेत काय बडबड करतात ?

चिंता
राज्यसभा खासदार अमरसिंग यांनी सरकारला चिंतित केले आहे. मात्र, सरकारची चिंता अमरसिंगांच्या आजारपणाची नाही. खासदार खरेदी प्रकरणात अमरसिंग तिहारमध्ये असताना जे बोलत होते, त्याने सरकारला चिंतित केले आहे. तिहारमध्ये असताना दिवसा तर अमरसिंग शांत राहात होते, कुणाशी फार बोलत नव्हते. पण, रात्री झोपेत त्यांची जी बडबड होत होती, त्याने सरकारला सतर्क केले आहे. अमरसिंगांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी तिहार प्रशासनाने एक डॉक्टर तैनात केला होता.

Friday, September 30, 2011

मध्य प्रदेशात सापडले मंदिरांचं 'बेट'!

मध्य प्रदेशात खजुराहोपेक्षाही ३00 वर्षं जुन्या मंदिरांचं उत्खनन सध्या सुरू आहे.. खजुराहोची मंदिरं हे मध्य प्रदेशातील जगप्रसिद्धपर्यटनस्थळ.. कामशास्त्रावर आधारित शिल्पांमुळे खजुराहोच्या पुरातन मंदिरांना वेगळं वलय प्राप्त झाले आहे. मात्र या मंदिरांपेक्षा तब्बल ३00 वर्षं आधीची, अतिप्राचीन मंदिरं मध्यप्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यात चंबळ नदीच्या खोर्‍यात सापडली आहेत. 'बटेश्‍वर मंदिर' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या १0 हेक्टर क्षेत्रफळाच्या वास्तूत तब्बल २00 लहान-मोठी मंदिरं आहेत. यातील बहुतांशमंदिरं शंकर किंवा विष्णुची आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या दिल्ली सर्कलचे अधीक्षक के.के. मोहम्मद यांनी या मंदिरांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. सर्वप्रथम १९९४ साली या मंदिराचे अवशेषमिळाले होते. त्यानंतर २00५ साली पुरातत्व खात्यानं या क्षेत्रात उत्खनन सुरू केल्यानंतर बटेश्‍वर मंदिराची ही अतिभव्य जागा जगासमोर आली. आणखी किमान १0 वर्षं हे उत्खननाचं काम चालेल, इतकी ही वास्तू भव्य आहे. 'आर्यावर्ताचे महाराजाधिराज' अशी उपाधी धारण करणार्‍या गुर्जर प्रतिहार राज्यकर्त्यांनी ही मंदिरं उभारली आहेत. इसवी सनाच्या ६ ते ११व्या शतकात गुर्जर प्रतिहार घराण्याची उत्तर भारतातल्या बर्‍याच भागात सत्ता होती.
■ मोहम्मद यांनी या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय छेडला आहे.. देशात अशा अनेक पुरातन वास्तू असून त्यांचं योग्य संवर्धन व्हायला हवं असेल, तर हा विषय शालेय अभ्यासक्रमात घेतला जायला हवा, असं मत त्यांनी मांडलं आहे.
( दैनिक लोकमत, पान ६, ३० सप्टे. २०११)

Thursday, September 29, 2011

गुजरातमध्ये गोहत्येला सात वर्षांची सजा

अहमदाबाद, दि. २८ (वृत्तसंस्था) - गोमातेची हत्या करणे किंवा गायी खाटकाकडे घेऊन जाणे याविरुद्ध गुजरात सरकारने कडक कायदा केला असून, आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावणारे विधेयक नुकतेच विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. 'गुजरात प्राणीसंवर्धन कायदा १९५४' या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक कृषिमंत्री दिलीप संघानी यांनी मांडले. याला भाजपबरोबर कॉंग्रेसच्या आमदारांनीही समर्थन दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. यानुसार गोहत्येसाठी सात वर्षांचा तुरुंगवास, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. हत्येसाठी गायींची वाहतूक हाही गंभीर गुन्हा ठरणार आहे.
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)

Tuesday, September 27, 2011

नक्षलवाद : कोट्यवधींचा ऍक्शन प्लॅन केवळ कागदावरच ( विशेष लेख )

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...

Monday, September 26, 2011

स्पर्धा : प्रधानमंत्रिपदासाठी

मा. गो. वैद्य यांचे भाष्य
आमच्या गावाकडे एक मार्मिक म्हण आहे. ती शहरी भागातही असेलच. म्हण आहे : ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.'' एक दिवस एका भिक्षुकाला जरा बर्‍यापैकी दक्षिणा मिळाली. त्याने बाजारातून तुरी आणायचे ठरविले. त्याने पत्नीला विचारले, ''तुरीचे काय करशील?'' ती म्हणाली, ''त्याची डाळ करीन आणि छानपैकी वरण करीन.'' भटजी म्हणाला, ''नाही, तू त्याचे पुरण कर.'' पत्नी म्हणाली, ''नाही, वरणच करणार.'' पती म्हणाला, ''पुरणच कर.'' दोघांचा वाद मिटला नाही. शब्दाने शब्द वाढला आणि भटजीने, आपला नवरोजीपणा दाखवीत पत्नीला मारले. घरी तुरी आल्याच नाहीत, तरी त्यावरून वाद आणि वर पत्नीला मारणे, हा प्रकार पाहून म्हण पडली, ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.''

Sunday, September 25, 2011

अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ?

'मी' पणाचा आजार अर्थात व्यक्तिपूजा हा खतरनाक रोग आहे. ही कॉंग्रेस संस्कृती आहे. व्याक्तीपुजेनेच गांधी बाबांना महात्मा बनविले होते आणि त्यांच्या हट्टापायी देशाची फाळणी. नेहरूंना देशावर थोपविण्यात आले होते. व्याक्तीपुजेचा हा आजार नसता तर अण्णा कदाचित तुम्हाला सरदारजींच्या राज्यात आंदोलन करावे लागले नसते.

Saturday, September 24, 2011

अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...

अण्णा, तुमच्याबद्दल केवळ आमच्याच नव्हे तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणाराच आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काहीही कारण नाही.

Thursday, September 22, 2011

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????

हाँ तो साथियों..... हमारे कुछ तथाकथित बुद्धिजीवियों और सेक्युलर लोगो का कहना है कि... हिन्दू धर्म में जातिवाद है और यहाँ दलित भाइयों को प्रताड़ित किया जाता है .... सो.., उन्हें हिन्दू धर्म छोड़ के मुसलमान बन जाना चाहिए....क्योंकि मुसलमान जाति नहीं मानते हैं ........
तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथित बुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी