Sunday, February 15, 2015

भाजपच्या पराभवाची पाच कारणे

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
दिल्ली प्रदेश निवडणुकात आम आदमी पार्टीने जबरदस्त बहुमताने जिंकल्या. एकूण 70 पैकी त्यांना 67 स्थानी यश मिळाले. या यशाला लॅन्ड्स्लाइड् म्हणजे भूमीपाताचे यश असे म्हणतात. निवडणुकीत ज्यांना यश मिळते ते आनंदी होतात,आणि ज्यांना अपयश मिळते ते दु:खी होतात. भाजपाचे नेते आणि समर्थक आज दु:खी आहेत. या निवडणुकीत आपला एवढा दारूण पराभव होईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. 
2014 च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या. 61 विधानसभा मतदार संघात त्यांनी आघाडी घेतली होती. 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपाला 32 जागा मिळाल्या आणि आपला 28 जागा मिळाल्या होत्या. 2015 च्या निवडणुकीत भाजपाला फक्त 3 जागा मिळाल्या आणि आपला 67 जागा मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 46% मते मिळाली होती आणि आता फक्त 32% मिळाली, 'आप' ला 54% मते मिळाली. 2013 च्या निवडणुकीत भाजपाला 33% मते मिळाली होती. भाजपाच्या मताच्या टक्केवारीत फक्त 1% ने फरक पडला आणि 32 ऐवजी 3 जागा झाल्या.

Monday, February 2, 2015

दाभोलकरी मत्सरातून विवेकानंद विचारांचे अपहरण

दाभोलकर कुलोत्पन्न दत्तप्रसाद यांची स्वामी विवेकानंद यांच्यावरची तीन दिवसांची व्याख्यानमाला सोलापुरात २४ ते २६ जानेवारी या काळात पार पडली. अतिशय तल्लख बुद्धीमत्तेच्या दत्तप्रसाद यांनी विवेकानंदांच्या नावावर स्वत:चे विकृत विचार पसरवण्याचा खटाटोप या व्याख्यानमालेतून केला. भंपक आणि खोटारडेपणा करून विवेकानंद विचारांत भेसळ करू पाहणार्‍या दाभोलकर यांना उघडे पाडणारा युवा पत्रकार सागर सुरवसे यांचा तरुण भारतच्या आसमंत पुरवणीमध्ये प्रकाशित लेख...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी