Wednesday, April 23, 2014

नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीमधील एक सर्वोत्कृष्ट मुलाखत


शाज़ी ज़मां: नरेंद्र मोदी जी आपका बहुत स्वागत है.
 नरेंद्र मोदी: मेरे दर्शकों को मेरा नमस्कार

Monday, April 21, 2014

आर्य आणि अनार्य


जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.

युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !

कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच !

रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? - लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? - ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? - हा खुळेपणा आता पुरे !

महासरितांच्या विस्तीर्ण पात्रांनी खंडित झालेला विराट, समतल आणि समशीतोष्ण सुखद असा आर्यभूमीचा या भूभाग आर्यसंस्कृतीच्या महावस्त्राचा भाग आहे. येथील धागा उच्च संस्कृतीच्या, विकसनशील संस्कृतीच्या आणि वनवासी संस्कृतीच्या मानवांनी - बह्वंशी आर्यांनी घडविला आहे. वर्णाश्रमधर्माच्या चौकटीत या वस्त्राची निर्मिती होत आहे. निसर्गातील स्पर्धा आणि संग्राम यांच्यावर विधायक बुद्धीने विजय मिळविण्याच्या आकांक्षेच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हेमंगल वस्त्र विणले आहे. युरोपीय लोकांनो ! मला असे सांगा की, कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश तुम्हाला जिथे जिथे आढळले,तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात. तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत. हे आजतागायत चाललेले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय सांगतो ? तिथल्या मूळच्या जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी, तशी तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे. ज्या ठिकाणी असे करणे तुम्हाला शक्य झाले नाही, त्या ठिकाणची राष्ट्रे अद्यापही जिवंत आहेत.

हिंदुस्थानने असे कधीच केले नाही. आर्य हे सहृदय, उदार होते. त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उतुंग होती. त्यात या पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते.आणि माझ्या देशातल्या मूर्खांनो ! मी तुम्हाला विचारतो की, हिंदुस्थानात एतद्देशीयांच्या कत्तली झाल्या असल्या तर चतुर्वर्णांची रचना अस्तित्वात तरी आली असती काय ?

स्वत: जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे ध्येय आहे. आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य करणे हे आहे. युरोपीयांचे साधन शस्त्र हे आहे. आर्यांचे साधन चतुर्वर्णांची रचना हे आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी समाजाची चार वर्णात विभागणी करणे आर्यांना आवश्यक वाटले. वर्णांचे कप्पे कडेकोट नव्हते. जो तो आपल्या साधनेने उच्च वर्णात प्रविष्ट होऊ शके. युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे. भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे. म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत.

(पूर्व आणि पश्चिम, स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय, खंड ५)


****

आधुनिक काळातील संशोधन आणि पुरावे
Introduction
Oriental Renaissance
Motives of the British East India Company 
Implication of Aryan Invasion Theory
Voices of dissent
Indian protests

Challenging the infallible façade of Western scholarship
Indological MacCarthyism

Race, Religion and Philology in the 19th Century 

Colonial Indology - Acceptance of A Racist Theory
California Textbook Controversy
CAPEEM Fights Discrimination Against Hindu Children with a Lawsuit
Disparaging/Sarcastic text of Ramayana in American Textbooks?
Background on Aryan Invasion Theory
Scientific Racism
India's Cultural Unity

Harmful Theory
Evidence from Indian tradition
Evidence from Archaeology
Conclusion

***
source : http://www.hinduwisdom.info/aryan_invasion_theory.htm

Wednesday, April 16, 2014

मोदींसाठी एव्हढे कराच

केलीच पाहिजेत अशी कामे...  

१. स्वतः मतदान करणे.
२. किमान ११ मित्र/नातेवाईक/परिचितांना भेटून/फोन करून मतदान करण्याची विनंती करणे.

३. ज्यांच्याकडे लोकसंवादाचे कौशल्य आहे, ज्यांचा जनसंपर्क दांडगा आहे, त्यांना यासाठी सक्रिय करण्याचा प्रयत्न करणे.

४. युद्धाची खूप तयारी केलीय पण युद्धभूमीवर उतरलाच नाही तर काय उपयोग? मतदानाचा दिवस एकप्रकारे युद्धाचाच दिवस. आजच्या काळात मतदानाद्वारेच युद्ध लढले व जिंकले जातात. म्हणून १७ एप्रिलचा दिवस अख्खा मतदान वाढण्यासाठीच खर्ची घाला.

५. मोदी पीएम होणारच आहेत, पण तगडे बहुमत मिळण्यासाठी लोकसभेची प्रत्येक जागा, प्रत्येक मत मोलाचे असणार आहे. त्या यशात माझंही योगदान असणं हा सर्वोच्च आनंदाचा विषय आहे.

६. मतदान वाढण्यासाठी आपापल्या स्तरावर जे काही करता येण्यासारखं आहे ते सारं करण्याचा संकल्प घेऊ या.

अबकी बार... मोदी सरकार

नव्या युगाची देशभक्ती
मोदींना देऊया मतशक्ती

किमान ११ जणांना हा संदेश पाठवावा, ही विनंती.
(भगतसिंग ग्रुप))

Monday, April 14, 2014

मत कुणाला देणार?


देशात सध्या निवडणुकांचे दिवस सुरू आहेत. विजयी होण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. राजकारण्यांची एक प्रकारे परीक्षाच सुरू आहे. मतदारांचीसुद्धा ही एक प्रकारे परीक्षाच आहे. डोळे उघडे ठेवून देशातल्या घडामोडींकडे पाहून आपल्याला निर्णय करावा लागणार आहे. असं म्हणतात की जनतेला त्यांच्या पात्रतेप्रमाणे राज्यकर्ते मिळतात, कारण हे राज्यकर्ते जनतेतूनच आलेले असतात. म्हणून जनतेत जागरुकता आणण्यासाठी काम करण्याची आज गरज आहे.

सत्तेतील राजकारणी धूर्तपणे आश्‍वासनांची खैरात करून, पैसे, भेटवस्तू वाटून, अल्पसंख्यकांचे लांगूलचालन करून, विरोधी उमेदवारांची निंदानालस्ती करून, सत्तेत येण्यासाठी आपला कुचकामीपणा भरून काढण्याचा प्रयत्न करतीलच. अकार्यक्षम आणि कणाहीन लोकांना क्षमा न करणे हेच आपल्या हाती आहे. आपल्या देशासमोरील खर्‍या प्रश्‍नांना समजून घेऊनच आपण ही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो.
गेल्या शतकात आपण काय काय सहन केले नाही? देशाची धुरा ज्यांच्या हाती देण्यात आली, त्यांच्या सत्तामोहापायी आपल्या महान देशाचे तुकडे होताना पाहण्याची पाळी आपल्यावर आली. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून पाकिस्तान बनवण्यात आले. यानंतरही केवळ मतांच्या लाचारीसाठी देशहिताला नख लावणारे राज्यकर्ते आपल्या नशिबी आले.
‘भारताच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे विधान देशाच्या पंतप्रधान पदावरील व्यक्तीने ९ डिसेंबर २००६ रोजी राष्ट्रीय विकास परिषदेत केले. देशाच्या गृहमंत्रीपदासारख्या जबाबदार पदावर विराजमान असलेल्या व्यक्तीने ३० सप्टेंबर २०१३ रोजी सर्व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. ‘कोणत्याही निरागस, निष्पाप मुसलमान तरुणांना संशयावरून अटक करू नका. चुकीने कोणत्याही अल्पसंख्याक व्यक्तीला अटक केल्यास त्या पोलिस अधिकार्‍यावर कठोर कारवाई करण्यात यावी.’, असे त्या पत्रात म्हटले होते. चुकीने कोणा हिंदूला किंवा ख्रिश्‍चनाला अटक केले तर चालते की काय? चुकीने कोणासही अटक करू नका असे का सांगण्यात येऊ नये?
‘मुसलमानांना तुटपुंजे कर्ज देऊ नका. त्यांना ५० लाखांपर्यंत कर्ज अल्पसंख्याक विकास महामंडळाने दिले पाहिजे. तसेच जर ते कर्ज मुसलमान फेडत नसतील तर सरकारची त्याला हरकत राहता कामा नये. तेवढी सूट त्यांना दिल्याने काही बिघडत नाही.’, असे प्रतिपादन देशावर अनेक दशके राज्य केलेल्या पक्षाच्या कर्नाटक प्रदेशाचे अध्यक्ष यांनी ६ ऑक्टोबर २०१३ रोजी केले.
अशी शेकडोंनी उदाहरणे देता येतील. पण या उदाहरणांपेक्षा अधिक घातक बाब आहे, या मंडळींची विचारधारा. स्वामी विवेकानंदांनी ‘हिंदुत्वाला’ या देशाचे प्राणतत्व संबोधले. या हिंदुत्वाला नष्ट करणे हीच या मंडळींची विचारधारा बनली आहे.
आज स्वार्थप्रेरित शक्तींच्या हाती देशाची सत्ता आहे. स्वातंत्र्यानंतर दीर्घकाळ सत्तास्थानी राहिलेल्या ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांनी या देशाचा आत्मा समजून घेतला नाही. परकीय आक्रांतांच्या मानसिकतेतूनच या देशाकडे पाहण्याची सवय या देशाचे नेतृत्त्व करणार्‍यांनी देशवासीयांच्या अंगी बाणवली. परिणामी त्याग आणि सेवा या राष्ट्रीय मूल्यांची उपेक्षा झाली.
फसवून धर्मांतरण करणारे मिशनरी आणि जिहादी दहशतवाद या मायावी आणि मुजोर शक्तींकडे केवळ स्वार्थासाठी दुर्लक्ष करण्यात येऊ लागले. जिहादी दहशतवादाला पाठीशी घालण्यासाठी ‘हिंदू दहशतवादाचे’ कुंभाड रचण्यात आले. या देशाची सुरक्षा करणार्‍या वीर जवानांमध्ये धर्माच्या आधारावर शिरगणती करून मुस्लिम समाजात फुटीरता दृढ करण्याचा प्रयत्नही सत्ताधार्‍यांनी करून पाहिला. आता कारगिल विजयात कोणत्या धर्माचे किती सैनिक, याचीही जाहीर चर्चा होत आहे.
दुसरीकडे, राष्ट्रीय विचारधारेने प्रेरित होऊन देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाणारे नेतृत्व नामोहरम करण्यासाठी सर्वच बाजूने ‘सेक्युलॅरिझमचे’च्या नावाखाली हाकाटी पिटण्यात येत आहे. राष्ट्रीय विचारधारेचे आणि विकासाचे प्रबळ प्रतिनिधी बनलेल्या आश्‍वासक नेतृत्त्वाला संपवण्यासाठी सर्वच कथित सेक्युलरवादी आकाशपाताळ एक करत आहेत.
या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘सेक्युलर’ राज्यकर्त्यांना दूर करण्याची संधी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मिळाली आहे. भारतीय जीवनमूल्यांप्रती श्रद्धा असणार्‍यांना आपले मत दिले पाहिजे. आपल्या एका - एका मतातून आपल्या राष्ट्राला बळ मिळणार आहे. मतदान हा केवळ आपला अधिकार नाही, त्याहून जास्त आपले कर्तव्य आहे. आपल्या राष्ट्रासाठी, संस्कृतीसाठी, विचारांसाठी कोण उभा आहे, हे जाणण्याचा आपल्याला अधिकार आहे. आपला समाज विखुरलेला आहे असे समजून आपल्याकडे न पाहणार्‍यांना, राजकारण्यांना दरवाजा दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. योग्यतेला, योग्य व्यक्तीला, योग्य पक्षाला, योग्य कारणांसाठी मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे.
आपल्या या छोट्याशा कृतीने फक्त ५ वर्षे शक्तिशाली राष्ट्रच लाभणार नाही, तर त्यासोबतच शाश्‍वत अशा विकासाची चेतनाही मिळेल.
सिद्धाराम भै. पाटील

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी