Sunday, April 17, 2011

भगवान महावीरांचे विचार

जीवनातली सर्वात मोठी चूक कोणती असेल तर ती स्वत:ची ओळख करून न घेणे ही
होय. आत्मपरिचय करून घेऊनच ती दुरुस्त करता येते.

संयम आणि शांती म्हणजेच अहिंसा होय.

प्रत्येक आत्मा हा स्वतंत्र आहे; कोणीही कोणावर अवलंबून नाही.

देवाचे वेगळे असे अस्तित्वच नाही. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास
प्रत्येकजण देवत्व प्राप्त करू शकतो.

प्रत्येक जीव हा मूळत: सर्वज्ञ आणि आनंदमय आहे. आनंद हा बाहेरून येत नसतो.

जीवमात्रांप्रती मनात करुणा असू द्या. घृणा आणि द्वेषाचा मार्ग हा विनाशाकडे जातो.

प्रत्येकाप्रती आदरभाव याचाच अर्थ आहे अहिंसा.

स्वत:शीच झगडा करा, बाहेरील शत्रूंशी कशाला? जो स्वत:वर विजय मिळवतो
त्यालाच आनंदप्राप्ती होते.

मनुष्य हा जळणार्‍या जंगलाने वेढलेल्या झाडावर बसला आहे. सर्व जीव-जंतु
मृत्युमुखी पडताना तो डोळ्यांनी पहातोय, पण थोड्याच वेळात आपलीही तीच गत
होणार आहे, हे त्याला उमजत नाहीय. हा मनुष्याचा मूर्खपणा नाही काय?

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी