Wednesday, March 4, 2009

"अंधश्रद्धाळू' अंनिस

श्रद्धेची वर्गवारी ही अंध आणि डोळस या प्रकारे करता येत नाही, असे श्रीरामकृष्ण परमहंस सांगतात। मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे। माणसातून "विचार' वजा केला तर शिल्लक राहतो तो केवळ प्राणी. माणूस हा विचार करणारा असल्यामुळे काही गोष्टींवर त्याची श्रद्धा असते. विचार करणारा मनुष्य श्रद्धेशिवाय जगूच शकत नाही.

"अंधश्रद्धा निर्मूलन समिती'वाल्यांचीही काही गोष्टींवर श्रद्धा असते. अंनिसवाल्यांची गांधीजींवर श्रद्धा आहे. सोनिया गांधींवर श्रद्धा आहे. धर्मनिरपेक्षतेच्या (तथाकथित) तत्त्वांवर श्रद्धा आहे. कॉंग्रेसवर श्रद्धा आहे. भारताच्या राज्यघटनेवर श्रद्धा आहे. अंनिस कधीही वरील श्रद्धास्थानांवर आघात करताना दिसते का पाहा.
समाजातून अंध समजुती, दुष्ट रूढी यांचे उच्चाटन व्हावे, सामान्य जनांची होणारी फसवणूक थांबावी, लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी या देशात मोठी चळवळ चालविण्याची आवश्यकता आहे। "अंनिस'ने हे काम करावयास हवे होते, परंतु अंनिसचे नेतृत्त्व याकामी अपयशी ठरले आहे. अंनिसच्या धुरिणांनी याकामी कुचराई केली आहे, असे खेदपूर्वक म्हणावे लागते.

जादूटोणाविरोधी कायदा येथील "पुरोगामी' राज्य सरकारने मंजूर केला नाही म्हणून अंनिसचे 300 कार्यकर्ते दि। 17 मार्च रोजी स्व-रक्ताने पत्रे लिहिण्याचा "अघोरी' प्रकार करणार आहेत. या पत्रांमुळे सरकारमध्ये संवेदना उत्पन्न होऊन सरकार गांभीर्याने विचार करेल अशी अंनिसची श्रद्धा (की अंधश्रद्धा) आहे. अंनिसवर ही नामुष्कीची पाळी यायला अंनिसच कारणीभूत आहे.

अंनिसने राजकारणापासून दूर राहणे अपेक्षित होते, परंतु अंनिसने सदैव कॉंग्रेससी लगट केली। स्वत:ला विज्ञानवादी म्हणवून घेणाऱ्या अंनिसने हिंदू धर्म आणि परंपरांविषयी शुद्ध अवैज्ञानिक आणि द्वेषपूर्ण दृष्टिकोन अवलंबिला। आपल्याला न पटणाऱ्या, माहीत नसणाऱ्या गोष्टी अस्तित्वात असूच शकत नाहीत, असा संकुचित दृष्टिकोन अंनिसने योग आणि अध्यात्म याविषयी बाळगला.

जगातील अनेक प्राचीन संस्कृती परकीय रानटी टोळ्यांच्या आक्रमणाबरोबर नेस्तनाबूत झाल्या, परंतु भारत मात्र सततच्या रानटी आक्रमणानंतरही टिकून राहिला- याचे रहस्य येथील जीवनधारेत आहे। धर्म हा या देशाचा प्राण आहे, हे अंनिसने समजून घेतलेच नाही। सुधारणा म्हणजे मोडतोड नव्हे, हे अंनिसवाल्यांना समजलेच नाही.

इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे खुळ्या समजुती आणि अंध रूढी यांचे गाठोडे आहेत, मात्र अंनिसने कधी त्याविरोधात अवाक्षरही उच्चारले नाही। परधर्मीयांकडून हिंदू धर्माचे लचके तोडण्याचे जे काम सुरू आहे, त्याला पूरक असेच अंनिसचे काम राहिले। यामुळे सुरुवातीच्या काळात काही शुद्ध हेतूने कार्य करणारे अंनिसचे कार्यकर्ते अंनिसपासून दुरावले।

अंनिसचे धुरंधर कार्यकर्ते म्हणजे ढोंगीपणा आणि कॉंग्रेसी राजकारण्याची हुजरेगिरी असे समीकरण बनले। अंनिसने आत्मपरीक्षण करावे. (आत्मपरीक्षण करणे अंधश्रद्धा आहे का, याची मला कल्पना नाही.)

अहिंसा तत्त्वाचा उदोउदो करणारे अंनिस कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदानावर दि। 17 रोजी स्वरक्ताने पत्रे लिहिण्याचा कार्यक्रम करणार आहेत। त्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा !

४ मार्च ०९ पण ४ तभा

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी