Wednesday, December 24, 2014

विमर्श - चीनशी वागायचं कसं?

ज्ञानप्रबोधिनीच्या उपासना मंदिरात ब्रिगेडियर महाजन यांच्या व्याख्यानाला उपस्थित श्रोते.

चीनच्या शत्रू राष्ट्रांशी मैत्री करून मुकाबला शक्य

ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन

डावीकडून दुर्गाप्रसाद मिणीयार, हेमंत महाजन, बसवराज देशमुख आणि सिद्धाराम पाटील
प्रतिनिधी । जपान आणि इतर अनेक शेजारी देशांबरोबर चीनचे वादाचे संबंध आहेत. शत्रूचा शत्रू मित्र या नात्याने त्या देशांबरोबर आपली मैत्री वाढवत चिनी ड्रॅगनशी मुकाबला करणे शक्य आहे. केंद्रातील नवे सरकार मोदींच्या नेतृत्त्वाखाली या दिशेने पावले टाकत असल्याचे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडअर व संरक्षण तज्ज्ञ हेमंत महाजन यांनी केले.

Tuesday, November 18, 2014

द्रष्टा - ज्याने दगडात ओतले प्राण

एकनाथजी रानडे

सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. १९ नोव्हेंबर २०१४ पासून माननीय एकनाथजी रानडे जन्मशती वर्षाला सुरुवात होत आहे, त्यानिमित्ताने…
स्वामी विवेकानंदांचे स्मारक



भारताच्या दक्षिण टोकाला कन्याकुमारी येथे समुद्रातील श्रीपाद शिलेवर उभे असलेले स्वामी विवेकानंदांचे भव्य स्मारक आता सार्या देशाला माहीत झाले आहे. तीन सागरांच्या संगमस्थळी असलेल्या या स्मारकाला दरमहा दीड लाखाहून अधिक लोक भेट देतात. सर्व स्तरातून प्रचंड विरोध होऊनही या स्मारकाच्या उभारणीत संपूर्ण देशाचे सहकार्य मिळवणारी व्यक्ती होती माननीय एकनाथ रानडे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे उद्घाटन नवी दिल्ली येथे नुकतेच, ९ नोव्हेंबर २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.

Tuesday, September 23, 2014

पाकिस्तानी जिहादी बनलाय भारतीय राज्यसभेचा खासदार

📎पाकिस्तानातून अहमद हसन उर्फ इम्रान नावाचा माणूस भारतात येतो. ISI साठी काम करतो. सिमी या जिहादी अतिरेकी संघटनेचा पश्चिम बंगाल राज्याचा प्रमुख म्हणून अनेक वर्षे काम करतो.

📎यावर कळस म्हणजे ममता बैनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसतर्फे खासदार म्हणून त्याला राज्यसभेत पाठवले जाते. मग सगळा भांडाफोड होतो.

📎 लोकसभा निवडणूक प्रचारात ममता यांनी नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते की, बांगलादेशी मुस्लिमांना हात तर लावून दाखवा.

📎पाकिस्तानातील भारतीय दूतावासातील एक वरिष्ठ महिला अधिकारी इस्लाम कबूल करून पाकिस्तानसाठी हेर म्हणून काम करत होती. आता पाकिस्तानी नागरिक असलेल्या जिहादी माणसाला खासदार बनवून थेट संसदेत पाठवणाय्रा ममता बैनर्जीबद्दल संशय बळावला आहे. ममता बैनर्जी या जिहादींसाठी काम करताहेत की काय?

📎 साधूवेषातील "रावणा"ला ओळखणे कठीण असते. भारतातील अनेक "सेक्युलर" बुद्धीजीवी, पत्रकार आणि राजकारणी देशविरोधी शक्तींसाठी काम करतात, हे मध्यंतरी उघड झाले होते. भारतातील उदारमतवादी वातावरणाचा गैरफायदा घेतात, हे अनेकदा पुढे आले आहे. कायद्यातील पळवाटा व सबळ पुराव्याअभावी या मंडळींचे फावते.

📎बांगलादेशी घुसखोरांचे समर्थन आणि आताच्या नव्या गौप्यस्फोटामुळे ममता यांच्यावरील संशय गडद झाला आहे. ममता यांची चौकशी झाली पाहिजे.

📎संदर्भ - The New Indian Express - http://www.newindianexpress.com/nation/Mystery-Surrounds-Pakistan-Citizens-TMC-MP-Post/2014/09/22/article2442700.ece

#नोंदी सिद्धारामच्या
www.psiddharam.com

Saturday, August 30, 2014

जपान, मोदी, अबे सिंझो आणि विवेकानंद

पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान दौय्रावर जात आहेत. त्यावरून एक आठवण २२ ऑगस्ट २००७ ची.
त्या दिवशी जपानचे  पंतप्रधान एबे सिंझो यांनी भारताच्या संसदेसमोर भाषण केले होते.
भाषणाची सुरुवात त्यांनी विवेकानंदांचा संदर्भ देऊन केली.

Friday, August 29, 2014

देशोदेशींचा गणपती

Displaying indonesia2000yrs.jpg
२००० वर्षापूर्वीची इंडोनेशिया येथील मूर्ती
शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपं असलेला गणपती हिंदू धर्मातील पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. गणपती हा लहान मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात. दशदिशांत आनंदाची उधळण करणारा गणपती देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगती, साहित्याचा ज्ञाता, केलेचा उद्गाता, भक्तांचा रक्षणकर्ता आहे. रणांगणापासून रणभूमीपर्यंत अग्रस्थानी राहणारा तो नेता आहे. म्हणूनच हिंदू धर्माच्या मुख्य शाखा असणाऱ्या शैव, वैष्णव, जैन, बौद्ध आदी विविध पंथांमध्ये गणपती पूजला जातो.

Thursday, August 21, 2014

विवेक विचार'तर्फे मुजफ्फर हुसेन यांचे आज व्याख्यान

सोलापूर. विवेकानंदकेंद्राचे सांस्कृतिक मासिक विवेक विचारतर्फे शुक्रवार (दि. २२ ऑगस्ट) रोजी सायंकाळी वाजता पद्मश्री मुजफ्फर हुसेन यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

Thursday, August 14, 2014

गुढीपाडवा आणि वैज्ञानिक कालगणना

जगातील सर्वाधिक विज्ञाननिष्ठ कालगणनेचे नवीन वर्ष म्हणजेच गुढीपाडवा. वर्षप्रतिपदा, नवसंवत्सर, संवत्सरी या नावांनीही हे भारतीय नवीन वर्ष साजरे करण्यात येते. युगाचा आदी अर्थात युगाचा प्रारं दिवस म्हणूनही युगादी किंवा उगादी म्हटले जाते. याच दिवशी ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. सृजनाला सुरुवात झाली अन् वेळेलाही प्रारं झाला. मुकुल कानिटकर, नागपूर यांचा स्वैर अनुवादित लेख 

Sunday, June 8, 2014

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

विवेकानंदांच्या विचारप्रकाशात नरेंद्र मोदी 

स्वाभिमानी. कणखर. भारतीय संस्कृतीचा कट्टर अभिमानी. भारताला जगद्गुरूपदी विराजमान करण्याची तीव्र तळमळ असलेला. देशभक्त. त्याग आणि सेवा या मूल्यांवर श्रद्धा ठेवून संपूर्ण जीवन कळत्या वयातच राष्ट्रार्पण केलेला. गरिबांप्रती ईश्वरी भाव बाळगणारा. प्रसंगी लीन होणारा अन्‌ आवश्यक तेव्हा वज्राहून कठोरता दाखवणारा. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी आपले जीवन घडवलेला. हिंदुत्वाप्रती मनात गौरवाची भावना मिरवणारा आणि त्याच वेळी अन्य धर्मांप्रती हृदयात सद्भाव धारण करणारा नेता देशाच्या शीर्षस्थानी विराजमान झाला आहे. 

Monday, May 5, 2014

विवेकानंद केंद्रातर्फे त्र्यंबकेश्‍वरजवळ १६ मेपासून योग शिबिराचे आयोजन

सोलापूर | विवेकानंद केंद्राच्या वतीने त्र्यंबकेश्‍वरजवळ (जि. नाशिक) पिंपळद येथे १६ मे ते ३० मे २०१४ या कालावधीत निवासी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्र्यंबकपासून तीन किलोमीटरवर सह्याद्री डोंगररांगांच्या कुशीत रम्य परिसरात विवेकानंद केंद्राचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्या ठिकाणी रोज सकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळेत विविध सत्रांचे आयोजन असेल.

Wednesday, April 23, 2014

नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीमधील एक सर्वोत्कृष्ट मुलाखत


शाज़ी ज़मां: नरेंद्र मोदी जी आपका बहुत स्वागत है.
 नरेंद्र मोदी: मेरे दर्शकों को मेरा नमस्कार

Monday, April 21, 2014

आर्य आणि अनार्य


जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे पॅरिसच्या परिषदेत मी हे म्हणणे प्रखरपणाने मोडून काढले. भारतीय आणि युरोपीय पंडितांशी मी याबद्दल वेळोवेळी बोलत आलो आहे. आर्य बाहेरून आले या सिद्धान्तावरचे माझे आक्षेप मी वेळ मिळताच सविस्तर रीतीने मांडणार आहे. माझे तुम्हाला सांगणे आहे की, आपले जुने धर्मग्रंथ स्वत: अभ्यासा आणि मग निष्कर्ष काढा.

युरोपीय लोकांना जेव्हा जेव्हा संधी मिळली, तेव्हा तेव्हा त्यांनी, ते जातील तिथल्या मूळच्या रहिवाशांना नेस्तनाबूत केले आणि तेथे ते आरामात राहू लागले. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तेच केले असेल ! पाश्‍चिमात्य लोक आपापल्या देशातल्याच साधनसंपत्तीवर अवलंबून राहून तिथे सुखात राहीलेअसते तर त्यांना जगात ऐदी, उनाड समजण्यात आले असते. म्हणून त्यांना जगात सर्वत्र भटकावे लागले. जिथे ते गेले तिथे त्यांनी कत्तली केल्या, दरोडे घातले, लोकांची संपत्ती लुटली. म्हणून त्यांना वाटते की, आर्यांनीही तसेच केले असेल ! पण याला पुरावा काय ? युरोपीय पंडितांनो, हे सारे तुमचे तर्कटच ना ? मग ते कृपा करून गुंडाळी करून तुमच्या बासनातच ठेवून द्या कसे !

कोणत्या वेदात नि कोणत्या सूक्तात असे लिहिलेले आहे की, आर्य बाहेरच्या देशातून आले ? कुठे पुरावा आहे की, त्यांनी एतद्देशीयांच्या कत्तली केल्या ? असल्या वेडपट गोष्टी बोलून तुम्हाला काय मिळते ? रामायणाचा तुमचा अभ्यास व्यर्थ आहे. आपल्या सोयीची एक कपोलकल्पित गोष्ट तुम्ही रामायणावरून रचली आहे इतकेच !

रामायणात आहे तरी काय ? दक्षिण भारतातील अनार्य जमातींचा आर्यांनी केलेला पराभव. अहा ! काय पण प्रतिभा ! रामचंद्र हे आर्य सम्राट होते ना ? त्यांचे युद्ध कोणाबरोबर चालले होते ? - लंकेचा सम्राट रावण याच्याबरोबर. जरा रामायण वाचा म्हणजे कळेल की, रावण हा रामापेक्षा काकणभर जास्तच विद्वान होता. लंका ही अयोध्येपेक्षा समृद्ध होती. आणि वानरांवर किंवा दक्षिण भारतीयांवर रामचंद्रांनी विजय तरी केव्हा मिळविला ? - ते तर सारे रामचंद्रांचे मित्र आणि सहकारीच होते. वाली आणि गुहक यांची राज्ये खालसा करून रामाच्या राज्याला जोडली होती काय? - हा खुळेपणा आता पुरे !

महासरितांच्या विस्तीर्ण पात्रांनी खंडित झालेला विराट, समतल आणि समशीतोष्ण सुखद असा आर्यभूमीचा या भूभाग आर्यसंस्कृतीच्या महावस्त्राचा भाग आहे. येथील धागा उच्च संस्कृतीच्या, विकसनशील संस्कृतीच्या आणि वनवासी संस्कृतीच्या मानवांनी - बह्वंशी आर्यांनी घडविला आहे. वर्णाश्रमधर्माच्या चौकटीत या वस्त्राची निर्मिती होत आहे. निसर्गातील स्पर्धा आणि संग्राम यांच्यावर विधायक बुद्धीने विजय मिळविण्याच्या आकांक्षेच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी हेमंगल वस्त्र विणले आहे. युरोपीय लोकांनो ! मला असे सांगा की, कोणत्या देशाला तुम्ही उन्नतीसाठी हात दिलात ? तुमच्याहून दुर्बल वंश तुम्हाला जिथे जिथे आढळले,तिथे तिथे तुम्ही त्यांचा समूळ उच्छेद केलात. तुम्ही त्यांची भूमी बळकावलीत. हे आजतागायत चाललेले आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पॅसिफिक बेटे आणि दक्षिण आफ्रिका यांचा इतिहास काय सांगतो ? तिथल्या मूळच्या जमाती आता कोठे आहेत ? पशूंची कत्तल करावी, तशी तुम्ही त्यांची निर्घृण कत्तल केली आहे. ज्या ठिकाणी असे करणे तुम्हाला शक्य झाले नाही, त्या ठिकाणची राष्ट्रे अद्यापही जिवंत आहेत.

हिंदुस्थानने असे कधीच केले नाही. आर्य हे सहृदय, उदार होते. त्यांची हृदये सागरासारखी अथांग होती आणि त्यांची प्रज्ञा हिमाचलासारखी उतुंग होती. त्यात या पशुवत जीवनाला, पाशवी आकांक्षांना तिळमात्र स्थान नव्हते.आणि माझ्या देशातल्या मूर्खांनो ! मी तुम्हाला विचारतो की, हिंदुस्थानात एतद्देशीयांच्या कत्तली झाल्या असल्या तर चतुर्वर्णांची रचना अस्तित्वात तरी आली असती काय ?

स्वत: जगण्याकरिता इतरांच्या मुंड्या मुरगाळाव्यात हे पाश्चात्यांचे ध्येय आहे. आर्यांचे ध्येय सर्वांनाच उन्नत करणे, सुसंस्कृत करणे, आर्य करणे हे आहे. युरोपीयांचे साधन शस्त्र हे आहे. आर्यांचे साधन चतुर्वर्णांची रचना हे आहे. संस्कृतीच्या निर्मितीसाठी समाजाची चार वर्णात विभागणी करणे आर्यांना आवश्यक वाटले. वर्णांचे कप्पे कडेकोट नव्हते. जो तो आपल्या साधनेने उच्च वर्णात प्रविष्ट होऊ शके. युरोपात दिसते की, सबलांनी दुर्बलांना सदैव खाऊन टाकले आहे. भारतात मात्र प्रत्येक सामाजिक नियम हा दुर्बलांच्या रक्षणासाठी आहे. म्हणून म्हणतो की, या दोन संस्कृतींचे ताणेबाणेच सर्वस्वी भिन्न आहेत.

(पूर्व आणि पश्चिम, स्वामी विवेकानंद समग्र वाङ्‌मय, खंड ५)


****

आधुनिक काळातील संशोधन आणि पुरावे
Introduction
Oriental Renaissance
Motives of the British East India Company 
Implication of Aryan Invasion Theory
Voices of dissent
Indian protests

Challenging the infallible façade of Western scholarship
Indological MacCarthyism

Race, Religion and Philology in the 19th Century 

Colonial Indology - Acceptance of A Racist Theory
California Textbook Controversy
CAPEEM Fights Discrimination Against Hindu Children with a Lawsuit
Disparaging/Sarcastic text of Ramayana in American Textbooks?
Background on Aryan Invasion Theory
Scientific Racism
India's Cultural Unity

Harmful Theory
Evidence from Indian tradition
Evidence from Archaeology
Conclusion

***
source : http://www.hinduwisdom.info/aryan_invasion_theory.htm

Sunday, March 2, 2014

माझी पहिला कविता

काल मराठी दिवस होता. आज आमच्या कार्यालयात स्वलिखित कवितांच्या वाचनाचे कार्यक्रम आयोजले गेले. कविता लिहिण्यासाठी खूप आग्रह झाल्याने मीही एक लंगडा प्रयत्न केला अन लिहिली माझी पहिली कविता…

माझी पहिला कविता

कन्नड माझी मातृभा
षा, शिक्षणाची भाषा मराठी
घरात, मित्रांत कानडी, शाळेत मात्र मराठी
संवाद होतसे
 कानडीवाचन, लेखन मराठी
बालभारती, कुमारभारतीतून शिकत गेलो मराठी
त्यातून अभिलाषा जागली, व्हावे लेखक मराठी

पुढल्या शिक्षणासाठी शहर गाठले
मराठी
बोलताना तारांबळ उडू लागली
बोलण्याच्या ओघात कानडी घुसू लागली
वाचन वाढत गेलं, वृत्तपत्रांचा लळा लागला
विचारांशी मैत्री झाली
अन् पत्रकार बनलो

कामाची गरज म्हणून लेखन करू लागलो
अनेक विषयांवर लेख पाडू लागलो
लेखांना वाचक मिळाला, कौतुकही झाले
स्वांतसुखाय लिहू लागलो, पण लेखक झालो काय?
आग्रहास्तव कविता लिहिली, पण कवी बनलो काय?

- सिद्धाराम

Saturday, January 18, 2014

विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान

 
युवक प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून रविवारी सायंकाळी सोलापूर युवारत्न पुरस्कारांचे वितरण झाले. हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटर सभागृहात कार्यक्रम झाला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते युवकांना गौरवण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंदाच्या जयंतीचे औचित्य साधून ‘दिव्य मराठी’चे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील यांचे विवेकानंदांच्या जीवनावर व्याख्यान झाले. अमित रोडगे यांनी प्रास्ताविक केले. श्वेता हुल्ले यांनी सूत्रसंचालन केले. राज सलगर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला आठ वाजता सुरुवात झाली मात्र गृहमंत्री रात्री 10.20 वाजता आले आणि पुरस्कारांचे वितरण झाले.

Thursday, January 9, 2014

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

विज्ञान आणि अध्यात्म, युवा विचार आणि बुजुर्ग चिंतन अशा कित्येक द्वंद्वांचा अद्भुत संगम म्हणजे स्वामी विवेकानंद. 12 जानेवारीला स्वामीजींची 151 वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त..

सिद्धाराम भै. पाटील, सोलापूर

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी