Thursday, April 18, 2013

धर्मसंस्थापना हीच खरी सेवा!


 समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’

Wednesday, April 17, 2013

स्वामी विवेकानंद आणि डॉ आंबेडकर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

स्वामी विवेकानंद  आणि डॉ आंबेडकर पुस्तक  प्रकाशन कार्यक्रमात प्रस्तावना  करताना सिद्धाराम पाटील 

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????




स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-book-on-swami-vivekanand-and-dr-babasaheb-ambedkar-4237448-NOR.html

Tuesday, April 16, 2013

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकाननंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन
श्रीनिवास दासरी । सोलापूर
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे सावरकरांनी म्हटले आहे. परंतु बौद्ध धर्माविषयी ते लागू होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन समरसता मंचचे प्रांताध्यक्ष रमेश पांडव (औरंगाबाद) यांनी केले. धर्म आणि धम्म समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय समाजात खºया अर्थाने समरसता येणार नाही, असेही ते म्हणाले.
vishwas lapalkar, chandrakant gadekar, bhante sumedhji, ramesh pandaw, vikram kamble, vilas bet
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-swami-vivekanad-and-dr-4237385-NOR.html

Sunday, April 14, 2013

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

दिव्य सिटी, दिव्य मराठी, 14 april 2013


सोलापूर- जातीपातीत विभागलेला समाज, अस्पृश्यता, धर्माचा विकृत अर्थ लावून होणारी फसवणूक आणि असंघटितपणा या आपल्या देशासमोरील मूलभूत समस्या आहेत. या दोषांतून मुक्त कसे होता येईल, याचा विचार स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक अंगाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक संदर्भांच्या आधारे केला. आपला समाज दोषमुक्त व्हावा, हीच तळमळ दोनही महापुरुषांची होती, असे विचार ‘विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांतून समान मुद्दे शोधण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे असे ते म्हणाले.

Saturday, April 13, 2013

गुगलचे महत्त्व अधिक, की देशाच्या घटनेचे?

गुगल ही जगातील सर्वांत मोठी ई-मेल अथवा वेब साईटशी संबंधित सूचना अथवा संवाद सुविधा पुरविणारी कंपनी आहे. संवादासाठी या माध्यमाचा वापर करणार्‍यांची संख्या अब्जावधीत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भारतातील सर्वांत मोठा आणि प्रतिष्ठित, मानचित्र निर्मिती तथा सर्वेक्षण क्षेत्रातील भारतीय सर्वेक्षण विभाग गुगलविरुद्ध दिल्लीच्या आर. के. पुरम्‌‌ येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास बाध्य झाला आणि सर्वांचे कान टवकारले गेले.

विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर पुस्तकाचे १४ एप्रिल रोजी प्रकाशन



सोलापूर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद सार्ध शती समारोह समितीतर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ पुस्तकाचे प्रकाशन रविवारी (१४ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ऍम्फी थिएटरमध्ये बौद्ध धर्मगुरू भन्ते सुमेधजी यांच्या हस्ते होणार आहे.

स्वामी विवेकानंद यांचे १५० वे जयंती वर्ष आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रकाशन होत आहे. रमेश पतंगे यांनी लिहिलेले हे पुस्तक विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभागाने प्रकाशित केले आहे.

संभाजीनगर (औरंगाबाद) येथील डॉ. आंबेडकर यांचे अभ्यासक रमेश पांडव यांचे व्याख्यान यावेळी होईल. याशिवाय प्रा. विक्रम कांबळे व प्रा. विलास बेत हे पुस्तकासंबंधी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. विवेकानंद केंद्राचे प्रांत संघटक विश्‍वास लपालकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.या पुस्तकामुळे बहुतेक करून दुर्लक्षित राहिलेले स्वामी विवेकानंदांचे सामाजिक विचार आणि त्याच पद्धतीने दुर्लक्षित राहिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे धार्मिक विचार यांचे दर्शन होते, अशी माहिती संयोजक वल्लभदास गोयदानी यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने पुष्कळ लेखन केलेले लेखक रमेश पतंगे यांनी स्वामी विवेकानंदांच्या सामाजिक विचारांचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. तो आढावा घेताना त्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये किती साम्य होते, हे दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.

((here I am giving the details of photo used on front page of ambedkar book. This photo is basically was from Babasahebs Buddhis deeksha samaroh. The photo was published in outlook magazine of 20 August 2012 issue in the article 
named The Apostate Children Of God.
link of the same is
http://www.outlookindia.com/article.aspx?281931 ))

बाबासाहेब आम्हाला क्षमा करा


आज जरी आम्ही राजकीय, सामाजीक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो आहे तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखिल आम्ही 'एक-राष्ट्र' म्हणुन उभे राहू. एक दिवस अअसाही येईल की, फाळणीची मागणी करणार्‍या मुस्लिम लीगला पण 'अखंड हिंदुस्थानच' हिताचा वाटू लागेल."                         डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन

बाबासाहेब, म्हणाले होते, "जातीयतेच्या वडवानलाने गौतम बुद्ध, विवेकानंद, ज्ञानदेव, तुकाराम, सर्वांना भस्मिभूत करुन टाकले आहे." आता हा कूपमंडुक समाज कुठे आपलीही अशीच दशा करणार नाही ना, अशी भयशंका मनाला व्याकूळ करते. म्हणून हे बाबासाहेब आम्हाला क्षमा करा.

हिंदुत्वात धर्मांतरास परवानगी नाही

Friday, April 12, 2013

लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट



भारतीय स्त्रिया पाश्‍चिमात्यांप्रमाणेच विचारक्षम व्हाव्यात, परंतु त्यांच्या चारित्र्याची किंमत देऊन मात्र नव्हे ! विचारक्षमता हे काही श्रेष्ठतम इप्सित नाही. नैतिक बल आणि अध्यात्मबल आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते. आमच्याकडील स्त्रिया काही फार शिकलेल्या नाहीत, पण त्यांचे आचरण अत्यंत पवित्र असते. स्त्री, पुरुष हा भेद विसरून आपण केवळ माणसे आहोत, अशा भूमिकेतून काम करायला शिकल्याशिवाय स्त्रियांचा खरा विकास होणार नाही. एरवी स्त्रियांकडे भोगवस्तू म्हणूनच पाहिले जाते. घटस्फोटांचे मुख्य कारण हेच आहे. जोपर्यंत स्त्रियांची स्थिती सुधारत नाही, तोपर्यंत जगाचे कल्याण होणे शक्य नाही. पक्षी कधीच एका पंखाने उडू शकत नाही.                        - स्वामी विवेकानंद


वाचक बंधू-भगिनी,
सध्या आपल्या देशातील घडामोडी आणि देशाची धुरा वाहण्याची जबाबदारी असलेल्यांचे वर्तन पाहा. देशाच्या हिताला नख लावणार्‍या शक्ती प्रबळ झाल्याचे दिसून येत आहे. संस्कार आणि नीतीमूल्ये यापासून दूर गेल्याने समाजाची होत असलेली घसरण रोखण्याऐवजी भारत सरकारमध्ये बसलेल्या मुखंडांनी अध:पतनाची परीसीमाच गाठल्याचे दिसून येत आहे. अल्पवयीन मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी लैंगिक संबंध ठेवण्यासाठी किमान वय १६ वर्षे करण्याचे विधेयक संसदेसमोर आणले गेले. रोगापेक्षा इलाज भयंकर म्हणतात, तसला हा प्रकार. समाजात अनाचार माजवण्याचाच हा प्रयत्न.
भारतामध्ये लैंगिक सहमतीसाठी प्राधान्याची अट आहे विवाह.विवाहाला भारतीय संस्कृतीत संस्कार मानले गेले आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी