Friday, July 13, 2012

तेथे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत

सोलापूर - ‘आमच्या राज्यात मुलगा आणि मुलगी असा भेदभाव केला जात नाही, त्यामुळे स्त्री भ्रूणहत्येचे प्रकार ऐकायलाही मिळत नाहीत’, अशी माहिती सोलापुरात आलेल्या ताकेलूम बिलाई या अरुणाचलच्या तरुणाने दिली. ताकेलूम हा गेली पाच वर्षांपासून पुणे येथे विधी कायद्याचे शिक्षण घेत आहे. अरुणाचल प्रदेशात लग्न मुलीकडेच असते, पण लग्नप्रसंगाचे गावभोजन मात्र मुलाने द्यायचे असते. तेथे हुंडा देण्याची पद्धत नाही, असे तो म्हणाला.

Sunday, July 8, 2012

संगमांच्या प्रश्‍नांवरून निरुत्तर का झालात?



 राष्ट्रपतिपदासाठी उभे असलेले गैरकॉंग्रेसी उमेदवार पूर्णो संगमा यांनी त्यांचे व्यक्तित्व आणि कार्यशैलीमुळे स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. त्यांनी निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रश् उपस्थित केले आहेत ते सद्य:स्थितीत भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत.

Saturday, July 7, 2012

ब्रिटेन नहीं भारत में बसती हैं मैकॉले की संतानें


अंग्रेजों ने भारत में करीब 250 साल राज किया। उनकी स्पंज रूपी व्यवस्था ने सदियों तक गंगा के किनारे से धन सोखकर टेम्स के किनारे निचोड़ा। भले ही अपने फायदे के लिए सही, लेकिन कई चीजों का विकास भी किया - मसलन रेलवे। उन्होंने कई इमारतें बनवाईं, कई शहरों को बसाया। वहीं राज-काज चलाने के लिए भारत में अंग्रेजी शिक्षा का विकास करना उनकी सबसे बड़ी जरूरत थी। हालांकि इसी शिक्षा ने आगे जाकर आधुनिक समाज की नींव रखी। हमारे यहां क्रांति का आगाज किया। लेकिन आजादी के बाद हम बौद्धिक रूप से उन्हीं के नक्शेकदम पर चलने के लिए बाध्य हो गए। आज हमारी आत्मा भले ही भारतीयता के रंग में रंगी हो, लेकिन चाल-ढाल अंग्रेजी ताने-बाने में बुनी है।

Wednesday, July 4, 2012

मुनी तरुणसागर यांनी केली मोदींची प्रशंसा

दिव्य भास्कर नेटवर्क । अहमदाबाद
क्रांतीकारी संत तरुण सागर महाराज यांनी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मंगळवारी गुरूपौर्णिमा उत्सवप्रसंगी ते म्हणाले की, गुजरातची वेगाने प्रगती होत आहे. याचे श्रेय निसंशय मोदींना आहे. गुजरातकडे पाहून वाटते की असा कर्मठ आणि झुंजार नेता दिल्लीला मिळाला तर देशाचे चित्र पालटून जाईल. मुनी तरुणसागर अहमदाबाद येथे चातुर्मास साधना करताहेत.
3 जुलै 2012


Monday, July 2, 2012

सांस्कृतिक मुळांपासून तुटणारे काश्मीर

बलबीर पुंज 
सध्या काश्मीरमध्ये असलेल्या कथित शांतीमागे लपलेले नेमके सत्य काय आहे? काश्मीर खोर्‍याची पर्यटकांना सामावून घेण्याची जेवढी क्षमता आहे त्याच्या कितीतरी पट अधिक पर्यटक यंदा जम्मू-काश्मिरात आले, कुठेही काहीही अप्रिय घटना घडली नाही. परंतु, काश्मिरातील ही शांती खरोखरच स्थायी स्वरूपाची आहे काय आणि काश्मीरची संस्कृती आपल्या मूळ स्वरूपात परतली आहे असे आम्ही मानायचे काय? यामागचे कटु सत्य हेच आहे की, सध्या दोन्ही बाजूंनी युद्धविरामाची स्थिती आहे. एकीकडे पाकिस्तान आणि दुसरीकडे दहशतवादामुळे त्रस्त स्थानिक सामान्य जनतेकडून पाठिंबा मिळत नसल्यामुळे दहशतवादी सध्या ‘तात्पुरते’ निष्क्रिय आहेत आणि दुसरीकडे फुटीरवादाची समस्या सध्या भूमिगत आहे. गेल्या काही दशकांत काश्मीर खोर्‍यात जो प्रचंड सांस्कृतिक विनाश झाला आहे त्याबाबत केंद्र सरकार आणि उर्वरित भारताने तडजोडच केली आहे आणि ही सांस्कृतिक हानी भरून काढण्याचे प्रयत्न कधीही झालेले नाहीत. त्यामुळेच दोन्ही बाजूंनी ‘जैसे थे’ अशीच परिस्थिती ठेवण्याचे धोरण राबवण्यात येत आहे.

डॉ. कलाम यांनीच सोनियांना रोखले होते

ते’ पत्र सार्वजनिक करण्याची मागणी
 वृत्तसंस्था
 नवी दिल्ली, १ जुलै
 कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी २००४ मध्ये सरकार स्थापन करण्यासाठी दावा केला असता तर त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नव्हता, या माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केलेल्या दाव्याला जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आव्हान दिले आहे.

Thursday, June 28, 2012

नितीशकुमार आणि नरेंद्र मोदी

रवींद्र दाणी, 26 जून, तरुण भारत
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी एक चूक केली. त्यांनी राजकीय संन्यास घेण्याची घोषणा करून, 2014 चे पंतप्रधानपदाचे उमेदवार, दावेदार, वारसदार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हेच असतील, असे सांगितले असते, तर ‘मोदी हे धर्मनिरपेक्ष आहेत,’ असे लॅमिनेटेड केलेले प्रमाणपत्र पाटण्यातील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आतापर्यंत जारी झाले असते. मोदी यांनी ते केले नाही आणि त्यांना धर्मनिरपेक्षतेचे प्रमाणपत्र मिळाले नाही.

सोनिया गांधी - शिवसेनेचे नवे दैवत

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिली दोन दशके सेनाप्रमुख म्हणून ओळखले जात. मात्र गेली दोन दशके हिंदू हृदयसम्राट या नावाने ते संबोधले जातात. ही नवी उपाधी त्यांच्या स्वभावाप्रमाणे अगदी स्पष्ट आहे. बाळासाहेबांनी 35-40 वर्षांत एकच चूक केली. भारतीय लोकशाहीला कलंक आणि लांछन असलेल्या 1975 च्या आणीबाणीस त्यांनी का पाठिंबा दिला हे कळले नाही.

Tuesday, May 29, 2012

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद


सिद्धाराम पाटील । सोलापूर
23 डिसेंबर 1910 रोजी विनायक सावरकरांना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. बंदिवासातील पहिल्या दिवसाच्या मन:स्थितीचे वर्णन करताना सप्तर्षी नावाच्या प्रदीर्घ कवितेत ते म्हणतात की, मी गेल्या सहा महिन्यांपासून विवेकानंदांच्या राजयोग पुस्तकाचा अभ्यास करत आहे.

Saturday, May 26, 2012

अण्णा हजारे आणि स्वामी विवेकानंद
सन २०११ या वर्षावर अण्णा हजारे यांचा प्रभाव राहिला. अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असा होता. संपूर्ण जगाने अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची दखल घेतली. कोट्यवधी भारतीयांनी त्यांच्याबद्दल नितांत आदर व्यक्त केला. अण्णांनी राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणारा आहे. समाजाची काळजी असणा-या अण्णांसारख्या काही लोकांमुळेच या देशाला माहितीचा अधिकार मिळाला. आज याच माहितीच्या अधिकारामुळे अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी