Saturday, May 11, 2013

जीबीएस : संवेदनशिलतेला आवाहन

तीन वर्षांपूर्वी एका भयंकर आजाराने (जीबीएस) मला छळले होते. नागपूरच्या एका पत्रकारालाही या आजाराने घेरल्याचे आज कळले. त्याविषयी नम्र आवाहन…

Thursday, May 9, 2013

… तर भाजपला ९७ + ९ = १०६ अन काँग्रेसला 82 जागा

येडि्डंनी असे झोपवले भाजपला-
कर्नाटकात भाजपने 40 जागा जिंकल्या. भाजपमधून बाहेर चूल मांडलेल्या येड्डींच्या केजेपीला 6 जागा मिळाल्या. मात्र, 51 जागांवर भाजप-केजेपीला (एकत्रित) विजयी उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. यात 39 जागांवर काँग्रेसला विजय मिळाला, तर 10 जागी जेडीएस आणि 2 जागांवर अपक्ष विजयी झाले. येड्डी वेगळे नसते तर भाजपला 40+6+51 = 97 जागा मिळाल्या असत्या. यात कमी फरकाने जिंकलेल्या काँग्रेसच्या 39 जागा कमी झाल्या असत्या तर काँग्रेसची 121 वरून ही संख्या 82 जागावर आली असती. म्हणजेच गेल्या वेळेपेक्षा फक्त 2 जागा अधिक. त्यातच खाणसम्राट रेड्डी बंधूंचे साथीदार व माजी आमदार श्रीरामुलू यांनीही भाजपला 9 जागांवर फटका दिला. त्यांचे चार उमेदवार विजयी झाले तर 5 जागांवर दुसर्‍या स्थानी राहिले.
सभार - दिव्य मराठी http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-OTS-why-bs-yeddyurappas-birthday-party-cancelled-4259103-NOR.html?HT2=


यातून धडा घेऊन लोकसभा निवडणुकीवेळी येडीयुरप्पा भाजप एकत्र येतील का ?

सीबीआय, सरकार आणि विधी अधिकारी

अरुण जेटली 

 -कोळसा खाण वाटप घोटाळ्याच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयात सादर करावयाचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल तयार करताना केंद्रीय कायदा मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयातील अधिकार्‍यांनी जो हस्तक्षेप केला, त्यातून सरकारवर वारंवार सीबीआयच्या कामकाजात हस्तक्षेप करण्याचे जे आरोप होतात, त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सीबीआयचे नियंत्रण हळूहळू सरकारकडून सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकार्‍यांच्या हातात जाऊ लागले आहे.

सर्वांत मोठे आरोपी ठरले आहेत-पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग!

 ‘‘सीबीआय ही संगनमत करणारी संस्था आहे, की निष्पक्ष तपास करणारी? पिंजर्‍यात बंदिस्त पोपट जसा आपल्या मालकाच्या सांगण्यावरून पोपटपंची करतो, तसा हा अहवाल आहे.’’ कोळसा घोेटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयसोबतच सरकारवरही ओढलेले हे कठोर शब्दांतील ताशेरे पाहता, पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी आणि कायदामंत्री अश्‍वनीकुमार यांना तोंड दाखविण्यासाठीही थोडीशीही शिल्लक जागा उरलेली नाही. सीबीआय आधी सरकारच्या पिंजर्‍यात बंदिस्त होते. बुधवारी ते सर्वोच्च न्यायालयासमोर आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहिले. सीबीआयची कधी नव्हे एवढी अब्रू प्रथमच चव्हाट्यावर आली. संचालकानेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्यामुळे, तर संपूर्ण सीबीआय या संस्थेची मान शरमेने खाली गेली आहे.

Sunday, May 5, 2013

स्वामी विवेकानंद : हिंदू, हिंदू राष्ट्र और हिंदू धर्म

 ‘हिंदूशब्द को आजकल, और विशेषत: राजनीतिक क्षेत्र में, एक संकीर्ण अर्थ चिपकाने की कोशिशें जारी हैं| ‘हिंदू’, अन्य संप्रदायों की भॉंति एक संप्रदाय मात्र है, ऐसा प्रचारित किया जा रहा है| अत:, जो कोई हिंदू की, हिंदू-हित की, या हिंदू-राष्ट्र की बात करता है, उसे सांप्रदायिक और अराष्ट्रीय मानने की प्रवृत्ति दिख रही है| उसे सेक्युलरराजनीति का शत्रु माना जा रहा है| एक अजीब बात यह है कि जो संप्रदायविशेष का विचार कर अपनी नीतियॉं और कार्यक्रम बना रहे हैं, उन्हें सेक्युलरकहा जा रहा है| और जो सब पंथों को समान समझो, राजनीति और राज्यशासन पंथनिरपेक्ष होना चाहिये, ऐसा कहते हैं, उन्हें सांप्रदायिक कह कर उनकी निंदा की जा रही है| वैचारिक व्यभिचार का ऐसा विचित्र उदाहरण दुनिया में शायद ही, और कहीं मिल पायेगा|
हिंदूहोने का अभिमान इस परिप्रेक्ष्य में, जिनकी १५० वी जयंति, अब अपने देश में मनाई जानेवाली है, उन स्वामी विवेकानंद के विचार क्या थे, यह जानना सचमुच उद्बोधक होगा| हमारे सार्वजनिक जीवन की कई भ्रांतियॉं दूर करने में वे सहायक होंगे|
स्वामीजी कहते हैं, ‘‘हिंदू होने का मुझे अभिमान है| मैं आप का देशवासी हूँ इसका मुझे गर्व है| (Complete works of Vivekanand. vol-3, page 381) हिंदू शब्द सुनते ही, शक्ति का उत्साहवर्धक प्रवाह आपके अंदर जागृत होगा तभी आप सच्चे अर्थ में हिंदू कहने लायक बनते हैं| आपके समाज के लोगों में आपको अनेक कमियॉं देखने को मिलेंगी, किन्तु उनकी रगों में जो हिंदू रक्त है, उस पर ध्यान केन्द्रित करो| गुरु गोविंदसिंह के समान बनो| हिंदू कहते ही सब संकीर्ण झगडे समाप्त होंगे| और जो जो हिंदू है, उसके प्रति सघन प्रेम आपके अंत:करण में उमड पडेगा|’’ (तत्रैव पृ. ३७९)

Saturday, May 4, 2013

ब. ना. जोग : उत्तम संघटक व व्यासंगी लेखक

लेखक आणि कार्यकर्ता या दोन भूमिका रेल्वेच्या रुळाप्रमाणे समांतर धावणार्‍या आहेत. त्या दोन्ही एकत्र आल्या तर त्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व समाजात उठून दिसते. त्याचे वेगळेपण सहजपणाने जाणवते. पण अशी उदाहरणे विरळच होत. तशा अपवादांपैकी एक आहेत बळवंत नारायण तथा ब. ना. जोग, रा. स्व. संघाचे सर्मपित कार्यकर्ते. उत्तम संघटक म्हणून ब. ना. जोग यांचा जेवढय़ा गौरवाने उल्लेख केला जातो, तेवढाच त्यांचा व्यासंगी लेखक व स्पष्टवक्ते, परखड विचारवंत म्हणून लौकिक आहे. साप्ताहिक विवेकचे सात वर्षे संपादक या नात्याने त्यांनी विवेकमधून व नंतर विविध नियतकालिकांमधून राष्ट्रीय प्रश्नांवर विपुल लेखन केले. वैचारिक मांडणी करणारी त्यांची मोठी ग्रंथसंपदा आहे. त्यांच्या सडेतोड लेखनाचे चाहते श्री. गोळवलकर गुरुजी, पं. दीनदयाळ उपाध्याय, स्वा. सावरकर, वाजपेयी-अडवाणी यांच्यासारखी अनेक नामवंत मंडळी होती. ‘जोग तुम्ही चांगले लिहिता’, या शब्दांत सावरकरांनी त्यांना अनेकदा प्रशस्तिपत्र दिले आहे. यावरून जोग यांच्या लेखनाची व त्यांची अभ्यासू वृत्ती ध्यानात यावी.

Thursday, May 2, 2013

जर्मन जिहादी सीरियात

जगभरात कुठेही मुसलमान आणि त्यांचा लढा म्हटलं की अल्-कायदा संघटना आलीच. फेब्रुवारी २०१२ मध्ये अल्-कायदाचा प्रमुख ऐमान अल् जवाहिरी याची एक चित्रफीत इंटरनेटवरून प्रसिद्ध झाली. तिच्यात त्याने स्पष्टपणे म्हटलं होतं की, सर्व मुसलमानांनी सीरियातल्या आपल्या बंधूंना शक्य ती मदत करावी. सीरियातल्या संघर्षात आंतरराष्ट्रीय जिहादी उतरायला तिथून सुरुवात झाली. संघर्ष सुरू होऊन अकरा महिने उलटल्यावर हे घडलं, म्हणजे, खरं पहाता उशीरच झाला.

चीनला एवढी हिंमत येण्यामागे काय कारण ?

बलवीर पुंज
गेल्यावर्षी ४०० हून अधिक आणि यावर्षी आतापर्यंत जवळजवळ १०० वेळा चिनी सैन्याने भारतीय सीमांचे उल्लंघन केले आहे. सीमोल्लंघनाच्या ९० टक्के घटनांची नोंद लडाख क्षेत्रात करण्यात आली आहे. अगदी ताज्या प्रकरणात म्हणजे, १५ एप्रिलच्या मध्यरात्री चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या दौलत बेग ओल्डी क्षेत्रात भारतीय हद्दीत १० किलोमीटर आत घुसखोरी केली होती. जवळजवळ १७,००० फूट उंचीवर असलेल्या या भागात चिनी लष्कराने तीन अस्थायी चौक्या उभारल्या आहेत. भारताने यासंदर्भात आक्षेप घेतल्यानंतरही चिनी सैनिक तेथून माघार घ्यायला तयार नाहीत. हा भूभाग आपलाच असल्याचा चीनचा दावा आहे. चीनला ही एवढी हिंमत येण्यामागे काय कारण आहे? आमचे सरकार चीनला सडेतोड उत्तर देण्यास का घाबरत आहे, हा देखील यक्ष प्रश्‍न आहे.

Sunday, April 28, 2013

तरुण भारतवर हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न


तारीख: 27 Apr 2013 20:46:53

-पोलिसांच्या सतर्कता; हिंदुत्ववादी संघटनांतर्फे निषेध
प्रतिनिधी
जळगाव, दि. २६ -
दैनिक तरुण भारतमधील प्रकाशित बातमीचा राग येऊन मुस्लिम समाजातील काही युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जमून नंतर तरुण भारतच्या गोलाणी मार्केटमधील कार्यालयाावर हल्ला करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. गोलाणी मार्केट परिसरात आल्यानंतर मात्र पोलिसांनी वेळीच सतर्कता बाळगत आणि शांततेचे आवाहन करुन हा प्रयत्न हाणून पाडला.

ड्रॅगनची पुन्हा आगळीक


तारीख: 27 Apr 2013 18:25:47

ले. जनरल दत्तात्रय शेकटकर 
 १५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी सूर्योदय होत असताना लद्दाख-चीन सीमा क्षेत्रात लाईन ऑफ कंट्रोलवर सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याकरता जबाबदार आयटीबीपीच्या (इंडिया टिबेट बॉर्डर पोलिस) अधिकारी व जवानांनी, दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ.) क्षेत्रात, एक आश्‍चर्यजनक व धक्कादायक सत्य समोर पाहिलं. ज्या जागेवर चीनचे सैन्य १९६२ च्या युद्धानंतर कधीपण स्थानीय रूपाने राहिले नव्हते, त्या जागेवर चिनी सैन्याचे जवळ जवळ ३० ते ४० सैनिक टेंट लावून उपस्थित दिसले! ही संख्या चिनी सैन्याच्या एका प्लाटूनची (एका प्लाटूनमध्ये ५० सैनिक असतात) होती. जरी चीनचे सैन्य या क्षेत्रात पेट्रोलिंगकरता येत होते, परंतु त्यांनी टेंट (तंबू) कधीच लावले नव्हते! ही जागा भारतीय क्षेत्रात जवळ जवळ १० किलोमीटर आत आहे!

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी