Saturday, October 1, 2011

अमरसिंग झोपेत काय बडबड करतात ?

चिंता
राज्यसभा खासदार अमरसिंग यांनी सरकारला चिंतित केले आहे. मात्र, सरकारची चिंता अमरसिंगांच्या आजारपणाची नाही. खासदार खरेदी प्रकरणात अमरसिंग तिहारमध्ये असताना जे बोलत होते, त्याने सरकारला चिंतित केले आहे. तिहारमध्ये असताना दिवसा तर अमरसिंग शांत राहात होते, कुणाशी फार बोलत नव्हते. पण, रात्री झोपेत त्यांची जी बडबड होत होती, त्याने सरकारला सतर्क केले आहे. अमरसिंगांची प्रकृती लक्षात घेता त्यांच्या प्रकृतीवर रात्री लक्ष ठेवण्यासाठी तिहार प्रशासनाने एक डॉक्टर तैनात केला होता.

Friday, September 30, 2011

मध्य प्रदेशात सापडले मंदिरांचं 'बेट'!

मध्य प्रदेशात खजुराहोपेक्षाही ३00 वर्षं जुन्या मंदिरांचं उत्खनन सध्या सुरू आहे.. खजुराहोची मंदिरं हे मध्य प्रदेशातील जगप्रसिद्धपर्यटनस्थळ.. कामशास्त्रावर आधारित शिल्पांमुळे खजुराहोच्या पुरातन मंदिरांना वेगळं वलय प्राप्त झाले आहे. मात्र या मंदिरांपेक्षा तब्बल ३00 वर्षं आधीची, अतिप्राचीन मंदिरं मध्यप्रदेशातल्या मोरेना जिल्ह्यात चंबळ नदीच्या खोर्‍यात सापडली आहेत. 'बटेश्‍वर मंदिर' या नावानं ओळखल्या जाणार्‍या या १0 हेक्टर क्षेत्रफळाच्या वास्तूत तब्बल २00 लहान-मोठी मंदिरं आहेत. यातील बहुतांशमंदिरं शंकर किंवा विष्णुची आहेत. भारतीय पुरातत्व विभागाच्या दिल्ली सर्कलचे अधीक्षक के.के. मोहम्मद यांनी या मंदिरांची सविस्तर माहिती जाहीर केली आहे. सर्वप्रथम १९९४ साली या मंदिराचे अवशेषमिळाले होते. त्यानंतर २00५ साली पुरातत्व खात्यानं या क्षेत्रात उत्खनन सुरू केल्यानंतर बटेश्‍वर मंदिराची ही अतिभव्य जागा जगासमोर आली. आणखी किमान १0 वर्षं हे उत्खननाचं काम चालेल, इतकी ही वास्तू भव्य आहे. 'आर्यावर्ताचे महाराजाधिराज' अशी उपाधी धारण करणार्‍या गुर्जर प्रतिहार राज्यकर्त्यांनी ही मंदिरं उभारली आहेत. इसवी सनाच्या ६ ते ११व्या शतकात गुर्जर प्रतिहार घराण्याची उत्तर भारतातल्या बर्‍याच भागात सत्ता होती.
■ मोहम्मद यांनी या निमित्तानं एक महत्त्वाचा विषय छेडला आहे.. देशात अशा अनेक पुरातन वास्तू असून त्यांचं योग्य संवर्धन व्हायला हवं असेल, तर हा विषय शालेय अभ्यासक्रमात घेतला जायला हवा, असं मत त्यांनी मांडलं आहे.
( दैनिक लोकमत, पान ६, ३० सप्टे. २०११)

Thursday, September 29, 2011

गुजरातमध्ये गोहत्येला सात वर्षांची सजा

अहमदाबाद, दि. २८ (वृत्तसंस्था) - गोमातेची हत्या करणे किंवा गायी खाटकाकडे घेऊन जाणे याविरुद्ध गुजरात सरकारने कडक कायदा केला असून, आरोपींना सात वर्षांची शिक्षा ठोठावणारे विधेयक नुकतेच विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. 'गुजरात प्राणीसंवर्धन कायदा १९५४' या कायद्यामध्ये सुधारणा करणारे विधेयक कृषिमंत्री दिलीप संघानी यांनी मांडले. याला भाजपबरोबर कॉंग्रेसच्या आमदारांनीही समर्थन दिल्याने हे विधेयक मंजूर झाले. यानुसार गोहत्येसाठी सात वर्षांचा तुरुंगवास, ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविण्यात येणार आहे. हत्येसाठी गायींची वाहतूक हाही गंभीर गुन्हा ठरणार आहे.
( दै. सामना, २९ सप्टे. २०११)

Tuesday, September 27, 2011

नक्षलवाद : कोट्यवधींचा ऍक्शन प्लॅन केवळ कागदावरच ( विशेष लेख )

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणाऱ्या लेखमालेचा हा दुसरा भाग खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...

Monday, September 26, 2011

स्पर्धा : प्रधानमंत्रिपदासाठी

मा. गो. वैद्य यांचे भाष्य
आमच्या गावाकडे एक मार्मिक म्हण आहे. ती शहरी भागातही असेलच. म्हण आहे : ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.'' एक दिवस एका भिक्षुकाला जरा बर्‍यापैकी दक्षिणा मिळाली. त्याने बाजारातून तुरी आणायचे ठरविले. त्याने पत्नीला विचारले, ''तुरीचे काय करशील?'' ती म्हणाली, ''त्याची डाळ करीन आणि छानपैकी वरण करीन.'' भटजी म्हणाला, ''नाही, तू त्याचे पुरण कर.'' पत्नी म्हणाली, ''नाही, वरणच करणार.'' पती म्हणाला, ''पुरणच कर.'' दोघांचा वाद मिटला नाही. शब्दाने शब्द वाढला आणि भटजीने, आपला नवरोजीपणा दाखवीत पत्नीला मारले. घरी तुरी आल्याच नाहीत, तरी त्यावरून वाद आणि वर पत्नीला मारणे, हा प्रकार पाहून म्हण पडली, ''बाजारात तुरी अन् भट भटणीला मारी.''

Sunday, September 25, 2011

अण्णा अंधभक्तीला चालना देताहेत का ?

'मी' पणाचा आजार अर्थात व्यक्तिपूजा हा खतरनाक रोग आहे. ही कॉंग्रेस संस्कृती आहे. व्याक्तीपुजेनेच गांधी बाबांना महात्मा बनविले होते आणि त्यांच्या हट्टापायी देशाची फाळणी. नेहरूंना देशावर थोपविण्यात आले होते. व्याक्तीपुजेचा हा आजार नसता तर अण्णा कदाचित तुम्हाला सरदारजींच्या राज्यात आंदोलन करावे लागले नसते.

Saturday, September 24, 2011

अण्णा, आता हे जरा अतीच होतंय...

अण्णा, तुमच्याबद्दल केवळ आमच्याच नव्हे तर कोट्यवधी भारतीयांच्या मनात नितांत आदर आहे. तुम्ही राळेगणसिद्धीचा केलेला कायापालट हा कोणालाही नतमस्तक व्हायला लावणाराच आहे, याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे काहीही कारण नाही.

Thursday, September 22, 2011

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????

हाँ तो साथियों..... हमारे कुछ तथाकथित बुद्धिजीवियों और सेक्युलर लोगो का कहना है कि... हिन्दू धर्म में जातिवाद है और यहाँ दलित भाइयों को प्रताड़ित किया जाता है .... सो.., उन्हें हिन्दू धर्म छोड़ के मुसलमान बन जाना चाहिए....क्योंकि मुसलमान जाति नहीं मानते हैं ........
तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथित बुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????

Monday, September 19, 2011

नक्षलवादाची विषवेल आणि तिचा देशातील विस्तार

राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील तज्ज्ञ  आणि अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून ब्रिगेडियर हेमंत महाजन हे महाराष्ट्राला परिचित आहेत. नक्षलवादाची गंभीर समस्या हे राष्ट्रीय सुरक्षेपुढील एक गंभीर आव्हान आहे. ब्रिगेडियर महाजन यांनी नक्षलवादाच्या समस्येचा सखोल अभ्यास केला आहे. नक्षलवादाचे विविध पैलू आणि तो नियंत्रणात आणण्याचा मार्ग सांगणारी लेखमाला खास दिव्य मराठीच्या वाचकांसाठी सुरु करीत आहोत. या विषयावरील लेख आठवड्यातून एकदा प्रसिद्ध होतील...
२०१० साली देशभर १ हजार ५११ नक्षलवादी हल्ले झाले. त्यात ४९० निरपराध नागरिक, २३१ पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि १९९ नक्षलवादी ठार झाले; परंतु एकाही नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला नाही. ३३ राज्यांपैकी २० राज्ये नक्षलग्रस्त आहेत. ६०४ पैकी २३२ जिल्हे, १२४७६ पैकी १६११ पोलीस ठाण्यांची हद्द, ६५०००० पैकी १४,००० गावांना नक्षलवादाने घेरलेले आहे.

Sunday, September 18, 2011

चाणक्य नीती 5 : सदैव आनंदी रहायचे...


ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट ?

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी