Sunday, April 28, 2013

ड्रॅगनची पुन्हा आगळीक


तारीख: 27 Apr 2013 18:25:47

ले. जनरल दत्तात्रय शेकटकर 
 १५ एप्रिल २०१३ रोजी सकाळी सूर्योदय होत असताना लद्दाख-चीन सीमा क्षेत्रात लाईन ऑफ कंट्रोलवर सुरक्षा व्यवस्था सक्षम ठेवण्याकरता जबाबदार आयटीबीपीच्या (इंडिया टिबेट बॉर्डर पोलिस) अधिकारी व जवानांनी, दौलत बेग ओल्डी (डी.बी.ओ.) क्षेत्रात, एक आश्‍चर्यजनक व धक्कादायक सत्य समोर पाहिलं. ज्या जागेवर चीनचे सैन्य १९६२ च्या युद्धानंतर कधीपण स्थानीय रूपाने राहिले नव्हते, त्या जागेवर चिनी सैन्याचे जवळ जवळ ३० ते ४० सैनिक टेंट लावून उपस्थित दिसले! ही संख्या चिनी सैन्याच्या एका प्लाटूनची (एका प्लाटूनमध्ये ५० सैनिक असतात) होती. जरी चीनचे सैन्य या क्षेत्रात पेट्रोलिंगकरता येत होते, परंतु त्यांनी टेंट (तंबू) कधीच लावले नव्हते! ही जागा भारतीय क्षेत्रात जवळ जवळ १० किलोमीटर आत आहे!

हे चमकते आमचे आदर्श नव्हेत


-शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळचे वर्णन करताना इतिहासकारांनी म्हटले आहे- ‘‘त्या काळी महाभयंकर स्थिती होती. हिंदूंना बाटविले जात होते.पवित्र मूर्तींच्या ठिकर्‍या होत होत्या. गायींची सर्रास हत्या होत होती. हिंदू स्त्रियांना सरळ उचलून घेऊन जात होते. तलवारीच्या टोकावर धर्मांतरे चालू होती...’’

Thursday, April 25, 2013

गुजरात: कॉग्रेसच्या हिंसक हिंदूत्वाची प्रयोगशाळा

भाऊ तोरसेकर  
१९६९ च्या गुजरात दंगलीच्या वेळी जाफ़रभाई सरेशवाला अवघा पाच वर्षाचा पोरगा होता. सतत वर्ष दोन वर्षानंतर उसळणार्‍या दंगली तो बघतच होता, त्यांचे चटके भोगतच होता. पण नंतर जीवन उध्वस्त करणारी पुढली मोठी दंगल गुजरातमध्ये झाली, ती १९८५ सालात. तेव्हा तर संपुर्ण देशातच भाजपाची धुळधाण उडालेली होती आणि गुजरातमध्ये कॉग्रेसचे माधवसिंह सोलंकी मुख्यमंत्री होते. तेव्हा तर एकट्या अहमदाबाद शहरात सलग दोनशे दिवस म्हणजे सात महिने कुठल्या ना कुठल्या भागात संचारबंदी चालूच होती.  संसदेत तर राजीव गांधींनी अफ़ाट बहूमत मिळवलेले होत. पण म्हणून गुजरातच्या मुस्लिमांना सुरक्षा लाभली नव्हती. दोन वर्षात गुजरातचा मुख्यमंत्री बदलला तरी हिंदू-मुस्लिम दंगली काही संपत नव्हत्या.

Wednesday, April 24, 2013

वृत्तपत्र बनतं कसं ? (माहितीपट)

 मी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्यत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा मराठी ' वृत्तपत्र बनतं कसं ?' या विषयावर माहितीपट सादर केला. जिज्ञासूंसाठी माहितीपट पुढील youtube लिंकवर  उपलब्ध करून देत अहे. अभिप्राय जरूर कळवा.
वृत्तपत्र बनतं कसं ?

Monday, April 22, 2013

शीतल साठे, सचिन माळी नक्षलवादीच!


Thursday, April 18, 2013

धर्मसंस्थापना हीच खरी सेवा!


 समाजात सेवेची गरज तेव्हा भासते जेव्हा धर्म स्थापित झालेला नसतो.धर्मसंस्थापनेने समाजाच्या परस्पर सहयोगातूनच सहज सेवा होऊ लागते.परस्परसंबंधातूनच सर्वांचे समग्र कल्याण होते. अशा आदर्श समाजाची रचना करण्यासाठी केलेले कार्य ही सर्वोत्तम सेवा.भारतात परतल्यावर दिलेल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांनी या विषयावर अनेक संदर्भ दिले आहेत. एकदा बोलताना स्वामीजी म्हणतात, ‘प्राचीन ऋषींनी आदर्श जीवन स्थापनेची एक अद्भुत योजना आखली होती.या योजनेवर अंमल करून प्रत्येक युगात धर्माधारित आदर्श रचना होत गेली. कालाच्या प्रवाहात आज ती योजना पूर्णपणे उलगडण्याआधीच विधर्मी,परकीय प्रभावात निष्प्रभ झालेली दिसते.’

Wednesday, April 17, 2013

स्वामी विवेकानंद आणि डॉ आंबेडकर पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात

स्वामी विवेकानंद  आणि डॉ आंबेडकर पुस्तक  प्रकाशन कार्यक्रमात प्रस्तावना  करताना सिद्धाराम पाटील 

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

डॉ. बाबासाहेब यांचे विचारधन

आणि बुद्ध रडला ...

दलित राजकारण आणि शरद पवार

क्या मुसलमान जाति नहीं मानते ????




स्वामी विवेकानंद, डॉ. आंबेडकर यांच्या मांडणीतील साम्यस्थळे

‘धर्म हा भारताचा प्राण आहे, आपण धर्म सोडला तर आपला विनाश अटळ आहे,’ ही विवेकानंदांची मांडणी; तर ‘समाज धम्माच्या आधारे चालतो, धम्माशिवाय शासन म्हणजे अराजक,’ हे बाबासाहेबांचे प्रतिपादन. तसेच ‘वंचित वर्गातील आध्यात्मिक सामर्थ्य वाढवण्यावर विवेकानंदांनी भर दिला’, तर ‘समाजातील दलित-दीन वर्गाला धम्माची सर्वात जास्त आवश्यकता आहे,’ ही बाबासाहेबांची स्पष्टोक्ती. थोडक्यात, दोघांनीही सामाजिक जडणघडणीत आणि सामाजिक प्रगतीत धर्माचे महत्त्व ठामपणे प्रतिपादित केले, हे तथ्य या पुस्तकात सूचक पातळीवर अधोरेखित केले गेले आहे. याच साम्यस्थळाचे अधिक सविस्तर विवेचन पुस्तकात येणे आवश्यक होते, असे वाटत राहते.
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-book-on-swami-vivekanand-and-dr-babasaheb-ambedkar-4237448-NOR.html

Tuesday, April 16, 2013

बौद्ध धर्माविषयी ‘ते’ लागू होत नाही !

स्वामी विवेकाननंद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुस्तकाचे प्रकाशन
श्रीनिवास दासरी । सोलापूर
धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असे सावरकरांनी म्हटले आहे. परंतु बौद्ध धर्माविषयी ते लागू होत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन समरसता मंचचे प्रांताध्यक्ष रमेश पांडव (औरंगाबाद) यांनी केले. धर्म आणि धम्म समजून घेतला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आंतरजातीय विवाह झाल्याशिवाय समाजात खºया अर्थाने समरसता येणार नाही, असेही ते म्हणाले.
vishwas lapalkar, chandrakant gadekar, bhante sumedhji, ramesh pandaw, vikram kamble, vilas bet
http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-WMAH-swami-vivekanad-and-dr-4237385-NOR.html

Sunday, April 14, 2013

विवेकानंदानाही होते बुद्धाचे आकर्षण

दिव्य सिटी, दिव्य मराठी, 14 april 2013


सोलापूर- जातीपातीत विभागलेला समाज, अस्पृश्यता, धर्माचा विकृत अर्थ लावून होणारी फसवणूक आणि असंघटितपणा या आपल्या देशासमोरील मूलभूत समस्या आहेत. या दोषांतून मुक्त कसे होता येईल, याचा विचार स्वामी विवेकानंदांनी आध्यात्मिक अंगाने तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक संदर्भांच्या आधारे केला. आपला समाज दोषमुक्त व्हावा, हीच तळमळ दोनही महापुरुषांची होती, असे विचार ‘विवेकानंद आणि डॉ. आंबेडकर’ या पुस्तकाचे लेखक रमेश पतंगे यांनी व्यक्त केले. महापुरुषांच्या विचारांतून समान मुद्दे शोधण्याची परंपरा भारतात प्राचीन काळापासून आहे असे ते म्हणाले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी