Tuesday, December 27, 2011

२०१४ पर्यंत निर्माण होईल राममंदिर

रायपूर - रायपुरच्या व्हीआयपी रोडवर भव्य राममंदिराची निर्मिती होत आहे. अयोध्येतील प्रस्तावित राममंदिरासारखेच हे मंदिर बांधण्यात येणार असून या मंदिर निर्माणातील सर्व अडचणी आता दूर झाल्या आहेत. हे मंदिर श्रद्धा, संस्कार आणि शिक्षणाचे केंद्र असणार आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-ram-mandir-at-raipur-2682172.html

Sunday, December 25, 2011

कब दुनिया को हिन्दु करने घर घर मे नरसंहार किया

आजच्याच दिवशी सन १९२४ रोजी श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. उत्तर प्रदेशाला कर्मभूमी बनविलेले वाजपेयी आज वृद्धापकाळामुळे राजकारणातून निवृत्त झाले असले तरी त्यांची मोहिनी देशवासीयांवर आजही पाहायला मिळते.

Tuesday, December 20, 2011

गीतेवरील बंदीमागे ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स चर्च

नवी दिल्ली  - गीतेच्या 'महाभारता'वरून रशियामध्ये काम करणा-या भारत, बांगलादेश, नेपाळसह अनेक देशांतील हिंदू समुदायातील लोकांनी हिंदू कौन्सिलची स्थापना करून प्रस्तावित बंदीला विरोध केला आहे. साधुप्रिय दास यांची इस्कॉनच्या रशियन विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आपली संघटना मॉस्को येथील भारतीय दूतावासाशी व पंतप्रधान कार्यालयाच्या संपर्कात आहे, असे दास यांनी म्हटले आहे.
http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-chaos-over-move-to-ban-geeta-in-russia-2656436.html

Sunday, December 18, 2011

मेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर...

निमित्त होते 'लोकसत्ता' आयोजित 'आयडिया एक्स्चेंज' या कार्यक्रमाचे. गडकरी यांनी 'प्रतिमा विरुद्ध वास्तव' आणि 'धारणा विरुद्ध वास्तव' ही पक्षाची मुख्य समस्या असल्याचे यावेळी ठामपणे सांगितले. मेधा पाटकर यांचे ऐकले असते तर मुंबईत एकही पूल बांधला गेला नसता, अशी माहितीही त्यांनी दिली....
गिरीश कुबेर - गडकरींचा कार्यक्रम कधी चुकवायचा नसतो. त्यांच्या एका कार्यक्रमात दोन कार्यक्रम असतात. जेवण आणि गप्पा. त्यांच्याकडे जेवायला जाण्यापूर्वी २४ तास आधी काहीही खायचं नसतं आणि दुसऱ्या राजकारण्याविषयी बोलायचे नसते. त्यांच्या गप्पा श्रवणीय आणि प्रेक्षणीय असतात. सर्वाच्या मनातील प्रश्न विचारतो, भाजपमध्ये सध्या नक्की चाललंय काय?
नितीन गडकरी - भाजपमध्ये सगळं व्यवस्थित चालू आहे. मी आता दिल्लीत आहे. विविध वाहिन्यांना मुलाखती देतो, तेव्हा तेही सगळं व्यवस्थित सुरू आहे, असे सांगतात. तुम्हीही ऐकलं असेल दोन वर्षांत भाजपमध्ये सर्व सुरळीत सुरू आहे. आमचा प्रॉब्लेम आहे तो इमेज वर्सेस रिअ‍ॅलिटी आणि पर्सेप्शन वर्सेस ग्राऊण्ड रिअ‍ॅलिटी. आम्ही लोकतांत्रिक पक्ष आहोत, फॅमिली पार्टी नाही.

श्रीकृष्णावरही चालला होता मजेशीर खटला

भारताच्या स्वातंत्र्ययुद्धात अनेक देशभक्तांना प्रेरणादायी ठरलेल्या भगवत गीतेवर बंदी आणण्याचा प्रयत्न रशियात सुरु आहे. २००७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयाने भगवत गीतेला भारताचे राष्ट्रीय धर्मशास्त्र घोषित करावे, असे म्हटले होते. http://divyamarathi.bhaskar.com//article/REL-bhagadgeeta-russia-ban-2650519.html
 

Saturday, December 17, 2011

या 3 गोष्टींमुळे चिदंबरम ठरतात राजापेक्षाही मोठे गुन्हेगार

नवी दिल्ली - गृहमंत्री पी. चिदंबरम हे 2 जी प्रकरणी तुरुंगात असलेले माजी दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्यापेक्षाही मोठे गुन्हेगार आहेत, असा आरोप या प्रकरणी न्यायालयीन लढाई लढणा-या सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे. यासाठी स्वामी यांनी तीन आरोपांचा आधार घेतला आहे.http://divyamarathi.bhaskar.com/article/NAT-swamy-to-testify-against-chidambaram-in-2g-case-today-2647784.html?HT1=

'लष्कर'ने वाहिली होती श्रद्धांजली

मुंबई - बहुचर्चित इशरत जहान चकमकप्रकरणी मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) २० गुजरात पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अहमदाबादच्या पोलिस आयुक्तांवारही गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

Friday, December 16, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 4)

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.

... झलक पाहूनच अमेरिकेने घाबरून काढला होता पळ


१६ डिसेंबरला जगाच्या इतिहासात एक वेगळे महत्व आहे. ४० वर्षांपूर्वी याच दिवशी बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाले होते. १९४७ साली ब्रिटिशांनी भारतवर्षाचे तुकडे करून पाकिस्तान जन्मास घातले. त्यापैकी पूर्व पाकिस्तान या नावाने ओळखल्या जाणा-या पूर्व बंगाल प्रांताला  भारताने मुक्त केले होते. या युद्धात आणखी एका देशाने महत्वाची भूमिका बजावली होती, तो देश म्हणजे रशिया.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-indo-pak-war-and-usa-us-2644811.html?HF=

केवळ ३००० बहादूर जवानांनी जिंकले होते पूर्व पाकिस्तान

1971 चे भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्यातून जगाच्या नकाशावर बांगला देश या नव्या देशाची निर्मिती हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरांनी लिहिलेला अध्याय आहे. या युद्धाचे भारताच्या इतिहासामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जगाचा सार्वभौम सम्राट होण्याचे स्वप्न पाहणार्‍या सिकंदराचा सरसेनापती सेल्यूकसचा पराभव इ.स. पूर्व 303 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी केला होता. भारत खंडावर परकीयांनी केलेल्या आक्रमणाचा संपूर्ण बीमोड करणारा गेल्या अडीच हजार वर्षांतील हा पहिला विजय म्हणून नोंदवला गेला.
http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-india--bangladesh-divya-marathi-special-2644388.html?HT1=

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी