Saturday, August 3, 2013

बाली हिंदू साम्राज्य

मध्यंतरीसर्व वर्तमानपत्रांत एक बातमी ठळकपणे झळकली, ती म्हणजे इंडोनेशियाने अमेरिकेला एक अतिभव्य सरस्वतीची मूर्ती दिली! सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. एका इस्लामी देशाने ही मूर्ती कशी दिली? ही मूर्ती बालीला तयार करण्यात आली.खरंतर इंडोनेशियात सर्वत्र हिंदुसंस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली हा इंडोनेशियातील एक प्रांत असून, पश्‍चिमेला जावा, तर पूर्वेला लोम्बोक ही बेटे आहेत. बालीला अनेक नावाने संबोधिले जाते जसे- ‘देवतांचे द्वीप’, ‘हिंदूंचे द्वीप’, ‘शांतिद्वीप’, ‘प्रणयद्वीप’ आणि ‘मॉर्निंग ऑफ द वल्डर्र्!’ आम्ही मे महिन्यात इंडोनेशियाला जाऊन आलो. बाली हे लहानसे बेट. एकंदर क्षेत्रफळ ५६२० चौरस किलोमीटर. पश्‍चिम-पूर्व १४० किलोमीटर, तर दक्षिण-उत्तर ८० किलोमीटर.

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं?

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा पाकिस्तानी नागरिक. इंजिनीयर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो अमेरिकन नौदलात इंजिनीयर म्हणून नोकरी करतो.

फितूर इस्रायली

आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी अंगवळणी पडलेली आहे. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले. 

जपानमध्ये हिंदू संस्कृती

आर्य नावाच्या उंच, गौरवर्णीय, परक्या लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक रुजवला.

अमेरिकेचे ‘हे’ ६५ दरबारी हुजरे!

नरेंद्र मोदींना विरोध केला काय किंवा त्यांचे समर्थन केले काय, भारतीय लोकशाहीत याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. गेल्या १५ वर्षांत कदाचित ते जगात सर्वाधिक चर्चित आणि तथाकथित सेक्युलर मंडळींकडून व्यावसायिक विरोधाचे बळी ठरविले गेले आहेत. परंतु, खोट्यानाट्या आरोपांवरून कथित सेक्युलॅरिस्टांनी जसजसा त्यांना विरोध केला, तसतशी नरेंद्रभाईंची वाटचाल अधिकच वेगात झाली आणि आमजनतेने त्यांना आपल्या डोक्या-खांद्यावर घेतले. आता राज्यसभेचे एक खासदार मोहम्मद अदीब यांनी अन्य खासदारांच्या स्वाक्षर्‍या करवून अमेरिकेच्या सरकारकडे एक निवेदन पाठविले आहे. नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यातील काही खासदारांनी- ज्यात माकपचे सीताराम येचुरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे- म्हटले आहे की, या निवेदनातील त्यांच्या स्वाक्षर्‍या बनावट आहेत. आता या प्रकरणाचा निपटारा आता अदीबच करतील किंवा न्यायालय.

जातीयवादाला खतपाणी घालणारी कॉंग्रेस

undefinedइस्लामी जिहादविरुद्धच्या आपल्या संघर्षात भारत यशस्वी होऊ शकतो काय? इशरत जहां चकमकीनिमित्त सरकारने जेथे एकीकडे आपल्याच गुप्तचर संस्थांना एकमेकांच्या विरोधात उभे केले, तेथेच त्या सरकारचा प्रवक्ता एका दहशतवादी संघटनेच्या निर्मितीसाठी गुजरात दंगलींना जबाबदार ठरवत आहे. अशी मानसिकता असल्यास इस्लामी जिहादींपासून सभ्य व सुसंस्कृत समाजाला रक्तरंजित होण्यापासून कसे वाचविता येणार?

Tuesday, July 30, 2013

इंग्रजीमुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त

वेदप्रताप वैदिक | Jul 30, 2013, 02:00AM IST आता इंग्रजीमुळे फायदा होतो आहे की नुकसान या जुन्याच चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.इंग्रजीमुळे फायदा कमी झाला आणि नुकसान जास्त असे माझे स्पष्ट मत आहे. कोणतीही नवी भाषा शिकल्याने फायदा होतोच. जर ती भाषा विदेशी असेल तर थोडा जास्त होतो. जागतिक  व्यापार, कूटनीती, व्यवसाय, ज्ञानविज्ञान आणि संपर्काची नवी दालने उघडली जातात. भारतात तीन ते चार टक्के लोक कामचलाऊ इंग्रजी जाणतात, याचा त्यांना फायदाही झाला आहे. नोकरी, व्यवसायात आणि समाजात त्यांचेच वर्चस्व आहे. ते भारताचे धोरण ठरवणारे आणि भाग्यविधाते आहेत. 125 कोटींचा देश हेच चार-पाच कोटी  लोक चालवत आहेत. इंग्रजाळलेले हे लोक मुख्यत्वे शहरात राहतात. तीन-चार हजार कॅलरीचे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण करतात. ब्रँडेड कपडे आणि दागिन्याने मढलेले असतात. त्यांना वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सुविधा, पर्यटनाच्या सोयी सर्व उपलब्ध असतात. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या महागड्या  शाळेत शिकतात. 

...म्हणून ‘दुर्गा’ला हटवलं

मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ // Jul 29, 2013, 11.03AM IST
दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे एका मशिदीच बांधकाम सुरू होतं. पवित्र रमझानच्या महिन्यात मशिदीचं काम सुरू असल्यानं सगळ्यांनाच आनंद वाटत होता. पण ही मशिद अनधिकृत असल्याचं लक्षात येताच एका महिला आयएएस अधिका-यानं त्या मशिदीचं काम थांबवलं. पण राजकीय नेत्यांनी राजकारण करत त्या महिलेला हटवलं.

Saturday, July 27, 2013

बाटला हाऊस चकमक खरीच; अतिरेकी शहजाद अहमद दोषी

 वृत्तसंस्था   |  Jul 26, 2013, 09:27AM IST
राजकीय चकमक
1. सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी घटनेचे बनावट चकमक असे वर्णन केले होते. ते प्रथम बाटला हाऊसला पोहोचले. नंतर आझमगडचा दौरा केला. तेथे मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन चौकशी व्हावी, असे म्हटले होते. निर्णयानंतर वक्तव्य आणि मागणीवर ठाम.

2. बाटला हाऊसची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावर खूप राजकारण झाले; परंतु नंतर सलमान यांनी घूमजाव केले, माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले होते. खुर्शीद सध्या मात्र मौन धारण करून आहेत.

गुजरात दंगलीच्या आधीपासून सक्रिय होती इंडियन मुजाहिदीन

इंद वशिष्ट | Jul 26, 2013, 03:27AM ISTनवी दिल्ली  - काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी गुजरातच्या दंगलीनंतर इंडियन मुजाहिदीन (आयएम)ची स्थापना झाल्याच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात आयएम ही संघटना गुजरात दंगलीच्या आधीपासूनच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी