Thursday, April 14, 2016
Wednesday, April 13, 2016
Sunday, April 10, 2016
सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन । बातम्या
![]() |
| दै. दिव्य मराठी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
![]() |
| दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. सोलापूर तरुण भारत । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. संचार । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
| दै. सकाळ । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमी |
दै. पुण्य नगरी । सर्वस्पर्शी बाबासाहेब विशेषांक प्रकाशन बातमीसर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन |
सर्वस्पर्शी बाबासाहेब अभिवादन विशेषांकाचे थाटात प्रकाशन
मनातील अस्पृश्यता संपायला हवी : करमरकर
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तेजस्वी आणि प्रेरणादायी महापुरूष होते. पिचलेल्या समाजासाठी त्यांनी देशभर उभ्या केलेल्या चळवळीमुळे कायद्याने अस्पृश्यता संपली; पण सामाजिक न्यायाची भावना संपूर्णत: प्रस्थापित होऊन प्रत्येकाच्याच मनातील अस्पृश्यता संपली तरच बाबासाहेबांचे स्वप्न साकार होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण करमरकर यांनी आज येथे केले.
((विशेषांकासाठी संपर्क : 8855872228))
डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विवेकानंद केंद्राच्या विवेक विचार या मासिकाकडून काढण्यात आलेल्या अभिवादन विशेषांकाचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी करमरकर बोलत होते. माजी सनदी अधिकारी विठ्ठल पाथरूट, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते राजाभाऊ इंगळे, विवेकानंद केंद्राचे संचालक दीपक पाटील, संपादक सिध्दाराम पाटील मंचावर होते.
करमरकर म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनात लहानपणापासून अनेक अन्याय झेलले. अस्पृश्यतेसारख्या अमानुष अन्यायाची धग सोसली; पण यावर त्यांची प्रतिक्रिया सूड भावनेची नव्हती. राज्यघटनेचे एकेक कलम लिहिताना त्यांनी सामाजिक न्यायाचाच विचार केला. न्यायनिष्ठा, समाजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा हे बाबासाहेबांच्या जीवनाचे पैलू होते. सामाजिक न्यायाचाच त्यांनी जीवनभर ध्यास घेतला होता.
बाबासाहेबांनी शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन या आपल्या पक्षाचे अधिवेशन आयोजित केले होते. तेव्हा वीस हजार महिला उपस्थित होत्या. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी या महिलांना स्वत:ला अस्पृश्य मानू नका, असा संदेश दिला. गुरांचा मृतदेह न वाहण्याचे आणि दारू न पिण्याचे आपल्या पतीला सांगा याच बरोबरच अर्धपोटी राहून आपल्या मुलांना शिकवा, असा महिलांना संदेश दिला, असे सांगून करमरकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या जीवनात एकच सकारात्मक बाब होती, ती म्हणजे त्यांचे माता - पिता. वडील लष्कराच्या सेवेत होते. त्यांनी मुलाच्या शिक्षणाला महत्त्व दिले. विलायतेत शिक्षणासाठी जाण्यापूर्वी बाबासाहेबांनी सयाजीराव गायकवाड यांना आपल्या तेथील शिक्षणाचा उद्देश सांगितला. तेव्हा ते म्हणाले होते की, मला राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्तव्यवस्था हे विषय शिकायचे आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी मला विषयांचे शिक्षण घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते.
प्रारंभी पाटील यांनी प्रास्ताविक केले. सागर सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी प्रशांत बडवे, कवी मारूती कटकधोंड, शांतीवीर महिंद्रकर, प्रमोद खांडेकर, प्रशांत गायकवाड यांच्यासह श्रोते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
http://epaper.lokmat.com/
Wednesday, April 6, 2016
सर्वस्पर्शी बाबासाहेब या विषयावर शनिवारी अरुण करमरकर यांचे व्याख्यान
विवेकानंद केंद्रातर्फे आयोजन
सोलापूर – विवेकानंद केंद्राचे मासिक विवेक विचारच्या वतीने शनिवारी (९ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फडकुले सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या १२५ पानी विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, विठ्ठल पाथरुट, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.
विशेषांकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रचिंतनाचे विविध पैलू आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यात आले आहे. शेषराव मोरे, रमेश पतंगे, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अभिराम दीक्षित, मुजफ्फर हुसेन, अरुण करमरकर आदी मान्यवर विचारवंतांचे लेख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लेखाचा समावेश या विशेषांकात केला आहे. मूल्य ५० रुपये असून होमगार्ड मैदानाजवळील विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात अंकाची पूर्वनोंदणी सुरू आहे.
सोलापूर – विवेकानंद केंद्राचे मासिक विवेक विचारच्या वतीने शनिवारी (९ एप्रिल) सायंकाळी ६.३० वाजता फडकुले सभागृह येथे ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांचे "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच "सर्वस्पर्शी बाबासाहेब’ या १२५ पानी विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी करण्यात येणार आहे.
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास राजाभाऊ इंगळे, राजाभाऊ सरवदे, विठ्ठल पाथरुट, प्रमोद गायकवाड, बाळासाहेब वाघमारे आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत. केंद्राचे संचालक दीपक पाटील यांनी ही माहिती दिली.
विशेषांकात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रचिंतनाचे विविध पैलू आणि त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवण्यात आले आहे. शेषराव मोरे, रमेश पतंगे, भाऊ तोरसेकर, प्रा. डाॅ. गौतम कांबळे, डाॅ. अभिराम दीक्षित, मुजफ्फर हुसेन, अरुण करमरकर आदी मान्यवर विचारवंतांचे लेख आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विशेष लेखाचा समावेश या विशेषांकात केला आहे. मूल्य ५० रुपये असून होमगार्ड मैदानाजवळील विवेकानंद केंद्राच्या कार्यालयात अंकाची पूर्वनोंदणी सुरू आहे.
Tuesday, March 15, 2016
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निबंध स्पर्धा
भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त
राज्यस्तरीय निबंध स्पर्धा
आयोजक : विवेक विचार, विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे सांस्कृतिक मासिक
स्पर्धा कोणासाठी ? पदव्युत्तर विद्यार्थी. तसेच २० ते ३० वयोगटातील कोणीही.
निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक ? १५ आॅगस्ट २०१६.
शब्दमर्यादा किती? १५०० ते २००० शब्द.
निबंधाचे विषय
१. बाबासाहेबांचे राष्ट्रचिंतन
२. बाबासाहेबांचे धर्मचिंतन
३. बाबासाहेबांचे अर्थचिंतन
४. घटनाकार बाबासाहेब
५. तरुणांचे प्रेरणास्थान बाबासाहेब
(वरीलपैकी एका विषयावर निबंध अपेक्षित.)
पारितोषिके :
प्रथम – रु. ७०००/-
द्वितीय – रु. ५०००/-
तृतीय – रु. ३०००/-.
याशिवाय सहभागींना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह.
प्रथम – रु. ७०००/-
द्वितीय – रु. ५०००/-
तृतीय – रु. ३०००/-.
याशिवाय सहभागींना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह.
निबंध पाठवण्याचा पत्ता : विवेक विचार, विवेकानंद केंद्र, १६५
रेल्वे लाईन्स, सोलापूर. ४१३००१ किंवा vivekvichar@vkendra.org
अधिक माहितीसाठी : 9769179823
Thursday, February 11, 2016
राजकारणात संस्कृतीचे राजदूत - पंडित दीनदयाल उपाध्याय
सिद्धाराम भै. पाटील
‘ज्या समाज आणि धर्माच्या रक्षणासाठी रामाने वनवास स्वीकारला, कृष्णाने संकटे झेलली, राणा प्रताप रानावनात भटकत राहिले, शिवाजींनी सर्वस्व समर्पित केले, गुरू गोविंद सिंगांच्या मुलांना भिंतीत चिणून ठार करण्यात आलं, त्यासाठी आम्ही आमच्या जीवनातील आकांक्षा आणि खोट्या आशांचा त्याग करू शकत नाही काय?’’
Thursday, February 4, 2016
पुस्तकातील प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर आहे "म'
भाषाशास्त्रातील
नावीन्यपूर्णप्रयोग
विज्ञान,
तंत्रज्ञानात नवनवीन प्रयोग होतात, त्याप्रमाणे भाषेच्या प्रांतातही प्रयोग होत
असतात. मराठी साहित्यामध्ये असाच एक आगळावेगळा प्रयोग केला आहे. सोलापुरातील लेखक
गोवर्धनलाल बजाज यांनी. मराठी भाषा लवचीक आहे. या वैशिष्ट्याचा कौशल्याने वापर करत
श्री. बजाज यांनी सुमारे १०० पानांचे एक पुस्तक लिहिले आहे. मंगलम् मंगलम्
मधुचंद्रम्! या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकातील प्रत्येक शब्दाची सुरुवात
"म’ या अक्षराने होते. अनुप्रास अलंकाराने नटलेले हे पुस्तक विश्वविक्रमी
ठरावे असे आहे.
Thursday, January 21, 2016
९०० वर्षांपूर्वी दिलेली “गिफ्ट’’ आम्ही उघडून पाहिलीच नाही !
सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धराम. ९०० वर्षांपूर्वी सोलापुरात जन्मास आलेले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे बहुआयामी होते. त्यांनी ६८ हजार वचनांची निर्मिती केली. कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात शिवयोगी सिद्धराम यांना ईश्वर मानून भक्ती करणारा वर्ग खूप मोठा आहे. परंतु त्यातील खूप कमी लोकांना सिद्धरामांच्या वचनसाहित्याची माहिती आहे. रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या या विचारांची ही शिदोरी, गिफ्ट आम्ही उघडून पाहिलीच नाही.
Saturday, January 2, 2016
श्रीपाल सबनीस उठले अन् तुम्हीच माझे शरद पवार म्हणत सगळ्यांच्या देखत भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले
श्रीपाल सबनीस यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.
संपूर्ण लेख
पुढील प्रमाणे...
Subscribe to:
Posts (Atom)
.
.
siddharam patil photo
लेखांची वर्गवारी
- bjp (8)
- congress (16)
- g b syndrome (1)
- INBOX (1)
- research (1)
- rss (2)
- shivaji (3)
- tarun bharat (2)
- अग्रलेख (2)
- अतिरेकी हल्ले (3)
- अध्यात्म (16)
- अनुभव (1)
- अन्य (3)
- आंबेडकर (14)
- आर्मी (4)
- इतिहास (23)
- इस्लाम (25)
- एस. गुरुमूर्ती (3)
- ओळख (1)
- कसाब (3)
- कार्यक्रम (1)
- केन्द्र (3)
- खळबळजनक (1)
- ख्रिस्ती (15)
- गीत (3)
- चाणक्य नीती (7)
- चीन (1)
- छायाचित्र (1)
- जटायु (2)
- जटायु अक्षरसेवा (1)
- जीबीएस (4)
- जीवन मंत्र (2)
- डॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)
- दहशतवाद (7)
- नक्षलवाद (4)
- निमंत्रण (1)
- न्यूज़ (6)
- पत्रकारिता (6)
- परिचय (9)
- पाक (2)
- पाकिस्तान (6)
- पुस्तक परिचय (7)
- पूर्वांचल (2)
- पोलिस (2)
- बातमी (9)
- बातम्या (1)
- बुद्ध (6)
- भारत (2)
- मा. गो. वैद्य (2)
- माझ्याविषयी थोडे... (18)
- मीडिया (11)
- मुकुल कानिटकर (6)
- मुलाखत (4)
- मुस्लिम जगत (9)
- मोदी (7)
- योग (5)
- राजकारण (21)
- विमर्श (6)
- विवेक विचार (15)
- विवेकानंद साहित्य संमेलन (1)
- वैचारिक (50)
- वैद्यक (5)
- शिव धर्म (2)
- सडेतोड सागर (2)
- सर्वस्पर्शी बाबासाहेब (3)
- संस्कृति (21)
- संस्कृती (5)
- सामाजिक (7)
- सावरकर (2)
- साहित्य (6)
- सिद्धरामचे लेख (11)
- सुविचार (1)
- सूर्यनमस्कार (4)
- सोलापुर (7)
- सोलापुर दंगल (2)
- सोलापुर बातमी (7)
- स्वामी विवेकानंद (1)
- स्वामी विवेकानंदांचे विचार (31)
- हिंदू (5)








